Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)

व
वामन देशमुख
Wed, 04/14/2021 - 12:20
🗣 266 प्रतिसाद
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे. यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल. युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली. हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे. पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी. अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या. ... ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69808 views

🗣 चर्चा (266)
ल
लिओ Mon, 04/19/2021 - 11:15 नवीन
मार्च २०२० मध्ये माननीय पं. प्र. नी रातोरात लॉकडाऊन लावले.जबाबदारी कोणाची ?? करोना उपचाराचे डोस मिळाले ? पण जबाबदारीने उपदेशाचे डोस नक्किच वाटले. लोक दिवे लावत गेले, लॉकडाऊन उजळत गेले, २०२०मध्येच लॉकडाऊनची सुधारित आव्रुत्ती आली कि राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, पुन्हा २०२०मध्येच लॉकडाऊनची सुधारित आव्रुत्ती कि संबधित जिल्हा कलेक्टरने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा ......... प्रॉब्लेम काय आहे ? संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याआधी नागपुरच्या शेजारी अमरावती, यवतमाळ येथे लॉकडाऊन लावला गेला. शेजारच्या नागपुर जिल्ह्यातील नेत्यांची उतरली नव्हती काय ? जे संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावल्यावर तोंडाने शिमगा करु लागले ?? गडकरी फार छोटे नेते आहेत, स्वताचे वजन वापरून नागपुरला ऑक्सिजन पुरवण्यासाठी लक्ष घातले, नागपुरमधील महान नेते रस्त्यावर शिमगा करुन महाराष्ट्राची परिस्थितीत सुधारणा करणार. आपला तो बाब्या दुसर्याचे ते कार्टे हे सत्य जाणवत आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 04/19/2021 - 16:45 नवीन
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कोव्हिड पॉझिटिव्ह आल्यामुळे दिल्लीत एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. https://www.thehindu.com/news/national/former-pm-manmohan-singh-tests-positive-for-covid-19-admitted-to-aiims/article34359554.ece
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/19/2021 - 18:18 नवीन
https://www.sumanasa.com/go/6qQcw6 निर्णय घेवू तरी लागले
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/19/2021 - 18:20 नवीन
https://www.sumanasa.com/go/xqQcw6 केंद्र सरकार active झाले आनंदाची गोष्ट आहे
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 04/19/2021 - 19:51 नवीन
११ जुलै २००६ रोजी मुंबईत उपनगरीय रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात हात असल्याबद्दल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेला कमाल अहमद महमद वकिल अन्सारी कोरोनामुळे आटोपला. पहिल्यांदाच कोरोनामुळे कोणी गेल्यानंतर बरे वाटले. या बॉम्बस्फोटात जखमी झालेला एक प्रवाशी तब्बल १२ वर्षे कोमात होता आणि त्याचे २०१८ मध्ये निधन झाले. असल्या घृणास्पद प्रकारात सहभागी असलेल्या या कमाल अहमद या हरामखोराला नरकातून सुध्दा पार्श्वभागावर लाथ मारून हाकलतील!! आता प्रशांत भूषण, योगेन्द्र यादव आणि तत्सम घाणेरड्या लोकांना रात्री तीन वाजता सुप्रीम कोर्ट उघडायला लावायची वेळ येणार नाही. गिरीश कुबेरांना लोकसत्तात 'कमालके अब्बा' हा अग्रलेख लिहावा लागणार नाही. https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/mumbai-bomb-blast-accused-dies-of-coronavirus/articleshow/82149462.cms
