चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याबद्दल पहिली केस रजिस्टर.शशांक यादव नावाच्या मुलाने आजोबांसाठी ऑक्सिजन पाहिजे असे ट्विट केले, ते द वायर च्या पत्रकारांनी स्मृती इराणी यांना कळवले, कारण मुलगा अमेठीचा होता, स्मृती इराणींनी दखल घेऊन प्रयत्न केले. पुढे समजले, कि हे आजोबा रात्री हार्ट अटॅक येऊन गेले.अमेठी पोलिसांनी "आजोबांना कोव्हिड झाला नव्हता आणि डॉक्टरांनी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केला नव्हता" या कारणासाठी शशांक यादव वर केस केली.शशांक यादवने ऑक्सिजनसाठी ट्विट केल्यानंतर स्मृती इराणींंनी त्याला तीन वेळा फोन केला. पण त्याचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना त्याला मदत करण्यास सांगितले. नंतर पोलीसांनी फोन क्रमांकावरून पत्ता शोधून ऑक्सिजन सिलींडर बरोबर घेऊन त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा ते घर बंद होते. काही वेळाने त्याचा फोन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तो कोठे आहे ते शोधले, तेव्हा तो वेगळ्याच ठिकाणी झोपलेला होता. नंतर समजले की मृत व्यक्ती ८८ वर्षांचे आजोबा असून काल रात्रीच ते ह्रुदयविकाराने गेले व त्यांना कोरोना झालेला नव्हता व ऑक्सिजन सुद्धा नको होता. तसेच ते त्याचे आजोबा नसून कोणत्या तरी मित्राचे आजोबा होते. हा सर्व प्रकार एकंदरीत शशांक यादवचा खोडसाळपणा दिसतो. स्मृती इराणी व पोलिसांनी धावपळ करून आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडलेले दिसते. त्यामुळे आधीच प्रचंड काम असणाऱ्यांंना खोटी माहिती देऊन विनाकारण धावपळ करणाऱ्या विरूद्ध तक्रार दाखल करणे योग्य आहे. ऑक्सिजन, रेमेडिसिवर मागितले म्हणून उत्तर प्रदेशात अनेकांविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे असा आरोप आआपच्या मुंबईतील प्रतिनिधी प्रीति मेनन यांनी केला. परंतु अनेकदा विचारूनही तक्रार झालेल्याचे एकही नाव त्यांना सांगता आले नाही. दिल्लीतील यमुना विहार भागातील एका रूग्णालयाच्या डॉक्टरांनी एक चित्रफीत ट्विटरवर टाकली आहे. ऑक्सिजन सिलींडर मागितल्यानंतर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली व ऑक्सिजन हवा असल्यास स्वतः जाऊन टँकर घेऊन या असा सल्लाही दिला, असे ते सांगतात. ऑक्सिजन अभावी आमच्या नातेवाईकाचा मृत्यु झाला असे सांगत एकाच मृताचा फोटो घेऊन वेगवेगळ्या रूग्णालयाबाहेर २० हून अधिक जण बसले आहेत, असे चर्चेत सांगितले गेले. एकंदरीत हा सुद्धा खोडसाळपणा वाटतो. कोरोना संसर्ग हाताळण्यात केंद्र व सर्व राज्य सरकारे कमी पडली याविषयी दुमत नाही. परंतु तथाकथित शेतकरी आंदोलनाप्रमाणे कोरोनासंदर्भातही एक योजनाबद्ध प्रपोगंडा सुरू झाला आहे अशी शंका येत आहे.लोक योग्य वेळ आली की योग्य बदल करतात, काळजी करु नका. लोकांना सरकारविरुद्ध उठाव करायला वेळ लागत नाही.बदल करण्यासाठी फक्त योग्य वेळ पुरेशी नाही. बदल करण्यासाठी योग्य कारणे व योग्य पर्याय सुद्धा असावा लागतो. सध्या बदलासाठी योग्य वेळ नाही व योग्य कारणेही नाहीत. पर्याय तर नाहीच नाही. त्यामुळे बदलासाठी प्रतीक्षा करावी लागेल.लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे.आपणच हे आंदोलन करण्यास प्रारंभ करावा.