Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)

स
साहना
Wed, 03/24/2021 - 05:04
🗣 193 प्रतिसाद
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे. - भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला. - फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे). - आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती. - सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे. - कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे. - येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले. - मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे. - नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली. - एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला. - अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली. विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55650 views

🗣 चर्चा (193)
ब
बिटाकाका Sat, 03/27/2021 - 08:47 नवीन
गणेशा, खालील लिंक वर विडिओ वर पूर्ण भाषण आहे. माझी खात्री आहे तुम्ही जाऊन बघण्याचे कष्ट घ्याल. आपल्याला हवे ते वाक्य घेऊन पूर्ण भाषणात तेच बोलले असे म्हणणे खेदजनक आहे. https://youtu.be/ANidurzVZu0
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/27/2021 - 08:41 नवीन
मोदी विचारपूर्वक ठरवून सद्यस्थितीशी संबंध नसलेले एखादे वाक्य बोलतात. लगेच मोदीद्वेष्टे त्यांच्यावर तुटून पडतात आणि पुरावे मागून वातावरण तापवायला सुरूवात करतात. काही दिवसांत पुरावे समोर येतात आणि मोदीद्वेष्टे तोंडावर आपटतात. या गदारोळात महत्त्वाचे मूळ विषय बाजूला पडून भलत्याच विषयात मोदीद्वेष्टे गुंतून जातात आणि शेवटी तोंड काळे करून घेतात. मोदी नुसती मजा बघतात. विरोधकांना भलत्याच विषयात गुंतवून खड्ड्यात पाडण्याचे तंत्र मोदींना चांगलेच जमले आहे. विरोधक बिनडोकासारखे परत परत फसतात.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 03/27/2021 - 08:46 नवीन
=)) कोणी तुटून पडलेलं नाही. विसंगतीवर विनोदी टिप्पणी केली की समर्थक मात्र समर्थन करायला सरसावून येतात. चांगला वेळ जातो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/27/2021 - 08:51 नवीन
तुमचा नाना तुटून पडला की. मोदींना जे हवे तेच मोदीद्वेष्टे करीत आहेत व खड्ड्यात जात आहेत.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 03/27/2021 - 08:55 नवीन
आमचा नाना? आमचं नाही कोणी. हे बायनरी वाटप सोडून द्या. आम्ही एका सार्वभौम देशाचे सार्वभौम नागरिक म्हणून स्वतःचे मत मांडतो. आम्हाला कळपात ढकलू नका बळेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/27/2021 - 09:54 नवीन
तुमचा कळप सर्वांना माहिती आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 03/28/2021 - 06:31 नवीन
जे कळपाने राहतात त्यांना वाटतं सगळेच तसे आहेत. =))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/28/2021 - 07:45 नवीन
जे आयुष्यभर लबाडी करतात त्यांना सगळेच लबाड वाटतात तसंच का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/27/2021 - 08:44 नवीन
विदेशात असताना त्यांच्या भूमिकेला देशाने पाठिंबा च दिला पाहिजे.ते देशाचे पंतप्रधान आहेत पक्षाचे अध्यक्ष नाहीत. पण त्यांनी सुद्धा काही प्रोटोकॉल पाळावेत ही लहान शी अपेक्षा असतेच ना देश वासियांची. बांगलादेश साठी भारताने खूप मोठे धाडस केले होते ,जागतिक दबाव झुगारून एका देशाचे दोन तुकडे करणे सोपी गोष्ट नक्कीच नाही. आपल्या देशाच्या शूर सैनिकांनी प्रचंड दाखवत पाकिस्तान च पूर्ण पराभव करून बांगलादेश निर्मिती केली होती. देशाच्या त्या वेळच्या सरकार नी तो निर्णय घेतला होता आणि देशाने त्याला पाठिंबा दिला होता. " मी बांगलादेश निर्मिती साठी सत्याग्रह केला" ह्याचा अर्थ काय होतो त्या वेळचे भारत सरकार बांगलादेश स्वतंत्र करण्याच्या विचाराचे नव्हते. आम्हाला सत्याग्रह करावा लागला सरकार विरुद्ध तेव्हा भारत सरकार तयार झाले आणि मदत पाठवली. असा अर्थ होतो त्या वाक्याचा. मोदी चे ते वक्तव्य सरळ सरळ चुकीचे आणि देशविरोधी आहे..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/27/2021 - 08:48 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/female-forest-officer-commits-suicide-after-being-harassed-by-her-superior-abn-97-2430337/ चालढकल केली आणि एक जीव हकनाक बळी पडला...
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 03/27/2021 - 09:38 नवीन
मोदींनी कुठेही असे म्हटलेलं नाही की फक्त माझ्यामुळेच बांगलादेशला स्वतंत्र मिळाले आहे. उलट त्यांनी बांग्लादेश च्या स्वतंत्र साठी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून पाठिंबा मिळत होता त्याच बरोबर प्रत्येक राजकीय पाक्षाचा ही पाठिंबा होता असेही म्हटलेलं आहे. मोदींनी त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं ही कौतुक केलेल आहे, श्रीमती गांधींनी बांगलादेश स्वतंत्र साठी विशेष प्रयत्न केलेले होते असा उल्लेख ही मोदींनी केलेला आहे. भारताच्या मिलिटरी ने विशेष ऑपरेशन राबून बंगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी मदत केलेली होती त्याचाही उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केलेला आहे. त्याचबरोबर भारताने तयार केलेली लस ही बांगलादेशला उपयोगी पडत असून दोन्ही देशांनी काही शक्ती विरोधात एकत्र येऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे. भारताने बांगलादेश स्वातंत्र्या साठी आणि त्या नंतर कशी मदत केली हे वारंवार मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. स्वतः विषयी बोलताना मोदी नि म्हटलेलं आहे की "मी त्यावेळी 20-22 वर्षाचा आसेल आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी माझ्या जीवणातील केलेल्या आंदोलनापैकी पाहिल्यात त्याची गणना होईल." ह्यात मी मीपणा आला असे मलातरी वाटत नाही. .>>>जसे साध्या कंपनीत project चे काम पुर्ण केल्यावर client meeting मध्ये पण आम्ही पुर्ण accenture team ने हे काम केले असे बोलतो...येथे कोणताही leader मी.. मी.. मी चा पाढा वाचत असेल तर ते चुकीचेच आहे.. आणि चुकीचेच समजले जाते >>> कोणी स्वतः असे credit घेतले तर चुकीचेच आहे पण मोदींनी केलेल्या आपल्या भाषणात आसा कुठेही उल्लेख नाही उलट त्यांनी भारताचाच गोडवा गायला आहे. कदाचित तुम्ही मोदींचे भाषण न ऐकता प्रतिसाद दिला असावा.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 03/27/2021 - 10:49 नवीन
<<<जसे साध्या कंपनीत project चे काम पुर्ण केल्यावर client meeting मध्ये पण आम्ही पुर्ण accenture team ने हे काम केले असे बोलतो...येथे कोणताही leader मी.. मी.. मी चा पाढा वाचत असेल तर ते चुकीचेच आहे.. आणि चुकीचेच समजले जाते >>>
थोडे अवांतर होईल पण लिहितोच. आमच्या टीमनेही एक कोणी न हातात घेत असलेला प्रोजेक्ट यशस्वी पणे पूर्ण करुन दिला. मॅनेजरने अगदी घरचे कार्य असल्यासारखे काम केले व करवुन घेतले. टीमवर्क वगैरे फंडे रोज झाडले जात होते. पण काही दिवसांनंतर ( खरेतर एका वर्षांनंतर कळले.) मॅनेजरला त्याकामाचे बक्षिस म्हणुन घसघशीत शेअर्स मिळाले होते पण इथे टीमवर्कचे पालुपद रोज झाडणार्या त्याने टीमपर्क ची वेळ येताच कॉर्पोरेट गोपनियता ह्या नियमाखाली तोंडात मीठाची गुळणी धरली होती. त्यानंतर टीमवर्क वगैरेवरचा विश्वास उडाला.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 03/27/2021 - 11:25 नवीन
बरोबर आहे मग. मी भाषण ऐकलेले नाही.. देशाचे नाव, देशाचे प्रतिनिधित्व केले असेल तर बस.. त्यावर चर्चा इतकी नसलीच पाहिजे.. मी आजच हे मुद्दे बघितले सगळे.. ---- बाकी मागे मोदी यांचे -आज का शिवाजी नामक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित झाले होते त्या पेक्षा मोदी यांनी कुठल्या वयात काय काय केले हे पाहणे रोचक ठरेल.. कारण त्यांनी चहा कधी किती वर्षे विकला, भीक मागणे व हिमालयात जाणे ते हि बरीच वर्षे (३० -३५ वर्षे असे ऐकल्याचे लक्षात आहे ) ते कधी? त्या नंतर रथयात्रेत ते कसे होते, आणि मुख्यमंत्री पर्यंत ते कसे किती वर्षात पोहचले, हिमालयातून आल्यावर लगेच तर मुख्यमंत्री झाले नसतीलच..त्याच बरोबर डिग्री आणि मास्टर डिग्री साठी त्यांनी कधी, किती वेळ अभ्यास केला ह्यावर विस्तृत पुस्तक लिहावे असे वाटते. खुपच कन्फ्यूजन होत असते कायम. कारण मोदी २००१ पासून राजकारणात मुख्यमंत्री ते आता pm असे दिसतात म्हणजे २० वर्षे झाले. मुख्यमंत्री होण्या आधी त्यांनी काही वर्षे तरी bjp चे काम केले असेलच गुजरात मध्ये का त्यांना लगेच मुख्यमंत्रीच केले गेले? समजा ते १० वर्षे तरी bjp चे काम करत असतील.. म्हणजे ३० वर्षे झाले. त्यानंन्तर ते ३० - ३५ वर्षे हिमालयात होते, म्हणजे ६०-६५ वर्षे झाले. त्यात हिमालयात असतानाच ते अन्न मागून खात होते हे मी अंदाज लावलाय.. जर भीक मागून खात होते हा अपप्रचार मानु.. पण हिमालय सोडून जर ते इतर टाइम ला अन्न मागून खात असतील तर ती वर्षे add करता येतील.. आता bjp चे १० वर्षे काम करतानाच त्यांनी बाहेरून डिग्रीज केल्या असे हि आपण माणूच काही हरकत नाहि.. त्यामुळे वेगळे वर्षे धरत नाही. ढोबळ मनाने ६०+ वर्षे येथे खर्च झालेत, एव्हड्या नंतर चौथी पर्यंत चे शिक्षण घ्यायला ९ वर्षे तरी लागली असतीलच. मग त्यांनी चहा किती वर्षे आणि कुठे विकला हा प्रश्न शिल्लक राहतोय.. अवघड आहे.. date नुसार सगळे मला वाचण्यास जास्त मज्जा येईल. त्यामुळे त्यांची भाषणे मी सध्या बघत नाही.. परंतु जर मुळ बंगलादेश भाषणता त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व, इंदिरा गांधी आणि सरकारचे प्रयत्न सांगितले असेल तर त्या भाषणाबद्दल मला आक्षेप नाहीच.. मी आपला त्यांनी मी सत्याग्रह केला असेच बोलणे केले कि काय यावरून असे केले असल्यास चुकीचे असे लिहिले आहे. कदाचीत त्यांच्या भाषणाचा विपर्यास केला गेला असेल.. जसे राहुल गांधी यांच्या आलू आणी सोना या भाषणाचा विपर्यास केला गेला तसे.. असो. चांगली गोष्ट आहे.. मोदींनी भारताचेच जे अपेक्षित आहे तेच प्रतिनिधित्व केले
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/27/2021 - 12:59 नवीन
बाकी मागे मोदी यांचे -आज का शिवाजी नामक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित झाले होते त्या पेक्षा मोदी यांनी कुठल्या वयात काय काय केले हे पाहणे रोचक ठरेल.. कारण त्यांनी चहा कधी किती वर्षे विकला, भीक मागणे व हिमालयात जाणे ते हि बरीच वर्षे (३० -३५ वर्षे असे ऐकल्याचे लक्षात आहे ) ते कधी? हे पुस्तक मोदींनी लिहिले नसून जय भगवान गोयल नावाच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या नेत्याने लिहिले आहे. चहाच्या स्टॉलवर ते शाळेत असताना काम करायचे. १९६७ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर नवराबायकोने सहसंमतीने सांसरिक जीवन न जगण्याचे ठरवून वेगळे झाले ( ज्या मोदीला बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार, असे एक कॉंग्रेस पुढारी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एकदा बोलला होता). नंतरची २ वर्षे मोदी भारतभर हिंडले (३०-३५ वर्षे नव्हे). १९७१ मध्ये ते अधिकृतपणे संघात सामील झाले. नंतर काही वर्षे अभाविपचे काम. १९८७ मध्ये अधिकृतपणे भाजपत जाण्याआधी त्यांनी बी ए आणि एम ए या पदव्या मिळविल्या. ही सर्व माहिती अनेक संकेतस्थळांंवर उपलब्ध आहे. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/27/2021 - 13:14 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद .... बाय द वे, राहुल गांधी यांना, आपल्या नेत्यांची नावे तरी माहिती आहेत का? मध्यंतरी, कुंभकर्ण असे एका नेत्याचे नाव घेतले होते...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/27/2021 - 13:28 नवीन
आहेत की. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशी अनेक नेत्यांची नावे त्यांना माहिती आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/27/2021 - 13:45 नवीन
विश्र्वेश्र्वरैय्या, नीट उच्चारता येत नाही... --------- चालायचेच, घराणेशाहीचे सुपुत्र आहेत...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/27/2021 - 14:38 नवीन
१८६५ पासून स्वतंत्र मिळेपर्यंत काँग्रेस चा अध्यक्ष दर वर्षी बदलत जायचा. आणि जवळ जवळ प्रतेक वर्षी नवीन व्यक्ती अध्यक्ष असायचा. त्या नंतर. १)१९४७ J .b.Kriplani २)१९४८- १९४९ Pattabh sitaramayya ३) १९५० Purushottam Das . ४)१९५१ - १९५६ Nehru ५)१९५७-५९ U.n.shebar ६)१९५९-६० इंदिराजी ७)१९६१-१९६४ नीलम रेड्डी ८)१९६५-६७ K.kamraj. ९)१९६८-६९ S.nijaigappa. १०)१९७०-७१ Jagjivan ram. ११)१९७२-७४ Shankar Dayal १२)१९७५-७७ Deviants Barua. १३)१९७७-७८ Karu reddy. १४)१९७८-८४ इंदिराजी. १५)१९८५-९१ राजीव जी . १६) १९९१-९६ नरसिंह राव. १७) १९९६-९८. सीताराम केसरी. ही लिस्ट आहे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या लोकांची. स्वतंत्र नंतर कुठे तुम्हाला घराणेशाही दिसत आहे. L.k adwani ११ वर्ष bjp चे अध्यक्ष होते. काँग्रेस मध्ये ११ वर्ष कोण अध्यक्ष आहे का.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/27/2021 - 16:31 नवीन
आपले काय मत आहे? पंतप्रधान पद जास्तीत जास्त वेळ, कुठल्या घराण्याच्या ताब्यात होते? कॉंग्रेस सत्तेत असो किंवा नसो, पंतप्रधान पद किंवा अध्यक्षपद जास्तीत जास्त काळ, कुठल्या घराण्याच्या ताब्यात होते किंवा आहे? बाय द वे, प्रियांका वाड्रा, अद्यापही गांधी हे आडनांवच का लावते? सुप्रिया ताई मात्र, पवार हे आडनाव न लावता, सुळे हे आडनाव लावतात... दक्षिण कोरियाचा अभ्यास करून झाला का?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/27/2021 - 19:22 नवीन
१९९८ नंतर कोण अध्यक्ष होतं हे टाकलं असतं तर तो प्रतिसादाच्या शेवटचा प्रश्न पडला नसता. शिवाय सलग १९ वर्षे वि. तुटक ११ वर्षे यातला फरकही कळला असता. ************ आताची काँग्रेस ही १९६९ ला वेगळी झालेली काँग्रेस नाहीये का? त्या काँग्रेसच्या आजपर्यंत च्या अध्यक्षांची यादी टाकता येईल का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/27/2021 - 20:03 नवीन
पण हे पण लक्षात घेतले पाहिजे राजीव गांधी च्या मृत्यू नंतर त्यांच्या परस्पर त्यांना काँग्रेस च्या नेत्यांनी काँग्रेस चे अध्यक्ष बनवले होते. त्या बिलकुल राजकारणात येण्यास तयार नव्हत्या. माझ्या मुलांना भीक मागायला लागली तरी चालेल पण मी राजकारणात पाय ठेवणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते. आणि त्यांनी अध्यक्ष पद नाकारले होते. त्या नंतर 1998 ला त्यांची काँग्रेस ची अध्यक्ष म्हणून निवड झाली ती पण काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी खूप आग्रह केल्या मुळे त्यांनी ते पद स्वीकारले. त्याच्या अगोदर काही महिनेच त्यांनी काँगेस चे सदस्यत्व स्वीकारले होते.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 03/27/2021 - 20:13 नवीन
त्याच्या अगोदर काही महिनेच त्यांनी काँगेस चे सदस्यत्व स्वीकारले होते.
सदस्य झाल्याझाल्या अध्यक्ष, ही घराणेशाही नाही? आणि त्यांची सत्ताकांक्षा तिथेच संपत नाही, आपण भारतात पंप्र होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले,आणि स्वतः एन.ए.सी. ही घटनाबाह्य संस्था निर्माण करुन सुपर पंतप्रधान झाल्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/28/2021 - 03:18 नवीन
भारतीय वैचारिक चौकटीत अडकलेल्या व्यक्तींना, आडनावाच्या वलयांत अडकून रहायला आवडते.. त्यामुळे, नेहरूंच्या नंतर, इंदिरा गांधी, मग राजीव गांधी आणि मग परमपूज्य राहुल गांधी, अशी परंपरा निर्माण झाली आहे. अद्याप तरी, राहुल गांधी यांना वंशज नाही, असता तर तो पण जन्मतःच, कॉंग्रेसचा अध्यक्ष झाला असता आणि होइलही... दक्षिण कोरियाचा अभ्यास करून झाला का? त्याच बरोबर, लगे हाथ, उत्तर कोरियाचा पण, अभ्यास करून टाका... वाचन चांगलेच असते....
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sun, 03/28/2021 - 05:17 नवीन
अद्याप तरी, राहुल गांधी यांना वंशज नाही जर राहुल गांधींचा वंशज यापुढे पण खरंच आला नाही तर उतार वयात त्यांना या बहुमूल्य कामगिरीसाठी भारतरत्न किताब द्यावा असा प्रस्ताव मी मांडतो.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 03/28/2021 - 05:33 नवीन
प्रियांका गांधी यांना दोन अपत्ये आहेत. कदाचित ते दोघेच भारताचे पुढचे तारणहार होतील, आणि ते दोघेही आपल्या आईचेच आडनाव लावण्याची शक्यता सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/28/2021 - 07:47 नवीन
गांधी यांचे वंशज आहेत ना? मग झाले...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/28/2021 - 05:45 नवीन
सहमत आहे ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/27/2021 - 09:57 नवीन

I don't mind admitting when I'm wrong. Yesterday, on the basis of a quick reading of headlines &tweets, I tweeted "everyone knows who liberated Bangladesh," implying that @narendramodi had omitted to acknowledge IndiraGandhi. It turns out he did: https://t.co/YE5DMRzSB0 Sorry!

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 27, 2021
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 03/28/2021 - 06:48 नवीन
मोदीद्वेष वा मोदीप्रेम जरावेळ बाजूला ठेवून जर विचार केला की जनसंघाच्या त्या आंदोलनात मोदी तुरूंगात गेले होते व त्या आंदोलनामुळेच तत्कालीन सरकारने हस्तक्षेप करुन बांगलादेशास स्वातंत्र्य मिळवून द्यायचे ठरवले असे मानले तरी एक प्रश्न अनुत्तरीत राहतो की मोदींचा त्या आंदोलनात भाग घेण्याचा उद्देश काय असावा? दोन शक्यता असू शकतात. १. मोदींना बांग्लादेशी (तत्कालीन पूर्व पाकिस्तानी) मुस्लिमादि नागरिकांच्या भाव-भावना, मानवाधिकार व आशा-आकांक्षांबद्दल विलक्षण कळवळा होता किंवा २. पाकिस्तानचे नाक भारताने ठेचावे म्हणून त्यांचा आटापिटा चालू होता. जर पहिले कारण असेल तर बांग्लादेशींच्या कत्तलीच्या गप्पा इथे मारणारे खरे मोदींचे विरोधक म्हणावे लागतील. जर दुसरे कारण असेल तर “बांग्लादेशींच्या भल्यासाठी मी आंदोलन करुन तुरुंगात गेलो“ हे मोदींचे म्हणणे सत्यास धरुन नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे आंदोलन झाले होते व मोदी तुरुंगात गेले होते हे सिद्ध झाले तरी विसंगती संपत नाही. बांग्लादेशात झालेली प्रचंड निदर्शने पाहता तिथल्या लोकांचा पहिल्या कारणावर विश्वास नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 03/28/2021 - 07:32 नवीन
तत्कालीन पाकिस्तानी मिलिटरी ने बांगलादेशातील हिंदू जनते वर भरपूर अत्याचार केले होते, हिंदू गावेच्या गावे जाळून टाकली तर महिलांवर अत्याचार केले. आणि सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूला पाकिस्तान असण्या पेक्षा एक नवे राष्ट्र भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कधीही फायदेशीर च आहे. त्या काळी जनसंघाणे का आंदोलन केले हे तेच सांगू शकतील, परंतु मोदींनी आपल्या भाषणात आंदोलन का केले ह्याचा उल्लेख नाही केला. >>>बांग्लादेशात झालेली प्रचंड निदर्शने पाहता तिथल्या लोकांचा पहिल्या कारणावर विश्वास नाही असे वाटते>>>> इस्त्राईल भारताचा मित्र आहे इस्त्राईल ने अतिशय कठीण काळात भारताची मदत करून सुद्दा जेंव्हा जेंव्हा इस्त्राईली पंतप्रधान भारत भेटीवर येतात तेंव्हा तेंव्हा भारतात त्यांच्या विरुध्द निदर्शने केली जातात. कारण आंदोलन करणाऱ्यांचा हेतू वेगळाच असतो. साध्याला बांगलादेश मध्ये तेच चालू आहे मोदीच काय पण bjp चा उद्या कोणीही पंतप्रधान झाला आणि त्याने बांगलादेश दौरा केला तरी थोड्या फार प्रमाणत विरोध हा होणारच.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 03/28/2021 - 07:50 नवीन
अच्छा म्हणजे फक्त बांग्लादेशातल्या हिंदूंसाठीच आंदोलन केले हे भाषणात सांगायचे टाळले तर. ओके.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 03/28/2021 - 08:38 नवीन
अच्छा म्हणजे फक्त बांग्लादेशातल्या हिंदूंसाठीच आंदोलन केले >>> ते नाही माहिती पण केले असेल तर चांगलच आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/28/2021 - 11:22 नवीन
हिंदू तितका मेळवावा...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/29/2021 - 09:09 नवीन
जरा ह्या विषयावर वाचत होतो तर काही उद्बोधक माहिती हाती लागली. बाईटातून चांगले निघते ते असे. १९७१ च्या युद्धापूर्वी काय काय झाले ते Official History of 1971 War या भारत सराकरने प्रमाणित केलेल्या कागदपत्रांमध्ये वाचता येईल. शिवाय त्या काळात खुद्द श्रीमती इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये सीआयएचा एक “मोल” होता म्हणे. त्याबद्दल NYTimes: CIA issue injected in India Election या दुव्यावर वाचता येईल. ९ ऑगस्टला भारत व सोविएत युनियन दरम्यान एक मैत्री करार झाला. (त्यामुळे पुढे अमेरिका व चीन विरोधात भारताला परराष्ट्रनैतिक आधार मिळाला). परंतु जनसंघाला हे मान्य नव्हते कारण सोव्हिएत युनियन बांग्लादेशाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळू देणार नाही असे त्यांचे मत होते. हिंदू राष्ट्रवादी व त्यांची शीतयुद्धकालीन परराष्ट्रधोरणांसंबंधी भूमिका यावर इथे एक निबंध आहे. भारताने असा करार न करता युद्धात उतरावे म्हणून जनसंघाचे हे आंदोलन केले गेले असे दिसते. त्याबद्दल एक लेख वााचण्याात आला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/29/2021 - 11:02 नवीन
https://www.google.com/amp/s/www.boomlive.in/amp/fact-check/narendra-modi-bangladesh-bjp-jana-sangh-1971-bangladesh-freedom-jana-sangh-satyagraha-12525 या लेखात खालील परिच्छेद आहेत ज्यात भारत-रशिया मैत्री कराराचा अजिबात उल्लेख नाही. in June 2015, Bangladesh had conferred Vajpayee with the prestigious 'Liberation War Honour'. With the late veteran BJP leader then unwell, Modi attended the event and received the citation on behalf of Vajpayee. The citation hails Vajpayee as a highly respected political leader and acknowledged his active role in support of the Liberation War of Bangladesh in 1971. It also mentions that the Jana Sangh, the earlier version of the now Bharatiya Janata Party, held a satyagraha from August 1- 11 which concluded with a rally on August 12, 1971, held in front of the Indian Parliament and attended by several supporters. The citation reads, "To press the demand for Indian Government's expedited support to Bangladesh's Liberation War, Jana Sangh held a Gana Satyagraha during 1-11 August and their volunteers organised a huge rally in front of the Indian Parliament House on 12 August 1971. Shri Vajpayee took a firm stand at national and international levels for the cause of Bangladesh and its striving people..." टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीतही भारत-रशिया मैत्री कराराचा उल्लेख नाही. https://m.timesofindia.com/india/modi-refers-to-jan-sangh-satyagrah-demanding-expedited-indian-support-to-bangladesh-liberation-war/amp_articleshow/81720510.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/28/2021 - 10:41 नवीन
दुसरे कारण असेल तर “बांग्लादेशींच्या भल्यासाठी मी आंदोलन करुन तुरुंगात गेलो“ हे मोदींचे म्हणणे सत्यास धरुन नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे आंदोलन झाले होते व मोदी तुरुंगात गेले होते हे सिद्ध झाले तरी विसंगती संपत नाही. काहीही समजा. दरम्यान निलंजय मुखोपाध्याय या लिब्रांडूचा खालील लेख व त्यात अनेक ठिकाणी मोदींचा उल्लेख केला आहे ते परिच्छेद वाचा. https://economictimes.indiatimes.com/blogs/et-commentary/how-emergency-turned-pm-narendra-modi-undercover-activist/?fbclid=IwAR0FbJSolP3Uo2WIGQs5yKpchMn8uC_C5YuFWGADYWAhOYtw5tH-z4Qk2WM
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/28/2021 - 10:43 नवीन
आंदोलनामागील कारणे वाचा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=870925187098655&id=100025435445131
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 03/28/2021 - 07:34 नवीन
ते "श्री मोदी यान्चे हस्ताक्षर "हा सन्देश कायप्पावर फिरतोय ,तो खरा आहे का ओ? (भारी आहे अक्षर)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/28/2021 - 07:46 नवीन
कोठे आहे ते हस्ताक्षर? फोटो टाका जमल्यास.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 03/28/2021 - 08:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/28/2021 - 10:34 नवीन
???
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 03/28/2021 - 11:39 नवीन
एक वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकार नी महत्वाचे कायदे बदल करण्याचा सपाटा लावला आहे. एक तर देश संकटात आहे देशात corona चे थैमान चालू आहे. लोकांवर अनेक निर्बंध आहेत संचार बंदी सारखी अवस्था आहे . आणि सरकार चे काय उद्योग चालू आहेत. १) तीन शेती विषयक कायदे चुपचाप पारित केले.. २) दिल्ली मध्ये मुख्यमत्र्यां चे अधिकार कमी करणारा कायदा गुपचूप पारित केला. ३)कामगार कायदे बदलून नवीन कायदा पारित केला.. ह्या सर्व कायद्याची ना माहिती लोकांनी दीली ना सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर चर्चा झाली. मन की बाते मध्ये बिनकामाचे डोस देण्याचे फक्त काम चालू आहे. सरकार काय काय दिवे लावत आहे त्या विषयी एक शब्द न बोलता बाकी सर्व पंतप्रधान बोलत आहेत. एवढं लपून छपून देशाचा कारभार आता पर्यंत कोणीच केला नाही. चोरुन सरकार चालवायची काय गरज आहे. लोकांवर जी अनंत बंधन आहेत corona मुळे ती बंधन पहिली हटवा आणि नंतर कायदे बदल करा. किती राज्यात किती लोक रस्त्यावर येतील ह्याचा नमुना बघायला मिळेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/28/2021 - 13:11 नवीन
परमपूज्य राहुल गांधी आणि जाणते राजे शरद पवार यांना हवेच होते... 2. राजधानीत कधीच बाजारबुणगे नसावेत, हे धोरण कमीअधिक प्रमाणात, आधी पण पाळत होतेच आणि ते योग्यच आहे. 3. बर्याचशा खाजगी कंपन्या, कंत्राटी कामगार नेमतात, ह्या कायद्यांमुळे, कंत्राटी कामगारांचे आर्थिक आणि शारिरीक शोषण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही लिहीत रहा, आमचा अभ्यास पक्का होत जातो...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा