ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत-
https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे..हा भ्रम खरं वाटावा म्हणून ते खोट रेटून बोलताहेत!पण यांना विचारले.त्यांचे बोट धरून मोदी राजकारणात चालायला शिकले, गुरुला विचारलेच असावे.मी काही तुमच्या इतका शिकलेलो नाही... पण .....मुवि, तुमचे अॅनॅलेसिस बरोबर आहे परंतु जिकडे तिकडे पाकड्यांच्या माकड्चाळ्यांचा आता उबग आला आहे. आपल्या देशाच्या ईतिहासात पाहिले की जसे जसे दिवस जातात तसे तसे मग एखाद्या घटनेची तीव्रता कमी कमी होत जाते. तसे होउ नये असे वाटते. जसे मागे मालदीव मधे ईंडीया हटाओ मोहिम चालु होती तेव्हा मुईझु वाकड्यात गेला तेव्हा माल्दीव बायकॉट मोहिम चालली नंतर सगळं ऑलबेल झाले. त्यात भारताला पाऊल मागे घ्यावे लागले. ईतके करुनही मुईझु भारतात आला तेव्हा त्याला पायघड्या घातल्या होत्या ... तसे काही होउ नये. जे लोक हकनाक बळी गेली त्यांचे बलीदान व्यर्थ जायला नको.माझा विश्वास आहे लष्कर व संबंधित मंत्री योग्य नियोजन करण्यात व्यग्र असणार.हे मान्य. ह्यातले मुरब्बी लोक योजना आखत असतील हे खरे. फक्त आपला वेळ जाउन त्या वेळेत शत्रु लष्करी सामग्रीत प्रबळ होउ नये हीच ईच्छा. नुकतेच तुर्कीये व चीन ने पाकीस्थान ला लष्करी सामग्री पुरवली आहे असे वाचनात आले. खरे खोटे माहीत नाही. सोशल मीडीया वर आल्येल्या बातम्या मी जास्त सिरियस्ली घेत नाही. परंतु काळजी वाटते ईतकेच.भारताकडुन अजुनही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये.काहीही होणार नाहीये, पाकिस्तानवर कारवाई करायला नेता दमदार लागतो, त्याला हुशारी लागते, लष्करी डावपेच वगैरे, निर्णयक्षमता, आंतरराष्ट्रीय राजकारण हाताळण्याची क्षमता ह्या गोष्टी लागतात. लोकांना “अच्छे दिन” सांगून मूर्ख बनवून सत्ता मिळवली म्हणजे हे गुण अंगात येत नाहीत. थोडक्यात पाकिस्तानला धडा शिकवायला भाजप म्हणजे काँग्रेस नाही नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाही. हे लक्षात घेतले तर दुःख कमी होते. मी तेच करतोय.