मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.याच निकषानुसार इस्लामचा विजय झाला असेही म्हणता येईल कारण हिंदुत्ववादी पक्षाच्या फडणवीसांनी दर्ग्यावर चढवून आणलेली चादर कपाळाला लावून नमस्कार केला, डोक्यावर जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टी दिली, कोणत्या तरी दर्ग्यासमोर झुकते, सेनेचे सुद्धा धर्मांध टिपूचे नाव मैदानाला दिले, जनाब ठाकरे असा उल्लेख सुरू केला, अजान स्पर्धा भरविली . . . हा तर इस्लामचा विजय आहे.जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल. नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?