चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-court-pronounces-ariz-khan-guilty-of-killing-delhi-police-inspector-mohan-sharma-101615193149179.html
याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seeing-batla-house-encounter-images-salman-khurshid-in-azamgarh-571479
त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gandhi-on-batla-house-encounter-issue-news-india-14271.html इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
सध्या कोणत्याही वाहिन्यांवर आंदोलनविषयी बातम्या दाखवल्या जात नाहीत. सरकार विरोधात जिथे कुठे काही चाललेले असेल त्याबाद्लची माहिती, चित्रण, दाखवायचे नाही. असे केंद्र सरकारचे धोरण आता हळूहळू भारतियांच्या लक्षात येत आहे. एका मोठ्या लोकशाहीच्या देशात होणारी भारतीयांची होणारी गळचेपी महाभयंकर आहे, पुढे काय काय होईल याची कल्पना आज तरी अशक्य आहे.महाराष्ट्रात अंदाजपत्रक, मनसुख हिरेन अशी चविष्ट प्रकरणे सुरू असताना परराज्यातील दलालांचे विझत आलेले बेचव आंदोलन वाहिन्यांंनी का दाखवावे? दाखविल्यास प्रेक्षक वर्ग किती मिळणार? हे आंदोलन एका विशिष्ट राज्यातील मुठभर दलालांचे आहे हे केव्हाच सिद्ध झाल्याने त्याविषयी ऐकण्यात, पाहण्यात कोणालाही रस नाही ही वस्तुस्थिती आहे. बाकी सरकारविरोधी काहीही दाखविण्यास बंदी घालून भारतीयांची गळचेपी होत असेल तर मराठी व इतरभाषिक अनेक वाहिन्यांवरून मोदींंना व केंद्र सरकारला झोडपणे कसे सुरू आहे? का अशी बंदी, गळचेपी वगैरे तुमच्या मनाचे काल्पनिक खेळ आहेत? आपल्याकडून खुलासा होणार नाही याची खात्री आहेच.सामान्य माणसाच्या डोक्यात हे शिरूनही त्याचा मोदी आणि त्यांच्या समर्थकांचा बादरायण संबंध जोडणे याला फक्त आणि फक्त मोदीद्वेषज्वर कारणीभूत आहे असे मला वाटते.+ १