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 03:07 नवीन
https://www.lokmat.com/politics/rahul-gandhi-all-rally-west-bengal-canceled-a607/amp/ शोले काॅईन उर्फ डब्बल ढोलकी.... हरलो तर म्हणणार की, मी प्रचार केला नाही म्हणून हरलो जिंकलो तर म्हणणार की, भाजपचे इतके प्रचारक असून पण हरले .... कॉंग्रेसची शोले काॅईन्स, आता बाजारात चालणार नाहीत...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/20/2021 - 04:28 नवीन
कितीही प्रचार केला तरी कॉंग्रेसला बंगालमध्ये काहीही भवितव्य नाही, हे राहुलला माहिती आहे. त्यामुळे कोरोनाप्रसाराचे कारण दाखवून प्रतिमासंवर्धनासाठी त्याने प्रचारसभा न घेण्याचे ठरविले आहे. यामागे हेतू प्रामाणिक नसला तरी हा निर्णय योग्य आहे व मोदी, ममतांसकट सर्वांनी हाच निर्णय घेऊन प्रचारसभा, पथयात्रा वगैरे गर्दीचे कार्यक्रम बंद करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/20/2021 - 05:58 नवीन
वाईट बातमी भाजप चा स्टार प्रचारकाने माघार घेतली आता भाजपचं बंगाल मध्ये काही खरं नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 06:40 नवीन
ते पण आहेच म्हणा ...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/20/2021 - 07:16 नवीन
इस्राएलने १००% लसीकरण झाले आहे आणि कोरोनावर मात केली आहे. इस्राएलला जमले ते मोदींना भारतात का करता आले नाही असा घणाघात सामनातून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर घातला आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/20/2021 - 08:35 नवीन
संजय उवाच ऐकून धन्य झालो ... हसावे कि पादावे हे कळेना ... आता सर्व मिपाकर मिळून एक काम करूयात ,, र १८८ आणि मामू यांची आणि संजय यांची भेट घडवून आणू यात र १८८ यांनी पुढे असा सल्ला दिला आहेच कि महाराष्ट्राने चीन बरोबर डिरेक्त वयहार करावा रेमिडीसीवर का काय ते मिळवण्यासाठी .... मग चीन कशाला इस्राएल बरोअबर मामुंनी व्यापार करावा आणि मोदींना जे जमले नाही ते निदान महाराष्ट्ररा पुरते तरी करावे .... अरे पण यात गोची होईलइस्राएल बरोअबर व्यापार केला तर "मोमीनपुऱ्यातील" लोकांना वाईट वाटेल ना ! ... नक्कोच ते .. रद्द १८८ आणि मामूनची भेट रद्द ...
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 04/20/2021 - 08:07 नवीन
मोठी बातमी! Remdesivir बाबत सरकारी टेंडरकडे कंपन्यांनी फिरवली पाठ; राज्य सरकारसमोर पेच-https://lokmat.news18.com/mumbai/pharmaceutical-companies-did-not-respond-to-maharashtra-governments-remedesivir-tender-rp-542122.html?utm_source=social_share_article आता बसा.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/20/2021 - 08:12 नवीन
ब्रुक फार्माच्या मालकाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे दमणहून याच सरकारच्या पोलिसांनी उचलून आणले हे पाहता या सरकारपासून दूरच राहावे असे कंपन्यांना वाटले तर त्यात त्यांची चूक कशी म्हणता येईल? समजा फडणवीस-दरेकर वेळेत पोलिस स्टेशनला पोचले नसते तर ब्रुक फार्माच्या मालकाचा पण मनसुख हिरेन झाला असता का? सध्याच्या परिस्थितीत सामान्य लोकांना मदत व्हावी असे कितीही वाटले तरी हे विकतचे दुखणे गळ्यात लोढणे म्हणून कोण कंपनी मालक अडकवून घेईल आणि कशाकरता घ्यावे?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 08:19 नवीन
Remdesivit भारतीय कंपन्या महाराष्ट्र ला देत नसतील तर चीन शी महाराष्ट्र नी संपर्क करावा आणि तेथून आयात करावी मुंबई मध्ये. इम्रानला सुद्धा विचारायला काही हरकत नाहीं
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 04/20/2021 - 08:22 नवीन
आपले चरण कुठे आहेत स्वामीजी?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/20/2021 - 08:37 नवीन
तुम्हाला सापडले कि मला हि कळवा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/20/2021 - 08:27 नवीन
पण आयातीला केंद्राची परवानगी लागते. ती नाही मिळाली तर चीन/पाकिस्तानला लसींचे कंटेनर मुंबईत एअरड्रॉप करण्यास सांगावे किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना राज्य सरकारने स्वखर्चाने चीनला पाठवून त्यांचे लसीकरण करून आणावे व या कंपन्याचे व मोदींचे नाक कापावे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 08:47 नवीन
व्हाइट कॉलर लोक जी ह्या भूमी ची लेकर आहेत तीच परकी झाली आहेत औषध नाही मिळाले की ह्यांना आनंद होतो,लस उपलब्ध नाही झाली की ह्यांना आनंद होतो. त्या इम्रान भाई ,भाई ला contract देतील ते लस पोचवायचे तो तरी ह्या माती चे उपकार फेडेल. सिनेमा मध्ये पण दाखवतात ना घरातील बेरोजगार मुलगाच आई वडिलांची सेवा करतो तसे(सिनेमा साहेब). ज्या शेतकऱ्यांना white कॉलर लोकांनी शिव्या दिल्या .तेच शेतकरी संकट काळात भाज्या,दूध ह्यांची कमतरता येवून देत नाही . आणि रोज दोन घास पोटात जात आहेत.. बाकी सर्व संधी च फायदा घेवून लूट करत आहेत किंवा अडवणूक..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 09:42 नवीन
+१ भाजप हा राज्य करण्याच्या लायकीच पक्श नाही सुदैवाने हे लोकांना आता कळलेय. सुदैवाने राज्यात भाजप सत्तेत नाही. देश कधी भाजपमूक्त होतो ते पाहूयात.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/20/2021 - 10:14 नवीन
राज्यात भाजपा सत्तेत नाही म्हणूनच राज्य करोना बाबतीत एक नंबरवर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 10:46 नवीन
+१ भाजपा सत्तेत असती तर गुजरात प्रमाणे आकडे लपवले असते आणी महाराष्ट्र राज्य कोरोना बाबतीत एक नंबरवर नसते. :) महाविकास आघाडीवाले मुर्ख आहेत खरे आकडे देवून स्वतची घालवून घेत आहेत. महाविकास साॅरी गुन्हा सिध्द झालेला नसला तरी भाजपेयीनी निकाल दिलेला असल्याने महावसूली म्हणूयात महावसूली आघाडीचा निषेध. :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 11:14 नवीन
अगदीं अगदी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/20/2021 - 08:24 नवीन
या कंपन्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने महाराष्ट्राबाहेर जावे. अन्यथा पोलीस उचलून नेतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 09:12 नवीन
एवढंच आहे की इतके पण राजकारण करू नका की आपलेच परके वाटायला लागतील. लोक औषदा वाचून तडफडून मरत आहेत आणि तेच औषध महाराष्ट्रर ला मिळू नये म्हणून सत्तेचा वापर करू नका. लस मिळू नये म्हणून सत्तेचा वापर करू नका. महाराष्ट्र लाचार होवून केंद्र सरकार पुढे औषध आणि लस ह्यांची भीक मागत उभा राहिला पाहिजे ही कोणती मानसिकता. देशात असे राजकारण कधीच झाले नाही. आणि औषध ,आणि लस मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या की जो काही लोकांना आनंद होतो. तो कोणता आनंद.त्याला राक्षसी आनंद च म्हणले पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 09:46 नवीन
+१ असो. महाआघाडी सरकार खंबीर आहे. गुजरात हाल भोगतच आहे. केंद्रात ही स्वपक्शाचे सरकार असल्याने गुजराती राज्यकर्त्याना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहण करावा लागतोय. सुदैवाने विकासपुरूष केजरीवाल असो की ठाकरे केंद्राचे गलिच्छ खेळ जनतेसमोर आनताहेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/20/2021 - 09:54 नवीन
आज तन्मय फडणवीस ट्रेंडिग मध्ये आहे .
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/20/2021 - 10:49 नवीन
४५ वर्षांहून कमी वय असूनही दुसर्यांदा लसीचा डोस घेतला. :) आता मुर्ख काॅग्रेसी गुलाम किंवा शिवसैनिक वशिलेबाजीचा आरोप लावतील त्यांचा आधीच निषेध. आपण सर्व भाजप समर्थकानी ह्यावर मौन पाळूयात :)
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/20/2021 - 11:24 नवीन
खर तर ह्यात जे दोषी कोणी दोषी असतील तर कारवाई केली पाहिजे. फडणवीसांवरती टीका करून काय होणार आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री असले असते तर टीका योग्य आहे, पण स्वतः सत्तेत असताना कारवाई करायची सोडून काँग्रेस चे आमदार मिडिया मध्ये टीका करत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/20/2021 - 11:44 नवीन
तर विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात येतील याची भीती वाटत असावी बहुदा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/20/2021 - 11:44 नवीन
वयोमर्यादा पाहून लसिकरण करण्याची जबाबदारी कुणाची आहे ? राज्यसरकारची की फडणविसांची ? आणि वशिलेबाजी करुन लस दिली असेल, तर राज्यसरकारने काय कारवाई केली ज्याच्या वशिला होता त्याच्यावर ?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 13:41 नवीन
घराणेशाही कन्सेप्टचा कॉपीराईट भंग झालेला दिसतोय वरकरणी. :)
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/20/2021 - 11:55 नवीन
https://www.esakal.com/mumbai/remdesivir-arranged-by-bjp-was-for-maharashtra-government-clarification-fda-minister-rajendra-shingne
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 04/20/2021 - 12:19 नवीन
म्हणजेच रेमेडीसीविर इंजेकॅशन्स च credit फडणवीस यांना व पर्यायाने भाजपला मिळू नये या साठीच पोलिसांनी कारवाई केली असे दिसतंय. पण ह्या सर्वात नुकसान झाले हे महाराष्ट्रातील करोना रुग्णाच झालं.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Tue, 04/20/2021 - 12:19 नवीन
Image removed. हे ट्वीट निट पहा कोरोना लसीचा हा दुसरा डोस आहे, जर लस मिळणार होती तर ती घरी का घेतली नाही ? लोक ट्विटरवर विचारत आहेत रेडमिसिवर लसी प्रमाणे कोरोना लसीचा सुध्दा गुप्त साठा भाजपाकडे आहे कि काय ?? शरद पवार सातार्‍यात पावसातील सभेत म्हणाले "मी म्हातारा आहे काय ? " त्या शरद पवारांना म्हातारा ठरवण्यासाठिच त्यांना लसीचा दुसरा डोस घरी दिला कि काय ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 12:45 नवीन
पुतण्या ची वृत्ती बघा ,हुकूमशाही वृत्ती आहे त्याचा काका विरोधी पक्ष नेता आहे म्हणून हा काही पण करणार . राहुल गांधीच्या घराणेशाही वर टीका करणारे आता गप्प आहेत. राहुल जी सुशील ,सुसंस्कृत तरी आहेत.. आणि हे ह्यांचे वारस बघा गुंड,बेशिस्त , अडाणी,
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 04/20/2021 - 13:01 नवीन
तो दूरचा कुणीतरी नातेवाईक आहे आणि त्याचं आडनाव फडणवीस आहे. तो काही राजकारणात नाही. देवेंद्रजींचा वारसदार नाही. उगीच कुठे तरी बादनारायण संबंध लावणे सोडा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 13:24 नवीन
खोटे बोलता येत असेल तर च bjp मध्ये प्रवेश मिळतो असा काही नियम आहे का? तन्मय हा देवेंद्र जी च्या भावाचा मुलगा आहे.हे लांब चे नाते आहे का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 13:26 नवीन
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/20/2021 - 13:31 नवीन
https://www.esakal.com/mumbai/tanmay-fadnavis-corona-vaccine-issue-amruta-fadnavis-tweet-befitting-reply-shivsena
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/20/2021 - 14:03 नवीन
उत्तरप्रदेशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, उत्तरप्रदेश सरकार हतबल झाले होते. कोणतीच कार्यवाही होत नाही, असे पाहून एका याचिकेत लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूरमधे २६ एप्रीलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दखल केली होती. योगी सरकारच्या वतीने म्हटल्या गेले की लॉकडाऊनचे आदेश देणे न्यायपालिकेच्या कक्षेत येत नाही. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अगदी योग्य आहे, पण योगी सरकार कोरोनात हतबल दिसत आहे, हेही तितकेच सत्य आहे. दरम्यान योगी सरकारने संपूर्ण राज्यात शनिवारी आणि रविवारी राज्यात लॉकडावूनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राने ज्या पद्धतीन विकेंडला लॉकडाऊन केले. अत्यावश्यक आस्थापनांना परवानगी देऊन इतर आस्थापना गर्दीच्या दुष्टीने बंद ठेवले त्याच पद्धतीने युपी सरकार प्रयत्न करीत असतांना दिसत आहे, महाराष्ट्राच्या लॉकडाऊनला नावे ठेवणा-यांनी आत्ता योगी सरकारची काळजी घ्यायला हवी, तिकडे काय काय मदत दिल्या जाते, कशी दिली जाते, तेही आपण पाहात राहु या. दुसरी गोष्ट, केंद्रसरकारचा महाराष्ट्र द्वेष नेहमीच दिसून आला आहे, मदतीतही सतत दुजाभाव ठेवला. दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी ) खरंय महाराष्ट्र जसे तसे जमले तसे करोनावर नियंत्रणासाठीचे आपल्या लेवलचे ते सर्व प्रयत्न करीत आहेत, पण केंद्र म्हणून आपली भूमिका ही सहकार्याची असायला पाहिजे, आपला द्वेष किमान अशा संकटप्रसंगी तरी दिसू नये अशी अपेक्षा आहे. लोक सुखातले प्रसंग विसरतील पण दु:खात कोण कोण सहभागी होतं, कोणी कोणी मदत केली, कसं द्वेषाचं राजकारण केलं त्याला महाराष्ट्र विसरणार नाही. करोना काळात प्राण गमावणा-या आरोग्य योद्द्यांचे विमाछत्र पन्नास लाखाचं जे सुरक्षा देणारी विमायोजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, करोना काळात पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचा-यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुंटूंबियांना आधार देण्यासाठी ही योजना सुरु झाली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील महिन्यामधे राज सरकारांना पाठविलेल्या पत्रात २४ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आल्याच म्हटलं आहे. सदरील पत्रावरुन सरकारवर टीका व्हायला लागल्यावर २४ एप्रीलपर्यंतची येणारी सर्व प्रकरणे दावे निकाली काढल्या जाणार आहेत न्यु इंडिया इन्शोरन्स कंपनीशी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. (बातमी ) सरकारच्या धोरणावर टीका झाली नसती तर ही योजना केव्हाच गुंडाळल्या गेली असती. ''तन्मय फडणवीस पुतण्या नसून दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लशीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही, जर नियमानुसार हे सर्व झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही.'' (फडवणीस साहेबांचं ट्वीट) अरे भावा, आपलं लशी दिल्याबद्दल आक्षेप नैच ये, पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली. आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. ( ट्वीट आणि खुलासा. ) अध्यक्ष महोदय, आपलं राजकारण संपवतील बरं हे सगळे मिळून. आणि वरच्या शेठ लोकांवरही जास्त विसंबून राहू नका. सिंहासन मिळवून देण्यात ज्या थोरामोठ्यांचे तपस्वी हात होते ते सर्व अडगळीत पडले आहेत. आपलंही तसं व्हायला काही वेळ लागणार नाही. आपल्या गप्पा आपल्याला आवडतात, एक मिपाकर म्हणून आपल्याला सल्ला द्यावा वाटला, पुन्हा म्हणू नका तुम्ही तर काही बोलले नव्हते म्हणून. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/20/2021 - 14:08 नवीन
आपला द्वेष किमान अशा संकटप्रसंगी तरी दिसू नये अशी अपेक्षा आहे. उठबस "टाळ्या थाळ्या, + मनकी बात" अशी चेष्टा करनार्यांनी असे लिहावे !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/20/2021 - 14:17 नवीन
आदरणीय पंतप्रधान यांनी करोनाच्या काळात भारतियांना जो दिवाबत्तीचा, टाळ्या- थाळीचा जो कै च्या कै टास्क दिला, तो आपल्या कायमच टिंगल टवाळीचा विषय आहे, हे नम्रपणे नमूद करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 04/20/2021 - 15:47 नवीन
"टाळ्या थाळ्या - दिवे लावणे" यामागचा उद्देश "कोणाच्यातरी डोक्यात प्रकाश पडावा" हा नक्कीच नव्हता. एवढे नम्रपणे नमुद करतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/20/2021 - 14:15 नवीन
>>> आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. कारगिल युद्धातील हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी बांधलेल्या आदर्श इमारतीत आदर्श मुख्यमंत्र्यांचे दिवंगत वडील, सासूबाई, मेव्हणा व मेव्हणी याना प्रत्येकी १ अश्या एकूण ४ सदनिका वाटल्या होत्या. याविषयी पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर, "ते माझे खूप लांबचे नातेवाईक आहेत" असे उत्तर आदर्श मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/20/2021 - 14:20 नवीन
हा हा हा.... गुरुजींनी पंच्यालाच हात घातला!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/20/2021 - 14:18 नवीन
अरे भावा, आपलं लशी दिल्याबद्दल आक्षेप नैच ये, पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली. आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. -- लस देताना तो पात्र आहे की नाही हे तपासायची जबाबदारी कोणाची होती, फडणवीसांची की लस देणार्‍या कर्मचार्‍यांची ? की मोदींची ?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 04/20/2021 - 19:07 नवीन
याला मोदी(च) जबाबदार आहेत. आजकाल सकाळी पोट साफ झाले नाही तरी त्याला मोदीच जबाबदार असतात ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 19:19 नवीन
मोदी ज्वराला उपाय नाही...
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 04/20/2021 - 14:27 नवीन
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे.
तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? या प्रश्नाला दिलेल्या महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे' या उत्तरात नेमकं काय वावगं आहे हे मला कळलं नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/20/2021 - 14:33 नवीन
दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी ) ही मुलाखत टाईम्स नाऊ यांनी घेतली होती व त्यांनीच या मुलाखतीतील माहिती खालील पानावर दिली आहे. अमित शहा असे म्हटल्याचे यात कोठेही लिहिलेले नाही. अमित शहांची खालील वाक्ये पहा. On some states' allegation of step-brotherly treatment amid COVID On this question, the HM said that this charge is nothing but 'plain politics'. "Remdisivir is being manufactured in both Maharashtra and Gujarat. We have given more Remdisivir injections to Maharashtra than Uttar Pradesh. I can understand their (Maharashtra) concern due to high cases but this kind of politics is not right," the BJP leader said. https://www.google.com/amp/s/www.timesnownews.com/amp/india/article/amit-shah-interview-with-navika-kumar-of-times-now-covid19-lockdown-kumbh-news-west-bengal-election/746620 प्राध्यापक डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेल्या बातमीचा दुवा सामनाचे मांंडलिक असलेल्या मटाचा आहे. भाजपविरूद्ध धडधडीत खोटे लिहिणे, भाजपविरोधात असलेल्या शिवसेना व इतर पक्षांची चाटुगिरी हेच मटामधून होत असते. मटा हे वृत्तपत्र नसून विकाऊ प्रकाशन आहे. या बातमीने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा