जाधवगड,जेजुरी व मयुरेश्वर एक धावती भेट
बरोब्बर एक वर्षांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारीला मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने मोरगावला जाणे झाले होते. लग्नाची वेळ थोडी वेगळीच होती. ना सकाळचा ना संध्याकाळचा असा दुपारी ४ वाजून ११ मिनिटांचा मुहूर्त होता. मुंबईहून गाडीने साडे तीन चार तासात पोहचणे शक्य होते. पण असाही संपूर्ण दिवस तर जाणारच होता म्हणून आमच्याबरोबर येणाऱ्या स्नेह्यांशी चर्चा करून सकाळी लवकरच निघून वाटेत जमेल ती ठिकाणे बघत मोरगावला पोहचायचे ठरवले.
मार्ग ठरला नवी मुंबई-पुणे-सासवड-जाधवगड-जेजुरी-मोरगाव व रात्री परत माघारी. सकाळी सातला मुलीने लॅपटॉपवर लॉग आउट करत रात्रपाळी संपवली आणि जाहीर केले की केवळ लग्नाला न जाता वाटेत पर्यटन स्थळे बघणार असाल तर मीही येते. तासाभरात तिचीही तयारी करून सकाळी आठला प्रवासाला सुरुवात केली. खालापूर टोल नाक्याजवळ नाष्टा करून पुढे निघालो. पुण्याला वाकडच्या पुढे गेल्यावर गुगल मॅपवर मरीआई घाट मार्गे सासवडला जाण्याचा कमी वेळाचा मार्ग दिसला . मुख्य रस्त्यापासून घाटाकडे जाणारा रस्ता सुरुवातीला थोडा खराब होता पण घाट व त्यापुढे खूपच चांगला होता. घाटाच्या पलीकडे एका रसवंतीवर रस घेऊन पुढे निघालो.
रसवंतीवाल्याची परी
थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी फुलांची शेती केलेली दिसली. मस्त बहरलेली फुले बघितल्यावर गाडीला ब्रेक लावावेच लागले. राखणदार कोणीही नव्हते. विचारल्याशिवाय शेतात कसे जायचे? पण फुलांसोबत फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. फुलाची एक पाकळीसुद्धा तोडायची नाही व कुठलेही रोप पायदळी तुडवायचे नाही अशी स्वतःलाच ताकीद देत घुसखोरी केलीच.
सासवडजवळील जाधवगड बघायचे ठरविले होते. पिलाजीराव जाधवांनी इ.स. १७१० मध्ये बांधलेल्या या ऐतिहासिक गडाचे एका हॉटेलमध्ये रूपांतर केल्या गेले असून महाराष्ट्रातील हे एकमेव हेरिटेज हॉटेल आहे. हा किल्ला कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सला देण्यात आलेला असून लग्न समारंभ वगैरेसाठी तो इ.स.२००८ पासून भाडे तत्वावर दिला जातो.
मुख्य रस्त्यातून गडाकडच्या रस्त्याकडे वळण घेतानाच दोन्ही बाजूला दोन चौक्या दिसतात ज्यावर मराठी व इंग्रजी असे जाधवगडाचे बोर्ड दिसतात व त्यावर हॉटेलचे ब्रीद वाक्य आहे "लढ, झगड, आगे बढ..... "
गडापाशी पोहचताच मावळ्याच्या वेशातील एक जण तत्परतेने गाडीजवळ आला व तुम्ही उतरा मी गाडी कुठे लावायची ते बघतो असे म्हणून गाडी ताब्यात घेतली. गड पाहण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपयाचे कुपन घ्यावे लागते असे कळले होते. आम्ही काही पायऱ्या चढून गडाच्या मुख्य दरवाजातील स्वागत कक्षाकडे निघालो.
लांबूनच आम्हाला पाहिल्यावर तुतारी वाजवून कोणीतरी येत असल्याची वर्दी दिल्या गेली.
मुख्य दरवाज्यापाशी पोहचल्यावर नगारा वाजवण्यास सुरुवात झाली.
सुवासिनी ओवळण्याचा तबक हातात घेऊन उभ्या होत्या. त्यांनी ओवाळून आमचे स्वागत केले. खूपच वेगळा अनुभव होता आमच्यासाठी.
प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर दोन्ही बाजूस देव्हड्या आहेत. येथे काही पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत.
यापुढे मात्र थोडी निराशा झाली. कुठल्यातरी शाही कुटूंबातील लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल व किल्ला चार दिवसासाठी आरक्षित केलेला असल्याने किल्ल्याच्या आतील भागात प्रवेश बंद होता. आम्ही लांबून आलो आहोत निदान थोडे तरी पुढे जाऊन बघू द्या अशी विनंती केल्यावर आम्हाला विनाशुल्क काही भाग बघायला परवानगी मिळाली .पाच जणांचे मिळून २५००/- वाचले यातच आनंद मानत जेव्हडे मिळाले तेव्हडे खूप झाले म्हणत परत फिरलो.
सासवडला जेवण करून तीन वाजता जेजुरीला पोहचलो. वेळ कमी होता. अक्षरशः पळतच पायऱ्या चढून खंडोबाचे मंदिर गाठले. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मंदिर तीन शतकांपूर्वी बांधलेले असून येथील दीपमाळा खूप सुंदर आहेत. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. खूप सुंदर मंदिर आहे.
जेजुरी गडावर शंकर व पार्वती हे खंडोबा व म्हाळसेच्या रूपात असल्याने जेजुरीला येऊन नवविवाहित दाम्पत्यांनी देवकार्य करण्याची प्रथा अनेक पिढय़ांपासून चालू आहे.
अशी अनेक जोडपी देवाला भंडारा उधळीत होती.
वरून दिसणारी जेजुरी
दर्शन घेऊन पायथ्याशी पोहचेपर्यंत चार वाजले होते. एका हॉटेलवाल्याला चहाची ऑर्डर दिली व विनंती करून बाजूच्याच खोलीत लग्नासाठीचे कपडे बदलण्यासाठी परवानगी मिळवली . अवघ्या दहा मिनिटात पुढे निघालो . जेजुरी ते मोरगाव रस्ता अगदी चकाचक. २०-२५ मिनिटात मोरगावला लग्नाच्या ठिकाणी पोहचलो. वरात हॉलच्या दरवाज्याशी पोहचतच होती. तासाभरात लग्न समारंभ आटोपला. लग्नाला हजेरी लावल्याचा पुरावा म्हणून नवदाम्पत्याबरोबर एक ग्रुप फोटो काढून घेतला. मैत्रिणीला म्हटलं तू आता खूप गडबडीत असशील तेव्हा नंतर सवडीने बोलू आणि निरोप घेतला.
लगेच मयूरेश्वराच्या मंदिराकडे धाव घेतली. कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या मोरगाव येथे हे मंदिर आदिलशाही कालखंडात बांधलेले आहे. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर म्हणजे एक गढीच आहे. मंदिराला चारही उंच संरक्षक भिंत आहे. तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठे दगडी कासव नजरेस पडते. मंदिराच्या समोरच एक नंदिचीही मूर्ती आहे. असे सांगितले जाते कि शंकराच्या मंदिरासाठी मूर्ती रथातून नेली जात असताना येथे रथाचे चाक तुटले त्यामुळे मूर्त्ती येथेच ठेवण्यात आली. अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून श्री मयुरेश्वर ओळखला जातो. सुदैवाने आम्ही पोहचलो तेव्हा गर्दी अजिबात नव्हती. आरामात दर्शन झाले.
सात वाजले होते. मंदिराच्या बाहेर चहा घेतला.
जय मयुरेश्वर, जय मल्हार, "लढ, झगड, आगे बढ....." म्हणत परतीचा प्रवास सुरु केला व रात्री साडे अकराला घरी पोहचलो आणि लेकीने रात्रपाळीसाठी लॉगिन करत ऑफिसकाम सुरु केले.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments