त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
🗣 चर्चा
(510)
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/02/2022 - 07:56
नवीन
+१
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 05/02/2022 - 10:07
नवीन
एक मुद्दा अजुन कुणी मांडला नाहीये किंवा माझ्या नजरेतुन सुटला असावा.
अमित्भै स्वतः गुजराथी असुन सुध्दा त्यांनी हिंदीचा वापर करावा अशी फक्त विनंती केली आहे.
तस्मात अमितभैंचा भारतीयांमधले संभाषण सोपे व्हावे असे वाटण्याव्यतिरिक तसा काही स्वार्थी हेतु नसावा. तसा असला असता तर त्यांनी गुजराथीला आडुन आडुन प्राधान्य दिले असावे.
ह्याचा अर्थ हा निघतो कि अमितभैंना गुजराथी समाजाबद्दल आत्मविश्वास असावा कि बाहेरची भाषा कुठलीही असो गुजराथी परस्परांतील संवाद गुजराथीमधुन्च करतील.
अमितभंच्या ह्या विधानाचा गुजरातम्ध्ये काय परिणाम झाला आहे ह्याची कुणाला काही माहीती आहे का?
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/02/2022 - 10:26
नवीन
मुघल राज्यकर्त्यांनी,ब्रिटिश राज्य कर्त्यानी.
महाराष्ट्र मधील सर्व किल्ले हल्ला करून उध्वस्त केले पण राजस्थान मधील केले नाहीत.
का?.
स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी शील,अभिमान,विचार ह्यांचे ते लिलाव करत होते .
पण महाराष्ट्र तसे करत नव्हता.
गुजरात ची मानसिकता तीच आहे.
फायद्यासाठी काही ही करतील .
त्या मुळे अमित shah ना गुजराती लोकांची चिंता वाटत नाही
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/02/2022 - 10:39
नवीन
आणि देशाच्या एकतेला धोकादायक असणारे घटक.
१) हिंदी भाषा
२) हिंदी मीडिया.
३) धार्मिक वाद.
४) जातीय वाद.
५) व्यापारी स्वार्थी जमात
आसाम,ओरिसा,पंजाब,
हिमाचल, अती पूर्वेतील सात राज्य, दक्षिण भारतातील राज्य,कश्मिर.हिमाचल .
ह्या भाग विषयी महाराष्ट्र सहित बाकी प्रगत राज्यांना राग नाही,द्वेष पण नाही.अखण्ड यूपी,अखंड बिहार,अखंड mp.
ही राज्य आणि त्या राज्यातील लोक ह्या विषयी मात्र तीव्र संताप आहे.
बंगाल,राजस्थान,गुजरात ही थोडी ठीक आहेत पण तिरस्कार करण्या इतकी वाईट नशित्म
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Mon, 05/02/2022 - 15:51
नवीन
https://fb.watch/cLCGTHyUY9/
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Mon, 05/02/2022 - 16:55
नवीन
हिंदी भाषा असणाऱ्या लोकांनी मराठी,गुजराती किंवा कोणती ही दक्षिण भारतीय भाषा शिकावी..जेव्हा त्यांना कायम स्वरुपी त्यांचे राज्य सोडून उदर निर्वाह करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाणे गरजेचे असते.. तात्पुरतं फिरायला जायचे असेल तर गरज नाही.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/02/2022 - 17:14
नवीन
आणी अशा प्रकारे नानांच्या धाग्याने पंचशतक पुर्ण केले. अभिनंदन. :)
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Wed, 06/21/2023 - 09:02
नवीन
https://qr.ae/py491D
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 06/22/2023 - 07:02
नवीन
हा प्रश्न सोडवणे सरळ नाही . याची खेचाखेच , मग टोकाची विधाने / राजकीय पोळी भा जने हे तर दिसतयच
आता प्रश्न असा आह एकी जरी हिंदी हि काही राष्ट्रभाषा नसली आणि तिची सक्ती करेन अयोग्य असले तरी हे हि खरे नाही का कि अशी कोणती भाषा आहे कि जी भारतातील अनेक भासंचय त्या मानाने जवळ आहे ? तर उत्तर हिंदी असे दयावे लागेल . अनके भाषा जय लिप्या वापरतात त्याचेही हिंदीची देवनागरी लिपी साधर्म्य दर्शवते ( गुजराथी , बंगाली आणि अर्हताःत मराठी कदाचित गुरुमुखी ? हरयाणवी कोणती लिपी वापर माहित नाही
तशी कोणती दक्षिणी भाषा आहे का ?
यूरोपात फ्रेंच इटालियन आणि जर्मन आपापल्या भाषेहूतून वयहार करताट आणि यूरोपीन संसदेत? आणि जरी समाज त्यांनी तिसरी भाषा म्हणून इंग्रजी स्वीकारली असली तरी इंग्रजी हि फ्रेंच इटालियन आणि जर्मन यांचं जवळ आहे .. तोच तर्क हिंदी साठी
हिंदी ची सक्ती नको पण प्रेमाने चुचकारत जर हिंदी राष्ट्रीय संसदेत वाढवली तर एवढा कडवा विरोध पण नको
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
गुरुवार, 06/22/2023 - 07:39
नवीन
अशी कोणती भाषा आहे कि जी भारतातील अनेक भासंचय त्या मानाने जवळ आहे ? तर उत्तर हिंदी असे दयावे लागेल .
आपल्या वरील विधानास पुरावा काय ?
हिंदी ही हिंदी पट्ट्यात (पर्यायाने लोकसंख्या स्फोट झालेल्या) प्रदेशात बोलली जाते म्हणुन ती इतर "अनेक" भाषांच्या जवळ कशी ??
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11