Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक
Mon, 04/11/2022 - 15:22
🗣 510 प्रतिसाद
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 105991 views

🗣 चर्चा (510)
श
श्रीगुरुजी Tue, 04/12/2022 - 16:33 नवीन
याचा अर्थ ७ वी पर्यंत हिंदी शिकावे लागले का? एकही वर्ष हिंदी नाही असा एखादा अभ्यासक्रम महाराष्ट्रात आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Tue, 04/12/2022 - 07:29 नवीन
मुळात भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. ज्याला जी भाषा लहानपणी बोबड्या बोलाने शिकवली गेली ती त्या त्या व्यक्तीची सहज येणारी बोली भाषा ठरली. आज जे सर्व मीपबाहेरील सुद्धा मराठी भाषा आणि लिपी सुद्धा जपली पाहिजे बोलणारे कितीजण धनादेश मराठीत लिहतात बरं? आणि जरी लिहला तरी सही रोमन लिपीत न लिहणारे टक्के किती?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 04/12/2022 - 08:01 नवीन
भाषा हे संवाद साधण्याचे साधन. दोन परप्रांतीय एकत्र आले आणी आपापल्या भाषेत बोलू लागले तर संवाद साधणे कठीण होते.म्हणून दोघांना येणारी आशा भाषेचा वापर केला जातो. त्यात काहीच चूक नाही. मद्रास रेजिमेंट मधे इतर भाषीय आधीकारी सुद्धा अस्खलित तामीळ भाषा बोलतो. त्यामुळेच जसा देश तसा वेश या न्यायाने स्थानिक भाषा शिकणे केंव्हाही चांगलेच. जीतक्या जास्त भाषा येतील तीतके त्या त्या स्थानिक समाजात समरस होणे सोपे आसते. भाषावार प्रांतरचना आहे हा वाद नेहमीच राहाणार. तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान करा मी तुमच्या मातृभाषेचा सन्मान करेन. मातृभाषेचा अभिमान हवाच पण दुसर्‍या भाषेबद्दल द्वेष नसावा. बाकी ज्ञान भाषा शिकणे न शिकणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन दक्षिण भारतीय एकत्र आले तर बहुतांशी आपलीच भाषा बोलतात आसे माझे निरीक्षण आहे.पण मराठी माणूस परप्रांतीय बरोबर त्याच्या भाषेत बोलतो हा त्याचा गुण आहे याचा अर्थ त्याला मराठीचा अभिमान नाही आसे मानायला कुठलाही आधार नाही. कित्येक परप्रांतीय जे मराठी मुलखात आहेत ते सुंदर मराठी बोलतात हे पण बघीतले आहे. बाकी राजकारण तर घालूच आहे.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Tue, 04/12/2022 - 20:35 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 04/12/2022 - 08:04 नवीन
भाषा हे संवाद साधण्याचे साधन. दोन परप्रांतीय एकत्र आले आणी आपापल्या भाषेत बोलू लागले तर संवाद साधणे कठीण होते.म्हणून दोघांना येणारी आशा भाषेचा वापर केला जातो. त्यात काहीच चूक नाही. मद्रास रेजिमेंट मधे इतर भाषीय आधीकारी सुद्धा अस्खलित तामीळ भाषा बोलतो. त्यामुळेच जसा देश तसा वेश या न्यायाने स्थानिक भाषा शिकणे केंव्हाही चांगलेच. जीतक्या जास्त भाषा येतील तीतके त्या त्या स्थानिक समाजात समरस होणे सोपे आसते. भाषावार प्रांतरचना आहे हा वाद नेहमीच राहाणार. तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान करा मी तुमच्या मातृभाषेचा सन्मान करेन. मातृभाषेचा अभिमान हवाच पण दुसर्‍या भाषेबद्दल द्वेष नसावा. बाकी ज्ञान भाषा शिकणे न शिकणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन दक्षिण भारतीय एकत्र आले तर बहुतांशी आपलीच भाषा बोलतात आसे माझे निरीक्षण आहे.पण मराठी माणूस परप्रांतीय बरोबर त्याच्या भाषेत बोलतो हा त्याचा गुण आहे याचा अर्थ त्याला मराठीचा अभिमान नाही आसे मानायला कुठलाही आधार नाही. कित्येक परप्रांतीय जे मराठी मुलखात आहेत ते सुंदर मराठी बोलतात हे पण बघीतले आहे. हनुमान चालीसा का भीमरूपी महारूद्रा, बाकी राजकारण तर चालूच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/12/2022 - 14:10 नवीन
इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने शिकलीच पाहिजे. मराठी मातृभाषा व राज्याची भाषा असल्याने शिकलीच पाहिजे. हिंदी किंवा इतर भाषा ज्यांना शिकारच्यात त्यांनी शिकाव्या, ज्यांना शिकायच्या नाहीत त्यांच्यावर शिकण्याची सक्ती अजिबात नको. जनगणनेत मी फक्त मराठी, इंग्लिश व संस्कृत या तीनच भाषा येतात असे सांगणार आहे.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Tue, 04/12/2022 - 20:46 नवीन
मी मराठी आणि हिंदी येते असे लिहिणार. ज्याचे पोट इंग्रजी किंवा संस्कृतवर भरते त्याने तसे लिहावे. माझे पोट मराठी आणि हिंदीवर भरते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/12/2022 - 16:53 नवीन
चेन्नई मध्ये मारवाडी ( सुवर्ण व्यावसायिक )आणि बोहरी ( मुस्लिम) ज्यांची हार्ड वेअर ची दुकाने आहेत ते अस्खलित तामिळ बोलताना मी पाहिलेले आहेत. याचे कारण तेथील लोकान हिंदि येत नाही/ आले तरी ते बोलत नाहीत. याउलट आपण मराठी माणसे आपसात बोलताना सुद्धा मराठीत बोलत नाही. ए एफ एम सी मध्ये माझ्या वर्गात ११ मराठी होते. त्यापैकी २ जण आपसात सुद्धा मराठी अजिबात बोलत नाहीत. जर इतर लोक अमराठी असतील तर तुम्ही सर्वाना समजावे म्हणून हिंदीत बोलता हे समजू शकतो. माझ्या कडे येणारे अनेक गुजराती कच्छी रुग्ण माझ्याशी छान मराठीत बोलतात. (काही उच्चार चुकीचे असतील.) याउलट शिंदे आणि भोसले यासारखी आडनावे असणारी माणसे आपल्या ४-५ वर्षाच्या मुलांशी हिंदीत बोलताना दिसतात तेंव्हा मात्र संताप येतो. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या मुलांना मराठी अजिबात येत नाही आणि दुर्दैवाने या गोष्टीची लाज वाटण्या ऐवजी त्यांना त्याचा अभिमान वाटतो. लष्करात असताना आम्ही आमच्या मुलांशी कटाक्षाने मराठीत बोलत असू. त्यामुळे आमची मुले इंग्रजी माध्यमात असूनही आपसात किंवा मराठी मित्रांशी व्यवस्थित माहित बोलतात. माझ्या मुलीने पंजाबी मुलाशी प्रेम विवाह केला आहे पण तो समोर असला तरी आम्ही मराठीतच बोलतो आणि आता त्याला मराठी बऱ्यापैकी समजू लागले आहे. माझ्या मुलीला मी पंजाबी शिकून घे म्हणून मागे लागलो होतो पंरतु माझ्या जावयाला किंवा व्याह्याला पंजाबी लिहिता वाचता आणि बोलता ही येत नाही. केवळ समजते (तीन पिढ्यापासून लष्करात असल्याचा परिणाम) त्यामुळे मुलीला पंजाबी शिकणे दुरापास्त झाले आहे. मला गुजराती समजते वाचता येते पण सराव नसल्याने बोलता येत नाही (याची खंत आहे). आणि मी मराठी हिंदी आणि इंग्रजी जवळ जवळ ९५ % (कदाचित जास्त) शुद्ध बोलतो आणि अर्धवट हिंदी/ इंग्रजी बोलण्यापेक्षा शुद्ध हिंदी शुद्ध इंग्रजी किंवा शुद्ध मराठी बोलण्याबद्दल माझा कटाक्ष असतो. एवं प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा परंतु दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/12/2022 - 17:10 नवीन
प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा परंतु दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Tue, 04/12/2022 - 19:17 नवीन
तुम्हाला हिंदी भाषेचाा एवढा द्वेष का आहे हे समजेल का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/12/2022 - 19:35 नवीन
शाळेपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र हिंदी सक्तीने लादली जात असल्याने, हिदीसमोर माझ्या मातृभाषेला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने व हिंदीभाषिकांच्या मगरूरी आणि आडमुठेपणामुळे या भाषेविषयी चीड निर्माण होत आहे.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Tue, 04/12/2022 - 20:23 नवीन
मग तुम्ही तुमच्या मुला मुलींना मराठी शाळेत घातलत की कॅान्व्हेंट मधे की पुर्ण किंवा सेमी इंग्रजी माध्यमात?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/13/2022 - 02:57 नवीन
मराठी शाळेत
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 04/12/2022 - 19:47 नवीन
प्रत्येक भाषेचा अभिमान, सन्मान, आदर असावाच. कोणतीही भाषा हीन नाही, प्रत्येक भाषेतून ज्ञान मिळतेच. दुसऱ्याची भाषा शिकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गरज. जर आपण पर प्रांतात गेलो असू आणि तेथे संवाद साधणे आपल्याला गरजेचे वाटत असेल तर ती भाषा आपण शिकतो किंवा शिकण्याचा प्रयत्न तरी करतो. नोकरी निमित्ते गुजरातच्या खेडोपाडी फिरण्याचा संबंध आला आणि नाईलाजाने गुजराती शिकावीच लागली. त्यात गैर अथवा कमीपणा वगैरे काहीच नाही, उलट मातृभाषे व्यतिरिक्त अजून एक भाषा शिकायला मिळाली ह्याचा आनंदचं आहे. अमेरिकेत आपले भारतीय आपली मूळ नावे बाजूला ठेवून अमेरिकन नावे अंगिकारतात. संदीपचे सँडी, राजीवचे रॉजर, सलीमच्या सॅम वगैरे, का ? तर म्हणे त्यांना आपली नावे उच्चारता येत नाहीत. मला हे पटत नाही. आपले नाव उच्चारायची जास्त गरज कोणाला आहे ह्यावरून मूळ नाव ठेवायचे का बदलायचे हे ठरत असावे. मी ज्या कंपनीत काम करत होतो तेथे अनेक मार्केटिंग कॉल्स यायचे व त्यांना आमची जास्त गरज असायची. ते माझे 'सौंदर्य' नाव खूपसे बरोबर उच्चरायचे. तेच जर मला त्यांची गरज असती तर त्यांच्या सोयीसाठी मला देखील माझे नाव 'सँडी' वगैरे करावे लागले असते. अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/12/2022 - 20:28 नवीन
अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.
कधी कधी हिंदी मनुष्यही मराठीचा पर्याय स्विकारल्यानंतर उपलब्ध नसतो. मग तसेच वाट बघत बसावे लागते, शेवटी इंग्रजी किंवा हिंदी पर्याय घ्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 04/13/2022 - 07:43 नवीन
पण वरती सुरवातीच्या प्रतिसादांत लिहिले आहे ते बरोबर आहे. दक्षिणी राज्यांत मुस्लिम लोक खूप आहेत. खासगी बसेसवर तर हिंदी बोलणारेच कर्मचारी असतात. त्यामुळे काम होते. स्थानिक भाषा किंवा इंग्रजी येत नसल्याने काहीही अडत नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 04/13/2022 - 09:32 नवीन
"हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?" चेन्नाई,बेंगळूरू,कोची.. दक्षिणी राज्यांतील अनेक हिंदी भाषिक दुकानदार उत्तम स्थानिक भाषा बोलतात. मारवाडी समाजातील लोक तर जेथे जातात तेथील भाषा चटकन आत्मसात करताना दिसतात. पुणे शहराबाबतही तसेच म्हणता येईल. जे नोकर्या करण्यासाठी आपल्या राज्याबाहेर जातात त्यांना मात्र स्थानिक भाषा आत्मसात करायला वेळ लागतो. हैद्राबादमध्ये अनेक वर्षे राहुन तेलुगु बोलता न येणारे मराठी असंख्य दिसतील. बेंगळूरमध्ये २/२.५ लाख मराठी सहज असतील पण कन्नड बोलता लिहिता येणार्यांची संख्या नगण्य असेल हे खात्रीलायक सांगू शकते. दोष त्यांचा नाही. मोठ्या महानगरांमध्ये स्थानिक भाषेशिवाय तुमचे व्यवहार चालू राहू शकतात. व्यापार्/धंदा असेल तर मात्र स्थानिक भाषा आत्मसात करण्यावाचुन पर्याय नसतो. मुंबईत अमराठी दुकानदार(गुजराती/मारवाडी) मराठी उत्तम बोलू शकतात पण टॅक्सीवाले तसे मराठी बोलू शकणार नाहीत कारण बोलणे मर्यादित असते-"कुठे जायचे आहे? व बील किती झाले?" एवढेच मर्यादित असते. हिंदीचा दुस्वास हा मुख्यतः तामिळनाडूत दिसतो कारण "आमची(च) भाषा सर्वात श्रेष्ठ व जुनी" हा दुराभिमान हे आहे. गंमत म्हणजे अनेक तामिळ, विशेष करून मुंबईतील वा अमेरिकेतील, अगदी स्पष्ट हिंदी बोलताना दिसले आहेत.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 04/14/2022 - 19:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/13/2022 - 16:01 नवीन
कुठल्याही प्रदेशातील भारतीय लोकांना आपल्या प्रादेशीक भाषांचा फुकाचा पोकळ अभिमान असतो मात्र आपल्या राज्यात आलेल्या परभाषकाने ती शिकावी, ती शिकण्याच्या सहज संधी त्याला उपलब्ध करून द्याव्यात यासाठी कुठलेही चांगले प्रयत्न करायची त्यांची तयारी नसते. मराठीसाठी गळे काढणार्‍या कुणालातरी ड्युओलिंगो सारखे एखादे मराठी शिकवणारे अ‍ॅप तयार करावेसे वाटते का? कि सरकार आपली मराठी भाषा, संस्कृती इतरापर्यंत पोचवण्यासाठी काही चांगले प्रयत्न करते?व नुसत्या पाट्या मराठीत करायला लावले की झाले? एखाद्या हिंदी भाषकाला मराठी शिकायची असेल तर एकही चांगले माध्यम उपलब्ध नाही. तीच गत तमिळची किंवा बंगालीची. राष्ट्रीय स्तरावर कुठलीही भाषा सहजपणे घरबसल्या शिकता येईल असा एक तरी उपक्रम या माहिती तंत्रज्ञानाच्या बहारीच्या काळात आहे का? वेबसिरीज, सिनेमा या माध्यमांमुळे एखादी भाषा शिकावीशी वाटते पण ते करायचे कसे? अमित शहा सुद्धा उंटावरूनच शेळ्या हाकताहेत. हिंदी शिकण्यासाठी तमिळ किंवा तेलुगुमध्ये चांगला कंटेंट उपलब्ध करून दिला तर भाषा शिकण्याची आवड असणार्‍यांना सोयीचे ठरेल. हिंदीभाषकांनीसुद्धा आपला हेका सोडून आवडीने इतर भाषा शिकायला हव्यात. उप्र, मप्र, हरयाणा इथल्या एकाभाषक जन्तेला इतर भाषा, संस्कृती याबद्दल काही माहिती कशी मिळणार? मिळाली तर फक्त स्टिरियोटाईप्स कळतील. रेमडोक्यासारखे आमची भाषा राष्ट्रभाषा, आमची भाषा नोबेलविजेत्यांची भाषा, आमची भाषा प्राचीन भाषा असले नुसते गंड पाळुन त्या भाषेचा कसला उद्धार शक्य आहे? माझेच उदाहरण सांगतो. मला बंगाली आणि मल्याळम या भाषा शिकण्याची फार इच्छा आहे. पण पुस्तके वगळता कुठलेही चांगले माध्यम मला मिळाले नाही. संस्कृतसाठी मात्र एनपिटीएलचे नितांतसुंदर कोर्सेस फुकटात उपलब्ध आहेत ते तरी बरे. कोरियनसारखी भाषा आज इतकी पॉप्युलर आहे, ती सहज शिकली जाते, प्रचंड कंटेंट उपलब्ध आहे आंतरजालावर तो देखिल मोफत. जर्मनसाठी गोएथे इंस्टिट्युट आहे, फ्रेंचसाठी आलियांझ फ्रान्स्वा. कुठल्या भारतीय भाषेसाठी असे व्यासपिठ उपलब्ध आहे? का फुकाचा आपल्या भाषिक वैविध्याचा डांगोरा पिटायचा?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/13/2022 - 16:37 नवीन
Ling-App, Shoonya, Marathi Shala, Learn Marathi, Letter2Sound (Marathi), Marathi Dictionary, uTalk Marathi अशी अनेक Apps मराठी शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्रात मराठी जनतेला सक्तीने हिंदी शिकवित असल्याने परप्रांतीयांना मराठी शिकण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे फारसे कोणी मराठी शिकत नसावे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/13/2022 - 18:42 नवीन
तुम्ही फक्त तर्काने किंवा अर्धवट माहितीने लिहिले असावे अशी शक्यता आहे. माझा आंजावरुन भाषा (हिंदी आणि मराठी) शिकवण्याचा अनुभव सांगतो. कोणतीही भाषा शिकण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पुरेसा वेळ देणे आणि चांगली स्मरणशक्ती. मी महाराष्ट्रात राहणार्‍या तमिळ ,मल्याळी ,कन्नड ,तेलुगू भाषिकांना मराठी शिकवतो. अगदी मोफत. माझा अनुभव किंवा निरीक्षण असं आहे की लोक आपल्या रोजीरोटीला आणि कौटुंबिक गोष्टींना आधी महत्व देतात. यातून वेळ उरला तर मग जिथे पोट भरतो तिथली भाषा वगैरे शिकायला बघतात. ते सुद्धा स्थानिकांशी रोजचा संवाद अधिक सुकर व्हावा म्हणून. मराठी ही यांची राज्यभाषा आहे. ती न शिकता आपण हिंदीतून बोलून इथली राज्यभाषा शिकणं टाळतोय हे योग्य नाही असं काही त्यांना वाटून ते मराठी शिकत वगैरे नाहीत. जाता जाता सहज होण्यासारखं असेल तर शिकू मराठी. असे विचार असतात. मग इतकी तीव्र इच्छा असल्यावर त्याचे फलित काय असणार? आणि हे मी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंपुठा इथे किमान ७+ वर्षांपासून राहणार्‍या दक्षिण भारतीयांबद्दल बोलतोय. ते सुद्धा सुशिक्षित द.भारतीय बरं का! झाडून सगळे द. भारतीय असेच असतात असं नाही. काही आवडीने शिकणारेही असतात. पण त्यांचे प्रमाण तुरळक असते. सुशिक्षित हिंदीभाषिक हे मराठी शिकायला तयार असतात. पण त्याचं कारण दोन्ही भाषा संस्कृतोद्भव असणं ,दोन्हींची लिपी एकच असणं बरेचसे शब्द समान असणं या गोष्टी आहेत. या गोष्टींमुळे त्यांना मराठी शिकणं सोपं जातं. तेच यांना तमिळ किंवा मल्याळी शिकणं कठीण जातं. महाराष्ट्रात रस्त्यावर ,हातगाडीवर व्यवसाय करणारे , रिक्षा , टॅक्सीचालक असे उत्तरभारतीय हे मराठी शिकायला सर्वात नाखुष असतात. शिकवायला कोणी तयार असलं तरी शिकण्याची फारशी कुवत नसल्याने , त्यांचं त्यामुळे फारसं अडत नसल्याने मराठी शिकत नाहीत. दक्षिण भारतीय हे उत्तरेकडच्या भाषा हे न्यूनगंडामुळे किंवा आपण हिंदी शिकलो नाही तर मागे पडू या भितीने हिंदी शिकायचा प्रयत्न करतात. तितका न्यूनगंड बॉलीवूडचे सिनेमे आणि दक्षिण भारतात पसरलेले हिंदीभाषिक यांनी नक्कीच निर्माण केला आहे. हिंदी पट्ट्यात व्यापार वाढवू इच्छिणारे दक्षिण भारतीय लघुउद्योजक/व्यापारी किंवा केंद्र सरकारचे उत्तरेत नोकरी मिळालेले दक्षिण भारतीय कर्मचारी यांनी हिंदी शिकली तर समजण्यासारखं आहे.पण जे यात येतच नाहीत ते दक्षिण भारतीयदेखील हिंदी येत नसल्याचा न्यूनगंड आणि भिती बाळगून आहेत. हिंदीची ही दहशत नक्कीच निषेधार्ह आहे. एक तमिळ माणूस आणि एक तेलुगू माणूस दोघांना तमिळमधून किंवा तेलुगूमधून व्यवस्थित बोलता येत असेल तर त्यांनी दोघांनाही धड येत नसलेल्या हिंदीतून का बरं बोलावं?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/15/2022 - 09:36 नवीन
भाषिक अस्मिता हि आपली पोळी भाजून घेण्याची चांगली सोय असल्यामुळे राजकारण्यांची अतिशय आवडती असते. लष्करात असणारे सर्व दक्षिण भारतीय आपोआप हिंदी शिकून घेतात. लषकरी अधिकारी ज्या रेजिमेंट मध्ये असतात त्या रेजिमेंटचे भाषा आपोआप शिकून घेतात. जसे सॅम माणेकशॉ गुरखा रेजिमेंट मध्ये होते त्यामुळे त्यांना गोरखली भाषा उत्तम येत असे. असेच माझे तीन चार मित्र गुरखा रेजिमेंट मध्ये होते त्यामुळे त्यांना गोरखाली भाषा उत्तम येते आणि आमचा वर्गमित्र आता नेपाळ लष्कराच्या वैद्यकीय विभागाचा महासंचालक आहे त्याच्याशी छान गोरखाली भाषेत संवाद करतात ज्या मित्रांचे पोस्टिंग पंजाब रेजिमेंट मध्ये होते ते पंजाबी शिकले ज्या अमराठी मित्रांचे पोस्टिंग मराठा किंवा महार रेजिमेंट मध्ये होते ते मराठी शिकले. कुठेही कुणाची अस्मिता दुखावली नाही कि अहंगंड दुखावला नाही. आणि यात व्यवसाय धंदा करण्याचा किंवा पैशाचा प्रश्न नव्हता. माझे कोची ला पोस्टिंग होणार होते तेंव्हा मी मल्याळी शिकायला सुरुवात केली होती आणि ती वाचायला यायला लागली परंतु पोस्टिंग विशाखा पटणम ला झाले आणि मी तेलगू शिकेपर्यंत( एक वर्षातच) परत गोव्याला बदली झाली. आणि मग ते राहूनच गेले याची आता खंत वाटते. हिरानंदानी रुग्णालयात माझ्या दोन्ही सहकारी (एक मल्याळी आणि दुसरी पंजाबी) रुग्णांशी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांशी उत्तम मराठी बोलत असत. आणि दोघीही जन्मापासून कोट्याधीश आहेत( एक पेडर रोड वर जन्म गेलेली आणि दुसरी हिरानंदानी मध्येच राहत असलेली). मूळ मुद्दा मराठी बोलणे हे त्यांना कमीपणाचे वाटले नाही (बिलो डिग्निटी) किंवा यांचा इगो दुखावला नाही. याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 04/15/2022 - 09:58 नवीन
याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.
जया बच्चन यांनी बक्कळ पैसे कमावले आहेते हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करुन, मराठी चित्रपटांत (एक अपवाद आहे त्यांच्या मेकअपमनने जेव्हा एक मराठी चित्रपट निर्माण केला होता तेव्हा त्यात जया व अमिताभ बच्चन यांनी अतिथी कलाकार म्हणून भूमिका केली होती) नव्हे. हिंदी चित्रपटांत अभिनय ही त्यांची आवड आणि कमाईचे साधन आहे. या संबंधित एफटीआयआय ही संस्था ज्यात त्यांनी शिक्षण घेतले ती पुण्यात आहे आणि पुढे त्यांचे कार्यक्षेत्र अर्थात चित्र निर्मिती संस्था व बहुसंख्य स्टुडिओज् हे मुंबईत आहेत, म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण आणि व्यवसाय करण्यास त्यांना महाराष्ट्रात यावे लागले. अर्थात एनएसडी ही एक संस्था दिल्लीत देखील आहे पण तिथल्या अभिनय शिक्षणाचा बाज वेगळा आहे त्यामुळे ज्याला एफटीआयआय च्या पद्धतीचे अभिनय प्रशिक्षण हवे असेल त्याला एनएसडी हा पर्याय समर्पक असेलच असे नाही. असो. समजा एफटीआयआय सारखी संस्था आणि विविध चित्रनिर्मिती संस्था / स्टुडिओज् यांची उभारणी जर उत्तर भारतातच केली तर उत्तर भारतीय मंडळींना येथे येण्याची गरज भासणार नाही व महाराष्ट्राच्या लोकसंख्येत अतिरिक्त भर पडून जो सोयीसुविधांवर ताण येत आहे तोदेखील येणार नाही. अर्थात अशा वेळी बॉलीवूड महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही छापाची विधाने मराठी नेतेमंडळींकडून केली जातात त्या दुटप्पी वर्तनाचीही नोंद घ्यावीच लागेल. म्हणजे यूपीत स्टूडिओ बनवायला विरोध आणि इथल्या स्टुडिओत येऊन काम केले तर आमच्या जीवावर कमविता असे डबल स्टँडर्ड विधान करणे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 04/15/2022 - 10:05 नवीन
यातही विरोधाभास असा की जया बच्चन या कट्टर मोदीविरोधक आहेत. हिंदी आग्रह देशभर धरलाय मोदींनी (आणि आता त्यांच्या तर्फे अमित शाह यांनी). म्हणजे हिंदी आग्रहाबाबत जयाजी मोदींसोबत आहेत का? समजा तसे असेल तर हाच हिंदी आग्रह बंगालमध्येही धरण्यात आला तर जयाजींचे काय मत असेल? समजा
मुंबईत असताना मी मराठी बोलणार नाही केवळ हिंदीतच बोलेन
असा पवित्रा त्यांनी घेतला आणि कोलकात्यात गेल्यावर या महानगरात
हिंदीत कामकाज चालणार नाही प्रत्येक कोलकातावासियाला बंगाली आलेच पाहिजे
अशी उलट भूमिका घेतली तर मात्र याबाबत जया बच्चन यांचा निषेधच करावा लागेल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/15/2022 - 17:36 नवीन
जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही !
मुंबईत कित्येक वर्षे राहणार्‍या, बक्कळ पैसे कमावणार्‍या किंवा जेमतेम पोट भरणार्‍या बर्‍याच लोकांना मराठी येत नाही. "हम हिंदीमें ही बात करेंगे" चा संदर्भ वेगळा होता (मला आठवते त्याप्रमाणे) त्यांनी इंग्लीश मध्ये बोलण्याला विरोध करत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते होते तेव्हा त्याला कसलाही भाषिक, प्रादेशिक, राजकीय विखार नव्हता. "हम हिंदीमें ही बात करेंगे" हे वाक्य पकडून तिच्या विरुद्ध राळ उठवण्यात आली !
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 04/15/2022 - 18:05 नवीन
ते विधान मराठी विरोधातच होते. https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%83-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE-108090700004_1.htm
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/16/2022 - 14:30 नवीन
हे पण मोडतोड केलेले वृत्त वाटते. मला आठवतंय त्या नुसार त्या समारंभात इतर लोक इंग्लीशमध्ये बोलत होते, त्या पार्श्वभुमीवर जया बच्चन तसे म्हणाल्या होत्या. आंजावर त्या समारंभाचे कव्हरेज सापडले नाही (मला तरी... आपणास सापडल्यास नक्की द्या) सगळ्या बातम्या राज ठाकरे आणि जया बच्चनच्या वादाच्या दिसतात.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 14:39 नवीन
तोच संदर्भ आहे. फार जुना (२००८) असल्याने कदाचित वर्तमानपत्रांच्या लिंक्स सापडणार नाही. द्रोण चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी घडलेली घटना आहे. https://youtu.be/-4sBKE9aVQc व्हिडीओ २ मिनिटे १० सेकंदापुढे पाहा. सर्व स्पष्टीकरण मिळेल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/16/2022 - 15:23 नवीन
चेतन सुभाष गुगळेजी, व्हिडीओ संदर्भासाठी धन्यवाद ! पण आधीची दृष्ये त्यात दाखवली नाहीत, विशेषतः " समारंभात इतर लोक इंग्लीशमध्ये बोलत होते" हा. बाकीचे लोक इंग्लीश मध्ये बोलत होते, हिंदी सिनेमाचे प्रमोशन आणि इंग्लीश का ? असे म्हणत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते पण पुढे " महाराष्ट्रके लोग हमें माफ करें " या विधानाने त्यांचा घात केला. कदाचित मराठीत नीट बोलता येणार नाही म्हणून त्या असे म्हणाल्या. असो. या संदर्भात काही सापडले तर मी नक्की पोस्ट करेन !
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 15:35 नवीन
निदान माझ्या माहितीत (ही माहिती अर्थातच त्यावेळच्या प्रसारमाध्यमांमधूनच मिळालेली) तरी मराठी विरोध म्हणूनच त्या तसे बोलल्या होत्या. २००८ सालची गोष्ट आहे हे ध्यानात घ्या. त्यावेळी राज ठाकरे मराठी सक्ती हा विषय घेऊन एकदम फॉर्मात होते. मनसेला बस्तान बसविण्याकरिता एक विषय हवा होता आणि हिंदी भाषिक मंडळी हे सॉफ्ट टार्गेट होते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 04/15/2022 - 18:48 नवीन
मला वाटतं भाषा ही माणसाच्या सोयीसाठी बनवली आहे. तिला तश्याच दृष्टीने पाहावं. ज्यांना एखादी भाषा शिकण्याची आवड आहे किंवा आर्थिक इनसेंटिव्ह आहे त्यांनीच भाषा शिकावी. एखाद्याने न शिकल्यास दुसऱ्यांना दुःख होण्याचे काहीही कारण नाही.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 10:21 नवीन
याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.
कायदा सुव्यवस्था सुशासन न्यायदान प्रक्रिया हे केवळ पुस्तकी शब्द नाहीत, त्यांचा व्यवहारात देखील उपयोग करता येतो. तितका संयम नसल्यास निषेध करण्याचे अनेक सभ्य व सुसंस्कृत मार्ग आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाऊणशे वयाच्या एका महिलेला शारिरीक इजा करण्याची इच्छा होणे व ती समाजमाध्यमावर जाहीर व्यक्त करणे ही निरोगी पुरुषाची मानसिकता नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/14/2022 - 19:44 नवीन
ज्याच्या हाती काठी, त्याची म्हैस प्लासीच्या लढाईत जर, फ्रेंच जिंकले असते तर आज भारतात फ्रेंच भाषेचे वर्चस्व असते .... मराठीसाठी गळे काढणार्‍या कुणालातरी ड्युओलिंगो सारखे एखादे मराठी शिकवणारे अ‍ॅप तयार करावेसे वाटते का? .... हीच खरी गोम आहे. भाषा आधारित मते मिळवायची आणि राज्य हाकायचे ... जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे? .... जे ज्ञान हवे आहे, ते ज्ञान ज्या भाषेत उपलब्ध असेल, ती भाषा शिकणे उत्तम ....
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 04/14/2022 - 13:12 नवीन
( हा प्रतिसाद परभाषिक शब्द न वापरता लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येईल ) १. सर्व भारतीय भाषा कोणत्याही प्रकारच्या आधुनिक ज्ञाननिर्मितीसाठी, ज्ञानदळणवळणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाकडून कळत-नकळत कालबाह्य ठरविल्या जात आहेत. ( घटक- समाज, शासन-प्रशासन, माध्यमं इत्यादि ) २. व्यवहार या पातळीवर भाषा नेहमीच लवचिक राहिली आहे. ती कोणतीही भाषा असो. त्यामुळे भाषिक व्यवहार आणि व्यवहारासाठीची भाषा यांच्यातला फरक आपल्याला करावाच लागेल. दोन्हीकडून रेटा आल्याशिवाय कोणतीही भारतीय भाषा आजच्या रूपात २० वर्षांनी तग धरणार नाही. २. मुलांना कोणत्याही भारतीय भाषेविषयी प्रेमच उत्पन्न होऊ नये अशी व्यवस्था आपण जाणीवपूर्वक उभी केली आहे. ( शिक्षणाचे माध्यम पूर्णपणे बदलणे, दरवर्षी त्याचा खेळखंडोबा करणे इत्यादि. ) भाषेचे प्रेम घेऊन कोणी जन्माला येत नाही. आज मराठी संस्थळ, माध्यमं इत्यादिंवर मराठी लेखन करणारी बहुतेक सर्वजण मराठी माध्यमातूनच शिकली आहेत. १००० मुलांना ५ विषय मराठीतून १० वर्षे शिकवल्यावर त्यातली १० मुले खुद्द 'भाषा' या गोष्टीकडे आत्कृष्ट होतात. ५ मुलांना आवर्जून साहित्य वाचावंसं वाटतं, आणि दोघा तिघांना भाषेवर असे प्रेम जडते की त्यांना भाषेतून ललित अभिव्यक्ती करावीशी वाटते. ३. (किमान उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी आणि निमशहरी) लोकांना भाषेविषयी इतर अनेक गोष्टींप्रमाणे नुसताच फुकाचा 'हबिमाण', किंवा आजच्या बोलीत 'गर्व' असतो. जरासं खोदून पाहिलं तर त्याच्याखाली अनेक प्रकारचा असुरक्षितपणा, अनेक गंड-न्यूनगंड वळवळ करताना दिसतात. ४. ज्यांना कळवळा आहे अश्या सर्वच जणांना भाषिक भविष्याविषयी फारशी आशा नाही. ज्यांना कळवळा नाही पण जे चाणाक्ष आहेत ते अभिजन, आणि त्यांचा मागोवा घेत जाणारे इतर सर्व आपली मुले इंग्रजी माध्यमात घालतात. त्यापैकी कळवळाधारक परंतु 'आम्ही घरातच (बहुतेकदा क्रियापदापुरती) मराठी बोलतो' वगैरे बोलून स्वतःचे आणि इतरांचे समाधान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. बाकीच्यांना केवळ एकच भारतीय भाषा येत असल्याने, स्वजातीय कुटुंब असलेला आणि दुसरा भाषिक पर्यायच माहित नसलेला ग्रामीण भाग ज्याने उच्च शिक्षण घेतलेलेच नाही तो मात्र आपापल्या बोलीत सेंद्रियरित्या बोलत असतो. परंतु त्यांच्यात भाषिक अस्मिताच नसते. कारण त्यांच्या रोजीरोटीला भाषिक अस्मिता पूरकही आणि मारकही नसते. ५. आमच्या रावळगुंडवाडीत ९० टक्के लोक कन्नड बोलतात, शासकीय व्यवहारांची भाषा मराठी आहे, घरांतली भाषा कन्नड आहे, लिहायची-वाचायची आणि शिक्षणाची भाषा मराठी आहे, शेतकामांतली भाषा कन्नड आहे. आध्यात्मिक व्यवहाराची भाषा मुख्यत्वे कन्नड आहे. (लिंगायत) मुसलमानीवळणाची दख्खनी बरेच लोक बोलू शकतात. गेल्या हजारवर्षात एकदाही भाषिक संघर्ष झालेला नाही. असला विचारही कोणाच्या मनात येत नाही. शासकीय व्यवहाराची भाषा म्हणून उद्या कोणी रावळगुंडवाडीमध्ये इंग्रजी/हिंदी लादली तरीही काही फार फरक पडणार नाही. कारण स्वभाषेचेच उन्नत आणि औपचारिक स्वरूप आत्ताच्या घडीला सगळ्यांनाच परके आहे त्यामुळे ती भाषा काय किंवा परकी भाषा काय? ६. मुलांची स्थिती मात्र वेगळी आहे. मुलांवर भाषिक संस्कार टीव्ही आणि आता इंटरनेट हेच घडवत आहे. जवळजवळ प्रत्येक मूल दिवसाला २ तास या सरासरीने कार्टून्स पाहतात. त्यामुळे यु-ट्यूब, मेटा या कंपन्यांचे अल्गोरिदम आणि कार्टून-मालिका मुलांची भाषिक समज घडवत आहेत. त्यामुळे भाषेविषयी प्रेम उत्पन्न व्हायला लागणारे भाषिक वैविध्य आणि समृद्धी मुलांना शिक्षणाऐवजी इंटरनेटकडून मिळत आहे. जिथे सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. ७. जगभर सध्या जपानी भाषेची क्रेझ आहे. मुख्य कारण जपानी अ‍ॅनिमे. भारताला असा कोणताच सांस्कृतिक ठेवा निर्माण करता येत नाही. म्हणजे आपल्याकडे त्या गोष्टी नाहीत असे नाही, भरपूर आहे. योगाने जगाला भुरळ घातली आहे. आता योग, अध्यात्म इत्यादि गोष्टींची भाषा ९५ टक्के भारतीयांनाच उपलब्ध नव्हती/नाही, तर त्यांच्यामार्फत जगातले लोक भारतीय भाषांकडे का आकर्षित होतील? आणि आपण तर स्वतःच नैवेद्य सर्व्ह करतो, ह्याच्यात ते मिक्स करतो वगैरे वगैरे.. ८. या सर्वांवरून आजच्या रूपातल्या भारतीय भाषा 'संस्कृतीकरणाकडे' चालल्या आहेत. म्हणजे या 'कल्ट' या रूपात नांदतील. व्यवहारात प्रयोग जवळजवळ शून्य पण अकादमिक रूपात जिवंत राहतील. व्यवहारातली भाषा अशी होईल -> स्थानिक भाषांचे क्रियापदी व्याकरण + बहुतेक इंग्रजी/हिंदी शब्द + नावाला स्थानिक शब्द + रोमन लिपी. अगदी नेमकं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात हिंदाळलेली मिन्ग्लिश बोलतील लोक काही वर्षांनी..
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 04/14/2022 - 19:17 नवीन
https://www.google.com/amp/s/www.indiaglitz.com/amit-shah-hindi-imposition-statement-ar-rahman-reply-tamil-_amp-news-311211
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/15/2022 - 07:14 नवीन
तामिळ ही जोडणारी भाषा आहे असे रहमान म्हणाला. द हिंदू ह्या व्रुत्तपत्रात जवळपास रोज ह्या विषयावर लेख येत आहेत. "हिंदीची सक्ती नको' असे स्पष्ट मत दिले जात आहे. मराठी कलावंत नेहमीप्रमाणे कुंपणावर बसून आहेत का ? मागे एका तामिळ चेनलवर रहमान एक वाक्य हिंदीत बोलू लागला. निवेदिकेने त्याला ताबडतोब थांबवला व "हा तामिळ चॅनेल आहे. हिंदी चॅनेल नाही"असे स्पष्ट सांगितले. ही हिंमत मराठी चॅनेलवाले दाखवू शकतील्?शक्यता नाही कारण हे लोक 'विशेष मुलाखती'साठी बॉलिवूड कलावंताना अनेक्वेळा बोलवतात व हिंदीतच मुलाखत घेतात. ए बी पी माझा ह्याचे उदाहरण आहे. असो.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 04/15/2022 - 07:17 नवीन
हिंदीला दक्षिणेकडील राज्य परंपरागत पद्धतीने विरोध करतायत हा समज योग्य नाही. हिंदी हि व्यवहारासाठीची भाषा आहे अशी गुळमुळीत सुरुवात करून नंतर सर्व शासकीय स्तरावर उपकृत झालेल्या सरकारी बाबूंची वर्णी लावायची असा मास्टर प्लॅन असू शकतो. अगोदरच एवढे असंवेदनशील, भंकस सरकार सत्तेवर आहे. त्यात आणखीन नोकरशाही देखील सामील झाली तर सामान्य माणसाचे हाल कुत्रं खाणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/15/2022 - 09:21 नवीन
नंतर सर्व शासकीय स्तरावर उपकृत झालेल्या सरकारी बाबूंची वर्णी लावायची असा मास्टर प्लॅन असू शकतो. उगाच काहींच्या काही. तामिळनाडू शासनात स्थानिकांचीच भरती होते आणि त्यात तामिळ आवश्यक असते. तर केंद्र सरकारच्या कोणत्याही खात्यात कोणतीही स्थानीय भाषा अत्यावश्यक नसते. इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार हिंदी ची सक्ती करत होते तेंव्हा पासून बाबूंची वर्णी लावली होती का? हा प्रश्न खरं तर पक्ष विरहित आहे. राजकारणासाठी तामिळ अस्मितेचा प्रश्न पणाला लावल्यापासून हिंदी तामिळ असा संघर्ष सुरु झाला तसाच संघर्ष तामिळ आणि कन्नडिगा यांच्यात कावेरी नदीच्या पाण्यासाठी झाला. जिथे तिथे राजकारण्यांच्या भल्यासाठी अस्मिता आड येते हेच खरे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/15/2022 - 08:14 नवीन
अतिशय बेदबाबदार विधान. सुशिक्षीत माणूस मोठा पदावर नसला की काय होतं ह्याचं ऊदाहरण.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 04/15/2022 - 17:19 नवीन
म्हणुन घटनेने निवडली आहे. त्यामुळे अमित शहा काही नवीन विचार आणत नाहीयेत. गुलाम लोक उगीचच गळा काढत आहेत. मुम्बैत उर्दु भवन सुरु करायचे प्रयत्न चालु आहेत ते निमुट बघायचे. मराठी आणि हिन्दी ज्या समान देवनागरी लिपी वापरतात त्याना आपापसात भान्डायला लावायचे. हिन्दी भाषिक लोकान्ची मुम्बैत मराठी मधे न बोलण्याची दादागिरि असते तर तो त्या लोकान्चा माजोरडेपणा आहे. त्यात हिन्दी भाषेचा काहिही दोष नाही. खालील लिखाण मला Canada मधील University च्या साइट वर मिळाले. https://www.uottawa.ca/clmc/language-provisions-constitution-indian-union Article 343 Official language of the Union (1) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script. The form of numerals to be used for the official purposes of the Union shall be the international form of Indian numerals. (2) Notwithstanding anything in clause (1), for a period of fifteen years from the commencement of this Constitution, the English language shall continue to be used for all the official purposes of the Union for which it was being used immediately before such commencement: Provided that the President may, during the said period, by order authorise the use of the Hindi language in addition to the English language and of the Devanagari form of numerals in addition to the international form of Indian numerals for any of the official purposes of the Union. (3) Notwithstanding anything in this article, Parliament may by law provide for the use, after the said period of fifteen years, of (a) the English language, or (b) the Devanagari form of numerals, for such purposes as may be specified in the law.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/15/2022 - 17:28 नवीन
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घटनेने निवडली आहे. अगाध ज्ञान. रचाकने अज्ञानात सुख असतं म्हणून तुम्ही तुमचं नाव सुखीमाणूस ठेवलंय का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/15/2022 - 19:23 नवीन
पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत या देशाला राष्ट्रभाषा नाही. हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा ही भारताची राष्ट्रभाषा नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/15/2022 - 19:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 04/15/2022 - 23:18 नवीन
काही लोक हिंदीला अतिआत्मविश्वासाने ती राष्ट्रभाषा नाही असे इतरांना ( म्हणजे ज्यांची सर्वसाधारण समज अशी आहे की हिंदी घटनादत्त राष्ट्रभाषा आहे ) उच्चरवाने सांगतात, परंतु हे अगदी सरळसोट प्रकरण नाही. ते कसे ते पाहा - भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही - अचूक. अगदी बरोबर. परंतु - - कलम ३४३ : देवनागरी लिपीतली हिंदी ही भारतीय संघराज्याची अधिकृत राजभाषा आहे. अंक आंतरराष्ट्रीय पद्धतीचे भारतीय अंक आहेत. - कलम ३४४ : हिंदी ह्या राजभाषेसाठी आयोग व संसदीय समितीची स्थापना केलेली आहे. ही समिती दर पाच वर्षांनी भाषेशी निगडीत प्रश्नांचा आढावा घेईल आणि जरूर ते बदल सुचवेल. त्याचबरोबर पहिल्या पाच ते दहा वर्षांत शासकीय प्रयोजनांसाठी अधिकाधिक प्रमाणात हिंदी वापरली जाईल आणि इंग्रजीच्या वापरावर निर्बंध घातले जातील. - कलम ३५१ : ह्या कलमात हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आले आहेत. बहुसंस्कृती असलेल्या देशात अभिव्यक्तीचं मध्यम म्हणून सर्वांना समजेल अशारीतीनं हिंदीचा विकास करणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे. यावरून हिंदीला भारतीय संघराज्यात महत्त्वाचं स्थान आहे आणि ती जरी राष्ट्रभाषा नसली तरी तिचा (कदाचित त्या दिशेने) विकास करणे हे संघराज्याचे कर्तव्य म्हणून सांगितले आहे. [ कदाचित त्या दिशेने ] असं मी संदिग्ध बोलत आहे कारण बाकीच्या कलमांनुसार भाषा विकासाबाबत आणि धोरणांबाबत वेगवेगळे निर्णय घेण्याचे अधिकार वितरित केले आहेत.. - कलम ३४३ (२) : घटना लागू होण्यापूर्वीपासून घटना लागू होईपर्यंत इंग्रजी ज्या शासकीय प्रयोजनासाठी वापरली जात होती तशीच ती भारतीय संघराज्यात सर्व अधिकृत कारणांसाठी पुढची १५ वर्षं अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल. - कलम ३४३ (२) : प्रशासकीय कोणत्याही प्रयोजनासाठी इंग्रजीच्या जोडीस हिंदीचा(!) वापर करायचा असेल, तर तसा तो राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे करता येईल. - कलम ३४३ (३, ४) : घटना लागू झाल्यापासून १५ वर्षांनंतर ठराविक क्षेत्रात इंग्रजीच्या किंवा देवनागरी अंकांच्या वापरासाठी संसद कायदा करू शकते. - कलम ३४४ : प्रथम ५ वर्षांनी आणि मग १० वर्षांनी भाषा विषयी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येईल. तीस जणांची समिती अहवाल तयार करून आयोगाकडे पाठवेल. आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती योग्य वाटेल तिथे बदल करण्याचे अध्यादेश काढतील. - कलम ३४९ : संसदेमध्ये कोणालाही भाषेसंबंधी काही बदल सुचवायचे असतील तर ते आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच सुचवता येतील. - कलम ३४८ : सर्वोच्च आणि सर्व उच्च न्यायालयामधली सर्व कारवाई संसदेच्या पुढील आदेशापर्यंत इंग्रजीत होईल. संसदेत मांडायची विधेयके, पारित केलेले नियम, अधिनियम, विधेयके इंग्रजीत प्रसिद्ध होतील. ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/16/2022 - 08:26 नवीन
पण अधिकृतरीत्या हिंदी राष्ट्रभाषा नाही हेच दिसतेय.राजभाषा असेल. प्रत्येक राज्याची स्वतची अशी अधिकृत “राज्यभाषा” आहे. अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो. अमितभाईने बिमारू राज्ये नी तियाला गुजरात जोडून वेगळं राष्ट्र मागून घ्यावे नी त्याला हिंदी राष्ट्रभाषा करावी. ईतर राज्यांच्या माथी बळजबरीने हिंदी मारू नये. देशातील एकमेव हुशार राज्य असेल तर तामीळनाडू त्यानी हिंदीला सरळ लाथाडले. तरी त्याना काही फरक पडला नाही ऊत्तरोत्तर तामीळनाडू विकासच करत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/16/2022 - 08:48 नवीन
ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो. कलम ३७० रद्द करणे आणि हिंदी राष्ट्रभाषा करणे यात महद्अंतर आहे. ३७० वे कलम रद्द करण्यास बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा होता. परंतु त्यांच्या दृष्टीने ती प्राथमिकता नव्हती. त्यामुळे ते कलम लादणारा व रद्द न करणारा पक्ष वारंवार सत्तेत येऊ शकला. परंतु त्याचमुळे भाजपने हे कलम रद्द केल्यानंतर अत्यंत क्षीण विरोध झाला. हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याचा निर्णय झाला तर अनेक राज्यातून विरोध होईल. त्याचा भाजपला निवडणुकीत तोटा होईल. भाजप कर्नाटक पाठोपाठ तेलंगणात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. तेथे भाजपला फटका बसू शकतो. महाराष्ट्र, बंगाल व ईशान्येकडील राज्यातही विरोध होईल. मुळात हिंदी भाषिक राज्यात भाजप बराचसा संतृप्त झाला असल्याने निवडणुकीत तेथे अधिक फायदा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा निर्णय टिकणार नाही. त्यामुळे अमित शहा हे धाडस करणार नाहीत. केले तर पस्तावतील.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sat, 04/16/2022 - 13:59 नवीन
ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.
करु देत ना राष्ट्रभाषा.. केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ? हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही हा कायदेशीर वाद काही काळ बाजूला ठेवू .. त्याचा कायदेशीर कीस पाडून काय आहे ते कायदेपंडित सांगतीलच.. आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून प्रत्येकाने जबरदस्तीने हिंदीच बोलली पाहिजे याला काय अर्थ ? स्थानिक भाषा बोलायच्या /शिकायच्या नाहीत ? उद्या हे अमित शहा स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/16/2022 - 14:59 नवीन
मुळात जेथे अनेक भाषा बोलल्या जातात व कोणतीही भाषा निम्म्याहून कमी जनता बोलते अशा देशात एखादी विशिष्ट भाषा "राष्ट्रभाषा" म्हणून का हवी आहे? समजा हिंदीला राष्ट्रभाषा केले तर भारतीय जनतेने काय करणे अपेक्षित आहे? सर्व भारतीयांनी हिंदी शिकायची, सर्व शिक्षणाचे माध्यम हिंदी करायचे, सर्वांनी एकमेकांशी हिंदीत बोलायचे, सर्व वाहिन्या/प्रकाशने/पुस्तके/वृत्तपत्रे इ. फक्त हिंदीतच असणार असे काही करायचे आहे का? म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक असलेल्या अहिंदी जनतेने आपली भाषा ओंकारेश्वरावर दहन करून टाकायची आणि हिंदीभाषिकांना काहीच करावे लागणार नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sat, 04/16/2022 - 15:46 नवीन
हिंदीच्या सक्तीला विरोध आहे तो याच कारणामुळे... खरंतर हिंदी भाषिक अनेक राज्यात आहेत. ते तिथली स्थानिक भाषा शिकत , त्या भाषेबद्दल आदर व आपुलकी दाखवत हळूहळू स्थानिकांच्या मनातही हिंदीबद्दल आस्था निर्माण करु शकतात.. पण "आमचीच भाषा ही श्रेष्ठ" या गंडात असलेले बहुसंख्य हिंदी भाषिक (काही सन्माननीय अपवाद नक्कीच असतील) हे करु शकणार नाहीत म्हणून सक्ती करण्याची वेळ येते..
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 15:11 नवीन
केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ?
स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?
स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे. यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे. आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी. इंग्रजी तरी प्रयत्नपुर्वक शिकावी लागती तरी परिणामकारकरीत्या बोलता येत नाही ती नाहीच. जे हिंदी चित्रपट / दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम (मनोरंजन + वृत्त) पाहतात त्यांना हिंदी शिकावी लागतच नाही. आपोआपच येते. मला शाळेत फक्त ५ वी ते ७ वी हे तीनच वर्षे हिंदी हा एक १०० गुणांचा विषय होता. तरीही मी सहजपणे इतरांसोबत हिंदीत संवाद साधू शकतो. ५ वी १० वी इंग्रजी हा १०० गुणांचा विषय आणि पुढे महाविद्यालयात सर्वच विषय इंग्रजी भाषेतून शिकलो तरी इतरांसोबत इंग्रजीत संवाद साधताना एक अवघडलेपण वाटते. एकेक शब्द मनात अनुवाद करुन मग मनातल्या मनात काळ बरोबर आहे की नाही हे ठरवत वाक्य जुळवत बोलावे लागते आणि तरीही चूका होतात. हिंदीत बोलताना कितीही चूका केल्यात तरीही अपराधीपण वाटत नाही. इंग्रजी बोलताना एक जरी चूक झाली तरी आपल्याला फाशीची शिक्षा होईल इतके प्रचंड अपराधीपण वाटते. एक तर इंग्रजीतले ते हॅव बीन / हॅड बीन असे परफेक्ट टेन्स धरून एकूण बारा काळ, मग आता आपण प्रेसेन्ट परफेक्ट मध्ये बोलायचे की सिंपल पास्ट मध्ये की पास्ट परफेक्ट मध्ये की पास्ट कंट्यूनिअस की पास्ट परफेक्ट कंट्यूनिअस हा घोळ काही केल्या संपत नाही. पॅसिव्ह व्हॉईस / इंडायरेक्ट स्पीचमध्ये तर अजूनच दडपण येते. उच्चारांबाबत तर नवीनच गोंधळ दिसतो आहे. पूर्वी आम्ही कॉस्च्यूम, शेड्यूल, कोच असे शब्द उच्चारायचो आता तेच म्हणे कॉस्ट्यूम, स्केड्यूल, काऊच असे उच्चारले जातात. इतकंच उच्चारांकरिता वापरले जाणारे इंग्रजी शब्द प्रोनाउंन्सिएशन आणि अ‍ॅक्सेंट यांच्या उच्चारातही अनेक ठिकाणी तफावत आढळते. दक्षिण भारतीय लोकांचं एक बरं आहे ते चूकीचं इंग्रजीही सर्रास बोलतात आणि ते देखील प्रचंड आत्मविश्वासाने. त्यांचे इंग्रजी शब्दांचे उच्चार हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय होईल. हां इंग्रजी ही लेखनाकरिता बरीच सुलभ भाषा आहे असे खात्रीने म्हणता येईल. विशेषतः आता लॅपटॉप वर टायपिंग करायचं असतं तेव्हा तर स्पेल चेक ग्रामर चेक आणि डिक्शनरी सोबत असताना तर अगदीच विल्यम शेक्स्पीअर इतकं नाही तरी शशी थरूर यांच्या तोडीचं इंग्रजी देखील अनेक भारतीय लोक लिहू शकतात. समोरच्याला आपला मुद्दा समजेल आणि तो आपल्याला उचित प्रतिसाद पाठवेल व तोही पुन्हा आपल्याला समजेल इतपत कार्यालयीन इंग्रजी वाचन लेखन बहुतेक सर्व डेस्क जॉब असणार्‍या नोकरदार मंडळींना येत असावं असा अंदाज आहे. नोकरीकरिता अर्ज, वस्तू खरेदी करिता चौकशी - प्रत्युत्तरात माहितीपत्रक दरपत्रक कोटेशन, त्यानंतर पुढे कस्टमर कंप्लेंट - रिझोल्यूशन याकरिता करावं लागणारं रिटन कम्यूनिकेशन इंग्रजीत फारच सुलभ आणि विनासायास होतं. हेच हिंदीत करायचं म्हंटलं तर प्रचंड कटकटीचं होईल. आणि तोंडी करायचं ठरलं तर नेमकं उलट म्हणजे इंग्रजीत अवघड आणि हिंदीत तूलनेने सुलभ. स्थानिक भाषिक अर्थातच सर्वोत्तम पण अनेकदा मी वस्तू महाराष्ट्रात वापरतोय आणि कंपनीचं हेड ऑफिस बेंगलोरमध्ये आहे अशा वेळी मला कन्नड येत नाही आणि विक्रेत्याला मराठी येत नाही तर इंग्रजीपेक्षा बोलायला मला हिंदी सोपी पण जर तो इंग्रजी किंवा कन्नडमध्येच बोला असं अडून राहिला तर मग मी तोंडी ऐवजी लेखीचा आग्रह धरेल. कारण इंग्रजी बोलताना चूका होऊ शकतात आणि मग पुढे त्याचा परिणाम अपेक्षित सोल्यूशन मिळण्यात होऊ शकतो. लेखीमध्ये इंग्रजीत चूक होण्याची शक्यता तूलनेने कमी आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा