Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारताच्या तुलनेत

उ
उपयोजक
गुरुवार, 12/29/2022 - 16:33
🗣 204 प्रतिसाद
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 49486 views

🗣 चर्चा (204)
उ
उपयोजक गुरुवार, 01/19/2023 - 07:17 नवीन
ताजे प्रेत यांनी तो प्रतिसाद तिरकसपणे लिहिला आहे. अतिशयोक्ती म्हणून
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/20/2023 - 00:52 नवीन
हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ? हि अजब माहिती तुमहाला कोणी दिली? शक्यच नाही! आधी एक लक्षात घाई कि दोन प्रकारचे एन आर आई असतात १) भारतीय नागरिक जे परदेशात कायम वास्तव्यास आहेत आणि दुहेरी नागरिक नाहीत २) परदेशी नागरिक जे "ओ सी आय" या प्रकारचे भारतीय नागरिक ( ज्यांना कायमचे भारतात राहता येते / काम करता येते पण मताधिकार नसतो आणि अर्थात निवडणुकीला उभे राहत येत नाही ) उलट असे आहे कि जे २) प्रकारचे "ओ सी आय" आहेत त्यानं भारतात पदवी साठी ५ पट शुल्क आकारले जाते .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/20/2023 - 00:45 नवीन
अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे ऑस्ट्रेलियातील उत्तर चालेल का ? सुरवातीचं काळात ६,७ वि पर्यंत तसे आपण म्हणून शकतो , हि वर्षे घोकंपट्टी वर भर कमी असतो आणि अभ्यासक्रम जरी ठरलेला असतो तरी "पाठपुस्तकाप्रमाणे आज हा धडा " असे कमी व शिक्षकाला स्वतःच्या पद्धती प्रमाणे शिकवयाला मुभा असते त्यामुळे भारतीय समजला ते थोडे विस्कळीत वाटते ८ वि पासून मात्र १२ वि पर्यंत गणितावर भर असतोच ...तसा नसता तर येथील पदवी कमी किमतीची ठरली असती ( अभियांत्रिकी ) पण तसे नाहीये अर्थात हे सर्व आता खूप बदलेले असावे कारण भारतात शिक्षणात सुद्धा बदल झालेला दिसतोय मूळ फरक असा कि स्वतःहून शोधून काढून शिकणे यावर भर ( नक्की शब्दात हे वर्णन करत येत नाहीये ) एकूण काय भारतात पदवी पर्यंत शिक्षण उत्तम असल्यामुळे आपण जर इतिहासा बघितलात तर साधारण पने पदवी घ्यायला बाहेर फारसे कोणी जात नाहीत तर पद्वियोत्तर ला जास्त जाण्याकडे लोकांचा कल दिसतो
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 02/26/2023 - 10:16 नवीन
श्री नारायण मूर्ती यांनी भारतीय वृत्तीवर केलेले भाष्य
https://www.loksatta.com/desh-videsh/infosys-founder-narayana-murthy-said-india-needs-culture-of-honesty-just-like-china-know-more-yps-99-3484835/ त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये तुलना करत ते म्हणाले, “१९४० मध्ये चीनचा आकार भारताएवढा होता. पण चीनने वर्क कल्चरच्या जोरावर भारतापेक्षा सहापट प्रगती केली. त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा पाहायला मिळतो.” पुढे नारायण मूर्ती यांनी ‘भारतामध्ये चीनप्रमाणे प्रामाणिकपणाची वृत्ती असायला हवी’ असे विधान केले. भाषण देताना ते म्हणाले, “भारतामध्ये पक्षपात नसलेली संस्कृती असणे आवश्यक आहे. देशाला जलद निर्णय घेत त्यांवर अंमलबजावणी करण्याची आणि त्रासरहित व्यवहार करण्याची गरज आहे. भारतामध्ये कठोर मेहनत करणारे, प्रामाणिक आणि नीतिमत्ता असणारे फार कमी लोक आहे. प्रगती करण्यासाठी यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. परदेशातील व्यावसायिकांनी आपल्याकडे गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला निर्णय प्रणालीमध्ये त्वरीत बदल करायला हवे आहेत.”
त्यांनी केलेले भाष्य आणि येथील चर्चा बर्याच अंशी समान आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा