सार्थक जीवन

जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात.

पंढरीची वारी

महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.

एकादशीची पहाट

एकादशीची पहाट
विठ्ठलाकडे पाठ
फोटोफ्रेम मधे आठ
पांडूरंगा ।।

दर्शन घडू दे
पाऊस पडू दे
भक्ती जडू दे
चरणाशी ।।

वारकरी दहा लाख
कोरोना चा ना धाक
असेच आम्हा राख
विठूराया।।

टाळ मृदंग गजर
दिंड्या पताका हजर
नाचे,गाये, बाजीगर
जन्मोजन्मी।।

भोग

अंतरीचा ठाव माझ्या
अजून मी घेतोच आहे
अनंत जन्मांचे हे देणे
अजून मी देतोच आहे

वृक्ष छाया तापलेल्या
धरणीला देतोच आहे
पोळलेल्या हृदयावर मी
ती छाया घेतोच आहे

धीर देऊन भ्यालेल्यांना
मीही तरी भितोच आहे
अमृताच्या प्याल्यातूनही
विष मी पितोच आहे

इतरांची मी कीवच करतो
परंतु मीही तोच आहे
आयुष्याची शाई संपली
तरीही मी लिहितोच आहे

मरणाची मी वाट पाहतो
तरीही मी मरतोच आहे
जिंकिले जरी षड्रिपू तरी
अजून मी हरतोच आहे

खेळापासून सावल्यांच्या
मैलन मैल पळतोच आहे
सावली जरी माझी पडली
परंतु मी जळतोच आहे

मातीचे पाय

पायांना स्पर्शून आले
ते हात मळाले होते
लख्ख उमगले तेव्हा
ते पाय मातीचे होते

मी केवळ पाहत होतो
पायांच्या खालची धूळ
ती ललाटास लावावी
हे एकच माथी खूळ

मी इथवर पाहून आलो
पाऊलखुणा विरणाऱ्या
आधी खुणावत, मागून
कपटी विकट हसणाऱ्या

आता, पुन्हा चालावे
पुढे, की परत फिरावे?
सोस ना-लायक पायांचे
पुसून अवघे टाकावे?

प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही

ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती.

भेट तुझी माझी होता.

वैशालीतली भेट!
मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या सुलतानाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे सुलतानाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगमकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? आज कुणाचे डोके उडवायचे आहे? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते.

“ चिअर्स! "

“ काय घेणार ? रम, वोडका, वाईन की या पावसात चिल्ड बिअर ? ” तिने नेहमीच्या उत्साहात विचारलं.
“ कॉफी, ” त्यानेही नेहमीसारखं थंडपणे उत्तर दिलं.
“ खूप बोअर आहेस रे तू. ”
“ आता जे पॅकेज आहे, ते आहे तुझ्यासमोर. Want to go for return or exchange ? ”
“ नको, चालवून घेईन. वैसे भी ' तेरे संग एक सिम्पलसी कॉफी भी किक देती है, तेरे संग'.. ” ती खट्याळ चेहरा करून गात म्हणाली.