Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

द काश्मीर फाइल्स

न
निनाद
Wed, 03/09/2022 - 04:34
🗣 327 प्रतिसाद
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 93281 views

🗣 चर्चा (327)
स
सुबोध खरे Sat, 03/26/2022 - 16:53 नवीन
बिरुटे सर तुम्ही दिलेला इतका भंपक आणि फाल्तु दुवा दुसरा नसेल. डोंगर पोखरून झुरळ बाहेर काढलंय All IndiaWritten by Sheikh Zaffar IqbalUpdated:

January 24, 2017

3:03 pm IST According to government figures, after the unrest in Kashmir started in

early 1990s,

37,347 Hindu families, 2,257 Muslim families and 1,758 Sikh families had migrated from Kashmir. a Central grant of ₹ 1618.4 crore sanctioned in 2008-2009, administrative officials in Kashmir valley have already identified 723 kanals of land which has a tentative cost of land ₹ 374.65 crore money

will be

used to build 6,000 transit accommodations १९९० सालच्या वंश विच्छेदा साठी २००९ साली १६१८ कोटी मंजूर झाले. (१९ वर्षांनी) त्यावर २०१७ पर्यंत फक्त ३७४ कोटींची जमीन निश्चित झाली ( २७ वर्षांनी) आणि त्यावर ६ हजार घरे बांधण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. कशाला उगाच फालतू दुवे देऊन स्वतःचे हसे अन इतरांची करमणूक करताय?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/27/2022 - 18:11 नवीन
डॉ.साहेब. देशच भंपक नेतृत्वाच्या नादी लागलेला आहे, अनुयायी तसेच. त्यामुळे तुम्हाला सर्व भंपकच वाटणार. बाकी, अजून खुप दुवे देता येतील पण शेवटी समजून घेण्याच्या तुमच्याही वयोमर्यादांचा आदर करावा लागतो. बाकी, राहीला विषय करमणुकीचामोंदी भक्तांमुळे देशभर करमणुक होत असते. लवकर बरे व्हा...! वाढदिवसाच्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/28/2022 - 01:10 नवीन
मोंदी भक्तांमुळे देशभर करमणुक होत असते. हो ना काय ती भक्ती करोडोंन्चि दोन वेळा निवडून दिले .. शी शी शी ... तुंमपे लानत है भारतीय जनता .. तुम्हारा चुक्याच कधी एकदा हे संपतंय आणि अतिशय परिपक्व असे राजकुमार राहुल गादि वर बसत आहेत .. याची वाट पाहती आहे "गुलाम" जनता
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/28/2022 - 05:54 नवीन
लवकर बरे व्हा @प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मुद्देसूद उत्तर देता आले नाही म्हणून असे गोलगोल लिहिणे आपल्याला शोभत नाही. बाकी वैयक्तिक पातळीवर उतरलात हे पाहून समाधान वाटले कारण त्याचा अर्थच असा आहे कि आपल्याकडे मुद्देच राहिलेले नाहीत. बाकी २०२४ मध्ये श्री मोदीच परत येणार हि काळया दगडावरची रेघ आहे त्यामुळे जळजळ अजून साडे सात वर्षे राहणार आहे. लॉन्ग टर्म उपाय शोधून ठेवा
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 03/26/2022 - 03:11 नवीन
राजकारणातील रक्तपिपासू जळु .... हि जळू कुठे निर्माण होते ? अलाहाबाद च्या "आनंद भावनापासून" कि सांबारमतीच्या आश्रमातून अर्थात आपण म्हणार कि जेथून संत्री मिळतात तिथून हे गृहीत आहे आज रात आठबजह से सभी पंडितोकी एक सुची बनाकर सभी को अपने घर मिल्ट्री के द्वारा घर घर छोडा जायेगा' काय ते काय ते स्वप्नरंजन .. जादूची कांडी जणू.... नुसता असा विचार जरी केला तरी काय आंगडोंब उसळवाल हे काय आमहास माहीत नाही ! पहिला शब्द फेकला जाईल कि हे इस्लाम विरोधी आहे ! ( हायला काश्मिरी हिंदूंना त्यांच्या स्वतःच्या घरी जर वसवायला कोणी मदत केली तर ते इस्लाम च्या विरुद्ध कसे काय होईल कोण जाणे आधी समान नागरी कायद्यातील "स" जरी शेठ नि उच्चारला तर तुम्ची काय प्रतिक्रिया येईल हे तर बघू
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 08:11 नवीन
इथे कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ति आठवतात... समिधाच नव्हे त्या, त्यांत कसला ओलावा, कोठून फुलांपरी मकरंद वा मिळावा, जात्याच रूक्ष त्या, एकच त्या आकांक्षा, तव आंतरअग्नि क्षणभरी तरी फुलावा. हे झाले, हेही खूप झाले. पुढे हा आंतरअग्नि मार्ग दाखवेलच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 03/25/2022 - 02:26 नवीन
निर्माता / दिग्दर्श काने १५ कोटी + आपलला जीव धोक्यात घालून चित्रपट काढला.. जनतेने स्वखुशीने डोकयावर घेतले तर मी तर म्हणतो कि यातील "जीवाची किंमत = झालेलया फायदा आहे.. त्यामुळे कोणी कुठे वापरणार हे विचारयाचाह अधिकार नाही .. असल्या काड्या घालणं बंद करा.. हवे तर तो चित्रपट पाहू नका दुसरे असे कि यातील कलाकारांवर निश्चित पाने आटा काही निर्माते "गुप्ता फतवा काढून त्याला वाळीत टाकणार " तर त्यांना हि यातील पैसे हरकत नाही मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी भरकटवण्यासतचे हे टूल किट आहे दुसरे काय .. लाज वाटली पाहिजे
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/24/2022 - 17:11 नवीन
का काय का अहो ? सांगितले ना त्यांनी मुस्लिम अभिनेते आहेत म्हणून.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/25/2022 - 06:24 नवीन
+१ अभिव्यक्ती सादरीकरण आणि स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. थेटरात कशाला घरीपण "स्वदेस",डिडिलजे,सिक्रेट सुपरस्टार ,पीके नाही पाहत टीव्ही वर काही लोक. कलेला कला राहू द्या राव!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 07:18 नवीन
बाकी तुमच्या प्रतिसादातील इतर टिपण्णीवर काहीही म्हणायचे नाही, पण
कलेला कला राहू द्या राव!
हा निव्वळ भुक्कडपणा आहे, असे माझे मत आहे. कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्‍या कलाकारांनी करणे जरूरी आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 03/25/2022 - 07:36 नवीन
समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्‍या कलाकारांनी करणे जरूरी आहे.
खरे आहे. मुसलमान कलाकारांनी जन्म घेण्याआधीच विचार करायला हवा होता. या context मध्ये दुसरा कोणता विचार अपेक्षित असू शकतो ?!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 08:00 नवीन
माझ्या वक्तव्यात धर्माचा विषय कुठून आला? मी तसा काहीही उल्लेख केलेला नाही, अथवा तसे काही हिंटही केलेले नाही. माझी टिपण्णी सर्वसाधारण कुठल्याही कलाकाराला लागू आहे. 'कलेसाठी कला, एव्हढेच आम्ही जाणतो' असे म्हणून समाज/ देश ह्यांविरूद्ध काहीही बडबडणार्‍यांविषयी आहे; आपली व एखाद्या शेजारी देशाची मोठी कुरबूर सुरू असतांनाही, तेथे जाऊन कार्यक्रम करणार्‍यांविषयी आहे. माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय कलाकारांनी मला आनंद दिलेला आहे. मी स्वतः सर्वधर्मिय कलकारांसमवेत कार्यक्रमांत भाग घेतलाय. आणि एव्हढेच नव्हे, दोन वर्षांपूर्वी, आमच्या येथील हिंदू मंदिरातील आमच्या कार्यक्रमांत, आम्ही 'बेकस पे करम कीजिये' हा नातही आळवला होता. अर्थात, मी मुविंच्या कडव्या भूमिकेशी सहमत नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 03/25/2022 - 08:04 नवीन
मुविंच्या भूमिकेचे समर्थन असा माझा गैरसमज झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 08:05 नवीन
ती माझी चूक होती.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/25/2022 - 08:09 नवीन
माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय कलाकारांनी मला आनंद दिलेला आहे +१ जेवढे ज्ञानदेव ईश्वराकडे घेऊन जातात तेवढेच संत कबीर ही ईश्वर रूप दाखवतात.. कलेला कलाच राहू द्या _/\_
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 03/26/2022 - 02:48 नवीन
प्रदीप १००%
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/25/2022 - 07:50 नवीन
कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्‍या कलाकारांनी करणे जरूरी आहे. म्हणजे नक्की कशी कलाकृती घडवावी नवरसांपैकी?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 08:03 नवीन
त्यांना जशी सुचते तशी घडवावी. मात्र अनेकदा काही कलाकार, आपण वॅक्युममधे रहात असल्याचे दर्शवतात. त्याला आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 08:05 नवीन
कलाकारांची ते रहातात त्या समाजाशी बांधिलकी असते, हे मान्य करून कार्य करावे.
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Fri, 03/25/2022 - 08:20 नवीन
माझी पचनशक्ती अतिशय अशक्त आहे. मी सकाळी एकपेक्षा जास्त चपाती खाल्ली तर डोकेदुखी, मळमळ होते. सतत अस्वस्थ वाटत रहाते. खुप झोप येते. एकच चपाती खाल्ली तर काहीच त्रास होत नाही फक्त एक तासाने भूख लागते. कामावर, बाहरगावी असताना अडचण होते. पचनशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय आहे का? डॉक्टरांना दाखवून, औषधी घेऊन झाली पण विशेष फायदा झाला नाही.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Fri, 03/25/2022 - 13:37 नवीन
चपातीचा आकार वाढवून बघा.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 03/29/2022 - 15:52 नवीन
हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. पठाण फ्लॉप करा, लालसींग चड्ढा बुडवा.. का? तर ते शहारुख, आमीरचे चित्रपट आहेत म्हणुन.
काही मंडळी आहे जी खास करुन शाहरुखच्या मागे नेहमीच हात धुवून लागलेली आहेत.. मग कधी त्याने पाकिस्तानला मदत केल्याची अफवा उठवली गेली. आर्यन खान ड्रग्जच्या केसमध्ये अडकल्यावर तर अनेक पोस्ट्सना अगदी उत आला होता त्यानंतर अमेरिकेच्या कुठल्यशा विमानतळावर लघुश्ंका केल्याचा कुणाचा तरी व्हिडिओ आर्यन खानच्या नावाने प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला मग लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शाहरुखने मुस्लिम समाजातील काही प्रथेप्रमाणे फुंक मारली त्या प्रसंगाला तो थुंकला म्हणत त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.. वानखेडे स्टेडियमवर शाहरुखने एकदा काहीतरी गोंधळ घातला होता. पण असा एखाद दुसरा प्रसंग वगळला तर तो फारस कधी काही वावगं वागला आहे असं दिसत नाही. तरी काही लोक नेहमीच त्याला बदनाम करण्याच्या प्रयत्नात असतात असे दिसते. [अर्थात शाहरुखचे गेले काही वर्षातले बहुतेक चित्रपट हे टुकार व फ्लॉप होण्याच्या लायकीचे होते ही गोष्ट वेगळी ] अमिरला ट्रोल केलं जातं ते त्याने पीके चित्रपटात हिंदू धर्मातील काही प्रथांवर टीका केली म्हणून.. अशा पोस्ट्स मध्ये "आमिरचा पीके" असे म्हंटले जाते.. पण पीकेचे निर्माते आहेत विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी तर दिग्दर्शक हिरानी आहेत. मग तो "आमिरचा" चित्रपट कसा ? आणि निर्माता दिग्दर्शक असेही काही नवखे नाहीत की ज्यांचा चित्रपट अभिनेत्याने आपल्या पध्द्दतीने हायजॅक करावा. आमिरला ट्रोल करण्याचे दुसरे कारण असते त्याने दोन हिंदू तरुणींशी लग्न केले आणि मग काही वर्षांनी त्यांना घटस्फोट दिला.. आणि काहींना यातही लव्ह जिहाद दिसतो..(धन्य!!) पण या ट्रोल्समधून सहसा सलमानची मात्र सुटका होते. हे पण एक कोडेच आहे... खरेतर सलमानची ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची केस ज्यात रस्त्यावर झोपलेले काही गरीब लोक मारले गेले ती अतिशय गंभीर बाब होती आणि काळवीट शिकारची केसही गंभीर होतीच. पण तरी सलमानचे चित्रपट प्लॉप करा अशा पोस्ट्स सहसा फिरत नाहीत .. सलमान स्वतःला हिंदू व मुस्लिम असे दोन्ही म्हणवून घेतो (संदर्भ : विकीपीडिया) म्हणून असेल काय ? .. बाकी त्याच्या अतिरेकी अभिनयामुळेच झाले तर काही फ्लॉप होतात पण बहुधा इतर चित्रपटात चांगला माल मसाला असल्याने सलमानच्य वाईट अभिनयालाही डोक्यावर घेत त्याचे चाहते चित्रपट हिट करतातच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/24/2022 - 13:10 नवीन
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/the-kashmir-files-anupam-kher-vivek-agnihotri-propaganda-film-anti-hindu-muslim-kashmiri-pandit-shared-video-real-massacre-happened-in-kashmir/articleshow/90415676.cms?minitv=true उदारमतवादी हिंदू, आता काय मत व्यक्त करणार? हे बघणे रोचक ठरेल ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/24/2022 - 15:33 नवीन
https://www.lokmat.com/bollywood/the-kashmir-files-director-vivek-agnihotri-says-threats-to-his-life-after-the-success-of-film-a681/ आता, उदारमतवादी हिंदू, काय प्रतिसाद देतात? हे वाचणे रोचक ठरेल ....
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 03/29/2022 - 14:27 नवीन
आता पर्यंत काश्मिर फाइल्सने मिडीया रिपोर्ट नुसार २२८.१८ कोटींचा व्यवसाय केला आहे आणि २५० कोटींकडे घोडदौड चालू आहे. आर.आर.आर सारखी तगडी व्यावसायिक स्पर्धा असताना देखिल काश्मिर फाइल्स प्रभाव ओसरत नाहीय. तीन तासांपेक्षा जास्त लांबीमुळे आर.आर.आर बद्दल नारा़जीचे सूर उमटताना दिसताहेत !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/11/2022 - 14:53 नवीन
“जेव्हा मुस्लीम बहुसंख्यांक असतो तेव्हा हिंदू…”, शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत https://www.loksatta.com/manoranjan/ncp-chief-sharad-pawar-criticizes-the-kashmir-files-director-vivek-agnihotri-and-people-with-power-dcp-98-2882809/ माननीय शरद पवार, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे काय हाल होत आहेत? हे बघायला विसरले असतील किंवा गेला बाजार, अफगणिस्तान येथील बौद्ध मुर्तींचा विध्वंस कुणी केला? हे वाचायचे विसरले असतील .... बाकी, गाथा इराणी, हे पुस्तक माननीय शरद पवार, यांनी न वाचण्याची शक्यता जास्त आहे ...
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 04/12/2022 - 02:00 नवीन
संकष्टीला मटन खा असा सल्ला देणारे लोक आहेत हे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा