चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/
दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.
बाकी त्याच "चाणक्यांना" अहमदाबादला जाऊन कुणालातरी सलाम ठोकावा लागला म्हणे मध्यंतरी...त्याआधी १९ ऑक्टोबर २०१४ ला स्वत:हून मोदी-शहांना सलाम ठोकला होता. नंतर २९ ऑक्टोबर २०१९ ला दिल्लीत जाऊन पुन्हा मोदी-शहांना सलाम ठोकला होता. पण दोन्ही वेळा हकालपट्टी झाली. १९९९ मध्ये आव आणून सोनिया गांधींच्या विरोधात गेले होते. पण ५ महिन्यातच सोनिया गांधींंना सलाम ठोकून घालीन लोटांगण वंदीन चरण करावे लागले होते.नाही तर इतिहास उकरून कढवा लागेल आणि उत्तर देणे मुश्किल होईल.काढा उकरून. स्वत:ला कणभरही माहिती नाही हे कायमच दिसले आहे. ठाकरे सरकार अत्यंत उत्तम काम करीत आहे हे नुसते पालुपद सुरू आहे. परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही.परंतु १७ महिन्यात केलेले एकही काम सांगता येत नाही.-- जनतेसाठी केले असेल एकादे काम, तर सांगतील ना. फक्त स्वत:साठी १०० कोटी दरमाह वसुली सुरु होती, करोना काळात. जनतेची काय पडलेय या भ्रष्टवादींना. आज साडे आठला परत येणार आहे फेसबुकवर लाईव्ह, बिन कामाची बकबक ऐकायला तयार राहावे जनतेने.