चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
लसोत्सवावर
आहे @बिरुटे सर आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. करोना हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर आजतरी औषध नाही भारताची लोकसंख्य १३८ कोटी आहे. यापैकी ७० टक्के लोकांना लस दिली किंवा त्यांना करोना झाला तर आपल्याला हर्ड इम्युनिटी येऊन हि महामारी संपेल याचा अर्थ रोज २ लाख लोकांना लस दिली तर पूर्ण लसीकरण होण्यास दीड वर्ष लागेल. इतक्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारणे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारणे हि सोपी गोष्ट नाही. त्यातून लस वाया जाण्याचे प्रमाण ५% गृहीत धरले तर (यातील राजकारणात मी जात नाही). पूर्ण लसीकरणासाठी दोन वर्षे जातील हे गृहीत धरणे आवश्यक आहे. लसोत्सव म्हणण्यासाठी कोणतेही आरोग्य कर्मचारी तेथे दिवाळी करायला आलेले नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. आपल्याला सरकारला( कोणत्याही पक्षाचे) मदत करता येत नसेल तर करू नका पण दुसऱ्याचे घर जळत असेल त्यावर पाणी टाकता येत नसेल तर निदान त्यावर टाळ्या पिटू नये एवढे व्यवधान असायला हवे होते.पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ?निवडणुक वेळापत्रकानुसार घ्यायची का पुढे ढकलायची हा निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेऊ शकत नाही. या निर्णयाचे अधिकार निवडणुक आयोगाकडे आहेत. राज्य सरकालचा विरोध असूनही विधानसभा निवडणुक आधी घेण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या काही घटना भूतकाळात घडलेल्या आहेत.म्हणजे केंद्र सरकार आणीबाणी निवडणूक पुढे ढकलू शकत होते, १ वर्षापर्यंत, तर हे महत्वाचे२६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी निवडणुक आयोगाने या ५ राज्यात निवडणुक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी भारतात सर्वत्र कोरोनाप्रसार खूपच कमी झाला होता. ३ महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणुक व्यवस्थित पार पडली होती व त्या काळातील प्रचारामुळे कोरोनाप्रसार वाढला नव्हता. अशा परिस्थितीत देशात आणिबाणी जाहीर करणे व त्याद्वारे निवडणुका पुढे ढकलणे यासाठी केंद्राकडे कोणतेही सबळ कारण नव्हते.