...याचा अगोदर बंदोबस्त करा!
रोज नित्यक्रमाने ताजी ए० आय० न्युज युटयुब वर बघत असताना हा व्हिडीओ नजरेस पडला. https://www.youtube.com/watch?v=v2Ur_DgaEEI
काही वेळाने या एक चिनचा नकाशा पुढे केला

या नकाशात भारताचा मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे (स्वगत- सुब्रम्हण्यम स्वामी ओरडून सांगत असलेली जमीन ती हीच का?)
आता याचा राग म्हणून जर भारताने चीनी ए० आय० वर बंदी घातली तर इतर बाबतीत एकापेक्षा एक सरस असलेली चीनी मॉडेल्स वापरण्यापासून भारतीय संशोधक वंचीत राहतील आणि सरकार गप्प बसले तर जमीन गिळंकृत केली हे स्वीकारून गप्प बसावे लागेल.
भारतीय राजकारणी भारतीय बुद्धीमत्तेला वर्षानुवर्षे नामोहरम करत आहेत - गोमूत्र, शेण यावर यावर संशोधन करून ही जमीन परत मिळणार नाही की चीनने उभ्या केलेल्या बौद्धिक आह्वानाना तोंड देता येणार नाही...
कुणी ऐकतय का?
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही.वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.कुणी ऐकतय का?गोबरयुगात कुणीही ऐकत नाही!