चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
मला वाटते, जसे १ वर्ष free data दिल्यावर आता relaince, airtel आणि vi मिळून कितीही रुपयाला त्यांचे data plan देत असतील तरी मला ते घ्यावे लागतील, आता bsnl वगैरे मोडीत निघालेलेच आहेत..समजा सर्वांनी तसं केले तरीसुद्धा ग्राहकविस्तारासाठी त्यांच्यापैकीच कोणीतरी कमी किंमतीचे data plan बाजारात आणतील व इतर सर्वांना त्याचे अनुकरण करावेच लागेल. १२-१३ वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा टाटा डोकोमोने १ पैसा प्रतिसेकंद शुल्काची योजना सुरू करून बरेच नवीन ग्राहक मिळविले. त्यामुळे इतरांनाही तशीच योजना आणावी लागली. काही जणांनी अजून जास्त सवलतीच्या योजना आणल्या व त्यातून ग्राहकांचाच फायदा झाला. असेच शेतीमालाबद्दल सुद्धा होऊ शकते. त्यामुळे नवीन कायदे अजून लागू झालेले नसताना त्याविरुद्ध आकांडतांडव करणे योग्य नाही.