Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा

श
श्रीगुरुजी
Sun, 05/02/2021 - 05:32
🗣 301 प्रतिसाद
आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69943 views

🗣 चर्चा (301)
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 08:00 नवीन
पण जेंव्हा बोलण्यात मोदी, bjp येते तेंव्हा हिंदू आणि मुस्लिम यावरच गाडी येऊन थांबते.. याला काराणे - हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहे ... - भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचार - देश हित साठी काह्ही केलं कि ते म्हणजे हिंदुत्ववकडे वाटचाल असा खोटा प्रचार इंदिरा गांधींनी जे देशासाठी ७१ साली केले तसे जर या सरकारने काही केले तर ते मात्र "हिंदुत्वासाठी केलं" असा ढोंगी प्रचार .. कमालिचा भाजप द्वेष ( भाजपला साथ देणारा सुद्धा म्हणेल कि काँग्रेस सारखा राष्ट्रीय जुना पक्ष अगदीच विरून जाऊ नये ... पण तेच तुम्ही डाव्या आणि काँग्रेसनं विचारआ . त्यांचं मते भाजप अस्तत्वातच असू नये सत्ता तर दूर एवढा कमालीचा द्वेष )
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/11/2021 - 08:21 नवीन
येथे हिंदू आणि मुस्लिम कोणी सुरु केले हे तरी बघा.. माझा सवाल होता ३ चे ७७ झाले चांगली गोष्ट आहे.. पण यात मूळचे भाजपाचे किती.. यात वावगे असे काही नाही.. कोणी तरी लिंक दिली कि ४ जण tmc चे आहेत फक्त.. जर तसे असेल तर चांगले आहे.. भाजप वाढतोय.. तसे नसेल तर त्यांनी हि पाठ थोपटण्यात अर्थ नाही.. -- १
.हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहे
येथे हिंदू. मुस्लिम कोणी सुरु केले? ह्याचे उत्तर वरती मिळेलच..मुवि हे पहिले होते.. मग काय करणार आता? २.
भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचार
बरोबर, राजकारणी आणि त्यांचे पक्ष हे कोणत्या जातीच्या विरुद्ध आहेत हे पसरवने चुकीचेच आहे.. असे कोणी पसरवत असेल तर त्या पक्षाच्या लोकांनी, त्यांच्या संघटनांनी तशी त्या विरुद्ध न्यायालयात रीतसर कारवाही करावी.. पण त्याच वेळेस त्यांनी आपण कोणत्या तरी धर्मासाठी लढतोय.. वगैरे सुद्धा बोलू नये.. ३.
कमालिचा भाजप द्वेष
काँग्रेस मुक्त भारत हा विचार भाजपाच आहे.. या आधी भाजप मुक्त देश कोणी म्हणाले हि नव्हते.. द्वेष हा पक्षा वर नसावा..द्वेष हा त्या त्या वेळी अवलंबलेल्या त्यांच्या नीती वर किंवा कार्यावर असावा.. जे चूक ते चूक.. जे बरोबर ते बरोबर.. -- येथील चर्चा हिंदू मुस्लिम कशी चालू झाली ते आपण पाहणार नाही आणि इतर उदाहरणे दिल्यास त्याचा काय अर्थ आहे? असो..
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sun, 05/09/2021 - 08:35 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Azad_Maidan_riots हा २०१२ सालचा इतिहास आहे फार दुरचा नाही. जगभरात मुस्लीम धार्मिकता धोकादायक ठरते आहे म्हणुन तरी सावध रहायला हवे. https://en.wikipedia.org/wiki/Bengali_Muslims
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 05/09/2021 - 08:45 नवीन
कोरोनाने लाखो लोक ( सर्व धर्माचे ) मृत्युमुखी पडत आहेत ते केंद्र सरकारला दिसत नाही का? हिंदू हिंदू करून सगळ्यांनाच संकटात टाकलेय ह्या अडाण्यांने .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 05/09/2021 - 10:41 नवीन
काय संबध आहे या धाग्याशी ? मुस्लिम धर्मांधता संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरत आहे सध्या. बंगालमधे हिंदूच्या कत्तली सुरु आहेत व महाराष्ट्रात पोलीसांची धुलाई सुरु आहे दिवसाढवळ्या. या धुलाई करणार्‍यांपैकी एकाला तरी अटक केल्याची बातमी आहे का कोणाकडे ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/09/2021 - 13:32 नवीन
संबंध तर मुस्लिम धर्मांधतेचा तरी कुठाय या धाग्याशी ? तरी काढलाच की तुम्ही आणि मुक्त विहारींनी विषय. धागा आहे- विधानसभा निवडणुकींचा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/09/2021 - 13:43 नवीन
निवडणूक झाल्या नंतर, भाजप कार्यकर्त्यांच्या वर झालेले हल्ले हेच दाखवत आहेत.... अजूनही काही दाखले हवे असतील तर, Youtube वर काही व्हिडियो आहेत, ते बघा ....
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/09/2021 - 14:24 नवीन
भाजप म्हणजे हिंदू धर्म आहे की काय ? राजकीय हाणामारी बंगालमध्ये जुनी आहे. आणि TMC पण अर्थात दोषी आहे, शंकाच नाही. त्यांनी ना हिंसा रोखण्याचा प्रयत्न केला ना निषेध केला, आणि तिथेही केंद्रावर दोष मढण्याचा प्रयत्न केला. पण, इथे हिंदू धर्मावर हल्ला ही थाप आहे. TMC सुद्धा हिंदू बहुसंख्य पक्ष आहे. TMC मधल्या प्रिस्युमेबली (निदान काही) हिंदू गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. जिथे तिथे धार्मिक ट्विस्ट देणे भाजपाचा USP आहे. काय आधार आहे सांगा तुमच्या म्हणण्याला. आणि माझा मुद्दा अवांतर बाबत होता.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/09/2021 - 13:24 नवीन
पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/11/2021 - 08:12 नवीन
मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. अहो सगळेच मानतात हो ... त्यात काय ! कोणाला हिंदुराष्ट्र कर्यायाचे नाहीये ... भाजप ला मत देणारे पण या गोष्टीतील तयार नाहोये ना कोणाला अफगाणिस्तान पासून बंगाल पर्यंत "अखंड भारत" करण्याचे वेध लागलेत अनेकांना या "गांधीगिरी " आणि टायपेक्षा हि वाईट म्हणजे "काँग्रेसी फसवेगिरी आणि दाव्याचा "शातिर " पण याचा प्रथम उबग आणि चीड आली आहे आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ? जाता जाता एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार.. आपण म्हणता ते बरोबर मग हे हि ऐका बहुतेक मांसाहारी हिंदू हलाल पद्धतीचे खायला नाही म्हणणार नाही .. एक मुस्लिम दाखवा जो झटका पद्धतीचे मास खायला तयार होईल एकतरी .. पळपुटा उत्तरे नकोत .. जर माझा हिंदू धर्म मुसलमानाच्या हातचे खाल्याने बुडत नाही तर त्याला उलटे का वाटतेय ? होऊनच जाऊद्या सर्वधर्म समभाव आता प्रश्न "व्ययक्तिक वैगरे काही नाही " रोख ठोक
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 09:34 नवीन
रोखठोक होऊन जाऊद्या म्हणजे?
आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ?
जेथून हि चर्चा सुरु झाली त्यात मुक्त विहारी ह्यांनी भाजपात लोक येत आहे हे हिंदू एकीकरण होते आहे असे ते म्हणाले त्यावर माझ्या प्रतिक्रिया होत्या.. आता मला सांगा.. तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय.. तर bjp हिंदू वर राजकारण करते म्हणतात वगैरे प्रश्न तुम्ही मला का विचारताय? मी म्हणालोय का? दुसरे काँग्रेस ने राष्ट्रवादी ने काय केले.. अहो त्यांनी शेण खाल्ले म्हणुन bjp ने पण खाल्ले पाहिजे का? हा साधा प्रश्न आहे.. मानवता वाद सगळेच मानतात असे तुम्ही म्हणता.. मग सर्व धर्म जाती मधील लोक मानव नाहीयेत का? आहेत ना? मग हिंदू एकीकरण.. मुस्लिम धार्जिणे.. दलित पँथर हे काय आहे.. मूर्ख पक्ष आणि मूर्ख जनता.. एका विरोधात बोलले कि तुम्ही दुसऱ्याला समर्थन देणारेच असले समज का? रोखठोक बोलता येणे आणि ते उग्र भाषेत सोशल मांडणे यात फरक असतोच.. असो... बाकी हलाल पद्धत चुकीची कि बरोबर हा विषय येथे का? त्यावरून जातीय राजकारण योग्य कि अयोग्य ठरते का? असे वेगळे मुद्दे मांडल्याने मुळ मुद्द्यात काही बदल होतो का? आणि सर्वात महत्वाचे.. माझे हिंदू मित्र आहेत, तितकेच जिगरी मुस्लिम मित्र सुद्धा आहेत आणि इतर धर्मीय सुद्धा.. त्यामुळे मी वयक्तिक कुठलीही जात पात धर्म मध्ये आणत नाही.. काँग्रेस चुकीची मानली म्हणुन लाथाडली.. मग bjp पण तेच करत असेल तर फक्त तो आपला धर्म आहे म्हणुन बरोबर म्हणायचे? आणि याला रोखठोक म्हणायचे? कसे आहे ना.. मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो.. असो
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/12/2021 - 13:15 नवीन
कसे आहे ना.. मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो.. मानवतावादी असल्याचा दावा आपण केला होता .. जणू काही इतर जण पण तसे विचार करत नसतील... भाजपाला पाठिंबा दिला कि लगेच तो माणूस धर्मांध झालाच असे होत नाही हो ...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 13:30 नवीन
मला एक कळत नाही, तुम्ही मला का हे सांगताय.. मी म्हणालो आहे का कि bjp ला वोट दिले म्हणजे धर्मांध? तुम्हाला वरती धर्मावर कोणी कमेंट केली ते हि सांगितले.. त्यांच्याशी मी बोलताना त्यांना मी काय बोललो त्यातील काही वाक्य तुम्ही घेऊन मला प्रतिसाद दिला.. ठीक आहे.. अहो तुम्ही जातीय वादी नाही आणि प्रगतीसाठी bjp ला वोट देताय मान्य आहे.. पण मग मी कुठे म्हंटले आहे bjp ला वोट देणारे सगळे जातीय वादि आहेत.. ज्या माणसाने वरती हिंदू एकीकरण लिहिले त्याला बोलत होतो ना मी? इतरजण मानवता विरोधात आहे मी म्हणत नाही.. पण जातीय कमेंट bjp म्हणजे आता हिंदू एकीकरण असले बोलणाऱ्याला फक्त तो bjp बद्दल बोलतोय म्हणुन काहीच बोलायचे नाही काय? तुमचे जे म्हणताय ना.. Bjp ला वोट देणारे सगळे धर्मांध नसतात.. ते माहिती आहे, आणि त्याबद्दल तसे मी कधी म्हणालोय ते सांगा.. तुम्ही इतर कोणी तसे बोलत असेल तर मला का सांगताय? आणि हेच मी पण म्हणतोय bjp ला वोट न देणारा पण काही लगेच चमचा.. नोकर.. व्यक्तीपूजक.. मुस्लिम धार्जिणा.. भ्रष्टाचार पुरस्कारता असला नसतो.. असे दोन्ही हि बाजूने जो विचार करतो तो महामूर्ख.. नालायक माणुस असेल.. त्यामुळे.. तुम्ही मी काय बोललोय त्यावरच मला बोला किंवा जबाबदार धरा.. नाही तर राहूद्या..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 13:48 नवीन
हा घ्या जेथून मी बोलायला लागलो त्या हिंदू जातीय प्रतिसादावरील माझा पहिला प्रतिसाद यात काय चुकीचे लिहिले आहे, आणि हिंदू हा येथील प्रश्न नाही सरळ बोललो होतो ना? मग जे हिंदू जातीय लिहितात त्यांना सोडून तुम्ही मला का विचारताय? मी बोललो का ते..? मुवि, हिंदू हा प्रश्नच नाहीये.. तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही.. हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का? आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का? सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही.. बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले.. यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/12/2021 - 10:29 नवीन
एक मुस्लिम दाखवा जो हलाल...
मी स्वतः शाकाहारी आहे, पण अनेक मांसाहारी जेवणावळींमध्ये सर्व प्रकारच्या आणि सर्व धर्माच्या मित्रांसोबत कित्येकदा गेलो आहे, आणि तिथे हलाल आणि झटका शब्द उच्चारले गेले नव्हते. एक मुस्लिम दाखवा जो झटका खाईल हे इतक्या आत्मविश्वासाने म्हणताय यावरून तुमचे मुस्लिम लोकांसोबत जेवण्याचे प्रसंग कमी आले आहेत किंवा तुम्ही आऊटलायर्स बद्दल बोलताय, असा निष्कर्ष निघतो. आऊटलायर्स बद्दल बोलायचे तर असेही असते- ऑफिस मध्ये कधीही अंडे किंवा मांस डब्यात आणणाऱ्या (कोणत्याही धर्माच्या) व्यक्तीला आपल्या सर्कल मधून शक्य तेव्हडे बाहेर टाकणे. ह्याच्यावरून सर्व शाकाहारी लोकांबद्दल मत प्रदर्शन करणे योग्य आहे काय ? वरील प्रकार खूप वेळा पहिला आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/12/2021 - 12:23 नवीन
मी अनुभवावरून बोलतोय दुबई, मराठी भाषिक मुस्लिम ऑस्ट्रेलियात : अफगाणी कामगार मित्र , लेबनीज अनि इरनि , भारतीय हैद्राबादी मुस्लिम लगेच ते "आऊटलायर्स " वा ! शब्धशा अर्थ घेताय असलतील काही मुस्लिम ज्यांना फरक पडत नसेल किंवा बाहेर काही पर्याय नसेल .. पण जगभर " हलाल इकॉनॉमी आणि त्याचा इतरांवर दबाव " यावर पहा आणि मग विचार करा बहुसंख्यान्का "हालचालच " लागते .. तेवढे संकुचित हिंदू मांसाहारी नसतात, किंवा आपल्यास्तही लागेचच तो "धार्मिक प्रश्न सहसा होत नाही " एवढेच माझे म्हणणे होते एक उदाहरण आपण हिंदूंवर एवढा धार्मिक पगडा नसतो ... आपण सहिष्णू आहोत याचे अजून काय उदाहरण द्यायचे ? येथे शाकाहारी मांसाहारी याचा काही संबंध नाही २ मांसाहारी लोकांबद्दलच चाललंय
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/12/2021 - 07:55 नवीन
एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार..
ग वि बेहरेंच्या सोबत या साप्ताहिकात, "Hindus are most gullible people" अशा अर्थाचे लिखाण कुणीतरी करायचे त्याचा प्रत्यय हे शहामृगी वाक्य वाचून आला. तथापि, सत्य परिस्थिती अनेक वेळा वेगळीच असते - श्रीलंकेतील एका शांतीप्रिय डॉक्टराचे प्रकरण माहित असेलच. शांतीप्रिय नसलेल्या सुमारे चार हजार स्त्रियांना वंध्य करण्याचा तो प्रकार होता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 09:42 नवीन
या उदाहरणावरून तुम्ही समस्त जातीला दोष देणार आहात काय? त्या डॉ ला अटक झाली..मग न्यायालयाने पुर्ण जातीला नष्ट केले पाहिजे असे म्हंटले आहे का? आणि तसे करणे आणि मानणे योग्य आहे का? उद्या एखादा हिंदू गुन्हेगार असेल तर समस्त हिंदू.. तुम्ही आणि आम्ही गुन्हेगार असता का? आणि तुम्ही जे वाक्य ठळक केले आहे ना, ते म्हणजे मला म्हणायचे आहे, माणुस कर्तव्य पार पाडताना जात पात बघत नाही.. आणि राजकारण करताना असे फुट का? असो.. ७७ मध्ये किती मुळ भाजपा चे लोक आहेत ह्या साध्या प्रश्ना नंतर इतके ऊत्तरे देत बसावे लागतेय.. पार हिंदू.. मुस्लिम.. कुराण फलाना.. म्हणजे येथिल लोक भाजपा विरोधात बोलले तर कसे स्वैर बोलून मुद्दा भरकटावतात हे नविन नाही.. असो..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/12/2021 - 14:21 नवीन
या उदाहरणावरून तुम्ही समस्त जातीला दोष देणार आहात काय? आपण हे जरी देशमुख यांना विचारले असले तरी मी प्रतिसाद देतो आपण हे जरी देशमुख यांना विचारले असले तरी मी प्रतिसाद देतो १) असे सरसकट सगळ्या धर्माला १०० % दोषी ठरवायचे नसते एवढे मला वाटते सगळ्यांनाच कळते ... ( परत तुम्ही जातीला असे का म्हनता कोण जाणे ?मुस्लिम / ख्रिस्ती = धर्म , क्षत्रिय = जात ... असो ) लोक जेव्हा उदाहरण देतात तेव्हा पॅटर्न दाखवणे ( कल दाखवणे ) हा असतो ते समजून घ्या जरा २) "सर्व मुस्लिम काही आतंकवादी नाहीत पण संख्येने बघितले तर आतंकवाद्यात मुस्लिम खूप आहेत " हे आपण वाचले असेल ३) जगातील अनेक धार्मिक भांडणे घ्या .. त्यात साधी संख्या मोजा, कि हिंदूंची किंवा बौद्ध किंवा शीख लोकांची अशी किती देशात आणि किती जणांशी भांडणे आहेत आणि त्याच्या तुलनेने मुस्लिम धर्मियांची किती देशात आणि किती जणांशी भांडणे आहेत ... ? साधे उदाहरण घ्या - ख्रिस्ती ब्रिटिशांनी हिंदू आणि इतर भारतीयांवर जुलुमी राज्य केले म्हणून आजमितीला किती हिंदू आणि किती शीख आज जगभर ब्रिटनच्या किंवा जगातील एकूणच क्रिस्टी लोकांची कत्तल करीत सुटलेत ? - जपानी ( बुद्ध / शिन्तो) लोकांचे अमेरिकेशी ( ख्रिस्ती ) एवढे भांडण झाले आज किती जपानी लोक अमेरिकेत जाऊन ९/११ करतात ? - आता हाच तर्क मुस्लिमांचे इतर सेकुलर देशातील वागणे / भांडणे आणि सतत चा जिहाद याची संख्या बघा ... "मजहब नही सिखाता आपस में बैर रखना" ... हे अगदी नागपूरच्या हेड क्वार्टर ला पण हे माहित आहे .. पण सतत " हमारा मजहब खतरे मी है " हि आरोळी ऐकण्याचा आणि त्याचा पाठपुरावा ऐकण्याचा अगदी कंटाळा आला आहे आणि खास करून डोळे झाकलेल्या हिंदूंकडून ! बर हे काही फक्त बहुधर्मीय भारतातातच नाही तर इतर बहू धर्मीय आणि बहू वर्णीय देशात पहिले आहे ... उगाचच कोणाला शेंड्या लावताय ... "जेथे जातो तेथे तू माझा संगती" या वाक्यप्रमाणे "प्रेमळ धर्माच्या " लोकाची संख्या जमली कि ... आधी हलाल + देश आधी कि धर्म आधी असे विचारले कि एक तर गुळमुळीत उत्तर नाही तर धर्मच हे उत्तर ( मग लेको बहुधार्मिक देशात जाता कशाला राह्यला ??? सौदी आणि मलेशियात आहेत चांगले जीवन ... बोटी भरून का येता "ख्रिस्ती बहुधार्मिक ऑस्ट्रेल्यात " जिथे एक देश एक कायदा आहे ... मग त्यात ख्रिस्ती धर्माचा पगडा असला तरी माझ्या सारख्या अल्पसकनख्यांक हिंदूला फार त्रास वाटत नाही .. कारण माझ्यसाठी देश आधी मग धर्म ... माफ करा कोणाला हा प्रतिसाद विखारी वाटला तरी चालेले किंवा त्यामुळे कोणी मला मिपावरून उडवणार असले तरी चालेल... कंटाळा आलाय या बोटचेप्या गांधीगिरी, गोल गोल जिलंबाय पडणाऱ्यांचा... एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/12/2021 - 16:23 नवीन
एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...
पवित्र पुस्तकाचा सारांश!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 05/12/2021 - 18:16 नवीन
एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ... मिपावरचा "त्यांच्या" बाजुने लिहीलेला प्रतिसाद दाखवुन स्वतःला वाचवता येईल काय?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/12/2021 - 11:25 नवीन
वरील बातमी ज्या वृत्तपत्रात आली आहे, त्यांनी कोणत्याही आधाराशिवाय आरोप केला आहे. पोलीस आणि हॉस्पिटल मधून मिळालेल्या महितीवरून, इतकेच आधार आहेत, कोणते हॉस्पिटल आणि पोलीस सांगितले नाही. सदर डॉक्टर आणि परिवाराने गुन्हा अमान्य केला आहे. कोर्टाने इसमास बेल दिली आहे. त्यापुढे, श्रीलंका CID ला कोणताही पुरावा सापडला नाही आणि कोर्टात दिलेल्या रिपोर्ट नुसार CID म्हणते-
"There is no justification for the arrest of Dr. Shafi," the CID concluded in a 210-page report.
विखारी लोकं असल्या बातम्यांनी उत्फुल्लीत होऊन follow up ना घेता तेच तेच उगाळत राहतात. https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/world-news/doctor-arrested-for-sterilising-women-in-sri-lanka-was-framed-probe-2064837%3famp=1&akamai-rum=off https://www.google.com/amp/s/mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1T71HS https://mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1UK2SN
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/30/2021 - 14:30 नवीन
Agra: ANM Niha Khan found not injecting Covid-19 vaccine after inserting needle, FIR to be filed for throwing away loaded syringes ही शांतीप्रिय महिला कर्मचारी, रुग्णांना कोविडची लस देताना केवळ सुई टोचायची आणि लसीचे औषध तसेच डस्टबिन मध्ये टाकून द्यायची असा आरोप आहे. असे करण्यामागची प्रेरणा भारतभूमीवर शांतता पसरवणे हीच आहे नाही का? अर्थात, भारतीय प्रजासत्ताकात, प्रत्येकाला स्वतःची प्रार्थनापद्धती (religion) पाळण्याचे स्वातंत्र्य आहे! उत्तरदायित्वास नकार लागू.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 05/31/2021 - 10:38 नवीन
कठोरात कठोर शिक्षा झालिच पाहिजे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/08/2021 - 15:05 नवीन
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://quranicquotes.com/wp-content/uploads/2014/10/marathi-quran-full-translation.pdf&ved=2ahUKEwi875rgkbrwAhXVzTgGHRFsBKkQFjAEegQIFhAC&usg=AOvVaw0Xy6jXsK_h-NlYS3Ur1kGM कुराण नक्की वाच ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/11/2021 - 05:15 नवीन
मी सत्यनारायण कधी वाचला नाही.. तेथे कुराण वाचला का किंवा वाच हा काय प्रश्न किंवा सल्ला आहे? आणि न वाचता हि मी सांगतो.. बायबल, कुराण, गीता.. कुठलेही ग्रंथ असुद्या माणुसकी हाच धर्म श्रेष्ठ मानला असणार..आणि जर त्या ग्रंथाचे माणुस आणि माणुसकी हा गाभा नसेल तर धर्म आणि जात इतकेच त्याचे मुळ असेल तर असल्या सर्व ग्रंथाना वाचण्यात वेळ घालावण्यात काय अर्थ आहे? असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत.. वाईट माणसे हि माणुसकी ला काळिमा असतात.. मग ती कुठल्याही जाती धर्माची असुद्या.. मुळ मुद्दा.. एक सहज प्रश्न विचारला होता..७७ मध्ये मुळ भाजपाई किती.. त्यावरून पार इतके अवांतर.. अवघड आहे..
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/11/2021 - 07:36 नवीन
असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत.. तुमच्याबाबत विषयच नाही चिंतेचा... प्रश्न हा आहे जे असे ग्रंथ वाचतात व भेदाच्या भिंती मनात, देशात, समाजात उभ्या करतात मग ते कोणतेही धर्मीय असो त्यांना काउंटर करायचा कृतीकार्यक्रम तुमच्याकडे आहे का ? निव्वळ तुम्ही योग्यपणे जगत आहात त्याबद्दल गुन्हेगारी प्रव्रुत्तीचे लोक तुमच्या नादाला लागणार नाहीत असा तुमचा समज आहे का ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/11/2021 - 07:55 नवीन
Hello, नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत.. ---- समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.. उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र घेऊन फिरत असेल तर आपण हि शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय.. पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते. मी रस्त्यावर गाडी व्यवस्तिथ चालवत असेल तर रस्त्यावर इतर काही जण व्यवस्थित चालवणार नाही म्हणुन मी माझी स्व रक्षण करण्यास काय करेल हे माझ्या पाशी आहे.. बेल्ट लावणे.. हेल्मेट घालणे वगैरे.. पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक.. गुन्हेगार हा कुठल्या हि जातीचा धर्माचा असु शकतो.. तुमच्या कडे त्याला काउंटर करायचा पर्याय नसेल तर त्याला गुन्हेगार नजरेतून बघणे हा काउंटर आहे का?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/11/2021 - 08:02 नवीन
पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते. असं म्हणता ? असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय.. मंग आस्स कस्सं करता ? माझे मत काय त्याचा आशय काय याची खात्री तुम्हास नाही तरीही तुम्ही.... पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक.. सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/11/2021 - 08:26 नवीन
उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र घेऊन फिरत असेल तर आपण हि शस्त्र घेऊन फिरले पाहिजे तुम्ही शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे नव्हे पण उद्या तो तुमच्या फिरण्यावर निर्बंध घालू लागेल तेंव्हा तुम्ही त्याला गांधीवादी सदाचाराचे धडे शिकवणार आहात का? आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय काम? अशा विचाराच्या वृत्तींनी लष्करी उत्पादनाच्या कारखान्यात( ऑर्डेनन्स फँक्टरी) मध्ये शस्त्रास्त्रांऐवजी एस्प्रेसो कॉफी मेकर बनवायच्या ऑर्डरी दिल्या आणि चीनच्या युद्धात दयनीय अशी हार झाली हा इतिहास आपण विसरला असाल तर स्वा.सावरकरांचे "सन्यस्त खङग" हे नाटक जरूर वाचून पहा. बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/11/2021 - 08:35 नवीन
येथे खुप चिंचोळे प्रतिसाद होत आहे म्हणुन उत्तर separate खाली देतोय
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/11/2021 - 08:55 नवीन
तुम्ही शस्त्र घेऊन फिरले पाहिजे असे नव्हे पण उद्या तो तुमच्या फिरण्यावर निर्बंध घालू लागेल तेंव्हा तुम्ही त्याला गांधीवादी सदाचाराचे धडे शिकवणार आहात का? स्व संरक्षण हवेच.. पण जो अत्याचार करील त्याच्या विरुद्ध.. मग तुम्ही bjp ला वोट देऊन त्याचा बिमोड करणार आहे काय? मग पुढील शस्त्र धारी हा कुठल्या जातीचा असतो हे तुम्हीच ठरवून त्याच्या पुर्ण जातीला च बदनाम ठरवणार आहे काय? जो हिंसा भडकवेल तो चूक कि त्याची पुर्ण जात आणि धर्म? जातीय म्हणुन bjp ला वोट द्यायचे कि प्रगती साठी.. अच्छे दिन म्हणुन? नक्की काय ते ठरवा.. डॉ. साहेब.. तुमच्या कडे येणारा पेशंट हिंदू आहे का मुस्लिम यावरुन तुम्ही नक्कीच इलाज करत नसताल.. माझे हि तेच म्हणणे आहे पुढील व्यक्ती हा गुन्हेगार आहेच हे आपण फक्त त्याच्या धर्मावरून का ठरवायचे?
आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे.
पण आपण शाकाहारी असलो आणि समोरील माणुस मांसाहारी असला तरी समोरील माणुस मला खाणार नाही हे तर नक्की आहे ना? आपण माणसां बद्दल बोलतोय.. जंगली प्राण्याबद्दल नाही..
बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.
मी १००% अहिंसेचा पुरस्कारता नक्कीच नाही.. पण हिंसा हा एकच पर्याय प्रत्येक वेळेस आपल्याकडे आहे काय? अराजका विरुद्ध.. गुन्हेगारा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.. वेळ प्रसंगी त्याच्या शी दोन हात केले पाहिजे.. पण समोरचा गुन्हेगारच आहे हे फक्त त्याच्या जाती धर्मा वरून ठरवायचे.. आणि त्या साठी bjp ला हिंदू एकीकरण करतायेत म्हणत पाठपुरवठा करायचा हे मला चूक वाटते.. Bjp अजून ७० वर्षे राज्य करो.. मला आनंद आहे.. पण हिंदू मुस्लिम.. वगैरे मुद्द्यासाठी नाहि तर प्रगती आणि उन्नती साठी त्यांनी झटले पाहिजे आणि समर्थकांनी त्या साठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे... आणि ते जर तसे करत नसतील तर असल्या लोकशाही म्हणजे तुमच्या माणुसकीची बोळवन करण्यास जन्माला आल्या आहेत काय?
स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय काम
अहिंसक विचार असणाऱ्यांचे हे मत असते असे तुम्ही सरसकट कसे म्हणू शकता? मला लष्कर महत्वाचे वाटते.. तुम्ही चुकीच्या गोष्टीत सरसकट लोकांना का तोलता? आणि सिंह, किंवा लष्कर असे मुद्दे भाषेचे सामर्थ्य वापरवून मुळ मुद्दे divert का करता? शक्यतो कोणी म्हणत नाही कि सिंह मला खाणार नाही.. किंवा लष्कर गरजेचे नाही..हे मुद्देच नाहीयेत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/12/2021 - 06:27 नवीन
मुसलमान व्यक्ती आणि गट यांच्या वागण्यात फार मोठा फरक आहे. जगभरात जेथे जेथे मुसलमान बहुसंख्य झाले आहेत तेथे फुटीरता वाद धर्मांधता वाढीस लागते हा जगभरचा गेल्या १५ शतकांचा इतिहास आहे. हिंदू मुळात सहिष्णू आहेत याचा कायम गैरफायदा घेतला गेला आहे. भाजपला मी सरसकट पाठिंबा देत नाही पण ७० वर्षे काँग्रेसने मुसलमानांचा एक व्होट बँक म्हणून वापर केला आणि शाहबानो प्रकरणात आम्ही संख्याबळावर भारताची घटना बदलून घेऊ शकतो हा एक दंभ आणि फाजील आत्मविश्वास तयार झाला होता त्याला विरोध म्हणून राम जन्मभूमी आंदोलन सारख्या गोष्टींना पाठिंबा मिळत गेला. आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे. हा कायदा किंवा तीन तलाक वर बंदी सरसकट कुटुंब नियोजनाचा कायदा का अस्तित्वात येऊ शकला नाही याचा मूलगामी अभ्यास केला तर त्याच्या मुळाशी ही व्होट बँक आहे. जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो. बाकी भाजप किंवा मोदी हेच १०० टक्के बरोबर असे माझे अजिबात मत नाही. परंतु सद्यस्थितीत सर्वात चांगला आणि निर्णयक्षमता असणारा पक्ष म्हणजे भाजपच आहे आणि सध्या तरी त्याला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे. समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी काय करता येईल याचा ठोस उपाय सुचवता येतो का ते सांगा अन्यथा आपले गुळगुळीत युक्तिवाद चालू द्या आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही. ( माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच). अंतिम सत्य इ काथ्याकुटात मला अजिबात रस नाही
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/12/2021 - 07:00 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 05/12/2021 - 07:11 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 05/12/2021 - 07:19 नवीन
नेहमीप्रमाणेच डॉ. खरे एकदम 'बँग ऑन स्पॉट' आहेत.
  • Log in or register to post comments
य
यश राज Wed, 05/12/2021 - 07:25 नवीन
प्रतिसाद पटला.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/12/2021 - 07:33 नवीन
पूर्ण प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 05/12/2021 - 07:34 नवीन
सडेतोड प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 05/12/2021 - 07:51 नवीन
हा स्ट्रेट ड्राईव्ह आवडला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 09:46 नवीन
उत्तर separate प्रतिसादात देतो, येथे खुप निमूळते झाले आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 10:08 नवीन
@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद निमूळता झाल्याने येथे देतोय ) -----
आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.
आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही.. सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि.. घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही.. पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे.. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता.. मग निवडून आल्यावर काय केले.. बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय? मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही? का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का? अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना.. आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे.. उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो.. काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही.. असो..
आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)
प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो.. तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल... एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत.. आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले... तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून.. असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो.. तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या.. पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही.. समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/12/2021 - 10:10 नवीन
खाली हा प्रतिसाद पुन्हा दिलाय
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/12/2021 - 11:00 नवीन
समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही. मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण; ३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते. पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये. तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय. सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय. थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय. समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत तर भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्‍या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/12/2021 - 14:32 नवीन
समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी काय करता येईल याचा ठोस उपाय सुचवता येतो का ते सांगा अन्यथा आपले गुळगुळीत युक्तिवाद... सडे तोड ,शतप्रतिसद सहमत .. डॉक्टर तुम्हाला एक ग्लास फुल्ल सोलकढी आणि मिसळ प्लेट लागू आपल्या कडून - कारण भाजपचं आयटी सेल च्या पगारात तेवढेच परवडणार आपल्याला !!!) एकवेळ वारीस पठाण परवडला पण हे गुळगुळीत आत्मघातकी " गांधीगिरी " वाले नकोत ... एवढेच बोलतो आणि माझे शब्द थांबवतो... लै कावायला होत बघा ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/11/2021 - 08:29 नवीन
Hell o, गणेशा तुम रेहना संग हमेशा... कट्टा कधी करायचा ते बोला साहेब नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत.. आशा करतो हा तुमचा शेवटचा प्रतिसाद नसवा, आणि तुमचे विचार्/कवीता आमास्ने भरभ्रुन वाचायला मिळुदेत...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/11/2021 - 08:32 नवीन
सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?
याचे उत्तर द्या ना तुम्ही.. अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे? आणि पूर्णपणे पुढच्यांचा नायनाट कसा करायचा हे बघायचे? सांगा तुमचा काउंटर काय? माझे उत्तर एकच आहे.. खातरजमा झाली असेल तर ते सगळे पुरावे न्यायालयात दाखवून कारवाही करावी..खातरजमा व्हायला पुरावे पण हवे ना.. कि पुढून येणारी गाडी मला उडवनारच आहे हे म्हणुन त्याला गुन्हेगार मानणे म्हणजे काउंटर आहे का? असो थांबतो.. तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय.. उगाच इतर चर्चा करण्यात अर्थ नाही आणि वेळ हि वाया घालवू नये असे वाटते.. वयक्तिक घेऊ नये
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 05/11/2021 - 08:41 नवीन
याचे उत्तर द्या ना तुम्ही.. अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे? उत्तर मी का द्यावे स्वतःच शोधा की ही सवय का बरे लागली ? कारण शांतताप्रीय गाडीवाल्यांनी धडका देउनही त्याना साधा जाबही विचारला गेला नाही म्हणूनच ना ? आठवा मुंबै वेठीला धरल्याबद्दल काय कारवाइ झाली ? आता असे म्हणून नका सुमडीत कारवाइ झाली आम्ही ते जाहीर करत नसतो... वगैरे . थांबतो.. मी कोण आडवणार ? तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय.. तसे असे तर तुमच्याशी चर्चा का केली असती ? मला तुम्हे चर्चा करणे अपेक्षीत आहे कारण मी शॅलो इंटरेस्टचे गोल गोल राणी प्रकरण करत नाही मला मुलभुत गोश्टींवर नेमकी व कमी श्ब्दात चर्चा करायला आवड्ते
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/08/2021 - 05:09 नवीन
३४ पक्ष बद्दलणाऱयांपैकी पैकी १३ जणांना तिकीट मिळाले. आणि १३ पैकी फक्त ४ जिंकले. https://www.businessinsider.in/politics/elections/news/final-tally-of-suvendu-adhikari-mukul-roy-rajiv-ghosh-and-other-ex-tmc-leaders-who-fought-on-bjp-ticket/amp_articleshow/82354609.cms
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/12/2021 - 14:43 नवीन
म्हणजे हे म्हणणे बरोअबर होईल का कि ७७ पैकी ४ जणच मूळचे भाजप वाले नाहीत? तसे असेल तर एकूण ३ वरून ७३ वर गाडी नेली हे हि नसे थोडके आणि ते सुद्धा ३०% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यात ... पण हे कोणी कबुल करणार नाही बहुतेक . कारण मग फॅशिष्टांची थोडी तरी जीत झाली असे म्हणल्यासारखेच होईल नाही का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 4 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 7 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा