Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

द काश्मीर फाइल्स

न
निनाद
Wed, 03/09/2022 - 04:34
🗣 327 प्रतिसाद
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 93281 views

🗣 चर्चा (327)
ब
बाजीगर Sun, 03/13/2022 - 13:59 नवीन
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sun, 03/13/2022 - 14:00 नवीन
आपल्यावर अमानूष अत्याचार झालाय, ह्याचं documentation आणि प्रसार झालाच पाहिजे, हे आपलं म्हणणं पटलं. विषेशत: तरुणपिढी ला हे कळलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/13/2022 - 14:56 नवीन
ते नक्कीच बघतील .... सूनबाई, देखील आमच्या सारखीच, हिंदू हितवादी आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/13/2022 - 12:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 03/14/2022 - 05:51 नवीन
गोपाल पाठा
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sun, 03/13/2022 - 17:25 नवीन
कायप्पा वरून साभार: एक विनंती आहे. खूप जण म्हणत आहेत, "आम्हाला काश्मीर फाईल्स पाहवणार नाही" ठीक आहे! पण जरी पाहिला नाहीत तरी तिकिटे काढा. हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर तुफान चालला पाहिजे. विवेक अग्निहोत्री यांनी नाना अडचणी आणि त्रास याला तोंड देत हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराचा दाबून ठेवलेला सत्य इतिहास मांडायला हा चित्रपट बनवला. ही हिम्मत आतापर्यंत कोणीही केली नव्हती. त्यात बॉलिवूडमधील नशेडी , माफियाचे कुत्रे रिलीज करायला धड थिएटर मिळू देत नाहीयेत. कपिल शर्माने प्रमोशनला नकार दिला या बातम्या आपण ऐकतोय. तरीही सगळ्याला तोंड देत सिनेमा रिलीज झालाय. खानांच्या तालावर नाचणाऱ्या बॉलिवूडमधील या प्रो हिंदू इकोसिस्टिमला फ़ंडिंग आपणच केले पाहिजे. हा पिक्चर जर चालला नाही तर भविष्यात कोणी हिंदूंच्या बाजूने बोलण्याची, वाचा फोडण्याची किंवा काही कलाकृती बनवण्याची हिंमत दाखवणार नाही हे लक्षात ठेवा! त्यामुळे सर्व हिंदू भगिनी आणि बांधवांना हात जोडून विनंती आहे, की जरी तुम्ही चित्रपट पाहणार नसाल तरी तिकिटे काढा. मग सिनेमाला जा किंवा जाऊ नका. पण तिकिटे काढाच.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 03/13/2022 - 17:41 नवीन
केंद्रात हिंदू वादी सरकार आहे पूर्ण बहुमत आहे सरकार का. देशाच्या बहुसंख्य जनतेचा आजुन पण सरकार ल पाठिंबा आहे सरकार कडे काश्मिरी पंडित न साठी काही ठोस कार्यक्रम आहे का? त्यांच्या विषयी खरेच तळमळ असेल तर त्यांना त्यांच्या मुळ जागी परत त्यांना वसवले पाहिजे त्यांच्या मालमत्ता परत मिळवून दिल्या पाहिजेत. पण अशी काही योजना सरकार कडे नाही. रडगाणे किती दिवस गाणार. रडगाणे कोणी ऐकत नाही ठोस उपाय पाहिजेत योजना पाहिजे. इथे पण परत पोकळ भावना भडकून देण्याचा उद्योग च चालू आहे काश्मीर फाईल ह्या सिनेमाचा आधार घेवून. फक्त पोकळ प्रेम ..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/14/2022 - 02:39 नवीन
इथे पण परत पोकळ भावना भडकून देण्याचा उद्योग च चालू आहे काश्मीर फाईल ह्या सिनेमाचा आधार घेवून. फक्त पोकळ प्रेम .. sunil kachure यांचा मी जाहीर धिक्कार करतो ...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 03/14/2022 - 14:38 नवीन
sunil kachure यांचा मी जाहीर धिक्कार करतो ...
आणि त्यांचे प्रतिसाद वाचून, त्यावर प्रतिसाद लिहीणार्‍या तुमच्यासकट सर्वांचा मी 'जाहीर धिक्कर' वगैरे करतो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 03/13/2022 - 18:55 नवीन
बहुचर्चित काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्यात दाखविलेल्या घटनांविषयी शाळेत असताना झेलमची हाक म्हणून एका पुस्तिकेत आणि नंतर जगमोहन यांच्या My frozen turbulences in Kashmir या पुस्तकात वाचले होते. मला पुरोगामी विचारवंत या जमातीविषयी जितकी घृणा आणि तिरस्कार आहे तितका माझ्या ओळखीतल्या कोणालाही असणे शक्य नाही. तरीही हा चित्रपट बघून त्यांच्याविषयीचा संताप आणखी वाढला आहे. अमेरिकेत झालेल्या घटनेवर हे लोक Black lives matter हे hashtag चालविणार. इस्राएल-Palestine मध्ये काही झाले की यांना लगेच मानवता आठवणार. पण मग काश्मीरी हिंदूचा विषय आला की मग यांच्या तोंडाला कुलूप लागते. खरं तर या लोकांसाठी All lives other than Hindu lives matter हा योग्य hashtag आहे. त्या लोकांचे धोरण तेच असते. बस आता ठरले. या पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांवर कडकडीत बहिष्कार टाकायचा. समाजकार्याच्या नावावर हे लोक हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत असतात. त्या संस्थाना वाळीत टाकायचे. हे सगळे लोक इतके कट्टर मोदीविरोधी का असतात याचे खरे कारण मोदींनी या लोकांना मिळणारा चखणा बंद केला आहे. आणि हे असले लोक सिव्हील सोसायटीचे प्रतिनिधी असतील तर मरो ती सिव्हील सोसायटी. त्यांच्याविषयी कोणीही अश्रू ढाळायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 03/14/2022 - 00:57 नवीन
या पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांवर कडकडीत बहिष्कार टाकायचा. समाजकार्याच्या नावावर हे लोक हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत असतात. त्या संस्थाना वाळीत टाकायचे. हे आपण सर्वांनी करायचे आहे. म्हणजे दणका बसेल. यांच्या एन जी ओज, यांचे वार्ताहर, यांचे चित्रपट समिक्षक, यांचे वकील, यांना सहाय्य करणारे प्राध्यापक या सर्वांना जेथे दिसेल तेथे उघडे पाडले गेले पाहिजे. डावे पुरस्कृत चित्रपट बनवणारे - भट कुटुंबीय, खान मंडळी, बच्चन गट हे सर्व या इको सिस्टीमचा भाग आहेत हे लक्षात आले की अक्षरश: डोळे उघडतात. त्यातले एकमेकांचे संबंध सहजतेने दिसू लागतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/14/2022 - 02:37 नवीन
चंद्रसूर्यकुमार , १०००% सहंंमत
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 03/13/2022 - 20:11 नवीन
निनाद, धाग्याबद्दल आभार. मला हा चित्रपट बघायची इच्छा नाही. अगदी १९९० सालापासनं काय व कसं घडंत गेलं त्याची जाणीव आहे. परत तो विषय नकोसा वाटतो. माझे बापजादेही काहीशे वर्षांपूर्वी असेच काश्मीरातनं हाकलले गेले होते. कदाचित जरा कमी हिंसक प्रकारे असेल, पण हाकलले गेलेले हे नक्की. काश्मीरातनं परतपरत हिंदूंची हाकलपट्टी होत होती. आज इतक्या शतकांनी त्यास वाचा फुटते आहे हे योग्य दिशेने पडलेलं पाऊल आहे. काश्मीरी विखरणाचा ( = डायास्पोरा ) एक सदस्य म्हणून माझी मती गुंग झाली आहे. जाताजाता : मागे राजीव गांधींवर काहीतरी आक्षेपार्ह टिपणी केल्यामुळे माझं सदस्यत्व गोठवलं होतं. चूक माझीच होती. रीतसर माफी मागितली. प्रशासकांनी क्षमा करून सदस्यत्व परत सुरू केलं. राजीव गांधींविषयी तीव्र भावना बाळगण्यामागील कारण हा चित्रपट पहिल्याने कळतं. बस इतकंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 03/14/2022 - 00:51 नवीन
यांची इकोसिस्टिम फार ताकदवान आहे. - हो अजूनही आहे! भारतातील डाव्या आणि साम्यवादी लोकांची इकोसिस्टिम उघडी पाडण्यात विवेक रंजन अग्निहोत्री यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या '''अर्बन नक्षल''' या पुस्तकात नक्षल गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी शहरी भागातील लोकांचे गट कसे पुढे येतात हे त्याने दाखवून दिले आहे. या गटात वार्ताहर, वकील, प्राध्यापक आणि समाजात प्रतिष्ठेचा बुरखा घतलेले अनेक लोक सामील असता किंवा सामील करून घेतले जातात. हे लोक त्यांना हव्या असलेल्याच बातम्या माध्यमात पेरतात. त्यांना हव्या असलेल्या दृष्टीनेच बातमीचे चित्रण केले जाते. मग गुन्हेगारांना बळी असल्याचे भासवले जाते. अशा रीतीने या गटाने दबाव निर्माण करायचा आणि सरकारला काम करू द्यायचे नाही असा साधारण डाव्या विचारधारेचा कामाची शैली असते. यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाया करणे अशक्य होते. मग परत नवीन गुन्हेगारी सुरू होते असा निष्कर्ष त्यांनी आपल्या संशोधन लेखनातून काढला आहे. यासाठी त्यांनी अनेक पुरावे आपल्या पुस्तकात दिले आहेत. आपण विचार केल्यावर असे अनेक पुरावे जागोजागी आपल्याला दिसून येतात. आपली कार्य शैली उघडी पडल्याने अनेक डाव्या विचारधारेच्या लोकांनी अग्निहोत्री यांना प्रचंड विरोध केला आहे. त्यांची विश्वासार्हता नाही हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. आपली वेदना हीच माझीही वेदना आहे गा मा साहेब!
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 03/13/2022 - 21:41 नवीन
राजकारण बाजूला ठेवून The Kashmir file एक सिनेमा आहे . आणि सिनेमा एक व्यवसाय आहे बाकी व्यवसाय सारखा.. त्या बद्धल इतकेच राजकारण जरा पण इतके बिनडोक ,स्वार्थी करू नका की ते देशालाच संकटात टाकेल. अतिरेकी धर्मवाद मुळे पाकिस्तान ची स्वतःची आज ची अवस्था काय आहे पूर्ण मुस्लिम धर्मीय राष्ट्र आहे तरी हे अतिरेकी विचाराचे जल्लाद मशिदी मध्ये,शाळेत पण आत्मघाती हल्ले करतात..एक धर्मीय च आहे... मुस्लिम धर्मीय दुबई ,सौदी पण आहे पण तिथे असे घडत नाही भारतात धार्मिक उन्माद निवडणुका जिंकण्यासाठी कोणी वापरू नका. मग ते मुस्लिम असतील ,हिंदू असतील नाहीं तर बौद्ध देशाला रसातळाला घेवून जाईल हा स्वार्थ त्या पेक्क्षा भारताची न्याय व्यवस्था मध्ये . सुधारणा करा..पोलिस यंत्रणा सशक्त बनवा.active बनवा. अंतर्गत सुरक्षा इतकी मजबूत आणि talented हवी की कोणताच गुन्हेगार कोणत्या ही धर्माचा असू त्याला कठोर मधील कठोर शिक्षा लगेच मिळेल .धर्म देश एकत्र ठेवू शकतं नाही .अनेक उदाहरणे आहेत ..न्याय,सुशासन ,भेदभाव बिलकुल नसणे. आणि बलाढ्य आर्थिक स्थिती ह्याच गोष्टी देश एकत्र ठेवू शकतात . हे लक्षात ठेवा. नाही तर आज सत्ता मिळण्यासाठी केलेल्या उचापती पुढच्या पिढी लं नरकात ढकलतील.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/14/2022 - 02:35 नवीन
- माझ्या गावात २च खेळ लावले होते, काही कारणाने जाता आले नाही परंतु तिकिटाचे २८ डॉलर मी विवेक रंजन अग्निहोत्रींच्या कार्यासाठी या ना त्या पद्धतीने पोचवण्याचा पण केला आहे - या शिवाय काही मित्रानि मिलून , मुद्दामून दुकानात जाऊन " नॉन हलाल " मिळेल काय असे विचारायचा उपक्रम हाती घेतला आहे ( भादीपचं भाषेत शांतीत क्रांती ) पशिमत्य देशात रहनर्या मिपकरन्न हि हे आवाहन कि अपण पण असे करुन बघा...( कल्पना पटत अस्ल्यास ) बाकी सर्व पूरो गाम्यांना काय बोलू.... आम्ही हरलो हो बरोबर आहे तुमच, हिंदूंच्यावर अत्याचार कधीच होत नाहीत ... आणि झाले तरी त्या बद्दल शष्प बोलणे दुःख करणे , हे महापाप आहे .. आपला एक उदास हरलेला हिंदू
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 06:51 नवीन
कशाला नाराज होता? माझ्या ओळखीतले 100-125 हिंदू आता, उदारमतवादी हिंदू नाहीत...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/14/2022 - 04:02 नवीन
एकूणच या चित्रपटाच्या निमित्ताने जमात-ए-पुरोगामी चा तडफडाट होत आहे ते बघता बाण योग्य ठिकाणी लागला आहे याची खात्री पटते.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Mon, 03/14/2022 - 05:22 नवीन
इतिहासातीलच नव्हे तर कोणाहि स्त्रीची प्रतिमा जपलीच पाहिजे. या सिनेमात हिन्दु पन्डितान्च्या स्त्रियावर झालेले अत्याचार पाहून अस्वस्थ झालो॰
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Mon, 03/14/2022 - 05:34 नवीन
गेली अनेक वर्षे पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या संस्था समाजकार्याच्या नावाखाली हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत आहेत असे दिसते. यात देशातील तसेच परदेशी वर्तमानपत्रे, टीव्ही चानेल्स, अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि वृत्तसंस्था पण आहेत.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 03/14/2022 - 06:01 नवीन
Image removed. प्रतिसाद देणाऱ्यांची नावे पहा: Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 06:18 नवीन
देवगिरी येथील अत्याचार विजयनगर येथील अत्याचार कर्णावती येथील अत्याचार राजस्थान मधला जोहार सुर्हावर्दी प्रकरण पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये झालेला हिंसाचार पानीपत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील लेख वाचल्या नंतर, कित्येक दिवस झोप येत न्हवती त्यामुळे, आता हा सिनेमा बघवणार नाही, पण तिकीट काढून, सिनेमा बघणार नाही .... उदारमतवादी हिंदू, हा हिंदू लोकांना लागलेला शाप आहे ...
  • Log in or register to post comments
स
स अर्जुन Wed, 03/16/2022 - 07:09 नवीन
क्रुपया लिन्क शेर कराल काय....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/16/2022 - 14:50 नवीन
वाचनालयांत मिळतील
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/14/2022 - 06:27 नवीन
चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्व कलाकारांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 07:20 नवीन
आमच्याविरोधात फतवा निघाला होता, पण…”, पल्लवी जोशींनी सांगितला शूटिंग करतानाचा ‘तो’ किस्सा https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-producer-pallavi-joshi-reveals-fatwah-against-her-and-husband-vivek-agnihotri-last-day-of-the-shooting-in-kashmir-nrp-97-2840345/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 07:43 नवीन
https://youtu.be/DsJdrYjxdsw https://youtu.be/NcvE8bHnDPU https://youtu.be/0xBrXRHtfgM https://youtu.be/etGu-mFhigA
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 08:01 नवीन
सिनेमाघरों में लगाई गई रोक, नहीं दिखाई जाएगी फिल्म https://m.youtube.com/watch?v=j8yOo6vCRJE&feature=youtu.be
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/14/2022 - 08:06 नवीन
The काश्मीर फाईल हा सिनेमा . हिंदू वरील झालेले अत्याचार जगा समोर आण्याण्यासाठी बनवला गेला आहे. त्या मधील काम करणाऱ्या कलाकार चा पण तोच उदात्त हेतू आहे. हे खरे असेल तर . ह्या सिनेमाच्या निर्मात्याने असे जाहीर करावे. मी हा सिनेमा व्यवसाय म्हणून बनवला नशिम काश्मिरी पंडित विषयी प्रेम आहे म्हणून बनवला आहे . ह्या सिनेमातून होणारा नफा हा मी जे पीडित काश्मिरी पंडित आहेत त्यांना दान करत आहे फक्त सिनेमा निर्मिती साठी झालेला खर्च सोडून बाकी सर्व पैसा मी दान करत आहे. त्यांची नियत साफ असेल तर असे जाहीर आश्वासन निर्माते देतील मग मात्र देशातील सर्व हिंदू नी हा सिनेमा थिएटर मध्ये जावून बघावाच . पण इथे पण स्व स्वार्थ साधण्यासाठी जाहिरात बाजी असेल तर हिंदू नी फुकट २०० रुपये तरी का खर्च करावेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 03/15/2022 - 04:20 नवीन
अजिबात गरज नाही, त्याने हा नफा असे अजून चित्रपट तयार करण्यासाठी वापरावा. आम्ही त्याला खुशीने पैसे देऊ.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 08:13 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Farooq_Ahmed_Dar 2006 मध्ये, ह्याची सुटका झाली आणि त्यावेळी असलेले केंद्रीय मंत्रीमंडळ .... https://en.m.wikipedia.org/wiki/First_Manmohan_Singh_ministry Farooq Ahmed Darच्या सुटकेला, कुठल्या केंद्रीय मंत्र्याने आक्षेप घेतला होता का? जितकी-जितकी इतिहासाची पाने उलगडावी, तसे तसे, माझे हेच मत बनत जाते की, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हिंदू हितवादी भुमिका घेत नाहीत... जाता जाता, सध्या तरी Farooq Ahmed Dar, अटकेत आहेत, असे विकीपेडीया वरून कळते... अर्थात, हा काही खात्रीशीर माहितीचा स्त्रोत नाही..
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/14/2022 - 08:49 नवीन
आज ची हिंदू ची आर्थिक स्थिती आणि bjp व्यतिरिक्त दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सत्ता काळातील हिंदू ची आर्थिक स्थिती ह्या वर फोकस करा. बकवास,भावनिक, विषय सोडून ध्या. आज हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम आहेत का? असे प्रश्न मनात आणा. हिंदू कमजोर आणि हिंदुत्व वादी स्वार्थी फक्त सत्तेवर. .. ही स्थिती आहे. भावनेच्या आहारी जावू नका. स्व स्वार्थ बघा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 03/14/2022 - 11:00 नवीन
sunil kachure,
आज हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम आहेत का? असे प्रश्न मनात आणा.
रोचक सल्ला आहे. हिंदूंच्या आर्थिक स्वार्थाचं म्हणाल तर तो चालू होताच की. १९९० साली जेव्हा काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद होत होता तेव्हा उर्वरित भारत मुक्त अर्थप्रणाली राबवण्यात मग्न होता. तुमचा सल्ला आधीच अंमलात आणून झाला आहे. काश्मिरी हिंदूंच्या जखमांवर कृपया मीठ चोळू नका. धन्यवाद. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/14/2022 - 09:29 नवीन
हिंदू वादी BJP सरकार केंद्रात सत्तेवर आल्या नंतर सर्व सामान्य हिंदू ची आर्थिक स्थिती ही bjp सत्तेवर नसताना असलेल्या सरकार च्य काळात उत्तम होती. हिंदू आर्थिक बाबतीत कमजोर करायचे .त्या वर काहीच बोलायचे नाही आणि भावनिक विषय काढून हिंदू हित वादी आम्हीच आहोत असा प्रचार करायचा. ही त्री सूत्र आहेत . हिंदू चे हित हेच ध्येय असेल तर ..देशातील प्रतेक हिंदू आर्थिक बाबतीत पूर्ण सक्षम असेल अशा योजना अमलात आणा. आणि नंतर हिंदू हिताच्या गप्पा मारा
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/14/2022 - 09:55 नवीन
कोण हे पंडित हिंदू वर जातीच्या नावा वर अत्याचार करणारे हैवान. अजून पण ह्या लोकात स्वतः लं सर्व श्रेष्ठ समजायची स्वार्थी वृत्ती आहे. काश्मीर मध्ये फक्त मुस्लिम लोकांनी जात विचारून हिंदू पंडित म्हणजे ब्राह्मण लोकावर च अत्याचार केले का? हिंदू फक्त पंडित च आहेत का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/14/2022 - 10:42 नवीन
गेल्या ३० वर्षात अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील १७२४ नागरिकांना ठार केले, त्यात ८९ काश्मीरी पंडित होते असे RTI कार्यकर्त्याने उघड केले. आपल्या देशाच्या नागरिकांचे रक्षण करणे हे सरकारचे काम आहे. असे सिनेमे बघून त्यांचे रक्षण कसे होणार?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/14/2022 - 12:01 नवीन
हिंदू फक्त पंडित च आहेत का? चला धागा धन्य झाला .. यात आपण आता जात आणलीत "अजून पण ह्या लोकात स्वतः लं सर्व श्रेष्ठ समजायची स्वार्थी वृत्ती आहे." सबुरीने घ्या .. sunil kachure फार होतंय आग्या१९९० असे सिनेमे बघून त्यांचे रक्षण कसे होणार? लोक हलाल सर्टिफिकेट मधून जमवतात आम्ही काढून आणि बघून
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/14/2022 - 12:05 नवीन
लोक हलाल सर्टिफिकेट मधून जमवतात आम्ही काढून आणि बघून ह्याने देशातील नागरिकांचे रक्षण कसे होते ?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/14/2022 - 12:55 नवीन
असा ,,,दावा केलाय का ? उगा का चिकटवताय ? स्वतःचं राज्यातून अशी हकालपट्टी झाली त्याबद्दल काही लोक आणि सरकार बोलत नाही, अश्या चित्रपटातून जर गोष्टी ची हि बाजू दाखवली तर का चिडचिड? एवढया गंभीर घटनबद्दल का नाही बोलायचे ? १९९० चे हे कारस्थान आणि त्यावेळचा भारत म्हणजे काही युगांडा नव्हतं कि १५ दिवसात भारतीयाना एका हुक्मशाहने हाकलून द्यावे किंवा १९४८ सालचे जनतेचा राग म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्माण विरोधी जाळपोळ ( कि एकवेळ म्हणू शकतो कि एका व्यक्तीने घेत ला म्हणून त्या समाजाला सोसावे लागले ) १९९० ला काश्मीर मधील हिंदूंनी काय घोड मारल होतं हो? सरळ तर्क आहे जम्मू च्या हिंदूना किंवा लडाख च्या बुद्धांना इतर भारतीय गणराज्य बरोअबर काही प्रश्न नाही फक्त काश्मीर मधील " प्रेमळ" धर्माचं लोकांनाच का? कारण ते ९०% कि ९४% आहेत मग तिथे बाकी सगळे काफिर एवढेच काय काश्मिरी लोकांच्या मुलाखती बघा अनेक जण म्हणतात हा प्रसहन " काश्मिरीयत" चा पण नाही आम्ही भारतीय आहोत हेच एखाद्य पंजब्याला विचारा तिथे "भारत या संकल्पनेपेक्षा कितीदा तरी "पंजाबीयत" जास्त पुढे पुढे केली जाते मग ह्या काश्मिरीन बद्दल आत्मीयता का वाटू नये सरळ तर्क आहे जम्मू च्या हिंदूना किंवा लडाख च्या बुद्धांना इतर भारतीय गणराज्य बरोअबर काही प्रश्न नाही फक्त काश्मीर मधील " प्रेमळ" धर्माचं लोकांनाच का? कारण ते ९०% कि ९४% आहेत मग तिथे बाकी सगळे काफिर इथेच ग्यन्बचि मेख आहे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/14/2022 - 13:16 नवीन
माझ्या प्रतिसादातले एक वाक्य बोल्ड करून तुम्ही त्यावर काहीतरी गहन उत्तर दिले,जे मला समजले नाही म्हणून विचारले. चिडचिड बिडचिड काही नाही. फक्त एकच खटकते, ३७० कलम काढले तरी आपले सरकार काश्मीरी पंडितांचे अतिरेक्यांपासून संरक्षण करू शकत नाही ह्याचे. सिनेमे लाख काढा ,बघा, जमल्यास सरकारलाही दाखवा. सिनेमे बघून सरकार प्रश्न सोडवत असेल तर चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 03/14/2022 - 15:05 नवीन
सिनेमे लाख काढा ,बघा, जमल्यास सरकारलाही दाखवा. सिनेमे बघून सरकार प्रश्न सोडवत असेल तर चांगलेच आहे.
प्रथम प्रश्नाची व्याख्या करूयात. ही माझ्या समजूतीनुसार व्याख्या आहे: " १९९० साली काश्मिरांतील हिन्दू जनतेचे जे संघटित हत्याकांड (लिबरलांचा आवडता शब्द-- पोग्रॉम) झाले, त्याची आतापर्यंत कुठल्याही सरकाराने दखल घेतलेली नाही. अलिकडेच एक याचिका सुप्रिम कोर्टांत दाखल झाली होती, त्यांनीही ती फेटाळून लावली. हे धिक्कारार्ह आहे, व सरकारने त्याविषयी काहीतरी ठोस करावे. असे काही झाले होते ते मान्य करावे, त्याची व्यवस्थित चौकशी व्हावी, निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदू जनतेचे हाल त्याने ऐकून घ्यावेत. त्यांपैकी कुणाचीही पैशाने अथवा अन्य प्रकारे खर्‍या अर्थाने नुकसान भरपाई होणार नाहीच. तरीही, त्यांच्या झालेल्या आघाताची दखल घेऊन, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत". सिनेमे काढून, व ते दाखवून काय होणार आहे? ह्याचे उत्तर असे की प्रथम जनमानसांतच असे काही झालेले होते ह्याविषयी माहिती होईल... (त्या कालानंतर जन्मलेल्या अनेकांना ह्याविषयी माहिती, जवळजवळ नाहीच, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये). ही माहिती झाल्याने, एकतर सरकारवर दबाव आणणे सोपे होईल. तसेच, हे लोण आपल्यापर्यंतही आज ना उद्या येऊ शकते ह्याचीही हिंदूंना जाणीव होईल. येथे सुप्रीम कोर्टांतील एक वकिल, जे. साईदिपक ह्यांनी सरकारकडून काय करून घेता येईल, ह्याविषयी त्यांचा प्रस्ताव मांडला आहे. तो मुळातून वाचावा. अर्थात, ह्या क्षणाला तो प्रार्थमिक स्वरूपाचा आहे. ह्यावर चर्चा होऊ शकते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 03/14/2022 - 15:20 नवीन
त्याची आतापर्यंत कुठल्याही सरकाराने दखल घेतलेली नाही. अलिकडेच एक याचिका सुप्रिम कोर्टांत दाखल झाली होती, त्यांनीही ती फेटाळून लावली.
पण असे का ? कोर्टाने काय ग्राउंड वर फेटाळली ?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 03/14/2022 - 16:06 नवीन
Ever since the release of #TheKashmirFiles, people have expressed their serious and justified disappointment with the Supreme Court's failure to take cognizance of the genocide of Kashmiri Pandits citing passage of time and other untenable reasons. हे मी वर दिलेल्या साई दीपक ह्यांच्या ट्विटरवरून.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 03/14/2022 - 16:26 नवीन
साई दीपक यांचे बोलणे पटले. इथे वाचले असता KP बाजू मांडणाऱ्या वकिलाचा युक्तिवाद सुद्धा पटला.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 03/14/2022 - 12:54 नवीन
काही इतर मुद्दे ही समोर आलेत जे मी फेसबूकवर वाचलेत. माझा या विषयातला मुळातून अभ्यास नाही व चित्रपटही अजून बघितला नाही. पण या मुद्द्यांमध्ये तथ्य असल्याचे जाणवते - त्यावरही चर्चा होण्यास हरकत नसावी काश्मिरी पंडितांविरोधात जेव्हा अत्याचार झालेत तेव्हा केंद्रात व्ही पी सिंग यांचे सरकार होते तर सरकारला भाजपचा पाठिंबा होता. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. काश्मीरमधल्या घटना घडत असताना पाठिंबा देणार्‍या भाजपकडून तत्कालीन सिंग सरकारवर योग्य ती कारवाई तातडीने करण्याकरिता कशा प्रकारे दबाव आणला गेला किंवा कसे ? तसेच या मुद्द्यावर सरकारचा पाठिंबा काढून घेतला नाही ह्या मागचे काय कारण असावे ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/14/2022 - 14:02 नवीन
काश्मिरी पंडितांविरोधात जेव्हा अत्याचार झालेत तेव्हा केंद्रात व्ही पी सिंग यांचे सरकार होते तर सरकारला भाजपचा पाठिंबा होता. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती.
तेलाने भरलेल्या जमिनीवर एक ठिणगी अक्राळविक्राळ आग लाऊ शकते. आता ती आग नक्की कोणी लावली असे म्हणायचे? तेलाने की ठिणगीने? तेल नसते तर नुसती ठिणगी काहीही करू शकली नसती तेव्हा आग लावायला जबाबदार तेल आहे असे म्हणायला हवे. काश्मीरमध्ये तेल पसरवायचे काम राजीव गांधींच्या सरकारच्या काळात झाले आणि ठिणगी वि.प्र.सिंगांच्या सरकारच्या काळात लागली. हे तेल लावण्यात १९८७ च्या निवडणुकांची भूमिका मोठी होती. या निवडणुकांमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीने मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले आणि स्थानिक मुस्लिम युनायटेड फ्रंटच्या उमेदवारांना पाडून या युतीचे उमेदवार असे गैरव्यवहार करून निवडून आणले गेले. त्यामुळे काश्मीरी युवकांमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर पसरला. दिल्लीतील केंद्र सरकार आपल्याला आपले प्रतिनिधी निवडूनही देत नाही आणि आपलेच पिट्टे लादते असा प्रचार करायला फुटिरतावादी ताकदींना कारण मिळाले. खरं वाटणार नाही पण हिजबुल मुजाहिदीनचा दाढीवाला सय्यद सलाहुद्दिनही १९८७ मध्ये मुस्लिम युनायटेड फ्रंटचा उमेदवार होता. ३७० कलमामुळे 'आम्ही इतर भारतीयांपेक्षा वेगळे' ही भूमिका आधीपासून होतीच. त्यात ही भर पडली. मे १९८४ ते मे १९८९ या काळात (बराचसा राजीव गांधींचा कार्यकाळ) जगमोहन मल्होत्रा काश्मीरचे राज्यपाल होते. परिस्थिती बिघडत आहे तेव्हा काहीतरी करा ही विनंती करणारी कित्येक पत्रे त्यांनी गृहमंत्र्यांना म्हणजे केंद्र सरकारला लिहिली होती. त्याविषयी काही करणे दूरच राहिले त्या पत्रांची पोच द्यायची तसदीही केंद्र सरकारने घेतली नव्हती. मार्च १९८७ नंतर म्हणजे परिस्थिती जास्त बिघडायला लागली तेव्हापासून काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्लांचे सरकार सत्तेत होते. आपल्या राज्यपध्दतीत एखाद्या राज्यात विधानसभेत बहुमत असलेले सरकार सत्तेत असताना राज्यपालांना प्रशासकीय निर्णय घेता येत नाहीत त्यामुळे जगमोहन त्याविषयी पत्रे लिहिण्यापलीकडे काहीही करू शकले नाहीत. वि.प्र.सिंगांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे पहिल्यांदा मुफ्ती महंमद सईदला गृहमंत्री करणे आणि रूबिया सईद अपहरण प्रकरणात दहशतवाद्यांना सोडणे. हे झाले वि.प्र.सिंग सरकार सत्तेत आल्यानंतर आठवड्याभरात. हे प्रकरण गंभीर असले तरी त्यावरून आठवड्याभरात सरकार खाली खेचणे हा पर्याय नव्हता. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर विचारवंतांची एक विनोदी पोस्ट फिरत आहे त्यात म्हटले आहे की काश्मीरी पंडितांचे स्थलांतर व्हायला राज्यपाल 'संघी' जगमोहन जबाबदार होते आणि त्याबद्दल त्यांना पुढे वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपद दिले गेले. तसेच भाजपने काश्मीरी पंडितांचे स्थलांतर या कारणावरून नाही तर रथयात्रेच्या कारणावरून वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा काढला होता यावरून भाजपची प्राथमिकता कशाला होती हे कळते. इतके मूर्खपणाचे (खरं तर विचारवंती) आर्ग्युमेंट मी गेल्या दहा हजार वर्षात ऐकले नव्हते. काश्मीरी पंडितांचे बरेचसे स्थलांतर १५ ते १९ जानेवारी १९९० या काळात झाले. त्यानंतरही तुरळक प्रमाणात स्थलांतर अगदी मार्चपर्यंत चालू होते पण बरेचसे १५ ते १९ जानेवारी या काळात झाले होते. जगमोहन यांनी दुसर्‍यांदा राज्यपालपदाची शपथ घेतली १९ जानेवारीच्या संध्याकाळी. अशावेळी जगमोहन काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराला कसे जबाबदार? दुसरे म्हणजे जगमोहन आणि संघी? बोंबला. आणीबाणी प्रकरणात जगमोहन संजय गांधींचे उजवे हात होते. दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे उपाध्यक्ष या नात्याने दिल्लीत तुर्कमान गेटजवळची झोपडपट्टी पाडण्यात त्यांचा मोठा हात होता. १९८१ मध्ये शेख अब्दुल्लांचे निधन झाल्यानंतर फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले होते. शेख जिवंत असतानाच नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसपासून दुरावला होता पण शेखच्या मुख्यमंत्रीपदाला धक्का लावणे इंदिरा गांधींना शक्य झाले नव्हते. पण नंतर फारूख मुख्यमंत्री झाल्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारने ती संधी साधली. विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त करा हा एकच अजेंडा घेऊन इंदिरा सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जगमोहन आणि आंध्र प्रदेशात ठाकूर रामलाल या राज्यपालांना पाठवले. याच जगमोहन यांनी २ जून १९८४ रोजी फारूख अब्दुल्लांचे सरकार बरखास्त केले होते (त्याचप्रमाणे दोन महिन्यात ठाकूर रामलालांनी आंध्र प्रदेशात एन.टी.रामारावांचे सरकार बरखास्त केले). असे जगमोहन संघी? बोंबला. त्याच जगमोहन यांची वि.प्र.सिंग सरकारने राज्यपालपदावर परत एकदा नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ फारूख अब्दुल्लांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि १९ जानेवारी १९९० रोजी राज्यात राज्यपाल राजवट लागली (तत्कालीन जम्मू काश्मीरच्या संविधानाप्रमाणे राज्यपाल राजवटही होती. हे संविधान कलम ३७० काढले गेल्यावर हटवले गेले) आणि मग जगमोहन यांच्या हातात खरे अधिकार आले. जगमोहन राज्यपाल पदावर ४ महिने होते. या काळात सुरवातीला प्रशासनात शिस्त हा प्रकार नव्हता. अनेक पोलिसही सरकारच्या नाही तर दहशतवाद्यांच्या ऑर्डर घेत होते. अशा परिस्थितीत जगमोहन यांनी कडक आसूड उगारला आणि मुळात प्रशासन ठीक करायचा प्रयत्न केला. काश्मीरमधील फुटिरतावादी तत्वे आजही जगमोहन यांची चार महिन्यांची राज्यपालपदाची कारकिर्द हा एक काळा कालावधी होता असेच म्हणतात त्यातच सगळे काही आले. जगमोहन निष्क्रीय असते, काश्मीरी पंडित जात असताना त्यांनी काही केले नसते तर फुटिरतावाद्यांना ते हवेसे वाटायला हवे होते नाही का? पण विचारवंतांना हा साधा प्रश्न पडत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की १९ जानेवारी १९९० पर्यंत राज्यात राज्य सरकार सत्तेत असताना आणि प्रशासन पोखरले गेले असताना पंडितांना वाली राहिला नाही. एक तर ३७० मुळे केंद्र सरकार काय करणार यावर मर्यादा होत्या आणि त्यात मुफ्ती महंमद सईदसारखा घाणेरडा माणूस गृहमंत्री होता. त्यामुळे दुसरे काय होणार होते? आणि या परिस्थितीविषयी राजीव गांधी आणि फारूख अब्दुल्लांना जबाबदार न धरता जगमोहनना जबाबदार धरणे हे केवळ आणि केवळ अती उच्चशिक्षित पुरोगामी विचारवंतच करू शकतील. आता या कारणावरून भाजपने वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा का काढला नाही? ते सरकार सत्तेत आले होते २ डिसेंबर १९८९ रोजी. तेव्हा दीड महिन्यात पाठिंबा काढणे कसे काय शक्य होते याचे उत्तर वाचकांनीच शोधावे. दुसरे म्हणजे पाठिंबा रथयात्रेनंतर म्हणजे ऑक्टोबर १९९० मध्ये काढला (सरकारला साडेदहा महिने झाल्यावर) ही खरी गोष्ट आहे. पण मधल्या काळात देवीलालांचे बंड आणि त्याला उत्तर म्हणून वि.प्र.सिंगांनी उगारलेले मंडल कमिशनचे हत्यार आणि त्याविरूध्द उत्तर भारतात पेटलेले राखीव जागाविरोधी आंदोलन आणि त्यानंतर सुरू झालेली रथयात्रा अशी टाईमलाईन आहे. म्हणजे मधल्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले होते. एक प्रश्न कधीही विचारवंतांना पडत नाही का? काँग्रेसने देवेगौडा सरकारला दिलेला पाठिंबा १० महिन्यांनंतर (१ जून १९९६ रोजी देवेगौडा सरकार सत्तेत आले आणि ३० मार्च १९९७ रोजी काँग्रेसने पाठिंबा काढला) काढला होता तेव्हा अशा स्फोटक घटनांपैकी काहीही घडलेले नव्हते. त्यामुळे अचानक पाठिंबा काढून घेतला म्हणून काँग्रेसची किती छी थू झाली होती हे या लोकांना माहित नाही का? पण भाजपची वि.प्र.सिंग सरकारला दिलेला पाठिंबा असाच १०-साडेदहा महिन्यात काढल्यावर तशी छि थू झाली नव्हती. त्याचे कारण काय असावे? माझ्या मते त्याचे कारण हे की वि.प्र.सिंग सरकारच्या त्या दहा-साडेदहा महिन्यात बरेच काही घडले होते. तेव्हा काश्मीरी पंडितांचे स्थलांतर मग देवीलाल बंड (आणि त्यामुळे डुगडुगायला लागलेले जनता दल) मग मंडल आयोग आणि मग रथयात्रा अशाप्रकारे पाठिंबा काढून घ्यायला परिस्थिती निर्माण होत होती. काश्मीरी पंडितांचे स्थलांतर हे त्यातील पहिले कारण होते. ही सगळी टाईमलाईन लक्षात न घेता 'भाजपने रथयात्रेच्या मुद्द्यावरून वि.प्र.सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला' असे म्हणणे हे केवळ आणि केवळ ढुढ्ढाचार्य विचारवंतच करू शकतील. दुसरे कोणी नाही. चंसूकु
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/14/2022 - 14:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 03/14/2022 - 14:22 नवीन
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 03/14/2022 - 19:53 नवीन
विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद! जगमोहन, संघ, रथयात्रा, आणि व्हीपी सरकार याबद्दल समाजमाध्यमांवर फिरणार्‍या कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळाली.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/16/2022 - 16:52 नवीन
? ते सरकार सत्तेत आले होते २ डिसेंबर १९८९ रोजी. तेव्हा दीड महिन्यात पाठिंबा काढणे कसे काय शक्य होते याचे उत्तर वाचकांनीच शोधावे. सहमत. सत्तेपेक्षा कश्मिरी पंडीतांचा जीव महत्वाचा नव्हता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा