Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/06/2021 - 18:50
🗣 226 प्रतिसाद
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-senior-leader-sharad-pawar-gave-advice-to-sachin-tendulkar/articleshow/80725877.cms आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50306 views

🗣 चर्चा (226)
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 09:16 नवीन
राणेंनी सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज काढले अभिनंदन
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/07/2021 - 09:26 नवीन
राणेंनी मालवणात तारकर्ली हे पर्यटन स्थळ विकसित केले आहे. अत्याधुनिक सेवा असलेले एक हॉस्पिटलदेखील चालू झाले आहे. आता रायबरेली, अमेठी मध्ये तुमच्या सो कॉल्ड राजमातेने वा राजपुत्राने काय सुविधा निर्माण केल्या ते सांगा? सत्तर वर्षे होते ना तिकडे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 09:29 नवीन
ह्यांची जाहिरात केली ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 09:32 नवीन
परवाच तुमची आठवण काढली .... आता तुम्ही एकटे नाहीत, राजेश भाऊं सारखे, जोडीदार आहेत ... आता मिपावर, प्रतिसाद-प्रतिसाद खेळू या .... तसेही मिपाकर सहनशील आहेत, आपला खेळ, ते पण Enjoy करतील ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 12:35 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-politics-amit-shah-attack-on-shivsena-uddhav-thackeray-ncp-congress-bmh-90-2396035/ सत्तेसाठी, शिवसेनेने, हिंदू मतदारांना भुलवले...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 12:40 नवीन
सिंधुदुर्ग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे तर गेले, पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत,अशा शब्दात अमित शहा यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडलं असं खोटंनाटं सांगून आम्हाला बदनाम केलं केलं आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली अशा शब्दात शहा यांनी शिवसेनावर हल्लाबोल केला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 12:42 नवीन
लेकिन हमारे पास मोदी है
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 13:01 नवीन
या दोन पक्षांनी युती करताना एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली होती याचा भक्कम पुरावा, एखादी चित्रफीत असली तरच विश्वास ठेवता येईल. दोघेही जे सांगतात ते पूर्णपणे परस्परविरोधी आहे. आम्ही सर्व जागा, सर्व पदे व सर्व जबाबदाऱ्यांचे समान वाटप करणार आहोत असे युतीची घोषणा करताना ठाकरे व शहांच्या उपस्थितीत फडणवीसांनी जाहीर सांगितले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोणाचा असणार यावर ते व ठाकरे एकही शब्द बोलले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री असेल हे शहांनी मान्य केले आहे, असे दुसऱ्याच दिवशी ठाकरेंंनी जाहीर सांगितले होते. त्यावर भाजपने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर पुढील ७-८ महिने ठाकरे व सेनेचे इतर नेते याचाच जाहीर पुनरूच्चार करीत होते व भाजप नेते गप्प होते. शेवटी मतदानाच्या जेमतेम एक आठवडा आधी, असे आश्वासन न दिल्याचे शहांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे अमित शहा जे आता जे सांगत आहेत त्यावर पुरावे नसताना विश्वास ठेवणे अवघड आहे. त्यावेळी शिवसेनेने युती करण्यासाठी अजिबात उत्सुकता दाखविली नव्हती. आपण युती करणार नाही असे उद्धव ठाकरेंनी अनेकदा जाहीर सांगितले होते. परंतु युती व्हावी फडणवीस अत्यंत कासावीस झाले होते. २०१८ मध्ये व फेब्रुवारी २०१९ पर्यंत ते वारंवार मातोश्रीवर जाऊन युती करावी यासाठी वाटाघाटी करीत होते व शेवटी युतीसाठी त्यांनी ठाकरेंना तयार केले. एकंदरीत युती व्हावी यासाठी सेना अजिबात उत्सुक नव्हती व युतीसाठी भाजपच अत्यंत कासावीस होता ही वस्तुस्थिती पाहता, त्यावेळी, निदान मोघम स्वरूपात का होईना, भाजपने सेनेला काही काळासाठी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन व इतर अनेक आश्वासने दिली असावी, असा माझा अंदाज आहे. परंतु निकालानंतर ते आश्वासन पाळण्यास भाजपने नकार देऊन काखा वर केल्याने भाजपला धडा शिकविण्यासाठी व कार्यकर्त्यांसमोर खालमानेने न जाण्यासाठी ठाकरेंनी वेगळा मार्ग धरला असावा. खरेखोटे काय हे फक्त ठाकरे, शहा व फडणवीसच जाणतात.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 13:11 नवीन
श्रीगुरुजींचा प्रतिसाद वाचोन डोळे पाणावले. स्वतःची सत्ता जाताच तडफडतडफड करणारे भाजपाचे लोक रामाच्या नावाने पावत्या फाडत गावभर फिरायचे सोडून रामकथा वाचतील तर त्यांना आणि जनतेला मनशांती मिळेल
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 13:59 नवीन
बाय द वे, तुमची मांजर कशी आहे?
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 13:13 नवीन
मोदी सरकार एक वर्ष झाल्यावर तुमि केक कापला होता नंतर 7 वर्षे झाली तरी केक नाय आला , आता एखादा होऊन जाऊदे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 13:57 नवीन
मोगा तर लापताच झाले ... सचीन उद्दाम पोटे , चंपाबाई बरोबर कुठे गेले? ते समजलेच नाही ..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/07/2021 - 13:19 नवीन
प्रेम ब्रेक झाले तरी प्रेमवीर लगेच सावरतात. इथे एकतर्फी च प्रेम आहे प्रियकर ला प्रेयसी विचारात नाही आणि हे येड गुडघ्याला बाशिंग बांधून वेड चाळ करतेय. खूप विदारक चित्र आहे.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 13:32 नवीन
ठाकरेंनी झटकन निर्णय घेऊन पद मिळवून दाखवले, ह्यांचे चाणक्य , दुसरे सरकार स्थापन झाल्यावर , पक्ष फोडून , राज्य अस्थिर करून , जनतेचा पैसा बरबाद करून पुन्हा निवडणुका घेऊन ऑपरेशन लोचट करतात , ते ह्यांना चालते. ठाकरेंनी केलेले मात्र चालत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 13:55 नवीन
चंपाबाई काय म्हणतात? जमल्यास, सचीन उद्दाम पोटे, यांना नमस्कार सांगा
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 02/07/2021 - 13:34 नवीन
काहीही झाले तरी जनमताचा अपहार करून हे सरकार सत्तेत आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसायचा जनमताचा कौल होता आणि शिवसेनेला भाजपबरोबर सत्तेत जायचा कौल होता. त्यामुळे हे सरकार गद्दारी करून सत्तेत आले आहे. जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो. तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो? समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते. पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला. उध्दव ठाकरे is an illegitimate Chief Minister. He is a usurper.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 13:54 नवीन
शिवसेनेने, हिंदू मतदारांना भुलवले
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 02/07/2021 - 17:13 नवीन
तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो?
असहमत. भाजपाने ही रातोरात राष्ट्रवादीशी युती केलीच होती कि? मग ठाकरेंनी त्यांच्याच खेळात त्यांना हरवले (वा ठाकरेंनी आपला तसा वापर करु दिला) तर बिघडले कुठे? इतर बाबतीत महाआघाडीवर कितीही दोषारोप झाले तरी रातोरात सरकार स्थापन करण्याचा उतावीळपणा करुन भाजपाचा पार्श्वभाग उघडा पडलेला आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 02/08/2021 - 16:07 नवीन
याबाबतीत सहमत. असे काहीही करण्याची गरज नव्हती. सत्तेसाठीचा हपापलेपणा यातून दिसून येतो. राज्य तर गेलंच, सोबत पत घालवून लोकांची सहानुभूती देखील घालवली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 14:33 नवीन
जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो. ठाकरेंनी तेच केले होते. परंतु त्यामुळे, ज्यांना चक्की पिसायला फडणवीस तुरुंगात पाठविणार होते, त्यांनाच क्लीन चिट देऊन त्यांच्याचबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केले. फडणवीस सत्तेसाठी सर्व नीतिमत्ता विसरून कोणाहीबरोबर जाऊ शकतात हे दिसले व आपल्याला मुख्यमंत्रीपद तर सोडाच, कदाचित ५ वर्षे विरोधात बसावे लागेल, हे सुद्धा ठाकरेंच्या लक्षात आले असावे. अशावेळी काकांनी बरोबर फिल्डिंग लावली, सेनेला पाठिंब्यासाठी कॉंग्रेसला राजी केले व फडणवीस-अजितदादांचे ओटघटकेचे सरकार इतिहासजमा केले. सेना-भाजप एकत्र आले तर आपल्याला अजून ५ वर्षे विरोधात बसावे लागेल. तोपर्यंत आपला पक्ष संपलेला असेल हे दोन्ही कॉंग्रेसच्या लक्षात आले असणार. त्यापेक्षा आपल्या तालावर चालणारे मुख्यमंत्री व सरकार आणून व त्यात महत्त्वाची मंत्रीपदे मिळवून काकांनी सर्व दृष्टीने बाजी मारली. तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो? ज्या न्यायाने भाजपने कर्नाटकात देवेगौडांंबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती, त्याच न्यायाने शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करण्याचा अधिकार मिळतो. समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते. हेच भाजपलाही करता आले असते. पण ते करण्याऐवजी भाजपने राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती करून मतदारांचा विश्वासघात केला. पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला. भाजपने राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणे हा सुद्धा जनमताचा अपहारच होता. भाजप व शिवसेना या दोघांनीही अत्यंत चुकीच्या गोष्टी करू जनमताचा व दिलेल्या आश्वासनांचा अवमान केला आहे. दोघेही समान दोषी आहेत.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 14:43 नवीन
सेनेला काँग्रेस , राष्ट्रवादी बरोबर जायचा काय अधिकार म्हणे ! स्वतः राष्ट्रवादीबरोबर गेले , ते चालले ममतादीदी राष्ट्रद्रोही आहेत म्हणून मोदीभक्त आज नाचत असतात , ह्यांच्याच वाजपेयी सरकारात ममतादीदी रेल्वेमंत्री होत्या , हे विसरतात, मायावती व बीजेपी ह्यांचीही राज्यस्तरावर युती होती
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 14:51 नवीन
2000 मध्ये बीजेपी वाजपेयी सरकारात 2009 मध्ये काँग्रेस मनमोहन सरकारात
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 15:08 नवीन
असे वाटायला वाव आहे .... त्या दीड दिवसांत काय झाले? ते कधीच समजणार नाही ... मोदी, शहा आणि डोवाल हे फार हुषार आहेत ... चीनला जेरीस आणले, तिथे काका आणि गॅन्ग, किस खेत की मुली है?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/07/2021 - 15:19 नवीन
खूपच घाबरले आहेत.शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. जे अमेरिकेला जमलं नाही ते अमित शह नी करून दाखवलं. सैन्य पण सीमेवरून चीन नी मागे घेतले अशी बातमी येईलच थोड्या दिवसात.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 16:22 नवीन
कोई आया नही कोई गया नही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 16:31 नवीन
अहो, साध्या मिपावर, मोगा, चंपाबाई, सचीन उद्दाम पोटे, इतके जण येऊन गेले ..... इतर मोठ्या प्रकरणाची गोष्टच सोडा .... बाय द वे, जागो मोहन प्यारे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 15:44 नवीन
सद्यपरिस्थितीत ४-५ शक्यता आहेत. १) भाजपने कोणत्यातरी एका पक्षातील किमान दोन तृतीयांश आमदार फोडून भाजपत आणणे व आपले सरकार स्थापन करणे. त्यासाठी कॉंग्रेसचे किमान ३० किंवा राष्ट्रवादीचे किमान ३७ किंवा सेनेचे किमान ३८ आमदार फोडावे लागतील. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच पक्षाचे आमदार फोडणे अशक्य आहे. तसेच फोडल्यानंतर आयाराम व इतरांना एकूण ४२ मंत्रीपदांपैकी किमान ३४-३५ मंत्रीपदे द्यावी लागतील. त्यामुळे हा पर्याय प्रत्यक्षात येणे अशक्य आहे. २) तीन पक्षांपैकी एका पक्षाने मविआतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करणे. कॉंग्रेस हे करणे शक्य नाही. मुख्यमंत्रीपद गमवावे लागत असल्याने शिवसेना हे करणे शक्य नाही. राष्ट्रवादीने असे करणार नाही कारण फडणवीस-मोदी-शहा यांना हाताळण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना हाताळणे खूप सोपे आहे. तसेच भाजपबरोबर गेले तर सध्या हातात असलेली महत्त्वाची मंत्रीपदे न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पर्याय प्रत्यक्षात येणे शक्य वाटत नाही. ३) शिवसेनेने मविआतून बाहेर पडून भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा सरकार स्थापन करणे. चंद्रकांत पाटील वेळोवेळी हे सांगत आहेत. असे झाले तरी मुख्यमंत्रीपद सेनेकडेच राहील. भाजपला फार तर निम्मी मंत्रीपदे मिळतील. परंतु यातून भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही व पुन्हा एकदा सेनेसमोर दुय्यम भूमिकेत वावरावे लागेल. त्यामुळे हा पर्याय प्रत्यक्षात येण्याची फारच अल्प शक्यता आहे. ४) सेनेला उपरती होऊन स्वत:हून भाजपला पाठिंबा देणे. असे होणे अशक्य आहे. ५) हे सरकार पडून मुदतपूर्व निवडणुक होणे. ही शक्यता नाकारता येत नाही. ६) ५ वर्षे हे सरकार चालून २०२४ मध्ये निवडणुक होणे. असे होण्याची शक्यता खूप कमी आहे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 02/07/2021 - 16:04 नवीन
श्रीगुरुजी, तुमचे शक्यता क्रमांक २ आणि ५ परस्पर विरोधी आहेत. जर कोणीच बाहेर पडणार नसेल तर सरकार कस पडणार. उ. प्रदेश निवडणुकीच्या आदी कॉग्रेस सत्ते मधून बाहेर पडण्याची शक्यता किती वाटते? सेने बरोबर युती केल्यामुळे काँग्रेस ला उ. प्रदेश मध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा म्हणावा असा फायदा होणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 16:25 नवीन
शिवसेनेमुळे आपल्या मुस्लिम व उत्तर भारतीय मतपेढीवर परीणाम होत आहे असे वाटले तर कॉंंग्रेस मविआतून बाहेर पडू शकते. तसंही कॉंग्रेसला या सरकारमध्ये सामील होऊन फार काही मिळालेले नाही. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवता आले, एवढेच साध्य झालंय. परंतु हे केल्यामुळे आयुष्यभर टीका केलेल्या बाळ ठाकरेंचं आणि शिवसेनेचं आता कौतुक करावे लागतेय, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे निघून गेलीये व इतर राज्यातील मतदारांवर परीणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतून बाहेर पडल्याने कॉंग्रेसचे फारसे नुकसान होणार नाही. किंबहुना नाना पटोलेंना सभापतीपदाचा राजीनामा द्यायला लावून त्यांना प्रदेशाध्यक्ष करणे हे बाहेर पडण्याचे पहिले पाऊल आहे. जशी उत्तर प्रदेशची निवडणुक जवळ येईल, तशी कॉंग्रेस बाहेर पडण्याची कारणे शोधून शेवटी बाहेर पडणार. अशा परिस्थितीत सेना-भाजप परत युती करणार नाहीत याची खात्री करूनच पवार मुदतपूर्व निवडणुकीचा पर्याय स्वीकारतील.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 02/07/2021 - 16:10 नवीन
फडणवीसांनी राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले होते तो पण जनमताचा अपहारच होता याविषयी सहमत. पण--
ज्या न्यायाने भाजपने कर्नाटकात देवेगौडांंबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती, त्याच न्यायाने शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करण्याचा अधिकार मिळतो.
हे अमान्य. कारण कर्नाटकात, उत्तर प्रदेशात जनादेश स्पष्ट नव्हता आणि त्रिशंकू विधानसभा होती. पण महाराष्ट्रात युतीला १६१ जागा मिळून पूर्ण बहुमत होते त्यामुळे कर्नाटक-उत्तर प्रदेशातील स्थिती महाराष्ट्रातील स्थितीपेक्षा वेगळी होती.
दोघेही समान दोषी आहेत.
फडणवीस-चंपांबरोबर आणखी कोणी दोषी आहे हे वाचून संतोष जाहला :)
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/07/2021 - 16:21 नवीन
करणाटकातही भाजप विरोधी पक्षांना बहुमत होते , सरकारही आले नंतर ऑपरेशन लोचट झाले ना ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 16:27 नवीन
स्वाभिमानी व्यक्तीने, नक्कीच काढायला हवा... बाय द वे, चंपाबाई कशा आहेत?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2021 - 17:27 नवीन
जनादेश नसला म्हणून कोणाबरोबरही जायची परवानगी मिळते का? भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्रीपदासाठी दोघेही भांडत बसल्याने सरकार स्थापन झाले नाही. यासाठी दोघेही समान दोषी आहेत. फडणवीस-चंपांबरोबर आणखी कोणी दोषी आहे हे वाचून संतोष जाहला :) शिवसेनेचा मी कधीच समर्थक नव्हतो. या पक्षाशी युती करून भाजपने आत्मघात केला हे माझे १९८९ पासून आजतागायत मत कायम आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 02:50 नवीन
त्यामुळेच, गेल्या वर्षा पर्यंत, युती बाबत, पाठिंबा होता ... पण, तुम्ही 1989 मध्ये जे ठरवले ते सत्य समजायला, 2019, वीस वर्षे लागली ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 02:51 नवीन
तीस वर्षे लागली ...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 02/07/2021 - 14:39 नवीन
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे हिमकडा तुटल्याने प्रचंड विनाश झाला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची बातमी आहे. त्याच वेळी तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे. दोन पुल तुटले असून दीडशे लोक बेपत्ता होण्याची शक्यता आहे. -- https://marathi.abplive.com/news/india/uttarakhand-glacier-collapse-state-govt-release-helpline-number-862972
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/07/2021 - 19:44 नवीन
हा तिन्ही पक्षांचा समान हेतू आहे.पुढची निवडणूक एकत्र लढू नाही तर वेगळी जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ येईल तेव्हा तिनी पक्ष एकत्र येवून bjp ला बाहेरच ठेवतील. नाही म्हणलं तरी शेतकरी आंदोलनाचा तडाखा bjp ल Hariyana, पंजाब ,आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये नक्की बसणार आहे. आता जे केंद्रात बहुमत आहे त्या मध्ये उत्तर प्रदेश मधील 80 जागा च जबाबदार आहेत. योगी ची हुकूमशाही उत्तर प्रदेश bjp च्या हतामधून निघून जाण्यास पुरेशी आहे. एक गुजरात सोडले तर बाकी राज्यात bjp चे भवितव्य अंधारमय आहे. त्याला कारण मोदी किंवा सरकार नसून bjp पक्षाची यंत्रणा कारणीभूत आहे. अतिशय बावळट दावे करायचे आणि त्या वर च आडून राहायचं हे bjp ल चांगलेच महागात पडणार आहे.
  • Log in or register to post comments
P
pspotdar Sun, 02/07/2021 - 21:36 नवीन
Nakki Kaa .... ???? nahitar Bihar madhye NOTA pekshasha chota hota ..... Nahi Voting % mhantoy mi
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 02:47 नवीन
हा तिन्ही पक्षांचा समान हेतू आहे.पुढची निवडणूक एकत्र लढू नाही तर वेगळी जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ येईल तेव्हा तिनी पक्ष एकत्र येवून bjp ला बाहेरच ठेवतील. .... ह्यावर सहमत आहे ... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, आपापला मतदार संघ, शिवसेनेला देणार नाहीत... नेहमी प्रमाणे, हिंदूंच्या मतदारांमध्ये फूट पडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, आपापली पोळी भाजून घेणार...गाजर मात्र, शिवसेनेला... हिंदू नेहमी प्रमाणे, जपजाप्य करत, बाबा किंवा महाराज, यांच्या मंदिरात बसणार...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 04:19 नवीन
पुढील विधानसभा निवडणुक हे तीन पक्ष युती करून लढणे अशक्य आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती नक्की होईल. भाजप-सेना किंवा भाजप-राष्ट्रवादी किंवा सेना -राष्ट्रवादी युती होण्याची सुद्धा थोडी शक्यता आहे. भाजप-सेना वेगळेच लढतील याची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच पवार हे सरकार पाडून मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावतील कारण राष्ट्रवादी-कॉंग्रेस वि. भाजप वि. शिवसेना या तिरंगी लढतीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळतील व भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची वाट लागेल. फडणवीस-चंपा जोडीमुळे भाजपवर भाजपचे बरेचसे समर्थक मतदार आधीच नाराज आहेत. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरीषद निवडणुकीत हे दिसले आहे. नेतृवबदल न करता यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने निवडणुक लढली व सेनेच्या मतांचा टेकू नसेल तर राष्ट्रवादी-कॉंग्रेस युतीसमोर यांचा निभाव लागणार नाही. परंतु सेनेशी पुन्हा युती करणे हा पुन्हा एकदा आत्मघात ठरेल. भाजपला महाराष्ट्रात टिकायचे असेल तर हे दोन्ही नेते बदलणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 04:25 नवीन
फडणवीस यांना, केंद्रीय पातळीवर न्यायचे असेल तर, भाजपला योग्य नेता महाराष्ट्रात शोधायला लागेल...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 04:25 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pmc-bank-scam-ed-seized-viva-group-property-worth-rupees-34-crore/articleshow/80741395.cms
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 11:10 नवीन
पी.एम.सी बँकेला एच.डी.आय.एल या रिअल इस्टेट कंपनीच्या डायरेक्टर्सनी पध्दतशीर धुतले. लॉक डाऊनच्या काळात महाबळेश्वरला गेलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्सच्या वाधवानचे चुलतभाऊ वाधवान या एच.डी.आय.एल कंपनीचे प्रोमोटर्स होते. त्यातील एकाला उंची गाड्या घ्यायची हौस होती. त्याला लॅम्बॉर्गिनी वगैरे घ्यायची असेल तर तो सरळ पी.एम.सी बँकेच्या डायरेक्टरला फोन करायचा आणि 'दे दो पैसा' अशी मागणी करायचा. मुख्य म्हणजे हे कर्ज डायरेक्टरला गाडी घ्यायला पाहिजे असेल तर त्याला ते वाहनकर्ज म्हणून दिले न जाता कंपनीच्या बॅलन्स शीटवर दिले जायचे आणि ते तो तिथून उचलायचा. पी.एम.सी बँकेच्या एकूण कर्जाच्या अर्ध्याहून जास्त कर्ज एकट्या एच.डी.आय.एल कंपनीला दिले गेले होते. हा रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा (खरं तर तत्वांचा) पूर्ण भंग होता. पण आर.बी.आय ला हे पकडण्यात अपयश आले त्याचे एक कारण म्हणजे सहकारी बँकांवर आर.बी.आय चे कडक पर्यवेक्षण पूर्वी नसायचे. हा प्रकार कुठेही होऊ शकेल- अगदी सरकारी बँकांमध्येही. स्कॅम १९९२ सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेट बँकेच्या सीतारामन म्हणून एका अधिकार्‍याने बँक रिसीट न घेता हर्षद मेहताला ५०० कोटी (हे १९९२ चे ५०० कोटी होते) असेच दिले. स्टेट बँकेने ते परत मागितल्यावर आयत्या वेळेस इतकी मोठी रक्कम हर्षद मेहताने कुठून उभी केली? तर ती त्याला दिली नॅशनल हाऊसिंग बँकेच्या मनोहर फेरवानींनी. ही रक्कम देऊन तत्कालीन भारतातील सर्वात ज्येष्ठ फायनान्स प्रोफेशनल्सपैकी एक असलेल्या फेरवानींनी आपले ३०-३५ वर्षांपासून कष्टाने उभे केलेले नाव गाळात घालवले. बिचार्‍याने त्यात हाय खाल्ली आणि डायरेक्ट तिकडचा रस्ता पकडला. असो. सांगायचा मुद्दा हा की अशा गोष्टी या सिस्टेमिक फेल्युअर असतात. सरकारी किंवा खाजगी बँका याने त्यात फरक पडत नाही. उलट सरकारी बँका असतील तर या घोटाळ्यांचा खर्च करदात्यांना (म्हणजे तुमच्याआमच्या सारख्यांना) करायला लागतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 05:16 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan-news/the-whole-bollywood-is-silent-says-naseeruddin-shah-on-farmer-protest-supports-farmers-movement-sas-89-2395467/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS नसीरुद्दीन शाहचे बोलणे, जास्त मनावर घेण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 07:14 नवीन
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जॉर्ज शुल्झ यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले आहे. Image removed. जॉर्ज शुल्झ हे रॉनाल्ड रेगन यांच्या प्रशासनात १९८२ ते १९८९ या काळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते. या काळात भारत आणि अमेरिकेचे संबंध विशेष चांगले नव्हते कारण रशियाचे अफगाणिस्तान युध्द चालू होते त्यामुळे अफगाणिस्तानातील मुजाहिदींना रशियाविरूध्द मदत करायला म्हणून पाकिस्तान हा अमेरिकेसाठी फ्रंटलाईन स्टेट होता. तसेच पाकिस्तानने अणुबॉम्बही याच दरम्यान मिळवला आणि त्याकडे अमेरिकेने कानाडोळा केला. जॉर्ज शुल्झ हे १९७२ चे १९७४ दरम्यान रिचर्ड निक्सन यांच्या प्रशासनात अर्थमंत्री पण होते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 02/08/2021 - 09:36 नवीन
सध्या तथाकथित शेतकरी आंदोलनादरम्यान सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर वगैरे सेलेब्रिटींनी 'आम्ही आमच्यातील मतभेद आमच्या घरीच सोडवू त्यात इतरांनी ढवळाढवळ करायची गरज नाही' असे ट्विट केले ते केंद्र सरकारच्या दबावात केले आहे का याचा तपास राज्यातील गुप्तचर यंत्रणा करणार असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे असे एबीपी माझावर आताच बघितले. या सेलेब्रिटींच्या ट्विटमधून कुठलाही हिंसाचार करायला फूस नव्हती पण ग्रेटाच्या तथाकथित टूलकिटमध्ये भारतात कसा गोंधळ घालायचा या योजनेची टाईमलाईन दिली होती त्यात राज्यातील कोणी जबाबदार आहे का याची चौकशी राज्य सरकारला कराविशी वाटत नाही. एकूणच राज्यातील त्रिपक्षीय सरकार मोदीद्वेषात ठार वेडे झाले आहे असे दिसते. फेसबुकवर या टूलकिटची रूपरेषा ठरवून देण्यात मुंबईतील आपशी संबंधित कुणा वकिलीण बाईने मदत केली असे फिरत आहे. खखोदेजा. ते खरे असेल तर त्याचा तपास होणार की ती वकिलीण बाई मोदीसरकार विरोधात असल्याने सगळे काही चालते?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 09:38 नवीन
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षयकुमार आदींनी केंद्राच्या दबावाखाली भारत देशाच्या बाजूने ट्विट्स लिहिली का, याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र गुप्तचर खात्याला दिले आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 09:45 नवीन
समजा केंद्राच्या दबावाखाली भारत देशाच्या बाजूने ट्विट्स लिहिली असे सिद्ध करता आले तरी त्यातील एक अक्षरसुद्धा प्रक्षोभक, चिथावणीखोर, जातीय, विद्वेषी वगैरे नसल्याने ट्विटरकर्त्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही आणि राज्य सरकार केंद्रावर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे यातून फालतूगिरी करणे व पोरखेळ करण्यात टाईमपास करणे याव्यतिरिक्त मविआच्या हाती काहीही लागणार नाही. महाराष्ट्रात तातडीने ऑक्टोबर २०२४ पर्यंत राष्ट्रपती राजवट जारी करणे आवश्यक आहे. अन्यथा हा पोरखेळच सुरू राहील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 11:38 नवीन
घेतलेला निर्णय आहे.... त्याला पोरखेळ समजणे, चुकीचे आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/08/2021 - 12:31 नवीन
करण्यासारखे काम हातात नसले की अश्या चोकशा केल्या जातात. हे सरकार म्हणजे मूर्खपणा व निरूद्योगीपणाचा कळस आहे. ११ महिने निरूद्योगी घरात बसून काढल्यानंतर असाच मूर्खपणा सुचतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा