Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडी

न
निनाद
Fri, 08/27/2021 - 05:27
🗣 159 प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 63108 views

🗣 चर्चा (159)
ग
गॉडजिला Fri, 08/27/2021 - 05:43 नवीन
फक्तं एका आर्थिक घडामोडींच्या धाग्यांवर एका विद्वानाने विशिष्ट पध्दतीच्या एकतर्फी घडामोडींचं पुन्हापुन्हा दिल्या व वरून मी फक्त जगातील घडामोडींची माहिती देत आहे त्यावरून काहीही अनुमान माझे लिखाण वाचून काढू नये असे काहीतरी बरळले होते... अर्थात तो पर्यंत त्यांचा भाता फक्त विनोदाच्या बाणांनी भरलेला आहे आणीखी कोणत्याही नाहीं हे मला माहीत नव्हते त्यामूळे मी त्यांचे प्रतिसाद त्याआधी कधीच विनोद म्हणून वाचत न्हवतो ही माझीही चूकच झाली होती. असो, धाग्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 08/27/2021 - 05:51 नवीन
मालदीवमधील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा करार गुरुवारी २६ ऑगस्ट २०२१ रोजी माले येथे झाला. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट (जीएमसीपी) मध्ये ६.७४ किमी लांबीचा पूल माले आणि जवळच्या बेटांदरम्यान कॉजवे लिंक असेल. भारतीय बांधकाम कंपनी AFCONS ला प्रकल्प पूर्ण करण्याचे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या माले भेटीपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय सल्लामसलतीचा परिणाम आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 08/27/2021 - 05:58 नवीन
मोरारजी देसाई संस्था योग (MDNIY), आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि सौदी सरकार यांच्या योग विषयक, संशोधन आणि शिक्षण देण्यासाठी करार केला गेला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/27/2021 - 11:07 नवीन
खरं तर ह्या चर्चा चालू घडामोडी धाग्यातच व्हायला हव्यात. पण दिवस ऊजाडला कि मोदी, फडणवीस यांची आरती गायला सुरूवात करायची. आघाडी सरकार वाईट आहे म्हणून आदळ आपट करायची ( ह्यात फडणवीसना घरी बसवल्याचा राग जास्त असतो), कुणी मुद्दा खोडला का त्याला वयक्तिक बोलायचं, मुद्द्याला ऊत्तर नसेल तर पळ काढायचा. अक्षरष: ऊच्छाद मांडलाय भाजप समर्थकानी मिपावर. ह्या धाग्याच्या निमीत्ताने काहीतरी माहीती मिळेल. नाहीतर ईथेही ठाकरे सरकार विरूध्दची जळजळ व्यक्त करायला भक्तगण येतील.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Fri, 08/27/2021 - 13:22 नवीन
धागा उपक्रम स्तुत्य आहे.. फक्त धाग्याचे नियम सान्गा.. नाहीतर सामनाछाप सदस्य गोन्धळ घालतील.. माझ्याकडून त्यान्ना उत्तर नाही..
  • Log in or register to post comments
ज
जॅक द रिपर Sun, 08/29/2021 - 22:09 नवीन
इथे ती शक्यता फार कमी आहे, कारण इथे माहिती घेऊन लिहावे लागेल आणि अकलेचे दिवाळे वाजलेले असलेल्यांना वाचता येत नाही आणि वाचले तर कळ्त त्याहून नाही.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 08/28/2021 - 04:15 नवीन
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 08/28/2021 - 04:15 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 08/28/2021 - 05:04 नवीन
https://www.news18.com/news/india/india-welcome-to-finish-projects-in-afghanistan-says-taliban-as-it-warns-against-use-of-soil-for-military-goals-4096631.html तालीबान भारताला अपुरे प्रोजेक्ट पुरे करु शकतात असे बोलतो आहे. एक तर तिथे परीस्थीती अगदीच बिन भरवश्याची झाली आहे. त्यात भारताने केलीली कित्येक कोटी रुपयांची गुंतवणुक आता अडकली आहे. त्यात अजुन जोखीम घेणे कितपत योग्य आहे? हाच तालीबान प्रोजेक्ट संपल्यावर भारतावर उलटणार नाही याची काय शाश्वती ? माझ्या मते भारताने तोच पैसा घरी वापरावा ...
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 08/28/2021 - 06:30 नवीन
कुठलाही देश मदत फुकटात करत नसतो. जर तालिबान ला हे प्रोजेक्ट पूर्ण करून हवे असतील तर भारताला काय मिळेल? खाणी, उत्खनन वगैरे मध्ये हिस्सा मिळेल का? पाकिस्तान ला चाप लावण्यात मदत मिळेल का? आपला मिलिटरी बेस वगैरे साठी परमिशन मिळेल का? नसेल तर सरळ ही कर्जे राईट ऑफ करून गप्प बसावे. अर्थात चीन काय करतोय हे ही पहायला हवे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 08/28/2021 - 08:06 नवीन
अजुनपर्यंत तरी सारे गूडविल म्हणुन चालु होते. त्यात भारताचे घनी सर्कार बरोबर सलोख्याचे संबंध होते याचा तालीबानींना राग आहे .. म्हणुन म्हणतो या लोकांवर विश्वास कसा ठेवावा. त्यात एयर इंडिया च्या विमान अपहरणात याच तालीबाणी लोकांनी अतीरेक्यांची मदत केली होती हे विसरता कामा नये ..
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 08/30/2021 - 08:52 नवीन
आपला देश गरीब असताना आणखीन गरीब देशांत जाऊन नस्ते प्रकल्प का बरे राबवावे ? अमेरिकन मूर्ख पणा पासून भारतीय सरकारने धडा घ्यायला हवा होता. जी लायब्रेरी भारताने बांधली होती त्याला तालिबान ने आग लावली आणि जलऊर्जा प्रकल्प आता तालिबान वापरत आहे. तालिबानी मंडळींची एक खासियत म्हणजे, बाहेरून एक आणि आतून एक असा प्रकार नाही. ते प्रकल्प वगैरे पूर्ण करण्याची वाट पाहणार नाहीत. आधीच भारताला शिव्या देतील, काही भारतीय मंडळींचे शिरकाण करतील आणि वरून "प्रकल्प पूर्ण करा " असे ठणकावून सांगतील. म्लेंछ मंडळींशी कसलाही संबंध ठेवू नये. मदत तर अजिबात करू नये.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/30/2021 - 09:07 नवीन
+1 मूर्ख लोकांचं सरकार असल्यावर आणखी काय होणार?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 08/30/2021 - 09:51 नवीन
अफगाणिस्तान मध्ये गुंतवणूक ही मनमोहन सरकार च्या काळा पासून चालू आहे. आणि ह्यात काहीही चुकीचे वाटत नाही. शेजारील देशात गुंतवणूक ही करायलाच पाहिजे. अफगाणिस्तान च्या गुंतवणुकीतून भारताला काहीही आर्थिक फायदा होणार नाही परंतु अफगाणिस्तान हा पाकिस्तान चा शेजारी आहे आणि त्या दोन्ही देशाचे संबंध चंगले नव्हते त्या दृष्टिकोनातूनच भारताने गुंतवणूक केली असणार. आणि महत्त्वाचे म्हणजे आपण गुंतवणूक केली त्यावेळी अफगाण सरकार हे भारताच्या बाजूचे होते तालिबान सत्तेत असे पर्यंत भारत गुंतवणूक करण्याची शक्यता नाही. श्रीलंकेतील Hambanthota बंदर विकसित करायला लंकेने सर्वात आधी भारताला विचरले होते परंतु आपण नकार दिला आणि तिथे अत्ता चीन येऊन बसला आहे, सुरक्षेच्यादृष्टीने भारता साठी डोकेदुखी झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 09/01/2021 - 23:20 नवीन
सध्याचे सरकार मूर्ख लोकांचे आहे तर त्याला जे पर्याय आहेत ते महामूर्ख आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 03:50 नवीन
:) :) :) रे बोलो हर हर... १८८ * २
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/28/2021 - 08:16 नवीन
https://www.hindustantimes.com/india-news/indias-only-investment-in-afghanistan-is-on-its-people-will-get-full-value-in-return-jaishankar-101629975634988.html
  • Log in or register to post comments
न
निनाद Sat, 08/28/2021 - 12:00 नवीन
भारत आणि मॉरिशसने २०२१ मध्ये व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार (सीईसीपीए) करार केला आहे. हा भारताने केलेला अशा पद्धतीचा पहिला व्यापार करार आहे. या करारासाठी दोन्ही बाजूंनी त्यांच्या अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि भारत-मॉरिशस CECPA एप्रिल २०२१ पासून लागू झाला आहे. यामध्ये भारताला ३१० वस्तूंची निर्यात करता येईल. यामध्ये अन्न सामग्री आणि पेये, कृषी उत्पादने, कापड आणि, धातू , इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. प्लास्टिक आणि रसायने , लाकूड आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश आहे. सेवांच्या व्यापाराच्या संदर्भात, भारतीय सेवा प्रदात्यांना
  1. व्यावसायिक सेवा,
  2. संगणक संबंधित सेवा,
  3. संशोधन आणि विकास,
  4. इतर व्यवसाय सेवा,
  5. दूरसंचार,
  6. बांधकाम,
  7. वितरण,
  8. शिक्षण,
  9. पर्यावरण,
  10. आर्थिक,
  11. पर्यटन
यासारख्या व्यापक सेवा क्षेत्रांमधून अनेक उपक्षेत्रांमध्ये प्रवेश असेल.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sat, 08/28/2021 - 12:07 नवीन
भारत आणि ईयु मध्ये व्यापारी वाटाघाटी २००७ मध्ये ईयु च्या पुढाकाराने सुरू झाल्या होत्या. २०१३ मध्ये त्या भारताने स्थगित केल्या होत्या. या वाटाघाटी मोदी सरकारने परत सुरू केल्या आहेत. तीन संतुलित आणि सर्वसमावेशक व्यापार-संबंधी करारांवर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. भारताने कोविड लसींसाठी पेटंट संरक्षण माफ करण्याची मागणी ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/30/2021 - 01:26 नवीन
महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स आता टॉर्पेडोंचे उत्पादन करणार आहे. भारतीय नौदलाने खाजगी क्षेत्राशी असलेला १३४९.९५ कोटी रुपयांचा हा पहिला मोठा करार आहे. या करारान्वये महिंद्रा अँटी सबमरीन वॉरफेअर डिफेन्स सूट प्रणाली पुरवणार आहे. यामुळे भारताला आयातीवर अवलंबून रहावे लागणार नाही. तसेच यातून पुढे जाऊन निर्यातीच्या संधी मिळतील.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 08/30/2021 - 05:26 नवीन
स्तुत्य उपक्रम. चांगली माहिती येतेय. धन्यवाद. जसे जमेल तसे माहिती टाकण्याचा प्रयत्न करेनच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/30/2021 - 13:08 नवीन
यावरच त्याचे महत्त्व वाढले. अफू भरपूर पिकते पण त्याचा आपल्याला उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/31/2021 - 07:22 नवीन
अफगाणिस्तानात तांबे आणि लिथियम हे फार महत्त्वाचे धातू मोठ्या प्रमाणावर आहेत. हे दोन्ही धातू डिजिटायझेशन आणि विजेच्या बॅटरी निर्मितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. (बाकी अफू आणि रत्ने याचा भारताला फारसा उपयोग नाही) हे माहिती असल्यामुळे तेथे कोणतेही सरकार आले तरी ते सरकार चीनच्या हातचे बाहुले बनू नये आणि या दोन महत्त्वाच्या धातूंवर चीनची मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी भारत प्रयत्नशील आहे आणि हे केवळ विद्यमान सरकार करत आहे असे नाही तर श्री मनमोहन सिंह सरकारने चालू केलेले आहे. चीनने आफ्रिकेत आपली अशी मक्तेदारी निर्माण केलेली आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय धोरणे सुदैवाने पक्ष निरपेक्ष राहिलेली आहेत. काही मूर्ख लोक केवळ द्वेषाने हे श्री मोदी यांचे अपयश समजून अनाठायी प्रतिसाद देत आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे लागते आहे.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 09/06/2021 - 16:46 नवीन
काही मूर्ख लोक केवळ द्वेषाने हे श्री मोदी यांचे अपयश समजून अनाठायी प्रतिसाद देत आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे लागते आहे. ---एक हजार टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/31/2021 - 03:20 नवीन
अमेरिका-भारत संरक्षण व्यापार आणि संरक्षण सहकार्याचे तीन पायाभूत करार
  1. लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट (LEMOA),
  2. कम्युनिकेशन्स, कॉम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅग्रीमेंट (COMCASA)
  3. औद्योगिक सुरक्षा करार (ISA)
या सर्व करारात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात उच्च तंत्रज्ञान सहकार्य करून नोकर्‍या निर्माण केल्या जातील असे म्हंटले आहे. मूलभूत संरक्षण करार केल्या नंतर २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून नियुक्त केले. या पदनामानुसार, २०१८ मध्ये, भारताला सामरिक व्यापार प्राधिकरण टियर १ दर्जा देण्यात आला आहे. ज्यामुळे भारताला नियंत्रित केलेल्या लष्करी आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीमध्ये परवाना-मुक्त प्रवेश मिळाला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्याची निर्मिती भारतात केली जाते आहे. हे साहित्य भारतातून निर्यात केले जाते. असे संरक्षण आणि तंत्रज्ञान विषयक करार गेली किमान २५ वर्षे रोखून धरले गेले होते. भारतीय साम्यवादी पक्षांनी वेळोवेळी हे करार होऊ नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. हे करार झाल्यावर ते कसे वाईट आहेत. यावर ही डिसिन्फॉर्मेशन मोहिना राबवल्या गेला आहेत. पण २०१४ नंतर साम्यवादी पक्ष भारतीय राजकारणातून बाद होत गेले आणि भारताचा रोख मोदी सरकारने अमेरिकेकडे वळवल्यावर या करारांचा मार्ग मोकळा होत गेला. भारत आणि अमेरिकेने संवेदनशील उपग्रह डेटा सामायिक करण्याच्या लष्करी करारावरही स्वाक्षरी केली आहे. क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर लक्ष्यांना अचूकतेने वेध घेण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/31/2021 - 08:39 नवीन
चांगला उपक्रम! आफ्रिका खंडाकडे आजही खूप मोठ्या प्रमाणावर खनिज व अन्य नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असल्याने, आफ्रिकेतील मोझांबिक आणि दक्षिण सुदान देशांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायु उत्पादन क्षेत्रामध्ये भारताने ७०० कोटी डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक केली आहे. २२ सप्टेंबर २०२० म्हणजे जवळपास वर्षभरापुर्वी भारत आफ्रिका सहकार्य या विषयावर (कोविड परिस्थितीमुळे) डिजिटल परिषद झाली होती त्याला आफ्रिकन देशांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला होता. चिनच्या आधुनिक वसाहतवादाने त्रस्त झालेले अनेक आफ्रिकन देश भारताकडे एक प्रामाणिक आणि दीर्घकाळचा भरवशाचा सहकारी म्हणुन पहात आहेत ही प्रशंसनीय बाब आहे. माध्यमांकडुन ह्या परिषदेची आणि तिच्या फलीतांची फारशी दखल घेतली जात नसल्याने गेल्या ११ महिन्यांत किती विषयांवर ह्या देशांशी बोलणी/वाटाघाटी झाल्या आणि त्यातुन काही करार झाले/होण्याच्या मार्गावर आहेत ह्याची माहितीही वाचण्यात रस आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 08/31/2021 - 19:55 नवीन
इस्राईल बरोबर दोन संरक्षण सामग्री करार झाले आहेत असे ऐकुन आहे. जाहीरपणे याची माहीती नसल्यामुळे जास्त काही माहीत नाही. कदाचीत संरक्षण सामग्री करार असल्यामुळे गोपणीय असावे. एका "एशियन" देशाबरोबर झालेला करार इतकेच त्यांनी सांगीतले आहे. १. २०० मिलीयन डॉलर चे स्पाईस बाँब खरेदी करार. हाच स्पाईस बाँब बालकोट एयर स्ट्राईक करताना वापरला होता. २. इस्राईलच्या टेवर एक्स ९५ रायफल आता भरतात बनवल्या जातील. त्याचे उत्पादन कुठे करणार आहेत हे अजुन गुल्दस्त्त्यात आहे. त्याबरोबर भारातीय कंपण्यांना काही संरक्षण सामग्री उत्पादन करण्याचे करार झाले आहेत .. १. एच ए एल बरोबर ८४ नवे तेजस लढाउ विमान उत्पादनाचे काम. हा करार जवळ्पास ४८००० कोटी रुपयांचा आहे. २. भारत इलेक्ट्रटीक बरोबर १००० कोटी रुपयांचा करार. यात नवीन संदेशवहन प्रणाली विकत घेणार आहेत. ३. डीआरडीओ १२० अर्जुन रणगाडे बनवणार आहे. हा करार जवळ्पास ९००० कोटी रुपयांचा आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/31/2021 - 20:49 नवीन
सकारात्मक माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 09/01/2021 - 05:53 नवीन
मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चीनच्या नॅशनल केमिकल कॉर्प कडून युरोपची सर्वात मोठी सोलर पॅनल उत्पादक REC ग्रुप घेणार आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/02/2021 - 07:22 नवीन
मीहिती देत राहा म्हणजे धागा वाचनीय होईल. कोणत्या सरकारने काय घाण केली वगैरे बाजूला ठेवून प्रतिसाद लिहित जा. झालं ते झालं किंवा ते पक्ष निवडणुकीसाठी प्रचार म्हणून उपयोग करतील ते सोडून द्या. आपल्या मिपाकर मराठी वाचकांना माहिती मिळावी हाच हेतू ठेवा सर्वानी म्हणजे मिपा समृद्ध होईल. वेळ मिळेल तसे लेख वाचत जाऊ. सर्वच जण इंडिया टुडे सारखी साप्ताहिके वाचत नाहीत. ( हिंदीतही निघते) पण मराठीत सोपे करून इथे देत जा. चाःगला धागा चांगलाच राहू द्या. दुसरं म्हणजे धागा लांबला की भाग करा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/02/2021 - 12:36 नवीन
आज देशात शिक्षणाचा बाजार निर्माण झाला आहे . बारावी ला ९०% पुढं मार्क मिळून सुद्धा मुलांना मेडिकल ला सहज प्रवेश मिळत नाही. काँग्रेस सरकार नी निर्माण केलेल्या मेडिकल कॉलेज मध्ये bjp सरकार नी काय भर घातली. सात वर्षात किती मेडिकल कॉलेज bjp sarkar निर्माण केली? मुलांना चीन ,रशिया मध्ये जावं लागत आहे. बाजारू मेडिकल शिक्षण मुळे अत्यंत हुशार डॉक्टर भारतात उपलब्ध च नाहीत. किती नवीन IIT मोदी सरकार नी निर्माण केल्या? कोटा सारखे class च बाजार देशभर चालू आहे उत्तम दर्जा चे इंजिनिअर भारतात तयार च होत नाहीत. जे आहेत ते शिक्षित हमाल आहेत काही कामाचे नाहीत. सर्व सरकारी संपत्ती विकून फालतू योजना bjp आखत आहे आणि निनाद सारखे भक्त त्याची जाहिरात करत आहे.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… गुरुवार, 09/02/2021 - 13:14 नवीन
राजेश काका तुम्हि दिलेल्या प्रतिसादात कुठला आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोड दिसत नाहि. उगाच जिकडे तिकडे तुमच्या मोदि आणि bjp द्वेषाची घाण पसरवु नका.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 09/02/2021 - 13:21 नवीन
नाकाने सोललेल्या वांग्यांची भाजी आज जरा जास्तच झालेली दिसते..
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/02/2021 - 15:29 नवीन
करणारे लेखच वेगळे लिहा राजेश. पेप्रातही असे लेख येतात. समीक्षा/टीका करणे वाईट नाही. पण एक विषय घेऊन मालिकाच काढा.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 18:39 नवीन
ही विनंती मी मीपाला आधीच केली होती बघुयात केंव्हा कार्यवाही होते ते
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 09/02/2021 - 19:17 नवीन
तुमच्या मागणीला माझे अनुमोदन आहे!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा गुरुवार, 09/02/2021 - 13:17 नवीन
हुशार डॉ उपलब्ध नाहीत ? काही पुरावे. काय बरळतो हा माणूस. याच्यावर अंकुश लावा कुणीतरी. राजकीय धागाच झेपेल तुम्हाला इकडे चिकलफेक सुरू नका करू. दिवसभर खरडत बसायचं काहीतरी. लोक फालतू गोष्टींवरून चिडले की मजा येते का हो तुम्हाला. दाखवून द्या एकदा सो कॉल्ड चांगल्या वैद्याला कारण चांगले डॉ तर नाहीतच ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्हाला माहीत तरी आहे का रशिया आणि इतर देशात जे शिकून येतात त्यांची क्वालिटी काय असते ते. पदव्युत्तर नीट पास होत नाहीत जन्मजन्म. D.ed कॉलेज सारखे मेडिकल कॉलेज काढून यांना भारतात शिकवून लोकांच्या जीवाशी खेलायच का आता. काय बोलताय राव. ते bjp च काहीच देणंघेणं नाही मला. पण तुम्ही रोज नीट वेळेवर गोळ्या घेऊन टायपायला बसत जा राव. नाहीतर आम्हाला गोळ्या चालू होतील तुमचं फालतू वाचून.
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 09/02/2021 - 13:23 नवीन
मला वाटतं हा प्रतिसाद पुरेसा असावा ह्या १८८ आयडीवर कारवाई करायला.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/02/2021 - 14:15 नवीन
मला वाटते, आयडीवर नाही तर, नको असलेल्या प्रतिसादांवर कारवाई केली पाहिजे. "धाग्याचे हीत सांभाळण्यासाठी" किंवा "अप्रस्तुत टिपण्णी" असा नवा नियम करून अंमलात आणला गेला पाहिजे व प्रशासकांचा निर्णय अंतीम मानला गेला पाहिजे. असे झाले तरच तरच, गांभिर्याने प्रतिसाद देणारे व वाचणारे या धाग्यावर येत राहतील.
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 09/02/2021 - 18:50 नवीन
नको असलेल्या प्रतिसादांवर कारवाई करायला संपादकांचा खूप वेळ जाणार. त्यापेक्षा आयडीवर कारवाई कमी वेळ घेईल. तसही मी आधी आयडी बघतो मग प्रतिसाद वाचतो. पण गूल्लु दादा सारखा आयडी वैतागला म्हन्जे संपादकांनी बघितले पाहिजे इकडे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/02/2021 - 13:37 नवीन
यांच्या मेंदूवर उपचार करू शकेल असा एकही हुशार डॉक्टर भारतात नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/02/2021 - 14:08 नवीन
राजेशराव मानलं बॉ तुम्हाला. गुल्लूदादांचा संयम पण तुम्ही संपवू शकलात. प्रशासक हो, नको असलेले प्रतिसाद कृपया काढून टाका.
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 09/02/2021 - 15:56 नवीन
प्रशासक हो, नको असलेले प्रतिसाद कृपया काढून टाका.
कुणाला नको असलेले ? . प्रशासकाना नको असतील तर तुमच्या सांगण्याची वाट कशाला बघतील? ;)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/02/2021 - 17:18 नवीन
कुणाला नको असलेले ? . प्रशासकाना नको असतील तर तुमच्या सांगण्याची वाट कशाला बघतील? ;)
😀 त्या प्रतिसादात "प्रशासक हो" ह्यालाच जास्त महत्व होतं. मला राजेशभौंचा त्रास नाही होतं. त्यामुळे पुढचे वाक्य मी सोडून इतरांसाठी होते. 😂 १. त्यांनी त्यांचाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केलेला असेल तर लागलीच पुढे जाता येतं. २. फारशी महत्वाची चर्चा चालू नसताना त्यांच्या आलेल्या पोस्ट वरवर वाचायला मजा येते. ३. मात्र चांगली चर्चा चालू असताना त्यांचा प्रतिसाद आल्यास तो खटकतो. पण इथेच आपली परिक्षा आहे हे लक्षात आल्याने तो प्रतिसाद वगळून पुढे जाता येत किंवा प्रतिसाद वाचूनही शांत रहावयाची प्रॅक्टीस करता येते. 🤣
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sat, 09/04/2021 - 15:55 नवीन
@शामकाका हसणे मस्त आहे तुमचे पण, साधा प्रश्न होता तुम्हाला, कारण 'नको असलेले' असा शब्द तुम्ही वापरलात. सध्या तुम्ही म्हणताय तुम्हाला त्रास नाहि होत मग इतरासाठी हा पुढाकार का? . पूर्ण मिपासाठीच ते ११८ प्रतिसाद हानिकारक आहेत का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 09/04/2021 - 17:23 नवीन
अहो, राजेशभौंचा एकच अजेंडा आहे. असंतोष पसरावयाचा. बस्स. मग विषय कोणताही असो. ते त्यात माहीर आहेत. आत्तापर्यंत राजेशभौंच्या प्रतिसादाबद्दल बर्‍याच जणांनी लिहिलंय. त्यावरून "नको असलेले" म्हणजे कोणते हे कळू शकते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/04/2021 - 17:33 नवीन
काही तरीच काय. असंतोष पसरवणे हा माझा हेतू नाही.मला काय इथे बंडखोर थोडीच निर्माण करायचे आहेत. जे वाटत ते मी लिहतो.त्याला चांदी,सोन्याचे वर्ख लावून आकर्षक वाटलं असे काही लिहीत नाही. त्या मुळे माझे लिखाण खूप कमी लोकांना आवडते. असंतोष पसरवणे ह्या हेतू नी कोणताच प्रतिसाद दिला जात नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 09/04/2021 - 17:56 नवीन
तूम्ही जसे आहात तसेच व्यक्त होत आहात इतर लोक जास्त शांत असतील तर तो तुमचा दोष न्हवे मला तर कधिच तूम्ही असंतोष पसरविणारे वाटले नाही उलट तुमच्यामुळे मी तिसरी चौथीत जसा होतो त्याच आठवणी ताज्या होतात _/\_
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/04/2021 - 19:28 नवीन
माझे प्रतिसाद हे तिसरी यत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या बुध्दी नी जसे दिले जातील तसे असतात असे तुम्हाला वाटत. हे वाचून तुमची थोडी जीव वाटली. समाजात असे तुमच्या सारखे स्वतः ला अती हुशार समजणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे तुम्ही एकटे नाही आहात . आयुष्यात कधीच bat हातात न घेतलेले आणि फक्त टीव्ही वर क्रिकेट बगून स्वतःला क्रिकेट मधील जाणकार समजणारी मंडळी. सचिन,कपिल,द्रविड आणि जगातील बाकी दिग्गज मंडळी च्या पण चुका काढत असतात. आणि सल्ले पण देत असतात त्यांना. असतात अशी लोक तुमच्या सारखी मी समजू शकतो. राहुलजी म्हणतात मोदी ना काही कळत नाही. मोदी जी म्हणतात राहुलजी ना ज्ञान नाही. राणे आणि bjp वाले म्हणतात उद्धव जी मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे नाहीत. आणि उद्धवजी देशातील सर्वात अती उत्तम मुख्यमंत्री आहेत असे आहावल पण येतात. मी मात्र जमिनीवर आहे मला जास्त कळत असला फालतू आत्मविश्वास मला नाही. पण खूप लोकांना असतो त्या मध्ये तुम्ही एक. पण निराश होण्याचे काही कारण नाही अशा खूप लोकांची संख्या समाजात आहे तुम्ही एकटे नाही आहात.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 09/04/2021 - 19:49 नवीन
ज्यांना आपले प्रतिसाद वाचुन ते तिसरी चौथीत जसे होते त्या आठवणी ताज्या होतात. आणि अशा सर्व लोकांच्या आनंदाच्या क्षणासाठी तुम्ही लिहते राहणे मला फार फार आवश्यक वाटते.
माझे प्रतिसाद हे तिसरी यत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या बुध्दी नी जसे दिले जातील तसे असतात असे तुम्हाला वाटत. हे वाचून तुमची थोडी जीव वाटली.
काहीतरी तुम्ही गोंधळ केलाय समजुन घेन्यात तो माझाहि होत असे तिसरी चौथीत… असो... मी तुमचे प्रतिसाद हे तिसरी यत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या बुध्दी नी जसे दिले जातील असे असतात हे कुठेच म्हटलेले नाहि हो _/\_
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा