छान.
मला विमुक्त यांचा एक गुण आवडला. ते छायाचित्र काढतांना कोणतीही कॄत्रीम बाब (जसे विजेच्या तारा, पोल्स, अॅड बॅनर, सिमेंटचे घर आदी) येवू देत नाही.
अवांतर: विमुक्त यांचा दर २ महीन्यातुन असे बाहेर भटकणे कसे परवडते? (आर्थीक द्रुष्ट्या नव्हे तर संसारीक द्रुष्ट्या. घरची मंडळी काही बोलत नाही का? मी तुमचा हेवा करतो.)
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
हो खरं आहे..... कॄत्रीम बाबी आल्या की, खुप राग येतो... आपण निसर्गाची किती वाट लावतोय ह्यची जाणिव होते.....
आणि ...दर २ महीन्यातुन नव्हे तर महीन्यातुन २ वेळा.... अजुन मी मोकळा आहे... कोणी बायको किवा G.F. नाहि...... पण आई ओरडते.... पण आता तीला कळालय की, मी भटकायला नाहि गेलो तर वेडा होइन ते.... आणि मी नुसता भटकायच म्हणुन भटकायला जात नाहि.... मी भटकण्या साठिच जगतोय..... बघु पुढे कस होतय ते...
असल्या ठिकाणी जातांना योग्य ती काळजी घ्या. अर्थात हे मी आपल्याला सांगायला नको पण मला वाटले म्हणून सांगीतले.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
कोकणातुन हरीश्चंद्र गडावर चढताना चे काही photos आहेत.... माळशेज घाट उतरुन खाली आलं की उजव्या हाताला जरा आत बेलपाडा गाव आहे.... तिथुन मग चढायच... पण वाट अतिशय अवघड आहे.... प्रचंड अनुभव हवा....
प्रस्तर-रोहणाचे साहित्य लागते का? नुसता रोप पुरेसा होईल का? साधारण वेळ किती लागतो? आळेफाट्यावरुन कल्याण गाडी पकडली तर साधारण किती वेळ, आणि माळशेज पुर्ण पार करायचा कि मधेच कुठे?
हरीश्चंद्र माझा अत्यंत आवडता, आत्तापर्यंत ६-७ वेळा गेलोय. पण वाट ठरावीकच, ही नवी वाट चोखळायला आवडेल. गड प्रचंड आहे, नजरेत मावत नाही.... विलोभनीय निसर्ग १२ महीने. रहायला गुहा, डुंबायला तळे, भटकायला तारामती, रोहीदास, कोकणकडा अजुन काय काय...
रोप पुरेसा आहे... नविन कोणाला सोबत नका घेउ.... पावसात अजिबात नको.... हिबाळ्यात best आहे... stamina चांगला असेल तर बेलपाड्याहुन ७ तास... नाहीतर १० - ११ तास... ह्या वाटेला नळिची वाट असा म्हणतात.... गुगल वर शोधा... खुप माहिती मिळेल... काही अडल तर मी आहेच.... :-)..
आळेफाट्यावरुन कल्याण गाडीने १.२५ तास... माळशेज पुर्ण पार करायचा ....सावर्णे ला उतरायच... मग चालत बेलपाडा... १.५ तास..
१ - केळद हुन सह्याद्री....
२,३,४,५ - हरीश्चंद्र गड कोकण कडा... नळीची वाट
६ - वरंध हुन मंगळगडा कडे जाताना
७ - वरंध घाट माथा
८,९ - रोहिड्याहुन उतरताना
१०,११,१२ - ढाकोबा हुन कोकणात बघताना
१३,१४,१५ - कोकणातुन (ढवळे) अर्थ्र सीट चढताना
१६ - कोयनेच पाणी... वासोट्याला जाताना
१. ज्याला खरड टाकायची आहे त्याच्या नावावर क्लिक करा.
२. त्याचे "सदस्य खाते" दिसेल. त्याखाली "खरडवहीतील नोंदी पाहा" वर क्लिक करा.
३. तिठे तुम्हाला खरडवहीतील नोंदी पाहता येतील. त्या स्क्रिनमध्येच
"खरडवहीत नोंद करा" तिठेच तुम्ही खरड नोंदवू शकतात.
हेच उदाहरण मी तुम्हाला आताच खरड च्या माध्यमातून टाकले आहे.
अवांतर : तुम्ही फोटोच्या खालीपण डिस्क्रीपश्नन लिहू शकतात. म्हणजे वाचकांना कुठले फोटो म्हणून प्रश्न पडणार नाही.
टेन्किकल सपोर्ट मध्ये नं १ व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
तात्या, तात्याच फक्त याला जबाबदार आहेत. :-)
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी