मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
सामना मध्ये मास्तरच्या (श्रीराम लागू) तोंडी निळू फुलेंच्या पाळलेल्या गुंडाला उद्देशून एक संवाद आहे तो आठवतो. 'तुमच्या या निरागस निर्बुद्धपाणाचे रहस्य काय'?मलाही भाजप समर्थकांना पाहून हाच प्रश्न पडतो. वय झाल्यामुळे होत असावे कदाचीत. :)पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही?पाच वर्षे काम करतो ह्या पेक्षा कसे करतो हे महत्वाचे. त्यांच्या काळात पुरग्रस्तांना मदत मिळायची.भाजप अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेताना दिसतो यामागे काहीतरी कारण असेल कि नाही?काय कारण आहे? तामिळनाडू, पंजाब या दोन राज्यात भाजप दुय्यम भूमिका घेतो कारण तेथे भाजपचा मताधार स्थानिक पक्षांपेक्षा खूपच कमी आहे. परंतु बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही दशकानुदशके दुय्यम भूमिका घेतल्याने भाजपचा फक्त तोटाच झाला आहे. या दोन्ही राज्यात मुख्य भूमिका घेतल्यानंतरच भाजपचा फायदा झाल्याचे स्पष्ट दिसले. तरीही भाजप पुन्हा एकदा यांच्या वळचणीला जाऊन शेवटी दुय्यम भूमिकेतच राहिला.जर श्री मोदी आणि शहा गुजरात सारख्या राज्यात २२ वर्षे सत्ता एकहाती निवडून आणतात आणि केंद्रात दोन वेळेस स्वबळावर सरकार स्थापन करतात तर त्यांच्या राजकीय समंजसपणा आणि आकलनशक्ती मध्ये इतकी मोठी चूक असणे शक्य नाही.मोदी-शहांची आकलनशक्ती व राजकीय समंजसपणा अत्यंत अचूक आहे असे निदान मी तरी म्हणणार नाही. २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांबरोबर दिल्ली विधानसभेची निवडणूक घेतली असती तर भाजपची फक्त ३ जागा जिंकण्याइतकी दारूण परिस्थिती झाली नसती. डिसेंबर २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ३२ व आआपने ३८ जागा जिंकल्या होत्या. मे २०१९ मध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ७ जागा भाजपने जिंकल्या होत्या ऑक्टोबर २०१९ मध्ये दिल्लीत भाजपने बहुमत जिंकण्याची शक्यता होती. परंतु मोदी-शहांनी निवडणूक लांबवून केजरीवालांना सावरण्याची संधी दिली व स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. फेब्रुवारी २०१९ मध्ये अजिबात गरज नसताना सेनेच्या अटींवर सेनेशी युती करणे, महाराष्ट्रातील जेष्ठ नेते फडणवीस संपवून पक्ष खिळखिळा करीत असताना त्यांना पाठिंबा देणे, नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करणे, डिसेंबर २०२० मध्ये नितीशकुमारांना निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देणे इ. निर्णय मोदी-शहांच्या चुका दृग्गोचर करतात.परंतु बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही दशकानुदशके दुय्यम भूमिका घेतल्याने भाजपचा फक्त तोटाच झाला आहे.ईथे सरळ दिसतंय की १९९५ ला सेनेला १६.३९ टक्के तर भाजपला १२.८० टक्के मते पडलीत. तरीही श्रिगुरूजी धडधडीत खोटं विधान करताहेत.बिहार व महाराष्ट्र येथे भाजपचा मताधार प्रारंभापासूनच तथाकथित स्थानिक मित्रपक्षांपेक्षा खूप जास्त असूनही