Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 08/13/2021 - 11:12
🗣 196 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy-as-fight-for-kabul-nears/world/news/2475419.html एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो. मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते. अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही. असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51878 views

🗣 चर्चा (196)
R
Rajesh188 Fri, 08/13/2021 - 12:50 नवीन
पहिल्या कर्माची फळ तर आहेत च आणि आता अफगाणिस्तान अनेक देशांच्या हातचे खेळणे झालेला आहे. रशिया नी खेळणी पुरवली आणि त्याचा वापर अमेरिका विरूद्ध झाला. आता कोणता त देश खेळणी पुरवणार आणि त्याचा वापर कोणाविरुद्ध होणार हेच बघायचे आहे .. ह्या खेळात अफगाणिस्तान चा फायदा कधीच होणार नाही हे मात्र सत्य आहे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 08/13/2021 - 14:51 नवीन
ह्रदयद्रावक.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 08/13/2021 - 14:55 नवीन
प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच उत्पन्न नसल्याने कोणालाच त्याचे काहीच देणे घेणे नाही ? जिंकुन सोडुन देणे यापलिकडे त्यातुन काहीच साध्य नाही. बरे आता जगातील दोन महासत्ताना प्रोक्सिवॉर करुन जेरीस आणले असल्याने अगदी पाकिस्तानच्या सपोर्टवर देखिल त्याभागात युध्द केले जाउ शकते त्यासाठी तालीबानच्या बाजुने लश्कर उतरवायची गरजच नाही त्यामुळे प्रश्न अजुन कठीण बनला आहे कारण तालीबानचा वापर प्रोक्सीवॉरसाठी आता नेहमीच केला जाणार. अर्थात ते देखिल आता शहाणे झाले आहेत अणु हल्याचा धोका वगळता त्यांचे कडुन पाश्चात्यांवर मोठा हल्ला व्हायची शक्यता नजिकच्या काळात जवळपास नसल्यात जमा आहे म्हणजे धोका फक्त भारताला व थोडाफार चिनला संभवतो. भवितव्य काय याचा काहीच अंदाज नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/13/2021 - 15:52 नवीन
प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच उत्पन्न नसल्याने कोणालाच त्याचे काहीच देणे घेणे नाही त्या देशात जगातील सर्वात जास्त अफूची निर्मिती होते याची किंमत १० हजार कोटी इतकी आहे. तालिबानला यातील १० % कररूपाने मिळतात म्हणजेच १००० कोटी. हा सर्व व्यापार थांबवण्यासाठी अमेरिकेने २००१ पासून ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. https://www.bbc.com/news/world-us-canada-47861444 याशिवाय त्या देशात खनिज संपत्ती आहे ज्यात मौल्यवान रत्ने येतात. यातील केवळ लॅपिस या रत्नांचा साठा अमेरिकी भूवैज्ञानिकी संस्थेच्या अंदाजाप्रमाणे किंमत १ लाख कोटी रुपये इतका आहे. या सर्व खाणी टोळीवाल्यांच्या ताब्यात आहेत आणि ते लोक या बेकायदेशीर खनिज उत्पादन करणाऱ्या भुरट्या लोकांना भाड्याने देतात आणि यातील ५०% उत्पन्न तालिबानला देतात. https://www.bbc.com/news/world-asia-36424018 याशिवाय इतर इस्लमिक देशातून( आखाती) येथे ४ हजार कोटी रुपये अवैध मार्गाने येतात (आयसिस किंवा अल कायदाशी तालिबानचा संधान आहे त्यातून) .
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 08/13/2021 - 16:12 नवीन
हे सर्व अफू वरील कर तालिबान गोळा करु शकते सरकार नाही म्हणजेच सरकार कामाचे नाही अन खनिजाचे एक लाख कोटी रुपये तर आमचेच लोकं दोन तिन वर्षात स्विसमधे जमा करतात ;) असो, आपल्याला ग्राउंड रिपोर्ट जास्त व्यवस्थित माहित आहे... तेंव्हा अफगाणिस्तानात स्थिरता का येत नाही आली नाही अथवा येणार नाही यावर अजूनच भाश्य अवश्य करावे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/13/2021 - 18:54 नवीन
ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन जमा झाले म्हणे स्विस बॅंकेत. आता ते देखील राष्ट्रहीतासाठीच असावे. :)
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 08/14/2021 - 04:23 नवीन
भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद टाकून मजा बघणाऱ्याची फारशी पत समाजात उरत नाही हे अजूनपर्यंत तुम्हाला कळायला हवं होतं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/14/2021 - 05:20 नवीन
असे लोक अत्यंत चिवट असतात. Spam प्रतिसाद १८८ कोटी वेळा टाकल्यानंतर एकाला तरी कोणीतरी उत्तर देईल या आशेवर ते spam ओतत राहतात.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 08/14/2021 - 10:20 नवीन
मोदी आणि भाजपाची तळी उचलून धरणे हेच एकमेव पवित्र कर्तव्य आहे असे एकदा जाहीर करून टाका म्हणजे मिपावर सतत पडीक राहून सदस्यांचा उपमर्द करण्याचा खटाटोप वाचेल. कसं? बाकी भारतात स्वर्ग अवतरणार आहे या बाबत माझ्या मनात काहीच शंका नाही. गर्वाने छाती तट्ट फुगावी असा नवा कोरा नाव बदलेला खेल पुरस्कार, फाळणीच्या जखमांवर फुंकर घालणारा नवा स्मृती दिन, जान हैं तो जहान हैं याची आठवण करून देणारा उडान योजनेचा विमान प्रवास महाग करणारा निर्णय. काय सांगावे महाराजा, मला तर वाटते आत्तापर्यंत महासत्ता होण्याच्या शर्यतीची सीमारेषा पार देखील केली असेल. आज काल ती सीमारेषा दिसत देखील नाही म्हणून एक शंका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/14/2021 - 11:09 नवीन
आपल्याला सुद्धा ईनो, जेलुसिल, बरनॉल वगैरेची नितांत गरज आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/14/2021 - 13:47 नवीन
भाजपला अडचणीत आणणारे प्रतिसाद स्पॅम असतात. :- संत रावसाहेब चिंगभूतकर अच्छेदिनवाले.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 08/16/2021 - 09:26 नवीन
एका वेळेस अधिकतम ३० सदस्य हजर असलेल्या संस्थळावर एका टिनपाट सदस्याने प्रतिसाद दिल्याने भाजप अडचणीत येतो. - ढोर थोर विचार्वन्त भुजबळ साहेब.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/16/2021 - 16:41 नवीन
मिपावरील सर्वात “संस्कारी” माणूस. भक्तीत न्हाऊन निघालेला...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/14/2021 - 06:47 नवीन
सर्वात जास्त काळेधन जमा झाले म्हणे स्विस बॅंकेत. काळा चष्मा काढा अन्यथा सर्वच जग काळं दिसतं. According to the SNB, its data for 'total liabilities' of Swiss banks towards Indian clients takes into account all types of funds of Indian customers at Swiss banks, including deposits from individuals, banks and enterprises. This includes data for branches of Swiss banks in India, as also non-deposit liabilities. An automatic exchange of information in tax matters between Switzerland and India has been in force since 2018. Under this framework, detailed financial information on all Indian residents having accounts with Swiss financial institutions since 2018 was provided for the first time to Indian tax authorities in September 2019 and this is to be followed every year. In addition to this, Switzerland has been actively sharing details about accounts of Indians suspected to have indulged in financial wrongdoings after submission of prima facie evidence. Such exchange of information has taken place in hundreds of cases so far. https://www.indiatoday.in/business/story/indian-black-money-swiss-bank-accounts-latest-estimate-1816211-2021-06-17
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 08/14/2021 - 07:11 नवीन
की आपल्यासारखी समजूतदार वेल balanced लेख व माहितीव्यक्त करणारी व्यक्ती हळू हळू हिरीहिरीने स्पॅमरना उत्तरे कशी काय देत असते... व्हाय दे कांट इग्नोर स्पॅम आत्ता मात्र निर्माण कार्यास झोकून देऊन अधिकृत व समर्पित भावनेने आपला वाटा उचलणाऱ्या खारीची आठवण येते आहे. असो, केजरीवाल यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आयबीएम मधील जॉब सोडुन दिल्लीला आंदोलनास गेलेली व्यक्ती पाहिली आहे... देश बदलावा म्हणुन... आला परत...
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 08/14/2021 - 07:44 नवीन
आधीच इथे फारसे लोक balansd प्रतिसाद लिहीत नाहीत आणि त्यातून तुम्ही असं लिहा
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 08/14/2021 - 17:30 नवीन
आमच्या भंपक भिकरड्या प्रतिसादांकडे डॉक शश्प लक्ष देत नाहीत तसेही कोणी काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/13/2021 - 15:58 नवीन
स्थिर सरकार आणि शांतता असल्या शिवाय कोणताच देश प्रगती करू शकत नाही. मग ते कोणतेही क्षेत्र असू ध्या. अफगाणी जनतेच्या नशिबात सुख,शांती,वैभव,सुरक्षित पना कधी येईल असे वाटत नाही . त्या देशावर इतर देश लक्ष ठेवून असणार च .त्यांच्या सीमेच्या आता काही ही गोंधळ घातला तरी बाकी देशांना काही फरक पडत नाही.पण कोणाचे हितसंबंध संकटात आले तर मात्र देश लष्करी हस्तक्षेप नक्कीच करणार. अशांत क्षेत्र म्हणून जगातून त्यांना खूप आर्थिक मदत मिळत असते.हे पण कारण असेल नेहमीच अशांत देश ठेवण्याचे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 08/13/2021 - 16:33 नवीन
अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा एकदा सैन्य पाठविणार आहे. कोणीही आले तरी तालिबानचा संपूर्ण पराभव होणे खूप अवघड आहे कारण तालिबान्यांना शस्त्रपुरवठा पाकिस्तानकडून होतो. जोपर्यंत पाकिस्तानचे नाक दाबले जात नाही तोपर्यंत तालिबान्यांना संपविणे अशक्य आहे. समजा आता अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबान्यांच्या ताब्यात गेला तरी भारताच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांना फार त्रास होईल असे वाटत नाही. मुळात भारताला अफगाणिस्तानातून फार काही मिळत नाही. भारतच अफगाणिस्तानला भरपूर मदत करीत असतो. तालिबान्यांचे इराणशी व रशियाशी पटत नाही. तालिबानी सत्तेत परतणे पाकिस्तानला सुद्धा त्रासदायक ठरणार आहे. भारताने अफगाणिस्तानातील सध्याच्या घडामोडींकडे फार लक्ष देऊन स्वत:स त्रास करून घेऊ नये.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/14/2021 - 05:37 नवीन
अमेरिका सैन्य पाठवणार आहे पण त्यांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तान मधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी. तालिबान चे अनेक दहशतवादी संघटने बरोबर संबंध आहेत ही चिंतेची बाब आहे. काश्मीर मधील अतिरेक्यांना त्यांची मदत होईल असे पाकिस्तान ला आशा आहे.म्हणून तालिबान ला पाकिस्तान पाठिंबा देत आहे. असा पण पाकिस्तान हा नालायक देश आहे. कीड आहे जगाची. बाकी तालिबानी आणि पाकिस्तानी जनता ह्या मध्ये मोठे प्रेम असण्याची शक्यता कमी च आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/14/2021 - 13:49 नवीन
पण आपल्या लष्करे तैय्यब्बा ची सर तालीबानला नाही. ट्विन टावर पाडणे हे मजारे शरीफ, नी कंधार घेण्याईतके सोप्पे आहे व्हय?? लादेन गेल्या पासून कुणी वाली ऊकला नाही ओ लष्करे तैय्यब्बा ला
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/14/2021 - 14:31 नवीन
आपले अज्ञान वारंवार उघड करू नये. अन्यथा सर्वत्र हसे होते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/14/2021 - 17:04 नवीन
साॅरी गुरूजी. अस कायदा. लष्करे तैयब्बा त्या जागी अल कायदा वाचावे. अल कायदा ची सर तालीबान ला नाही.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 08/14/2021 - 15:59 नवीन
मौजमजेसाठी अविवाहित मुलींनी शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोहोचला नाहीय : उच्च न्यायालय India still conservative, girls don’t indulge in carnal activities just for fun: MP HC judge मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर यांनी एका खटल्याचा निर्णय देताना मुलींनी केवळ मौजमजा म्हणून लग्नाआधी शरीर संबंध ठेवावेत, इतका भारतीय समाजमन अद्याप आधुनिक झालेलं नाही, असं मत व्यक्त केलं. The accused had claimed that the complainant had consensual sex with him and that it was not a forced relationship. Justice Abhyankar rejected this argument and observed that in a majority of rape cases involving adults, the defence usually takes the plea that the complainant was a “consenting party” and, therefore, the accused get the benefit of doubt. However, in the court’s opinion, barring some exceptions, this does not hold true. Therefore, the judge said, the accused cannot “plead consent on the part of the prosecutrix and laugh all the way to your home”. अशा प्रकरणांमध्ये कोणा कडची बाजू खरी आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आणि तितकंच अवघड असतं.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 08/15/2021 - 18:17 नवीन
आज काबूलही पडलेच. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी राजीनामा देऊन ते ताजिकिस्तानला पळून गेले आहेत. आता अफगाणिस्तानात परत तालिबान राजवट येणार हे नक्की झाले आहे. २५ वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालिबान काबूलमध्ये घुसल्याची आणि महमूद नजीबुल्लांना ठार मारल्याची बातमी आली होती. आज १५ ऑगस्टच्या दिवशी ही बातमी आली आहे. मागच्या वेळेस तालिबान्यांना कंदाहार ते काबूल यायला दीड वर्ष लागले होते. यावेळेस चार दिवस लागले आहेत. मागच्या वेळेस अहमदशाह मसूद पंजशीर व्हॅलीमधील निदान ५% भाग नियंत्रणात ठेऊन तालिबानविरोधात एकाकी का होईना किल्ला लढवत होता. यावेळेस तसा कोणीही दिसत नाही. तालिबान हे बहुसंख्य पश्तू वंशाचे आहेत. हे लोक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या दोन्ही देशांमध्ये पसरले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तानातील सीमारेषा ड्युरंड लाईन हे लोक मानत नाहीत. तसेच तिकडचा डोंगराळ प्रदेश लक्षात घेता दोन देशांमधील सीमारेषा ठेवणे तितके सोपे नाही. त्यामुळे त्या लोकांचे नियमितपणे इकडून तिकडे चालू असते. भिती आहे की आज अफगाणिस्तान- उद्या पाकिस्तान असे करत तालिबान्यांनी पाकिस्तानवरही कबजा मिळवला तर मग भारतावर ते टोळधाडीसारखे चालून यायचा प्रयत्न करतील.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 08/15/2021 - 18:58 नवीन
ज्या सहजतेने अफगाण तालिबानने ताब्यात घेतले ते पाहता मी पुर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत आहे असे वाटते जणू सर्वच अमेरिका निघुन जायची वाट पहात होते. फार सहजतेने व कसलाही विशेष रक्तपात न होता हे घडले अर्थात याचा इंटेल आधीच मिळाला असला पहिजे ज्यामुळे वकिलात लगेच सोडल्या गेल्या... जनतेला अमेरिका नको होती विकास नको होता... असेच म्हणावे लागेल. पूर्वी भारतात जसे शासक बदलले तरी सामान्य जनता त्याच परिस्थीतीमधे रहात असे त्यामूळे त्यांना फार फरक पडत नसे व ही बाब भारताच्या हजार वर्षांच्या गुलामगिरीस अनुकुल ठरली तसेच काहीसे अफगाण बाबत वाटत आहे अमेरिका असली काय अथवा नसली काय लोकांचें दैनंदिन जीवन अमुलाग्र बदलले नाही त्यामूळेच अफगाण काही शतके स्वकीय अथवा परकियांच्या गुलामगिरीसाठी दीर्घकाळ कटिबध्द आहे असेच सकृतदर्शनी खेदाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 08/15/2021 - 19:31 नवीन
माझा भारत व विशेषः भारतीय सैन्यदळ याविषयी विश्वास व अभिमान कमालीचा वाढला आहे... धन्यवाद, भारतीय संरक्षण दलांना १५ ऑगस्टच्या औचीत्यावर माझा मानाचा सलाम.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sun, 08/15/2021 - 19:53 नवीन
भिती आहे की आज अफगाणिस्तान- उद्या पाकिस्तान असे करत तालिबान्यांनी पाकिस्तानवरही कबजा मिळवला तर मग भारतावर ते टोळधाडीसारखे चालून यायचा प्रयत्न करतील.
https://youtu.be/ZA82PnTs_OA
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 08/15/2021 - 20:05 नवीन
अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा होता व २००१ पर्यंत तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या नॉर्दर्न अलायन्समध्ये बहुसंख्य ताजिक होते. सद्यपरिस्थितीत ताजिकांचा कोठे पुसटसा सुद्धा उल्लेख होताना दिसत नाही. एकंदरीत अफगाणिस्तान पुन्हा एकदा अत्यंत क्रूर धर्मांधांच्या दडपशाहीखाली भरडला जाणार. मुळात तालिबान हे पाकिस्तानचे अपत्य असून त्यांना सर्व प्रकारची शस्त्रे, आर्थिक मदत पाकिस्तानकडूनच होते. जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत अमेरिका, रशिया, इंग्लंड असे कोणीही आणि कितीही वर्षे अफगाणिस्तानात राहिले तरी तालिबान संपणार नाही. तालिबानला संपवायचे असेल तर आधी पाकिस्तानला संपविणे आवश्यक आहे. तालिबानी पाकिस्तानशी वाकड्यात गेले तर भारताला फायदाच होईल. सध्या तरी भारताला कोणताच धोका संभवत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/15/2021 - 21:13 नवीन
तेच फक्त पाकिस्तान ला संपवू शकतील .अशा थापा मारतील की पाकिस्तान स्वतःच शरण येईल.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/16/2021 - 00:35 नवीन
तालिबानी पाकिस्तानशी वाकड्यात गेले तर भारताला फायदाच होईल. हो तर्क बरोबर पण तसे होईल असे फारसे वाटत नाही भारताला धोका आहेच ... गझवा ए हिंद या साठी जी लोक कार्यरत आहेत त्याला पाठबळ वाढेल
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 08/16/2021 - 04:34 नवीन
भारताला धोका आहेच ... गझवा ए हिंद या साठी जी लोक कार्यरत आहेत त्याला पाठबळ वाढेल
आणि मोदींच्या अडचणी तालिबानमुळे वाढणार असतील तर भारतातले विचारवंत तालिबान पण कित्ती कित्ती चांगले आहेत याच्या पंचारत्या ओवाळायला पण कमी करायचे नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/16/2021 - 03:13 नवीन
तालिबान हे बहुसंख्य पश्तू वंशाचे आहेत. हे लोक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या दोन्ही देशांमध्ये पसरले आहेत बरोबर पण दुर्दैवाने काही अति उदारमतवादी आता .. बघा अमेरिकेची कशी जिरवली या उन्मादात "बामियान च्या बुद्धांना" सुरुंग लावणाऱ्या तालिबानचे स्वागत करतील आपण हि आता पंजाबी पाकिस्तानाण्यांना साथ दिली पाहिजे असे वाटत्तय ..बघ तुम्ही शिकलेले उच् मुस्लिम कशाला या येडण्याच्या नादी लागतताय .. पण ते कशाला घेतील ... त्यांना बरेच आहे परत अममेरिकेल सांगायला .. "आमचं मार्फत " म्यानेज " करा ,, वर्षाला एवढे डॉलर द्या... https://www.youtube.com/watch?v=-c_ctZ4lUCk म्हणे झियांनी म्हणले होते कि कि इस्राएल ची अस्त्रे अमेरिका अफगाणिस्तान मुजाहिदीन ना देणार.. हे चालेल म्हणाले .. पण १) सर्व माझ्या मार्गे आणि २) एक सुद्धा "फकिंग ..... स्टार ऑफ डेव्हिड एकही वेपण वर दिसला नाही पाहिजे https://www.youtube.com/watch?v=sykCqx4IS6c
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/15/2021 - 21:11 नवीन
तालिबान त्यांच्या देशाच्या सीमे बाहेर येवून महासत्ता ना भावी महासत्ता (भारत) धोका निर्माण करणार नाही. भारताला जास्त च भीती वाटत असेल तर भारतीय लष्कर अफगाणिस्तान मध्ये पाठवून तालिबान ची सत्ता नष्ट करावी. भारत भावी महासत्ता आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/16/2021 - 00:32 नवीन
काबुल तालिबान च्या हातात, तालिबानी काळ्या फेट्यात, ए के ४७ शकत अफगाणी राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले व्हिडिओ दिसत आहेत फरक एवढाच कि फार मोठा कळलं करताना दिसत नाहोयेत आजी सोनियाचा दिनू किंवा आज उन्मादाचाच दिवस असे जगातील अनेकांना वाटत असणार किंवा बघा अमेरिकेची कशी जिरवली .. अमेरिकेचाच दुसरे व्हिएतनाम खरंच आहे जिरवलीच म्हणलं पाहिजे पण हे चांगला आहे का? आता काय होईल - कडक इस्लामी कायदा येईल कि जो सौदी आणि इतर अरब देशात पण आहे पण तिथे बदल, मुलींचे शिक्षण यात प्रगतीच होत आहे , पण अफगाणिस्तानात मुली आणि स्त्रियांवर काय बंधन आणली जातील - जागतिक इस्लामी दहशतवादी जोपसण्यासाठी एक मोठी पाठशाला परत वाढेल .. - पाकिस्तान वाहत्या गंगेत हात धून घेणार अमेरिका का गहाण करून ठेवलीत ,,, कम्युनिसम चा एवढा तिटकारा करताना ( असे मूळ कारण दिले होते ) तुम्ही तालिबान ला जन्म दिलात .. तुम्ही हि भोगणार आणि दुसऱ्यांना हि भोगावे लागणार जगातील लोकशाही टिकवू म्हणून हस्तक्षेप जिथे करता ते करताना एकतर हुकूमशहांना पाठ देता नाहीतर असले ... गॉड आणि गन वृत्ती झिंदाबाबाद ! चला प्रत "चार्ली विलसनस वॉर " हा चित्रपट पाहावा म्हणतो
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/16/2021 - 03:50 नवीन
१४ ऑगस्ट येथून पुढे विभाजन विभीषिका स्मृति दिवस (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळला जाणार आहे असे पंतप्रधान मोदी यांनी जाहिर केले आहे. भारताचे विभाजन झाल्यावर उसळलेली दंगल अणि त्यात मरण पावलेले लाखो हिंदु हा आधुनिक भारतातील सर्वात वाईट भाग आहे. आजवर त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे. अखंड भारतातील मुस्लिम नेत्यांनी Direction Action Day म्हणजे प्रत्यक्ष कृती दिवसाची हाक त्यांच्या बांधवांना दिली होती. त्यानुसार त्यांनी भारतीय हिंदुंचे त्यांच्याच भूमीवर शिरकाण केले होते. अनेक लढवय्या हिंदुंनी याचा प्रतिकार केला होता आणि दंगलखोरांना पिटाळून लावले होते हे ही विसरता कामा नये! तथापि प्रत्यक्ष कृती हा काळा दिवस आणि फाळणीच्या दंगलींवर कधीच चर्चा होऊ दिली गेली नाही. सय्यद अहमद खान १८७६ ​​मध्ये म्हणाले, की हिंदू आणि मुस्लिम कधीही एक राष्ट्र बनू शकत नाहीत कारण त्यांचा धर्म आणि जीवनपद्धती एकमेकांपासून अगदी वेगळी आहे. तेव्हापासून द्विराष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली होती. १९४७ मध्ये द्विराष्ट्रवादाची अंमल बजावणी नेहरू आणि गांधींनी केली आणि अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले. ज्या दिवशी पाकिस्तानने आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला त्या विभाजन स्मृति दिवसाची ही शोकांतिका आहे. पाकिस्तानात त्याकाळी सुमारे ३८ टक्के असलेले हिंदु बांधव आता पाकिस्तानात फक्त २ टक्के उरले आहेत. या आधीही हिंदुंवर त्यांच्याच भूमीवर अनेक अनाचार झाले आहेत. जसे १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाने केरळमध्ये शेकडो आणि हजारो हिंदूंची हत्या केली. अ‍ॅनी बेझंटने तिच्या 'द फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात या नरसंहाराबद्दल सांगितले आहे. त्या म्हणतात की, 'खून केले गेले आणि मोठ्या प्रमाणात लूट केली आणि धर्मत्याग न करणाऱ्या सर्व हिंदूंना ठार मारले.' या सर्व कारणांनी १४ ऑगस्ट हा 'विभाजन भयपट स्मरण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. अर्थात भारतीय माध्यमांनी या दिवसाला काहीही महत्त्व दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 05:44 नवीन
अखंड भारतात सुद्धा हिंदू च बहुसंख्य होते . मग हिंदुच्याच कत्तली का झाल्या. मुस्लिम बहुल भागात ते समजण्यासारखे आहे. पण फाळणी झाली हे योग्यच झाले नाही तर आता अवस्था खराब झाली असती. ३५ कोटी मुस्लिम लोकसंख्या प्लस पुरोगामी,वंचित ह्यांनी मिळून हिंदू चे जगणे मुश्किल केले असते. सत्ता त्यांचीच असती. हिंदू बहुसंख्य असतील तर च सर्व धर्म समभाव,लोकशाही टिकू शकते .हिंदू अल्पसंख्यांक झाले तर देश कट्टरवादी लोकांच्या हातात जावून अजुन धार्मिक कत्तली झाल्या असत्या हे मात्र १००% सत्य आहे. फाळणी अजुन काटेकोर पने झाली असती तर एक प्रश्न कायमचा सुटला असता. चांगली संधी आपण गमावली.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 08/16/2021 - 06:22 नवीन
मोदींनी ही अत्यंत चांगली प्रथा सुरू केली. हे भारताने फार पूर्वी करावयास पाहिजे होते. अर्थात, ह्याविषयी नेहमीच्या संशयितांकडून निषेध, व विरोध सुरू झालाच. त्यांतून, ह्यामुळे आपण पाकिस्तानला दुखावतो आहोत, असले फालतू युक्तिवाद, अर्थातच कॉन्ग्रेसकडून केले जात आहेत. जगांत इतरस्त्र पाहिले तर अशाच बाबतीत काय दिसते? * जपानमधे दरवर्षी ह्याच महिन्यातील एका दिवशी, तेथील एका युद्ध- समाधि (war memorial), यासुकुनीला तेथील सरकारचे अधिकारी, मंत्री व काहीवेळा स्वतः तेथील पंतप्रधान भेट देतात. युद्धांत बळी पडलेल्या त्यांच्या बांधवाची आठवण म्हणून हे मेमोरियल बांधले गेलेले आहे. पण ह्यांत काही युद्ध- अपराधीही आहेत, व त्यांचे अपराध जागतिक स्तरावर मान्य झालेले आहेत. हे अपराध बहुतांश, चिनी व कोरीयन जनतेवरील अत्याचराचे होते. तेव्हा त्यांचा सन्मान जपानी सरकारने करणे, म्हणजे तो चीनी व कोरीयन जनतेचा अपमान आहे, असे म्हणून, ह्या दोन्ही देशांच्या सरकारांकडून, त्या भेटीचा प्रखर निषेध केला जातो. तरीही जपान त्यांना भीक न घालता जे करायचे ते दरवर्षी करतेच. * जपानी सेनेने चीनवर आक्रमण केल्यावर, नान्जिन्ग्चा पाडाव झाला. तेव्हा आक्रमकांनी तेथील जनतेवर, विषेशतः स्त्रीयांवर अन्वनित अत्याचार केले. त्या जखमा चीनने जाणीवपूर्वक जतन केल्या आहेत, त्या शहरांत ह्याविषयीचे संग्रहालय बांधून. * ब्रिटीशांनी चीनमध्ये जाऊन अफूच्या वापरांतून काही प्रांतांचा ताबा मिळवायचा प्रयत्न केला, त्यांतून तीन युद्धे झाली. त्यांना अफू- युद्धे असे म्हटले जाते. चीन ह्या जखमा अजिबात विसरला नाही. त्यांचा उल्लेख अधूनमधून केला जातो, व गाफिल राहिल्याने आपली कशी हार झाली, ह्याची आठवण जनतेत जागी ठेवली जाते. * जर्मनीमधे होलोकास्ट झालेल्या प्रमुख स्थळावर मेमोरियल उभारले आहे. आपल्या जनतेत स्वत्वाची धग जागी करण्याचा मोदींचा प्रयत्न अतिशय स्त्युत्य आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 08/16/2021 - 06:48 नवीन
याविषयी भारतात स्थायिक झालेले फ्रेंच पत्रकार फ्रॅन्कॉईस गॉटिअर यांनी २००३ मध्ये लिहिलेला Where's India's holocaust museum? हा लेख आठवला. नंतरच्या काळात फ्रॅन्कॉईस गॉटिअर बर्‍यापैकी वहावत जाऊन कैच्याकै क्लेम करायला लागले पण १८-२० वर्षांपूर्वी बरेच चांगले लिहायचे. पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या परिसरात असलेल्या हिंदूकुश पर्वतांना ते नाव कसे पडले याचा एक अतिशय रक्तरंजित इतिहास आहे. अफगाणिस्तानातून टोळधाडीसारखी पुरूषपूर (सध्याचे पेशावर) आणि पंजाबवर आक्रमणे होत होती तिथून कित्येक हिंदूंना पकडून गुलाम म्हणून अफगाणिस्तानात नेले जायचे. त्या दुर्गम भागातून जाताना खाण्यापिण्याचे हाल, दिवसेंदिवस चालत राहायचे यामुळे अनेक हिंदू तिथेच मरण पावले. आत्महत्येला 'खुदकुशी' म्हणतात त्यातील कुश म्हणजे ठार मारणे (खुदकुशी म्हणजे स्वतःलाच ठार मारणे). त्या पर्वतरांगांमध्ये अशाप्रकारे हिंदूंना ठार मारण्यात आले म्हणून त्या पर्वतरांगांचे नाव हिंदूकुश पर्वत असे पडले. या प्रकारात किती हिंदू मारले गेले असतील याची गणतीच नाही. पण त्यावेळच्या लोकसंख्येचा विचार करता बर्‍यापैकी प्रमाणावर तो आकडा होता हे नक्की. त्यानंतर अनेक शतके भारतात तेच चालू होते. म्हणजे हिटलरच नाही तर माओ, स्टालिन, पॉल पॉट, चे गव्हेरा वगैरे क्रूरकर्म्यांनी केलेल्या कत्तलींच्या पेक्षाही तो आकडा कदाचित टक्क्यात जास्त असेल. त्यांच्या स्मृतीसाठी सुध्दा भारतात होलोकॉस्ट म्युजिअम असावे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/16/2021 - 08:16 नवीन
या प्रकारात किती हिंदू मारले गेले असतील याची गणतीच नाही. हीच गणती व्हावी आणि या त्याचारांना कधीतरी वाचा फुटलीच पाहिजे. भारतात होलोकॉस्ट म्युझियम म्हणजे हिंदु हौतात्म्य स्मारक असलेच पाहिजे यात शंका नाही. असो, फ्रान्स्वा गोतिए (Francois Gautier), अजूनही चांगले लिहितात असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/16/2021 - 08:18 नवीन
चांगला प्रतिसाद आहे हा. तरीही जपान त्यांना भीक न घालता जे करायचे ते दरवर्षी करतेच. हेच भारतात व्हावे हीच सदिच्छा!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/16/2021 - 11:01 नवीन
तरीही जपान त्यांना भीक न घालता जे करायचे ते दरवर्षी करतेच. नाही भारत असे काह्ही करणार नाही ,, कारण आपण षंढ आहोत.. चुकून भाजप सत्तेवर आले आहे ..चुकून पडलेले स्वप्न आहे ते लवकर ममता दीदी किंवा राऊळ जी सत्तेवर यवो हि ईश्वर चरणी प्रार्थना ( अरे चुकलो ईश्वर हा हिंदू शब्द वाटतो.. उगा कोणाच्या भावना दुखावयायला नकोत ... प्रभू ( हा आता कसे बरे वाटले) चरणी प्रार्थना... अर्रे प्रभू तरी कशाला लाल बावट्याला वाईट वाटेल त्याला धर्मच मान्य नाही . आता काय करावे !
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/16/2021 - 06:46 नवीन
विभाजन विभीषिका स्मृति दिवसाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी विभाजन विभीषिका स्मृति दिवस पाळण्यावर टीका केली आहे. विभीषिका स्मृति दिवसामुळे पाकिस्तानच्या भावना दुखावल्या जातील असा काँग्रेसचा भाव आहे असे दिसून येते. म्हणजे हिंदु मेले तरी चालतील पण पाकिस्तान दुखावले नाही पाहिजे. भारतीयांपेक्षा पाकिस्तानच्या भावना काँग्रेससाठी जास्त महत्त्वाच्या आहेत असे त्यांनी यातून सूचित केले आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/16/2021 - 03:56 नवीन
दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले... नाहीतर "ओसामा भारतात सापडला" अशी बातमी आली असती...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 08/16/2021 - 04:39 नवीन
दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले... होय परंतु ज्या भयप्रद पद्धतीने त्यात हिंदू मारले गेले ते अनावश्यक होते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/16/2021 - 03:58 नवीन
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली आहे. यामुळे ग्रीन हायड्रोजनद्वारे स्वच्छ ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकेल. अर्थात यामुळे भारतात नव्या तंत्रज्ञानाला चालना मिळेल असे दिसते. भारतात सीएनजी नळ जोडणीची सुरुवात २०१४ नंतर केली गेली आहे. मोदींनी पुढाकार घेऊन या योजने अंतर्गत अनेक भाग सीएनजी नळ प्रकल्पाला जोडले जात आहेत हे पाहिले आहे. आधीच वेगात असलेल्या प्रकल्पाचा जोडणीचा देशातील वेग वाढवला जाणार आहे. यामुळे भारत उर्जा क्षेत्रात आयात कमी करू शकेल.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/16/2021 - 08:44 नवीन
सध्या भारतातील विभागवार वायू वितरण व्यवस्था अशी आहे.   विभाग % खप टक्केवारी वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था असलेली राज्ये वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था नसलेली राज्ये पश्चिम ५३% गुजरात, महाराष्ट्र गोवा उत्तर २६% दिल्ली, उ.प्रदेश, हरियाणा, राजस्थान पंजाब, जम्मु काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्य ३% मध्य प्रदेश छत्तीसगड दक्षिण १४% तमिळनाडू आन्ध्र प्रदेश केरळा, कर्नाटका पूर्व शून्य! एकही राज्य नाही! बिहार, प. बंगाल, झारखंड, उडिसा उत्तर पूर्व ४% आसाम, त्रिपुरा मेघालय, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपुर, नागप्रदेश         संदर्भः https://www.pngrb.gov.in/Hindi-Website/pdf/vision-NGPV-2030-06092013.pdf यात पुढे जाऊन सुधरणा होईल यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 09:03 नवीन
निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल. घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो. अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे. Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत. त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे. त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या . म्हणजे चित्र स्पष्ट होईल.. लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 09:03 नवीन
निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल. घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो. अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे. Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत. त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे. त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या . म्हणजे चित्र स्पष्ट होईल.. लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/16/2021 - 09:03 नवीन
निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल. घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो. अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे. Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत. त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे. त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या . म्हणजे चित्र स्पष्ट होईल.. लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा