Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

A
Ashutosh badave
Mon, 04/26/2021 - 07:34
💬 1 प्रतिसाद

आज काय घडले...

फाल्गुन व. १४

ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
यांचे निधन झाले.

हायस्कूलमध्ये असल्यापासूनच यांच्या बहुश्रुतपणामुळे शिक्षक यांना 'एन्सायक्लोपीडिया' असे म्हणत. येथील शिक्षणक्रम अपुरा असतांनाच ते १९०६ मध्ये अमोरिकेस गेले. आणि तेथील कार्नेल विद्यापीठांत समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि थोड्याच अवधींत बी. ए., एम् . ए., पीएच. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. History of Castes in India.आणि Hinduism, its formation and Future या त्यांच्या ग्रंथांमुळे.इंग्लंड-अमेरिकेत त्यांना चागलीच कीर्ति मिळाली. सन १९१२ मध्ये हिंदुस्थानांत आल्यावर प्रथम कलकत्ता विद्यापीठांत थोडे दिवस काम करून देशभर 'राष्ट्रधर्मप्रचारकसंघा' च्या निमित्ताने त्यांनी प्रवास केला. आणि शेवटी सन १९१६ सालापासून ज्ञानकोशाचे काम अंगावर घेतले. या कार्यास लागणारी बुद्धिमत्ता, उद्योगप्रियता, चिकाटी हे गुण त्यांच्या अंगी असल्यामुळेच त्यांना हे प्रचंड काम करणे शक्य झाले. ज्ञानकोशाच्या प्रस्तावना-खंडांतून त्यांची शोधक बुद्धि आणि स्वतंत्र प्रज्ञा दिसून येते. हे. काम चालू असतानाच त्यांनी 'विद्यासेवक' नांवाचे मासिक सुरू केले आणि त्यांतून आपल्या 'परागंदा', 'गोंडवनांतील प्रिंयवदा', 'आशावादी' या कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. याशिवाय 'गांवसासू', 'ब्राह्मणकन्या', 'विचक्षणा' या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. या कादंबरी-वाङ्मयांतून त्यांनी महाराष्ट्राला एक नवें दर्शन घडवून दिले. आजपर्यंत मराठी कादंबरीचे क्षेत्र केवळ सदाशिव पेठ हेच होते. डॉक्टर साहेबांनी ते क्षेत्र अत्यंत विस्तीर्ण करून त्याला जागतिक स्वरूप दिले. 'एकच जगाच्या कल्पनेचा पुरस्कार केतकरांनीच प्रथम केला. त्यांची दृष्टिच व्यापक होती. संकलनापेक्षां संशोधनाकडे अधिक कल असल्यामुळे 'प्राचीन महाराष्ट्र' नामक ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यापैकी पहिला खंड प्रसिद्धहि आहे.

१० एप्रिल १९३७.


  • Log in or register to post comments
  • 999 views


वाचनखूण लावा
| 999 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (1)
च
चित्रगुप्त Mon, 04/26/2021 - 16:12 नवीन
उत्तम परिचय. आजच्या पिढीने ज्यांचे नाव सुद्धा ऐकले नसण्याची शक्यता असलेल्या, जुन्या काळातील सर्व महान लोकांचा परिचय या लेखमालेतून करून देत रहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा