चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
कामे
होणार नाहीत हे माहिती आहे. गुळाला चिकटलेला मुंगळा मरेपर्यंत आपली पकड सोडत नाही. त्यामुळे धुसफूस करत का होईना पण चार वर्षे सरकार चालणार आहे. बाकी तत्वनिष्ठा वगैरे शब्द केंव्हाच कालबाह्य झालेले आहेत.मराठी माणसांचा आता एकही पक्ष नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ...आता? म्हणजे यापूर्वी मराठी माणसांचा एखादा पक्ष होता का? मग कोणालाच तो पक्ष कसा माहिती नाही?