धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी -
१२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ .
स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात .
लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते .
या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत .
आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का
आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे
🗣 चर्चा
(413)
D
Duishen
Tue, 11/21/2017 - 20:35
नवीन
धन्यवाद, अॅमीजी!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 11/21/2017 - 12:11
नवीन
<<<त्यामुळे जातिगत संघटन होण हे साईड इफेक्ट असा नकरात्मक नसून चांगला आहे. ...फक्त पुढच्या पिढ्यांनी याला चांगले वळण द्यावे आणि जे कुणी जाती व्यवस्था मनात असतील ते तर याकडे नकारात्मक दृष्टीने बघून अपप्रचार करणारच.>>>
==>> माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो.
आमच्या समाजाची देखील एक अखिल भारतीय संघटना आहे. मी सहसा त्यांच्या कार्यक्रमाला जाणायचे अनेकवेळा टाळायचो. पण २०१६ च्या डिसेंबर मध्ये समाजाचे राज्यस्तरीय स्नेह मेळावा होता ज्या मध्ये माझ्या भाचीचा डान्स होता म्हणून गेलो होतो.
तर संघटनेच्या सचिवांनी त्यांच्या भाषणामध्ये अंतरजातीय विवाहासाठी समाज बांधवाना प्रेरित केले. प्रोहत्सानपर बक्षिसे देखील जाहीर केली.
विशेष म्हणजे समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी ने कार्यक्रमाच्या शेवटी आपला मुलगा आंतरजातीय विवाह करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले. संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षांच्या सख्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे.
माझ्यासाठी ह्या प्रगत विचाराची खूप मोठी नांदी होती. आमचा समाजाने या दृष्टीने पाऊले उचलली आहेत याबद्दल मला अभिमान आहे.
- Log in or register to post comments
D
Duishen
Tue, 11/21/2017 - 20:43
नवीन
तर संघटनेच्या सचिवांनी त्यांच्या भाषणामध्ये अंतरजातीय विवाहासाठी समाज बांधवाना प्रेरित केले. प्रोहत्सानपर बक्षिसे देखील जाहीर केली.
विशेष म्हणजे समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी ने कार्यक्रमाच्या शेवटी आपला मुलगा आंतरजातीय विवाह करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले. संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षांच्या सख्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे.
ही बाब निश्चितच प्रचंड आनंदाची, अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. आपण नमूद केलेल्या संघटनेला अतिशय प्रगतीशील विचारांचे सचिव आणि अध्यक्ष मिळाले आहेत. एकदा ही बाब समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी स्वीकारली तर समाजही ते अनुकरून करून भावी वाटचालीची दिशा ठरवतो. कृपया माझ्याकडून त्यांचे अभिनंदन कळवा!
अशी प्रगती निरंतर राहो हीच शुभेच्छा!!!
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Tue, 11/21/2017 - 18:47
नवीन
कारण यामधे कोणत्यातरी जाती ठ्ळक होत आहेतच. त्यापेक्शा सरकारी कागद्पत्रामधला जातीन्चा उल्लेख जाइल आणि जात प्रमाणपत्र घ्यायची गरज पडणार नाही तो खरा सुदीन.
मग यासाठी मला वाटत जातीआधारीत आरक्शणापेक्शा आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्शण जास्त मदतीचे ठरेल.
- Log in or register to post comments
B
babu b
Tue, 11/21/2017 - 20:07
नवीन
जातीय आरक्षण व आर्थिक आरक्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत , जातीय आरक्षणाला आर्थिक आरक्षण हे रिप्लेसमेंट होउ शकत नाही , हे सर्वाना समजेल तोही एक सुदिनच.
...
आरक्षणाला विरोध करणारे लोकही गंमतच करतात .. फक्त जातीय आरक्षणाला विरोध करतात .. कारणे नेहमीचीच , मार्क ५५ % असतात म्हणे , गुणवत्ता नसते म्हणे !
पण आजवर या लोकानी कधी पेमेंट सीट नावाच्या श्रीमंती आरक्षणाला विरोध केल्याचे ऐकिवात नाही. तिथे ५५ % वाला समाजाला चालतो ! त्याला गुणवत्ता नसली तर चालते !
- Log in or register to post comments
D
Duishen
Wed, 11/22/2017 - 00:11
नवीन
कारण यामधे कोणत्यातरी जाती ठ्ळक होत आहेतच.
तुम्ही म्हणता ही शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाने आदेश दिला आहे की आंतरजातीय विवाहातून झालेली संतती आई किंवा वडील कुणाचीही जात वापरू शकते. पण त्यांनी वापरली पाहिजेच असे बंधनही नाही. त्यामुळे त्या संततीला निर्णय घ्यावयाचा असेल की मुळात जात लावायची का नाही.
आमच्याच एका मित्राच्या वडिलांनी मुलांच्या शाळेत कधीही जातीचा रकाना भरला नाही. त्यावेळेस शालेय संस्थेसोबत भरपूर वाद झाले पण ते शेवटी त्यांनी तो रकाना रिकामाच ठेवला. तो कित्ता त्यांचा मुलगाही गिरवतो आहे.
मग यासाठी मला वाटत जातीआधारीत आरक्शणापेक्शा आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्शण जास्त मदतीचे ठरेल.
अनुसूचित जाती ह्या काहीही संसाधन नसणाऱ्या तर आहेतच पण अस्पृश्य म्हणून गणल्या गेल्या आहेत. त्यांच्याशी भेदभाव हा त्यांच्या जातीमुळे आहे. अनेकांना तो आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतरही भोगावा लागतो. कालचीच बातमी आहे की कडेगाव - जिल्हा सांगली येथे भजन करणाऱ्या दलित व्यक्तीस केवळ जातीमुळे मंदिर प्रवेश नाकारला. तो भक्त, आस्तिक, आणि भजन कीर्तन करणारा माणूस. कदाचित आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी असेल पण केवळ जातीमुळे प्रवेश नाकारला जातो. हा झाला ग्रामीण अनुभव. नागरी आणि शासकीय पातळीवर आरक्षित जागाच रिकाम्या ठेवून एकप्रकारे भेदभाव केल्या जातो. विस्तार भयास्तव इथे फार उदाहरणे देणार नाही.
याउलट आदिवासी समाज संसाधन संपन्न होता पण ब्रिटीशांच्या १९ व्या शतकातील जंगल कायद्यामुळे त्याचे हक्क संपले. त्या कायद्यात मागच्या १०-१५ वर्षात सुधारणा होऊन जंगलाच्या सह-व्यवस्थापानेबाबत (आदिवासी+शासन) कायदा झाला पण अंमलबजावणी खूपच असमाधानकारक आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी म्हणून फसवले जाण्याची शक्यता. शिवाय शासनाबाबत आदिवासींची अनेक प्रकारामुळे अनास्था किंवा अविश्वास. उदा: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पोलिसांना आदेश देऊन आदिवासींसोबत 'जालियानवाला बाग' हत्याकांड घडवून आणले. त्यांचा राजा आणि पुरोहित हा एकाच व्यक्ती असे. त्यांच्या कुटुंबाला तर संपविले पण अनेक आदिवासींना उभे करून गोळया घालून ठार मारले. ती जखम अजूनही त्यांना शासनव्यवस्थेवर विश्वास ठेवू देत नाही. तर दुसरीकडे गडचिरोलीतील अनेक गावे (आंध्र प्रदेश सीमा) पावसाळ्यात भारतात असूनही भारतापासून तुटलेली असतात. जाण्यासाठी रस्ता नाही. जो रस्ता आहे तो एका मोठ्या ओढ्यातून जातो आणि पाण्याच्या फोर्समुळे कुणीही जाऊ शकत नाही. तसेच ते आंध्रातही जाऊ शकत नाहीत. जर शासनाशी संबंधच नाही तर प्रगती कशी होणार? खाणसंपन्न विभाग असल्यामुळे कंपनींचा डोळा तेथील संसाधनावर. ओरिसात पोस्को कं.ने एक प्रकारे त्यांचे हक्क हिरावून घेतले. एक तर आर्थिक व्यवस्था नाहीच शिवाय जमात म्हणून असलेले मागासलेपण. तेंव्हा त्यांना सामाजिक आणि आर्थिक असे दोन्ही संदर्भ आरक्षणाच्या मागे आहेत.
या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण रोचक आहे. प्रथम काका कालेलकर आयोग आणि नंतर मंडल आयोग. मंडल आयोगाने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अश्या तीन कसोट्यातील ११ निर्देशक तयार करून आरक्षण दिले आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण नाही हा धादांत अपप्रचार आहे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट आरक्षण देतांना निर्देशाकात "जाती / वर्ग" असा शब्द आहे. केवळ जाती असा नाही. एक गैरसमज असा आहे की ओबीसीमधे केवळ 'शुद्र' असणाऱ्या जातींचा समावेश आहे. तो समाज निखालस खोटा आहे. खालील राज्यात ब्राह्मण समाज हा ओबीसीमधे आहे -
राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली राज्यातील दाकोट किंवा जोशी ब्राह्मण
कर्नाटकात राज्यातील दैवज्ञ ब्राह्मण; केरळ आणि कर्नाटकात राजपूर सारस्वत ब्राह्मण; केरळमधेच मराठी ब्राह्मण; आसाममधे मणिपुरी ब्राह्मण; सिक्कीममधे बाहुन ब्राह्मण (राज्य सूची); कर्नाटकात ब्राह्मण ख्रिश्चन (राज्य सूची) पण हे ख्रिश्चन म्हणून गृहीत धरले आहेत.
खालील क्षत्रिय जातींचा समावेश ओबीसी यादीत (केंद्र सूची)आहे. कालापव्ययते मुळे राज्य सूची मी इथे नमूद करीत नाही.
क्षत्रिय, आर्य क्षत्रिय, कोट क्षत्रिय, राम क्षत्रिय, रामाकृष्ण क्षत्रिय, नायांजा क्षत्रिय,सोमवंश आर्य क्षत्रिय,शम्भूुकुल क्षत्रिय, अग्नीकुल क्षत्रिय,
देशातील १५ राज्यातील मुस्लिमातील अनेक जाती / वर्ग ओबीसी आरक्षणात येतात. कर्नाटक आणि केरळामधे अनेक ख्रिश्चन जाती / वर्ग ओबीसी यादीत आहेत.
याशिवाय आर्थिक मागास वर्गाची यादी आहेच. ज्या जाती किंवा वर्ग एस.सी., एस.टी. किंवा ओबीसी मधे येत नाहीत पण ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे (महाराष्ट्रात ६ लाखापेक्षा कमी आहे) त्या जाती आणि वर्ग आर्थिक मागास वर्गात समाविष्ट आहेत.
त्यामुळे खालील गैरसमजुती / अपप्रचार भारतीय सर्व समाज समूहाने समजून घेऊन मनातून काढून टाकणे आवश्यक आहे.
१ आम्हाला आरक्षण नाही.
२. आम्ही गुणवत्ता मानणारे त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही.
३. आरक्षण मिळणारे समाज समूह यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे.
४. आरक्षण घेणारे 'सरकारचे जावई' आहेत.
५. आरक्षण न घेणारे बुद्धिमान असतात.
६. आरक्षण ही विषमता आहे.
७. आरक्षण ह्या कुबड्या आहेत.
८. केवळ आर्थिक आरक्षण असेल तर समाज गुण्यागोविंदाने राहील / सोने की चिडिया होईल.
९. आरक्षणाने जातीभेद वाढतो इ.इ.
भारतात कुठल्याही जाती / जमाती / समूह आरक्षणाशिवाय राहिला नाही. आरक्षणाचा फायदा घ्यायचा की नाही हे व्यक्तीपरत्वे ठरेल.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 11/22/2017 - 02:39
नवीन
की सगळे समाज जर आरक्श्ण मिळवत आहेत तर हा सगळा मुर्खपणा आहे.
एवढ्या पो टजाती आहेत हे माहीतच नव्हते.
आरक्शण मिळवण्यासाठी जाती पाळल्या जात आहेत/जाणार आहेत.
त्यापेक्शा सरकारी कागद्पत्रान्वर, शाळेत आडनावे (कारण त्यातुन जात समजते) लावणे बन्द केले पाहिजे.
मुलाचे/मुलीचे नाव मधे आइचे नाव व शेवटी वडिलान्चे नाव.
आडनाव व त्यामुळे जाती समजणे बन्द झाले की बरीच सुधारणा होइल.
आणि माझ्यामते घरातील अपत्यान्ची सन्ख्या कमी झाली तरी अर्थिक स्तर उन्चावणे, मुलाना शिक्शणासाठी पाठवणे इत्यदी होइल.
हे देखिल एक दुष्त्ट्चक्र आहे. कारण गरीब घरात जितकी मुले जास्त तितकी कमावती डोकी जास्त असे असते.
- Log in or register to post comments
D
Duishen
Wed, 11/22/2017 - 04:00
नवीन
सुखीमाणुसजी, हा आपल्या आणि माझ्या दृष्टिकोनाचा फरक आहे -
आरक्शण मिळवण्यासाठी जाती पाळल्या जात आहेत/जाणार आहेत.
माझा दृष्टीकोन असा आहे की जातव्यवस्था आहे म्हणून आरक्षण आले. मुळात जात व्यवस्थाच नसती तर आज आरक्षण सारखा प्रश्नही निर्माण नसता झाला. शिवाय सर्व जाती स्वत:च्या "अहं" पाळण्यासाठी जातव्यवस्था पाळतात (अपवाद ज्यांना ज्यांना या व्यवस्थेला नाकारायचे आहे). त्यामुळे उद्या कोणी आरक्षण बंद करतो म्हणाले तरीही जात शिल्लक राहणारच! कारण जात हा फॅक्टर मनात आहे.
आडनाव व त्यामुळे जाती समजणे बन्द झाले की बरीच सुधारणा होइल.
भारतीय समाज स्व-जातीत विवाह (endogamous ) मानणारा. आडनाव लावले नाही म्हणून आपल्या नातेवाईकांना किंवा जात बांधवांना ओळखणे थोडीच बंद होणार आहे. अगदी मुंबई, पुणे सारख्या महानगरातही जातींच्या (आणि स्वत:च्या प्रदेशातील / राज्यातील) कळपाने वसाहती पण आहेत पण. त्यामुळे आडनाव लावणे बंद झाले म्हणून जात जाणार नाही. दक्षिण भारतात अनेक जागी आडनाव लावत नाही पण तिथेही दलित अत्याचाराचे प्रमाण भरपूर आहे. शिवाय विवाहविषयक जाहिराती बघितल्या तर असे आढळून येईल की "एस.सी. एस.टी." क्षमस्व" अथवा ९०% जाहिराती स्वजातीय वर किंवा वधू शोधत असतात.
आणि माझ्यामते घरातील अपत्यान्ची सन्ख्या कमी झाली तरी अर्थिक स्तर उन्चावणे, मुलाना शिक्शणासाठी पाठवणे इत्यदी होइल.
याबाबत पूर्णत:सहमत!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 11/18/2017 - 22:00
नवीन
गापै, गळपाटलेला प्रतिसाद. कशाला हरलेली लढाई लढताय?
तुमच्याकडे काहीच मुद्दे नाहीत, पण उसनं अवसान आणून षड्डू ठोकताय आपले.
(संपादित)
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 11/19/2017 - 05:42
नवीन
लैच वैयक्तिक प्रतिसाद!!
- Log in or register to post comments
म
मोदक
Sun, 11/19/2017 - 06:00
नवीन
प्रतिसाद कसे लिहावे याचे शहाणपण देत पुन्हा हेच तर्राटपणे फिरतात.
कसे आहे, दोष यांचा नाही. यांना त्यांचा प्रिय इस्लाम शांततेचा धर्म आहे हे बाँबस्फोट करून सांगावे लागते.. मग अशी थोडीफार तर्राट विसंगती आपण खपवून घ्यायची.
मजेशीर प्रकरण आहे. :D
- Log in or register to post comments
D
Duishen
Sat, 11/18/2017 - 22:12
नवीन
माझ्या जवळच्या सर्व मित्र-मैत्रिणीनी आंतरजातीय आणि आणि आंतरधर्मीय विवाह केले आहेत. पण मुळात जे विवाह प्रेम विवाह आहे त्यांना आंतरजातीय किंवा अंतरधर्मीय या श्रेणीत बसवावे असे वाटत नाही.
इथे सगळ्या प्रकारच्या विवाहाचे कॉम्बिनेशन आहे. उदा: हिंदू मुलगा / मुस्लीम मुलगी; किंवा मुस्लीम मुलगा / हिंदू मुलगी; ब्राह्मण मुलगा-दलित मुलगी/ दलित मुलगा-ब्राह्मण मुलगी किंवा मराठा मुलगा-ब्राह्मण मुलगी; ब्राह्मण मुलगी - मराठा मुलगा; मराठा मुलगा-ओबीसी मुलगी; ओबीसी मुलगा-मराठा मुलगी; पारसी मुलगा-बौद्ध मुलगी; बौद्ध मुलगा-पारसी मुलगी.जैन-हिंदू किंवा जैन-बौद्ध विवाह
क्वचितच एखाद्या प्रकारचा विवाह सुटला असेल. कुंडली न बघता केलेले आणि सुमुर्ह्त न पाहता केलेले हे सर्व जोडपी अगदी गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. त्यामुळे लव्हजिहाद यावर विश्वास ठेवणे कठीण.
मुलगा-मुलगी असे विलग करून सांगण्यामागे हेतू हा की काही स्वयंघोषित रक्षक लोक अशीही चर्चा करतात उदा:
१. आमच्या जातीची / धर्माची मुलगी / मुलगा त्यांनी "पळवली"/ "पळवला" ती/तो मुळात अशी / असा / नव्हता. तिने त्याला / त्याने तिला "नादाला" लावलं. नाहीतर माझी लेक म्हणजे सद्गुणांची खाण / माझा लेक म्हणजे सोन्याहून पिवळा इ.इ.
२. "वरच्या" जातीतला मुलगा चालेल हो "खालच्या" जातीतली सून कशी आणू किंवा याच्या अगदी विरुद्धही! ...म्हणजे "वरच्या" जातीतली मुलगी चालेल हो "खालच्या" जातीतला जावई कसा करणार.
३. मुलगी म्हणजे "घर की इज्जत" त्याहूनही पुढे जाऊन मुलगी म्हणजे "समाजाच नाक". त्यामुळे आपली मुलगी "दुसऱ्या" घरात नको एखाद वेळेस "दुसऱ्याच्या" घरची मुलगी आली तरी चालेल.
माझे तर निरीक्षण आहे ज्यांनी आंतरजातीय /आंतरधर्मीय विवाह केले त्यांना या स्वयंघोषित रक्षक लोकांच्या म्हणण्याशी काही देणे-घेणे नाही.उलट या स्वयंघोषित रक्षकांमुळे त्यांच्या जीवनात नको त्या अडचणी निर्माण होतात. एकट्या-दुकट्या केस घडतच नाही असे माझे म्हणणे नाही पण विनाकारण तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे भासवणे ही अतिरेकी विचारसरणी आहे. विवाहात अनेकांची फसवणूक होते पण ती फसवणूक स्त्री-पुरुष (लिंगाधारित) अशा अर्थाने घ्यावयाची की धर्माचे लेबल लावून? गुन्ह्याचा हेतू पाहणे महत्वाचे! स्वयंघोषित रक्षकांना तो हेतू काय वाटतो हे महत्त्वाचे नाही.
हुंडा पद्धत हिंदू समाजाचे लक्षण आहे. सन. २०१५ साली एकूण ७६३४ महिलांचे मृत्य हुंडाबळी म्हणून झाले. म्हणजे साधारणत: एका दिवसात २०-२१ महिलांचे बळी जातात याचाच अर्थ दर सव्वा तासाला एखद्या महिलेला हुंड्यामुळे मृत्यू पत्करावा लागतो. हे माझे म्हणणे नाही केंद्र शासनाचा अहवाल सांगतो. एन.सी.आर.बी. चा अहवाल साधारण ५५४ पानांचा आहे तो वाचणे शक्य नसल्यास http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/FILES/Figures%20at%20a%20Glance%202015-15.11.16.pdf ही संक्षिप्त माहिती वाचावी आणि आपले मत नोंदवावे ही विनंती!
हे प्रमाण असेच चालू राहिले तर आणि स्त्रीभृण हत्या सुरु राहिली तर सन २१०० पर्यंत हिंदूंना लग्नाला मुली तरी राहतील का? ...त्यासाठी इतर दुसऱ्या धर्माच्या लोकांना दुषणे देण्यात काय अर्थ!
- Log in or register to post comments
ए
एमी
Sun, 11/19/2017 - 04:47
नवीन
विवाहात अनेकांची फसवणूक होते पण ती फसवणूक स्त्री-पुरुष (लिंगाधारित) अशा अर्थाने घ्यावयाची की धर्माचे लेबल लावून? गुन्ह्याचा हेतू पाहणे महत्वाचे! स्वयंघोषित रक्षकांना तो हेतू काय वाटतो हे महत्त्वाचे नाही. >> +१
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Mon, 11/20/2017 - 18:33
नवीन
नका करू असाच तर हात लेख सांगतोय.
माहिती आहे की मुस्लीम तरुणाशी लग्न केले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त.. मग का करावा असा विवाह?
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 11/20/2017 - 21:30
नवीन
फसवणूक कोणत्याही विवाहात होऊ शकते. ज्याला बालपणापासून २०-२५ वर्ष ओळखत असतो त्याच्याशी लग्न केले तरी पुढे भ्रमनिरास होऊ शकतो. खात्री कुठेच देता येत नाही. लोक बदलतात, वेळ बदलते, आपण स्वतः बदलतो.....
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Tue, 11/21/2017 - 02:52
नवीन
नीट खात्री करून, डोळे उघडे ठेवून, पुढील परिणाम विचारात घेऊन लग्न करावे. मग विवाहानंतर मनाविरुद्ध काही करायला लागण्याची शक्यता कमी होते.
- Log in or register to post comments
D
Duishen
Tue, 11/21/2017 - 04:44
नवीन
नीट खात्री करून, डोळे उघडे ठेवून, पुढील परिणाम विचारात घेऊन लग्न करावे. मग विवाहानंतर मनाविरुद्ध काही करायला लागण्याची शक्यता कमी होते.
आपल्या या विधानाशी पूर्णत: सहमत. आणि असा विवाह कुठल्याही जाती-धर्म-लिंग, प्रदेश, भाषा, देश याच्यावर बंधन न ठेवता व्हावे.
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 11/18/2017 - 22:14
नवीन
मुस्लिम पुरुषाशी विवाह केल्याने नक्की काय होते ह्यावर एक बुकलेट बनवून आपली ५ वर्षांच्या मुलीला वाचायला द्यावी. ह्या बुकलेट मध्ये खरी आणि पूर्णतः unbiased माहितीच द्यावी.
उदा :
१. एकदा महिलेशी तलाक झाला कि तिचा तान्ह्या बाळावर काहीही अधिकार राहत नाही. पण तिच्या स्तनातील दुधावर पुरुषाची मालकी असते त्यामुळे मुलाला ती घरी घेऊन जाऊ शकत नाही पण तलाक दिलेल्या पतीच्या घरी येऊन तिला त्या बाळाला दूध जबरदस्तीने पाजावे लागते.
एकदा मी हा विषय एका मित्राच्या घरी काढला असता "आमची रश्मी नाही कधी कुणाबरोबर जाणार, तिला नको असली घाणेरडी माहिती" म्हणून मला गप्प केले. रश्मी नंतर मुस्लिम नाही तरी आणखी कुणाबरोबर तरी पळून गेलीच.
सत्य स्वीकारावे :
आजच्या काळांतील सत्य हे आहे कि आपली बाळे घरी कितीही सोज्वळ वाटली तर बाहेर त्यांचे गर्लफ्रेंडमी बॉयफ्रेंड असणार आहेतच. आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. आपण पालक म्हणून काहीही करू शकणार नाहीत. हे सत्य पालकांनी आधी स्वीकारले पाहिजे.
ह्यांत अल्फा पुरुष बाजी मारतील आणि मूर्ख uninformed मुली चुकीचे निर्णय घेतील. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले मुलगे अल्फा असतील तसेच आपल्या मुली १००% informed असतील किमान इतकी काळजी घ्यावी व इतर सर्व निर्णय त्यांच्यावरच सोडून द्यावेत. नवीन पिढी आपले निर्णय घेण्यास सक्षम आहे.
सत्यकथा:
माझी एक कझन बहीण २६ वर्षांची असताना एका मुलाबरोबर पळून गेली. मुलगा ख्रिस्ती होता. नंतर तिच्या जीवनाची विल्हेवाट लागली पण आमच्या परिवाराच्या मदतीने तिने आयुष्य पुन्हा व्यवस्तिथ उभारले.
तर आम्ही टिनयेजर असताना आमच्या बिल्डिंग मध्ये ३ मुलगे राहायचे. चांगली घराणे, दोघे इंजिनीअर तर एक वकिली शिकत होता. निर्व्यसनी इत्यादी. तिन्ही मुलगे आमच्यावर तथाकथित लाईन मारायचे. माझ्या कझिन च्या आईने ह्यावर आकांड तांडव करून जबरदस्तीने तिन्ही मुलांना आपल्या मुलीला राखी बांधायला लावले. त्या दिवसापासून त्यांचा इंटरेस्ट संपला.
माझ्या मते तिन्ही मुलगे चांगले असल्याने त्यांची मुलगी हैपैकी कुणाबरोबरही गेली असती तर आज सुखांत असली असती.
जुने तुणतुणे :
शेवटी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व संतशतवार आपला थोडा तरी कंट्रोल पाहिजे. उदाहरण म्हणजे शाळा.
- Log in or register to post comments
B
babu b
Sat, 11/18/2017 - 22:51
नवीन
https://islamqa.info/en/8189
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 11/18/2017 - 23:24
नवीन
भारतीय शरिया कायदा !
- Log in or register to post comments
ए
एमी
Sun, 11/19/2017 - 01:44
नवीन
धन्यवाद _/\_
मुस्लिम पर्सनल लॉनुसार:
• आईने पुर्नविवाह केला नसेल तर ७/८ (मी ६ ऐकलेलं) वर्षांपर्यंत कस्टडी (शक्यतो) आईकडे.
• त्यानंतर वयात येईपर्यंत [मुलगा १४(??), मुलीची पाळी येईपर्यंत (१० ते १४ कधीही)] जो कोणी खर्च उचलेल त्याच्याकडे कस्टडी ie (शक्यतो) बाप.
• त्यानंतर मुल ठरवणार कोणाकडे रहायचय.
हिंदू पर्सनल लॉनुसार:
• १८ वयपर्यंतच्या मुलांची कस्टडी (शक्यतो) आईकडे असते.
• बाप (शक्यतो) केवळ खर्च उचलत असतो.
(चूक असेल तर दुरुस्त करा कृपया)
आता जर आईवडील वेगवेगळ्या धर्माचे असतील आणि लग्नानंतर त्यांनी धर्मांतर केलं नसेल तर स्पेशल लग्न कायदा लागू होतो. मग त्यात कस्टडी कशी ठरवतात १८- वयाच्या मुलांची?
- Log in or register to post comments
D
Duishen
Sat, 11/18/2017 - 23:23
नवीन
कुणीही व्यक्ती तत्व आणि मुल्यांपेक्षा 'जात/धर्म/प्रादेशिकता/ वंश/लिंग' याची बाजू घेऊन लिहितात त्यांचे लिखाण कधीही unbiased असत नाही.
- Log in or register to post comments
ए
एमी
Sun, 11/19/2017 - 02:01
नवीन
एकदा महिलेशी तलाक झाला कि तिचा तान्ह्या बाळावर काहीही अधिकार राहत नाही. पण तिच्या स्तनातील दुधावर पुरुषाची मालकी असते त्यामुळे मुलाला ती घरी घेऊन जाऊ शकत नाही पण तलाक दिलेल्या पतीच्या घरी येऊन तिला त्या बाळाला दूध जबरदस्तीने पाजावे लागते. >> नक्की का? कारण मी अगदी उलटं ऐकलं आहे. मुस्लिम कायद्यानुसार 'अगदी तान्ह्या मुलालादेखील त्याची आई दूध पाजायला नकार देऊ शकते. तलाक झाला असो/नसो'.
===
सत्य स्वीकारावे :
आजच्या काळांतील सत्य हे आहे कि आपली बाळे घरी कितीही सोज्वळ वाटली तर बाहेर त्यांचे गर्लफ्रेंडमी बॉयफ्रेंड असणार आहेतच. आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. आपण पालक म्हणून काहीही करू शकणार नाहीत. हे सत्य पालकांनी आधी स्वीकारले पाहिजे.
ह्यांत अल्फा पुरुष बाजी मारतील आणि मूर्ख uninformed मुली चुकीचे निर्णय घेतील. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले मुलगे अल्फा असतील तसेच आपल्या मुली १००% informed असतील किमान इतकी काळजी घ्यावी व इतर सर्व निर्णय त्यांच्यावरच सोडून द्यावेत. नवीन पिढी आपले निर्णय घेण्यास सक्षम आहे. >>
विवाहबाह्य नाही ओ विवाहपूर्व :D
पण एकंदर भावनेशी सहमत आहे.
===
जुने तुणतुणे :
शेवटी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व संतशतवार आपला थोडा तरी कंट्रोल पाहिजे. उदाहरण म्हणजे शाळा.
>> awww you are cho chweet ;)
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 11/19/2017 - 08:11
नवीन
आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच.
विदा तरी द्या.का तुम्ही म्हणता म्हणून मान्य करायचं?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 11/19/2017 - 08:29
नवीन
हा प्रश्न साहना यांना नाही तर अॅमी यांना आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
Sun, 11/19/2017 - 12:35
नवीन
मला का विचारताय प्रश्न?? ते साहनाचे वाक्य आहे!!
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Mon, 11/20/2017 - 16:59
नवीन
एकदा का मुले मोठी (सज्ञान) झाली की पालकांनी कितीही प्रकारे त्यांना परधर्मात लग्न करण्यापासून परावृत्त केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. जर लहानपणीच योग्य ती माहिती मुलांना दिली तर कदाचित, मोठेपणी अश्या वेगळ्या धर्मात लग्न करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Mon, 11/20/2017 - 16:59
नवीन
एकदा का मुले मोठी (सज्ञान) झाली की पालकांनी कितीही प्रकारे त्यांना परधर्मात लग्न करण्यापासून परावृत्त केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. जर लहानपणीच योग्य ती माहिती मुलांना दिली तर कदाचित, मोठेपणी अश्या वेगळ्या धर्मात लग्न करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/19/2017 - 04:07
नवीन
प्रति गा.पै.
कश्याला वेळ वाया घालवताय. ते बडबडणारं स्वतःच्या "बूद्दीमट्टेच्या" जोरावर बोलत नैये. बी-ग्रेडी तृतीयपंथी अनेकवचनी बाप ज्या कामासाठी पॉकेटमनी देणार तसं ते टंकणार. एकप्रकारचा बौद्धीक वेश्याव्यवसाय आहे तो. :). बामनाला दोन शिव्या जास्तं दिल्या की दोन वडापाव आणि एक कटिंग इन्सेंटिव्ह असावा.
बाकी जाती-पातीचा विचार नं करता प्रगतीचा विचार करणार्यांना वरचा "सु"विचार लागु नाही. त्यांचं क्लबात स्वागत आहे. वरच्या कॅटेगरीतले ये*** लोकं ना स्वतःची प्रगती करत ना दुसर्याची होउ देत.
हाथी चले बझार कुत्ते भोंके हजार एवढं ध्यानात ठेउ. कसं?
आ.न.कॅ.जॅ.स्पॅ.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Sun, 11/19/2017 - 04:59
नवीन
अर्थात ब्राह्मण जात/ ब्राह्मण्यावर चर्चा सुरू असली / झाली तर इतके हिडीसपणे व्यक्त होण्याचे प्रयोजन कळले नाही... असो एकेकाची स्टाईल म्हणावी तर वेगळी च
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/19/2017 - 05:40
नवीन
हिडिसपणा कुठे दिसला ब्वा? मी जातपात पाळत नाही. पण उगाच कोणी मुजोरपणा करायला लागला तर तर त्यावा सोडतही नाही.
उगीच पहिल्या धारेची लाइन तर्राटपणा करणार्याला तर अजिबात नाही. गपगुमान आपापलं आयुष्य जग की म्हणो कश्याला उडते बाण पार्श्वभागावर झेलुन मुळव्याध झाल्याची बोंब ठोकायची?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/19/2017 - 07:25
नवीन
नै पन मी काय म्हणतोय.....
एक चांगला मुलगा,
केवळ प्रतीपक्षाकडील लीगल अडवाईजरच्या,
"चारित्र्य हनन व मीडिया ट्रायल" च्या डावपेचाचा बळी जात असेल, तर एक वाचक म्हणून तुम्ही त्याचा बचाव कसा करणार ?
असा अतिशय साधा हायपोथेटिकली विचारलेल्या प्रश्नाला,
काही सुसंगत उत्तर नाही मिळालं.
एक तेव्हड माहितीगार सरांनी उत्तर दिलंय, पण ते नीट कळलं नाही मला...
:(
- Log in or register to post comments
श
शलभ
Sun, 11/19/2017 - 09:13
नवीन
अहो उत्तर मागायचा साळसूदपणा कशासाठी अजून. तुमचा उद्देश तर सफल झाला. विषय पूर्णपणे बदलला. मुस्लिमांकडून ब्राम्हणांकडे..
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/19/2017 - 09:49
नवीन
साळसूदपणा ?? कृपया वैयक्तिक न होता चर्चा झाली तर उत्तमच.
असो माझा उद्देश ?? काय आणि तो सफल झाला की नाही ??
हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का ?
तुमचा उद्देश काय होता, जो आउट ऑफ फोकस झाला ? चर्चा हिंदू मुस्लिमवरच ठेवून, विचहंटिंग करण्याचा ??
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 11/19/2017 - 08:40
नवीन
कश्याला उडते बाण पार्श्वभागावर झेलुन मुळव्याध झाल्याची बोंब ठोकायची?
>> अगदी हेच. हेच. हेच. त्या तिथे वर गापै आणि सुखीमाणूस यांना सांगायचा प्रयत्न होता. पण काय इतकी सुसंस्कृत भाषा आम्हाला जमत नाही ना? स्पेश्यल क्लासेस असतील का याचे?
असो. भावना योग्य त्या ठिकाणी पोचलेल्या बघून आनंद झाला.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/19/2017 - 11:06
नवीन
कौटुंबिक वादात धर्म संस्कृती च्या नावाखाली, लुडबुड करणे
हे फार पूर्वीपासून चाललेलं दिसतंय
धार्मिक कर्मठपणा व स्त्रियांना हीन वागणूक, ही काही एकाच धर्माची मक्तेदारी नाही, त्यात आता स्वतःला लिबरल व सहिष्णु म्हणून स्वतःचीच पाठ स्वतः थोपटणाऱ्यांचे पूर्वज व सद्य स्थितीला त्यांचे वैचारिक वंशज सुद्धा (म्हणजे पाठ थोपटवून घेणारे स्वतः) कमी नाही. आगरकर रानडे यांच्या सारखे पुरोगामी तेव्हाही होते, व तेव्हाही त्यांना शिव्या घालणारे धर्म संस्कृती रक्षक होतेच....
###############
आताच्या पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील दातीवऱ्याच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या ९व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न झालं. मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी श्रीमंत होते, परंतु निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने राहता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू शकत नाही. आपली डाळ शिजत नाही हे कळल्यावर दादाजीने १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. न्यायाधीश पिन्हे ह्यांच्यावर या खटल्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पिन्हे ह्यांनी ‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’, असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला.
ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं.
त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला. परंतु रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही. २३ वर्षांच्या रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली.
###############
रेफरन्स: आज दि 19 नोव्हेंबर 2017 रोजी मटा लेख
https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/dr-rahamabais-confrontation/articleshow/61703292.cms
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/19/2017 - 12:42
नवीन
असे काहीतरी शांतताप्रिय धर्मात झाल्याचे दाखवून द्या बरं
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/19/2017 - 13:08
नवीन
समजा दाखवूनही दिलंत तर काय ?
तुम्ही पुढे अजून काहीतरी विचारत बसाल..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/19/2017 - 14:28
नवीन
हो, साहजिक आहे.
करण एखाद्या समाजातील स्त्रीच्या स्थितीला त्या समाजातील जनत्व लोक जबाबदार असतात असे माझे मत आहे.
आणि किमान शहाबानोसारखे एक मोठे उदाहरण देखील समोर आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/19/2017 - 13:18
नवीन
टिळकांनी व त्यांच्या सारख्यांची आगपाखड सहन करून, एकप्रकारे मीडिया ट्रायल , सामाजिक बहिष्कार कित्येक वर्षे
सहन करूनही....
रखमाबाई या खंबीरपणे उभ्या राहिल्या..
वैद्यकीय व्यवसायात समाजकार्य करत राहिल्या....
...
.
आणि म्हणे लिबरल व स्त्रीला मानाचे स्थान देणारा धर्म...
कैच्या कै हीही आनंदजी...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/19/2017 - 14:26
नवीन
तुम्हाला माझा प्रतिसाद कळलेला दिसत नाहीये..
तेव्हा आगरकर प्रभृती लोक उभे राहिले म्हणून हिंदू स्त्रियांना इतके चांगले दिवस दिसतायत..
जेव्हा वेळ आली तेव्हा इस्लाममध्ये असे लोक उभे का राहिले नाहीत?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 11/19/2017 - 15:05
नवीन
पुरोगामी आगरकरांनी सुद्धा एका वर्तमानपत्रातून झालेला
शिव्या खाल्यात,असो आगरकरांचे क्रेडिट घ्यायला आज संस्कृती रक्षक पुढं आलेले पाहून जरा मौज वाटली.
जसं सरदार पटेलांच्या क्रेडीटवर, आजकाल,
त्यांना एकेकाळी रावणाचे एक मुख म्हणून दाखवणारे व त्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना दाखवणारे व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्यांची पिलावळ पुढे मिरवताना दिसतात.
असो, लोकांना मराठी चा अभ्यास वाढवण्याचे सल्ले देण्यापेक्षा,
हुसेन दलवाई वै. बद्दल स्वतः अभ्यास वाढवावा, शिवाय
सध्या च्या काळातील ट्रिपल तलाक विरुद्ध लढणाऱ्या शायरा बानो या बद्दल देखील वाचावे...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/19/2017 - 15:11
नवीन
हुसेन दलवाई कर्मठ जातीयवादी आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/19/2017 - 15:37
नवीन
कैच्या के वैयक्तिक आहे. सो पास.
हिंदूमध्ये अशी दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. किमान 100 नवे तरी सहज घेता येतील.
मुसलमानांमध्ये 10 तरी सांगाल?
बाकी सुधारणा करायची म्हणजे टीका झेलावीच लागते. पण एखाद्याचे विचार काळाच्या पुढचे असतील तर किमान पुढच्या काळात तरी मान्य होतात. तेव्हा माझ्या पणज्याने टीका केली म्हणून आज मला त्यांची स्तुती करायचा अधिकारच नाही की काय?
बहुधा तुम्ही ऐतिहासिक माणसांना त्या काळच्या कसोटीवरच मोजायचे असते हे विसरलात. असो चालायचंच.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 11/19/2017 - 16:43
नवीन
आमचा मनपरिवर्तनावर विश्वास आहेच. त्यामुळं बदल घडतात ह्यावरही पूर्ण विश्वास आहे.
आता हेच बघाना,2014 मध्ये मंदिरात जाणारे इव्ह टिझर्स असतात म्हणणारे राहुल गांधी आज स्वतःला शिवभक्त अन मंदिरात जाणारे म्हणवून घेत आहेत!
त्यामुळं काल टीका करणाऱ्यांना आज सुबुद्धी सुचून मत बदलू शकते.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Mon, 11/20/2017 - 08:29
नवीन
हुसेन दलवाई का हमीद दलवाई .. माझ्यामते हुसेन दलवाई हा पक्का हिन्दूविरोधी( ब्राम्हण द्वेषाच्या गोन्डस नावाखाली) .. ABP Majha, IBN Lokmat, Zee 24taas वरच्या चर्चेत येउन लोकान्मधे फूट पाडण्याशिवाय काहीही करत नाही हा माणूस ..
प्रत्येक धर्मात आणि जातीत काही वाईट स्वार्थी लोकान्नी शिरकाव केला पण त्यामुळे सगळी जात, धर्म वाईट होत नाही
हमीद दलवाई म्हणत असाल तर मान्य ते मोठे विचारवन्त होते आणि त्यान्नी सर्व धर्मातल्या सर्व प्रकारच्या वाईट चालीरितीन्वर कोरडे ओढले होते ..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/20/2017 - 09:38
नवीन
हुसेन दलवाई पक्का जातीयवादी व हिंदूद्वेष्टा आहे. तो सावरकरांचा अतोनात द्वेष करतो. एका चर्चेत बोलताना म्हणाला होता की सावरकरांनी विशेष काय केले? नुसती उडी तर मारली.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/20/2017 - 09:03
नवीन
क्षमस्व....
हमीद दलवाई असा उल्लेख वाचावा.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Mon, 11/20/2017 - 17:12
नवीन
टिळकान्चा राग आगरकर आणि प्रभ्रुतिन्नी सुचवलेल्या समाज सुधारणेला नसून , इन्ग्रज सरकार हिन्दू धर्मातल्या अनिष्ट रुढी आणि चालीरिती बन्द करण्याच्या नावाखाली लोकान्मधे फूट पाडण्याचा काम करत होत त्याला होता. मवाळ नेते समाज सुधारणान्साठी इन्ग्रजान्ची मदत घ्यायला तयार होते आणि टिळक प्रभ्रुती विरोधात .. पण त्यान्चा विरोध इन्ग्रजान्च्या हस्तक्षेपाला होता.. लोकान्ना नाही ..
आगरकर आणि टिळकान्ना एकमेकान्च्या विषयी मतभेद असले तरी आदर होता.. वरील प्रकरण मला माहित नाही तरी टिळक समाजसुधारणान्च्या विरोधात होते असा गैरसमज होऊ नये म्हणून एवढा सगळा ..
बाकी आपण 'धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी' या मूळ विषयापासून भरकटलो आहोत ..
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/20/2017 - 17:23
नवीन
ओह आय सी, इंग्रज यायच्या आधी, हिंदु धर्मात एकोपा होता...
सगळे गुण्यागोविंदाने नांदायचे.
केसरीतून आगरकरांना काय काय लाखोली वाहिली गेलीय वेळोवेळी, ते एकदा तपासा...
घटस्फोटित स्त्रीला वर्तमान पत्रातून मीडिया ट्रायल करणे,
म्हणजे इंग्रजांवर राग व्यक्त करणे का ?
आणि इंग्रजांच्याच हायकोर्टने स्त्री विरुद्ध निर्णय देऊन, आधीचा खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवला..
त्यावेळेस इंग्रजांवर लेख नाही बरं आलेत ते..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »