Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

करोनाचा बागुलबुवा

आ
आशु जोग
Mon, 05/16/2022 - 12:47
🗣 147 प्रतिसाद
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले. स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले. करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत. असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32981 views

🗣 चर्चा (147)
न
नर्मदेतला गोटा Mon, 05/16/2022 - 15:19 नवीन
म्हणजे तुम्हाला हा सगळा बागुलबुवा वाटतो
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/16/2022 - 17:07 नवीन
प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?
डॉक्टर शंभर टक्के अनभिज्ञ असतात. लेकाच्यांना उगाच वाटते की वर्षानुवर्षे अभ्यास केला म्हणून आपण फार ज्ञानी झालो असं. तुमचा अभ्यास चुलीत घाला म्हणावं, आमच्याकडे गुगल असते, ट्विटर , फेसबुक वरून काय ती खरीखरी माहिती आम्हाला कळते. भेंडी, मी ऑफिसमधल्या डब्याच्या सुट्टीत दहा मिनिटात युट्युब आणि गुगलवरून कोव्हिड काय असते हे समजून घेतले, आणि तरी वर्षानुवर्षे अभ्यास करणारे (म्हणे) डॉक्टर मला व्यवस्थित समजावून सांगू शकत नाहीत- कोव्हिड काय, लस कशी काम करते वैगेरे वैगेरे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 05/21/2022 - 17:29 नवीन
या सगळ्यांचं उच्चतम विद्यापीठ राहिलं!
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 05/16/2022 - 18:27 नवीन
Covid काळात हे स्पष्ट दिसले डॉक्टर स्वतः काहीच निर्णय घेवू शकतं नव्हते. निदान कसे करायचे,उपचार कोणी आणि कसे करायचे,कोणती औषध वापरायची ,ह्याचे स्वतंत्र dr ना नव्हते. Who किंवा सरकार च हे ठरवत होते. Dr ना स्वतःच्या मनाने उपचार करायला दिले असते तर covid लवकर नियंत्रणात आला असता.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/26/2022 - 07:44 नवीन
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला देणारी संस्था आहे. औषधी ठरविणे प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग पाहणारे अधिकारी /मंत्री करतात. प्रोटोकॉल मध्ये ठरवलेली औषधी देणे ही बंधनकारी नसतात. पण जर ती दिली नाही आणि रोगी दगावला तर त्याचे नातेवाईक हॉस्पिटल विरुद्ध केस करू शकतात. म्हणून आपल्या देशात कुठलेही शास्त्रीय परीक्षण न झालेली औषधे प्रोटोकॉल म्हणून दिल्या गेली. त्या औषधांचे रोगींवर दुष्परिणाम झाले. आता रोगी दगावण्याचे कारण औषधी होती की करोंना, हे दोन चार वर्षांत मेडिकल संस्था स्वीकार करतील.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/26/2022 - 07:44 नवीन
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला देणारी संस्था आहे. औषधी ठरविणे प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग पाहणारे अधिकारी /मंत्री करतात. प्रोटोकॉल मध्ये ठरवलेली औषधी देणे ही बंधनकारी नसतात. पण जर ती दिली नाही आणि रोगी दगावला तर त्याचे नातेवाईक हॉस्पिटल विरुद्ध केस करू शकतात. म्हणून आपल्या देशात कुठलेही शास्त्रीय परीक्षण न झालेली औषधे प्रोटोकॉल म्हणून दिल्या गेली. त्या औषधांचे रोगींवर दुष्परिणाम झाले. आता रोगी दगावण्याचे कारण औषधी होती की करोंना, हे दोन चार वर्षांत मेडिकल संस्था स्वीकार करतील.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 05/16/2022 - 20:38 नवीन
http://misalpav.com/node/50096#new
शिळ्या कढीला उत आणताय की नव्या बाटलीत जुनी दारु विकताय ?
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 05/18/2022 - 17:53 नवीन
मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 05/18/2022 - 18:20 नवीन
आपल्या मताचा आदर आहे. पण मी साथीचे रोग व मेडीकल क्षेत्रातील तज्ञ लोकांचे म्हणने मानतो. ते म्हणता तेच खरे. गेल्या दोन वर्षांपासुन जगात या रोगाने हाहा:कार माजवला आहे. त्याचे परीणाम पाहतोच आहे. तेव्हा " रोगच खोटा आहे" हे तुमचे म्हणने माझ्या लेखी चुक आहे. बाकी तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 05/16/2022 - 22:07 नवीन
मजेची गोष्ट आहे. मस्तिष्कशार्विका झाली जे नतद्रष्ट विचार सुचू लागतात त्यांत कोविड हा बागुलबुआ आहे हा साक्षात्कार प्रथम होतो (ट्रम्प प्रेम, वॅक्सीन विरोध, रशिया प्रेम वगैरे सिम्प्टम नंतर येतात). ह्या लोकांची शेवटची सिम्प्टम म्हणजे कदाचित स्टोक मार्केट मध्ये लाखाचे बारा हजार करून घेणे. कोविड हा निःसंशय पणे धोकादायक रोग आहे. ह्याने आधीच लक्षावधी (आणि कदाचित कोट्यवधी) लोकांचा अकाल मृत्यू झाला आहे. कोविड धोकादायक आहे ह्याचा अर्थ सर्व डॉक्टर, राजकीय नेते, इत्यादी इत्यादी मंडळी बरोबर आहे आणि अचूक आहेत असा होत नाही पण रोग धोकादायक आहे आणि व्हॅक्सीन्स हि त्यावरील चांगला तोडगा आहे हे सत्य आहे (ज्यांना मस्तिष्कर्षविका झाली नाही त्यांच्या साठी तरी). रिस्क मॅनॅजमेण्ट चा पाया म्हणजे धोकादायक गोष्टी आम्हाला १००% ठाऊक नसतात तरी सुद्धा ढोबळ मानाने आम्ही त्यासाठी तयार राहतो. त्यासाठी प्रसंगी पैसे खर्च करतो. विमा उतरवतो. एखाद्या गोष्टीची १००% काय पण १०% सुद्धा माहिती नसली तरी त्याच्या बाबतीत भरपूर काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यांत विवेक सुद्धा आहे. डॉक्टर लोकांना रोगाची १००% माहिती नाही ह्याचाच अर्थ त्या रोगाची आम्ही धास्ती घेतली पाहिजे असा होतो. हळू हळू जशी जास्त माहिती येईल तशी तशी आपण आपली प्रतिक्रिया बदलू शकतो. कोविड धोकादायक आहे ह्याचा अर्थ त्याला रोखण्यासाठी सरकारने जो धुडघूस घातला तो बरोबर आहे असा होत नाही. इतर सर्व सरकारी कारभाराप्रमाणे तिथे निष्क्रियता, भ्रष्टचार, सत्तेचा मद इत्यादी गोष्टी दिसून आल्याच आणि त्यामुळे प्रचंड नुकसान सुद्धा झाले. काही ठिकाणी हेच नुकसान मूळ रोगापेक्षा जास्त सुद्धा झाले असावे. पण ह्याचा अर्थ रोग धोकादायक नाही असा होत नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 05/17/2022 - 08:29 नवीन
करोना थोतांड आहे वगैरे म्हणणार्‍या लोकांना फाट्यावर मारावे. जगभरात लाखो लोक या रोगाने मेली आहेत किवा मरत आहेत. भले त्यातले अनेक जण आधीपासुनच रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण असतील. पण या रोगाने त्यांना शेवटचा फटका दिला नपेक्षा ते लोक अजुन काही वर्षे जगले असते. आमच्या फॅमिली डॉक्टर्स आणि ईतरही डॉ. लोकांच्या म्हणण्यानुसार हा जो काही संसर्गजन्य रोग आहे त्याचे व्हेरिअंट येतच राहणार आहेत. आणि आपल्याला त्याच्या बरोबर जगायची सवय करुन घेतली पाहिजे. जसे सर्दी,खोकला, साथीचे ताप हे आपल्या आयुष्याचा भाग आहेत तसेच. जगभरात या रोगावर रामबाण उपाय कोणाकडेही नाही, सर्वजण चाचपडत उपचार करत आहेत, एकही लस न घेतलेले ,विनामास्क फिरणारे, गुटखे/तंबाखु खाउन थुंकणारे लोक मजेत जगताहेत आणि दोन दोन लशी, बुस्टर वगैरे घेतलेले आणि घरातच क्वारंटाइन राहणारे मरत आहेत. तेव्हा करोनापासुन वाचण्याचा एक असा काही नियम नाही. तेव्हा जमेल तेव्हढी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे, कुठल्याही आजारांकडे दुर्लक्ष न करणे,वेळेवर उपचार घेणे हाच काय तो मार्ग दिसत आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/17/2022 - 09:39 नवीन
किती ही काळजी घ्या,सर्व नियम पाळा covid हा हवेतून पसरणारा रोग आहे. तो होणारच च होणार. निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. ऐन रोगाच्या भरात नळ बाजार किंवा crofort मार्केट च्या भागात बिना मास्क लोक फिरायची. त्या च वेळी तिथे जाण्याचा योग आला तेव्हा बघितले. त्या भागात covid मुळे जास्त लोक ग्रस्त नव्हते. पॉश समजले जाणारे भाग covid ग्रस्त जादा होते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/26/2022 - 09:05 नवीन
कचरे बुवा निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. कचरे बुवा वरील विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला काही पुरावा देता येईल का हे पण असंच (नेहमीसारखं) न विचार करता टंकलंय? अतिदक्षता विभागात काम केलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वतःचे अनुभव असे आहेत कि जेवढे मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते. याचा अर्थ सांगता येईल का? साधा अर्थ असा आहे ज्यांनी लस घेण्याची काळजी घेतली त्यांच्यात गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण नि:संशय दृष्ट्या कमी आहे. काळजी घेणारे लोक कोण होते ज्यांचे वय किंवा/ आणि वजन जास्त होते ज्यांना मधुमेह हृदयविकार सारखा रोग होता. करोनाच काय सध्या फ्लूने मरणार्या लोकांत सुद्धा याच लोकांचे प्रमाण २०२० पूर्वी सुद्धा जास्त होतेच. यांची तुलना विशी पंचविशीच्या तरुणाशी करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. बाकी आकडेवारीने एक सोडून कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते. ती एक गोष्ट म्हणजे सत्य
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/17/2022 - 10:21 नवीन
रोग नविन असल्याने बागुल्बुवा आहेच. १० रुपयाचा हॅन्ड सॅनिटायझर ७५ रुपयाना विकणार्या कंपन्याना करोना हवा आहेच. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवणार्या कंपन्यानाही करोना हवा आहेच. लस बनवणार्या कंपन्यानी उखळ पांढरे केले व भविष्यतही त्यांना ते करायचे आहे. तोवर भारतात २०२० मध्ये ८०,००० मृत्यु टी.बी.ने झाले ह्याकडे दुर्लक्ष करु. गेल्या ३ वर्षात २२ लाख लोक कर्करोगाने दगावले ह्याकडेही दुर्लक्ष करू. २०२० मध्ये १,३०,००० लोक रस्ते अपघातात मरण पावले येथेही दुर्लक्ष करू व मास्क घालून फिरत राहू.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/17/2022 - 10:34 नवीन
फक्त दहा च surgical मास्क असलेले pkt आता मध्ये मागवले तेव्हा कविड नव्हता. किंमत 20 रुपये. त्या वर एमआरपी बघितली 75 रुपये होती. म्हणजे ह्यांनी covid काळात ते 10 मास्क 75 रुपयाला विकले होते. ऑक्सिजन मीटर कोणी विचारत नव्हतं....जेव्हा मीडिया नी ऑक्सिजन ,ऑक्सिजन म्हणून बोंब मारायला सुरुवात केली. तज्ञ त्यांचे अमूल्य विचार मांडू लागले तेव्हा oxymeter ची किंमत 2000 झाली त्या नंतर तज्ञ जास्त च बुद्धी ची चमक दाखवायला लागले किंमत 3500 वर गेली. त्याचा काही उपयोग होता का रोग नियंत्रणात येण्यासाठी हे फक्त तेच जाणोत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/26/2022 - 12:49 नवीन
आपण वर्णन केलेलं घडले यावर कोणी शंका घेत नाहीये ,, पण ते झाले मनुष्य स्वभावातील घाणरडेपणाचे दर्शन पण म्हणून रोगाचं खोटा? काही देशात कोणत्याही रोग्याला वैद्यकीय व्यावसाय लुबाडतो असे मानले जाते... तर त्या व्यवसायातील असा दुष्ट प्रवर्ततींवर टीका जरूर कर पण मुळात रोगाचं नाहीत असे कसे म्हणू शकता .. काह्ही राजकीय दृष्टीने विचार केलं तर उद्योग बंद पडलेम हे ना उजवया विचहरसरणीला परवदणारे ना डॉय विचहरसरणीचं कामगारांना परवडणारे मग हे जे मी वरती न्हणतो तर हे कोण्ही सांगावे कि दोन्ही उजव्या सरकारांनी आणि दाव्या सरकारांनी कसे काय हो उद्योग बंद ठेवले ? आज आमचं देशात परदेशी विद्यार्थी यायचे कमी झाले आणि छोट्या वयवसायांना अर्ध वेळ काम करणारे कामगार मिळत नाहीत .. उजवे सरकार असूनही त्यांनी सुरवातीला तरी देश बंद ठेवला ? का? मूर्ख म्हणून , त्यांचे पाठीराखे उद्योजक किती ओरडेल असतील ! तरी उजवे असून त्यांनी बंद ठेवला
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/17/2022 - 10:48 नवीन
Who चे सर्व सदस्य,सर्व देशांचे सत्ता धारी,सर्व डॉक्टर्स,सर्व covid तज्ञ,सर्व covid संशोधक,लस निर्मिती करणारे,मेडिकल स्टोअर वाले, sanitizer, मास्क आणि covid वर औषध निर्माण करणारे . ह्या सर्वांची चोकशी जागतिक पातळीवर केली पाहिजे. ह्यांची संपत्ती किती पट वाढली ह्याची माहिती मिळेल. दुनिया बरबाद हे ठराविक मालामाल असेच चित्र दिसेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/17/2022 - 12:07 नवीन
आखरी अंतिम उपाय - पाण्यात तुरटी फिरवून गुळण्या करणे. माणसे पूर्वीही वेगवेगळ्या रोगांनी मरत होतीच. पण कोण किती पैसे खर्चून मरतो याने स्टांडर्ड वाढते ना!
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 05/18/2022 - 15:19 नवीन
खरंच बागुलबुवा ही लिन्क अवश्य पाहून घ्या
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/18/2022 - 19:38 नवीन
आशु जोग, मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय करोना नामे कोणताही विषाणू आजवर विलग करता आलेला नाहीये. त्यामुळे तुमचं म्हणणं खरं वाटतंय. हा रोग अथवा विकार जे काही असेल ते सर्दी ते फ्ल्यू या दरम्यानचं काहीतरी आहे. याच्यामुळे जर माणूस मरंत असेल तर त्याच्या / तिच्या शरीराची स्थिती सहव्याधींमुळे गंभीर आहे. प्राणघातक व्याधींवर उपचार करायचं सोडून जर करोनावर उपचार करीत बसलं तर जीव जाणारंच ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sat, 05/21/2022 - 13:40 नवीन
रोग खोटा आहे. मेलेले लोक हॉस्पिटलच्या तावडीत सापडल्यानंतर मेले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांचे देखील एक विधान आले होते. रेमेडीसिवर हे गरजेपेक्षा जास्त दिले जात होते ते दिले जाऊ नये. परंतु तोपर्यंत अनेक लोक औषधांमुळे मारले गेलेले होते. आणि हा बागुलबुवा आहे. यावर विश्वास असल्यामुळे लशीच्या वाटेला गेलेलो नाही. कोर्टात ज्या प्रकारच्या कबुल्या दिल्या जात आहेत त्यावरून या बागुलबुवाची खात्री पटते आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 05/22/2022 - 09:43 नवीन
आशु जोग, तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 08/10/2022 - 08:19 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/26/2022 - 09:07 नवीन
आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/26/2022 - 12:39 नवीन
१००% सहमत
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 05/26/2022 - 12:02 नवीन
तुम्हाला माहीत नसले तरी तुम्हाला स्वतःला करोना (कुठलाही वेरिएंट असुदे ) होऊन गेलाय. लक्षणे दिसली नसतील! आणि लक्षणे दिसत नसतानाही लोक स्वखुशीने हॉस्पिटल मधे अ‍ॅडमीट होतात आणि डॉक्टरही करून घेतात असं म्हणायचंय का तुम्हाला? >> उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा तुम्ही कुठल्याही करोना होऊन गेलेल्या व्यक्तिला भेटला नाही आत्तापर्यंत ? कुठल्या जगात राहताय ? बातम्या बघून ठरवता का कि करोना होता कि नाही ?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 05/26/2022 - 12:18 नवीन
1माझ्या बाजू लाच covid ची rtpcr टेस्ट negetive आली पण त्रास होत होता. म्हणून xray काढण्याचा सल्ला दिला सामान्य लोकांनीच..श्वास घेण्यास त्रास covid निगेटिव्ह रिपोर्ट तरी दबाव टाकून भरती करायला लावले . व्यक्ती बरा झाला. २)एक नाही दोन नाही ७ ते ८ covid बाधित लोकांशी खूप जवळून संपर्कात होतो ते पण दोन चार तास. सहज सर्वांची rtpcr केली आणि आणि ती दूसरी टेस्ट पण केली बरोबर असणारे ८ जन covid positive मी एकटा निगेटिव्ह. विश्वास बसला नाही म्हणून परत टेस्ट केली परत negetive . close संपर्कात असून पण संसर्ग नाही .जे positive होते ते सर्व मस्त होते . तरी bmc मध्ये पाठवले.. आता बस झाले सोडा त्यांना असा पण दबाव टाकावा लागला. ३) covid positive एकाची आली थोडे सिरीयस लक्षण होती पण तो व्यक्ती घरातच विलगिकरण मध्ये गेला पाच सह दिवसात टणाटण ..दवाखान्यात गेला असता तर गेला असता... Covid पेक्षा उपचार मुळे लोक मेली आहेत हे मला पण खरे वाटते ४)माझी आई ८२ वर्षांची आहे वृध्द पना मुळे किरकोळ आजार covid काळातच हॉस्पिटल मध्ये घेवून गेलो होतो. ते पण covid हॉस्पिटल ..ना तीला covid ची लागण झाली ना काही त्रास.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 05/26/2022 - 13:04 नवीन
काही वाट्टेल ते बोलु नका. डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही ! इथुन पुढे काहीही झाले तरी जाऊ नका दवाखान्यात. 1माझ्या बाजू लाच covid ची rtpcr टेस्ट negetive आली पण त्रास होत होता. म्हणून xray काढण्याचा सल्ला दिला सामान्य लोकांनीच >> एक्स-रे काढतात अशावेळी ? मला वाटलं HRCT करतात. माहिती घ्या आधी नीट. आणि फोनवर टाईप करताय का ? इतकं गचाळ आहे म्हणून विचारलं. जे positive होते ते सर्व मस्त होते . तरी bmc मध्ये पाठवले.. आता बस झाले सोडा त्यांना असा पण दबाव टाकावा लागला. >> तसं मग सगळ्यांना जबरदस्ती लॉकडाऊन लावून बसवलेलेच होते ना ? स्वतःहुन कोण बसलं होतं ?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 05/26/2022 - 13:24 नवीन
नाही . मी माझ्या अगोदर च्या एका कॉमेंट मध्ये पण लीहले आहे.डॉक्टर नी स्वतःच्या मनाने उपचार केले असते तर इतके मृत्यू झालेच नसते. मिळालेलं आदेश नी उपचार केल्या मुळे स्थिती बिघडले. असेच उपचार करा,हीच औषध ध्या,ह्याच टेस्ट करा असे निर्देश दिल्यामुळे डॉक्टर कडे करण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही. ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. किती तरी लोक गंभीर परिणाम भोगत आहेत. ह्या वर एक शब्द तरी कोणी बोलत आहे का? Industrial वापरासाठी लागणारे विविध वायू चे सिलिंडर खाली करून त्याचा उपयोग ऑक्सिजन सिलिंडर म्हणून केल्या मुळे ब्लॅक फंगस आजार निर्माण झाला असा अंदाज खूप तज्ञ लोकांनी व्यक्त केला होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/26/2022 - 15:55 नवीन
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. कचरे बुवा तुम्ही इतकं भंपक लिहिता आहात त्यातील प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करणे अशक्य आहे आणि कालापव्यय करण्यासारखे आहे. कधीही काहीही माहिती नसताना केवळ टंकायचं एवढच तुम्हाला माहिती आहे. ब्लॅक फंगस अनादी काला पासून भारतात आहे सर्वत्र पसरलेली आहे. तुमच्या पावावर किंवा मुरंब्यावर येणारी बुरशी आहे ती. करोना मुळे किंवा टोसिलीझुमॅब या औषधामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती अशा रोग्यांना हा आजार झाला होता. टाटा कर्करोग रुग्णालयात किंवा कर्क रोगावर उपचार करणाऱ्या इतर कोणत्याही रुग्णालयाला अनेक तर्हेच्या कर्करोगांवर केमो थेरपी घेणाऱ्या रोग्यांपैकी काही रोग्यांना ( विशेषतः ल्युकेमिया) हा आजार झालेला डॉक्टर कित्येक वर्षे पाहत आलेले आहेत. हा आजार जेंव्हा जेंव्हा प्रतिकार शक्ती कमी होते तेंव्हा होऊ शकतो तेंव्हा रोज काहीतरी टंकलेच पाहिजे हा अट्टाहास सोडून द्या.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 05/26/2022 - 13:25 नवीन
नाही . मी माझ्या अगोदर च्या एका कॉमेंट मध्ये पण लीहले आहे.डॉक्टर नी स्वतःच्या मनाने उपचार केले असते तर इतके मृत्यू झालेच नसते. मिळालेलं आदेश नी उपचार केल्या मुळे स्थिती बिघडली असेच उपचार करा,हीच औषध ध्या,ह्याच टेस्ट करा असे निर्देश दिल्यामुळे डॉक्टर कडे करण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही. ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. किती तरी लोक गंभीर परिणाम भोगत आहेत. ह्या वर एक शब्द तरी कोणी बोलत आहे का? Industrial वापरासाठी लागणारे विविध वायू चे सिलिंडर खाली करून त्याचा उपयोग ऑक्सिजन सिलिंडर म्हणून केल्या मुळे ब्लॅक फंगस आजार निर्माण झाला असा अंदाज खूप तज्ञ लोकांनी व्यक्त केला होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/26/2022 - 15:46 नवीन
@उन्मेष दिक्षीत कुठे त्या कचरे बुवांच्या नादाला लागत आहात. टंकन करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि बॅण्डविड्थ आणि नेट स्वस्त आहे म्हणून काही तरी टंकत असतात ते. दिसामाजी काहीतरी टंकित जावे प्रसंगी अखंडित टंकित जावे एवढेच त्यांचे ब्रीद
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/26/2022 - 15:54 नवीन
एकदम करेक्ट. लसी घेऊ नका, कोरोना पॉझिटिव्ह माणसाचा मुका घ्या, काय वाट्टेल ते करा असे म्हणावे वाटत आहे. बरं, कोरोना हा रोगच थोतांड आहे असे म्हणणारा माणूस २४*७ बेसमेंटमध्ये राहत असणार असे वाटत आहे. समाजात वावरणाऱ्या लोकांना आणि आजूबाजूला होणाऱ्या घटना ज्यांनी पहिल्या त्यांना हा रोग थोतांड आहे असे वाटणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 05/26/2022 - 16:38 नवीन
Corona थोतांड होता असे नी कुठे लीहले आहे? Corona नीट हाताळायला गेला नाही त्या बाबंत भीती पसरवली गेली . उपचार योग्य दिशेने झाले नसावेत अशा अर्थाचा माझा प्रतिसाद आहे . न्यूज चॅनेल, समाज मध्यम ,ह्यांनी अंतरांजित माहिती पसरवली त्या मुळे भीती चे वातावरण निर्माण झाले. जे उपचार केले गेले त्याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. उपचार चुकीचे झाले असे फक्त मला वाटतं. त्या वर खरेच सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. पुढे त्या चुका त्या मुळे टाळता येतील. ब्लॅक fungas वर कोणी च का बोलत नाही. हा पण प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/26/2022 - 16:50 नवीन
उपचार चुकीचे झाले असे फक्त मला वाटतं. म्हणजे कोणा कोणाला काय काय उपचार व्हायला हवे होते आणि ते झाले नाहीत ते एकदा डिटेलवार मध्ये जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय आरोग्य समिती इंडियन मेडिकल असोसिएशन या सर्वाना सांगून टाका. म्हणजे पुढच्या महामारीच्या वेळेस सर्व लोक जागृत राहतील हा का ना का त्या वर खरेच सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. हायला मला वाटलं तुम्हाला सगळं माहिती आहेच ब्लॅक fungas वर कोणी च का बोलत नाही. fungas नव्हे fungus तुम्हाला काय fun gas फन गॅस (गमतीचा वायू) वाटला काय? विचार न करताना टंकताय निदान स्पेलिंग तरी ठीक लिहा कि.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 05/27/2022 - 12:51 नवीन
उपचार चुकीचे झाले असे फक्त मला वाटतं. 1.हाइड्रोक्लोरोक्वीन ते रेमेडेस्वीर बिना कुठल्याही प्रमाण प्रोटोकॉलमध्ये का दिली गेली याचे उत्तर एम्स ते आईएमए कुणाही जवळ नाही. 2. जागतिक आरोग्य संघटना फक्त सल्लागार संस्था आहे. औषधी विकसित करण्याची त्यांच्या जवळ कुठली यंत्रांना नाही. उपचार पद्धतीचा निर्णय प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग घेतो. 3. आयएमए एक असोसिएशन आहे ज्यात 20 एक हजार डॉक्टर सदस्य आहेत. आयएमए जवळ ही रिसर्च लॅब इत्यादि नाही. डॉक्टरांच्या हितांचे रक्षण हे संस्थेचे उदेश्य आहे जसे आणि मजदूर संघटनांचे असते. या शिवाय फार्मा कंपन्यांचे हित जपणे ही असते. त्यामुळे शेकडो डॉक्टर आणि लाखो रोगी मृत्यूमुखी पडले. हे सत्य सर्वांनाच माहीत आहे. ब्लॅक fungas वर कोणी च का बोलत नाही. आपल्या देशात फक्त पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूट या संस्थेने कोविड आणि ब्लॅक फंगस वर वास्तविक रिसर्च केले आणि ते जागतिक दर्जाच्या जर्नल्स मध्ये प्रकाशित ही झाले. (https://www.patanjaliresearchinstitute.com/covid-19.php )अर्थात ते प्रकाशित होऊ नये म्हणून देशातील मेडिकल माफियाने औषध कंपन्यांच्या दलालांनी मोठ्या प्रमाणात दबाव टाकला. प्रत्येक रिसर्च प्रकाशित कारला सहा ते एक वर्ष लागायचे. शेवटी सत्य हे स्वीकार करावेच लागते. By Daily Excelsior -21/01/2022 A team of scientists at Patanjali Research Institute has found classical ayurvedic nasal drop ‘Anu taila’ effective against the black fungus (mucor), by using sophisticated scientific technologies. The intractable mucormycosis caused by Mucorales primarily targets immune compromised individuals. The first-line therapy, intravenous liposomal Amphotericin B and surgical debridement of necrotic tissue, is contraindicative in individuals with compromised kidneys. https://sfamjournals.onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1111/jam.15451 ‘Anu taila’ effective against black fungus: Patanjali … बाकी कारोंना , मी आणि ज्या भागात राहतो ते बिंदापुर एक्स्ट. एक लेख लिहणार आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/30/2022 - 06:31 नवीन
@ विवेकपटाईत हाइड्रोक्लोरोक्वीन ते रेमेडेस्वीर बिना कुठल्याही प्रमाण प्रोटोकॉलमध्ये का दिली गेली. कुठलेही औषध उपलब्ध नसताना हि दोन्ही औषधे प्रायोगिक पुराव्यावर (empirical evidence) दिली गेली. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध भारतीय लष्कर आपल्या सैनिकांना वर्षानुवर्षे मलेरिया च्या बचावासाठी देत आले आहे आणि ज्या प्रमाणात ते दिले गेले त्याचा कोणताही साईड इफेक्ट गेल्या ५० वर्षात आढळलेला नाही. रेम्डेसीव्हीरच्या उपयोगाबद्दलचे उपलब्ध शोध निबंध हे संशयास्पद होते आणि त्याचा वापर आपल्या औषधविक्रीसाठी पाश्चात्य कंपन्यांनी केला हि वस्तुस्थिती आहे परंतु त्यामुळे रुग्ण दगावले याला कोणताही पुरावा नाही. कारण ज्या प्रमाणात आणि जितके दिवस ते दिले गेले त्याचा कोणताही साईड इफेक्ट आढळलेला नाही. या दोन्ही औषधांचा म्हणावा तितका फायदा होत नाही हे दिसल्यावर त्याचा वापर थांबवण्यात आला. आयएमए जवळ ही रिसर्च लॅब इत्यादि नाही. डॉक्टरांच्या हितांचे रक्षण हे संस्थेचे उदेश्य आहे जसे आणि मजदूर संघटनांचे असते. या शिवाय फार्मा कंपन्यांचे हित जपणे ही असते. हे (सध्यापुरते) मान्य केले तरी त्यामुळे शेकडो डॉक्टर आणि लाखो रोगी मृत्यूमुखी पडले. आय एम ए मुळे शेकडो डॉक्टर आणि लाखो रोगी मृत्यूमुखी पडले या विधानाला कोणताही शेंडा किंवा बुडखा नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/26/2022 - 12:38 नवीन
जगभर जे काही झाले त्यात सरकार कडून चुका झाल्या असतील ( मग ते सरकार दावे असो वा उजवे आणि विकसित देशातील असो किंवा विकसनशील ) आणि या चुकांवर टीका टिपण्णी करने हा नागरिकांचा अधिकार आहे हे मान्य असले तरी "उचलली जीभ लावली टाळ्याला या उक्ती प्रमाने " हा रोग, रोगचं नाही "किंवा "धोकादायक नाही "किंवा "थोतांड आहे " हे म्हणणारे बेजबाबदार आहेत. जगभरची येवढि सरकारे / शास्त्रन्य / वैद्य एकाच वेळी अशी गंडू शकतात ? अशक्य
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/26/2022 - 17:51 नवीन
सुबोध खरे डॉक्टर, तुमचा इथला संदेश वाचला. १.
अतिदक्षता विभागात काम केलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वतःचे अनुभव असे आहेत कि जेवढे मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते.
तुमच्याच शब्दांत विचारतो की वरील विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला काही पुरावा देता येईल का ? की हा देखील सांगोवानगीचा आकडा आहे? बाकी, करोना जर इतका घातक आहे तर वारंवार चाचणी करून लोकांना का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून? २.
ज्यांनी लस घेण्याची काळजी घेतली त्यांच्यात गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण नि:संशय दृष्ट्या कमी आहे.
तर मग शेन वॉर्न, रफायेल नदाल यांना कसले त्रास होत होते? ज्योकोव्हिच का लस घेत नाहीये? तब्ब्येत ठीक नसल्याच्या कारानार्थ मायामी ओपन टेनिस स्पर्धेतनं विक्रमी प्रमाणावर माघारी का घेतल्या गेल्या? आणि करोनावरील लस म्हणजे नेमकं काय? फायझरला लशीत m-RNA टाकून जनुकोपचार का करावा लागतोय? जनुकोपचाराची आवश्यकता पडावी इतका करोना खरंच घातक आहे का? उत्तर साधं सोपं आहे. करोना हे एक थोतांडच आहे. च महत्त्वाचा. आणि लस हे त्याहूनही मोठं थोतांड आहे. ३.
हा आजार जेंव्हा जेंव्हा प्रतिकार शक्ती कमी होते तेंव्हा होऊ शकतो
ये हुई ना बात. हाच नियम करोननास लागू करायला हवा. बस इतकंच. कित्येक लोकांना करोना झाल्याचं कळंतही नाही. कारण त्यांची प्रतिकारशक्ती शाबूत असते. म्हणजेच करोनास आटोक्यात आणण्यासाठी धडधाकट माणसाची प्रतिकारशक्ती पुरेशी आहे. फक्त ते प्रस्थापितांना मान्य नाही. ४.
करोनाच काय सध्या फ्लूने मरणार्या लोकांत सुद्धा याच लोकांचे प्रमाण २०२० पूर्वी सुद्धा जास्त होतेच.
करोना हा फ्ल्यू सारखाच रोग आहे. युरोपपुरतं म्हणायचं झालं तर इ.स. २०२० पूर्वी फ्ल्यूच्या हंगामात वयस्कर व्याधीग्रस्त दगावायचे. त्याचंच आता करोना असं बारसं केलंय. असो. बाकी, डॉक्टर सुझान हम्फ्रीझ यांनी लशीविषयी लिहिलेल्या पुस्तकाची चिरफाड करा, अशी तुम्हाला खूपदा विनंती केली होती. पुस्तक वाचलंत का? नसल्यास इथे दुवा आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/ तुम्ही गुपचूपपणे पुस्तक वाचलं असणार, अशी माझी शंका आहे. त्यातले निष्कर्ष तुमच्या मताप्रमाणे नाहीत म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/26/2022 - 19:34 नवीन
मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते.
तुमच्याच शब्दांत विचारतो की वरील विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला काही पुरावा देता येईल का ? की हा देखील सांगोवानगीचा आकडा आहे?
गामाजी, मी नम्रपणे तुम्हाला आठवण करून देतो कि ह्याचा आधार मी आपल्या चर्चेत दाखल केलेला, तेव्हा भारतात ९७% कोव्हिड मृत्यू लस न घेतलेल्यांच्यात झालेत असे दाखवलेले. त्यावर तुम्ही नीती आयोगाचे पॉल म्हणतायत त्या वक्तव्याचा विपर्यास करून काहीतरी प्रत्युत्तर दिलेले. पॉल ह्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढला हे मी तुम्हाला दर्शवले आणि ते तुम्ही मान्य केले. पण मूळ मुद्द्यांकडे तुम्ही परत आला नाही, आणि माझा पेशन्स सुद्धा तिथे संपला होता. हे चर्चा परत सुरु करण्याचा उद्दिष्टाने नाही. तर इथे खरे डॉक्टरांनी सुस्पष्टपणे त्यांचा व्यक्तिगत अनुभव सांगितला असता तुम्ही त्यांच्याकडे आधार मागत आहात. आणि मी मागे आधार आणि आकडेवारी दिली ती तुम्ही चुकीच्या प्रकारे खोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि त्यानंतर साफ दुर्लक्षच केले. ह्याला काय म्हणायचं ?!
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 05/27/2022 - 00:02 नवीन
करोनाला तुम्ही मॉडर्न फ्लु म्हणताय ना ? फ्लु असु दे नाहीतर बर्ड फ्लु असु दे ! लोक गेले ना ? आणि जायचे ते ट्रिटमेंट मुळे वाचले ना जायचे ? लस घेतल्यामुळे आज ते कमी आले आणि मास्क लावून फिरावे लागत नाही ना ? किती लोकांनी काय काय एफर्ट घेतले त्याच्यासाठी ? लस नसती तर अजूनही मास्क लावूनच फिरत असता तुम्ही ! व्हेअर इज द अ‍ॅक्नॉलेजमेंट ? एखाद्या करोना वॉर्ड ला भेट दिली आहे का तुम्ही ? तुम्हाला तेच विचारतो, तुम्ही एकाही करोना झालेल्याला भेटला नाही का ? ( तुम्हालाही हा थोतांड नावाचा आजार होऊन गेला आहेच ! ) नाहितर कॉमी म्हणतात तसे तुम्ही २४*७ बेसमेंट मेंबर होतात. टिप : मला स्वतःला झाला होता आणि बायकोलाही माझ्यामुळे, तिला हॉस्पिटल ट्रिटमेंट घ्यावी लागली आणि ती बरी झाली , काय काय झाले आणि किती परिणाम झाला ते मला माहिती आहे ! महिनाभर तरी विकनेस राहातो, श्वास कमी पडतो, थोडा मेमरी लॉस पण होतो. बट एवरिथिंग इज फाईन नाऊ , व्हाय, बिकॉज ऑफ ट्रिटमेंट ऑन टाईम! नशीब तुमच्यासारखे डॉक्टर नाहीत जे म्हणतात हे सगळे थोतांड आहे, का ? कारण ते डॉक्टर आहेत ! टाईमपास म्हणून कॉन्स्पिरसी थिअरी स्प्रेड करणारे नाहीत ! ते अ‍ॅकच्युअल ग्रांउंड वर्क करतात !
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 05/27/2022 - 01:18 नवीन
व्हेअर इज द अ‍ॅक्नॉलेजमेंट ? काय पण अपेक्षा बॉ तुमच्या ... स्वतः वर आले की हेच लोक पृष्ट्भागाला पाय लाउन पळतात. वर तोंड करुन विदा द्या म्हणतात ... दुर्लक्ष करा ..
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 05/27/2022 - 01:21 नवीन
बाय द वे. कालच मी फायझर चा तिसरा डोस घेउन आलो. ज्यांना थोतांड वाटते त्यांना वाटु द्या. आजारी पडलो तर हे लोक जेवण थोडी बनवुन देणार आहेत.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/27/2022 - 02:50 नवीन
मागील वर्षी दोन फायझरचे डोज घेतले. कालच तीसरा पण घेतला. २६ जानेवारीला कोणाच्यातरी संपर्कात आलो व लक्षणे दिसून आली. मीत्रच डॉक्टर व माझा सुद्धा बराच अनुभव.ताबडतोब उपचार केले.एक आठवड्यात ठिक झालो. महिनाभर अशक्तपणा होता.मुलीला व नातीला पण लक्षणे दिसली पण वय आणी रोग प्रतीकारक शक्ती म्हणून जास्त त्रास नाही झाला. सौ मधुमेह ग्रासीत उचित दक्षता घेतल्याने काहीच परीणाम नाही. या महामारी मधे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी काम व्यवस्थित केले. संधीसाधूनी वाहत्या करोनात हात धुवून घेतले. वैद्यकीय व्यवस्थापनाच्या प्रदीर्घ अनुभव आहे व केलेले विधान हे पुर्ण जबाबदारीने केले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 05/28/2022 - 00:54 नवीन
मी पण डिसेंबर च्या पार्टीत कुणाच्या तरी संपर्कात आलो. घरात सारे पॉझीटिव आले. १० दिवस त्रास झाला पण लक्षणे सौम्य होती. जिभेची चव घेण्याची क्षमता व नाकाची वास घेण्याची क्षमता जवळ्पास २ अठवड्यांनी परत आली. वॅक्सीन चे दोन डोस आधीच घेतल्यामुळेच लक्षणे सौम्य राहीली. संधीसाधूनी वाहत्या करोनात हात धुवून घेतले. ही जमात कुठेही हात धुवुन घेते. त्याला ईलाज नाही. गरजेच्या काळात लुटने हेच ह्या लोकांना माहीत असते. या महामारी मधे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी काम व्यवस्थित केले. १००% सहमत. यात डॉक्टर/ पोलिस / ईतर कर्मचारी हे सारे आले.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 05/27/2022 - 05:46 नवीन
त्याला च बुस्टर डोस म्हणतात ना? काय आहे तिथे किमंत.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 05/30/2022 - 16:40 नवीन
सुनील जी, फायझर चे पहिले दोन डोज एक महिन्याच्या अंतराने तर तीसरा डोज,बुस्टर दहा महिन्या नंतर. सर्व डोज फुकट आहेत. पहिल्या दोन डोज घेतल्यावर दहा $ इन्सेंटिव्ह म्हणून सरकार देते. इथे लसीकरणाला बराच विरोध आसल्याचे वाटले. भारताच्या तुलनेत अमेरिकी लोकसंख्या कमी व लोकांचा विरोध म्हणून लस फुकट देणे व वर इन्सेंटिव्ह देण्यामागचा कारणे असू शकतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/27/2022 - 06:10 नवीन
तुम्ही गुपचूपपणे पुस्तक वाचलं असणार पुस्तके गुप्तपणे वाचायची सवय नाही आणि गरजही नाही. असे अनेक लोक मला अनेकदा असून तमुक पुस्तक वाचा आणि अभिप्राय द्या सांगतात. एकतर मला त्यात रस नाही आणि फुकट घालवायला तितका वेळ ही नाही. यात डॉ मनू कोठारी सारख्या के ई एम च्या ऍनाटॉमीच्या प्राध्यापकांनी लिहिलेले पुस्तकही होते ज्यात कर्करोग हे एक थोतांड आहे असे लिहिलेले आहे. (दुर्दैवाने डॉ मनू कोठारी हे पुढे कर्करोगाने कैलासवासी झाले हा भाग अलाहिदा) बाकी तुमच्या सारखे करोना हे एक षडयंत्र आहे असे बोलणारे अनेक लोक आहेत. मी कुठे प्रत्येकाशी वाद घालत बसू? आम्ही अमुक तमुक स्वामींच्या अंगाऱ्याने बरे झालो पासून होमिओपॅथी मुले आमचा कर्करोग बरा झाला असे छातीठोक पणे सांगणारे लोक सुद्धा मला भेटत असतात अशा प्रत्येकाशी वाद घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा इतर अनेक विधायक कामे करता येण्यासारखी आहेत. आणि करायला काहीही नसेल तर मी छानपैकी झोप काढेन.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/26/2022 - 19:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/27/2022 - 05:07 नवीन
कोविड खरा की खोटा, हा एक प्रश्न आहेच, पण कोविड टेस्टा किती विश्वसनीय आहेत, हाही मोठाच प्रश्न आहे. कालच माझा मुलगा, सून आणि त्यांच्या दोन लहान मुली भारतातून अमेरिकेला परत गेले. विमानात बसण्यापूर्वी चोवीस तासाचे आत केलेल्या चाचणीत निगेटिव्ह असणे आवश्यक होते, त्याप्रमाणे जवळच्या एका लहान हास्पिटलातून (प्रत्येकी चारशे रुपये देऊन) चाचणी करवली. आधी त्यांनी आधार कार्ड आणि पासपोर्ट दाखवा, अमूक फॉर्म भरा, यात दीड तास घालवला. रात्री साडे आठ वाजता निकाल आले, त्यात सुनबाई पॉझेटिव्ह आल्या, मोठीच पंचाईत झाली. मग धावपळ करून (खूप गवगवा असलेल्या -) 'लाल पॅथ लॅब' मधे गेलो, त्यांनी रिपोर्ट चोवीस तासांनंतर मिळेल, असे सांगितले, तोवर थांबणे शक्यच नव्हते. मग दुसर्‍या एका मोठ्या चकाचक हास्पिटलात इमर्जन्सीमधे गेलो. (तिथले एकंदरित वातावरण वगैरे बघून मला वाटले इथे काही हजार रुपये घेतील, पण दीडशे रुपयेच लागले). त्यांनी चाचणी करून लगेचच निगेटिव्ह असल्याचे सांगून तासाभरात रिपोर्ट दिला. आता कोणता रिपोर्ट खरा आणि कोणता खोटा. मुळात या चाचण्या तरी खर्‍या आहेत का ? मला प्रश्न पडलाय की माझे काही परिचित (तरुणांपासून वृद्धांपर्‍यंत विविध वयाचे) कोविड पॉझिटिव आले म्हणून इस्पितळात भरती झाले आणि लाखो रुपये खर्चून शेवटी मृत्यु पावले (एकाला तर चाळीस लाख लागले, तोही मृत्यु पावला) ते खरोखरीच पॉझिटिव्ह होते का ? असले तरी त्यांना दिले गेलेले उपचार योग्य्/आवश्यक होते का? असले तर ते का मृत्यु पावले ? याउलटआम्ही दोघे (पतिपत्नि - वय ७० आणि ६५) जुलाई २०२० मधे कोविडग्रस्त होऊन महिनाभर त्रस्त होतो, परंतु इस्पितळात न जाता, कोणतेही औषध न घेता घरीच हळू- हळू पूर्णपणे बरे झालो. काहीतरी मोठाच लोच्या आहे हे कोविड प्रकरण.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा