Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

ओ
ओम शतानन्द
Sat, 11/18/2017 - 08:18
🗣 413 प्रतिसाद
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 87361 views

🗣 चर्चा (413)
आ
आनन्दा Sat, 11/18/2017 - 08:30 नवीन
....
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 12/07/2017 - 12:58 नवीन
एका माजी ‘कारसेवका’ची डायरी पडघम - बाबरी पतन अभिजित देशपांडे ‘एक होता कारसेवक’ या पुस्तकाचं लेखक, अभिजित देशपांडे http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4987523823755161558 ६ डिसेंबर १९९२ या दिवशी मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो. मशीद पाडणाऱ्यांतही सहभागी झालो. पण नंतर भारतभर उसळलेल्या हिंदू –मुस्लीम दंगलींनी मला अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेतून वाचत, विचार करत पुढे कट्टर हिंदुत्ववादी ते एक मुक्त, धर्मातीत माणूस असा आंतरिक प्रवास केला. आतल्या अस्वस्थतेतूनच ‘एक होता कारसेवक’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिलं. त्याच्या आजवर चार आवृत्त्या आल्या. माझं हे पुस्तक या पंचवीस वर्षांत खरं तर अप्रस्तुत ठरायला हवं होतं, पण तसे होताना दिसत नाही, याची एक नागरिक म्हणून काळजी वाटते. …………………………………………………………………………………………… १९८९-९० चा तो काळ. अयोध्या प्रश्नही तापायला सुरुवात झाली होती. घरी संघाचं वातावरण होतं. वडील संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आई आणि काका १९९०च्या कारसेवेत सहभागी होऊन अटकेत राहून लाठ्या खाऊन आले होते. मुलायमसिंग सरकारनं कारसेवकांवर केलेल्या लाठीमाराचे व्हिडिओज देशभर गल्लोगल्ली दाखवून संघ परिवारानं त्याचं भांडवल करायला सुरुवात केली होती. मी त्या वेळी जेमतेम १९ वर्षांचा होतो. मराठवाड्यात परभणीत एका संघशाखेचा कार्यवाह होतो. संघ बैठकींना नियमित जात होतो. विश्व हिंदू परिषदेच्या विविध सभांना गर्दी गोळा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या अनेक संघ कार्यकर्त्यांवर होती. त्याच वेळी शाखेत एक खेळ नव्यानं सुरू करण्यात आला होता - एका गटाच्या हातात रूमाल बांधलेली काठी, ती त्यानं कसोशीनं वाचवायची नि दुसऱ्या गटानं त्यावर हल्ला करून ती काठी पळवायची. हा मंदिर-मशिदीचाच खेळ होता. आक्रमकपणाची व्यवस्थित पेरणी चालू होती. संघ कार्यर्त्यांचं जाळं पसरत होतं नि त्या प्रमाणात समाजातून हिंदुत्ववादी विचारांना पाठबळ मिळत असल्याचं मी पाहत होतो. अयोध्या प्रश्नाचं भांडवल करून हिंदुत्ववादाचं संभाषित पेरलं जात होतं. तरारून उगवतही होतं. "पाचशे वर्षांपूर्वी बाबर नामक मुस्लीम आक्रमकानं अयोध्येतील रामजन्मभूमी स्थान उद्ध्वस्त करून तिथं मशीद बांधली. हीच ती बाबरी मशीद. ही मशीद म्हणजे हिंदू अस्मितेवरील कलंक आहे. ती बघून तुमचं पित्त खवळत नाही काय? बाबराची औलाद आज समाजातही आहे नि सरकारातही. ती वेळीच ओळखली पाहिजे. ठेचली पाहिजे. हिंदू बहुसंख्य असूनही त्यांचा पदोपदी अपमान करणारं सरकार मुसलमानांचं मात्र लांगुलचालन करत आहे. मुसलमानांच्या एकगठ्ठा वोटबॅंकेवर त्यांचा डोळा आहे. त्यामुळे अयोध्या प्रश्न सरकारी चर्चांच्या गुऱ्हाळानं सुटणार नाही. रामजन्मभूमी हा श्रद्धेचा  विषय आहे. अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, ही कोट्यवधी हिंदूंची  परमश्रद्धा आहे. जगातलं कुठलंही न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. हा आमच्या भावनांचा विषय आहे. हिंदूंच्या भावनांशी सरकार खेळत आहे. आम्ही जगात सर्वाधिक सहिष्णू  आहोत. पण त्याचाच गैरफायदा घेत मुस्लिमांनी आमच्यावर सातत्यानं आक्रमण केलं. अन्याय केला. स्वातंत्र्यानंतरचं सरकारही मुस्लिमधार्जिणंच राहिलं आहे. हिंदूंवर अजूनही प्रत्येक बाबतीत अन्याय होतो आहे. हिंदूचेतना आता जागी झाली आहे. मागून मिळत नसेल तर संघर्ष करून आम्ही हिंदू न्याय मिळवूच. हे धर्मयुद्ध आहे. इथं आता हार नाही. विजय ही विजय है. अयोध्या तो झांकी  है... काशी-मथुरा  बाकी है... गर्व से कहो हम हिंदू है... कहो... जय श्रीराम...!" आसमंत दणाणून टाकणारा उन्माद पद्धतशीरपणे पसरवला जात होता. कार्यकर्ते घरोघरी जाऊन,  प्रत्यक्ष भेटून लोकांना हे पटवून देत होते. आक्रमकपणे ठसवत होते. या पार्श्वभूमीवर १९९२ च्या कारसेवेची घोषणा केली गेली. संघ परिवारानं आता दुप्पट जोमानं तयारी करून लाखो लोक अयोध्येत जमा केले - त्यात मीही एक होतो. संघाच्या 'हिंदुत्ववाद म्हणजेच ‘राष्ट्रवाद' या विचारांचा पगडाच इतका होता की, माझं अयोध्येला जाणं जणू स्वाभाविकच होतं. माझ्यासारखे संघविचारांमध्ये घोळवलेले लोक होतेच. पण ज्यांचा संघाशी, संघविचारांशी थेट संबंध नाही, असेही कितीतरी लोक होते. किंबहुना तेच बहुसंख्य होते. त्यांच्या दृष्टीने हा श्रद्धेचा प्रश्न होता. धर्मयुद्ध होतं. त्यांत त्यांना खारीचा वाटा उचलायचा होता. तरुण पोरं  होती. म्हातारेकोतारे होते. राज्याराज्यांतले, नानाविध जातीजमातींचे लोक होते. हिंदुत्ववादाच्या छत्राखाली तमाम हिंदू एकवटला  आहे, असं बृहदचित्र उभं राहिलं होतं खरं, पण त्याला ठळकपणे मुस्लीमविद्वेषाची किनार होती. ध्रुवीकरणाचं नेपथ्य तयार झालं होतं.  एक डिसेंबरच्या मध्यरात्रीच एका भल्या मोठ्या गटासह मी अयोध्येला पोहोचलो. देशभरातून असे जत्थेच्या जत्थे अयोध्येत येऊन दाखल होत होते. वेगवेगळ्या घाटांवर तात्पुरत्या छावण्या उभारून त्यांची राहण्याची सोय केली गेली होती. अयोध्येत छोटी मोठी अशी कैक मंदिरं, घाट व कुंड आहेत. ते सारं पाहत शेवटी आम्ही बाबरी मशीदीच्या त्या वादग्रस्त वास्तूत शिरलो. खूप जुनी पण भव्य वास्तू. निव्वळ तीन घुमट. त्यातल्या एका घुमटात रामललाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यानं कारसेवकांचे जत्थे आणून त्यांना रामललाचं दर्शन करवलं जात होतं. सगळं काही शिस्तीत चाललं होतं. तिथून फार तर एखाद-दीड किलोमीटर अंतरावर विश्व हिंदू परिषद व रामजन्मभूमी न्यास यांची कार्यालयं होती. तिथं देशभरातून कारसेवेसाठी आणलेल्या विटांचे ढीगच्या ढीग होते. जवळच खांबासाठीचे कोरीव दगड ठेवलेले होते. राममंदिरासाठीची ही पूर्वतयारी आहे, असं कारसेवकांना आवर्जून सांगितलं जात होतं. हजारोंच्या संख्येनं रस्त्यारस्त्यांतून फिरणारे हे कारसेवक परस्परांना ‘जय श्रीराम.. !’च्या घोषणांनी अभिवादन करत होते. वातावरणात मग अधिकच त्वेष चढत होता. तीन, चार, पाच डिसेंबर या तारखांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे अनेक नेते, तमाम साधू-संत अयोध्येत दाखल होऊ लागले होते. मशीद परिसरातच भव्य मैदानात स्टेज उभारलेलं होतं. तिथं कारसेवकांसाठी भजन कीर्तन, नेत्यांची ज्वलज्जहाल भाषणं होत होती. क्रमाक्रमानं ज्वर वाढत होता. फोफावत होता. सहा डिसेंबर १९९२. सकाळी आठ वाजल्यापासूनच लाखो कारसेवक त्या मैदानात जमले होते. डाव्या बाजूला मशीदीच्या दिशेनं रोख असलेले भलं मोठं स्टेज. तिथं भजन संकीर्तन सुरू झालं होतं. उजव्या बाजूला मशिदीचे तीनही घुमट ठळकपणे दिसत होते. मधला सगळा परिसर लाखो कारसेवकांनी फुलून गेला होता. मग दहाच्या सुमारास विविध नेते मंचावर यायला सुरुवात झाली. त्यात लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, उमा भारती, प्रमोद महाजन, विनय कटियार, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्रजी, आचार्य गिरीराज किशोर... आणि कैक. मंचावरून त्यांची ज्वलंत भाषणं सुरू झाली. त्या सर्वांचा साधारण आशय असा - "बाबरी मशीद हा  आपल्या हिंदू अस्मितेवरील एक कलंक आहे... परिंदा भीं पर मार नहीं सकता- असे म्हणणाऱ्या मुल्ला मुलायमला धडा शिकवायलाच हवा... हिंदू आता गप्प बसणार नाहीत... रामजन्मभूमी लेकर ही रहेंगे..."  ही भाषणं चालू असतानाच मधून मधून घोषणा दिल्या जात होत्या. "तेल लगाओ डाबर का, नाम मिटाओ बाबर का... अयोध्या  तो झांकी  है, काशी  मथुरा  बाकी है... गर्व से कहो, हम हिंदू है.. जय श्रीराम...!" या प्रकारच्या घोषणा देण्यात सर्वाधिक पुढे होते आचार्य धर्मेंद्रजी, विनय कटियार, उमा भारती... आणि सर्वाधिक चिथावणीखोर भाषणंही त्यांचीच होती. लाखोंच्या संख्येनं जमलेले कारसेवक आणि परिसर दुमदुमवून टाकणाऱ्या त्यांच्या घोषणा... दुपारी पावणेबाराच्या आसपास काहीतरी गदारोळ सुरू झाला. स्टेजवरची भाषणं जराशी गडबडली. नक्की काय झालं, सुरुवातीला काहीच कळेना. मग कुणीतरी ओरडलं, मशिदीवर कारसेवक चढले आहेत आणि घुमटावर भगवा झेंडा फडकवत आहेत... संपूर्ण वातावरणात उन्मादाची एकच लाट उसळली. मग कारसेवकांतूनच वरीलप्रमाणे घोषणांच्या लाटांवर लाटा उसळत राहिल्या.  "कृपया, शांती बनायें रखे..."  असं व्यासपीठावरून नाममात्र आवाहन एक-दोनदा केलं गेलं. अर्थातच, ते जुमानण्याच्या मन:स्थितीत आता कुणी नव्हतं. मंचावरचे काही नेते आता निघून गेले होते. हा गोंधळ, उन्माद सलग दहा-पंधरा मिनिटं तरी टिकला. उत्स्फूर्त घोषणाबाजी चालूच होती. तोवर लक्षात आलं, आता चार-दोनच नाही, तर अनेक कारसेवक कुंपण भेदून, झाडांवर चढून मशिद परिसरात शिरले होते. त्यांच्या हातातला भगवा झेंडा दुरूनही ठळकपणे जिसत होता. आता तर मंचावरूनही घोषणा सुरू झाल्या, "एक धक्का और दो, बाबरी मसजिद तोड दो.., "कृपया, शांती बनायें रखे..."चं कोरडं आवाहन करून अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी मंचावरून निघून गेले. आणि मंचाचा ताबा विनय कटियार, आचार्य धर्मेंद्रजी व उमा भारती आदींनी घेतला. या घोषणाबाजीनंतर जो तो उन्मादानं भारून त्या प्रचंड गर्दीतही मशिदीच्या दिशेनं सरकू लागला. तिथपर्यंत जाण्यासाठी धडपडू लागला. थोड्या वेळानं मंचावरचे आवाजही विरले. मंच ओस पडला. आणि कारसेवकांचे जत्थे पुढे पुढे सरकत राहिले. या गर्दीतून मार्ग काढत मी व माझ्या तुकडीतले लोक दोन वाजण्याच्या सुमारास मशिदीच्या कुंपणाशी पोहोचलो. त्यावेळेस  "कृपया, यहां भीड न करे... शांतीसे काम करने दे..." असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुंपणाशी कारसेवकांना ओरडून सांगत होते. सर्वांनाच आत जाऊ देत नव्हते. मी तिथं बराच वेळ रेंगाळलो. दुपारी साडेतीन–चारच्या सुमारास कुंपणाशी परत गेलो. खरं तर, कुंपण असं काही आता शिल्लक राहिलंच नव्हतं. आता मात्र माझ्या तुकडीला आत प्रवेश मिळाला. आत जाईतो, तिथं काय चालू आहे, याचा सपशेल अंदाज येत नव्हता. आत मात्र व्यवस्थित, शिस्तबद्ध रीतीनं काम चालू होतं. कुदळ-फावडे घेऊन एक जत्था मशिदीच्या भिंतींवर घाव घालत होता. दुसरा गट घमेल्यांतून तो मलबा दूर करण्याचं काम करत होता. रांगेत उभं राहून "जय श्रीराम...!"च्या घोषणाबाजीत घमेली पुढे सरकवली जात होती. एखाद्या भव्य इमारतीचं बांधकाम ज्या शिस्तीत व समन्वयानं चालतं, त्याच शिस्तीत हेही सारं चालू होतं. तसा समन्वय राखण्याचं काम बजरंग दलाचे कार्यकर्ते करत होते. फरक इतकाच होता, इथं बांधकाम पाडले जात होते. रात्रीपर्यंत मशीद भुईसपाट झाली. दरम्यान उत्तर प्रदेशचं कल्याणसिंग सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. अयोध्येत अर्थातच या संचारबंदीला अर्थ नव्हता. मध्यरात्री अडीच वाजताच उठवून कारसेवकांना पुन्हा मशीद स्थानाकडे नेण्यात आलं. तिथं आता रामजन्मभूमीचे पुरावेच आढळले आहेत, असं सांगितले गेलं. सकाळपासून पुन्हा जत्थ्याजत्थ्यानं या कुंपण परिसरातला मलबा खणून घमेल्यांनी माती दूर करण्याचं काम अर्थात कारसेवा चालूच राहिली. तोवर हळूहळू सैन्यदलाच्या तुकड्यांनी अयोध्येचा ताबा घ्यायला सुरुवात केली आणि कारसेवकांना तिथून पिटाळून लावलं. विशेष रेल्वेगाड्यांनी कारसेवकांना अयोध्येतून बाहेर काढलं जाऊ लागलं. जे घडलं ते अविश्वसनीय होतं. या उन्मादी आनंदातच मीही गावी परतलो. पण तोवर बाहेरच्या बातम्या येऊ लागल्या. देशभर तणावाचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी संचारबंदी होती. स्टेशनांवर शुकशुकाट होता. दंगली उसळल्याच्या बातम्या येत होत्या. त्या सगळ्यानं क्रमश: पण अस्वस्थ होत गेलो. आणि कारसेवेचा सगळाच माज खाडकन उतरला. माझ्या कारसेवक असण्याच्या उन्मादाची माझी मलाच चीड आली. हिंदू असण्याच्या गर्व पोकळ वाटू लागला. मी एक मोठाच सामाजिक गुन्हा केलाय, या जाणिवेनं मला ग्रासलं. आणि मग मी कारसेवक अथवा हिंदू राहिलो नाही. विचारांनी आणि विचारान्ती बदलत गेलो. बाबरी मशीद पाडली जाणं, हे केवळ एक वास्तूचं उद्ध्वस्त होणं नव्हतं. मुस्लीम धर्मावर केलेला तो प्रतीकात्मक हल्ला तर होताच, पण भारतीय धर्मनिरपेक्षतेवरचाही तो हल्ला होता. हिंदूंनी स्वत:च्याच सहिष्णूतेला उद्ध्वस्त केलं होतं. हिंदू विरुद्ध मुस्लीम, मंदिर विरुद्ध मशीद, एवढ्याच मर्यादित परिघातला हा प्रश्न नाहीच. त्याचा आवाका त्याहून खूपच मोठा आहे. या प्रश्नाला ठळकपणेच चार पक्ष आहेत : रामजन्मभूमीचा मुद्दा हिंदू अस्मितेच्या केंद्रस्थानी आणून धर्माचं राजकारण करणारे कट्टर हिंदुत्ववादी हा त्याचा पहिला पक्ष. बाबरी मशीद ही जणू आपल्या अस्तिवाचीच लढाई असल्याचं भासवून अडाणी-निरक्षर-गरीब मुस्लिमांना मूळ प्रश्नांपासून विचलित करणारे मुस्लीम कट्टरपंथीय हा त्याचा दुसरा पक्ष. हिंदूंनांही गोंजारायचं आणि मुस्लिमांचंही लांगुलचालन करत त्यांना वोटबॅंक म्हणून वापरणारे नि धर्मनिरपेक्षतेकडे केवळ एक राजकीय सोय म्हणून बघणारं सरकार हा त्याचा तिसरा पक्ष. आणि चौथा पक्ष म्हणजे खुद्द तत्कालीन परिस्थितीत गोंधळलेला भारतीय समाज. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर समाजाचं जातीय व राजकीय ध्रुवीकरण वेगानं झालं होतं. आर्थिक प्रश्न देशाला भेडसावत होते. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना जनतेनं नाकारल्यानं प्रादेशिक पक्षांच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटत होते. वैचारिक सामजिक चळवळी क्षीण झाल्या होत्या. विचारबळांच्या अभावी असणारा सैरभैरपणा समाजात सार्वत्रिक होता. असा हा गोंधळलेला, भग्न, शतखंडीत, तणावग्रस्त समाज- हा या प्रश्नाचा चौथा पक्ष. याच परिस्थितीतून रामजन्मभूमी बाबरी मशीद अशा नॉन इश्यूला बळ मिळालं होतं. महत्त्वाचे, तातडीचे प्रश्न मागे पडले होते. आज बाबरी मशीद पाडली गेली, या घटनेला तब्बल पंचवीस वर्षं पूर्ण झाली. दरम्यान जागतिकीकरण व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय चित्र पार बदललं आहे. स्वत:ला अभिमानानं हिंदुत्ववादी म्हणवणारी संकुचित आचार-विचारांची सरकारं राज्याराज्यांत व केंद्रात विराजमान आहेत. गुजरात दंगल घडवणारेच आता पंतप्रधान होऊन बसले आहेत. लव्ह-जिहाद, गो-वंशरक्षण, असे कृतक मुद्दे उपस्थित करत तणाव पेरला जात आहेच. ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा नव्यानं दिल्या जाताहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असला तरी त्याचं राजकीयीकरण सर्वच पक्षांकडून केलं जात आहे. निवडणुका जवळ आल्या की, पुन्हा एकदा या मुद्यावर वातावरण तापवलं जाईल. "साधो, देखो जग बौराना! सांची कहौ तो मारन धावे, झुठे जग पतियाना.. हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहिमाना.. आपस मे दोऊ लडे मरत है, मरम कोई नही जाना..." शेकडो वर्षांपूर्वी, कबीरानं लिहून ठेवलेलं पुन्हापुन्हा प्रस्तुत ठरावं, ही भारतीय समाजकारणाची शोकांतिकाच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 14:13 नवीन
मुस्लीम धर्मावर केलेला तो प्रतीकात्मक हल्ला तर होताच, पण भारतीय धर्मनिरपेक्षतेवरचाही तो हल्ला होता. हा मुस्लिम धर्मावर हल्ला नव्हता तर शाहबानो प्रकरणानंतर तुमच्या भूमीचा कायदा बदलला गेला त्या मुस्लिम लांगूलचालनावर प्रतीकात्मक हल्ला होता. राजीव गांधींनी "केवळ मतांसाठी" सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्यासाठी कायदा आणला तेंव्हा या बुबुडा विपुमाधवी लोकांना हा धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला वाटला नाही याचा संताप आहे. माझ्या सारखे असंख्य हिंदू आहेत जे कधी शाखेत गेले नाहीत. आम्ही कधी राम मंदिरात गेलो नाही. ज्यांना अयोध्येत राममंदिर उभे राहते कि नाही त्याच्याशी पण सोयर सुतक नाही. माझ्या सारखे लष्करात राहून सुशिक्षित मुसलमानांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले अनेक लोक आहेत अशा असंख्य लोकांना या लांगूलचालनाची शिसारी आली. सर्व धर्माना समान नागरी कायदा यावा जशी समान दंडविधान संहिता (क्रिमिनल प्रोसिजर कोड) आहे. अशीच विचार सरणी असणारे लोक जेंव्हा इस्लामिक बँकिंग येते म्हटल्यावर अस्वस्थ होतात अशा लोकांची ती प्रतिक्रिया होती. आम्ही मुसलमानांना तितकेच राष्ट्रभक्त मानतो जितके आम्ही स्वतः राष्ट्रभक्त आहोत. पण मतांसाठी काँग्रेसने जितके मुस्लिम लांगुलचालन केले तितके कुणीही केले नाही याचा नक्कीच संताप आहे. इशरत जहाँ सारख्या स्त्रीच्या नावाने रुग्णवाहिका काढणाऱ्या लोकांचा संताप आहे. ओवैसी अबू आझमी सारखे लोक जे "देश के कितने भी तुकडे हो जाये लेकिन हम किसीको अपने मझहब के साथ खिलवाड करने नही देंगे" असे भर सभेत बोलतात अशांबद्दल हा संताप आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगणारे माझ्या सारखे अनेक लोक आहेत जे मुस्लीम "धर्मावर" हल्ला करणार नाहीत पण त्यांची दाढी कुरवाळलेली पण पटणार नाही. बाकी मुसलमान लांगुलचालन करणे म्हणजेच पुरोगामीत्व असेल तर मी स्वतः ला आनंदाने सनातनी म्हणवून घ्यायला तयार आहे
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 12/07/2017 - 19:00 नवीन
याला सुद्धा प्रतिकात्मक हल्ला म्हणणार का ? डॉ माया कोडनानी, सारखे लोकं डॉ असल्याचा इमेजचा फायदा घेऊन, समाजात विष पसरवतात, डॉ म्हणायच्या लायकीची तरी आहे अशी पिलावळ.... अशी डॉ व्यक्ती म्हणजे भारताला झालेला कँसरच.... 'Burnt man to death to save girl from love jihad': New video in Rajsamand case goes viral The victim being burnt alive in the viral video, allegedly for 'love jihad', has been identified as Mohammed Bhatta Sheikh. By Dev Ankur Wadhawan |  December 7, 2017 A horrifying video of a man being burnt alive in Rajasthan's Rajsamand district has gone viral on social media. The videos shows a man identified by police as Mohammed Bhatta Sheikh being thrashed and then set on fire by another man, identified Shambunath Raigar. After killing Sheikh, Raigar made another video where he talks to the camera. In the second video, Riagar, who was arrested by police today morning, not only admits to the crime but justifies the horrifying act, saying he killed Sheikh in order to save a girl from "love jihad." 
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 05:02 नवीन
एका माथेफिरूने केलेला खून आणि देशाच्या पंतप्रधानाने केवळ मतांसाठी केलेला कायद्यात बदल याची एकाच पातळीवर तुलना केलेली पाहून हसावे कि रडावे कि आपल्या अफाट बुद्धीचा आदर करावा हे कळत नाही __/\__.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 12/08/2017 - 07:27 नवीन
सोयीचे असते तेंव्हा राजीव गांधी आणि काँप्युटर युग वगैरे आठवते.. अन्यथा राजीव गांधीं = माथेफिरू हे यांचे पगले रंग. हिंदूद्वेष केला नाही तर पोटावर पाय येतो. मजबूरी असते डॉक.. समजून घ्या.
  • Log in or register to post comments
म
मामाजी गुरुवार, 12/07/2017 - 18:59 नवीन
प गो साहेब, उत्तम ऊदाहरण. आता या ऊदाहरणावरून बोध घेउन आपण आपला मोदिद्वेषाचा व पर्यायाने हिंदुद्वेषाचा उन्माद जो प्रत्येक प्रतिसादातुन व्यक्त करता त्यातुन केव्हा बाहेर पडणार?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 07:43 नवीन
कारसेवक अत्यंत विचारी लोक असतात.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 12/11/2017 - 08:40 नवीन
अभिजीत देशपांडेंचा हा लेख आधी वाचला होता. तेव्हादेखिल पटला आणि आवडला होता. माझे देखिल असेच हिंदूत्ववादी ते धर्मातित/विचारप्रणालीतीत भारतिय नागरिक असे परिवर्तन झाले आहे.(ही प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणणार नाही कारण अभ्यास, चिंतन चालूच आहे अजून) २५ वर्षांत भारतीय गणराज्याचे नागरिक अशी ओळख पुसटच होत चालली आहे. धार्मिक किंवा जातीय आयडेंटिटी आपल्याला अधिक महत्वाची वाटत आहे. हे योग्य नाही आणि भारतासारख्या प्लुरलिस्ट देशाला बहुतांश नागरिक असे एकारलेला धार्मिक डॉग्मा असणारे असणे परवडणार नाही.
I should say, "Love is wise; hatred is foolish." In this world, which is getting more and more closely interconnected, we have to learn to tolerate each other. We have to learn to put up with the fact that some people say things that we don't like. We can only live together in that way. And if we are to live together, and not die together, we must learn a kind of charity and a kind of tolerance, which is absolutely vital to the continuation of human life on this planet.
बर्ट्रान्ड रसेलचा वरील सल्ला अशा वेळेस अधिकच रिलेव्हन्ट वाटू लागतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/18/2017 - 09:37 नवीन
आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे जड अंत:करणाने सहमत
  • Log in or register to post comments
D
Duishen Sat, 11/18/2017 - 22:28 नवीन
श्रीगुरुजी, "आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे" या विधानाला आपण "जड अंत:करणाने सहमत" झाला आहात. मूर्ख म्हणजे बुद्धी नसणारे किंवा बुद्धी कुंठीत असल्याचा अर्थ निघतो. अशा सर्व (हिंदू) स्त्रिया आहेत असे सरसकटीकरण असणाऱ्या वाक्याला आपण सहमती दर्शवली आहे. असे विषमतामूलक वाक्य मनुस्मृतीकृत आहे आणि आपण मनुस्मृती वाचली नाही असे आपले म्हणणे आहे. खरेतर तुम्ही मनुस्मृती वाचली नाही या तुमच्या विधानावर माझा विश्वास आहे. हिंदू समाजातील ९९% लोकांनी ती वाचली नाही असेही मला वाटते. पण विषमता समर्थन करण्यासाठी मनुस्मृती वाचलीच पाहिजे असे मला वाटत नाही. गातानुगतिक परंपरा आपल्याला ही विषमता शिकवतात आणि कुणी कुणी तर हे स्वेच्चेने विषमतामूलक जीवन स्वीकारतात कारण त्यात सत्तास्थानाचा फायदा असतो!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/19/2017 - 04:12 नवीन
मराठीचा अभ्यास वाढवा एव्हढेच सांगेन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
D
Duishen Sun, 11/19/2017 - 10:03 नवीन
नक्कीच आनंदजी! मुळात माझी मराठी चांगली आहे असा मी कुठेही दावा केल्याचे स्मरत नाही. पण आपल्याला माझ्या मराठीतील उणीवा जाणवत असतील आणि ते खरे असेल तर अभ्यास करेलही. पण मुळ मुद्दा कायम आहे. माझ्या ज्या प्रतिसादाला आपण "मराठीचा अभ्यास वाढवा एव्हढेच सांगेन." असे उत्तर दिले त्या प्रतिसादातील प्रश्न सुटणार आहेत का? गातानुगतिक पद्धतीने रुजलेली मनुस्मृती माझ्या एकट्याच्या मराठीच्या अभ्यासाने मनुस्मृती मानणाऱ्यांच्या कुठल्याही व्यक्तीच्या मनातून निघून जाणार आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 11/19/2017 - 16:32 नवीन
इतिहासातील किती राजांनी मनुस्मृती लाहू करून त्यानुसार न्यायनिवाडे केलेत, हे सांगू शकल्यास आभारी राहील.
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Sun, 11/19/2017 - 04:13 नवीन
वरील वाक्यात सर्व हिंदू स्त्रिया असा उल्लेख केलेला नाही ,पण मूर्ख हिंदू स्त्रिया हे मुस्लीम पुरुषाच्या प्रेमात पडून लग्ना नंतर पश्चाताप करणाऱ्या स्त्रियांना उद्देशून आहे टिपिकल पुरोगाम्यान्प्रमाणे ज्यात त्यात मनुस्मृती घुसविण्याची गरज नाही
  • Log in or register to post comments
D
Duishen Sun, 11/19/2017 - 10:08 नवीन
ओमजी, टिपिकल पुरोगामी किंवा मी हे मनुस्मृती खरेच मनुस्मृती घुसवू शकत नाही. ज्यांच्या ज्यांच्या मनात आधीच मनुस्मृती रुजली आहे त्यांच्या मनात वेगळे घुसविण्याची गरज काय!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 18:35 नवीन
तुमच्या अनेक प्रतिसादात बादरायण संबंध नसताना सुद्धा सातत्याने मनुस्मृती येत असते. मनुस्मृती तुमच्या घट्ट रुजलेली दिसते.
  • Log in or register to post comments
D
Duishen Mon, 11/20/2017 - 23:45 नवीन
धन्यवाद श्रीगुरुजी! मनुस्मृतीचे भीषण परिणाम समाजात दिसतात. त्यासाठी संवेदनशील मनाची आणि निरीक्षणाची गरज आहे. परंपरा माणसावर, त्याच्या वागणुकीवर आणि सामाजिक संबंधावर परिणाम करीतच असतात. मी फक्त ते संवेदनशील आणि उघड्या डोळ्याने बघतो आहे. शिवाय जर आपण "पूर्वपुण्याई" असा मागील जन्माचा संदर्भ मतप्रदर्शनासाठी वापरू शकता तर मी दीड-दोन आठवड्यापूर्वी झालेल्या चर्चेचा संदर्भ वापल्यास नाराज होऊ नये.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 04:32 नवीन
मनुस्मृतीचे भीषण परिणाम समाजात दिसतात. हास्यास्पद विधान. बाकी तुमचं मनुस्मृती बद्दल असलेलं obsession विस्मयकारक आहे. तुमचे प्रतिसाद म्हणजे मायावतीचं भाषण वाटतं.
  • Log in or register to post comments
D
Duishen Sun, 11/19/2017 - 10:20 नवीन
पण मूर्ख हिंदू स्त्रिया हे मुस्लीम पुरुषाच्या प्रेमात पडून.... केवळ इतर धर्मियांच्या प्रेमात पडल्या तर मूर्ख कशा ठरतात? अनेक जण मग ते स्त्री असो वा पुरुष केवळ लग्न करूनच काही कारणास्तव पश्चाताप करतात मग त्या बाबतीत काय करायचे? त्यांना काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 10:50 नवीन
ज्या अघोरी पंथात विवाह, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, पत्नीशी शरीरसंबंध, कपडे इ. विषयीचे कायदे व पद्धती स्त्रियांसाठी अत्यंत अन्यायकारक आहेत, जो अघोरी पंथ अत्यंत कर्मठ असून ज्यात स्त्रियांना काडीचीही किंमत नाही, अशा अघोरी पंथाची माहिती असूनसुद्धा त्या पंथियाच्या नादी लागून स्वधर्म त्यागून विवाह करून नंतर पश्चाताप करणे हा महामूर्खपणा आहे़.
