Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 225912 views

🗣 चर्चा (616)
त
तेजस आठवले Mon, 01/14/2019 - 10:22 नवीन
भाजपद्वेष तर भाजपद्वेष.अहो माईंनी आता निदान एक बाजू घेतली आहे एवढे पुरे नाही का? नाहीतर मेली सदानकदा "ह्यांच्या" खांद्यावरून गोळ्या मारायची त्यांची सवय."ह्यांचा" खांदा आता निखळायला आला तरी! चला तर माई केरसुणी आणि लाटणे घ्या हाती जोरदार प्रहार करून फोडा ५६" छाती. बंदूक ठेवून ठेवून दुखतो "ह्यांचा" खांदा कुणी निंदा कुणी वंदा माझा खोट्याचा धंदा. झाली वैचारिक कावीळ दिसू लागली दुनिया पिवळी "ह्यांना" येई खोकला, निसटे माझी कवळी रिकामा वेळ हाताशी, नाही कसलेच टेन्शन "ह्यांचे" नाव दाखवून मीच घेते सगळे पेन्शन वापरून "ह्यांचे" नाव देते मी भाजपाला त्रास आमचे "हे" खरंच आहेत का नुसताच आभास. - कवी आपले हे नेहमीचेच आठवले नाहीत. ते वेगळे आहेत.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/14/2019 - 13:03 नवीन
वैयक्तिक शेरेबाजी नको. मोदी सरकार बर्यपैकी काम करीत आहे असे आमचे मत आहे. अनेक केंद्रिय मंत्री, सुरेश प्रभु, नितिन गडकरी,धर्मेंद्र प्रधान.. सुषमा स्वराज.. ह्या मंडळींची कामे निश्चित कौतुकास्पद आहेत पण म्हणून मोदी/शहा ह्यांचा गुजरातमधील ईतिहास लपून कसा राहणार?
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 01/14/2019 - 14:04 नवीन
गमतीत लिहिले आहे.मनावर घेऊ नका.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 18:05 नवीन
चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज काढत बसले , सरळ संघात जायला हवे होते, नेताजींच्या फाईली मोदी सरकारनेच उघड केल्या ना ? काय आले त्यात ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 18:49 नवीन
कॉंग्रेस सारख्या गद्दार लोकात न जाता त्यांनी फौज तयार केली !! कॉंग्रेसच्या हलकट लोकांनी नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना युद्ध कैदी म्हणुन भारतीय कैदेत ठेवल , त्यापुढे जाउन कलकत्त्यात ९००० आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना त्यांच्या बॅरॅक मध्ये जिवंत जाळल ! जनतेचा रोष होउ नये म्हणुन तिथे जुट रीसर्च सेंटर उभ केल ! https://youtu.be/zf3fJU3FdW
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/12/2019 - 19:03 नवीन
आणि आझाद हिंद सेनेच्या केसेस नेहरूंनीच जिंकल्या ना ? संघातही किती वकील अन ब्यारिस्टर होते , त्यांनी किती केसेस लढल्या ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/14/2019 - 06:20 नवीन
इथं रागा आणि सोगा च्या केसेस हिरीरीने लढणारी काँग्रेसवाल्यांची फौज आहे. मग त्याच काँग्रेसमध्ये असणारे नेताजी सुभाषबाबू यांची केस लढवायला वेळ कॉन्रेसी लोकांना वेळ नव्हता? नेताजी कधीच रा स्व संघात नव्हते. रा स्व संघाने त्यांची केस का लढावी? इथे काँग्रेसच्या दुटप्पीपणा बद्दल चर्चा चालली आहे तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी रा स्व संघच दिसतोय का? उद्या विचाराल झाकीर नाईकांची केस रा स्व संघात एवढे वकील असून का लढत नाहीत> आजार हाताबाहेर जायच्या अगोदर इलाज करून घ्या
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 07:13 नवीन
तुम्हाला कुणी कुणाची केस कधी लढली , हे ठाऊक आहे का ? https://hi.m.wikipedia.org/wiki/आजाद_हिन्द_फौज_पर_अभियोग http://zeenews.india.com/hindi/india/jawahar-lal-nehru-fought-for-save-azad-hind-fauj/459714 नई दिल्ली : दिल्ली के ऐतिहासिक लालकिले से आज भारत की पहली निर्वासित सरकार की स्थापना की 75वीं वर्षगांठ मनाई गई. इस सरकार की स्थापना नेताजी सुभाष चंद्र बोस ने की थी और वही इस सरकार के मुखिया थे. लेकिन जब सुभाष चंद्र बोस की मृत्यु हो गई और उनकी आजाद हिंद फौज के हजारों अफसर और सैनिक गिरफ्तार कर लिए गए तो देश के सामने चुनौती पैदा हो गई. अपने मित्र सुभाष की मृत्यु के बाद पंडित जवाहरलाल नेहरू ने इस काम को संभाला. उनके सामने सिर्फ यही चुनौती नहीं थी कि वे सुभाष के बलिदान और विरासत को संभालें. नेहरू को आजाद हिंद फौज (आइएनए) के उन हजारों सैनिकों को भी संभालना था, जो युद्ध में जर्मनी और जापान की हार के बाद ब्रिटिश सेना ने बंदी बना लिए थे. इनमें से बहुत से सैनिक दिल्ली के लाल किले में बंद थे. इन बंदियों में आइएनए के तीन प्रमुख कमांडर सहगल, ढिल्लन और शाहनवाज शामिल थे. इन तीनों को अंग्रेज सरकार ब्रिटेन के खिलाफ युद्ध छेड़ने के अपराध में फांसी की सजा सुना चुकी थी. देश आजादी की दहलीज पर खड़ा था. और आजाद हिंद फौज का एक हिंदू, एक मुस्लिम और एक सिख कमांडर मौत की दहलीज पर. हजारों आइएनए सैनिकों का भविष्य तो खैर अंधकार में था ही. तब नेहरू ने आइएनए डिफेंस कमेटी बनाई. इस कमेटी ने देश भर से आइएनए के सैनिकों की मदद के लिए चंदा इकट्ठा किया. इस कमेटी में देश के नामी वकील शामिल किए गए. इस समय तक देश में नारे लगने लगे: ‘‘चालीस करोड़ की ये आवाज, सहगल, ढिल्लन, शाहनवाज.’’
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 07:16 नवीन
नेहरूंनी हे का केले नाही , गांधींनी हे का केले नाही , हे प्रश्न येऊ शकतात , तर कुणीतरी संघाने हे केले नाही , हेही विचारणारच, नेताजी संघाचे नव्हते , म्हनून त्यांची केस संघाने लढली नाही , हे बोलून तुम्ही तुमच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन केले आहे ,
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/14/2019 - 07:37 नवीन
तुम्ही तुमच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन केले आणि आझाद हिंद सेनेच्या केसेस नेहरूंनीच जिंकल्या ना ? संघातही किती वकील अन ब्यारिस्टर होते , त्यांनी किती केसेस लढल्या ? हि खाजवून खरूज कुणी काढली आहे? कोणत्याही धाग्याचा संदर्भ नाही. काही घेणे देणे नाही फक्त गरळ ओकायची. आपण शेण खायचं आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायचं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/14/2019 - 07:39 नवीन
चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज काढत बसले , सरळ संघात जायला हवे होते, नेताजींच्या फाईली मोदी सरकारनेच उघड केल्या ना ? काय आले त्यात ? याचा आगापिछा चालू घडामोडीत काय आहे?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 13:41 नवीन
तसेही अहींसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणुन खोटे पसरवणारे नेहरुच होते. १५ ऑगस्टच्या पुर्वी आझाद सेनेच्या सेना पतींचा जय जय कार करणारे नेहरु . स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र लाल किल्यावरुन " माऊंटबॅटन की जय " चा नारा दिलेला सगळ्यांनी बघितलेले आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 14:04 नवीन
https://www.youtube.com/watch?v=zf3fJU3FdWw&t=18s
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 01/12/2019 - 19:08 नवीन
Bill to terminate Pakistan designation as major non-Nato ally introduced in US Congress मोगामिंयाच्या लाडक्या पाकिस्तानला अजुन एक झटका !! https://m.timesofindia.com/world/us/bill-to-terminate-pakistan-designation-as-major-non-nato-ally-in
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/13/2019 - 17:26 नवीन
अडकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने फेसबुकच्या माध्यमांतून जवानांना जाळ्यात अडकवले होते. जैसलमेर लष्करी तळावर सोमवीर सिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. २०१६ मध्ये सोमवीर जाळ्यात अडकला. त्यांनतर सोमवीरच्या फ्रेंड लिस्टमधील इतर काही जवानही जाळ्यात आडकल्याचा संशय आहे. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/13/2019 - 18:53 नवीन
अरे वा, माईसाहेबांसारखे तुम्हालासुद्धा 'हे' आहेत होय?! =)) तुमच्या प्रतिसादाच्या वरचा प्रतिसाद पाहता, ते मोगाखान आहेत असा अर्थ होतोय!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/13/2019 - 03:16 नवीन
नँशनल हेराल्ड या बहुचर्चीत खटल्यावर आणि त्यातील इतर कायदेशीर बाबींविषयी उकल करणारा हर्षवर्धन दातार यांचा महत्वपुर्ण लेख! ( मी आजपर्यंत या केसचा विचार Locus standi या आधारावर करत होतो, पण मला यातून खूप कांही नव्याने समजले) १. नॅशनल हेराल्ड खटल्यातल्या आयकर कायद्याशी निगडित भागावर टिप्पणी करणारी ही पोस्ट. फौजदारी कायद्याशी निगडित भागावर काहीही होणार नाही याची मला तरी खात्री आहे कारण तिथे MENS REA म्हणजे गुन्हेगारी उद्देश सिद्ध करणे अवघड आहे. आयकर खटल्यावर सध्या बरीच सुंदोपसुंदी माध्यमांमध्ये सापडत आहे. २. ही पोस्ट दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे. खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २९ जानेवारीला त्याची सुनावणी आहे. ३. १९९८ मध्ये यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना त्यांनी GIFT TAX रद्द केला. पुढे २००४ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी याला आयकर कायद्यात अंतर्भूत केले. तेव्हाच्या तरतुदीनुसार एखादा मनुष्य किंवा एच यू एफ यांना 'नातेवाईक' नसलेल्या व्यक्तींकडून 'भेट' किंवा 'GIFT' मिळाल्यास त्यावर 'आयकर' द्यावा लागत असे. आजही तरतुदी तशाच आहेत पण आज अन्य प्रकारच्या व्यक्तीही (उदा. भागीदारी संस्था, LLP, कंपनी, ई.) यात समाविष्ट आहेत. ४. एखाद्या कंपनीने तिचे शेअर्स जारी करताना, दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य जर घेतले आणि ते सकल मूल्य, त्या शेअरच्या बाजारभावापेक्षा जास्त असेल तर फरकाच्या पैशांवर आयकर द्यावा लागतो. उदा. १० रु. दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य ४० रु. जर घेतले (सकल मूल्य ५० रु.) आणि बाजारभाव जर ३० रु. असेल तर २० रु. वर कंपनीला कर द्यावा लागतो. पण तोच शेअर ५० रु. दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य ० रु. जर घेतले (सकल मूल्य ५० रु.) आणि बाजारभाव जर ३० रु. असेल तर कंपनीला कर द्यावा लागत नाही. याशिवाय ज्या व्यक्तीला हे शेअर्स दिले आहेत ती व्यक्ती जर आयकर कायद्यात नोंदणीकृत 'चॅरिटेबल ट्रस्ट' असेल तर कंपनीला कर द्यावा लागत नाही. (हा मुद्दा नॅशनल हेराल्ड खटल्यात सगळ्यात महत्वाचा आहे) ५. पं. नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली/प्रभावाखाली १९३७ मध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, त्यात जवळपास ५००० भागधारक होते. आज ही कंपनी 'नॅशनल हेराल्ड' नावाचं इंग्रजी वृत्तपत्र चालवते. त्या ५००० भागधारकांमध्ये बरेचसे स्वातंत्र्यसैनिक होते ज्यात पुरुषोत्तम दास टंडन, कैलाशनाथ काटजू (न्या. काटजूंचे पिताश्री), गोविंद वल्लभ पंत, ई. लोक होते. २०१० मध्ये त्यात जवळपास १००० भागधारक उरले. पुढे कंपनीने काँग्रेस पक्षाकडून ९०.२१ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले होते, हे कर्ज २०१०-११ मध्ये काँग्रेस पक्षाने शेअर्समध्ये रूपांतर करून, शेअर्स 'यंग इंडियन' नावाच्या तिसऱ्या कंपनीला देण्याची सूचना केली. हा व्यवहार भागधारकांच्या सभेत मान्यही झाला, अन हे शेअर्स 'यंग इंडियन' ला जारी करण्यात आले आणि कर्ज वळते करण्यात आले. (या व्यवहारात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने कसलेही अधिमूल्य आकारले नसल्याची कागदोपत्री नोंद/पुरावा आहे.) ६. 'यंग इंडियन' एक नफा न कमावणारी कंपनी म्हणून कंपनी कायद्याच्या (१९५६) कलम २५ मध्ये नोंदणीकृत कंपनी आहे. तिला आयकर कायद्यात नोंदणीकृत 'चॅरिटेबल ट्रस्ट' म्हणून मान्यताही होती. या कंपनीचे ७६% भागधारक राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत, ऑस्कर फर्नांडिस १२% आणि मोतीलाल व्होरा १२% भागधारक आहेत. ७. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे भागधारक 'यंग इंडियन'. 'यंग इंडियन'चे भागधारक राहुल गांधी, सोनिया गांधी, ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे शेअर्स 'यंग इंडियन'ला जारी करताना फायदा झाला असे सरकारचे म्हणणे आहे अन त्या फायद्यावर 'यंग इंडियन'च्या भागधारकांनी कर बुडवला असा सरकारचा दावा आहे, अन त्यावर पुढचे राजकीय इमले चढवण्यात आले आहेत. ८. २०१७ मध्ये 'यंग इंडियन' कंपनीचे आयकर कायद्यांतली नोंदणी रद्द करण्यात आली. या कृतीला आयकर लवादासमोर आव्हान देण्यात आले. हा खटला आजही प्रलंबित आहे. जरी 'यंग इंडियन' कंपनी हा खटला हरली तरी नोंदणी रद्द करण्याची कारवाई पूर्वलक्षी प्रभावाने करता येऊ शकत नाही, असं कोर्ट सांगते. त्यामुळे २०१०-११ च्या व्यवहारांवर २०१७ मधल्या विवादास्पद हालचालीच्या भरवश्यावर करआकारणी करता येऊ शकत नाही. ९. ३१ डिसेम्बर २०१८ रोजी, सरकारने (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT) एक परिपत्रक काढले आणि असे घोषित केले की जर एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स जारी करत असेल तर करआकारणी होणार नाही. 'भेट' किंवा 'GIFT' च्या तरतुदी शेअर्स विकत घेताना किंवा विकताना लागू होतील पण स्वतःचे शेअर्स जारी करत असेल तर करआकारणी होणार नाही. त्याचा नॅशनल हेराल्ड खटल्यावर परिणाम होईल असे दिसल्यावर २ दिवसांत मागेही घेतले अन स्वतःचे हसे करून घेतले. याची कारणे सर्वोच्च न्यायालयात द्यावी लागतीलच. भक्तमंडळी याला 'काँग्रेसचा' घातपात/षडयंत्र वगैरे नावं देताना दिसतात पण याचे मूळ कारण असे आहे की वेगवेगळ्या स्टार्टअप उद्योगांना या तरतुदींचा वापर करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या अन त्याविरुद्ध वाणिज्य, उद्योग मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली होती. १०. दिल्ली उच्च न्यायालयाने हे सर्व मुद्दे रिट याचिकेत दाखल करून घेण्यास नकार दिला आणि आयकर कायद्यातल्या अपील तरतुदींसाठी हे सर्व मुद्दे सुरक्षित असल्याचे सांगितले. याविरुद्ध खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २९ जानेवारीला त्याची सुनावणी आहे. ११. आता प्रश्न उरतो मनी लॉण्डरिंग आणि फौजदारी तक्रारींचा, आयकर बुडवल्याचा दावा जर टिकला नाही तर मनी लॉण्डरिंग खटला आपसूकच रद्द होईल. हा सगळा जुमला सुब्रमणियम स्वामींनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर विसंबून उभारण्यात आला आहे. १२. सर्वोच्च न्यायालयात यावर पुन्हा युक्तिवाद होतीलच पण ती एक रिट याचिका आहे आणि मूळ आयकर खटला खालच्या पातळीवर स्वतंत्रपणे लढवला जात आहेच. १३. ज्यांना राजकीय गरळ उधळण्याची हौस असेल त्यांना शुभेच्छा. #न्यायभारत #सीएच्यानजरेतून #NationalHerald भाग १२ (ही किंवा अन्य कोणतीही पोस्ट शेअर करा, कॉपी पेस्ट करा, विचारण्याची गरज नाही. स्वतःच्या नावावर पोस्ट केली तरी माझी काही हरकत नसेल.) © Harshvardhana Datar.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/13/2019 - 18:58 नवीन
मस्त स्ट्रॅटेजी... "मी दगड मारतोय. पण तो दुसर्‍या कोणीतरी माझ्या हातात दिला आहे. मला काहीही विचारू नका. (थोडक्यात, मी दगड मारणार. पण, मला जबाबदार धरू नका.)" काय पण नैतिकता ! अवांतरः सद्याच्या सामाजिक माध्यमांसंबंधीच्या कायद्याप्रमाणे, मूळ लेखका इतकाच, तो मजकूर पुढे सरकवणाराही जबाबदार असतो.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 01/13/2019 - 04:46 नवीन
अरे वा पूर्वी काँग्रेस पक्ष 90 कोटि पर्यन्त कर्ज द्यायचा !! कमाल आहे .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/13/2019 - 05:23 नवीन
नायतर तुमच्या भाजपाने पैसे साठल्यावर ऑफिस बांधले ( तेही अपशकुनी आहे म्हणे )
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 01/13/2019 - 06:12 नवीन
सुब्रमण्यम स्वामीनीं कोर्टा मार्फत कॉंग्रेस पक्षाने नॅशनल हॅरॉल्ड ला ९० कोटी रु कसे transfer केले ? कॉंग्रेस पक्षाने ९० कोटी रु कुठुन आणले ? असे प्रश्न विचारलेत त्याचे कागदी पुरावे बँक स्टेटमेंट मागीतलेत ! सो गा व रागा हे मुख्य आरोपी आहेत. कोर्टाने त्यांना बेलवर बाहेर सोडलेल आहे . त्यांना सु स्वा च्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 01/13/2019 - 06:13 नवीन
आता सगळ्या देणग्या चा हिशोब द्यावा लागतो हो , पूर्वी काय हापापा चा माल गपापा ! . चांगल आहे . उद्योगपति कडून पक्षा साठी घेतलेल्या देणग्याच्या अफ़रातफ़री चा प्रयोग नेहरू पासून चालू आहे म्हणजे !!!!
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 01/13/2019 - 06:29 नवीन
राजकीय पक्षांच्या देणग्या मोदी सरकारने चौकशीमुक्त केल्या, सन 2018 नेहरूंचा मृत्यू 1964-65 सुमारास जाहला, https://www.thehindu.com/news/national/lok-sabha-passes-bill-to-exempt-political-parties-from-scrutiny-on-foreign-funds-without-debate/article23285764.ece
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 01/13/2019 - 20:48 नवीन
पूर्वी काय हापापा चा माल गपापा पूर्वीच नाही तर आता सुद्धा कॉंग्रेसचा अजेंडा तोच आहे !! "हापापा चा माल गपापा " नॅशनल हॅरॉल्ड ला ९० कोटीच कर्ज दिल्याच खोटी कागद पत्र केली मग नॅशनल हॅरॉल्डची ५००० कोटीची मालमत्ता ह्यांच्या (म्हणजे सो गा व रा गा ) घश्यात गेली ! आता दोघेही बेल वर बाहेर आहेत !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 01/13/2019 - 06:46 नवीन
1995 च्या वेळी लखनऊ मधील गेस्टहावुस मध्ये बहनजी आणि त्यांच्या आमदारांची अखिलेश सरकार चा पाठिम्बा काढण्या विषयी मिटिंग चालू असताना अखिलेश च्या समर्थकानी बहनजी वर हल्ला केला , जातिवाचक शिविगाळ केल्या होत्या . तेव्हां पासून ते कट्टरवैरी झाले होते . आता 23 वर्षांनंतर त्याच बुवा भतीजा ला राजकीय अस्तित्व टिकवन्यासाठी पुन्हा एकत्र यावे लागले व त्यांनी सोइस्कर रित्या काँग्रेस ला बाजूला ठेवून जागा वाटप केले . स्व. नरसिंहराव यांच्या नंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतृत्व विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवार (१९९९) यांच्याकडे होते. या पदावर असताना पवार यांनी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ३८ खासदार निवडून आणले होते. पण जेव्हा पंतप्रधानपदासाठी नाव सूचवायची वेळ आली तेव्हा स्वतः सोनिया गांधी पुढे सरसावल्या. अर्थात, त्यांचे  विदेशीपण पाहून इतरांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. खरे तर तेव्हा विरोधी पक्षनेता असलेल्या पवार यांचे नाव पुढे केले असते तर इतरांनी पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असता. नंतर पवार, स्व. पी. संगमा व तारिक अन्वर यांनीही सोनियांचे विदेशीपण हा मुद्दा काँग्रेसमध्ये उचलला. सोनियांच्या भक्तांनी तिघांची हकालपट्टी केली होती .https://hindi.timesnownews.com/amp/india/article/ncp-chief-sharad-pawar-praised-sonia-gandhi-and-congress-president-rahul-gandhi-attack-on-pm-narendra-modi/336787#referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s म्हणजे सत्ते च्या सारिपाटावर एकमेकांचे जुने वैर विसरून एकत्र आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदींचे आभार मनावयास हवे . ऊदा : मोगा , ब्लैककैट , गोडसे , विशुमित , माई , व इतर . कृ ह घे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sun, 01/13/2019 - 20:26 नवीन
तात्या मिपापर कोण कोणाचे वैरी आहेत?? हा फक्त वाद संवाद चालू आहे. प्रतेक्षात सगळे (मोदी समर्थक, विरोधक अणि निव्ट्रल) वेगळी विचारधारा असताना सुद्धा एकमेकांचा बर्यापैकी आदर ठेवून आहेत. उगाच मोदी प्रेमापायी मिपावर फुट पाडू नका. == उगाच नाही तिथे माझे नाव घायचा अती शहाणपणा करु नका, हा निर्वाणीचा इशारा!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 01/13/2019 - 20:47 नवीन
हेच म्हणते. वैयक्तिक टीका करायची सवय काही मंडळींना येथे आहे. मोदींवर्/भाजपवर टीका झाली की ही मंडळी थेट स्वातंत्र्य्पुर्व काळात जातात. नेहरू बोस ह्यांच्यावर पाळत ठेऊन होते, शास्त्रींचा खून झाला होता... असे मानणारे लोकही येथे आहेत हे पाहून आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/14/2019 - 07:32 नवीन
जगतीक महायुद्ध १ व २ च्या बॅकग्राऊंड वर जिथे युद्धात अक्षरशः करोडो लोक मारले गेले व ज्या युद्धात भारताचे किमान २५ लाख लोक मृत्युमुखी पडले ( भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नव्हता, ब्रिटीशांनी भारताला युद्धात ढकलल होत, गांधींनी ब्रिटीशांना भारतीय सैनीक वापरायची परवानगी दिलेली होती ) ह्या युद्धात स्वतः फक्त ४.५ लाख ब्रिटीश मारले गेले. या युद्धापुर्वी करोडो ज्यु लोकांचा अमानुषपणे संहार करण्यात आलेला होता त्या पुढे गांधीजींच्या अहिंसा चळवळीमुळे भारताला ईंग्रजांनी स्वातंत्र्य दिले हे मानणारे लोक आहेत. https://www.youtube.com/watch?v=7cgRwDkP6vk नेहरुंनी सत्ता कशी बळकावली, सरदार पटेलांचा तसेच नेताजींचा काटा कसा काढला, आझाद हिंद सेनेच्या नावाचा कसा वापर करुन घेतला मग आझाद हिंद सेनेला कस बाजुला ढकलल, नेताजींना भुमिगत व्हाव लागल हे समजण्यासाठी ईतिहास उघडया डोळ्यानी शिकावा लागतो.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/14/2019 - 07:39 नवीन
तुम्ही तुमचा अजेंडा चालु ठेवा, ईतिहास हा सहजा सहजी पुसला जात नाही, नेहरुंनी काय काय उपद्व्याप केले होते हे सर्वांनाच माहिती आहे. लाल बहादुर शास्त्रीजींच्या मृत्युबद्दल ही असच गुढ अजुन आहे . जे नेहरुंनी केल ते ईंदिरा गांधीनी केल नसेल हे कश्यावरुन ? कारण लाल बहादुर शास्त्रीजींच्या नंतर पंत प्रधान पदी वर्णी ही त्यांचीच लागलेली होती.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/14/2019 - 09:52 नवीन
भाजपाच्या कुजबुज आघाडीची मते येथे नकोत. नेहरूंनी उपद्य्व्याप केले, पटेलांचा काटा काढला ह्यावर ठाम विश्वास असेल तर मोदी/शहा किंवा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने पुरावे आणावेत व टी.व्ही.वर सरळ सांगून टाकावे. पण ते धैर्य व हिंमत त्यांच्यात नाही. म्हणून समाजमाध्यमांतून अफवा पसरवायच्या.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 16:20 नवीन
सहमत .
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/14/2019 - 17:18 नवीन
99 % गरीब जनता असलेल्या देशाचा पहिला पंतप्रधान हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास घेवून देशाची काय सेवा करत असेल ? म्हणजे उपलब्ध असलेले फ़ोटो तरी तेच सांगतात , आणि त्या फ़ोटो च्या ऑरिजिनीलीटी ला आज पर्यंत तरी काँग्रेस ने हरकत घेतली नाही . एक वेळेस गाँधीचे कार्य , त्याग सामान्य माणूस मान्य करेल पण ििइंटरनेट वापरणारा कोणीही व्यक्ति चाचाची चाचेगिरी ओळखल्या शिवाय राहणार नाही .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 17:26 नवीन
म्हणजे मिसळपाववर कॉकटेलचे धागे काढणारे आणि त्याला वा वा म्हणणारे वाईट आहेत का ?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 17:55 नवीन
दारूची नशा उतरली की माणूस दुसर्या दिवशी परत माणसात येऊन आपले काम करतो, पण ब्रह्मचर्य , संतपद , अतिकाम ( रादर , अतिकामाचे ढोंग ) ह्यांची नशा लागलेले लोक कधीही नॉर्मल माणसात येत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/15/2019 - 05:22 नवीन

नॉर्मल

ची व्याख्या काय तुमची? केवळ लग्न करून संसारात असले कि नॉर्मल? बायकोच्या चपला खाणारा आणि सासर्याला शिव्या देणारा नॉर्मल का?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 01/15/2019 - 06:33 नवीन
दुसर्याच्या बायकोला ('लेडी माउंटबॅटन) प्रेम पत्र लिहीणारे ह्यांचे आदर्श ! त्यांच्या कडुन अजुन काय अपेक्षा करणार ?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 08:16 नवीन
आमच्या परिवाराकडून आपणास आरमी दिनाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/15/2019 - 14:59 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Fri, 01/18/2019 - 08:09 नवीन
हे असे खिंडीत नसते पकडायचे ! "हा वैयक्तिक हल्ला आहे" अशी बोंब मारण्याची संधीच ठेवलेली नाही. असहिष्णुता वाढली आहे हे खरंच आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/14/2019 - 03:43 नवीन
विनोदा चे वावडे आहे का तुम्हाला ? काय राव कृ ह घे . लिहून सुद्धा निर्वाणी चा इशारा ?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 01/15/2019 - 05:49 नवीन
बहनजी वर हल्ला केला , जातिवाचक शिविगाळ केल्या होत्या . तेव्हां पासून ते कट्टरवैरी झाले होते .
केवळ शिविगाळ नाही. मायावतींचे अगदी कपडे फाडण्याचा प्रकार घडत होता. तेव्हा भाजपाच्य ब्रह्मदत्त द्विवेदी नामक खासदाराने बंदुक दाखवत समाजवादीच्या गुंडाना रोखलं आणि मायवतींना त्या गदारोळातुन बाहेर काढलं.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 01/13/2019 - 06:51 नवीन
आता त्याच पावर साहेबा नीं गांधी कुटुंबा चे न थकता कौतुक करून जागा वाटप करून घेतले . बाकी यू टर्न बाबत पवार साहेबांचा हात कोणीही धरु शकत नाही .
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 03:01 नवीन
फाळणीच्यावेळी कर्तारपूर साहिब हे शिखांचे पवित्र ठिकाण भारताच्या ताब्यात घेण्यामध्ये कुचराई केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर टीका केली. ---------- होय ? मग तुम्ही जिंकून घेऊन या. सगळे काँग्रेसनेच करायचे का ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/14/2019 - 06:00 नवीन
अय्या , तुम्हीच म्हणाला होतात की सगळी युद्ध कॉंग्रेसनेच लढली होती मग दर युद्धाला थोडासा पाकिस्तानचा प्रदेश ह्या दराने एव्हांना पुर्ण पाकीस्तान जिंकुन झाला असता !! ईतकी युद्ध लढली , पाकीस्तानचे ९० हजार युद्ध कैदी परत केले पण भारताचे ५०-६० सैनिक जे पाकिस्तानने युद्ध कैदी म्हणुन ठेवले होते त्यांना परत घ्यायला मात्र वेळ मिळाला नाही !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/14/2019 - 06:12 नवीन
सगळे काँग्रेसनेच करायचे का ? नाही काँग्रेस सांगतंय आम्ही भ्रष्टाचार करतोय. तुम्ही बाकी सगळं करा.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/14/2019 - 15:10 नवीन
सगळे काँग्रेसनेच करायचे का ? आ य ला काँग्रेस हा पाकिस्तानशी चार वेळा युद्ध् करुन सुद्धा आपली भुमी हरणारा जगातला असा पहिला पक्ष असेल जो स्वतःला विजेता घोषीत करतो. गिलगीट बाल्टीस्तान, काश्मिरचा पाक व्याप्त भाग हा अजुनही पाकिस्तान कडेच आहे. त्यातला काही भाग चीन ने गिळलेला सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 16:15 नवीन
Sanghi portal 'My Nation' spreads fake news about “Rahul Gandhi stumped by a 14-year-old girl” in Dubai The article by ‘My Nation’ has no accompanying video to back its claim. Quite predictably, the article was soon found circulating on social media. Notable among those who shared it was addtional RBI director, Gurumurthy who has a penchant for falling for hoaxes. Turns out, it is a three-year old image! https://www.altnews.in/my-nation-spreads-fake-news-about-rahul-gandhi-stumped-by-a-14-year-old-girl-in-dubai/
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2019 - 16:18 नवीन
*माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवताना पकडला गेला राज्य भाजप IT सेल प्रमुख* मुंबई : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला आहे. विशेष *एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला आहे.* वास्तविक राहुल गांधी यांच्या मुलाखती विषयीची एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करण्यात करण्यात आली होती. वास्तविक एबीपी न्यूजच्या त्या मूळ फ्लॅश न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोशॉप करून त्यात राहुल गांधी जे बोलले नव्हते ते मुस्लिमांशी संबंधित वाक्य बनवून त्याला स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं होतं. भाजपच्या या फेक महाशयांनी या मूळ बातमीमध्ये फोटोशॉपकरून “काँग्रेस मुस्लिमो की है और उनकी ही रहेगी – राहुल गांधी” अस धार्मिक रूप देऊन हिंदुत्वाचा ठरल्याप्रमाणे अजेंडा राबविण्याचा कार्यक्रम आखल्याचे सिद्ध आहे. वास्तविक त्यात राहुल गांधी यांनी कोणताही धार्मिक विधान केलं नव्हतं. परंतु, हिंदू मुस्लिम असा द्वेष पसरवून समाजात विकृती पसरविणे हा त्यांचा एकमेव अजेन्डा असल्याचे सिद्ध होत आहे. विषय केवळ फोटोंचानसून तर अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा खोडसाळपणा करून ते समाज माध्यमांच्या आधारे तरुण-तरुणींची माथी भडकविण्याचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांच्या या कृत्यामुळे ते प्रसार माध्यमांची सुद्धा अप्रत्यक्ष बदनामी करत आहेत. बातमी खोटी असल्याचे निदर्शनास येताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे. https://www.maharashtranama.com/politics/maharashtra-state-bjp-it-cell-head-caught-during-speeding-fake-news-on-social-media/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/14/2019 - 16:42 नवीन
मला वाटलं पोलिसांनी पकडलं. अटक झाली खटला भरला इ. इ. चार काँग्रेसीं नेटकरींनी पकडलंय. डोंगर पोखरून "झुरळ" निघालं
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 01:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा