Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/02/2021 - 09:31
🗣 266 प्रतिसाद
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे. म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61966 views

🗣 चर्चा (266)
क
कंजूस गुरुवार, 02/04/2021 - 13:52 नवीन
या वेबसिरिजमध्ये एकदा पाहिलं - बाजारसाठी ती बाई जाताना शेतातले पाच किलो तांदूळ घेऊन जाते. ते विकून इतर गोष्टी घेणार असते. बाजारात तांदूळ घेणाऱ्याने पंधरा रु किलोने घेतले. पण भाजी साठ रु किलो, मीठ वीस रु किलो, डाळी शंभर रु किलो. म्हणजे नडतो कोण? अडतो कोण?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 14:25 नवीन
माझा एक मित्र, डोंबिवली येथे, किरकोळ भाजी विक्री करतो... तो वाशी येथल्या, APMC मार्केट मधून, भाजी खरेदी करतो .. त्याच्या माहिती नुसार, शेतकरी अक्षरशः कवडीमोलाने, दलालांना, भाजी विकतात ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2021 - 14:21 नवीन
दलालांच्या पोटावर पाय आणल्याने, ते आंदोलन करत आहेत ...
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/04/2021 - 14:31 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे हे कायदे आणतांना दोन्ही सभागृहात मांडल्या गेलेले आहेत. तेव्हा केवळ आरोप आणि गोंधळ करण्यात वेळ न घालवता, सविस्तर चर्चा करायला विरोधी पक्षांना कुणी रोखले होते? जर सरकार चर्चेसाठी तयार असेल तर, समिती स्थापन करून त्यांच्याकडे हे अवलोकनासाठी पाठवण्याचा आग्रह कशासाठी? विलंब करवण्यासाठीच ना? आंदोलनकर्त्यांशी देखील अगदी पहिलेपासून चर्चेसाठी सरकार तयार आहेच. कायद्यांतर्गत प्रत्येक कलमावर समाधान होईतोवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. आंदोलनकर्त्यांना चर्चा केली तरी समजूनच घ्यायची नाही. त्यांनी आपला एकच हेका लावलाय की कायदे मागे घ्या. का मागे घ्या? त्यावर एकही संयुक्तीक कारण ते देत नाहीत. संसदेत संमत झालेले कायदे पुढे ढकलण्याची खरेतर सरकारला काहीही गरज नाही. तरीही दीड वर्षे कायदे पुढे ढकलून समाधान काढण्यासाठी देखील सरकार तयार आहे, पण ह्यांना चर्चा करून हे सोडवायचेच नाही. यात मग लोकांना वाटले की आंदोलनकर्त्यांचा हेतू स्वच्छ नाही, तर कुठे चुकले?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 02/04/2021 - 14:37 नवीन
योग्यच आहेत तर सरकारने ते शेताकऱ्यांशी बोलुन समोपचाराने करावे..हे इतके म्हणणे आहे..>>> हे एकदम बरोबर, सरकार चर्चेला तयार आहेच की, सरकारने वर्षभर कायदे स्थगित ठेवायची पण तयारी दाखवली होती.. पण तथाकथित शेतकरी कायदे रद्द करा या मागणीवर असून बसलेत ना. अडमुठेपणा कोण करतोय ठरवा तुम्हीच... APMC बंद करा असे कोणीच म्हणत नाहीये, पण त्यांची एकाधिकारशाही मोडून काढा, आणि तितकेच हे कायदे करतायत. महाराष्ट्रात हे पूर्वीच झाले आहे, त्यामुळेच इतके मोठे आंदोलन होऊन सुद्धा महाराष्ट्रातले शेतकरी आणि राजकीय पक्ष पण शांत आहेत, कारण ते जर निघाले देशात आंदोलन करायला तर भाजप त्यांच्याच तोंडावर महाराष्ट्रातले कायदे मारील आणि आधी हे रद्द करा म्हणून सांगेल. ते काठावर बसून पाठिंबा देतायत. असो, डोळे मिटून बसायचे असेल आणि नुसती दडपशाही दडपशाही ओरडायची असेल तर त्याला काही इलाज नाही. अवांतर - भारतीय जनतेला सरकारकडून कोणत्याही फेवर ची गरज नाही, ती आपला उत्कर्ष आपल्या बळावर करेल, सरकारने फक्त स्थिरता द्यावी इतकीच अपेक्षा असते, तीदेखील कित्येक वर्षे मिळत नव्हती. आता ती मिळायला लागली आहे, जनता आपला उत्कर्ष आपला आपण करेल, त्याची काळजी नसावी..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 02/04/2021 - 16:20 नवीन
आंबे काय घेऊन बसलात ? द्राक्षवाले आतापर्यत थेट व्यापाऱ्यांनाच विक्री करायचे. माझ्या शेतातील पालेभाज्या , फळभाज्या , मका , सोयबीन थेट व्यापार्‍यालाच देतो.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 02/04/2021 - 16:40 नवीन
आम्हीदेखील थोड्या दिवसापुर्वीच पावटा आणि वाटाणा डायरेक्ट किरकोळ आणि होलसेल ग्राहकांना विकला.. जवळपास सर्व माल संपला. राहिलेला काही माल किरकोळ व्यापारी शेतात येऊन घेऊन गेले. थोडीफार मेथी केली होती. तीदेखील अश्याच पद्धतीने विकली. जवळपास सर्व माल संपल्यानंतर औंध मधील एका पराठा शॉपमालकाने संपर्क केला.. जर हा माल मी मार्केट यार्ड ला पाठवला असता तर फायदा तर दूर पण इन्व्हेस्टमेंट पण निघाली नसती.. कारण या सर्वांचे भाव खूप खाली होते.. आता शेतात हरबरा आहे.. अजुन एखादा महिना लागेल.. तो देखील असाच विकणार आहे. पाहुयात...
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sun, 02/14/2021 - 09:30 नवीन
पन काय जर त्या ठोक व्यापार्याने १०० रु भाव लावला ?? अणि लावनार नाही कशावरुन
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/04/2021 - 16:30 नवीन
शेतकरी आपलेच आहेत हे रेहाना मंंडळींच्या मेसेजवरुन सरकारला कळावं इतकं सरकार आपल्या शेतकर्‍यांबद्दल असंवेदनशील आहे असं खरच वाटतं तुम्हाला? सरकारच्या निती-धोरणांबद्दल आक्षेप असेलही. त्यांचे वागणे, बोलणे सुद्धा पटत नसेल. पण भारताच्या परिस्थितीशी काहिही घेणंदेणं नसलेल्या काहि विदेशी सेल्लिब्रेटींनी आपल्या सरकारला अक्कल शिकवावी हे बरं वाटतं? एरवी अशा चर्चेत भाग घेत नाहि... पण काहि सेन्सीबल व्यक्तींच्या प्रतिसादावर प्रश्न विचारायचं धाडस करतो.. तेव्हढीच विचारात भर.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 19:11 नवीन
अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो आहे.. आताचे मोदी सरकार हे शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे.. आणि बाहेरून प्रतिक्रिया उमटली कि आपली सार्वभौमता लगेच तुटते काय? नक्कीच नाही.. पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे.. नायलाजाने म्हणावे लागते, मोदी आणि bjp निवडून आल्याने काँग्रेस यांच्या पेक्षा खूप भारी होती हे पटतेय, आणि माझ्या पूर्वज लोकांना माझ्या पेक्षा जास्त कळत होते हे आता नक्कीच वाटत आहे. मोदी नसते तर अजूनही काँग्रेस ला शिव्या घालवण्यात दिवस घालवले असते... आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 19:43 नवीन
पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे.. सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली? आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच.. अबकी बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वत:च्या प्रचारात भारतीयांच्या सभेत वापरले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये मोदींनी हा जुना संदर्भ दिला होता. अमेरिकेची निवडणुक त्यावेळी सुमारे १४ महिने लांब होती. आपल्या सव्वा तासांच्या भाषणात मोदींनी फक्त एकदा हा जुना संदर्भ दिला होता. https://www.google.com/search?sxsrf=ALeKk03G8Kigkqbj71fW7T2YCj81AFbH9Q%3A1612463367237&source=hp&ei=Bz0cYIyODNmb9QOtqZSYDA&q=ab+ki+bar+trump+sarkar&oq=ab+ki+bar+trump+sarkar&gs_lcp=ChFtb2JpbGUtZ3dzLXdpei1ocBADOgkIIxDqAhAnEBM6BwgjEOoCECc6BwgjECcQiwM6BQgAELEDOgIIADoECCMQJzoGCCMQJxATOggIABCxAxCDAToICC4QsQMQgwE6BwguEBMQkwI6CggAEMcBEK8BEBM6BAguEBM6BAgAEBM6BQgAEMsBOgcILhAKEMsBOgUILhDLAToHCAAQChDLAToICAAQFhAKEB46BggAEBYQHlCoGVjhc2DYfGgBcAB4AIAB-wGIAfUlkgEGMC4xLjIxmAEAoAEBsAEPuAEC&sclient=mobile-gws-wiz-hp#fpstate=ive&vld=cid:0195fc45,vid:ogg2Hf9Qia0,st:0
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 20:00 नवीन
सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली? तुम्हाला तसे वाटत नाही, ह्याचीच कमाल आहे.. एकावेळेस हे सगळे स्वयंस्पुर्ती ने जागे झालेत ते हि ७० दिवसा नंतर हे नक्कीच यामागे कोण हे दर्शविते आहे... सचिन हा माझा लाडका क्रिकेटर त्यामुळे माझ्या मनातून थोडा उतरला आहेच.. पण या वेळेस मात्र हे नक्की.. कोणी कोणत्या क्षेत्रातील कितीही महान असले तरी त्या त्या क्षेत्रात तो महान, इतर ठिकाणी त्याचे मत हे तिकडच्या महानतेवर नक्कीच ठरवले नाही पाहिजे हे मात्र नक्की मला पुन्हा लक्षात आले.. राहता राहिला प्रोपोगंडा पसरावण्याचा प्रश्न... मोदी हे स्वतःच स्वतःचा propoganda देशात पसरवतात, टीव्ही म्हणू नका, पत्रकार म्हणू नका.. सोशल मीडिया म्हणू नका.. महाशयांच्या नावे tv channel पण होता.. आणि एका परदेशी ट्वीट ने देश तुटत नसतो...पण अहम, मला.. मला चुकीचे ठरवले जातेय, मग चला आपल्या सेलिब्रिटिना बोलते करा.. आणि देशाची एकात्मता वर बोला ते नाही जमले तर परकीय शक्ती बोला असलेच धंदे करून तर propoganda रेटला जातोय.. आणि आपण बसलोय, ह्याचे मागे कोण नाही, ते स्वतःहून बोलतात असे म्हणत... असो.. हे माझे मत आहे, येथे काँग्रेस असले लाचार वागत असती तरी माझी हीच मते असती.. कुठल्या हि पक्षा ची पालखी वाहण्याची गरजच नाही.. आणि भारत एक आहे तर येथील शेतकरी.. येथील प्रत्येक व्यक्ती, येथील प्रत्येक राज्य एकच आहे..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 02:57 नवीन
७० दिवसांनंतर परदेशात कोणीतरी ट्विट्स करायला लागले आणि भारतात माध्यमे त्याला वारेमाप प्रसिद्धी द्यायला लागली, त्यानंतरच भारतीय सेलिब्रिटींंनी उत्तर दिलंय. त्यामुळे ७० दिवसांनंतर हे स्वयंफूर्तीने जागे झाले की सरकारच्या सांगण्यावरून हा प्रश्न येथे लागू पडत नाही. सुरूवातीच्या काळात कॅनडाच्या पंतप्रधानांनी विनाकारण नाक खुपसल्याने भारत सरकारने सरकारी पातळीवर योग्य ते सांगितले होते व त्यानंतर त्यांचे तोंड बंद झाले होते. प्रपोगंडाचं म्हणाल तर भारतातील सर्व नेते हेच करीत असतात. राजीव गांधींनी भारतात पहिल्यांदा संगणक आणला, त्यांनी दळणवळण क्रांती केली वगैरे प्रपोगंडा फार पूर्वीपासून पसरविला गेला. एकीकडे मोदी माध्यमांशी किंवा इतर कोणाशीही अजिबात बोलत नाहीत अशी त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे ते स्वतःच प्रपोगंडा पसरवितात म्हणूनही टीका करायची. २००२ पासून मोदींविरोधात भारतात आणि जगभर प्रपोगंडा पसरविला गेला व अजूनही हे सुरू आहे. त्यांच्या विरोधात पार संयुक्त राष्ट्रसंघात आणि जागतिक न्यायालयात काही जण गेले होते. कोलंबिया देशाचा हुकुमशहा असलेल्या जनरल नोरिएगाला अमेरिकेने जसे सैन्य पाठवून पकडून आणून अमेरिकेत तुरूंगात डांबले, तसेच मोदींच्या बाबतीत करावे अशीही मागणी केली गेली. मोदींना घालविण्यासाठी कॉंग्रेसी नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानची मदत मागितली होती. हिटलर, सामुहिक हत्याकांड करणारा क्रूरकर्मा, नरसंहारक अशी त्यांची जगभर प्रतिमा केली गेली आहे. त्यामुळे जर मोदी स्वत:विषयी प्रपोगंडा पसरवून स्वतःविषयी मत बदलण्याचा प्रयत्न करीत असतील, तर ते योग्यच ठरेल.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 04:35 नवीन
तुम्ही लिहिलेले खूप एकांगी आहे असे तुम्हाला वाटत नाही हेच नवल आहे.. तुम्हाला असे म्हणायचे आहे का,७० दिवसा नंतर कुणी तरी ट्वीट करतेय आणि त्याला मुद्दाम प्रसिद्धी आपली मीडिया देतेय? अहो आपली मीडिया पहिल्यापासून आंदोलना विरोधात बोलते.. सोशल मीडिया तर विचारूच नका, आंदोलना विरोधात बोलणारे जास्त.. मग एक ट्वीट ला प्रसिद्धी देणारे वेगळे आणि २६ तारखेला जो गोंधळ मीडिया दाखवतेय तो कोणता मीडिया आहे? भूमिका मीडिया घेताना दिसतोय असे मला तरी वाटत नाही... कोणाच्या एका ट्वीट ने सगळे हलू शकतात? का इतके विदारक चित्र त्या ट्वीट मध्ये होते? जे आपल्या मीडिया ला आधी दिसले नाही, आधी ते त्यावर बोलले नाही.. उलट त्या ट्वीट नंतर जरी मीडिया ला हे विदारक चित्र कळाले असेल तरी चांगले आहे.. प्रपोगंडा सर्वच नेते पसरवतात म्हणुन तुम्ही मोदींना त्यामागे लपवता आहात... अटलबिहारी वाजपेयीनी पण रस्ते केले.. शायनींग इंडिया तितकासा प्रभाव टाकू शकला नाही पण त्यांनी नक्कीच इंडिया शाईन करण्यास हातभार लावला.. ते propganda नव्हे.. राजीव गांधी किंवा कुठलाही नेता असो, काळ बदलत जातोय, प्रगती होत जातीये.. म्हणुन होणारी प्रगती कोणत्या तरी पुंजीवाद्याच्या हातात द्यायला कोणता नेता पुढे आलाय? मागे मी हसदेव अडाणी ला दिलंय लिहिले, कोण बोलले त्यावर? किती न्यूज, किती मीडिया बोलला त्यावर? २००९ पासून परमिशन मिळत नव्हती.. तरी मोदी२००९२०१६ नंतर हळू हळू ते जंगल अडाणी च्या घशात घातले... धार्मिक मते, पाकिस्थान.. धार्मिक भावना.. पुंजीवाद हि असली मते रेटने हा प्रोपोगंडा आहे.. प्रगतीचा प्रोपोगंडा कोणता नेता पसरवत असेल मग ते मोदी असले तरी ते चांगले आहे.. पण तसे नाही.. मोदीनी स्वतः २०१९ ला प्रगती काय काय केली यावर मते मागितली नाहीत.. त्यांनी प्रोपोगंडे चालवले.. काँग्रेस ने कसे काय केले हि चित्रे ते पसरवत राहिले.. बाकी मोदी मीडिया ला पत्रकार परिषद देणे आणि propganda राबवणे वेगळे आहे हे नक्कीच कळत असावे... मोदी मध्ये मीडिया, पत्रकारा ना सामोरे जाण्याची ताकद नाही किंवा ते मीडिया ला उत्तरे देऊ शकत नाही.. कारण त्यांना कोणी प्रश्न विचारणे आवडत नाही असे दिसते... यालाच मी म्हणेल तसे.. अहम.. अहंकार असे का म्हणू नये.. मीडिया काय पाकिस्थान चे प्रश्न विचारणार असतो काय? असो.. जे लोकं बिला बद्दल, कायद्या बद्दल चर्चा केली म्हणतात, ते लोकं पत्रकार परिषद घेऊन मते, आरोप खंडण न करता, परदेशी.. बाह्यशक्ती असे करतेय आपण, आपला प्रश्न असे म्हणुन ते प्रश्न नाकारू कसे शकतात? आणि भारताने पाकिस्थान ची मदत मोदी विरोधात मागितली होती? मग मोदी नी निवडणूककाळा अगोदर पुन्हा तेच रहावेत म्हणुन पण पाकिस्थान ला मदत मागितली होती काय? आपण नक्की काय बोलतोय? असो..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 08:40 नवीन
जवळपास सर्व मराठी वृत्तवाहिन्या, अनेक हिंदी वृत्तवाहिन्या, अनेक मराठी वृत्तपत्रे आंदोलनाच्या बाजूने आहेय. त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांपासून रिहानापर्यंत जे जे सरकारविरोधात व आंदोलनाच्या बाजूने बोलले त्यांना या माध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी दिलीये. याउलट आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अशा काही संस्थांनी कायद्यांचे समर्थन केल्यानंतर त्यांना अनुल्लेखाने मारलंय. मोदी प्रपोगंडा पसरवितात असे मी म्हटलेच नाही. जर ते प्रपोगंडा पसरवित असतील तर ते योग्यच आहे असे मी लिहिलंय. मोदींनी २०१९ मध्ये कोणत्या मुद्द्यांंवर मते मागितली व २०१४ पेक्षा जास्त मतदारांनी कोणत्या मुद्द्यांवर त्यांना मत दिली हे शोधा. मोदी पत्रकारांना फार वेळ का देत नाहीत त्याची कारणे सर्वश्रुत आहेत. काश्मीर प्रश्नावर चर्चा सुरू करण्यासाठी मोदींना घालवा असे कॉंग्रेसींनी पाकिस्तानात जाऊन सांगितले होते हे सुद्धा सर्वश्रुत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 02/05/2021 - 08:46 नवीन
मागे ठाकरे सरकारसाठी, 'सरकार किती चांगले काम करत आहे' अश्या प्रकारचे ट्विट्स करण्याचा अनेक चाय-बिस्किट पत्रकार व सिने कलाकारांनी धडका लावला होता. नंतर हे ट्विट्स कोणत्या एजन्सी मार्फत केल्याचे उघड झाल्यावर ठाकरे सहित ट्विट करणारे अनेक जण तोंडावर आपटले होते. याचा अनुभव तुम्हाला असल्याने, सध्या जे सिनेकलाकार ट्विट करत आहेत ते त्याच धर्तीवर असावेत, असा तुम्हाला आलेला संशय कदाचीत खरा असावा. :))
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 19:46 नवीन
नालायक,आणि मूर्ख नक्की नव्हती आणि अजुन पण नाही. Bjp ल मी सुद्धा मत दिले होते पण ती आता मोठी चूक वाटत आहे. येथून पुढे परत कधीच bjp ल म्हणून मत देणार नाही असे ठरवून च टाकले आहे. भारताच्या इतिहासात असे नालायक आणि दूरदृष्टी नसलेले आत्मकेंद्री सरकार कधीच होवून गेले नाही .
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/04/2021 - 21:10 नवीन
पण तो अर्धवट मांडला आहे असं वाटतं.
या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप
रेहाना वगैरे मंडळी भारतातल्या शेतकर्‍यांविषयी जास्त संवेदनशील आहेत आणि त्यांना शेतकर्‍यांचं हित सरकारपेक्षा जास्त चांगलं कळतं असं म्हणायचं आहे का? बाहेरुन प्रतिक्रीया आलि कि सार्वभौमत्व तुटत नाहि... पण आपल्या देशातल्या संवेदनशील विषयांवर जेंव्हा विदेशी राजकारणी, संस्था आणि सेलिब्रेटी असं मोहोळ उठल्यासारखं वातावरण निर्माण करतात तेंव्हा त्या अरे ला कारे करणं आवष्यक असतं असं मला वाटतं. लौंदासी भिडवावा दुसरा लौंद. ना कमि ना जास्त. काँग्रेस बरी कि भाजपा हा वेगळा वादाचा मुद्दा होऊ शकतो ( मी व्यक्तीशः नेत्याला महत्व देतो, पार्टी दुय्यम. माझ्यासाठी शरद पवार ऑल टाईम फेव्हरेट. पण हे माझं वैयक्तीक मत झालं). पण कृषी कायद्या संदर्भात बघायचं झालं तर आंदोलकांची भुमीका मांडायला राकेश टिकैत प्रातीनीधीक स्वरुपात कन्सीडर केल्या जाऊ शकतात. मी त्यांची एबीपी माझा कट्टा वर मुलाखत बघितली.. आणि हे आंदोलन निव्वळ एका काल्पनीक आणि इल्लोजीकल भितीवर आधारीत आहे असं माझं मत बनलं. त्यानंतर अनेकांच्या मुलाखती बघितल्या.. कुठलंही काँक्रीट कारण दिसलं नाहि. तेंव्हा या बाबतीत माझ्यापुरतं मत सरकारच्या बाजुने. मतभेदांचं स्वागत आहेच. पण तुम्ही देखील, भांडवलदार शेतकर्‍यांच्या जमिनी घशात घालतील, साठेबाजी करुन भाव वाढवतील असल्या अनावष्यक भितीपलिकडे या आंदोलनात काय तथ्य आहे हे सांगु शकता का? राहिला मुद्दा मोदिंच्या वक्तव्यांचा... मोदि पोलिटीकली कितीही करेक्ट बोलले असतील तरी त्यांचा रोख भारतीय वंशाच्या लोकांना सायलेण्ट मेसेज देणं हाच होता हे उघड आहे. (मोदिंनी वर्तमान निवडणुकीसाठी अबकी बार ट्रंप सरकार म्हटलं नव्हतं तर मागील वेळी ट्रंप निवडुन आले तेंव्हा भारतात अशी प्रतिक्रीय उमटली होती, असं त्यांचं स्टेटमेण्ट होतं). आणि ते करणं फारसं अयोग्य नव्हतं, कारण ओबामा वगैरे अमेरीकी राष्ट्राध्यक्षांनी भारतात येऊन भारताला धर्मनिरपक्षतेची अक्कल शिकयावचा अगोचरपणा केला होता. राजकारणी लोक्स राजकारण खेळत असतात. दुसर्‍या देशाच्या राजकारणाला आपापल्या पद्धतीने प्रभावीत करत असतात. कधि बोलुन, कधि गप्प बसुन. असो. मुद्दा असा, कि रेहाना वगैरे गणंगांची टोळी कधि गप्प बसणार नाहि. त्यांच्यासाठी हा खेळ आहे. आपल्याही बाजुने गणंगांनी शिमग करावा. तो हि खेळाचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 02/04/2021 - 17:13 नवीन
पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते निंदनीय आहे.. +११११. पंजाब-हरीयाणा मधिल वास्तव परीस्थिती या बद्दल मला ठोस अशी माहिती नाही. या कायद्यातील काही तर्तुदी महाराष्ट्रात २००६ मध्येच करण्यात आलेल्या आहेत. पण काही तरतुदी (उदा. शेतकर्यांना करारा संबंधी न्यायालयात जाता येणार नाही.) शेतकर्यांच्या विरोधातील वाटतात. या कायद्याचा काय परीणाम होईल हे मी शेतकरी नसल्याने बोलणे चुकीचे ठरेल. पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे. भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा. पण यात मोदींचा दोष नसुन भारतीय जनतेचा आहे. त्यांनी भावनिक मूर्ख होण्याचे सोडुन जागरुक रहाव. जे बरोबर आहे त्याला बरोबर पण जे चुक आहे त्याला चुकच म्हणावे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 18:20 नवीन
मुद्देसूद आणि मनातले बोलला. मला इतक्या चांगल्या पद्धतीने मांडता आले नव्हते माझे मत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 02/04/2021 - 18:44 नवीन
भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा. पण यात मोदींचा दोष नसुन भारतीय जनतेचा आहे. त्यांनी भावनिक मूर्ख होण्याचे सोडुन जागरुक रहाव. जे बरोबर आहे त्याला बरोबर पण जे चुक आहे त्याला चुकच म्हणावे.
हे सगळं तत्वज्ञान दुसऱ्या बाजूला पण apply होते का?? कारण अश्या प्रकारची उदाहरणे द्यायची झाली तर एका प्रतिसादात सगळ्या लोकांची नावे आणि त्यांचा घटनाक्रम ( ट्विट, भाषण वगैरे ) मावणार नाहीत. एवढं टायपायला मला आत्ता वेळ नाहीये पण आपला आग्रह असल्यास मी कमीत कमी 20-25 उदाहरणे देऊ शकेल.. ती उदाहरणं तुम्ही भावनिक आवाहन म्हणणार नाही.. ते तुमच्या भाषेत प्रॅक्टिकल बोलणे किंवा फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन असणार.. कारण मोदी आणि BJP साठीच हे सगळे लॉजिक आहे.. आणि बाकींच्यांच्या बाबतीत फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन. उदा. जय श्री राम म्हणले कि कम्युनल आणि अल्लाह हूं अकबर सेकुलर.. rss आतंकवादी पण सिमी, लष्कर वगैरे भरकटलेली धार्मिक संस्था.. पिक्चर मध्ये शंकराला पाळताना, घाबरताना आणि लघवी करताना दाखवणं म्हणजे कलानिर्मिती स्वातंत्र्य.. नग्न चित्रे काढून प्रसिद्ध करणे हे पण कलानिर्मिती स्वातंत्र्य पण फक्त कार्टून छापणे हे भावना दुखावण्याचे षडयंत्र.. इकडच्या बाजूंच्यांनी विरोध केला कि असहिष्णू म्हणून हिणवायचे त्यांच्या रंगाचा आतंकवाद असा जावईशोध लावायचा.. पण तिकडून गळा कापला तरी ते त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य.. हे आणि असे मुद्दे एखाद्याने उचलले कि लगेच तुम्ही त्याला BJP चा एजेंट आणि साजस्वास्थ्य बिघडवणारा.. कम्युनल.. लोकांना भावनिक आवाहन करून मतं मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा अश्या उपमा द्यायच्या.. कितपत बरोबर आहे हो??

  • काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात.

.या सर्वाचा शीख आणि दलाल आंदोलनाशी डायरेक्ट संबंध नाहीये पण तुम्ही BJP च्या आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीला भावनिक आवाहन आणि मतं मिळवण्यासाठी चाललेली भावनिक खेळी असा जो काही गैर समज करून घेताय.. त्यामुळे इतके लिहिले. तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे.. कायच्या काय लॉजिक..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/04/2021 - 19:28 नवीन
हो हे लॉजिक दोन्हीकडील बाजूला लागू होते.. मुद्दा सचिन ने किंवा इतरांनी मत मांडू नये हा नाही.. मुद्दा हा आहे कि ७० दिवस काही न म्हणता एकाच वेळेस सगळे जवळ जवळ सेम ट्वीट करत आहेत.. त्यामुळे सचिनच काय इतर लोकांवर हि विश्वास ठेवता येत नाही..आणि हे जाणून बुजून केले जात आहे.. हे न कळण्यांइतपत कोणी लहान नाही.. बाकी दुसऱ्या देशात डंका वाजतोय म्हणणारे काही दिवसात दुसऱ्या देशाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये इथपर्यंत आलेत.. पुढील काही वर्षांनी, भारत हा धार्मिक तेढ निर्माण झाल्याने बाहेरील देशातील लोक इकडे पर्यटना ला येण्यास हि कमीच करतील आणि याला सर्वस्वी आताचे सरकार जबाबदार आहे.. भारताची इमेज कधीच बदनाम केलीये यांनी पण ते कळण्यास हि वेळच लागेल... आणि bjp च्या कमजोर अर्थनितीचा पुढील काही वर्षानंतर नक्कीच परिणाम दिसून येईल हे मला वाटते आहे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/04/2021 - 18:49 नवीन
पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे. बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे? भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा. एकट्या सचिनने टीका केलेली नाही. अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर, चेतन भगत, अक्षयकुमार, सुरेश रैना, शिखर धवन, कोहली, कुंबळे, कैलाश खेर, अजिंक्य रहाणे, पीक्षटी उषा, रोहीत शर्मा, हार्दिक पंड्या अशा अनेक क्रिकेट खेळाडू व चित्रपटकर्मींनी असेच केले आहे. या सर्वांना असे करण्यास भाग पाडले गेले?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 20:50 नवीन
हे फक्त काही लोकांचे पटेल.बाकी लोक खूप हुशार आहेत त्यांना नक्की काय चालले आहे ,सर्व खेळाडू अचानक कसे जागे झाले ह्याची उत्तरं माहीत असतात. जनतेला एवढे बेवकुब समजू नका.bjp samarthak nahi असे सांगायचे आणि bjp चीच चुकीची बाजू उचलून धरायची अशा लोकांना जनता चांगलीच ओळखते.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 02/05/2021 - 09:07 नवीन
वरती चुकुन २६ तारखेचा उल्लेख १५ असा झाला आहे. बाप्पूजी काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात. समजल नाही. तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे.. मी फक्त माझ मत लिहित आहे. मी बरोबरच आहे असही माझ म्हणन नाही आहे तर माझ मतही चुकिचे असु शकते. पण ते योग्यरित्या,मुद्देसुद पटवुन दिले तर माझ मत बद्लुही शकत. श्रीगुरुजी बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे? ज्यांनी धुडगूस घातला त्यांना निसंशय जेल मध्येच टाकल पाहिजे. पण नक्की धुडगूस घातला कोणी ? हाच तर मुद्दा आहे. मला वाटत सर्वांनी कुठ्ल्याही पक्षाचा कार्यकर्ता/समर्थक म्हणुन न पाहता तठस्थपणे भारताचा नागरिक म्हणुन या गोष्टींकडे पहायला हव. मोदींबद्द्ल माझा आक्षेप हा आहे की ते खुप खोट बोलतात व दिखाउ पणा करतात.(या बद्दल बहुतेक लोक सहमत असतील) याची मुळात गरज काय आहे?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 19:15 नवीन
तुम्ही अगदी योग्य लीहले आहे. भावनिक परिस्थिती निर्माण करून सत्य दडपयच हेच सध्या चालू आहे. देशद्रोही,अतिरेकी,खलिस्तानी हे शब्द ह्या वर्षी इतक्या वेळा टीव्ही न्यूज वर ऐकले तेवढे पूर्ण आयुष्य त पण ऐकले नाहीत. ह्यांच्या लॉजिक च विचार केला तर भारतातील प्रतेक पाचवा व्यक्ती ह्यांच्या लॉजिक प्रमाणे अतिरेकी,देशद्रोही,खलिस्तानी आहे.(,आकडेवारी मागे पुढे होवू शक्य 5 हाच आकडा घेवून बसू नये)
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 02/04/2021 - 20:02 नवीन
शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी किंवा देशद्रोही असतील तर दोन महीने शांततेने आंदोलन कशाला केले असते? पहिल्या दिवसापासून धिंगाणा घातला असता की. २६ जानेवारीची वाट कशाला बघत बसले असते?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/04/2021 - 20:27 नवीन
अतिरेकी रस्ता रोको,किंवा आंदोलन करत नाहीत सू नियोजित हल्ले करतात. पोलिस च्या लठ्या आणि अश्रू धुराचा मारा ते सहन करत नाहीत.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 02/05/2021 - 03:53 नवीन
तुमची अतिरेकी या शब्दाची संकल्पना ही हातात मशिनगन घेऊन लोंकाचे मुडदे पाडणे अशी आहे. पण मी ती वेगळी करतो. धर्माच्या नावाने राजकारण करणे, एका धर्माला ग्लोरिफाय करून दुसऱ्या धर्माच्या नावाने बोंब मारणे, आपल्या धर्माला श्रेष्ठ ठरवण्यासाठी दुसऱ्या धर्माची निंदानालस्ती करणे, बिनबुडाची आंदोलने करून राजकीय वा आर्थिक वा सामाजिक पोळी भाजणे या सर्व गोष्टी अतिरेकी करतात. अमीर खान, अरुंधती रॉय, चित्रकार हुसेन, अमिताभ बच्चंन, झाकीर नाईक हे सर्व अतिरेकी आहेत, आणि ते मुडदे पाडणाऱ्यापेक्षा खतरनाक आहेत. कारण या लोंकाना फॉलो करणारी असंख्य मेंढरे असतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 04:13 नवीन
सहमत आहे ... व्यक्तिपूजा केली की, राष्ट्र लयाला जाते, ही जगरहाटी आहे...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 04:43 नवीन
आणि सध्या मोदी या व्यक्तीची पूजा/ भक्ती केली जातेय, त्यामुळे साहजिकच राष्ट्र लयाला जातेय या तुमच्या म्हणण्याला दुजोरा देतोय...
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 02/05/2021 - 05:05 नवीन
बहुसंख्य जनतेला हे वाटत नाही. बिहार मध्ये हेच सिद्ध झालं आहे. पश्चिम बंगाल मध्ये पण bjp वाढण्याची शक्यता आहे. Bjp ने सुरवातीच्या चुका सुधारून आंदोलन योग्य रित्या हाताळले आहे. पण काही सेलिब्रेटी च्या विरोधी tweet ला उत्तर देऊन सरकार ने त्यांचे महत्व वाढवू नये.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 02/05/2021 - 06:41 नवीन
पण काही सेलिब्रेटी च्या विरोधी tweet ला उत्तर देऊन सरकार ने त्यांचे महत्व वाढवू नये.
ह्या बातमीत, सरकारने असे महत्व देऊन तातडीने जाहीर भाष्य का केले त्याविषयी काही माहिती दिलेली आहे. Sources said the view in New Delhi is that the government will not take comments from “state actors” or “non-state actors” lying down, especially in the highly amplified social media zone. While it was not the norm to respond to private individuals and the MEA departed from that norm by reacting to tweets from Rihanna and Thunberg, sources said the view within the government is that “diplomacy has to be dynamic” and it must take into account “social media realities, where influencers tend to shape the opinions of many”. “Past governments did not deal with such a highly active social media zone, and it is important for the government to respond to criticism, irrespective of the source, government or non-government,” a senior government functionary said.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/06/2021 - 06:40 नवीन
अतिरेकी या शब्दाची संकल्पना मुळात अतिरेकी आणि दहशतवादी यातील फरकच लोक समजून घेत नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 02/04/2021 - 21:06 नवीन
शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी किंवा देशद्रोही असतील तर दोन महीने शांततेने आंदोलन कशाला केले असते? पहिल्या दिवसापासून धिंगाणा घातला असता की. २६ जानेवारीची वाट कशाला बघत बसले असते?
निव्वळ हास्यस्पद आहे. उदाहरण देतो म्हणजे हास्यस्पद का ते समजेल. पाणी गरम व्हायला लागले कि डायरेक्ट उकळत नाही.. 100 डिग्री तापमान झाले कि उकळते.. पाण्याला उकळायचे असते तर 50-60 डिग्री लाच उकळले असते. 100.ची वाट कशाला बघत बसले असते ... :) :) असो. आडमुठे धोरण कोण घेतेय ते जनता पाहते आहे. चर्चेच्या इतक्या फेऱ्या घेऊन.. कायद्यामध्ये बदल करण्यासाठी सकारत्मक पावले उचलून सरकारने आपली नियत आणि नैतिकता स्प्ष्ट केली आहे. शिखांनी आणि दलालांनी अविरत नुकसान आणि तोडफोड करून देखील सरकारने आजवर संयमी धोरण अवलंबले आहे. हे सर्वसामान्य जनता बघतेय आणि जाणतेय. शेतकरी कायद्याला विरोध शेतकऱयांचा नसून दलाल आणि शीख लोकांचा आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. जे लोकं आंदोलन करतायेत त्यांना कायद्याची काडीचीही माहिती नाही.. त्यांची डोकी भडकावून त्यांना तिथे आणले गेले आहे फक्त गर्दी वाढवण्यासाठी. खरा शेतकरी कामधंदा सोडून इतके दिवस बोंबलत फिरू शकत नाही. हे सर्व मी स्वतः देखील एक शेतकरी आहे म्हणून सांगतोय..लहानपणापासून शेती पाहतोय आणि आता गेले 3-4 वर्षे करतोय देखील. ( स्पष्टीकरण एवढ्यासाठी दिले कारण पुन्हा कुणी विचारायला नको कि तुम्हाला शेतीतील काय कळत..) या आंदोलनामागील शक्ती वेगळ्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित फंडिंग होत आहे.. एवढेच बोलून मी शांत बसतो. मला वाटतं शेतकरी कायदा आणि त्याचे फायदे तोटे हा विषय आणि चर्चा कधीच बाजूला पडली असून आता फक्त Right vs ( लेफ्ट + लिब्रान्दु + शीख + खलिस्तानी + झुंडशाही + अँटी हिंदू + दलाल ) एवढाच विषय राहिला आहे..

"Right" is always right.. and "Left" can never be right.

  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 02:58 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 03:07 नवीन
+2
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 02/06/2021 - 17:35 नवीन
माझ्तामते, जर ग्रेटा चे ते प्लेबूक चव्हाट्यावर आले नसते तर सेलेब्रिटी व्यक्त होण्याला काहीच अर्थ नव्हता. रेहाना आणि मिया बोलली म्हणून जर सेलेब्रिटींना उतरवले असे वाटत असेल तर तो भ्रम आहे असे समजा. इतके सेलेब्रिटी सरकारकडे सज्जड पुरावा असल्याशिवाय, किंवा तशीच केस असल्याशिवाय समर्थन करायला उतरणार नाहीत. मुख्य म्हणजे यातल्या कोणीही रेहाना ला उत्तर म्हणून ट्वीत केलेले पण नाही. अर्थात सरकारने सांगितल्याशिवाय त्यांनी ट्वीत केलेले नाही यात पण शंका नाही, पण या ट्वीटमुळे रेहानाच्या टवीटमधली हवा काढली गेली.. आता रेहाना आणि ग्रेटा (ती तर गेलीच कामातून, म्हणजे तिची विश्वासार्हताच संपली एकदम, पुर्वी तरी काय होती म्हणा, पन तो भाग वेगळा) यांच्या ट्वीटचा मार्केटिंगला वापर करता येणे बंद झाले. कारण मग सचिनच्या टवीटचे काय असा प्रश्न उभा राहू लागला. दउसरी अशी एक पाचर मारली गेली की आता कोणताच सेलेब्रिटी आंदोलनासाठी आणून हवा करणे अशक्य झाले. तिसरी गोष्ट म्हणजे जस्टिस फोर पीस चे कनेक्शन उघडे पडले. सचिनसाऱह्यांनी केलेला गदारोळ पाहिल्याव माझ्यासारख्या अनेकांनी नेमके काय झाले आहे बुवा हे बघण्यासाठी बातम्या शोधून ग्रेटा चा उघडा पडलेला XXभाग बघितला, त्यामुळे सरकारला जो संदेश जिथे पोचवायचा होता तिथे बरोबर पोचला. एक नक्की सांगतो, शेतकरी आंदोलन वगैरे विसरून जा, यामध्ये शोबाजीपेक्षा खूप मोठे कुरघोडीचे राजकारण आहे. मी स्वतः शेतकरी आहे, आणि कृषी कायदे अजिबात वाईत नाहीत याची मला खात्री आहे. मि मागचि १० वर्षे स्वतःच रेटेल करतो.
पण काही तरतुदी (उदा. शेतकर्यांना करारा संबंधी न्यायालयात जाता येणार नाही.) शेतकर्यांच्या विरोधातील वाटतात.
==> ही तरतूद मला पण विरोधी वाटली होती, पण नतर लक्श्यात आले कि त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली आहे, आणि मला वाटते आजतरी भारतातला असा कोणताही विषय नाही कि जो उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात नेता येत नाही.. म्हणजे स्थानिक पातळीवर लवाद्, आणि मग न्यायालये अशी योजना आहे, यात तसे वाईट काहीच दिसत नाही.
पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते.
सराकारने १८ महिने कायदे स्थगित ठेवायची तयारी दाखवली, चर्चेच्या जवळजवळ १० फेर्‍या केल्या, पण दत्ता सामंतसारखे हे देखील पुर्ण आडमुठेपणा करत बसले आहेत.. अश्या आंदोलनांचे पुढे काय होते हा इतिहास आहे. एक सांगतो बघा, २०१४ नंतर गुजरातमध्ये हार्दिक पटेलने एक मोठे आंदोलन उभे केले होते, तेव्हा पण अशीच काहीतरी कारणे दिली होती, सरकारने तेव्हा त्याला ते आंदोलन पुर्णपणे करू दिले होते, हे सरकार आपल्या सवडीने प्रतिहल्ला करते. सरकारणे वेळ मिळाल्यावर बरोबर हल्ला केला. आज हार्दिक पटेल कोणाला माहीत तरी आहे का? आणि ते पटेल आरक्षणचे काय झाले ते तरी? आंदोलन यशस्वी करायचे असेल तर काय मागण्या करायच्या, कधी माघार घयायची हे पण कळले पाहिजे. ते आण्णा हजारेंना आणि केजरीवालला बरोबर कळते, म्हणून ते यशस्वी आंदोलने उभी करतात. रामदेवबाबांना कळले नाही,मग त्यांचा पोपट झाला.. एक यशस्वी राजकारणी होण्यासाठी अशी मोठी आंदोलने देखील यशस्वीपणे उभी करावी लागतात.. तुम्ही काँग्रेसी आहात, जरा तुमच्या नेत्यांना हे पण समजावून सांगा असे सुचवेन.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 02/04/2021 - 16:38 नवीन
तर कमीतकमी पश्चिम बंगाल मधील शेतकऱ्यांना तरी नवीन कायद्याची काहीही अडचण नाही आस म्हणू शकतो. बरोबर आहे. उद्या सरकारने सीएनजीचे दर वाढवून पेट्रोल एवढे ठेवले तर कोणते इंधन वापरणारे रिक्षावाले बोंबा मारतील?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 02/04/2021 - 17:33 नवीन
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बहुतेक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होईल. त्यातच थोरल्या पवार साहेबांनी आता विधानसभा अध्यक्षपद हे "व्हॅकन्सी" असलेले पद आहे व त्यावर चर्चा होऊन मगच पुढील अध्यक्ष निवडला जाईल असे नेहमीप्रमाणे वेगवेगळे अर्थ निघणारे विधान केले. त्याचबरोबर आता काँग्रेस मधून अजून एक उपमुख्यमंत्री होईल असेही काही वर्तमानपत्रे अंदाज करत आहे. खरं तर हे सरकार तीन चाकी रिक्षेप्रमाणे असले तरी त्याची दोन चाके (शिवसेना व राष्ट्रवादी) पुढे आहेत आणि एक चाक (काँग्रेस) मागे आहे आणि पुढील दोन चाके मागील चाकाला आपल्या मनाप्रमाणे वळवतात असा अर्थ काढायचा की मग पुढील चाक म्हणजे राष्ट्रवादी व मागील दोन चाके म्हणजे काँग्रेस व शिवसेना असा अर्थ काढायचा त्याबद्द्ल संभ्रम वाटतो. हे सरकार मधेच पडेल अथवा पडणार ही नाही मात्र जर यदाकदाचित ते पडलेच तर त्या दोषाचा धनी कोण असेल ? हे बघणे रोचक ठरेल. टीप : हे सरकार पडावे किंवा स्थिर रहावे याबाबतीत माझे मत तटस्थ आहे. अर्थात आपल्या मताला निवडणूकीपुर्वी विचारतो कोण म्हणा :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 03:06 नवीन
हेच सरकार पुढील 4 वर्षे चालणार ... पुढच्या निवडणूकीत, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या बरोबर फरफटत जाणार ... ज्या ज्या ठिकाणी, भाजपचा उमेदवार येण्याची शक्यता आहे, त्या त्या ठिकाणी, शिवसेनेला आपला उमेदवार उभा करण्यासाठी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेवर दबाव आणणार... जी गत मनसेची, नाशिक मध्ये झाली, तशीच गत, शिवसानेची होण्याची शक्यता आहे... सध्या तरी, शिवसेनेचे हिंदूत्वही गेले आणि मराठी प्रेम पण गेले ... काका जिंदाबाद ...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 04:47 नवीन
१०० दिवसांत पडणारे सरकार पडले नाही.. वर्षात हि पडले नाही... त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे.. पुढच्या निवडणुकीसाठी हे सरकार, आपण काय कामे केली, काय प्रगती केली, कोविड विरुद्ध कसे लढले.. आणि अशी असंख्य कामे पुढे घेऊन आले तर मतदार मते देतील.. पण प्रगती वर न बोलता २०१९ ला ज्या पद्धतीने त्यावेळेस चे सरकार सामोरं गेले तसेच हे समोर आले तर यांची पण जागा मतदारांनी दाखवावी... पक्ष कोणता यावर मते देऊ नयेत...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 05:21 नवीन
नुसतीच अधोगती.... अर्थात, अजान स्पर्धा आणि केम छो वरली, म्हणत, मतांची भीक मागणार्या शिवसेने कडून अपेक्षा नाहीच ... मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थामुळे, हिंदुत्व पण गेले आणि मराठी प्रेम पण गेले ... जोपर्यंत, डोळ्यांवर कातडे ओढलेले, मतदार आहेत, तोपर्य॔त शिवसेना आहे... आमच्या सारख्या शिवसैनिकांनी, 1993 मध्येच शिवसेनेला, जय महाराष्ट्र म्हटले... मला आज देखील, शिवसेनेला सोडल्याचा पश्र्चात्ताप होत नाही ...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/05/2021 - 05:47 नवीन
बरोबर आहे.. प्रगती नाही तर मते नाहीत, यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस कोणीही सुटू शकत नाही.. पण एका पक्षाचे कातडे काढून टाकले तर दुसऱ्या पक्षाचे चढवले तर तेच भारी हे वाटू शकते, कदाचीत या कातडीचा पण उबग भविष्यात येऊ शकतो.. त्यामुळे जे योग्य ते योग्य.. जे चूक ते चूक... बाकी २०१९ विधान सभेला मी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना वोट देणार होतो, पण ज्या पद्धतीने भाजपा निवडणूकीला सामोरे गेली.. प्रगती च्या गोष्टी न करता, काँग्रेस, काश्मिर या मुद्द्यावर बोलत राहिली.. त्यामुळे मी भाजपा विरोधात मतदान केले...( ते हि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ला केले नव्हतेच ) ज्यांना २०१४ च्या कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा ह्या जाहिर२०१४२०१९ ला delete कराव्या लागल्या उत्तरा अभावी ऱत्यांना मी वोट का द्यावे? राहता राहिला पुढच्या निवडणूकीचा प्रश्न, जेंव्हा निवडणूक येईल तेंव्हा त्या ५ वर्षाचे कामकाज बघूच.. पण जे कुठल्या तरी पक्षाची, नेत्याची वेसण कायम नाकात घालून फिरतात आणि दुसऱ्याला व्यक्तिपूजा, नेत्यांची पूजा करता म्हणतात असे लोक कधीच आपली ओढलेली कातडी सोडण्यास तयार नसतात
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 06:35 नवीन
आता ह्या, कातडीला आमचा नाईलाज आहे ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 09:18 नवीन
त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे.. सहमत आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडले तरच हे सरकार पडेल. नंतर त्यापैकी कोणी भाजपला पाठिंबा दिला तरच भाजपचे सरकार येईल. एकंदरीत दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप कमी आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 09:37 नवीन
पुढच्या पिढीला, राजकीय पटावर जिवंत ठेवायचे असेल तर, खेळाडू कमी करावे लागतील ...जेम्स बाॅन्डचा, कॅसिनो राॅयल, हा सिनेमा आठवा ... शिवसेनेचे दोन हुकमी पत्ते होते ... मराठी आणि हिंदूत्व .... काकांनी, हे दोन्ही पत्ते उघडे पाडले .... वंशपरापरागत, शिवसेनेला मत देणारा मतदार, हळूहळू बाहेर पडत आहे...डोंबिवलीत तरी हीच परिस्थिति आहे... आणि जे जे डोंबिवली येथे, ते ते जगात ... मुख्यमंत्रीपदाला, अपयशाची काळी किनार नेहमीच असते .... आता ही किनार कितपत झाकायची आणि कितपत उघडी ठेवायचे? हे काकाच ठरवणार .... मोदी उगाच, काकांना गुरूस्थानी मानत नाहीत .... मोदी ह्याच चाली, भारतच्या भल्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरतात. तैवान प्रश्र्न जिवंत ठेवण्यात, मोदींचा हात असणारच...चीन उगाच मोदींच्या मागे लागलेला नाही....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 09:50 नवीन
शिवसेनेला हाताळणे हे भाजपला हाताळण्यापेक्षा खूप जास्त सोपे आहे, हे पवार जाणतात. त्यामुळे पवार सेनेला सोडून भाजपबरोबर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरे कारण म्हणजे भाजपबरोबर गेले तर सध्या मिळालेली अर्थ, गृह, रस्तेबांधणी अशी काही महत्त्वाची मंत्रीपदे सोडावी लागतील. पवार तोटा करून घेणार नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/05/2021 - 12:23 नवीन
काका आधी बोलणी करायला दिल्लीत गेले होते ... पण, वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या असाव्यात .... काकांनी, ह्या अक्षता आणि मुख्यमंत्री पद, शिवसेनेला देऊन, अर्थपूर्ण बोलणी केली असावीत, .... म्हणायला, मुख्यमंत्री शिवसेनेचा पण, महत्वाची बरीचशी खाती, शिवसेनेकडे नाहीत ....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/05/2021 - 12:44 नवीन
बरोबर. प्रमुख खाती हातात असताना व हाताळण्यास सोपा माणूस मुख्यमंत्री असताना काका हे सरकार पाडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा