Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

श
श्रीगुरुजी
Mon, 04/12/2021 - 06:06
🗣 271 प्रतिसाद
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/ दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61811 views

🗣 चर्चा (271)
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/13/2021 - 15:44 नवीन
ही आत्मप्रौढी आहे.उध्दव ठाकरे हे फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम राज्य कारभार करत आहेत. त्यांचा संयमी स्वभाव आणि काम करण्याची ईच्छा ही फडणवीस पेक्षा किती तरी उत्तम आहे. -- बस कर पगले ! अब रुलायेगा क्या ? तुही सच्चा 'वडापाव' सैनिक है. :))
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/13/2021 - 15:57 नवीन
आणि गंमत म्हणजे काहीही झाले तरी आपल्या पक्षाचे किंवा नेत्याचे अमुक एक चुकले याविषयी चकार शब्द यांच्या (आणि आप समर्थकांच्या) तोंडातून बाहेर कधी पडायचा नाही. आणि हेच लोक इतरांना 'भक्त' वगैरे सर्टिफिकिटे वाटत फिरत असतात.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/13/2021 - 17:47 नवीन
आधी असल्या लोकांचं हसू यायचं आता तेही येत नाही. हास्यास्पद च्या पलीकडे काही असतं तिकडे पोहोचले आहेत. कधीही तथ्यांवर आधारित न बोलणे, स्वतःचा बायस लाळघोटेपणाच्या पलीकडे पोहोचलेला असताना दुसऱ्याला अंधभक्त वगैरे संबोधणे, कोर्टात नाचक्की झालेली असतानाही अजून आरोप आहेत असं एक बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाने निर्णय दिलेले असतानाही दोषी धरणे, टिपीकल आहे हे सगळं. कधी कधी वाटतं सगळ्यात चांगला मार्ग दुर्लक्ष करणे आहे पण खोटी माहिती रेटून पुढे ढकलणे चालू असते म्हणून केव्हातरी उत्तर द्यावेच वाटते. ************** शेवटी काय भक्ती ही स्वतःच्या इच्छेने केलेली असते, पण गुलामगिरी मात्र मजबुरी मधून येते. त्यामुळे गुलाम होण्यापेक्षा भक्त होणे केव्हाही चांगले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 16:16 नवीन
+१. शिवाय ऊत्तम मंत्रामंडळ आहे. पुरात दात दाखवत सेल्फ्या घेणारे सत्तेत नाहीत हे पवारांच्या कृपेने राज्यावर झालेले ऊपकार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 16:32 नवीन
तुम्ही पण पळपुटे निघालात
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/13/2021 - 16:47 नवीन
छगन भुजबळ - भ्रष्टाचारामुळे २ वर्षे तुरूंगवास, सध्या जामिनावर बाहेर नबाब मलिक - शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे मुर्दाडांचे नेते आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. पूर्वी भ्रष्टाचारामुळे मंत्रीपद सोडावे लागले होते. धनंजय मुंडे - दुसऱ्या महिलेबरोबर संबंध, बलात्काराचे आरोप संजय राठोड - दुसऱ्या महिलेबरोबरील संबधातून महिलेची आत्महत्या, मंत्रीपद सोडावे लागले. अनिल देशमुख - खंडणीच्या आरोपांमुळे मंत्रीपद सोडावे लागले. हसन मुश्रीफ - २६/११ चा हल्ला संघाने केल्याचे खोटे आरोप केले. बच्चू कडू - सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याने एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा, सध्या जामिनावर बाहेर. उद्धव ठाकरे - शून्य निर्णयक्षमता, १३ महिने घरातून बाहेर पडले नाहीत. वर्षा गायकवाड - सर्व परीक्षा सातत्याने पुढे ढकलणे एवढेच निर्णय घेतले, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण वर्ष वाया गेले. आव्हाड - टीकाकारांना घरी पकडून आणून बेदम मारहाण केली. __________ ऊत्तम मंत्रामंडळ !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 16:53 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद ...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 16:59 नवीन
ह्यातील बहुतांश आरोप आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर निघालो नाहीत ही खुपच चांगली गोष्टय. दो गज की दुरी रखे असं टीवीवर सांगून बंगालात लाखोंच्या सभा घेणार्यांमधले ते नाहीत ह्या बद्दल राज्यातील जनतेला गर्व वाटतो. कृतीतून सिध्द करनार्यातील आहेत. आणी वराल काही ऊद्या भाजपात आले की पावन होतील. ठाकरेंनी युती साठी हात पुढे केला की तेच कर्तृत्वशुन्याचे कर्तृत्ववान होतील : ) सर्व सत्ते भोवती फिरतं. भाजपाला जनतेशी नाहीतर सत्ते शी घेणेदेणे असते. त्यामुळे विरोधात बसवले पवारांनी तेच योग्य केले. राज्यात जनहिताचे सरकार आहे म्हणून ऊत्तम सुविधा मिळताहेत. नाहीतर कोल्हापुर चा पुर ऊदाहरणासाठी आहेच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 17:28 नवीन
शाब्दिक बुडबुडे
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/13/2021 - 17:02 नवीन
उत्तम कामे आहेत.. बाकी महामहीम मुख्यमंत्र्यांच्या नावासमोर अजुन एक काम लिहायचे राहिले.... "गोल गोल बोलबच्चन देणारे फेबु लाईव्ह करणे आणि सभागॄहात दसरा मेळाव्याचे भाषण वाचणे."
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 17:22 नवीन
प्रधानसेवक हवं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 17:30 नवीन
राज्य सरकारने केलेली जनहिताची कामे सांगीतलीत तर फारच उत्तम... उगाच, शाब्दिक बुडबुडे सोडत बसू नका...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/13/2021 - 17:44 नवीन
प्रधानसेवक कधीही दसरा मेळावा वगैरे घेत नाही हो...ते माननीय महामहीम उद्धवरावांचेच काम...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 17:47 नवीन
त्याना मेळावा घेण्यासाठी वेळ,काळ,स्थळ,सण कसलंही बंधन नसतं. मित्रो.....
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/13/2021 - 17:49 नवीन
मित्रो नाही हो....बंधुभगीनींनो....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 17:54 नवीन
अगदी डोंगर, दर्या, बोगदे ह्यांनाही हात हलवून अभिवादन करतात तें
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/13/2021 - 17:57 नवीन
निदान तेवढे तरी फिरतात ते...इथे तर....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 18:28 नवीन
तुम्ही ह्या सरकारने केलेल्या कामाची यादी कधी देणार आहात?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/13/2021 - 18:54 नवीन
जरा कळ काढा. एकदोन कामे तर करू देत. ती केली की लगेच यादी देणार.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 09:45 नवीन
केंद्रीय उद्योगपती धार्जिणे सरकार शेती व्यवसाय चे संघटित उद्योगात रूपांतर करण्याचे प्रयत्न करत आहे .म्हणजे एक हाती शेती व्यवसाय वर सत्ता गाजवता येईल आणि गोरगरीब शेतकऱ्यांना गुलाम ,नोकर बनवता येईल. हा उध्येश आणि एकहाती सत्ता निर्माण झाली की मध्यम वर्गीय,नोकरदार ह्यांना कधी ही कसे ही पिळून काढता येईल. येईल त्यांना अनुभव काही वर्षातच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 09:52 नवीन
तुम्ही पळपुटेपणा करता... 1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/12/2021 - 09:51 नवीन
Mumbai: mid-day investigation jolts BMC into action, probe ordered against fliers who escaped quarantine -------------------------------------------------------------------------------------------- Blame game ensues after Mid-Day finds BMC officials at Mumbai airport took bribes from international passengers to allow escape from mandatory quarantine आपल्या महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या अनेक कारणां पैकी एक ! खा साल्यांनो पैसे खा, लोकांचे आयुष्य खा... :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati Badi... :- Sunny
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 09:55 नवीन
राज्य सरकार उत्तम काम करत आहे ...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Mon, 04/12/2021 - 10:09 नवीन
१०० कोटी मिळण्याचा एक मार्ग बंद झाला...आता इतर मार्ग शोधायला नको का?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 04/12/2021 - 10:32 नवीन
आता पावसाळ्याआधी नालेसफाईचे टेंडर निघतील ना BMC चे. लाखो रुपयांचे टेंडर. एक दोन ठिकाणचे नाले सफाई करतानाचे आणि महापौर वगैरे अधिकारी पहाणी करतानाचे फोटो पण येतील. आणि मग आहेच नेमीची येतो पावसाळा आणि नाले गटारे तुडुंब.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Tue, 04/13/2021 - 03:15 नवीन
सहमत. पण फक्त लाखो रुपयांचे टेंडर? अहो शेकडो कोटींचे बोला. कारण राज्यातील अनेक शहरामधे हाच प्रोंब्लेम आहे. शिवाय अनेक ठिकाणी मलमुत्र विसर्जन सेवा पण चान्गली नाही तिकडे पण लक्षद्यायला हवे. यासाठी सरकारकडे पैसे नाहीत फक्त मन्त्र्यान्चे बन्गले दुरुस्त करायला आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 04/12/2021 - 12:06 नवीन
पुण्यात सकाळ पासून ससून मध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला. ऍडमिट होण्यासाठी रांग पण खाटा उपलब्ध नाहीत. रोज रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे राज्यकर्ते आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात दंग आहेत. यांना परिस्थिचे काही गांभीर्य आहे की नाही? पुणे आणि महाराष्ट्र सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर दिसतो आहे. वेळीच उपाय केले नाही तर कोरोना भयानक तांडव माजवेल अशी स्थिती आहे. दुसरीकडे टी व्ही वर कुंभ मेळ्याची गर्दी दाखवताहेत. पंढरपूरच्या निवडणूक प्रचाराच्या सभा गर्दीत होताना दिसताहेत. बंगालमधल्या प्रचंड सभा टी व्ही वर पाहिल्या. ही पंढरपूरची पोट निवडणूक आणि पाच राज्यातील निवडणुका निवडणूक आयोगाला पुढे ढकलता आल्या नसत्या का? की एव्हढी अक्कल त्यांनी खुंटीला टांगली आहे. बरं करोनाची एव्हढी परिस्थिती गम्भीर असताना पंतप्रधान, बीजेपी आणि इतर प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूकांबाबत काय भूमिका घेतली? त्यांनी का नाही पुढे ढकलण्याची विंनन्ती केली? काय चाललंय काही कळत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/12/2021 - 15:52 नवीन
सहमत. कुणाला गांभीर्य आहे असं दिसत नाही. जबाबदारी केंद्र अणि राज्य एकमेकांवर ढकलताहेत. राज्यात विरोधी पक्ष आहे म्हणुन केंद्र परिस्थितीचा फायदा घेतय की काय अशी शंका यायला लागली आहे. स्थानिक पातळीवर खाबूगिरी, टक्केवारी, रिग हे प्रकार सुरुच आहेत. आमच्या इमारती समोरील फुटपाथवरील मागच्याच वर्षी बसवलेल्या आणि चांगल्या असणाऱ्या टाईल्स बदलायला घेतल्यात. अशी कित्येक बिनकामाची "विकासकामे" बिनबोभाट सुरू आहेत. जिथे रस्ते पुल हवेत (पिंचिंवाडी ग्रामीण भाग) ते वर्षानुवर्षे करत नाहीत. शहरी भाग खाबुगिरी करत चकचकीत होपलेस स्मार्ट करत आहेत. या असल्या खाबूगिरीला कोण जाब विचारणार हाच प्रश्न आहे. इथे भाजपा सत्ताधारी झाल्यापासून कोणीच भ्रष्टाचाराच्याविरुद्ध आवाज उठवत नाही. बरेचसे काँगीवाले आता सत्ताधारी बनले आहेत. फक्त पक्ष बदलला. मंडळी तीच आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 04/12/2021 - 17:38 नवीन
सगळीकडे नुसते राजकारण चाललेय. जनतेचे मात्र हाल होत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/12/2021 - 12:23 नवीन
चालु घडामोडीतील मथळ्यातील. शेतक-यांच्या आंदोलनाची धग कमी होत आहे, ते सध्याचा करोनात्सव पाहता, टेंट रीकामे पडणे हे साहजिकच आहे, तरीही बातमीतील '' सध्या येथे ३०० -४०० आंदोलनकर्ते राहीले आहेत, त्यातील १०० शेतकरी आसपासच्या गावातील आहेत, जे येऊन जाऊन असतात'' ही गोष्ट चिवटपणाची साक्ष देणारी गोष्ट वाटली, शेतक-यांच्या लढावू बाण्याचं आपल्याला सुरुवातीपासून कौतुक वाटले आहे. आत्तापर्यंत दोन-तीनशे शेतक-यांना आपले प्राण गमवावे लागले, मात्र केंद्रसरकारला ते फार महत्वाचं वाटत नाही. पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटते, यातून सत्ताच केवळ किती आवश्यक आहे, आणि मोदी सरकार किती सत्तेचे भूकेले आहेत, तेही दिसून येते. कुंभमेळ्याची गर्दी पाहिली (दुवा) सरकारने कितीही काहीही महत्वाचे असले तरी असे कुंभमेळे, जत्रा, उत्सव, बंद केले पाहिजेत. परवानगी देऊ नये. पण, मतांसाठी आपला एक गठ्ठा असलेल्या मतांच्या विरोधात निर्णय घेणे कठीण काम असते. सरकारच्या मर्यादा आपण समजू शकतो. मागच्या वेळी त्या तबलिकी जमातीला करोनाच्या प्रादुर्भावासाठी जवळ जवळ सर्वांनीच जवाबदार धरले होते, त्यांची गर्दी करणे हे चुकच होते. तेव्हा, एकेक हुडकून त्यांच्या संपर्कातल्यांना होम कोरंटाईन किंवा दवाखान्यात भरती केले होते, काहींवर कायदेशीर गुन्हे दाखले केले होते. कुंभमेळ्यातील सर्वच सहभागींना शोधणे आता महाकठीण काम दिसते. सुरुवातीलाच १३०० लोक करोनाग्रस्त आल्याचे बातमी म्हटल्या जात आहे, आता होणा-या प्रादुर्भांवाबद्दल कायदेशीर कार्यवाही सहभागींवर व्हायला हवी. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पुढे कमी करणे अवघडा वाटत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित होत आहे असे एकूण बातम्यांवरुन दिसत आहे. महाराष्ट्रात ठोस अशा उपाययोजनांच्या बाबतीत सध्या काही नवीन दिसत नाही, लस दिलेल्यांचे प्रमाण वाढत असले तरी वाढत्या रुग्णांवर काही उपाय ना केंद्राला सुचवता आला ना महाराष्ट्राला नवे काही करता आले, आता लॉकडाऊन करुन या वाढत्या रुग्ण संखेला किती आळा बसेल हे काळ ठरवेल. सर्वपक्षीय बैठकीत मा.फडनवीस म्हणाले की, व्यापारी, रोजगार, मजुर यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था, जनभावना याचा आदर करुन निर्णय घ्यावा. मा. फडनवीस एक महाराष्ट्राचा चांगला नेता दुर्दैवाने सत्तेच्या मोहापोटी वाया चालला आहे, असे वाटते. मा.पंतप्रधानांनी मा.मुख्यमंत्र्यांना सध्या इतर गोष्टींकडे ( म्हणजे फडनवीसांकडे) दुर्लक्ष करुन कामावर फोकस करावे असे म्हटले आहे. मा.पंतप्रधानांनी साताठ महिने जे लॉकडाऊन देशावर लादले, हजारो मजुर पायी चालून, टेंपोत बसून, गुदमरुन मरण पावले, गरोदर स्त्रीयांना पायी प्रवास करावा लागला, तो केवळ आज रात आठ बजह से, कोणता आगा न पिछा पाहता, सब कुछ बंद रहेगा असे अचानक निर्णय घेतल्यानंतर झालेले आपण पाहिले आहे, तो निर्णय घेतल्यावर अन्नाची पॉकीटं आणि पैशाची पाकीटं काही हेलीकॉप्टरमधून मजुरांच्या घरांवर, गरजुंच्या घरावर टाकली नव्हती. सध्या पंधरा एक दिवस कळ काढणे सर्वांच्या हिताचे आहे, असे दिसते. एक दिव्यभास्करची बातमी वाचनात आली गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की ५००० रेमडिसीव्हिर इंजेक्शन भाजपाच्या प्रदेश अध्यक्षाकडे सापडले. एकीकडे सर्व जनता इंजेक्शनसाठी परेशान असतांना त्यांच्याकडे एवढा साठा कसा सापडला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं '' उन्ही से पुछे'' त्यावर दिव्य भास्करने बातमीबरोबर प्रदेशाध्यक्षांचा मोठ्या अक्षरात हेडलाईन म्हणुन केवळ मोबाईल नंबर छापला, हे लै भारी वाटले. राजकारण, समाजकारण, आणि विकासाच्या बाता या आणि इतर सर्वच गोष्टींच्या बाबतीत गुजरात म्हणजे देशाचा स्वर्ग असे आपल्या माथी मारल्या गेले आहे. कालच्या एका व्हीडीयोत सुरत, भावनगर, सुरत, अहमदाबाद, या ठिकाणीही करोनाचा हाहाकार माजलेला दिसत आहे, रुग्णांची हेळ्सांड होतांना दिसत आहे, सुविधांचा अभाव दिसत आहे, अशा वेळी महाराष्ट्रालाच बदनाम केले जाते त्याचं कारण केवळ राजकीयच आहे, असे वाटत आहे. देश म्हणून सर्वच राज्यांना समान सुविधा अशा कराल काळात दिला गेला पाहिजेज. लशीच्या असमान पुरवठ्याबद्दल उडालेलेला गदारोळ पाहता, मा. मोदीसरकार इथेही राजकारणच करतांना दिसत आहे, सध्या सर्वांचीच वेळ खराब आहे. सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याची जवाबदारी पालक म्हणून केंद्राची आहेआणि दुर्दैवाने लॉकडाऊन शिवाय आजही परिस्थिती फार बदललेली नाही असेच म्हणावे लागत आहे. बाकी, आता दिवाबत्तीच्या महोत्सवानंतर घेऊन येत आहोत. 'लसोत्सव' कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा ते शिकायचं आपल्या आदरणीय पंतप्रधान यांच्याकडून. पण, गेल्यावर्षापासून करोनाची कंडीशन हाताबाहेर जात असल्यामुळे टीव्हीवर येऊन काही नवीन टास्क दिला नाही. टीव्हीवर प्यारे देशवासीयो, भाइयो और बहनो असे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले आहेत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 04/12/2021 - 13:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 13:44 नवीन
तुम्ही ह्या राजवटीने केलेली, चांगली कामे, काही सांगीतली नाहीत ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 14:01 नवीन
केंद्र सरकार महाराष्ट्र ची अडवणूक करत आहे. प्रतेक कामात आडवा पाय घालत आहे. ह्या सरकार ची काम काय विचारताय सातवे वर्ष सुरू झाले मोदी सरकार चे. काय काम केले आहे . कंपन्या विकणे, नोट बंदी सारखे उथळ निर्णय घेणे,बँका चे खासगीकरण करणे,शेती उद्योगाची वाट लावणे,धार्मिक भावना भडकवने,विरोध पक्षाची राज्य सरकार असतील तर cbi पासून सर्व केंद्रीय संस्थेचा वापर करून राज्य चालवणे मुश्किल करून ठेवणे. सकाळी पाच लाच ह्यांचे राज्यपाल गुपचूप मुख्य मंत्री पदाची शपथ देत होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 14:25 नवीन
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत.... पळपुटेपणा न करता, वरील प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 14:35 नवीन
तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत राज्य सरकार कोणालाच वाचवत नाही जसे केंद्र सरकार अर्णव ला वाचवत होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 14:38 नवीन
वरील प्रश्र्नांचे हे उत्तर नक्कीच नाही...
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Mon, 04/12/2021 - 16:50 नवीन
निम्मा महाराष्ट्र आणि निम्मा भारत रस्त्यावर हागायला बसायचा , तो बंद झालाय , तेच खूप झालं सात वर्षासाठी , सत्तरचा हिशोब एवढ्या एकाच कामावरून क्लिअर करतो ... अजून काही ,
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 17:32 नवीन
Bjp सरकार यायच्या अगोदर किती तरी संडास बांधण्यासाठी सरकार प्रोत्साहन आणि सबसिडी देत होते. सार्वजनिक संडास मुतारी बांधण्यासाठी सरकार गावांना निधी देत होते. मुंबई मध्ये किती वर्षा पासून सार्वजनिक संडास आहेत त्याची देखभाल पण सरकार च करते. मोदी आल्यावर फक्त जाहिरात बाजी झाली काम झीरो. पेयजल योजना पण खूप वर्षांपासून आहे
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Mon, 04/12/2021 - 18:54 नवीन
प्रोत्साहन दिले , सबसिडी दिली , निधी दिले ह्यात फायनल गोल अचिव्हमेंट कुठे आहे ?? उलट आलेला निधी असा लुटला कि कीर्तनकार सुद्धा म्हणाले " कडबा तर सोडाच , ह्यांनी संडास खाल्ले " पेयजल योजना जितकी झाली तितकी उत्तम झाली त्याबद्दल दुमत नाही ,
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/13/2021 - 03:16 नवीन
पळपुटेपणा किती करणार?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/12/2021 - 15:02 नवीन
मागील १७-१७ महिन्यात एकही चांगले काम केलेले नाही (खरंतर कणभरही काम केलेले नाही). विद्यार्थ्यांची पूर्ण वाट लावून ठेवली आहे. जून २०२० मध्ये होणारी ११ वी ची प्रवेश प्रक्रिया एप्रिल २०२१ मध्ये सुद्धा संपलेली नाही. आता १० वी आणि १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली. विद्यार्थ्यांचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष वाया जाणार. वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची फार भयंकर किंमत महाराष्ट्राला द्यावी लागत आहे. महाराष्ट्रात तातडीने लष्करी राजवट (ते शक्य नसेल तर राष्ट्रपती राजवट) लावणे अत्यावश्यक आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:11 नवीन
ही पण केंद्राचीच जबाबदारी आहे, असे पण काही जणांना वाटू शकते...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 15:23 नवीन
केंद्र स्वतःची जबाबदारी सांभाळा यायना ते काय ते काय राज्याची जबाबदारी घेणार. केंद्रीय सरकार मध्ये एक तरी मंत्री उच्च गुणवत्तेच्या आहे का?. कोणत्याच विषयात विशेष काहीच प्रावीण्य नसलेल्या लोकांचे केंद्रीय सरकार आहे.. ते स्वतःच, बावरलेले, आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:36 नवीन
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत... गोल गोल राणी
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/12/2021 - 15:19 नवीन
परीक्षा घेणे ऑफ लाईन शक्य आहे का. महाराष्ट्र मध्ये corona पसरायला bjp च जबाबदार आहे. कधी मंदिरात प्रवेश द्यावा सर्व नियम मोडून म्हणून आंदोलन. ऑफ लाईन परीक्षा घ्या हा अती advance सल्ला. मुंबई एअरपोर्ट वर दुनिया भर ची लोक उतरवली . चीन मध्ये corona कहर चालू होता तेव्हा पंतप्रधान झोपा काढत होते. तात्काळ विदेशी वाहतूक बंद केली नाही. CORONA बाधित देशात राहणारे प्रचंड प्रमाणात मुंबई आणि दिल्ली मध्ये उतरले आणि देशात त्या रोगाचा प्रसार झाला.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 04/12/2021 - 15:25 नवीन
पंतप्रधान आताही झोपाच काढत आहेत. जनता मेली तरी चालेल पण निवडणूका महत्वाच्या. एकंदरीत देश चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याचे परिणाम देश भोगतोय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:30 नवीन
बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन आणायला हवे होते...
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 04/12/2021 - 16:46 नवीन
ते येइल तेंव्हा येइल.... सध्या रताळ्यापासुन लस करायचा प्रयोग चालू आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/12/2021 - 15:35 नवीन
मग गोव्यात का प्रसार झाला नाही? 1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत... गोल गोल राणी.....
  • Log in or register to post comments
स
सॅगी Mon, 04/12/2021 - 16:06 नवीन
गोल गोल राणी.....
भलत्याच अपेक्षा ब्वॉ तुमच्या..अहो जिथे राज्याचे मुख्यमंत्रीच गोल गोल बोलणे टाळू शकत नाहीत तिथे त्यांचे भक्तगण तरी सरळ कसे बोलणार? लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही हे वाक्य आतापर्यंत अगणित वेळा बोलले असतील...पण ठोस निर्णयाच्या नावाने मात्र बोंब.. बहुदा कोणत्यातरी शुभ मुहुर्ताची वाट पाहत असावेत, ठोस निर्णय घेण्यासाठी. पब्लिक आपले आहे गॅसवर...आता लॉकडाऊन होतोय की काय या विवंचनेत... तरीही...
राज्य सरकार उत्तम काम करत आहे
असेच बोलायचे...नाहीतर तुम्ही लगेच "महाराष्ट्रद्रोही" ठरता.. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा