मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
काका रॉक्स ऑलवेज.हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात. काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटतेआजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही.काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत. आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना??ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही.ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली.ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत.ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :)त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असतानाह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही.काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते.हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र
असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही तेंव्हा तुमचे चालू द्याविकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा..बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार)सहमत. तसे नसते तर आमदारपुत्र फडणवीस पुन्हा निवडूण आले नसते.वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे.हे असे कुठला ऊद्योगपती बोलला? की द्वेषातून तुम्ही तुमच्या मनाचंच दिलं चिपकवून?त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल.कालच नारळ फूटला. बच्चू कडूंच्या क्लिनचीट पासून. आता किलिनचीट यामीनी जाधवांना की सरदेसाईंना? अशी पैज लागलीय मित्राची नी माझी.मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही.म्हणजे ती भ्रष्ट नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का??