Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/19/2021 - 15:32
🗣 242 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61342 views

🗣 चर्चा (242)
श
श्रीगुरुजी Sat, 02/20/2021 - 15:43 नवीन
बरं. एका वर्षात समजेलच. सध्या ते येनकेनप्रकारेण मविआ सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी शिवसेनेला अडचणीत आणून राजीनामा द्यायला लावून नंतर राष्ट्रवादी किंवा सेनेच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची योजना दिसते. मध्यंतरी सेनेशी पुन्हा एकदा जुळवून घ्यायचा प्रयत्न झाला. नंतर सुशांतसिंग प्रकरणाचा फायदा घेऊन ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. नंतर राऊत व प्रताप सरनाईकांची अंमलबजावणी संचलनालयाद्वारे चौकशी करून सेनेला अडचणीत आणण्याचा अजून एक प्रयत्न झाला. आता संजय राठोड प्रकरण मिळालंय. परंतु अजूनपर्यंत सेनेला अडचणीत आणणं नीटसं जमलेलं नाही. विधानपरीषदेवर नियुक्त आमदारांची यादी रोखून राज्यपाल मदत करताहेत. यातूनही इप्सित साध्य झाले नाही तर शेवटी थेट ठाकरे निशाण्यावर येतील. त्यामुळे सरकार गेले तर सेना-भाजप मध्ये कायमस्वरूपी वितुष्ट निर्माण होईल व ते परत एकत्र येण्याची शक्यता शून्य असेल. अशावेळी पवार सरकारमधून बाहेर पडून मुदतपूर्व निवडणुक लादतील. भाजप विरूद्ध सेना विरूद्ध राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तिरंगी लढतीत कोण जिंकेल हे सांगण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 02/20/2021 - 15:49 नवीन
😀
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 02/21/2021 - 06:40 नवीन
श्रीगुरुजी, फडणवीसांनी तुम्ही म्हणता तस त्यांच्या मार्गतले भाजपा मधील अडथळे दूर केले असतील पण हे करताना त्यांनी जात पात बघितली नाही. त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही. त्याच बरोबर मोहिते पाटील, विखे आशा लोकांना भाजपा मध्ये स्थान दिले हे केवळ आपापल्या प्रदेशातील प्रस्तापित आल्यामुळे ते मराठे असल्याचा ह्यात काहीही संबंध नसावा. एका बाजूला तुम्ही आस म्हणता की भाजपा चे 105 आले ते आयराम आणि सेने मुळे आणि हे बरोबरच आहे पण त्याच वेळी तुमचा सेने बरोबर युती साठीही विरोध आहे. सध्या तरी महाराष्ट्रा मध्ये आपल्या स्वतःच्या जीवावर सत्तेत येईल असा एकही पक्ष नाही. फडणवीसांनी ह्याच साठी दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपा मध्ये घेतले असेल, काहीही करून त्यांना 144 च्या जवळ जायचे होते व सेने वरचे अवलंबन कमी करायचे असणार. सारथी सारख्या संस्था स्थापन करून मराठा समजला किती फायदा झाला हे माहिती नाही पण मराठा समाजाचे लाखोंनी मोर्चे निघत असताना आणि फडणवीसांनी तो काळ अतिशय योग्य प्रकारे हाताळला. 2014 मध्ये भाजपा चे 288 मधून 43 च्या सासरी ने 123 आमदार निवडून आले तर 2019 ला 164 मधून 64 च्या सरासरी ने105 आले. याचाच अर्थ भाजपा कमी झाला नाही पण स्वतः एकटे लढून सत्तेत येता येत नाही म्हनून युती करावी लागली. फडणवीसांनी ने बावनकुळे, तावडे ह्या सारख्या लोकांना तिकीट न देऊन चूकच केली वर त्याचे योग्य स्पष्टीकरण ही दिले नाही. त्याबरोबर शेतकरी कर्ज माफी, कोल्हापूर ची पूर परिस्थिती हो योग्य प्रकारे हाताळली नाही. केवळ पात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी चा फायदा मिळावा म्हणून फडणवीसांनी एवढ्या चाळन्या लावल्या की प्रत्येक गावामधून एक ते दोन शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली.तीच गोष्ट कोल्हापूर च्या पुरा वेळी झाली असा आरोप आहे. परंतु तरीही भाजपा ने फडणवीसांना बदलण्याची घाई करू नये. चंद्रकांत पाटलांना मात्र तात्काळ हटवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/21/2021 - 10:41 नवीन
श्रीगुरुजी, फडणवीसांनी तुम्ही म्हणता तस त्यांच्या मार्गतले भाजपा मधील अडथळे दूर केले असतील पण हे करताना त्यांनी जात पात बघितली नाही. त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही. हे बरोबर आहे. भाजपच्या पूर्वीच्या अवतारावर, म्हणजे जनसंघावर, ब्राह्मणी छाप होती. त्यामुळे एका ठराविक मर्यादेपलिकडे जनसंघ वाढत नव्हता. भाजप या नव्या अवतारात जनसंघ परतल्यानंतर भाजपच्या वसंतराव भागवतांनी पक्षवाढीसाठी "माधव" (म्हणजे माळी, धनगर, वंजारी) हे सूत्र अंमलात आणून पक्षात इतर जातीतील नेते पुढे आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे (वंजारी), ना. स. फरांदे (माळी), अण्णा डांगे (धनगर), एकनाथ खडसे (लेवा पाटील), बावनकुळे (तेली), महादेव शिवणकर असे अनेक नेते पुढे आले व त्यातून पक्ष वाढत गेला. ९० च्या दशकात मंडल आयोगामुळे या जाती इतर मागासवर्गीय गटात गेल्या व भाजपत इतर मागासवर्गीयांचे प्राबल्य वाढले. प्रमोद महाजन हे एकच मुख्य ब्राह्मण नेता होते व त्यांना केंद्रीय राजकारणातच रस होता. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. परंतु ते नसल्याने अचानक फडणवीस मुख्यमंत्री झाले. नंतर पंकजा मुंडे व खडसे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने भविष्यात हे आपल्या जागी येऊ नयेत यासाठी त्यांच्यामागे प्रकरणे लावून देऊन नंतर पद्धतशीर काटा काढला. बावनकुळेंंना अडकविता न आल्याने त्यांना उमेदवारी नाकारून बाजूला केले. विनोद तावडेंनाही प्रतिस्पर्धी समजून काटा काढला. फडणवीसांनी जात न पाहता फक्त आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांंचा काटा काढला. परंतु हे सर्व नेते इतर मागासवर्गीय जातीतील असल्याने फडणवीस इतर मागासवर्गीय नेत्यांना संपवित आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. >>> त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही. त्याच बरोबर मोहिते पाटील, विखे आशा लोकांना भाजपा मध्ये स्थान दिले हे केवळ आपापल्या प्रदेशातील प्रस्तापित आल्यामुळे ते मराठे असल्याचा ह्यात काहीही संबंध नसावा. >>> भाजपत आणलेले बहुसंख्य आयाराम मराठा आहेत. २०१७ पासून फडणवीसांनी मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून शेवटी बनावट अहवाल बनवून १६ टक्के राखीव जागा दिल्या. ब्राह्मण आमदारांना उमेदवारी नाकारून मराठा उमेदवार दिले. त्यामुळे ते भाजपला मराठा पक्ष बनवित आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. >>> एका बाजूला तुम्ही आस म्हणता की भाजपा चे 105 आले ते आयराम आणि सेने मुळे आणि हे बरोबरच आहे पण त्याच वेळी तुमचा सेने बरोबर युती साठीही विरोध आहे. सध्या तरी महाराष्ट्रा मध्ये आपल्या स्वतःच्या जीवावर सत्तेत येईल असा एकही पक्ष नाही. >>> पक्षातील इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविले नसते, ब्राह्मणांवर अन्याय केला नसता, मराठ्यांचे लांगुलचालन केले नसते तर घायकुतीला येऊन तब्बल १२४ जागा सेनेला देऊन युती करण्याची गरज नव्हती. >>> फडणवीसांनी ह्याच साठी दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपा मध्ये घेतले असेल, काहीही करून त्यांना 144 च्या जवळ जायचे होते व सेने वरचे अवलंबन कमी करायचे असणार. >>> आपल्या कारस्थानी निर्णयांंमुळे इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मते कमी होणार हे फडणवीसांनी नक्कीच ओळखले होते. ही कमी भरून काढण्यासाठी त्यांनी आयाराम पक्षात आणून वारंवार मातोश्रीवर फेऱ्या मारून सेनेला युती करायला लावली. >>> 2014 मध्ये भाजपा चे 288 मधून 43 च्या सासरी ने 123 आमदार निवडून आले तर 2019 ला 164 मधून 64 च्या सरासरी ने105 आले. याचाच अर्थ भाजपा कमी झाला नाही पण स्वतः एकटे लढून सत्तेत येता येत नाही म्हनून युती करावी लागली. >>> इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मतांचा फटका बसणारच होता. सवलतींचा वर्षाव करूनही फारशी वाढीव मराठा मते मिळणार नव्हती. अशा परिस्थितीत भाजप एकटा लढला असता तर फार तर ५० आमदार निवडून आले असते. त्यामुळे अत्यंत कासावीस होऊन फडणवीसांनी युती केली व पोत्याने आयाराम भाजपत भरले. म्हणून तर १०५ आले. परंतु सेनेला युतीला राजी करण्यासाठी तब्बल १२४ जागा देणे, ४ वेळा जिंकलेला पालघर मतदारसंघ सेनेला देऊन टाकणे, सेनेच्या मागणीमुळे सोमय्यांना उमेदवारी नाकारणे अशा अटी मान्य केल्या. त्याबरोबरीने काही काळ मुख्यमंत्रीपद देण्याचे सुद्धा निदान मोघम आश्वासन सुद्धा दिले असावे. यातून भाजपचे नुकसानच झाले. आधीच्या चुकांचा परीणाम कमी करण्यासाठी अजून चुका केल्या. >>> परंतु तरीही भाजपा ने फडणवीसांना बदलण्याची घाई करू नये. चंद्रकांत पाटलांना मात्र तात्काळ हटवले पाहिजे. >>> एवढ्या चुका करूनही फडणवीस बदलले नाहीत. अजूनही चुका सुरूच आहेत. बरीच वाट पाहून शेवटी खडसे बाहेर पडले. पंकजा मुंडे, बावनकुळे, मेधा कुलकर्णी, तावडे यांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. अजूनही बाहेरील मराठा उमेदवार लादणे सुरू आहे. त्यामुळे फडणवीस व पाटील या दोघांनाही नेतेवदावरून काढणे आवश्यक आहे. मी भाजपचा कायमच समर्थक आहे. परंतु २०१९ विधानसभा निवडणुकीत मतच दिले नाही कारण फडणवीसांचे काही विश्वासघातकी निर्णय अक्षम्य आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मत देणार. परंतु जोपर्यंत फडणवीस-पाटील नेते आहेत तोपर्यंत मी व माझे कुटुंबीय इतर कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 02/20/2021 - 06:50 नवीन
शिपायाच्या तेरा जागांसाठी सत्तावीस हजार अर्ज आले. त्यात पदवी, पदव्युत्तर आणि इंजिनियर देखील अर्ज करतात, म्हणजे असंख्य लोकांना काम ना करता पगार हवा आहे असा अर्थ होतो. अन्यथा किमान आठवी ही पात्रता असताना त्यांनी अर्ज केले नसते. सरकारी नोकरी म्हणजे नियुक्ती, बदली इत्यादी मार्गांनी भ्रष्टाचार आणि घेतलेला माणूस शक्यतो काम करत नाही!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 07:00 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 07:11 नवीन
सरकारी कंपन्या कुचकामी आहेत. सरकारी नोकर फुकट पगार घेतात. राज्यकर्ते कुचकामी आणि अशिक्षित आहेत. त्या पेक्षा राजेशाही पद्धत परत चालू करूया. म्हणजे तो राजा कॉर्पोरेट पद्धतींनी देश चालवेल. ह्यांना भांडवलदार हवे आहेत पण सरकार मात्र लोकशाही पद्धतीने निवडलेले च हवं असते. ही डबल ढोलकी मत झाली. लोकशाही हवीच कशाला एकच घरण्यका देश चालवू ध्या. बेकरी वाढली आहे. शिक्षित मुलांना खासगी कंपन्या अत्यंत कमी पगारात म्हणजे 10 ते 15 हजारात पंधरा पंधरा तास राबवत आहेत. स्वतः त्या कंपन्या श्रीमंत आहेत पण त्यांचे कामगार गरीब आहेत. सरकारी नोकरीत अशी पिळवणूक होत नाही. सरकारी यंत्रणा भ्रष्ाचारा सोडला तर अत्यंत कार्यक्षम पने काम करते हे प्रतेक संकटाच्या वेळी सिद्ध झाले आहे. प्रतेक वेळेस एकच रडगाणे गायचे बंद करा . खासगी चांगले आणि सरकारी वाईट असे काही नाही. उलट सरकारी काम च योग्य रिती नी होतात. खासगी आस्थापना मध्ये फक्त सावळा गोंधळ असतो. आणि पिळवणूक केली जाते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/20/2021 - 07:14 नवीन
लै म्हंजे लैच विनोदी प्रतिसाद ह ह पु वा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 07:23 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 07:27 नवीन
डोळे झाकून सहमत होत असता का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 07:35 नवीन
प्रतिसादाला सहमती दिली .... शिवाय, तुम्ही थापेबाजी करता, असे तुम्हीच सांगीतले आहे ... असो,
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 08:07 नवीन
मुलांनी शिपाई पदा साठी अर्ज केले आहेत ती हजारो मुल कामचोर,कामचुकार, आयते खाणारी आहेत काय. खेडूत ह्यांनी त्यांना कामचुकार,kamchor म्हंटले आहे. त्याला तुम्ही सहमत आहात?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 07:26 नवीन
तुम्हाला किती उदाहरणे हवी आहेत उच्च शिक्षित मुलांचे कसे शोषण केले जाते ह्याची . प्रत्यक्षात अशा किती तरी मुलांना भेटवू शकतो. तुमच्या आजूबाजूला पण असतील अशी उदाहरणे. फक्त डोळे उघडा. मुंबई मध्ये पुर आला तेव्हा दिवस रात्र कोण होते लोकांना मदत करत सरकारी कर्मचारी च. आता करोणा संकटात कोण लोकांची मदत आणि सेवा करत आहे सरकारी लोकच . खासगी dr बसले बिळात लपून.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/20/2021 - 08:14 नवीन
मुंबई मध्ये पुर आला तेव्हा दिवस रात्र कोण होते लोकांना मदत करत सरकारी कर्मचारी च. आता करोणा संकटात कोण लोकांची मदत आणि सेवा करत आहे सरकारी लोकच . खासगी dr बसले बिळात लपून. सरकारी लोक मदत करत होते ते फुकट करत होते का ? सरकार पगार कशाला देतंय? मी वट्ट २२ वर्षे लष्करात नोकरी केली ती काय समाजावर उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून. राष्ट्रीय संकटाच्या काळात National Disaster Response Force (NDRF) किंवा लष्कराची मदत नाही घ्यायची तर कुणाची? गेली १५ वर्षे मी नागरी जीवनात आहे आणि ११ वर्षे खाजगी व्यवसाय करत आहे. करोना काळात सुरुवातीला एकही दिवस दवाखाना बंद ठेवलेला नव्हता. जेंव्हा रुग्णांमुळे मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला करोना झाला तेंव्हा सरकारी आदेशा नुसार १४ दिवस गपचूप घरी बसावे लागले होते तेवढे सोडले तर अगादर आणि नंतर सर्व दिवस दवाखाना चालू आहे. बहुसंख्य खाजगी डॉक्टरांचे दवाखाने चालू होते. केवळ वरिष्ठ डॉक्टरांना वय वर्षे ५५ नंतर दवाखाना बंद ठेवण्यास सरकारी परवानगी होती. वय वर्षे ५८ ला सरकारी नोकर निवृत्त होतात. किती सरकारी नोकरांनी निवृत्तीनंतर करोना साठी काम केलंय. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे सर्वच्या सर्व सरकारी नोकर वय वर्षे ५० च्या आतले होते. खासगी dr बसले बिळात लपून.असली फालतू टीका करण्याच्या अगोदर वस्तुस्थिती जाणून घ्या. हातात कळफलक आला म्हणून काहीही बडवायची हि अत्यन्त हीन प्रवृत्ती सोडून द्या
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 08:33 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 02/20/2021 - 09:10 नवीन
म्हटलेय ना की ते फक्त थापेबाजी करतात. मग त्यांचे म्हणणे इतके मनावर का घ्यायचे ! :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 09:19 नवीन
हजारो उच्च शिक्षित मुल ज्यांनी शिपाई पदासाठी अर्ज केले आहेत ते. कामचोरं,कामचुकार,फुकटे आहेत का? फक्त ह्याचेच उत्तर ध्या. जसे त्यांना खेडूत ह्यांनी म्हंटले आहे.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sat, 02/20/2021 - 09:33 नवीन
राजेश जी तुमचे बरोबर आहे. खासगी कंपन्या मध्ये सगळेच काही योग्य नसते आणि कार्यक्षम लोकांची योग्य किंमत होते हे पण खरे नाही. मी आधी एक कंपनी मध्ये होतो, तिथे MD बदलला तर त्यांनी सगळ्या डिपार्टमेंट चे HOD हळु हळू बदलले आणि त्याच्या मर्जीतील लोक आणले, आधीचे जास्त कार्यक्षम होते तरी. भयंकर राजकारण चालते खासगी कंपन्या मध्ये पण
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 02/20/2021 - 09:55 नवीन
हे नैसर्गिक आहे. एक सिंह जेव्हा दुसर्या सिंहाला पराभूत करुन (मारुन अथवा पळवुन लावुन) त्याचा टोळीवर सत्ता स्थापित करतो तेव्हा सर्वप्रथम तेथील तरुण सिंहांना एकतर मारतो अथवा पिटाळून लावतो व शावकांची चक्क हत्या करतो. हेतु हाच कि जी संतती पुढे निर्माण व्हावी ती फक्त त्याचीच असावी. अशेच गोष्ट कार्पोरेट क्षेत्रात ही होते.त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 10:05 नवीन
संतती निर्माण करणे हे निसर्गिक आहे हे मान्य. पण चांगल्या कतृत्व वान लोकांना हटवून आपल्या मर्जी मधील सामान्य क्षमतेच्या लोकांना तिथे बसवणे नैसर्गिक आहे? कशाचा ही संबंध कुठे जोडता. समर्थन करायचे म्हणून कोणत्या ही चुकीच्या गोष्टी चे करायचे हे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 10:21 नवीन
काही मोजकेच गुंड अर्थी शहर भीती दाखवून ,हिंसाचार माजवून ताब्यात घेतील. भरल्या घरातून हाकलून देतील,जमिनी ताब्यात घेतील. सिंह सारखे प्रतेकच्या जीवाशी खेळतील आणि त्यांचे स्वतःचे साम्राज्य उभे करतील . चालेल का. हे नैसर्गिक च आहे. जंगलात असेच चालते.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 02/20/2021 - 13:42 नवीन
साहेब जर तुम्ही म्हणता तसे नैसर्गिक नसते तर पोलिस प्रशासन सरकार वगैरेची गरजच पडली नसती ना.! माणुस प्रगल्भ असल्याने सत्ता व अधिकार हस्तगत करण्याच्या नैसर्गिक उर्मीला काबुत ठेवण्यासाठीच समाच व्यवस्था अस्तित्वात आली. आणि जिथे जिथे फट मिळते तिथे तिथे माणुसातील ह्या वृत्ती नजरेसमोर येतातच कि.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 02/20/2021 - 13:57 नवीन
समर्थन करायचे म्हणून कोणत्या ही चुकीच्या गोष्टी चे करायचे हे अयोग्य आहे.
मुळात हे समर्थन नाही. हे वास्तव आहे आणि त्यानुसारच एखाद्याला मार्ग आखावा लागतो. जंगलातल्या कायद्याचे थोडे सभ्य रूप समाजव्यवस्थेत दिसते. इथे कोणी कोणाला जीवानीशी मारत नसले तरी एखाद्याचा प्रभाव कमी कसा होईल ह्याचे प्रयत्न होताना दिसतातच. उदा. सत्तेत राहण्याची काकांची उर्मी नैसर्गिक आहे नैतिक नाही.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 02/20/2021 - 07:31 नवीन
मजा आली हो दादा! आपण सरकारी नोकरी केली आहे काय कधी? मी केली होती म्हणून माझ्या अनुभवावरून लिहिलं. ते सगळं जाऊ देत..आपण राहुलजी, त्यांचा साधेपणा, त्यांची दूरचा विचार करण्याची समज, भारत देशाच्या कल्याणाची आस्था, भ्रष्टाचाराची चीड, या विषयावर नक्की लिहा ही आग्रहाची विनंती. त्यामुळे उगाच उठ सूट टीका करणारी सगळ्यांची तोंडं बंद होतील. या देशात काहीतरी तर चांगलं व्हायला हवं असं वाटतं राव!
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 02/20/2021 - 08:01 नवीन
> सरकारी यंत्रणा भ्रष्ाचारा सोडला तर अत्यंत कार्यक्षम पने काम करते हे प्रतेक संकटाच्या वेळी सिद्ध झाले आहे. ती बिरबल ची कथा आठवली. पोपट हालचाल करत नाही, आवाज काढत नाही, श्वास घेत नाही पण नाहीतर तसा तो शंभर टक्के बरा आहे . > लोकशाही हवीच कशाला एकच घरण्यका देश चालवू ध्या. इतकी वर्षं तेच चालू होते ना !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/20/2021 - 08:07 नवीन
१. आर्थिक स्थिरता २. बँक कर्जासाठी फार खेटे घालायला लावत नाही. ३. योग्य वयात लग्न होण्याची शक्यता खूप वाढते. ४. मानसिक ताण कमी ५. कामाच्या तुलनेत चांगला पगार बरेच फायदे आहेत.का येणार नाहीत हजारोंच्या संख्येने अर्ज?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 08:35 नवीन
सहमत आहे नंबर 5 तर, एकदम चपखल
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 02/20/2021 - 07:04 नवीन
सध्याच्या शिवजयंती उत्सवात पोवाड्यावर बंदी घातली आहे हे नक्की काय प्रकरण आहे ? फक्त कायप्पवर मेसेज आलेत. बातमी वाचण्यात आली नाही
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 07:22 नवीन
अधिकृत रीत्या शिवजयंती साजरी करण्यास प्रतिबंध च होता.जमाव बंदी कायदा लागू आहेच. फक्त शिवजयंती साजरी करण्यास अनधिकृत पने सूट दिली गेली. पोवाडा प्रकरण म्हणजे उभे केलेलं भूत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 02/20/2021 - 11:30 नवीन
फक्त शिवजयंती साजरी करण्यास अनधिकृत पने सूट दिली गेली. याचा काय अर्थ म्हणायचा?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 11:34 नवीन
पण हेल्मेट डोक्यावर नसले तरी दुर्लक्ष करतात ना . त्याला अनधिकृत मान्यता म्हणतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 13:39 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-gujarati-dayro-and-gujrati-meet-postponed-due-to-corona-crisis-in-mumbai-says-hemraj-shah/articleshow/81124577.cms उर्दूत कॅलेंडर छापल्या नंतर, शिवसेनेचा मराठी बाणा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 17:01 नवीन
शिवसेनेचे बेगडी हिंदूत्वही उघडे पडले आणि मतांसाठी घातलेले मराठी कातडे पण निसटले. आमच्या सारख्या अडाणी माणसांना, इतपत तरी नक्कीच समजते ...
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 02/20/2021 - 16:08 नवीन
ये दोस्ती हम नही छोडेंगे.. दोन हुच्चशिक्षित सरकारी कर्मचारी, वर्गमित्र.. दोघेही लाच घेताना सापडले.... https://marathi.abplive.com/news/maharashtra/acb-arrests-two-classmates-deputy-collector-shrikant-gaikwad-group-development-officer-narayan-misal-accepting-bribe-869275/amp
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 16:43 नवीन
कोणतीच पळवाट न ठेवता संपूर्ण संपत्ती जप्त करण्या पासून जन्म ठेपे पर्यंत अशा लाचखोर अधिकारी कर्मचारी ह्या ना शिक्षा होवू शकेल असा कायदा असण्याची नितांत गरज आहे. लाचखोरी च्या कॅन्सर मुळे देशाची तब्बेतं बिघडत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/20/2021 - 17:04 नवीन
नेत्यांना पण हीच शिक्षा होती .... मौर्य काळात, अशा लोकांची संपत्ती पण जप्त होत होती आणि जाहीर फाशी पण देत होते .... संदर्भ, कौटिल्याचे अर्थशास्त्र
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 19:48 नवीन
लाचखोर पना हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. लाचखोरी मुळे सज्जन लोक आयुष्यातून उठतात . खूना पेक्षा पण गंभीर गुन्हा आहे हा. मोदी सरकार एवढे कायदे बदलत आहे तर सरकारी अधिकारी,कर्मचारी,नेता कोणी ही लाच घेवून काम करत असेल तर त्याची आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाची (इन्कम पेक्षा जास्त प्रॉपर्टी असेल तर) संपत्ती जप्त करून ह्यांना बारा वर्ष तुरुंगात बिना जामीन टाकता आले पाहिजे असा कायदा करावा. पुढील पन्नास वर्ष मोदी ना लोक डोक्यावर घेतील असा
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/20/2021 - 18:53 नवीन
व्हॉट्सॲपला भारतीय पर्याय 'Sandes' : सरकारतर्फे आता मेसेजिंग ॲप! अधिक माहिती : https://bit.ly/37zO1D4
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 19:42 नवीन
लोकांना जे ऍप आवडेल ते ऍप लोक वापरतील . त्या साठी भारतीय आणि गैर भारतीय ह्याला काही किंमत नाही
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/20/2021 - 18:54 नवीन
https://youtu.be/NdpePlhKsf4
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 19:40 नवीन
हे पगारावर काम करत नसून कमिशन वर काम करतात .. जेवढी जास्त लोक फाईन भरतील तेवढे जास्त पैसे ह्यांना मिळतात.त्या साठी न केलेल्या गुन्हा पण ह्या लोकांना फाईन वसूल करण्यासाठी चालतो. आणि clean marshal he कोणी प्रशिक्षित लोक नाहीत तर ओवाळून टाकलेले च आहेत. त्या मुळे असे प्रसंग घडत असतात.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/20/2021 - 18:56 नवीन
https://www.prabhatkhabar.com/state/bihar/patna/petrol-diesel-biharis-arriving-in-nepal-to-take-cheap-petrol-you-will-also-be-shocked-knowing-the-price-of-oil-in-the-neighboring-country-rdy
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 19:29 नवीन
नेपाळ ला भीक लागली नाही त्या मुळे नेपाल सरकार ला पेट्रोल महाग करण्याची गरज नाही. इथे पेट्रोल जेवढे महाग तेवढे देश हित जास्त असे युक्तिवाद करणारे महाभाग आहेत.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/20/2021 - 18:59 नवीन
पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची https://thefocusindia.com/special/land-cruiser-used-for-the-procession-by-gaja-marane-belongs-to-the-ncp-leader-of-pune-24205/amp/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 19:34 नवीन
अट्टल गुन्हेगार सर्वच राजकीय पक्षात आहेत एक पण भारता मधील राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही.. फक्त राष्ट्रवादी पक्ष त्या गुन्हेगार व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न करेल की योग्य ती कडक कारवाई करेल हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/20/2021 - 19:02 नवीन
https://www.google.com/amp/s/www.sarkarnama.in/pune-vishleshan/land-cruiser-ncp-leader-taken-bjp-worker-and-used-gangster-70818%3famp
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 02/20/2021 - 19:36 नवीन
एका माळेचे मणी आहेत त्या मुळे ही पण शक्यता नाकारता येत नाही
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 02/21/2021 - 07:30 नवीन
करोना पुन्हा खरोखरच पसरतोय की लशीकरण सक्तीचे करण्यासाठी ह्या क्लुप्त्या आहेत? असो. करोनाच्या प्रादुर्भावामागे चीनच आहे..करोनामुळे चीनमध्ये किती अब्जाधीश वाढले.. वगैरे मांड्ण्या गेल्या वर्षी येत होत्या. त्या आता बंद झाल्या.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 02/21/2021 - 11:28 नवीन
किसान आंदोलनाला स्टेज डान्सर चा देखील पाठींबा... ही बातमी
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/21/2021 - 11:46 नवीन
कंगना चालते ना
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा