पूर्णब्रह्माचा अपमान!!
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.
त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.
हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.
बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.
आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.
*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.
एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.
हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!
*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!
आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!
जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
💬 प्रतिसाद
(194)
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 07:45
नवीन
पण मटार उसळ, काकडीची खमंग फोडणी घातलेली (काकडी नीट कोचवून) कोशिंबीर वगैरे पदार्थ कुळधर्म कुळाचारच नाही तर इतरही वेळी पूर्ण महाराष्ट्रात खाल्ला जातो, अर्थात ह्यापैकी काही पदार्थांवर जातीय शिक्के पडतात खरे पण भौगोलिक दृष्ट्या ते काही पुण्याचे प्रॉपर वाटत नाहीत. मटार उसळ (पाव), वडापाव, पावभाजी वगैरे पदार्थ तर थेट मुंबईच्या गिरणीसंस्कृतीच्या भरभराटीच्या काळात उगम पावलेले पदार्थ होत.
बेनिफिट ऑफ डाउट म्हणून शिकरण खाशा पुणेरी खाद्य मांदियाळीत अंतर्भूत करावं म्हणलं तरी (किमान) पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक गावात ते पिढ्यानपिढ्या खाल्लं जातंय (दळणवळण साधने तितकीशी नसताना) कोणी पुण्याला येऊन शिकून गेलं असेल अशी शक्यता नसतानाही.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 08/23/2018 - 07:49
नवीन
हे राम.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/23/2018 - 08:18
नवीन
तो रेस्त्राँमधला गोग्गोड दहीवडा पुण्याबाहेर सुद्धा मिळत असणे शक्य असल्यास मला व्यक्तिशः कल्पना नाही इतरत्र मिळत नसल्यास प्रॉपर पुण्याचा समजता येईल का ? दुसरे प्रत्येक पदार्थात साखर हे वैशीष्ट्य पेठ-प्रादेशिक की समुह विशेष हे नेमके माहित नाही.
या व्यतरीक्त अमृततुल्य आतशा लोपपावत चाललेला हा सेवा विशेष होता. बाकी उर्वरीत महाराष्ट्राच्या आहारात नसलेला चितळेंच्या बाकरवडी व्यतरीक्त पुणेरी पदार्थाची कल्पना नाही. अजून असतील तर जाणून घेण्यास उत्सुक.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 09:11
नवीन
सोमेश्वर तिसऱ्या राजाच्या काळातील मनसोल्लास मध्ये दहिवाड्याचे उल्लेख सापडतात. त्यामुळे तो पुणेरी ओरिजिनल असणे शक्य नाही. आता साखरेची चव घालणे हे "स्थानिक व्हेरियेशन" म्हणून नक्कीच गणले जाईल पण मूळ पदार्थ नाही गणल्या जाणार.
अमृततुल्य कदाचित समाविष्ट होईल, पण त्याचा इतिहास एकदा चाळून पहावा लागेल
(प्रा. पुष्पेश पंत फॅन) वांडो.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/23/2018 - 09:29
नवीन
अॅज व्हेरीएशन तरी पुण्यापुरते मर्यादीत आहे की कोल्हापूर सातारा अथवा कोकणातही गोग्गोड दहिवडा मिळतो . उत्तर कर्नाटकात बराच फिरलो पण दहिवड्याची चव शोधून पहाणे त्यावेळेस सुचले नाही.
माहितगारगिरीबद्दल __/\__
* बाकी बाकरवडी बद्दल आपले कन्फर्मेशन मिळाले नाही. ती महाराष्ट्रात आणखी कुठे होत असे का ?
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 09:50
नवीन
मूळ महाराष्ट्रीयन पदार्थ नाहीये, गुजराती पदार्थ आहे अर्थात व्यावसायिक प्रकारे कुरकुरीत बाकरवडी बनविण्याचे श्रेय चितळ्यांना जातेच.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 09:52
नवीन
जिथे जास्त एकवटलेली असेल तिथे बाकरवडी बऱ्यापैकी माहितीची असावी. उदाहरणार्थ सांगली मिरज कुपवाड जिथे व्यवसायानिमित्त खूप गुजराती मारवाडी लोक स्थायिक झालेले आढळतील. विदर्भात पण असावेत, मी त्या भागात जास्त फिरलेलो नाही त्यामुळे माझ्या माहीतीत नाही
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/23/2018 - 10:27
नवीन
ओह तर पदार्थातील साखरेचे व्हेरीएशन सोडले तर, पुणेरी खाद्यसंस्कृती आयातीतच म्हणायची !
आपण मृत्यूंजयरावांच्या वाक्याची पहाता पहाता विकेट घेतलेली दिसतीए ;) बघा बुवा पुणेकरांनो :) काही स्वतंत्र स्थानिक पदार्थ शोधता येतो का ते !
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 08/23/2018 - 11:07
नवीन
मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी लागेल. मिसळीचं सर्वात जुनं हॉटेल वैद्यबुवांचं, सुमारे १०० वर्ष उलटूनही आजही चालू आहे. ह्याच्यापेक्षा जुनं मिसळीचं हॉटेल ऐकिवात नाही. मिसळ पण नेहमीसारखी नाही, आलंयुक्त पांढर्या मसाल्याची.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 08/23/2018 - 11:11
नवीन
शेवपाव वगैरे लेटेस्ट पदार्थ पण पुण्यातच प्रथम सुरु झाले.
मासवडी बहुधा पुण्याचीच असावी म्हणजे शहरातली नसून नारायणगाव, मंचर वगैरे खेड-आंबेगाव तालुक्याच्या भागातली.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 08/23/2018 - 11:39
नवीन
आचार्य अत्र्यांच्या आत्मचरित्रात माट्यांच्या मिसळीच्या हॉटेलाचा उल्लेख आहे. तो काळ म्हणजे साधारण १९१० ते २५. त्यांचे इनोव्हेशन म्हनजे भाज्याचे तुकडे, पोह्याचा चिवडा आणि मसालेदार उसळीचा रस्सा ह्याचे फर्मास मिश्रण असा मिसळीचा उल्लेख आहे. अल्पावधीतच पुणेकरांना ह्या मिसळीचा लळा लागला. (पुण्याच्या तत्कालीन एका हॉटेलात वेगवेगळ्या खोल्या , वेटरना युनिफॉर्म, चकचकित बिल्ले आदि सोयी सुरु झाल्या पण वस्ताद पुणेकरांनी त्या वेटरना थोडे पैसे देऊन कमी बिल लावायला लावणे आदी गैरप्रकारामुळे ते क्रांतीकारी हॉटेलाने लवकरच गाशा गुंडाळला असाही उल्लेख आहे.) सध्यकालीन मिसळीतला महत्त्वाचा घटक म्हणजे फरसाण आणि शेव, कांदा हे त्या काळात नाही वापरले जात. आणि त्याकाळच्या मिसळीसम भजी,शेव आणि भाजी हे कामगारांचे खाद्य म्हणून जेथे जेथे कामगार वस्त्या होत्या (मुंबई, सोलापूर, इचलक्रंजी) तेथे तेथे प्रचंड लोकप्रिय होते, अजूनही आहे. भज्याऐवजी काही ठिकाणी वडे किंवा सुशीला किंवा पोहे दिले जात इतकेच. तस्मात सध्यकालीन मिसळीवर आमचीच म्हणून अधिकार वापरु नये हि विनंती.
- Log in or register to post comments
प
परिंदा
Fri, 08/24/2018 - 08:30
नवीन
भज्याऐवजी काही ठिकाणी वडे किंवा सुशीला किंवा पोहे दिले जात इतकेच.
>>
सुशीला हा कोणता पदार्थ आहे? पहिल्यांदाच ऐकतोय.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 08/24/2018 - 09:41
नवीन
जसे आपण जाड पोहे भिजवून फोडणी देऊन पोहे करतो, तसं चुरमुरे भिजवून घ्यायचे आणि त्याला फोडणी द्यायची. काही ठिकाणी ह्यात दाळवं सुद्धा घालतात. पटकन होणारा मस्त पदार्थ आहे हा.
फक्त चुरमुरे भिजवून म्हणजे पातेल्यात पाणी घेऊन त्यात चुरमुरे टाकायचे. त्यातून हवा जात असल्याचा आवाज येतो. तो आवाज थांबला की चुरमुरे हलके पिळून घेऊन फोडणीत टाकायचे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 08/24/2018 - 09:56
नवीन
लगदा होत नाही का?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/24/2018 - 10:04
नवीन
नाही ओ, अगदी साबुदाणा भिजवल्यागत नाही ठेवायचे. चुरर झाले की निथळून घ्यायचे. मराठवाड्यात सगळ्या टपऱ्या हाटेलात सुशीला मिळतो. त्यावर सांबर भाजी टाकून देतात. प्लस शेव.
नळदुर्ग आणि अनदुराला दोन उडपी भावाची हाटेले आहेत. इडली स्पेशल. तिथे एकदम पातळ चटणी इडलीवर टाकून देतात. वर शेव. सांबर सेपरेट वाटीत. बरेच जण ते घेतही नाहीत. तिथे सुशिल्यावर चटणी घालून देतात.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 08/24/2018 - 10:07
नवीन
छे छे.. हे पहा.. https://www.youtube.com/watch?v=fOXWkoPBMco
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 08/24/2018 - 10:13
नवीन
अभ्याशेठ, पिराजी .. धन्यवाद..
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 12:18
नवीन
ह्या आधारावर "वैद्य मिसळ हॉटेल" हे आज अस्तित्वात असलेले सर्वाधिक जुने मिसळ हॉटेल आहे, इतपत विधान करता येईल. ते आजही सुरू असल्यामुळे त्याचे ट्रेस नीट होतायत मागे इतिहासात, पण कळीचा प्रश्न हा आहे की मिसळ एक खाद्यपदार्थ म्हणून रस्सा, शेव-भजी-मसाला इत्यादी एकत्र करून (नीट फरसाणाच्या तिखटपणाला जोडीला मापून बनवलेला रस्सा वगैरे) करून तंत्रशुद्ध मिसळीची पाककृती /पहिली प्लेट नेमकी वैद्यांनी(च) ११० वर्षांपूर्वी शोधून काढली होती का नाही हा निष्कर्ष कसा काढणार?
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 08/24/2018 - 08:29
नवीन
आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ नावाचे एक हॉटेल होते. आता बंद झाले बहुतेक. २० वर्षांपूर्वी त्यांची तिसरी का चौथी पिढी ते हॉटेल चालवत होती. या हिशोबाने शंभर वर्षे त्यांनापण झाले असतील. झालेच आहेत असा माझा दावा नाही.पण मिसळीचे उगमस्थान शोधण्याच्या स्पर्धेत अमरावतीची उमेदवारी मान्य करावी (नंतर डिपॉझिट जप्त झाले तरी हरकत नाही.)
ता.क. गड्डा किंवा अमरावतीच्या कुठल्याही हॉटेलमध्ये मिसळीसोबत (किंबहुना मिसळ,भेळ,भजे या कोणहोसोबत) पाव मिळत नाहीत. मिसळ नुसतीच हादडायची अशी इथली पद्धत आहे. त्यामुळे स्पर्धा मिसळ -पाव या पदार्थाची असेल तर अमरावतीची उमेदवारी स्वीकारण्यात येऊ नये.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/24/2018 - 10:06
नवीन
च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा पुणेकरांचा दावा "पहिला सार्वजनिक गणपती आमचाच" ह्या दाव्याप्रमाणे बोगस निघाला की.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 08/24/2018 - 10:35
नवीन
तुम्हाला दावा कुठे दिसला ब्वा?
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 08/24/2018 - 10:50
नवीन
पण "गुळचट मिसळ" ह्या पदार्थाचे उगमस्थान पुणे हेच आहे. पुण्यातले बेडेकर गुळचट मिसळवाले ह्याचे शोधकर्ता. मिसळीत गोडवा आणून मिसळीच्या मूळ स्वभावालाच हरताळ फसल्याने ह्या प्रकाराला स्थानिक व्हेरिएशन ह्या गोंडस नावाखाली खपवून पुण्याचे श्रेय हिरावून नये ही आग्रहाची मागणी.
"गुळचट मिसळ" हा नवीन पदार्थ म्हणून स्वीकारण्यात यावा.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 08/24/2018 - 11:10
नवीन
पुणेकरांच्या स्वभावातला गोडवा मिसळीत उतरला असेल हो.
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
Fri, 08/24/2018 - 12:26
नवीन
पुण्याला नाव ठेवणारी मंडळी आता पुण्यात राहिल्या आल्यामुळे आता पहिल्या सारख पुणे राहिल नाही हेच खर.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/24/2018 - 12:28
नवीन
हम्म..
आता सुधारेल हळूहळू
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
Fri, 08/24/2018 - 12:37
नवीन
मुळचे पुणेकर की नवीन आलेले? मुळचे सुधरण्याच्या पलिकडे गेलेत आणि नवीन आलेले त्यांची स्पर्धा करतायेत .
- Log in or register to post comments
र
रानरेडा
Fri, 08/24/2018 - 22:07
नवीन
अथर्व वेद किंवा यजुर्वेद मध्ये मिसळीचा उल्लेख आहे ना ? त्यावरूनच तो उल्लेख इतर धर्म ग्रंथात घेतला आहे हे खरे आहे ना ?
- Log in or register to post comments
म
मोहन
Sat, 08/25/2018 - 07:44
नवीन
कोणीही गड्डा मिसळीची आठवण ईथे काढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. वा! वा !
मिसळी सोबत पाव खायची पध्द्त तेंव्हा रुढ व्हायची होती. कटींग चाय (ऑरेंज) - मिसळ हे काँबो प्रचलीत होते. चहाला ऑरेंज म्हणणारे मला अमरावती सोडून कुठेच दिसले नाहीत. आठ्वणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद चिनार भाऊ.
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 08/27/2018 - 07:16
नवीन
कालच अमरावतीला चक्कर झाली..
थोड्या चौकशीअंती असे कळले की, अमरावतीस्थित गड्डा मिसळ हॉटेल १९६५ च्या दरम्यान सुरु झाले. आणि साधारण ५ वर्षांपूर्वी बंद झाले. त्यामुळे मिसळ पदार्थ हा मूळ अमरावतीचा नाही. अमरावतीची उमेदवारी मागे घेण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 12:21
नवीन
ही नम्र विनंती
बरेच दिवस मनात असलेली चर्चा नीट घडणार असेल तर घडू द्या की चार क्षण. माझं काही मृत्युंजय साहेबांशी वैयक्तिक वैर नाही किंवा मी पुणेद्वेष्टाही नाही. फक्त एक वाक्य ट्रिगर पॉईंट होतं चर्चा सुरू करायला
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/23/2018 - 15:14
नवीन
वाक्याची विकेट लिहिलय, मृत्यूंजय रावांची नव्हे हो.
भांडणे करु नयेत, पण वादावे जरुर !!
- हा मराठी बाणा चालवण्यात भूषण !
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 08/23/2018 - 14:33
नवीन
देवाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आगाऊपणे स्वतः देण्याचा प्रमाद करू इच्छितो.
उत्तर : अपमान !! (आणि हा भल्याभल्यांना गिळता येत नाही)
(आणखी एक प्रमाद: धाग्याचा विषय "पुण्यातले भिकार हॉटेल्स किंवा रसातळाला गेलेली पुणेरी खाद्यसंस्कृती" यापैकी किंवा तत्सम नसताना हा उडणारा तीर आपल्या ***/ छातीत का घेण्यात आला हे अनाकलनीय आहे)
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 15:11
नवीन
मग हा रुचकर चविष्ट गरमागरम अपमान जसं लोकांना वाढता येतो तसं लोकांनी वाढल्यावरही गिळता आला पाहिजे.
इत्यलम.
बाकी उडते बाण घेण्यात तुम्हीही शौकीन दिसताय. असो असो!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/24/2018 - 07:11
नवीन
प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर कोलकाता चा , प्रॉपर दिल्ली चा वैगेरे कुठल्याही शहराचे पदार्थ माझ्या ऐकवीत तर नाही मग तिथे पुण्याचा टेंभा मिळवण्यात काय हशील ?
सर्वात जुने मिसळचे हॉटेल पुण्यात असले म्हणून काय झाले ? त्या हॉटेल मधील मिसळीच्या चवीवर आणि कार्यपद्धती वर यथेच्छ टीका करणारे सुद्धा पुणेकरच आहेत ते सुद्धा सदाशिव नारायण मधले .
राहिला प्रश्न महाराष्ट्रीयन थाळी चा . किती हॉटेल मध्ये महाराष्ट्रीयन थाळी चवदार मिळते ? विचार करून ! करून !! हातावरील बोटां च्या संख्ये पुढे आकडा जात नाही , जी थाळी सहज कुठल्याही हॉटेल मध्ये उपलब्ध होत नाही , व ज्या थाळीला बहुसंख्य ग्राहकवर्गा चा पाठींबा त्या थाळी चा झेंडा फडकवण्यात अर्थ नाही .
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 08/25/2018 - 19:59
नवीन
अगदी असेच नाही. काही केसेसमध्ये डीटेल्स उपलब्ध आहेत.
१. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला. (१८६८ साल)
२. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला. (नक्की साल माहिती नाही)
१. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला.
२. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला.
- Log in or register to post comments
स
सुनील
Sun, 08/26/2018 - 02:01
नवीन
के दास यांनी प्रथम बनवला असे मानले जाते, हे खरे. परंतु, आताशा ओडिशानेदेखिल "माजा नंबर पयला" म्हणून जी आय टॅग साठी क्लेम केला आहे. खरे काय ते चौकशीअंती समजेलच!
७० च्या दशकात सुरुवातीला, दादरात!
तसेही, वडा-पाव हा काही स्वतंत्र खाद्यपदार्थ नाही. बटाटेवडा महाराष्ट्राततरी तत्पूर्वीही बनत होताच. पोर्तुगीज्/ब्रिटिश्/इराणी कृपेमुळे, मुंबईत पावदेखिल उर्वरीत महाराष्ट्राच्या मानाने प्रथम आला. तेव्हा दोन्ही पदार्थ एकत्र करून एक स्वस्त आणि पोटभरू पदार्थ बनवला गेला, हे मात्र खरे.
* पहिल्या बाजीरावाच्या काळात बटाटावडा बनवला गेल्याचे पुसटसे वाचले होते. नक्की आठवत नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 08/26/2018 - 18:51
नवीन
बंगाल आणि ओडिशा यांच्यामधील रसगुल्ल्याच्या भांडणासंबंधी मी जवळपास सर्व बातम्या इ. वाचले आहे. रसगुल्ल्याचा इतिहास सांगणारे एक बंगाली पुस्तकही वाचले आहे. त्याबद्दल लिहिलेही आहे ते यथावकाश प्रसिद्ध होईलच. मुख्य मुद्दा असा आहे की सध्या जो रसगुल्ला बनतो त्याची बेसिक कन्सेप्ट जुनी असली तरी दूध फाडायची पद्धत नवीन आहे. या नव्या पद्धतीमुळे केलेला रसगुल्ला अगोदरच्या तुलनेत जास्त काळ टिकतो. या नव्या पद्धतीने बनवलेला रसगुल्ला प्रथम १८६८ साली बनवला गेला.
बाकी बटाटेवडा महाराष्ट्रात कधी आला? १७०० साली सुरत इथे अखिल भारतात प्रथम बटाट्याचे पीक घेतले गेले असे वाचले आहे. तेव्हा तुम्ही म्हणता ते खरे असूही शकेल, परंतु त्याला निश्चित पुरावा पाहिजे. मिळाला तर फार बेस्ट होईल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 08/26/2018 - 18:53
नवीन
शिवाय, दूध फाडून त्याचे गोळे बनवून ते साखरेच्या पाकात तळले की जे काही तयार होते त्याला रसगुल्ला हे नाव १८६८ सालीच देण्यात आले. त्याअगोदर हे नाव प्रचलित नव्हते.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 08/27/2018 - 10:30
नवीन
रसगुल्याचा पूर्वज खीर मोहन असावा. ही एक ओडिया मिठाई असून रसगुल्याप्रमाणेच छेना चेंडू पाकात बुडवून बनवली जाते. पारंपरिक उडिया पद्धतीत पाक गुळाचा (केशरी रंगाचा) असतो. हे चेंडू गुळाच्या पाकात भिजवून नंतर निथळून घेतले का ते झालं खीर मोहन आणि तसेच विक्री होईस्तोवर गुळाच्या पाकात मुरू दिले की झाले ते सुप्रसिद्ध ओडिया "पाहला रसगुल्ला".
टीप - जातिवंत खवय्ये एकदा खीरमोहन/पाहला रसगुल्ला तोंडी लावला का नंतर पांढरे गुलाबजल/केवडाजल शिंपडलेले रसगुल्ले ढुंकूनही पाहणार नाही. हल्दीराम-बिकाजी वगैरेचे डबाबंद गोडमिट्ट अत्याचार तर दूरच राहिले.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 08/27/2018 - 10:33
नवीन
म्हशीच्या दुधाला फाडून बनवलेला रसगुल्ला एका घासात ओळखेल आणि 'उडी बोका' म्हणून पानावरुन उठेल. अस्सल रसगुल्ले, खीर मोहन, पाहला वगैरे कायम गायीच्या दुधाचेच असायला हवेत. म्हशीच्या दुधाची मिठाई बंगाली खाताना दिसणे बांबूची फुले पाहायला मिळल्यागत दुर्मिळ योग आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 08/24/2018 - 07:19
नवीन
प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर कोलकाता चा , प्रॉपर दिल्ली चा वैगेरे कुठल्याही शहराचे पदार्थ माझ्या ऐकवीत तर नाही मग तिथे पुण्याचा टेंभा मिळवण्यात काय हशील ?
सर्वात जुने मिसळचे हॉटेल पुण्यात असले म्हणून काय झाले ? त्या हॉटेल मधील मिसळीच्या चवीवर आणि कार्यपद्धती वर यथेच्छ टीका करणारे सुद्धा पुणेकरच आहेत ते सुद्धा सदाशिव नारायण मधले .
राहिला प्रश्न महाराष्ट्रीयन थाळी चा . किती हॉटेल मध्ये महाराष्ट्रीयन थाळी चवदार मिळते ? विचार करून ! करून !! हातावरील बोटां च्या संख्ये पुढे आकडा जात नाही , जी थाळी सहज कुठल्याही हॉटेल मध्ये उपलब्ध होत नाही , व ज्या थाळीला बहुसंख्य ग्राहकवर्गा चा पाठींबा त्या थाळी चा झेंडा फडकवण्यात अर्थ नाही .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 08/24/2018 - 16:55
नवीन
सहमत व्हायला होतय.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/23/2018 - 12:13
नवीन
११० वर्षे जुनी?
प्रचेतस भाऊ, धिस इज इंटरेस्टिंग. ह्यावर अजून थोडा खाद्य इतिहास होऊन जाऊ दे देवा.
प्रचेतस भाऊंनी दिलेली माहिती म्हणजे ती सत्यापीत झाली. तरी मग मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ हे समीकरण कसे रूढ झाले असेल?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 08/23/2018 - 15:11
नवीन
ते मिसळ इतिहास वगैरे खरंच माहीत नाही पण आजमितीसही चालू असणारे मिसळीचे सर्वात जुने हॉटेल पुण्यातील हे अगदी नक्की.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/23/2018 - 15:21
नवीन
प्रचेतसराव या फेसबुक व्हिडीओनुसार नाशिक मिसळच्या पहिल्या हॉटेलाच्या नंबरवारीत पुण्याला स्पर्धा देऊ इच्छित आहे असे दिसते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 08/23/2018 - 15:40
नवीन
पुणेच पहिलं निघावं अशी माझी काही इच्छा वगैरे नाही हो. मूळ कुठलं आहे ते समजल्याशी कारण.
बाकी तो व्हिडीओ दिसत नाहीये.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 08/23/2018 - 15:36
नवीन
एस.पी.डी.पी.चाही इतिहास तपासला पाहीजे. पदार्थाचे महित नाही पण कमीत कमी एस.पी.डी.पी. हे शॉर्टफॉर्म पुण्याचे निघावे असा कयास आहे. चुभूदेघे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 08/25/2018 - 15:03
नवीन
एस.पी.डी.पी.चाही इतिहास
एस पी डी पी( सेव पोटॅटो दही पुरी) हा पुणेकरानी उगाच कॉस्मोपॉलिटन सोफिस्टिकेटेड आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
मी पहिल्यांदा पुण्यात होतो तेंव्हा १९८३ ते १९८७ अखेर( एम बी बी एस साठी) वैशालीत याच पदार्थाला एस बी डी पी (शेव बटाटा दही पुरी) असे स्वच्छ मराठी नाव होते.
आम्ही अनेक वेळेला संध्याकाळी हा पदार्थ चाळा म्हणून खात असू. वैशालीत बागेत संध्याकाळी जागा सहज मिळत असण्याचे दिवस होते ते.
कालांतराने पुण्यात अर्ध आंग्ल मंडळी बोकाळली आणि १९९३-९४ च्या सुमारास किंवा थोडे नंतर आपण कॉस्मोपॉलिटन, सोफिस्टिकेटेड आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात ते एस पी डी पी झाले.(१९९१ ते १९९७ परत मी पुण्यात होतो)
यातील पोटॅटो सोडून बाकीचे पदार्थ हिंदीत पण तसेच आहेत म्हणून बटाट्याचा पोटॅटो केला गेला.
आई बाबांचे मम्मी डॅड्डी झाले त्या कालावधीतिलच हा बदल असावा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 08/24/2018 - 16:24
नवीन
बरं, पोटं भरली का आता तरी पुण्यावर घसरून? आता विषय पुढे न्या मग.
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 08/24/2018 - 17:18
नवीन
पुणे कसं (हाँटेलमध्ये) खाण्याच्या बाबतीत अतिभिकार, तिथल्या भुक्कड लोकांना अजिबातच खाण्याची अक्कल नाही आणि आमच्या गावचा महीनाभर शिळा पाव सुद्धा त्रिखंडात डंका वाजवत आहे हे सिद्ध केल्याशिवाय चैन पडणार नाही.
धागाविषय उपरोक्त भोजनालयात आलेला अत्यंत अव्यावसायिक अनुभव व ते लक्षात आणून दिले तरी उर्मटपणे दिलेला प्रतिसाद यावर आहे.धागाकर्त्याने पुण्यातच इतरेत्र ठिकाणी सुग्रास भोजन अनुभवल्याचे स्पष्ट केले आहे...पण जस सबसे तेज वाल्या वाहिन्या तू आधी की मी आधी असं करून आपल्याला आवडत्या ध्येय्याकडेच चर्चा,बातमी वळवितात तसाच पवित्रा घेतला आहे.(त्या निमित्ताने चार दुगाण्या पुण्यावर झाडून घेऊ परत संधी मिळते न मिळते)
नगरला जन्मलेला आणि पुण्याने संगोपन केलेला पिंपरी-चिंचवड कर नाखु
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »