भारताच्या तुलनेत
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?
पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?
मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?भारतात काय कमी आहे यावर जीतकी आग्रही मते या धाग्यावर मला दिसत आहेत तितकी उपरोक्त ठळक गोष्टींवर येताना दिसत नाहीत. याचा अर्थ एकतर तिकडे सगळे आलबेल व १०० टक्के चांगल्याच गोष्टी आहेत असा घ्यायचा का? की परदेशातील वाईट गोष्टी कबूल करण्यात परदेशस्थ भारतीयांना कमीपणा वाटतो? गेल्या काही महिन्यात एका तूनळीवर ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची मुलाखत पाहण्यात आली. त्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेल्यामुळे किती आर्थिक ताण येतो, तेथे कसं जूळवून घ्यावं लागतं याबाबत माहिती दिली. त्यामधल्या बऱ्याच जणांनी शैक्षणिक कर्ज घेऊन तो देश गाठला होता व तिथंच राहून पैसे मिळवून कर्ज फेडलयाशिवाय भारतात परत येता येणं शक्य नव्हतं. एका मुलीचा स्पेशलायजेशन विषय तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठीच्या अटीमध्ये बसत नव्हता. हे तीला खूप उशीरा कळाले. तीला आता भरतात परत यायचंय परंतू तीच्या आईवडीलांनी तीला कर्ज फेडल्याशिवाय भारतात परत यायचं नाही असं स्पष्ट सांगतीलं. कारण तिथलं महागडं शिक्षण घेऊन इथे कमी पगारावर नोकरी करुन हप्ते फेडता येणे शक्य नव्हते. एकाही विद्यार्थ्यांला भारतात परत यायचंच नाही असं दिसत नव्हतं. परंतू त्यांना एकूण अर्थकारणामुळे (शैक्षणिक कर्ज फेडणे+नंतरचे स्थैर्य मिळण्याकरीता) तिथेच राहणं भाग होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वाटलं. तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे. परंतू आपणच आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. असो. अशा प्रकारच्या काही बाजूंवर परदेशस्थ भारतीय प्रामाणिकपणे व्यक्त झाले तर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. अन्यथा धागा भरकटलेला आहेच.पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"?मला ह्या प्रवासाचा भारतात इतका बाउ का केला जातो तेच समजत नाही. मी अगदी कोरोना चे लॉकडाउन सुरू होइ पर्यंत रोज १ - १.२५ तास कार / बस किंवा कार / मेट्रो रैल असा प्रवास जवळपास १० -१२ वर्षे नियमीत केला आहे. तेही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या तीन्ही ॠतु मधे. यात रोज जवळ्पास अर्धा मैल पायी पण चालावे लागे. भारतात लोकांना डोर टु डोर सर्वीस लागते. माझ्या ऑफीस मधे माझ्या पेक्षा जास्त प्रवास करुन अगदी सायकल वरुन येणारे पण अनेक लोक होते. मी कधीही कुणालाही ह्या प्रवासाचा त्रास होतो. मी थकुन जातो वगेरे वगेरे बोलताना पाहिले नाही. तसेही भारतात मी होतो तेव्हा ऑफीस म्हणजे १० - ५ (वर मधे १ तास लंच ब्रेक) असला प्रकार होता. इथे ऑफीस ८ - ५ असते. तरीही कुणी फार काम करतो मला त्रास होतो अशा तक्रारी करत नाही. भारतीय पण नाही. मग ह्या तक्रारी भारतातच का केल्या जातात?