  • Log in or register to post comments
B
babu b Sun, 11/19/2017 - 15:41 नवीन
!!! ( हिंदू विवाहात हेच कायदे पुरुषाना खड्ड्यात घालणारे आहेत . मग पुरुषहिताचा विचार केला तर हिंदू कायदाही अघोरीच का ? )
  • Log in or register to post comments
B
babu b Sun, 11/19/2017 - 15:41 नवीन
!!! ( हिंदू विवाहात हेच कायदे पुरुषाना खड्ड्यात घालणारे आहेत . मग पुरुषहिताचा विचार केला तर हिंदू कायदाही अघोरीच का ? )
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 07:30 नवीन
चंपाबाई पिचक्या टाकण्याच्या अगोदर विचार करत जा. हिंदूंचा कोणताही कायदा हा धर्मशास्त्रातील वाचन म्हणून जसाच्या तसा लागू नाही आणि जो कायदा केला आहे तो अनेक विचारवंतांनी आणि कायदे पंडितांनी केलेला आहे. पाचव्या शतकात कुणाच्यातरी स्वप्नात देवाने येऊन सांगितलेला आणि तसाच्या तसा "देवाची इच्छा" म्हणून लादलेला नाही.
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 11/20/2017 - 08:23 नवीन
ॲप्लिकेबल असलेला कायदा ( देवाचा / माणसाचा ) शेवटी कुणालातरी खड्ड्यात घालू शकतोच की .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 08:39 नवीन
माणसाचा कायदा बदलता येतो "म्हणजेच" खड्डा बुजवता येतो. पण देवाने "स्वप्नात येऊन सांगितलेल्या" गोष्टी १४०० वर्षे जशाच्या तशा स्वीकाराव्या लागतात कालबाह्य झाल्या तरी कारण ती "देवाची इच्छा" असते. म्हणजेच काय "त्याच खड्ड्यात" कायम पडत रहा. पुढे वाटचाल शक्यच नाही. अर्थात हे तुम्हाला समजावून घ्यायचंच नाहीये फक्त कुजकट पिचक्याच टाकायच्या आहेत त्यामुळे प्रश्नच मिटला.
  • Log in or register to post comments
B
babu b Sun, 11/19/2017 - 15:42 नवीन
!!! ( हिंदू विवाहात हेच कायदे पुरुषाना खड्ड्यात घालणारे आहेत . मग पुरुषहिताचा विचार केला तर हिंदू कायदाही अघोरीच का ? )
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 11/19/2017 - 16:39 नवीन
पत्नीशी शरीरसंबंध >> याबद्दल अधिक सांगू शकाल का? 'लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नसणं (सर्व धर्मांमधे समान कायदा)' हा विषय मी गेली ४+ वर्ष मराठीआंजावर काढतेय. आत्तापर्यंत फक्त २ पुरुष आणि १ स्त्री भेटलेत ज्यानी 'हा गुन्हा असावा' असे उघड मत मांडले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 17:56 नवीन
पतीने शरीरसंबंधाची मागणी केल्यास पत्नीने त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे (तिची इच्छा नसली तरी) असा कुराणाचा आदेश आहे.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 11/19/2017 - 23:35 नवीन
ठीक! === • इतर धार्मिक ग्रंथांमधे याबद्दल काय आदेश आहेत? • पतीला? • पत्नीला? === सध्याचा भारतीय कायदा '"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो. "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो. ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 03:08 नवीन
पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा नक्की कधी बलात्कार असतो व बलात्कार असल्यास ते कसे सिद्ध करणार?
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 11/20/2017 - 04:56 नवीन
म्हणजे बाबत कुराण व हिंदू कायदा यांचे एकमत आहे !
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 11/20/2017 - 05:03 नवीन
याबाबत
  • Log in or register to post comments
ए
एमी Mon, 11/20/2017 - 05:30 नवीन
म्हणजे याबाबत कुराण व हिंदू कायदा यांचे एकमत आहे ! >> कायद्याचे एकमत तर आहेच!! पण स्वतःला १००% हिंदूंचे प्रवक्ते समजणाऱ्या स्वघोषित उच्चवर्णातील पुरूषांचेदेखील त्याला समर्थन आहे आणि त्यांच्या बायका दालआटासाठी ४००००रुपयात सौदा (डील)करणाऱ्या आहेत (मराठी आंजावर हेच दिसतात म्हणून यांच्याबद्दल बोलतेय. बाकीच्यांचे सर्वेक्षण केले नाही). मग इस्लामला कशाला नाव ठेवायची उगीच!! किती ती दांभिकता!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 05:58 नवीन
एका मूर्खाच्या सांगण्यावर विसंबून थेट चुकीचे निष्कर्ष काढण्याआधी माझा प्रतिसाद नीट वाचून समजून घ्या.
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Tue, 11/21/2017 - 07:20 नवीन
पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा नक्की कधी बलात्कार असतो व बलात्कार असल्यास ते कसे सिद्ध करणार?
गुरुजी, सिद्ध कसा करणार हा मुद्दा नाहीये तर तो गुन्हा आहे कि नाही हा मुद्दा आहे. कमीतकमी गुन्हा आहे हे तरी मान्य करा. सिद्ध कसे करायचे वगैरे ते नंतर बघता येइल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 11:01 नवीन
सिद्ध करणे ही नंतर येणारी पायरी आहे. त्याआधी हा गुन्हा आहे किंवा गुन्हा घडला आहे हे ठरविणार कसे? म्हणजे या गुन्ह्याची नक्की कायदेशीर व्याख्या कशी करणार? हा शरीरसंबंध नक्की कधी गुन्हा समजला जाईल आणि नक्की कधी गुन्हा समजला जाणार नाही हे कोण व कसे ठरविणार? एखादे कृत्य गुन्हा या व्याख्येत येत असेल तरच त्यावर पुढील कारवाई होऊ शकते (म्हणजे गुन्हा दाखल करून खटल्याची सुनावणी करणे, गुन्हा घडला आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे इ.). मुळात हे कृत्य गुन्हा समजले जाईल हे कसे ठरविता येईल?
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Tue, 11/21/2017 - 11:39 नवीन
गुरुजी माझे म्हणणे इतके साधे आहे की, तात्विक पातळीवर तर आधी हा गुन्हा आहे हे तुम्ही मान्य करायला तयार आहात का ते स्पष्ट सांगा. जर तात्विक पातळीवर गुन्हा आहे हेच मान्य नसेल तर बाकीच्या डिटेल्स मधे काहीच अर्थ नाही. पण तात्विक पातळीवर अश्या प्रकारचा गुन्हा असु शकतो आणि मानला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर मग नक्की व्याख्या काय आहे, ते सिद्ध कसे करायचे किंवा पळवाटा कश्या असु शकतील हे चर्चेस घेता येइल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 11:03 नवीन
मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतोय. पतिपत्नीतील शरीरसंबंध नक्की कधी गुन्हा आहे हे ठरविता येईल किंवा गुन्हा नसून नैसर्गिक घटना आहे हे ठरविता येईल? हे ठरविल्यानंतरच मत देता येईल. हा गुन्हा आहे असे ठरवायचे असेल तर त्या गुन्ह्याची कायदेशीर व्याख्या करावी लागेल. अशी व्याख्या कोणी केली असेल तर ती द्यावी म्हणजे त्यावर मत देता येईल. नुसत्या अभिनिवेशाच्या आहारी न जाता या मुद्द्यावर कायदेशीर अंगाने चर्चा केली तरच त्यावर मत देता येईल.
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Wed, 11/22/2017 - 12:04 नवीन
साधी व्याख्या आहे गुरुजी - पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध. असा संबंध माझ्या मते गुन्हा आहे ( कायद्याच्या मते काय आहे हे आत्ता बोलायला नको ). तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का? मला खरंच वाटत नाही कि तुम्हाला कळत नाहीये, पण तुम्हाला स्टँड घ्यायचा नाहीये.
  • Log in or register to post comments
ए
एमी Wed, 11/22/2017 - 13:08 नवीन
मला खरंच वाटत नाही कि तुम्हाला कळत नाहीये, पण तुम्हाला स्टँड घ्यायचा नाहीये. >> स्टँड घ्यायचा नाहीय त्यांना. नका वेळ घालवू. एवढे वादविवाद करणार्यांना consent म्हणजे काय माहित नसेल हे शक्य आहे का?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 14:24 नवीन
स्टॅण्ड घेतला तर तोंडावर पडतील ना ते.. इस्लाम असो वा हिंदू, पत्नीला संभोगास नकार देण्याचा अधिकारच नाही हे ते कसे कबूल करतील, कोणत्या तोंडाने?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 20:02 नवीन
स्टँड ते घेत नसतील, कारण ते स्वतः कनफ्युज असतील, त्यांच्या विचारांबद्दल ... कारण ते आधी लिहितात
केवळ कायदा केल्याने प्रश्न सुटेल हे म्हणणे म्हणजे आराम खुर्चीतील विचारवंतासारखा विचार करणे आहे.
आणि ४-५ ओळी नंतर म्हणतात.... बाल विवाह विषयक कायदा सक्तीने राबवला गेला पाहिजे. म्हणजे नवे कायदे फायद्याचे नाहीत, व जुन्या मध्ये खूप पळवाटा आहेत, म्हणून जे चाललंय (विवाह अंतर्गत बलात्कार) ते चालू राहू द्यावे , असा त्यांचा स्टँड असावा, हा अंदाज बरका...
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 08:01 नवीन
इस्लाम असो वा हिंदू, पत्नीला संभोगास नकार देण्याचा अधिकारच नाही हे ते कसे कबूल करतील, कोणत्या तोंडाने?
हिंदू धर्माचे सर्व नियम एक्त्रित कुठे आहेत? च्यायला एवढे उपयुक्त नियम आम्हाला हिंदू असून माहित पण नव्हते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 10:15 नवीन
"पत्नीला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध" इतकी सोपी, साधी पतीने पत्नीवर केलेल्या बलात्काराची व्याख्या करता येणार नाही. पतीचं सोडा, भारतीय फौजदारी कायद्यात असलेली बलात्काराची व्याख्यासुद्धा खूप सविस्तर आहे. इथे तर पतीपत्नीचा संबंध असल्याने पतीपत्नीतील शरीरसंबंध नक्की कधी बलात्कार या व्याख्येत बसविता येतील याविषयी केवळ काही शब्दात व्याख्या होऊ शकत नाही. या धाग्यावर दिलेले डॉ. सुबोध खरे यांचे सविस्तर प्रतिसाद पुन्हा एकदा नीट शांतपणे वाचा. पतीपत्नीचे संबंध अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचे असतात. या नात्यात ते फक्त दोघे नसून दोघांच्या कुटुंबाचाही समावेश असतो. अशा गुंतागुंतीच्या संबंधात केवळ एका लहानशा गंभीर चुकीमुळे अनेकांची आयुष्ये कायमची उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पतीपत्नीतील शरीरसंबंध या विषयी एखादा कायदा करायचा असेल किंवा त्यांच्यातील संबंध काही विशिष्ट प्रसंगात गुन्हा ठरवायचा असेल त्यावेळी अतिशय काळजीपूर्वक व सविस्तर गुन्ह्याची व्याख्या केली पाहिजे. तुम्ही वर लिहिलेल्या काही शब्दांचे एक वाक्य हे त्यासाठी अत्यंत अपूर्ण आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर एखाद्या वकीलाशी याविषयावर बोला व असे संबंध गुन्हा ठरवायचा असेल तर त्यासाठी नक्की काय करावे लागेल, या गुन्ह्याची व्याख्या कशी करता येईल हे त्याला विचारा. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध हा गुन्हा ठरवावा असे अभिनिवेशात म्हणणे व यावर इतरांना भूमिका घ्यावयास सांगणे खूप सोपे आहे. अशा एखाद्या फेकलेल्या वाक्यावर भूमिका घेणे शक्य नाही. आधी हे संबंध नक्की कधी गुन्हा म्हणून ठरविता येऊ शकतील याविषयी सविस्तर व्याख्या करा, ती मांडा आणि नंतरच त्यावर मी भूमिका घेईन. समजा एखाद्या मुलाने वडीलांना सांगितले की मला बिझनेस करायचा आहे व त्यासाठी तुमची परवानगी आहे का नाही. यावर कोणताही बाप आधी विचारेल की तुला नक्की कोणता बिझनेस करायचा आहे, तुझ्याबरोबर कोण भागीदार आहेत, त्यासाठी भांडवल, जागा इ. ची तयारी आहे का . . . अशी सविस्तर माहिती बाप विचारेल. मुलगा एका वाक्यात सांगतो की मला बिझनेस करायचा आहे आणि बाप कोणतीही माहिती न विचारता मान डोलावतो असे होऊ शकत नाही. इथेही तसेच आहे. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध याला गुन्हा समजावा यावर तुमची भूमिका काय असे विचारल्यानंतर त्यावरील सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच भूमिका घेता येईल. असा कायदा इतर काही देशात आहे असे अ‍ॅमीताई म्हणतात. तसे असेल तर तिथल्या कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत हे इथे मांडले तर भूमिका घेण्याच्या दृष्टीने मदत होईल. असो. तेच तेच पुन्हा सांगण्याचा कंटाळा आला आहे. पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. मला यावर भूमिका घ्यायची नाही किंवा मला याविरोधी भूमिका घ्यायची आहे असा समज करून घेतलात तरी माझी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 10:23 नवीन
"पत्नीला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध" इतकी सोपी, साधी पतीने पत्नीवर केलेल्या बलात्काराची व्याख्या करता येणार नाही. पतीचं सोडा, भारतीय फौजदारी कायद्यात असलेली बलात्काराची व्याख्यासुद्धा खूप सविस्तर आहे. इथे तर पतीपत्नीचा संबंध असल्याने पतीपत्नीतील शरीरसंबंध नक्की कधी बलात्कार या व्याख्येत बसविता येतील याविषयी केवळ काही शब्दात व्याख्या होऊ शकत नाही. या धाग्यावर दिलेले डॉ. सुबोध खरे यांचे सविस्तर प्रतिसाद पुन्हा एकदा नीट शांतपणे वाचा. पतीपत्नीचे संबंध अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचे असतात. या नात्यात ते फक्त दोघे नसून दोघांच्या कुटुंबाचाही समावेश असतो. अशा गुंतागुंतीच्या संबंधात केवळ एका लहानशा गंभीर चुकीमुळे अनेकांची आयुष्ये कायमची उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पतीपत्नीतील शरीरसंबंध या विषयी एखादा कायदा करायचा असेल किंवा त्यांच्यातील संबंध काही विशिष्ट प्रसंगात गुन्हा ठरवायचा असेल त्यावेळी अतिशय काळजीपूर्वक व सविस्तर गुन्ह्याची व्याख्या केली पाहिजे. तुम्ही वर लिहिलेल्या काही शब्दांचे एक वाक्य हे त्यासाठी अत्यंत अपूर्ण आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर एखाद्या वकीलाशी याविषयावर बोला व असे संबंध गुन्हा ठरवायचा असेल तर त्यासाठी नक्की काय करावे लागेल, या गुन्ह्याची व्याख्या कशी करता येईल हे त्याला विचारा. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध हा गुन्हा ठरवावा असे अभिनिवेशात म्हणणे व यावर इतरांना भूमिका घ्यावयास सांगणे खूप सोपे आहे. अशा एखाद्या फेकलेल्या वाक्यावर भूमिका घेणे शक्य नाही. आधी हे संबंध नक्की कधी गुन्हा म्हणून ठरविता येऊ शकतील याविषयी सविस्तर व्याख्या करा, ती मांडा आणि नंतरच त्यावर मी भूमिका घेईन. समजा एखाद्या मुलाने वडीलांना सांगितले की मला बिझनेस करायचा आहे व त्यासाठी तुमची परवानगी आहे का नाही. यावर कोणताही बाप आधी विचारेल की तुला नक्की कोणता बिझनेस करायचा आहे, तुझ्याबरोबर कोण भागीदार आहेत, त्यासाठी भांडवल, जागा इ. ची तयारी आहे का . . . अशी सविस्तर माहिती बाप विचारेल. मुलगा एका वाक्यात सांगतो की मला बिझनेस करायचा आहे आणि बाप कोणतीही माहिती न विचारता मान डोलावतो असे होऊ शकत नाही. इथेही तसेच आहे. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध याला गुन्हा समजावा यावर तुमची भूमिका काय असे विचारल्यानंतर त्यावरील सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच भूमिका घेता येईल. असा कायदा इतर काही देशात आहे असे अ‍ॅमीताई म्हणतात. तसे असेल तर तिथल्या कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत हे इथे मांडले तर भूमिका घेण्याच्या दृष्टीने मदत होईल. असो. तेच तेच पुन्हा सांगण्याचा कंटाळा आला आहे. पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. मला यावर भूमिका घ्यायची नाही किंवा मला याविरोधी भूमिका घ्यायची आहे असा समज करून घेतलात तरी माझी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 07:57 नवीन
तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?
तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने स्वयंपाक करायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?" तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने नोकरी करायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?" तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने घरातले आवश्यक करायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?" तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने बाळाची शी काढायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?"
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 08:08 नवीन
तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?
जबरदस्ती आणि गोडीगुलाबी पैकी फक्त जबरदस्ती गुन्हा असते का? का असते? बाईने पुरुषाला गोडीगुलाबीने शरीरसंबंध लादला तर तो मॉरली एटसेटरा गुन्हा असतो का? आणि विवाहीत बाईने .. नवर्‍याला ... असतो का? का असतो/नसतो?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 07:54 नवीन
कमीतकमी गुन्हा आहे हे तरी मान्य करा.
गुन्हा आहेच. ते अमान्य करायचा प्रश्न येत नाही. --------------- पुढे बोला.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 15:10 नवीन
लग्न करताना पति पत्निचा सम्भाळ करीन असे वचन देतो. मग सध्याच्या भारतिय कयद्याने पत्निची ही गरज पुर्ण न करणार्या नवर्याला पण बडगा दाखवता आला पाहिजे जर लग्नामुळे येणारी कोणतीही बन्धन ठेवायची नसतील तर कमावत्या जोडीदाराची स्वताचे उत्पन्न स्वताच्या मर्जीने खर्च करण्याची सोय कयद्याने केली पाहिजे. म्हणजे फुकट पोसले जाणारे आयतोबा लोक्स मापात रहतील .विशेषता दारुडी आयतोबां मन्डळी तुम्ही जो कायदा होण्यासाठी सर्वे करताय तो स्त्री पुरुष व समलिन्गी विवाह या सर्वाना लागु झाला पाहिजे. तरच खरी सामाजिक समता येइल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 11 hours ago
  • सुंदर !!
    3 days 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा