🗣 चर्चा
(113)
म
मनस्वी
Mon, 04/28/2008 - 09:14
नवीन
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.
पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.
- Log in or register to post comments
व
वेडझवा
Wed, 04/30/2008 - 08:09
नवीन
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो
--
असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!
- Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक
Sun, 04/27/2014 - 17:40
नवीन
स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 03/26/2015 - 08:59
नवीन
आपल्या सारख्या आयडीचे पायसुध्धा मिपाला लागलेले हे पाहून धन्य झालो =))
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Fri, 03/09/2018 - 06:04
नवीन
सम्पादक
हा आयडी नाकरला कसा नाहि?
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 09:23
नवीन
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.
गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :(
>पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.
हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !
- Log in or register to post comments
आ
आर्य
Mon, 04/28/2008 - 09:46
नवीन
वेदश्री,
मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.
ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 10:01
नवीन
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
>आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.
बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता..
>ऊन्हात भटकणे वर्ज.
हे केले आहे.
> फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :(
>किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा..
>रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय..
>जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही..
>दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही.
>हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 04/28/2008 - 10:03
नवीन
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे!
त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!!
कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.
-(निमहक़ीम) ध मा ल.
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 10:07
नवीन
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!!
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :(
>कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी.
हे एक बरं झालं.
> त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Mon, 04/28/2008 - 10:13
नवीन
का बरे?
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 10:17
नवीन
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
>का बरे?
कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :(
>>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
>म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
चांगली दिसत नाही ना पण..
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 04/28/2008 - 10:21
नवीन
पण प्रॉब्लेम काय आहे?
एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!
करुन बघच...कस्सलं गारगार वाटतं
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 10:27
नवीन
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 04/30/2008 - 07:08
नवीन
:/
बुट पायात घालतात ना?
मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात?
आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी....
मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला....
ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं....
ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला...
बोला कोणकोण येतंय?
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Wed, 04/30/2008 - 07:15
नवीन
चल जाउयात !
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 04/16/2009 - 08:45
नवीन
एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 02/21/2014 - 21:51
नवीन
धम्या प्रश्न सुटला का रे?
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Sat, 02/22/2014 - 01:48
नवीन
उत्तर पण सुटलं, :)
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Mon, 04/28/2008 - 10:21
नवीन
तळपायाला. कोणी तुला पायावर नक्षीदार मेंदी काढायला नाही सांगते.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 04/22/2014 - 08:10
नवीन
रात्री तळपायाला तेल लाव, चांगले घासून घासून लाव्...खूप नको....त्यामुळे सगळी उष्णता बाहेर पडते... :)
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 04/24/2014 - 21:12
नवीन
२००८ च्या प्रश्नावर २०१४ साली उत्तर देता होय ? उत्तर शोधायला पंचवार्षीक योजना राबवली की काय ? :)
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Fri, 04/25/2014 - 10:55
नवीन
धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा!
धर्मराजमुटकेजी,
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST
पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sun, 03/31/2013 - 07:24
नवीन
सालाबादप्रमाणे, रसिक मिपाकरांच्या आग्रहाखातर हा लेख ह्या 'गरमीत' देखील वर आणला आहे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 03/31/2013 - 10:44
नवीन
गुजरातेत 'बसायची' व्यवस्था आहे का रे परा?
- Log in or register to post comments
उ
उपास
Mon, 04/01/2013 - 19:31
नवीन
पराशेठ,
अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 04/28/2008 - 10:09
नवीन
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.
बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
पोहणे हाही एक मस्त उपाय
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 10:14
नवीन
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! )
>उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले !
>पोहणे हाही एक मस्त उपाय
येत नाही त्यामुळे शक्य नाही.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 04/28/2008 - 10:33
नवीन
कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे.
पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे.
तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 10:49
नवीन
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
:,(
>ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.
- Log in or register to post comments
म
माझी दुनिया
Wed, 04/30/2008 - 09:45
नवीन
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X(
आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Mon, 04/28/2008 - 16:40
नवीन
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
(सहमत)केशवसुमार
स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?
- Log in or register to post comments
न
नारदाचार्य
Mon, 04/28/2008 - 16:44
नवीन
गाठ या दोघींची. ती वरदा. (वरदा वैद्य नव्हे, फक्त वरदा. नाही तर तुम्ही भलताच घोळ करायचे.)
- Log in or register to post comments
स
स्वाती राजेश
Mon, 04/28/2008 - 10:41
नवीन
दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव.
सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे.
२-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील).
तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 04/28/2008 - 10:53
नवीन
अनुष्पोटी
मी अनुष्कापोटी वाचले. सॉरी.....
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Mon, 04/28/2008 - 13:57
नवीन
अगदी हेच म्हणतो... =)) =)) =))
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 04/28/2008 - 10:57
नवीन
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही...
फारच त्रास होत असेल तर...
थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या.
आता कोपर्यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात....
डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Mon, 04/28/2008 - 11:08
नवीन
>>बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आणी स्वतः फ्रिजमध्ये बसून प्यावे.. म्हणजे त्रिवेणी संगम!
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Mon, 04/28/2008 - 11:26
नवीन
भारीच. पण धम्याचा उपायपण भारी :)
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 11:09
नवीन
नो कॉमेंट्स
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 04/28/2008 - 11:14
नवीन
रे धमाल मुला,
तू रामदासस्वामींना विवाह सोहळ्याचे वर्णन करून सांगतो आहेस.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 04/28/2008 - 12:01
नवीन
च्यामारी...
=))
- Log in or register to post comments
आ
आर्य
Mon, 04/28/2008 - 11:08
नवीन
पोहणे हाही एक मस्त उपाय
आहा हा......!!!....काय उपाय सांगीतलात विजूभाऊ, कृष्णा काठ अठवला.
- Log in or register to post comments
ध
धोंडोपंत
Mon, 04/28/2008 - 11:27
नवीन
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
आपला,
(धन्वंतरी) धोंडोपंत :D
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 11:45
नवीन
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते.
>दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.
>तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते.
>गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे.
हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची.
>शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Mon, 04/28/2008 - 12:11
नवीन
अरे बापरे!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 04/28/2008 - 12:38
नवीन
वेदश्रीधर्म?
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
दशावतरी पहनारा इजुभौ आगरी
- Log in or register to post comments
व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 12:57
नवीन
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 04/29/2008 - 08:33
नवीन
:$ म्या कुटं म्हनलं की रामायन म्हून. आमच्या महाडात ज्यादा करुन दशावतारी त म्हाभारतच घेत्यात जी
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Mon, 04/28/2008 - 14:07
नवीन
:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच...
मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :<
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »