Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)

व
वामन देशमुख
Wed, 04/14/2021 - 12:20
🗣 266 प्रतिसाद
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे. यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल. युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली. हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे. पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी. अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या. ... ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69808 views

🗣 चर्चा (266)
ध
धनावडे Sat, 04/17/2021 - 05:48 नवीन
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत कि प्रश्नच समजत नाहीत कि वेळ जात नाही म्हणून TP करताय??
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 04/17/2021 - 06:01 नवीन
त्यांनी ओकलेली गरळ वाचून लोकांचे मतपरिवर्तन होऊन ते मोदींना/भाजपाला मत देणार नाहीत असे त्यांना वाटते...म्हणूनच हा सर्व खटाटोप
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 04/17/2021 - 06:08 नवीन
अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे येणे म्हणजे लय मोठे जगावेगळे काही घडले आहे असे काही नाही..ही अतिशय किरकोळ बाब आहे.
लइ मनलं तं लइच हासलो भाव! रामपाऱ्यात मिपा उगडुन चांगल झालं. आणिक यऊ द्या भाव!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/17/2021 - 06:28 नवीन
ती संपूर्ण बातमी वाचली आणि शेतकऱ्यांचे अनुभव व प्रतिक्रिया वाचल्या तर समजेल की त्यांच्या दृष्टीने हा निर्णय किती क्रांतिकारी आहे ते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/17/2021 - 15:19 नवीन
करोनाच्या बाबतीत दररोज नवीन काहीतरी ऐकायला मिळतं. आता आपण सर्वच या बातम्यांनी थकून गेलो आहोत. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने नुकताच याबाबतीत नवा निष्कर्ष काढला आहे. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वच मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा, सॅनिटाइजरचा वापर करा, यंव करा आणि त्यंव करा असे सांगितले गेले आहे, आजही आपण तेच पालन करीत आहोत. आता करोनाने (सार्स -कोवीड २) आपले रुपच बदलले असून त्याचा कहर आता हवेतून वेगाने होऊ लागला त्यामुळे पूर्वीचे उपाय आता तोकडे पडू लागतील काय अशी भिती व्यक्त केल्या जात आहे. लॅन्सेट मधील हे संशोधन इंग्लंड, अमेरिका व कॅनडातील तज्ज्ञांनी लिहिले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील या अभ्यासाचा मुख्य संशोधक त्रिश ग्रीनहोल यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनांनी विषाणूच्या प्रसाराबाबतची व्याख्या आता बदलली पाहिजे, शारीरिक अंतर, मास्क, आदींचे नियम आता नवीन विषाणूला रोखण्यास असमर्थ ठरणार आहेत. मोठ्या ड्रॉपलेट्सने विषाणूचा सर्वाधिक प्रसार झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. (लॅन्सेट दुवा) आणि आपले मराठी वृत्तपत्र (दुवा) पीडीएफ फाईल थेट उघडेल (दुवा) आज दीडवर्ष जवळ जवळ होईल पण अजूनही कशामुळे करोना होतो काही निश्चित समजेनासे झाले आहे. सर्वच जग अनिश्चित वाटेवर उभे आहे. जाणकार मंडळी काय म्हणत आहेत ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/17/2021 - 15:44 नवीन
अपोकॅलिप्स आलाय, आता सर्व जग नष्ट होऊन नवीन जगाची निर्मिती होणार. ज्या काही इच्छा उरल्यासुरल्या असतील, त्या आत्ताच पूर्ण करून घ्या भो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/17/2021 - 16:05 नवीन
विज्ञानाची करोना प्रतिबंधासाठी अहोरात्र धडपड चालूच असणार आहे. मागील वर्षी याचवेळी जग अंधकारमय झालं होतं. काहीच उपाय नव्हता आणि काहीच मार्ग सापडत नव्हता. आज एक वर्षानंतर किमान एकेक डोस घेतल्यामुळे काहींचे दोनही डोस पूर्ण झाल्यामुळे किमान होणारी गंभीर गुंतागुंत थांबेल इथपर्यंत आणि गोळ्या औषधांनी जीव वाचू शकतो इथपर्यंत आता परिस्थिती आली आहे. आता अशीच गोळ्या औषधांची पुढची उत्तम आवृत्ती येत राहील. जसे आता 'नासल व्हॅक्सीन'चा एक पर्याय येतांना दिसत आहे, नाकात फवारलं की चालले कामाला. कामावरुन आले की नाकात फवारले की संरक्षण मिळणार आहे. ( Nasal vaccine दुवा) असे काही तरी येत राहील. त्यामुळे स्वतःला खुश ठेवायचं, नाटक, सिनेमे, गाणी, मित्र मैत्रीणी यात स्वतःला गुंतवून घ्यायचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/17/2021 - 19:31 नवीन
आपण जे हवेतून कोरोना पसरण्याबद्दल लिहीले आहे तसे होत असावे असा माझा अगदी पहिल्यापासूनचा अंदाज होता. माझे काही मित्र आणि नातेवाईक गेले वर्षभर संपूर्णपणे घरातच राहूनसुद्धा कोरोनाबाधित झालेले आहेत. सर्व काळजी घेऊनसुद्धा आम्ही उभयता दिल्ली-अमेरिका प्रवासानंतर बाधित झालो होतो हे माझ्या प्रत्यक्ष माहितीतले पुरावे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 04/17/2021 - 15:19 नवीन
महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ नये अन्यथा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना केंद्राकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नबाव मलिक यांनी केलाय. -- https://maharashtratimes.com/india-news/nawab-malik-is-unaware-of-the-ground-situation-mansukh-mandviya/articleshow/82116940.cms
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 04/17/2021 - 15:20 नवीन
महाराष्ट्राला रेमडेसिविर देऊ नये अन्यथा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना केंद्राकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नबाव मलिक यांनी केलाय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/17/2021 - 15:30 नवीन
लेखी पुरावा असेल तर, गोष्ट वेगळी...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/17/2021 - 15:48 नवीन
“…अन्यथा नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; भाजपाची मागणी..... https://www.loksatta.com/maharashtra-news/otherwise-nawab-malik-should-resign-from-the-ministry-bjps-demand-msr-87-2447064/ ---------- पुरावा द्या नाहीतर माफी मागा....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 04/17/2021 - 16:03 नवीन
https://www.lokmat.com/mumbai/nawab-malik-take-proof-nawab-malik-shared-letter-regarding-supply-remedi-a601/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 04/17/2021 - 16:52 नवीन
Image removed. काही मुद्दे: १. हे पत्र गुजरात सरकारच्या एफ.डी.ए ने लिहिले आहे त्यामुळे त्यांची कार्यकक्षा गुजरात राज्य हीच आहे. २. हे लोन लायसेन्स नंबर जी/२८-ए/६०४१-ए ही काय भानगड आहे? वरकरणी मला तरी असे वाटते की गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे काही औषधे निर्माण करून ती निर्यात करायच्या उद्योगासाठी गुजरात सरकारकडून काही सवलती या कंपनीला मिळाल्या असाव्यात. तसे असेल तर औषधे निर्यात न करूनही गुजरात सरकारने सवलती कायमच ठेवायच्या असतील तर ते औषध गुजरातमध्येच वितरीत केले जावे अशी अट गुजरात सरकारने घातली. वरकरणी- कारण असे दिसते की हे पत्र गुजरात सरकारच्या एका विभागाने दिले आहे त्यामुळे गुजरातबाहेर काय करावे हे सांगायचा त्यांना अधिकार नाही. ती त्यांची कार्यकक्षा नाही. ३. औषधे गुजरातमध्येच वितरीत केली जावीत असे लिहिले आहे म्हणजे त्या औषधांचे डिस्ट्रीब्युटर्स गुजरातमधील असावेत पण याचा अर्थ ती औषधे केवळ गुजरातमध्येच विकली जावीत असा होतो असे वाटत नाही. समजा केंद्र सरकारच्या एखाद्या विभागाने औषधे केवळ गुजरातमध्येच द्यावीत असे म्हटले तर तो पक्षपात म्हणता येईल. पण हे पत्र तो दावा सिध्द करायला पुरेसे आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 04/17/2021 - 17:56 नवीन
महाराष्ट्र सरकारनेही औषध महाराष्ट्रातच विकावे (वितरीत करावे असे नाही) असे आदेश औषध उत्पादक कंपनीला दिले आहेत. https://www.republicworld.com/india-news/general-news/maharashtra-bans-export-of-remdesivir-to-states-drug-to-be-distributed-by-collectors-only.html नबाब मलिक ज्या आधारावर गुजरात सरकारचा आदेश म्हणजे महाराष्ट्र राज्यावर केलेला अन्याय म्हणत असतील तर महाराष्ट्र सरकारचा हा आदेश म्हणजे इतर राज्यांवर केलेला अन्याय म्हणायचा का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/17/2021 - 18:17 नवीन
Republic world ही लाडक्या अर्णव ची न्यूज पोर्टल आहे का?. राज्यसरकार चुकीचे निर्णय घेत असतील तसे आदेश देत असतील तर ते आदेश रद्द करण्याचे अधिकार नक्कीच केंद्र सरकार जवळ असणार. तेव्हा मलिक ह्यांनी सत्य स्थिती सांगितली की लाडके स्वामीभक्त मीडिया हाऊसेस भ्रम निर्माण करून स्वामी ना वाचवायचे प्रयत्न करणार. झी न्यूज नी सुद्धा एकदा नवीन शोध लावला असेल, टीव्ही १८ न्यूज बनवण्यात मग्न असेल आता येथून पुढे चार दिवस स्वामी भक्त न्यूज हाऊसेस नवं नवीन शोध लावतील.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 04/19/2021 - 06:19 नवीन
चांगला विनोद आहे. अजून येऊ द्या
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/17/2021 - 15:59 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-bhojan-thali-lockdown-in-maharashtra-gopichand-padlkar-bjp-mla-uddhav-thackeray-bmh-90-2446916/ काय बोलावं ते सुचेना...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/17/2021 - 16:14 नवीन
ईथे काही आयडी ना कुंभ मेळा दिसत नाही ज्या मुळे किती तरी लोक बाधित झाली असतील त्या गर्दी च्या न्यूज दिसत नाहीत. बंगाल मधील लाखो च्या सभा दिसत नाहीत त्याच्या न्यूज दिसत नाहीत. यूपी , गुजरात,बिहार मधील लपवलापवी दिसत नाही. त्या बाबतीत आलेल्या न्यूज दिसत नाहीत. लस उत्पादक कंपन्यांना कच्चा माल मिळत नाही तरी भारत सरकार काही बोलत नाही. त्या बाबतीत येणाऱ्या न्यूज दिसत नाहीत. ह्या फक्त शिव भोजन थाळी च दिसते. असा रात आंधळे प्रतिसाद सारखे येत असतील तर उत्तर पण तशीच येणार. मग गरळ ओकू नका असा साजूक सल्ला दिला जातो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/17/2021 - 16:51 नवीन
पंतप्रधानांच्या लाखोतील सभा ह्यावर भाजपप्रेमी एक शब्दाने बोलनार नाहीत. पन्नास वेळआ राज्य सरकराची कामे देखवूनही तीच पिपाणी वाजवण्यात पुढे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/17/2021 - 16:30 नवीन
नवाब मलिक ह्यांनी पुरव्यासहित आरोप केले आहेत आणि ते सत्य च असण्याची शक्यता आहे महाराष्ट्र मधील 11 कोटी लोकांचं मानव अधिकार धोक्यात आहे.11 कोटी जनतेच्या जीवा शी खेळ चालू आहे. तरी केंद्र सरकार चे समर्थन महाराष्ट्रीयन लोक च पक्ष प्रेमानी आंधळे होवून करत आहेत. लाजिरवाणी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 04/17/2021 - 16:33 नवीन
राजेश१८८ साहेब, जरा नीट लक्ष द्या. तुमच बेअरिंग मधेमधे खुपच सुटतय. अचानक तुम्ही अतिशय शुद्ध मराठीत लिहायला लागता. आणी कधी कधी अशुद्ध लिहायला घेतलेल्या बेअरिंगने....... मग मला गोंधळायला होतं. इतक्यात ऑफीस अपडेट केलय की काही फाईल्स डिलीट झाल्यात???????
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 04/17/2021 - 16:46 नवीन
लेख भारत सरकारचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे विश्वासार्हता किंवा पुरावा किंवा देशद्रोह वगैरे मुद्दे येतीलच.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/17/2021 - 16:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 04/17/2021 - 17:24 नवीन
हाफकिनलापण किती उशीरा परवानगी दिली.खुप आधी द्यायला पाहिजे होती.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 04/17/2021 - 17:41 नवीन
लेख चांगला होता, पण अमेरिकेची आर्थिक शक्ती प्रचंड आहे. भारताची नाही. भारत सरकार लशीच्या किमती बद्दल वाटाघाटी करत होतं. सुरवातीला लस यशस्वी होईल का नाही याबद्दल शंका होत्या त्यामुळे सर्व अंडी एका बास्केट मध्ये ठेवणं चुकीचं ठरलं असतं. सिरम ची लस अयशस्वी ठरली तर काय झालं असतं? विरोधी पक्षाच्या अतिमूर्ख नेत्याने (तोच तो) या गोष्टीचं भांडवल कसं केलं असतं? जेव्हा लस यशस्वी ठरली तेव्हा सरकारच्या प्रतिनिधींनी सिरम बरोबर वाटाघाटी करायला सुरुवात केली. या वाटाघाटी अतिशय अवघड होत्या. कारण फक्त सिरम कडे लस होती आणि भारत बायोटेक ची तिसरी फेज टेस्टिंग चालू होतं (बहुतांश लसी याच फेज मध्ये बाद होतात). सरकार ला त्यामुळे जितके दिवस covaxin बद्दल विश्वास वाटत नव्हता तेवढे दिवस त्यांनी वाटाघाटी लांबवल्या. एक आठवत असेल की covishield ला ऑर्डर आणि covaxin ला मान्यता या दोन्ही गोष्टी घडण्यातला काळ फार कमी होता. कारण ज्यावेळी हे नक्की झालं की सिरम चा प्रतिस्पर्धी बाजारात तयार होतोय त्या वेळी वाटाघाटी यशस्वी झाल्या असाव्यात. भारत सरकार ला 130 कोटी लोकांना लस द्यायची होती. त्यांना किंमत पाडून हवी असणे गैर नाही. लक्षात घ्या की आपले सरकार आणि नोकरशाही मूर्ख नाही. आपल्याला मर्यादा आहेत, मुख्य करून पैशाच्या. आणि त्या मर्यादेत आपल्याला काम करावं लागतं. बाकी सध्याचा जो प्रॉब्लेम आहे तो बिडेन सत्तेवर आल्यावर तयार झालेला आहे. कदाचित ट्रम्प आणि भारत सरकार चं आधीच कच्च्या मालाबद्दल बोलणं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिडेन आल्याने यावर पाणी पडलं असण्याची शक्यता आहे. सगळ्याच गोष्टी मीडिया ला सांगितल्या जातात असं नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 04/17/2021 - 18:26 नवीन
तुम्ही अधोरेखित केलेले रिस्क - फॅक्टर व सीरमशी केकेल्या वाटाघाटी, महत्वाचे भाग आहेत. हा मूळ लेखही मी अन्यत्र वाचलेला आहे. आता इथे व इतरस्त्र येणार्‍या प्रतिक्रिया गंमतीच्या असतील. इतरस्र 'भांडवलदारांची शय्यासोबत' वगैरे आरोप करत फिरणारे अनेकजण आता 'सीरम ह्या खाजगी मालकीच्या कंपनीस भारत सरकारने पैसा वगैरे दिला पाहिजे होता' असे सांगत आता फिरणार !
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 04/17/2021 - 18:18 नवीन
१. 'अमेरिका लस विकसित करेल व भारत त्याचं उत्पादन करेल' हे चुकिचे गृहितक आहे. कारण सर्वसाधारणपणे, फार्मा.कं. त्यांच्या नव्या उत्पादनांवर प्रचंड रॉयल्टी आकारतात. दुसरे, तेथे जॉन्सनची सोडून इतर एकही लस विकसित झालेली नाही. व जॉन्सनही अलिकडेच बाजारात वापरासाठी आलेली आहे.फायझर व मॉडर्ना वापरत असलेली टेक्नॉलॉजी (एम. आर. एन. ए.) अतिशय नवी आहे, व ती जर्मनीतील बायो-एन-टेक ह्या एका कंपनीने विकसित केकेली आहे. फायझर व मॉडर्ना ती पैसे देऊन, वापरत आहेत. ह्या लशींना भारतात वापरता येणे तांत्रिकदृष्ट्याही अशक्य आहे, कारण तिला - ७० डिग्रीज से. ला ठेवावे लागते, व तिचे वितरण करतांनाही काही विशेष कंटेनर्स आवश्यक आहेत. अशा तर्‍हेने विकसित केलेल्या कुठल्याही औषधावर सर्वसाधारणपणे कुठलीही कंपनी भरमसाट रॉयल्टी लावते व ती भारतासारख्या देशास परवडण्यासारखी नाही. ऑक्सफर्डने विकसित केलेली लस अ‍ॅस्टो- झेनेकाने घेतली. व ह्या स्विस कंपनीने सध्यातरी तिच्यावर अतिशय नगण्य रॉयल्टी लावली आहे. तेव्हा आपण ती भारतांत वापरू शकतो तसेच इतर विकसनशील व अविकसित देशही ती वापरू शकतात. तेव्हा ह्या लसीचे उत्पादन सीरमकडे आले आहे. अर्थात, वरील हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट भारत सरकार व सीरम इन्स्टिट्यूट ह्या दोघांनाही पहावी लागली असणार. ह्याच बरोबर भारतात, भारत बायोटेकने स्वतःची लस विकसित करण्याचे समांतर कार्यही हाती घेतले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. २. सीरमला लागलेल्या आगीमुळे त्या कंपनीला आपली ह्या लसीची उत्पादनक्षमता कमी करावी लागली असे लेखात लिहीले आहे. पण ह्याविषयीच्या बातमीत असे म्हटले गेले आहे की "Mr Poonawalla said there would be no impact on the production of the Oxford-AstraZeneca vaccine, known locally as Covishield, "due to multiple production buildings that I had kept in reserve to deal with such contingencies". ३. अमेरिकेने जे काही तेथील फार्मांना हाताशी धरून, त्यांना विशेष गुंतवणूक देऊन धडाधड उत्पादनाची सोय केली वगैरे लेखात म्हटले आहे, ते सर्व ट्रंप ह्यांनी करवून घेतले. तेथील सरकारी व राजकीय व्यवस्थेमुळे त्यांना ते सहजसाध्य झाले असावे. आता, भारतांत अशी गुंतवणूक किंवा इतर कसल्याही प्रकारची प्रत्य़क्ष अथवा अप्रत्यक्ष मदत एका खाजगी कंपनीस देणे आपल्या सरकारला, संविधानिकरीत्या कितपत शक्य आहे, त्याची माहिती करून घेणे मलातरी आवडेल. आणि तसे जरी सरकारने करायचे ठरवलेच, तर मग 'अडानी-अंबानी' ह्यांच्या जोडीला अजून एक नाव, राजकारणांत जाऊन बसले असते, त्याचे काय? ४. सरकारने, जाने शेवटापर्यंत खरेदीची ऑर्डर का पाठवली नाही, ह्याविषयी माहिती नाही. पण मला वाटते, आपल्या येथील लसीकरण फेब्रुवारीच्या मध्यावर सुरू झाले, म्हणजे इतर देशांपेक्षा फार उशीर झाला नाही. तसेच ज्या वेगाने लस दिली जात होती, तोही गेल्या आठवड्यापर्यंत चांगला होता. ५. ब्रझिल येथे हजारो माणसे मरत आहेत वगैरे सर्व खरे आहे, पण त्यांनी चीनकडूनही सिनोव्हॅक ही लसही घेतलेली आहे. भारताने सध्या दोन्ही लसींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, पण त्याचव्यतिरीक्त सीरमच्या लशीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेने सध्या निर्यात करणे बंद केले आहे, हेही लस निर्यात न करता येण्याचे एक कारण असावे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/17/2021 - 18:41 नवीन
>>> पण मला वाटते, आपल्या येथील लसीकरण फेब्रुवारीच्या मध्यावर सुरू झाले, म्हणजे इतर देशांपेक्षा फार उशीर झाला नाही. भारतात सार्वजनिक लसीकरणाचा प्रारंभ १६ जानेवारीस जाहला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 04/18/2021 - 05:28 नवीन
घरचं कार्य असल्यासारखं धडाडीने केंद्र सरकारचा बचाव करणारे प्रतिसाद येत आहेत. आज रात्री ....... असं म्हणत विरोधक, स्वकीय, मंत्री, जनता कुणालाही n जुमानता, कुणाचीही पर्वा न करता, कोण काय म्हणेल, कोणावर काय परिणाम होईल याची चिंता न करता धडाडीने निर्णय घेणारे भारतातील खाजगी लस उत्पादकांना प्रोत्साहन दिल्याने टीका होण्याला घाबरतील, असे वाटत नाही. काही शे रुग्ण असताना अर्थव्यवस्थेचं चक्र काही तासात जागेवर थांबवताना न भिणारे, धडाडीचे नेते कोट्यवधी लोकसंख्येला वाचवण्यासाठी सरकारकडे तेवढा पैसा नाही, भारताची आर्थिक ताकद अमेरिकेहून कमी आहे, वगैरे लंगडी कारणे देऊ शकतील असे वाटत नाही. (२००*१४०,००,००,०००=२,८०,००,००,००,००० अक्षरी अठ्ठावीस हजार कोटी रुपये इतका खर्च देशातील प्रत्येकाचं लसीकरण करायला आला असता. दोन डोस प्रत्येकी छप्पन हजार कोटी. त्यातील किमान निम्मे लोकांनी स्वतःची काळजी घेत स्वखर्चाने डोस घेतले असते. देशाला हेसुद्धा परवडलं नसतं, असं जर केंद्र सरकार चालवणाऱ्या व्यक्तीचं मत असेल तर हे कारण किंवा समर्थन लंगडे नाही का?)
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 04/18/2021 - 05:38 नवीन
भारतातील खाजगी लस उत्पादकांना प्रोत्साहन दिल्याने टीका होण्याला घाबरतील >>>>> सिरम इन्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही प्रायव्हेट कंपन्या आहेत ...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/18/2021 - 07:54 नवीन
>>>>> घरचं कार्य असल्यासारखं धडाडीने केंद्र सरकारचा बचाव करणारे प्रतिसाद येत आहेत. =)) चांगला होता. अगदी खरं आहे. बाकी सध्या केंद्र सरकार सुडाच्या भेदभावाच्या राजकाराने कळस गाठला आहे. महाराष्ट्रातही विरोधी पक्षाच्या होत असलेला थयथयाटही लक्षात येत आहे. काल दमनच्या फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात जास्त रेमेडेसीवीर पूरवत होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर मा.फड़नवीस आणि प्रवीण दरेकर तिथे पोहोचले. (बातमी ) महाराष्ट्राला रेमेडेसीवीर पुरवू नका अशा ज्या कंपन्यांना ताकीद दिल्या गेल्या त्या काही कंपन्यानी महाराष्ट्र सरकारला पुरावे दिल्याच्या बातम्या येत आहेत, परंतु अशा काळात केंद्राशी वाद नको अशा महाराष्ट्र सरकारच्या वर्तुळातील म्हणने आहे. खरे खोटे आरोप पुरावे हे सर्व भविष्यात उपलब्ध होतीलच. सध्या महाराष्ट्रभर आणि इतरही राज्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत, केंद्रीय आरोग्य पथकांनी, मंत्र्यांनी, मा.प्रधानमंत्र्यांनी या सर्व परिस्थिती हाताळायला केंद्रसरकार म्हणून, माणुसकीच्या नात्याने म्हणून मदत केली पाहिजे. अर्थात, मा.पंतप्रधान आणि त्यांचं अस्तित्वशून्य केंद्रीय मंत्रीमंडळ बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला की मग या सर्व गोष्टीकड़े पाहतील अशी एक भारतीय म्हणून अपेक्षा करायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे (एक अस्वस्थ भारतीय)
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 04/18/2021 - 08:09 नवीन
चांगला सामना आहे ... एका बाजूने सातत्याने गरळ ओकणारे आणि दुसऱ्या बाजूने धडाडीने बचाव करणारे .. चालुद्या
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 04/18/2021 - 08:17 नवीन
महाराष्ट्राला ही कंपनी सर्वात जास्त रेमेडेसीवीर पूरवत होती. जर ही कंपनी महाराष्ट्राला सर्वात जास्त रेमेडेसीवीर पूरवत होती, तर पोलीसांनी ताब्यात कशाला घेतला. आणि ताब्यात घेतला तर लगेच सोडून का दिल? राज्यात होणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टीला केंद्रच कस जबाबदार आहे? बंगाल च्या सभांमधून कोरोना पसरत असेल तर पंढरपूर मध्ये ५-६ मंत्र्याच्या सभांमधून कोरोना पसरत नाही का? तीच गोष्ट लसीकरणाची, जर केंद्राने लस दिली नाही तर राज्यात सर्वात जास्त लसीकरण कस काय? मध्यंतरी शरद पवारांनी फक्त बारामती ला रेमेडीसीविर दिले, हे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sun, 04/18/2021 - 08:26 नवीन
तसे अवघड प्रश्न विचारू नका हो. त्यांचा अस्वस्थपणा वाढतो. सध्याच्या काळात ते धोकादायक आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/18/2021 - 08:44 नवीन
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि नंतर सोडूनही दिले. रेमेडसीवर इंजेक्शंस महाराष्ट्र सरकारला अत्यंत आवश्यक असतांना, महाराष्ट्र सकारला न देता भाजप प्रदेश अध्यक्षांना देत होता असे वाटल्यामुळे पोलिसांनी त्यास चौकशीस बोलावले. कंपनी मालकाला बोलावल्या बरोबर आणि त्याला बसवून ठेवल्याबद्दल ताबड़तोब फड़नवीस आणि दरेकर तिथे पोहोचले, या अगोदरही ही दोन्ही थोर माणसं कंपनीत दोनेक दिवसापूर्वी कंपनीत गेल्याच्या बातम्या वुत्तपत्रात येत आहेत, अर्थात महाराष्ट्राला इंजेक्शंस देण्यात कमी पडू नका असेच सांगायला गेले असतील याबद्दल महाराष्ट्र जनतेला कोणतीही शंका नाही. :) बाकी. करोना हा कुंभमेळ्यातील गर्दीने पसरतो, पश्चिम बंगालमधील रॅलीने पसरतो तसा महाराष्ट्रातील पंढरपुर निवडणुकीनेही पसरतो हे मी पूर्वी इथेच सांगितले आहे. गर्दी करणारी आणि त्यास पाठिंबा देणारी निवडणूक आयोगासोबत त्याचं नेतृत्व करणारी ही सर्व नालायक मंडळी आहेत असे माझं व्यक्तिगत मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 04/18/2021 - 09:36 नवीन
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला >>>>>> ही इंजेक्शन्स काय भाजप कार्यालयात विक्रीस ठेवण्यात येणार होती काय ? ही महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फतच वितरीत होणार होती हे सांगायला प्राध्यापक साहेब विसरले वाटत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/18/2021 - 09:56 नवीन
महाराष्ट्र सरकारला ही इंजेक्शंस दिलीच असती असे आपण क्षणभर समजू. आपल्या पक्षीय कार्यकर्त्यांना, आपल्या संघीय हॉस्पिटलला, आपल्या ख़ासगी मालकीच्या रुग्नालयांना ही इंजेक्शंस दिली असती असे मला वाटत नाही. आजच्या काळात फक्त दोनच ऋषितुल्य व्यक्तिमत्व उरली आहेत एक 'हे' अध्यक्ष महोदय आणि दूसरे 'ते'. भाईयो और बहनोवाले. आपलं असं म्हणने आहे की कंपनीवाल्यांकडून इंजेशन्स घेऊन ती महाराष्ट्राला द्यायची, अशा शोची काय गरज ? की जाहिरात करुन मिरवायचं असेल महाराष्ट्र सरकारला आम्ही कशी मदत केली असेच ना ? अरे भावांनो, महाराष्ट्र सरकारला काय मदत करायची, काय मदत मिळवून द्यायची, ती केंद्रसरकारकडून मिळवून दिली पाहिजे, असे वाटते. इथे दात कोरून पोटभर जेवण दिले, असा ठाणाना करुन काय उपयोग. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 04/18/2021 - 09:58 नवीन
शरद पवारांनी पण अशीच injections फक्त बारामती साठी उपलब्ध करून दिली आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 04/18/2021 - 10:00 नवीन
समजायचं कशाला ? खरं काय ते जाणून घ्या ... बाकी ऋषितुल्य व्यक्तिमत्व किती उरलेत माहीत नाही ... पण गरळ ओकणारे सर्वत्र पसरले आहेत (प्रतिसाद संपादित)
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sun, 04/18/2021 - 11:09 नवीन
As it turns out, the truth of the matter was that former Maharashtra chief minister Devendra Fadnavis had coordinated with Bruck Pharma for the supply of Remdesivir among patients in Maharashtra. As per Fadnavis, he had requested Bruck Pharma for supplying Remdesivir but they were unable to comply due to a lack of FDA approval. Fadnavis then coordinated with Minister of State for Chemicals and Fertilisers Mansukh Mandaviya and secured the approval yesterday evening, after a span of four days. राजकारण न करता मदत करा असं मामु परवाच म्हणाले होते. आणि मदत करणाऱ्या विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची "थोर माणसे" अशी संभावना करणे ही काँग्रेस वाल्यांची संस्कृती. विनाकारण पिंका टाकून आपला राजकीय द्वेष व्यक्त करणे हाच स्वभाव या पलीकडे त्याला महत्व नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/18/2021 - 09:51 नवीन
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि नंतर सोडूनही दिले. साध्या चौकशीसाठी बोलवायला १० पोलिस पाठविले. इतके पोलिस कशाला? बहुतेक एप्रिलचं १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण झाले नसावे.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sun, 04/18/2021 - 08:25 नवीन
शिवसेनेने अंग काढून घेतले: http://dhunt.in/e80T8?s=a&uu=0xcae9973ebb9f99bd&ss=wsp शेणेच्या नेत्यांच्या तोंडात गटारगंगा असते हे पूर्वी सिद्धच झालं आहे. हा आणखी एक पुरावा: http://dhunt.in/e88we?s=a&uu=0xcae9973ebb9f99bd&ss=wsp ही सगळी स्टोरी: http://dhunt.in/e7zfB?s=a&uu=0xcae9973ebb9f99bd&ss=wsp तो माणूस दमण मध्ये कंपनी चालवतो. स्टॉक केलेला साठा सापडलाच नाही (कारण तसं काही नव्हतंच). फक्त बीजेपी ने स्वतःच्या खर्चाने फॅक्टरी मधून महाराष्ट्र सरकारला देण्यासाठी म्हणून injections मिळवली (ती ही सर्व परवानग्या घेऊन) म्हणून हा जळफळाट होता. मंत्रांच्या OSD नि त्या मालकालाच धमकी दिली. जो तुम्हाला मदत करतोय त्यालाच धमकी देणारी ही कुठली संस्कृती? पण तेवढी अक्कल या सरकारला आणि त्याच्या नेत्यांना नाहीच. आता त्या मालकाने जर सांगितलं की मला रेमडेसीविर महाराष्ट्राला विकायचंच नाही तर काय करणार? तसं करू शकतो तो.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Mon, 04/19/2021 - 16:14 नवीन
अर्थक्रांतीचा सुचवलेला ट्रांसकशन टॅक्स मान्य केला असता तर आता सरकारला नियमित उत्पन्न मिळाले असत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/17/2021 - 17:06 नवीन
ह्या संकट काळात पंतप्रधान पद मोदी साहेबांकडून काढून घेवून ते अतिशय हुशार व्यक्ती कडे सोपवावे.तसा प्रस्ताव च सर्व पक्षीय खासदारांनी संसदेत मांडावा. COVID संपल्यावर हवं तर मोदी साहेबाना परत पंतप्रधान करा. घटनेत हे बसत नसेल तरी आपत्ती निवारण करण्यासाठी वाकडी वाट धरावी. आता खरोखर अतिशय हुशार लोकांची राज्य कर्त्ते म्हणून गरज आहे. सरकारी निष्काळजी लोकांना सरळ नारळ द्यावा त्यांच्या जागी सक्षम लोक भरावीत..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 04/17/2021 - 18:14 नवीन
+१ भाषणबाजी करायला पंप्र असावं असं काही नसतं.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 04/17/2021 - 18:47 नवीन
" ह्या संकट काळात पंतप्रधान पद मोदी साहेबांकडून काढून घेवून ते अतिशय हुशार व्यक्ती कडे सोपवावे" नाव सुचवा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/17/2021 - 19:20 नवीन
ज्या व्यक्ती ल प्रशासकीय अनुभव आहे,देशाची पूर्ण माहिती आहे,सरकारी निर्णय कसे वेगात अमलात आणावेत ह्या विषयी गती आहे , शमता आहे असा व्यक्ती हवा. त्याच बरोबर ज्याला देशाविषयी तळमळ आहे,निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता आहे. प्रामाणिक आहे. . आणि असा व्यक्ती आपल्याला भारतीय प्रशासकीय सेवेत च मिळेल. तो निःपक्ष पने शोधून पंत प्रधान पद त्या व्यक्ती कडे सोपवावे. देशाला आता असाच व्यक्ती पंतप्रधान पदी असण्याची गरज आहे बाकी राजकारण,हेवेदावे संकट संपल्यावर परत चालू करूच.. त्या शिवाय भारतीय लोकांना जेवण गोड लागत नाही
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 04/17/2021 - 19:47 नवीन
साहेब! हे कोण ठरवणार, किती वेळेत आणि कसे करणार हे ही सांगा! लोकसभेत ३७ पार्टी आहेत आणि भा ज प २८२/ ५४२. राष्ट्पती राजवट लागू करावी का आणि सध्याचे राष्ट्पती तरी सगळ्यांना मान्य आहेत का? का राष्ट्पती बदलावेत??
  • Log in or register to post comments
झ
झेन Sun, 04/18/2021 - 05:16 नवीन
मिपावरील कुठलाही चालू घडामोडींचा धागा उघडायचा, लगेच एक नाव आपोआप कळेल हाय काय आन नाय काय.... नाव सांगितले असते पण तुम्ही म्हणाल नावातकायआहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा