ते पंधरा लाख !
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली.
माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे.
आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४
मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाहीयोजना म्हणजे अगदी शेतकरी कर्ज माफी योजनेसारखी एखादी योजना आयटी मधील आणि त्यातही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पाहिजे का? इन्फ्रास्ट्रक्चर मधील सुधारणा, नोटबंदी/ जीएसटी मुळे घरांच्या कमी झालेल्या किंवा स्टेबल झालेल्या किमती आणि त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, तसेच रेरा सारख्या कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेले संरक्षण - यापैकी काहीच तुम्हाला फायद्याचं नाहीये? गुणगान करावं असं म्हणणं नाही पण नावं पण ठेवण्यासारखं काय आहे ते दाखवून द्या. स्थानिक गोष्टींमध्ये मोदी लक्ष घालू शकणार आहेत का? तुमच्या शहरातील/ गावातील/ विभागातील स्वच्छतेसाठी तिथली जनता आणि मुनिसिपालिटी जबाबदार नाही का? इथे तुम्ही नुसती योजना चालू केली आणि पुढे स्वच्छता झाली नाही/ राहिली नाही म्हणून मोदींना दोष देताय पण त्याचप्रमाणे कित्येक योजना चालू करून त्या नीट न राबवणारी, किंबहुना भ्रष्टाचार करणारी, काँग्रेस का बरं दोषी नाही? त्याच योजना थोड्या सुधारणा करून मोदींनी नीट राबवून दाखवल्या तर त्याचे श्रेय न देता वर जुन्याच "नावाच्या" योजना राबवल्या म्हणून नावं ठेवली जातात? जनता म्हणून आपले काही कर्तव्य आहे याची जाणीव का नाही? परदेशात फिरण्यासाठी म्हणून गेलेला भारतीय सुद्धा कचरा करत नाही कारण जबर दंड असतो, अमेरिकेत रस्त्यांवर कचरा करणाऱ्यास $१००० दंड आहे असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या इथे रु. १००० दंड लावला तरी लोक सरकारला नावं ठेवणार आणि त्यातही अजून एक भ्रष्टाचाराची संधी शोधणार.मी मोदींना दोष देत नाहीये. पण त्यांचा गौरव करावा असेही काही दिसत नाही नाएकूण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही फारच छोट्या परिघात विचार करताय असं वाटतं, कदाचित तुम्ही म्हणताय तसं मला तुमचा प्रतिसाद कळला नसावा. तुमच्या माझ्या दोष देण्याने किंवा गौरव करण्याने मोदींना काही फरक पडेल असं वाटत नाही. एवढंच काय २०१९ मध्ये पंतप्रधान पद नाही मिळालं तरी त्यांना काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही.काँग्रेसच्या पातळीचं काम भाजप करत असेल तरएका ट्रेनच्या प्रवासावरून आणि तुमच्या येणाजाण्याच्या रस्त्यावरून तुम्ही मत बनवताय. यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवताय. पण दुसरीकडे व्याजदर कमी झाले त्याचं श्रेय मात्र मोदी सरकारला नाही देत आणि म्हणताय "मी केवळ वस्तुनिष्ठ विचार करतो."! शहरांतर्गत रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे जरा बघा. "रेपो रेट" हे शब्द कधीतरी ऐकले असतील अशी आशा करतो, हे काय आहे आणि त्याचा ग्राहक कर्जाशी काय संबंध असतो हे जरा गुगलून बघा. गृहकर्ज का स्वस्त झालं हे इथे वाचा आणि इथे पण वाचा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर कर्जाचे दर आणि ठेवींचे दर एक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे ठेवींवर १०% आणि कर्ज मात्र ८% असं होऊ शकत नाही. म्हणून कर्जाचे दर कमी करायचे झाले तर ठेवींचे दर पण कमी करायला लागणार. म्हणजे मग ठेवीदार, मुख्यतः ज्येष्ठ नागरिक रागावणार. हा तिढा कसा सोडवायचा सांगा बघू.सत्तेचा मोह असणार्या सरकारांना लोक नाव ठेवणार याची भिती असते आणि ते लोकधार्जिणे निर्णय घेत राहतातमाझ्या मते तरी निश्चलीकरण आणि जीएसटी या निर्णयांसाठी मोदींना सगळीकडून शिव्या बसल्या आहेत. छोटे आणि मध्यम व्यापारी, जे मोदींचे समर्थक मानले जात होते, त्या लोकांना या दोन्ही निर्णयांचा फटका बसला. निश्चलीकरणात सामान्य माणसाचे पण हाल झाले असं म्हणतात. मग हा सत्तेचा मोह आहे म्हणता येईल का? त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर सारख्या योजना आग्रहाने राबवल्या. त्यामुळे मधल्यामध्ये पैसे खाणारे लोक नाराज झाले. पेट्रोल/ डिझेल वरील सबसिडी बंद करून ते जागतिक दरांशी संलग्न केले, त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर भारतातले पण दर वाढले. ते वाढायला लागल्याबरोबर लगेच मोदींवर टीका झाली. कर हा त्यातला मोठा भाग आहे आणि ते कमी करावेत अशी मागणी होते आहे. पण त्यात राज्यस्तरीय करांचा पण मोठा सहभाग आहे. जर राज्य तयार नसतील तर काय करायचं?त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, काही प्रमाणात खरंय. पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर.मी म्हणतो म्हणून का होईना तुम्ही मोदींना याचं श्रेय द्यायला तयार झालात, तुमचं मन खरंच मोठं आहे. हे मनापासून म्हणतोय बर्का, नाहीतर तुम्हाला खोडसाळपणा वाटायचा.