चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे.
- भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला.
- फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे).
- आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती.
- सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे.
- कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे.
- येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले.
- मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे.
- नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली.
- एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला.
- अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली.
विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo
बाकी मागे मोदी यांचे -आज का शिवाजी नामक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित झाले होते त्या पेक्षा मोदी यांनी कुठल्या वयात काय काय केले हे पाहणे रोचक ठरेल.. कारण त्यांनी चहा कधी किती वर्षे विकला, भीक मागणे व हिमालयात जाणे ते हि बरीच वर्षे (३० -३५ वर्षे असे ऐकल्याचे लक्षात आहे ) ते कधी?हे पुस्तक मोदींनी लिहिले नसून जय भगवान गोयल नावाच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या नेत्याने लिहिले आहे. चहाच्या स्टॉलवर ते शाळेत असताना काम करायचे. १९६७ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर नवराबायकोने सहसंमतीने सांसरिक जीवन न जगण्याचे ठरवून वेगळे झाले ( ज्या मोदीला बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार, असे एक कॉंग्रेस पुढारी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एकदा बोलला होता). नंतरची २ वर्षे मोदी भारतभर हिंडले (३०-३५ वर्षे नव्हे). १९७१ मध्ये ते अधिकृतपणे संघात सामील झाले. नंतर काही वर्षे अभाविपचे काम. १९८७ मध्ये अधिकृतपणे भाजपत जाण्याआधी त्यांनी बी ए आणि एम ए या पदव्या मिळविल्या. ही सर्व माहिती अनेक संकेतस्थळांंवर उपलब्ध आहे. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.दुसरे कारण असेल तर “बांग्लादेशींच्या भल्यासाठी मी आंदोलन करुन तुरुंगात गेलो“ हे मोदींचे म्हणणे सत्यास धरुन नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे आंदोलन झाले होते व मोदी तुरुंगात गेले होते हे सिद्ध झाले तरी विसंगती संपत नाही.काहीही समजा. दरम्यान निलंजय मुखोपाध्याय या लिब्रांडूचा खालील लेख व त्यात अनेक ठिकाणी मोदींचा उल्लेख केला आहे ते परिच्छेद वाचा. https://economictimes.indiatimes.com/blogs/et-commentary/how-emergency-turned-pm-narendra-modi-undercover-activist/?fbclid=IwAR0FbJSolP3Uo2WIGQs5yKpchMn8uC_C5YuFWGADYWAhOYtw5tH-z4Qk2WM