Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 08/13/2021 - 11:12
🗣 196 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy-as-fight-for-kabul-nears/world/news/2475419.html एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो. मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते. अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही. असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51878 views

🗣 चर्चा (196)
M
mayu4u Wed, 08/18/2021 - 09:05 नवीन
>> राज्य सरकार वर फालतू comment करता तेव्हा तुम्ही मराठी असून महाराष्ट्र चा द्वेष करता तुम्हाला महाराष्ट्र हित झाले की मूळव्याध उठतो असे म्हणले तर चालेल का? महाराष्ट्र हित होत असतं तर टीका का केली असती बरे? असो, जास्त लोड घेऊ नका. करमुक्त करमणूक चालू ठेवा!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/18/2021 - 09:08 नवीन
तुम्ही आल्या पासून करमणूक सुरू झालीय
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/17/2021 - 14:07 नवीन
तालिबान ला सत्तेमधून हाकलून देण्यासाठी भारत काय करू शकतो. अफगाणिस्तान मध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यासाठी भारत काय करू शकतो. १)सैन्य कारवाई करू शकतो. २) संयुक्त राष्ट्र समिती चा वापर करून अफगाणिस्तान सैन्य कारवाई करण्यासाठी पुढाकार घेवू शकतो ३) आर्थिक दबाव टाकू शकतो. ४) राजकीय दबाव टाकू शकतो तेथील अन्याय ग्रस्त स्त्रिया ,मुल,!नागरिक ह्यांना भारतात शरण देवू शकतो. माझ्या मता नुसार ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही असेच आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/17/2021 - 18:15 नवीन
राजेश १८८ ह्याना खरंच मानावं लागेल. भाजपभक्त येणकेन प्रकारे त्याना वयक्तिक बोल सावून त्यांचं माणसीक खच्चीकरण करन्याचा प्रयत्न करातहेत पण तरी ते जराही संतूलन ढळू देत नाहीयेत आणी संयमी प्रतिक्रीया देताहेत. मिपा व्यवस्थापनाने भक्ताना सक्त ताकीद द्यावी.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 18:22 नवीन
त्यांना मानावेच लागेल म्हणुन तर कोणितरी त्याना मानाचा मान मनापासुन देत आले आहे, भक्त बसलेत १८८वर फैरी झाडत अन त्यांच्या आकांच्या मांडिला मांडि लावुन महान रसग्रहणे चघळत :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/18/2021 - 06:13 नवीन
मिपा व्यवस्थापनाने भक्ताना सक्त ताकीद द्यावी. हा हा हा हि हि हि हू हू हू
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/18/2021 - 08:34 नवीन
व्यवस्थापनाला हसत आहात की व्यवस्थापन आमचं काहीच करू शकत नाही हा भाव?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 08/18/2021 - 09:10 नवीन
व्यवस्थापन मर्जीतल्या आयडींना काहीच करत नाही (त्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या कमेंट्स उडवण्या व्यतिरिक्त... माझी बॅट म्हणून मी क्याप्टन!) अन्यथा व्यवस्थापनाने कायप्पा ग्रुप प्रमाणे काही लोकांना केव्हाच लाथ मारून हाकलून दिलं असतं!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/18/2021 - 09:14 नवीन
तेच तर. हा कायप्पा गृप नाही. नाहीतर कायप्पा गृप प्रमाणे भक्तानी मिपा सुध्दा भाजप प्रचारासाठी ताब्यात घेतला असता. आणी चर्चाच झाली नसती.
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 08/19/2021 - 07:01 नवीन
कोडगेपणाची आणि मूर्खपणाची! साहित्य, चित्रपट, गप्पाटप्पा अशा सगळ्या समूहांमधून हाकललं गेल्यावर पण भाजप विरोधाचा कांगावा करायचा... व्वा!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/19/2021 - 09:03 नवीन
चित्रपट गप्पाटप्पा??? बरं. मुर्खपणा ईथे तरी सोडा. नानाच्या मिमीवरून हकलल्यावर ही कोडगेपणा जात नाही आपला. बाकी कारण माहीत नसताना काहीही लिहीणे हे मुर्खपणाते लक्शन आहे. सुधारणा होईल ही अपेक्शा नाही तुमच्या कडून.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/18/2021 - 19:53 नवीन
Bjp समर्थक असणे वाईट नाही BJP सरकार केंद्रात बहुमताने आले वाईट नाही. Bjp ही हिंदुत्व वादी पक्ष आहे ह्याचे आंधळे समर्थन करणे मूर्खपणाचे आहे.मोदी सरकार हे धनदांडग्या लोकांचे सरकार आहे हे कटू सत्य समर्थक समजत नाहीत Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते. जेणे करून हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ होतील. हिंदू ना खास वागणूक सरळ किंवा वाकड्या मार्गाने bjp ni दिली नाही उलट गरीब हिंदू,मध्यम वर्गीय हिंदू कमजोर होत गेला. शेतकरी हे जास्त हिंदू च आहेत काँग्रेस वीजे पासून पाण्या पर्यंत सर्व फ्री दिले होते. खूप गोष्टी आहेत. लालू rail मत्री hote तेव्हा सर्व यादव रेल्वे मध्ये होते. सर्व भरती नियम बाजूला सारून. Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/18/2021 - 19:57 नवीन
Bjp समर्थक असणे वाईट नाही BJP सरकार केंद्रात बहुमताने आले वाईट नाही. Bjp ही हिंदुत्व वादी पक्ष आहे ह्याचे आंधळे समर्थन करणे मूर्खपणाचे आहे.मोदी सरकार हे धनदांडग्या लोकांचे सरकार आहे हे कटू सत्य समर्थक समजत नाहीत Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते. जेणे करून हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ होतील. हिंदू ना खास वागणूक सरळ किंवा वाकड्या मार्गाने bjp ni दिली नाही उलट गरीब हिंदू,मध्यम वर्गीय हिंदू कमजोर होत गेला. शेतकरी हे जास्त हिंदू च आहेत काँग्रेस वीजे पासून पाण्या पर्यंत सर्व फ्री दिले होते. खूप गोष्टी आहेत. लालू rail मत्री hote तेव्हा सर्व यादव रेल्वे मध्ये होते. सर्व भरती नियम बाजूला सारून. Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही. मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील. मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/18/2021 - 20:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 08/19/2021 - 01:09 नवीन
सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. सहमत आहे. त्यातही लोकसभा आणि राज्यसभेत जवळपास पुर्ण ताकद असतांना सरळ हिंदुराष्ट्र घोषित करायचे सोडून हे पाणचट भुमिका घेत बसतात. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. असे कोणते कायदे आहेत या विषयी कुतुहल आहे... अधिक माहिती?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 08/19/2021 - 06:13 नवीन
१८८ साहेबांचे बाकीचे बेअरिंग जाऊ द्या, पण -
Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते.
आणि
Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही. मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील. मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.
हे त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/19/2021 - 12:51 नवीन
मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.
कारणं सो कॉलड हिंदूच हिंदुत्व आपल्यावर लादले गेले आहे या मनस्थितीत असतात, व्यक्तिगत पातळीवर त्यांना फक्त उपासना व उपासना स्वातंत्र्याचा उपयोग करून आत्म कल्याण साधणे यातच रस असतो आणि मी आधीही एकदा नमूद केल्याप्रमाणे जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही. :(
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 08/19/2021 - 15:47 नवीन
जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही
शतशः सहमत
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/19/2021 - 09:06 नवीन
भाजप हिंदूत्ववादी आहे हा निव्वळ गैरसमज आहे. मोदी जिंकले ते सिवतच्या प्रतिमेमुळे नाहूतर भाजपला सर्व सामान्य हिंदू हिंदूत्ववादी पक्श माणत नाही. अहो जे बंगालात कार्यकर्त्याना वाचवू शकले नाही ते हिंदू आणी देशाचे काय रक्शन करनार??
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 08/17/2021 - 23:14 नवीन
तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे. म्हणजे आता तरी ते बदला घेउ वगेरे भाषा करत नाहीत. बहुदा आंतर राष्ट्रीय समुदायकडुन मान्यता घ्यायची / नवीन सरकार ला बनवताना थोडे तरी आंतर राष्ट्रीय कायदे पाळण्याची तयारी दिसते आहे. काल सीएनेन वर एक तालेबानी लीडर ची मुलाखत पाहीली ... ते लोक आता कुराण च्या चोकटीत बसुन महिलांना अधिकार देउ असे बोलत आहेत. बहुदा सौदी अरेबिया प्रमाणे शरिया कायदा लावण्याचा विचार असावा .. बाकी तालीबान बोलते एक आणी करते एक असा आजवरचा अनुभव आहे .. पुढे काय होते ते रोचक असेल. अमेरीकेने यातुन अंग काढुन घेतले आहे. आता तिथे जे काय होइल ते आमची जबाब्दारी नाही असे बायदेन स्पष्ट बोलला आहे. त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 23:48 नवीन
त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...
या दोनच देशांच्या अफगाणिस्तान मधिल वकिलाती बंद झालेल्या नाहीत... माझ्या नजरेत तालिबान आता जामच सुधारलयं, राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे. आणि गंम्मत म्हणजे पाकिस्तानला त्यांच्या खेळात त्यांचाच भस्मासुर शह देतो आहे. पाकिस्तानने पध्दतशीर महासत्तांचा वापर वैयक्तीक स्वार्थ साधायला केला व हे करताना दहशतवाद पुरेपुर अस्तित्वात राहिल याची काळजी घेतली. तालिबानचेही आता हेच धोरण आहे प्रथम इतरांशी गोड बोलुन जुळवुन घेउन त्यांचे कडुन पैसा उभा करायचा त्याचा वापर करुन देशावर आपली पोलादी पकड मजबुत करायची व पाकिस्तानात तालिबानी राजवट उभी करायची. त्यासाठी दहशतवाद चालुच ठेवायचा. याकडे अर्थातच जोपर्यंत मोठा हल्ला होत नाही इतर देश दुर्लक्ष करत राहणार... तालिबानचे जवळचे टारगेट एकमेव आहे पाकिस्तान. मुळात लादेन गेल्या नंतर अमेरिका अफगाणिस्तानात का राहिली ? तर विकासासाठि न्हवे तर अमेरिकन कंपन्यांचे युध्दाच्या नावाखाली खिसे भरण्यासाठी. त्यांमुळे तेथिल जनता व लश्कर आमेरिकेबाबत कधीच आश्वासक बनले नाहीत. अमेरिकेचे वैयक्तिक मनसुबे पुर्ण झाले की आपण परत वार्‍यावर ही भावना तिथे आधिपासुनच असावी म्हणुनच जेंव्हा अमेरिका, भारत, चिन वगैरेनी तालीबानसोबत बोलणी केली करजाइ व लश्कर यांच्यात आपल्याला वार्‍यावर सोडले गेल्याची भावना निर्माण झाली व त्यांनी तालिबान विरोधात लढाच उभारला नाही
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 02:03 नवीन
काही मुद्दे आणि भाकिते:
  1. हे चीन प्रणित आहे असे वातते. जो बिदेन चा डेमो पक्ष हा प्रामुख्याने साम्यवादी बनला आहे आणि त्यांच्या पैश्यांवर चालतो हे आता गुपित नाही. त्यानुसारच चीन ला मोकळीक देण्यासाठी येथील सैन्य काढून घेतले आहे.
  2. चीनी अधिकारी आणि तालिबानी भेट झाली आणि काही निवडक(च) मिडियामध्ये ही भेट छापून आली होती. इतरत्र बातमी दाबली आहे
  3. अफगाणिस्तानातील रिसोर्सेस वर छुपे (किंवा उघडही) चीनी नियंत्रण आणले जाईल.
  4. न्युयॉर्क टाईम्स आणि एकुण लिबरल प्रपोगंडा पाहता आता तालिबान ची खलनायकी भुमिका पुसण्याचे प्रयत्न चालले आहेत.
  5. या नंतर तालिबान आणि एकुण शांतीदूत कसे चांगले या विषयी प्रपोगंडा केल जाईल.
  6. याच वेळी एक शांतीदूत विंगचे एजंट्स यथील लोकांना फक्त लोकशाही देशात मानवतावादी तत्त्वांवर शरण द्यावे म्हणून दबाव आणतील. (शरण देण्यामध्ये कोणतेही साम्यवादी आणि मुस्लिम देश नसतील हे भाकीत आधीच करतो.)
  7. तालिबानातील काही कडवट लोकांची टोळी वेगळी होईल आणि चीन चे न ऐकता त्यांना जे करायचे आहे तेच करतील. यातून एक चेन विरुद्ध फळी उभारण्याचे प्रयत्न केले जातील.
साम्यवादी लोक मुस्लिम कट्टरता त्यांचे हत्यार म्हणून वापरतात. म्हणून हे साटेलोटे चालते. जेव्हा कट्टरता कमी होते तेव्हा साम्यवादी त्यात येनकेन प्रकारे तेल ओततात आणि आग भडकवतात. त्यातून ते त्यांचे हेतू साध्य करून घेतात. जसे की जगाचे लक्ष इतर कुठे वळवणे वगैरे. जेव्हा अशी एखादी घटना माध्यमात फार मोठी होते तेव्हा काय दाखवले गेले नाही याचा शोध घेतला पहिजे. खरी बातमी तेथेच असते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 08/18/2021 - 06:49 नवीन
तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे.
तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. अशा लोकांबरोबर वागायचा एकच उपाय म्हणजे त्यांना दयामाया न दाखवता ठोकून काढणे. त्यांच्याशी कायद्याच्या भाषेत बोलायला गेलात तर ते साखळदंड आपण आपल्याच पायात अडकवून घेत असतो. जगातील मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर हे 'अशा लोकांना पण मानवाधिकार कसे आहेत' यावर लेक्चरबाजी करायला पुढे येतात. असल्या दहशतवाद्यांचे पडद्याआड समर्थन करणार्‍या थर्डरेट लोकांचे ऐकणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे असते. २००१ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुशनी पकडलेल्या तालिबान्यांचे गितमोमध्ये वॉटरबोर्डिंग करायचा आदेश दिला होता तेव्हा असल्याच लोकांनी त्याविरूध्द आकाशपाताळ एक केले होते. आणि मग मानवाधिकाराचा पान्हा फुटलेल्या ओबामाने गितमोच बंद करून टाकला. तेव्हा आता असले काहीतरी वरकरणी पोलिटिकली करेक्ट बोलून असल्या वर्गामध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करायचा तालिबान्यांचा डाव आहे. ते कधीनाकधी आपले खरे रंग दाखवायला सुरवात करतीलच. त्यावेळी हेच सगळे ढुढ्ढाचार्य विचारवंत लोक 'आता हे तालिबान २.० कसे आहे, जुन्या तालिबानशी त्याचा कसा संबंध नाही' याची लेक्चरबाजी करायला लागून कोणत्याही कडक कारवाई जगातील कोणत्याही सरकारने करू नये यासाठी दबाव वाढवतील. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच वगैरे संघटना, मोठेमोठे प्रोफेसर लोक हे तालिबान्यांचे छुपे समर्थक आहेत. वेळ पडल्यास ही मंडळी जास्तीतजास्त आवाज त्यांच्याबाजूने करतील यासाठी ही सगळी मोर्चेबांधणी चालू आहे असे मला तरी वाटते. त्याला अजिबात भुलायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 08:04 नवीन
पुर्णतः सहमत आहे. हे दुटप्पी दोन स्तर असलेले व्यवस्थापन आहे. आणि ताबा आणि त्यांचे व्हाईट कॉलर समर्थक असे चालवले जाते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 08:07 नवीन
तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. त्यांना नस वगैरे माहित नसावी पण त्यांच्या मागच्या सुत्रधारांना कोणती मोहरी प्यादी कधी हलवायची याचा फार चांगला अभ्यास आहे. तालीबान्यांना यात तलवारीची किंमत आहे. तलवार वार करते पण तिला तीची अक्कल नसते. कुठे आणि कसा वार करायचा हे डोके चालवणारे लोक निराळेच आहेत. आणि वार करण्या आधी तयारी करण्यासाठी मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर यांचा वापर केला जातो.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 08/18/2021 - 09:06 नवीन
मला आठवते, पूर्वी मी न्यू यॉर्क टाईम्स अगदी कौतुकाने दररोज वाचत असे, कारण माझ्या हपिसाजवळील कॉफीशॉपमधे तो ठेवलेला असे, तेव्हा जेवण आटोपल्यावर कॉफी + न्यू यॉर्क टाईम्स असा माझा रोजचा कार्यक्रम असे. तेव्हा २०१२ च्या सुमारास त्यांच्या ऑप-एड पानावर, कुण्या एका अमेरिकेतील प्राध्यापकाने लिहीलेला एक प्रदीर्घ लेख तेव्हा माझ्या वाचनांत आला. (दुर्दैवाने माझ्याकडे आता दुवा नाही, व एरव्हीही न्यू यॉर्क टाईम्स 'पेवॉल' च्या मागे आहे). त्यावेळी ह्या, सर्वसाधारणपणे दहशतवादी, मूलतत्ववादी संस्थेविषयी काहीबाही ऐकू येत होते, वाचनात येत होते. तर सदर प्राध्यापकाने ती संस्था कशी निरूपद्रवी आहे, व त्यांचे उद्देश कसे त्यांच्या मुस्लिम समाजाच्या हिताचे आहेत, अशा अर्थाचे त्या निरूपण लेखात केलेले होते. नंतर, २०१४ च्या मध्यावर बोको हरामने शाळकरी मुलींना पळवून नेऊन पुढे त्यांचे जे काही केले, त्यावेळी मला ह्या लेखाची तीव्रतेने आठवण आली.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 08/18/2021 - 10:27 नवीन
आय.बी.एन चॅनेलवरील पल्लवी घोषने अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत स्त्रियांना अधिकार असतील पण शरीया कायद्याखाली अशा अर्थाचे पुढील ट्विट केले आहे.

Taliban - all rights to women but under sharia law

— pallavi ghosh (@_pallavighosh) August 17, 2021
आता शरीया कायद्याखाली नक्की कोणते अधिकार स्त्रियांना असतील, पूर्वीच्या तालिबान राजवटीतही शरीया कायद्याचीच अंमलबजावणी होत असेल तर मग तेव्हा तिकडच्या स्त्रियांची स्थिती इतकी वाईट का होती वगैरे प्रश्न पल्लवीला पडले असतील अशी अपेक्षा करू. बाकी त्या टिवटिवाटावरील प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे मनोरंजक आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 08/18/2021 - 06:50 नवीन
ताबा २.० हे, आता सत्ताग्रहण केल्यावर, अतिशय काळजीपूर्वक जनसंपर्क करीत आहेत. पैसे भरपूर ओतले की पाश्चिमात्य देशांतील जनसंपर्क सेवा पुरवणार्‍या कंपन्या खूपच मिळतात, तेव्हा हे असे काही केले असावे. तेव्हा ह्यावेळी ते व्यवस्थित माध्यमांना मुलाखती देत आहेत-- अगदी इंग्लिशमधूनही काही मुलाखती दिल्या जात आहेत. एक मुलाखत तर अगदी इस्रायलच्या माध्यामाला दिलेली नजरेत आली. अर्थात, भारताकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष पुरवले आहेच. हे काम ह्यावेळी बरेच सोपे व कमी खर्चाचे झाले आहे, कारण त्यांच्यासाठी प्रचार करणारी माध्यम- टोळी इथे अगोदरच मोदीविरोध व हिंदू- साप- धोपटणे ह्या मुद्द्यांवर कार्यरत होतीच. आता हीच टोळी त्यांचे भारतांतील जनसंपर्काचे काम करतांना दिसते. एन्डीटीव्ही हे त्याचे एक उदाहरण. शेखर गुप्ता अतिशय चलाख इसम आहे. त्याचा अजेंडा तो उघड होऊ न देता, आपण नि:पक्ष आहोत असे दाखवत, हळूच पुढे रेटण्याचे काम करत रहातो. त्याची फारशी विश्वासार्हता ठेवता येणे कठीण वाटते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 08:09 नवीन
अक्षरशः शब्दा-शब्दाशी सहमत आहे तुमच्या! शेखर गुप्ता अतिशय चलाख इसम आहे. त्याचा अजेंडा तो उघड होऊ न देता, आपण नि:पक्ष आहोत असे दाखवत, हळूच पुढे रेटण्याचे काम करत रहातो. भामटा आहे तो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 08/18/2021 - 02:09 नवीन
राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे. असे वाटत नाही... कारण धर्मावर आधारित तालिबान आणि पाकसितां ची विचार दाहरण एकच आहे .. फरक एवढाच कि पाकिस्तानी कोल्हयांसारखे आहेत आणि घासून पौसून चकचकीत अफगाणी अजून गुहेत राहणारे ! हा इस्लामाबाद / लाहोर च्या पंजाबी पाकिस्तानींनवर त्यांचा राग असेल पण पशतुन पाकिस्तान्यांसाच्यात आणि यांच्यात एकी आहेच कि असे म्हणतां कि त्या भागात तर आंतरराष्ट्रीय सीमारेषा पण अस्तित्वात नाही
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 05:02 नवीन
असे वाटत नाही...
ही घोडचुक आहे. काहीही असले तरी अजुनही इस्लामी देश असुनही पाकिस्तानमधे शरीया पुर्णपणे लागु नाही. तालिबान ते करु पहात आहे. अफगाणिस्तानला जगाच्या राजकीय पटलावर आता पाकिस्तानची जागा घ्यायची महत्वाकांक्शा आहे म्हणुनच ते पाकमधे हल्ले करत आहेत. ते हल्ले म्हणजे पाकच्या नजरेत बॅड तालिबान अन ते हल्ल्ले अफगाणमधे झाले की गुड तलीबान अशी आता पर्यंत दुटप्पि भुमीका पाकने घेतली होती, आता पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल. आणी अफगाण प्रमाणे जर पाक मधेही सैन्याने नांगी टाकली तर लवकरच मोठा हाहाकार उडु शक्तो... अथवा या यादवीच्या बिमोडासाठी पाक परत इतर देशांकडे कटोरा घेउन फिरायला सुरुवात करु शकतो व स्वताचे महत्व परत प्रस्थापीत करु शकतो पण रस कुणाला आहे ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/18/2021 - 06:24 नवीन
पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल पाकिस्तानी लष्कर काही अफगाणिस्तानसारखे बाजार बुणग्यांनी भरलेले नाही. व्यवस्थित शिस्त असलेले आहे आणि तालिबानने तसा प्रयत्न केला तर ते त्यांना फार महाग पडू शकते. याशिवाय जागतिक सत्ताना पाकिस्तान सारखा अण्वस्त्र सज्ज देश आणि अण्वस्त्रे तालिबानच्या हाती लागू देणे अजिबात परवडणार नाही. कारण अण्वस्त्रांच्या धमकीवर ते जगाला तेलासाठी प्रचंड किंमत मोजायला लावतील. आपले मत अजिबातच वस्तुस्थितीला धरून नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 09:34 नवीन
मी वस्तुस्थतीपेक्षा थोडी रंजकता पकडुन शक्यता पडताळत असेन, आयमीन ही १८८ नंबरची पद्धत वापरणारा मी ईथे पहिला नाहीं. तुमचे म्हणणे मला तरी योग्य वाटते पण मुळात तालिबान उघड लढाई का करेल ? किंव्हा उद्या सत्ता ताब्यात घेउन लष्करानेच फ्रिहॅण्ड दिला तर ? अथवा तालिबानचा बाऊ करून पाकिस्तानने अण्वस्त्र सुरक्षा वगेरे वगैरे मुद्दे रेटून पुन्हा जगातून सहानुभूती व पैसा अशा दोन्हीं गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी का असेना पण तालिबान v पाकिस्तान खडाजंगी होणार असे मला वाटते... माझे विचार चुकीचे असतीलही पण मी फक्त शक्यता पडताळणे इतकचं कल्पना करून बघत आहे. कारण तालिबान संपूर्ण अफगाण महिन्याच्या आत ताब्यात घेईल असे कोणच म्हणत न्हवते पण ते घडले
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 08/19/2021 - 01:17 नवीन
बरेचदा पाकिस्तानी लष्कर याविषयी अनेक अफवा प्रचलित असतात /आहेत. या पार्श्वभूमीवर सुबोध खरे यांनी
  • पाकिस्तानी लष्कराची सद्य स्थिती,
  • त्यांची ताकद,
  • त्यांची कुवत,
  • काम करण्याची पद्धती,
  • त्यांची सपोर्ट सिस्टिम आणी मजबूत दुवे
  • अधिक अजून जे योग्य असेल ते
याचे तपशील देणारा एक लेख लिहावा
अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/19/2021 - 04:28 नवीन
डॉक्टर सगळे मुद्दे पटले... सध्या तरी तालिबान, पाकिस्तान कडे एक डोकेदुखी म्हणूनच पाहिलं असे वाटते, त्यांना आधी जगातून मान्यता आपली २. अवतारासाठी मिळवय्याची आहे .. त्यामुळे पाकिस्तान हे लक्ष असू शकेल असे वाटत नाही याशिवाय जर तालिबान २. खरंच हुशार असेल तर ते पाकिस्तान ची मदत घेईल गुपचूप तशी ती पख्तुनी वंश मुले मिळतच आहे , पाकिस्तान मात्र परत याचा फायदा कसा घेता येईल... हे बघेल ... ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/19/2021 - 13:14 नवीन
ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,
थोडे फार तथ्य आहे. अमेरिका व रशिया यांची घोड चुक वनाईलाज म्हणजे अफगाण भूमीवर प्रत्यक्ष उतरवलेले सैन्य होय. चीनने यातून धडा घेउन तालिबानला पैसा पुरवला आणि त्यांचे वितरण अफगाणिस्तानात होइल हे पाहिले त्यातून पुढील बाबी साध्य केल्या १) तालिबान सोबत संबंध बळकट केले २) तालिबानच्या विरोधकांना पैसे वाटून विरोध सपशेल निकामी केला ३) मोठा रक्तपात टाळला ४) चीनचे हीतसंबंध पक्के केले उद्या तालिबानचा पूर्ण शक्तीने चीन विरोध करणार नाही, त्यांचे बेल्ट अन रोड इनिशियटिव सारखे प्रोजेक्ट अफगाणिस्तानात व्यवस्थित पसरतील व चीनचा फार मोठा व्यापारी नफा सुरु होइल ५) यातील मोठा भाग तालिबानला अप्रत्यक्ष मिळत राहील तालिबान मजबूत व सशस्त्र होत जाईल व एक मोठी शक्ती व पाकिस्तानला पर्याय म्हणुन नावारूपाला यायचा प्रयत्न करत राहील ६) चीन मर्यादित प्रमाणात तालिबानचा उपयोग भारताची डोकेदुखी वाढवायला हमखास करेल ७) चीन व तालिबानकधीच मित्र होणार नाहीत पण आपापली सत्तास्थाने मजबुत करायला एकमेकांचा मुक्त वापर करतील ६)
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/19/2021 - 13:27 नवीन
आता युद्ध तलवारीने न्हवे पैशाने लढले जाते. जय पराजय, यशापयश लोक कीती मेले मारले यापेक्षा आपला देश किती सुरक्षीत व आर्थिकदृष्ट्या श्रीमंत केला यावर ठरते. चक्क तालिबानने रक्तपात टाळला यातच सर्वकाही आले यावेळेस तालिबानच शहाणे बनून नेटवर मुंडकी छाटायच्या व्हिडिओचा भडिमार न करता बिबिसी सारख्या वृत्तवाहिन्या मार्फत आपली इमेज सुधारायचा खरा खोटा प्रयत्न करत आहे यातच सर्व परिमाणे सिध्द होतात
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 02:16 नवीन
पश्चिम बंगालमधील मध्ये कोलकाता येथील बनियातोला हे प्राचीन भूतनाथ शिवमंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी हिंदु भक्तगण आले असता त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मध्ये एक साधू ही दिसून येतो आहे. बंगाल मध्ये हिंदुंवर अधिकाधिक अत्याचार होत आहेत असे दिसून येते आहे. निवडणूकी नंतर झालेल्या हिंसाचारात बंगाल येथील हिंदूंना येथून निर्वासित करण्यात आल्याच्या घटना ताज्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्टेट मशिनरी म्हणजे पोलिसांकडूनही असे अत्याचार होत आहेत असे दिसून येते आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 02:25 नवीन
वेस्ट पॉईंट येथील यूएस मिलिटरी अकॅडमीच्या कॉम्बेटिंग टेररिझम सेंटरने एक अहवाल प्रकाशित केला होता. देवबंदी इस्लाम हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विभक्त करणाऱ्या ड्यूरँड लाईनच्या दोन्ही बाजूंच्या पश्तून पट्ट्यातील लोकांना सर्वात लोकप्रिय आहे. शिवाय, प्रमुख अफगाण आणि पाकिस्तानी तालिबान नेत्यांनी देवबंदी मध्येच कट्टरतेचे शिक्षण घेतले आहे. तालिबान चळवळीसाठी देवबंदी हा धार्मिक आधार बनला आहे. अनेक तालिबान नेते आणि सेनानी देवबंदी पद्धतीमध्ये शिकलेले आहेत तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर हा देवबंदी पद्धतीने शिकलेला होता. हे पाहता तालिबान ची पाळेमुळे भारतीय कट्टर धार्मिक शिक्षणात आहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 08/18/2021 - 03:38 नवीन
शेखर गुप्तांनी याचे चांगले विश्लेषण केले आहे अणि माहिती दिली आहे येथे पहा https://www.youtube.com/watch?v=ZWoVrSuIf0s
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 04:00 नवीन
शेखर गुप्ता म्हणजे काँग्रेस चा छुपा समर्थक. त्याला सोनियाने २००७ मध्ये पद्मश्री दिली होती हे विसरू नका! फार घातक रितीने नरो व कुंजरोवा करणारा इसम. लिबरल्स प्रपोगंडाचा मास्टर प्लेयर आहे हा. याच्या व्हिडियो पासून दूर राहणे चांगले. शेखर गुप्ता प्रचंड प्रमाणार यु ट्युबवर प्रमोट केला जातो. म्हणजे याने किंवा याच्या बोलवित्या धन्याने खूप मोठे पॅकेज खरेदी केले आहे यात शंका नाही! दहा वेळा नॉट इंटरेस्टेड असे नोटिफाय करूनही युट्युब हे मला दाखवायचा प्रयत्न करत राहते म्हणजे किती पैसा ओतला असेल याने याचा विचार करा...
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/19/2021 - 04:30 नवीन
शेखर गुप्ता बद्दल आपल्याशी एकमत आहे, फक्त या व्हिडिओत तालिबान चा चेहरा कोण या संबंधी माहिती उलगडून देताना दिसले म्हणून उल्लेख केलं ,, यात तरी तसा त्यांचा "छुपा अजेंडा" दिसला नाही , तालिबान २.व चे मुख्य हे पाकिस्तानी मद्रसेतून पुढे आले असे ते स्पष्ट म्हणतात
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/18/2021 - 02:48 नवीन
कोव्हिड नंतर अर्थ व्यवस्थेला वेग देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू केला आहे. भारताला उत्पादन आणि निर्यात दोन्ही वाढवण्याची गरज आहे. यानुसार गती शक्ती योजना भारतीय उत्पादकांचे जागतिक प्रोफाइल वाढविण्यासाठी स्थायी सेवाभूत सुवीधा देणार आहे. ही योजना १०० लाख कोटी रुपयांच्या पायाभूत योजनांची असेल ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 08/18/2021 - 08:39 नवीन
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी कोर्टाने शशी थरूर यांना निर्दोष मुक्त केले आहे. फक्त किती विचारवंत शशी थरूर किती हुषार ते आपल्याविरूध्द पुरावा कसा सोडतील असे म्हणतात हेच बघायचे. कोर्टाने आज शशी थरूरना निर्दोष सोडले आहे. पण सुनंदा पुष्करचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झालेला असूनही यापूर्वी सात वर्षात किती विचारवंत त्या कारणावरून त्याच्याविरोधात बोलायचे? शशी थरूर या विचारवंतांच्या कळपातले आणि काँग्रेसमधले असल्याने बहुदा सुनंदा पुष्करचा मृत्यू हा धर्मनिरपेक्ष मृत्यू आहे असे या मंडळींना वाटत असावे. असो.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 08/19/2021 - 01:20 नवीन
रोचक घडामोड आहे ही. सुनंदा पुष्करचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झालेला असूनही त्यांना अटक झाली नव्हती.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 08/19/2021 - 06:25 नवीन
वकील घेण्याची क्षमता असली तर अटक टाळता येते, हा इतिहास आहे आपला.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 08/20/2021 - 14:53 नवीन
पाकिस्तानी एंजट पत्रकारा सोबत थरुरचे लफडे चालु आहे असा गौपयस्फोट सुनंदा ने केला अन आठवढ्याभरात ती मेली... सगळेच संशयास्पद
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 08/19/2021 - 17:28 नवीन
मला वाटतं भाजप आता थरूरना पक्षात घेण्याच्या हालचाली करेल.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 08/18/2021 - 16:15 नवीन
गेल्या काही वर्षांत सावरलेला,बहरलेला अफगाणिस्तानात​ तालिबानी माकड्यांच्या मर्कट चाळा टिव्हीवर पाहून फार वाईट वाटतय.पाकिस्ताननेही अनेक तालिबानी अतिरेकी कैद्यांना सोडलय.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/18/2021 - 17:26 नवीन
https://www.thehindu.com/news/national/india-announces-emergency-e-visa-for-afghans/article35952475.ece अफगाणींना विसा देनार आहेत म्हणे धर्मभेद न मानता. रोहींगे तर गनिघाले नाहीत अजून अफगाणी घ्या घालून. आता हे ही राष्ट्रहीतासाठीच असावे म्हणा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा