चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग १)
एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut-in-interest-rates-of-small-savings-schemes/articleshow/81811525.cms
जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
फडणवीस यांचे वागणे वयक्तिक रित्या मला, कुराघोडीचे वाटते..ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीस व भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहेत यात शंका नाही. सर्व बाबतीत ठाकरे सरकारची अडवणूक सुरू आहे. परंतु अनेकदा ठाकरे सरकारने स्वतःलाच अडचणीत आणून झोडपण्याची भाजपला अनेकदा संधी मिळवून दिली आहे. कंगना रनौटचे घर पाडणे, तिला जाहीर शिवीगाळ करणे, तिला मुंबईत पाऊल न ठेवून देण्याच्या धमक्या देऊन तोंडावर आपटणे, संजय राठोडची पाठराखण, सचिन वाझेची पाठराखण अशा सर्व अनावश्यक गोष्टीत ठाकरे सरकार तोंडावर आपटले व त्यामुळे भाजपला हातात आयते हत्यार मिळाले ही वस्तुस्थिती आहे. कोरोना महाराष्ट्रात येऊन वर्ष लोटले. परंतु राज्य सरकार अजूनही क्लूलेस आहे. जून २०२० मध्ये होणारी ११ वी ची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले व दुसरे वर्षही वाया जाण्याची शक्यता आहे, परंतु हे सरकार ढिम्म आहे. नशीबाने मिळालेल्या सत्तेचा वापर जास्तीत जास्त ओरबाडून खाण्यासाठी सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात गेलेला असताना हे सरकार थंडपणे निष्क्रीय बसून आहे.