Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/27/2021 - 11:45
🗣 184 प्रतिसाद
आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही. अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत. लोकसभेतील, ह्या वरील व्यक्तींची भाषणे ऐकलीत तर, प्रचिती नक्कीच येईल. माझ्या मते, इतर पक्षांकडे इतके सक्षम उमेदवार नाहीत. तुमच्या मते, पुढील निवडणूकीत, इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी, मोदींच्या इतका सक्षम नेता आहे का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61345 views

🗣 चर्चा (184)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/28/2021 - 05:16 नवीन
बजाज म्हणाले तसे, देशाला न मिळालेले ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत. हे वाचून खूप हसायला आले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 05:26 नवीन
शिकला सवरलेला माणूस, एकांगी विचार कसा काय करू शकतो? आपलेच कुठेतरी चुकत आहे. माध्यमांचा इतका पगडा जर, सुशिक्षित माणसांच्या मनावर होत असेल तर, आपलेच चुकत आहे...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 05:51 नवीन
तुमचा काही तरी गोंधळ होत आहे . तुमच्या मताशी जे सहमत होत नाहीत. किंवा तुमच्या मनात असलेल्या bjp aani मोदी च्या प्रतीमे विरूद्ध कोणी सत्य मत व्यक्त केले की. एक त्या व्यक्ती ला अडाणी म्हणायचे किंवा शिकला सवरला असून काही कळत नाही अशी कमेंट करायची. ही सर्व मानसिक रोगाची लक्षणे आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 05:53 नवीन
स्वतः वरून इतरांची परिक्षा करणे, हे नैसर्गिक आहे...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 01/28/2021 - 06:43 नवीन
For your kind information, माझ्यावर माध्यम किंवा बातम्यांचा प्रभाव नाहीये, माझे ते मत आहे.. आणि मी कुठलेही it cell च्या मेसेज वर, भडकावू news वर विश्वास ठेवत नाही.. आणि एकांगी विचार तुमचा हि आहेच, फक्त तुम्हाला तो सार्वभौम वाटतो आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 07:23 नवीन
दुसरा पर्याय कोणता?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 07:32 नवीन
आऊल गांधी. दुसरा कोण. :))
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 01/28/2021 - 07:44 नवीन
तुमचे कसे झाले आहे, पर्याय कुठला हा प्रश्न तुम्ही विचारता, पण पर्याय नाहीयेच हेच मनात बिंबवून ठेवलेले आहे. मग कोणी वेगळे उत्तर दिले कि शिकले सवरलेले आणी फलाना सुरु करायचे..कोणीही इतर म्हणाले तरी नाव सांगा म्हणायचे.. किंवा विनोद फलाना बोलायचे. आणि पुढे काय, कोण? यापेक्षाहि सद्य परिस्थिती मध्ये मोदींना पर्याय नाही असे पाहण्यापेक्षा मला वयक्तिक अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या सारख्या उत्कृष्ट माणसांनंतर असला माणुस पंतप्रधान निवडला गेला आहे त्याचेच जास्त दुःख वाटत आहे... एक जागरूक नागरिक म्हणुन जे चूक ते चूक, असे न म्हणता वेसण घातलेल्या बैला सारखे कोणाला तरी आपला मालक समजुन त्याने म्हणेल ती पूर्व दिशा आणि तोच सर्वात कल्याणकारी असले समजणे मला मुळीच आवडत नाही... प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, तुम्हाला पुढे पर्याय नाही वाटत असेल, तुमच्या मनाने ते योग्य असेल, पण मला हाच पर्याय चूक वाटत आहे, ते माझे मत आहे... आणि त्याच्यावर मला कळत नाही किंवा मीडियाचा प्रभाव असे बोलणे तुम्हाला शोभत नाही.. दुसऱ्यांच्या विचारांचा respect करा.. तर तुमच्या विचारांचा हि विचार केला जाईल.. नाही तर असे १००० धागे रंगवले तरी त्यांचा काडीचाही उपयोग नाही...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 07:52 नवीन
जातीयवादी शरद पवार हा पर्याय कसा वाटतो ? मला तर अगदी सक्षम पर्याय वाटतो. तुमचे मत काय ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 08:14 नवीन
दुसरा पर्याय कोणता? एका वाक्यात प्रश्र्न आहे... तुमचे पर्याय सांगा ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/28/2021 - 09:56 नवीन
त्यांनी आधीच सांगितलंय की. आठवले, राहुल, गडकरी असे कोणीही त्यांना चालणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 11:24 नवीन
आठवले होऊ शकत नाहीत, कारण, तितके खासदार, त्यांना मिळणार नाहीत. राहुल होऊ शकतात .... बटाट्या पासून सोने, अशा अफाट कल्पना ते नक्कीच मांडू शकतात. शिवाय, थायलंड आणि इटली मधून, राष्ट्र कारभार पण हाकू शकतील. गडकरीच कशाला, कुठलाही मराठी माणूस, कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाही.... आपलीच माणसे घात करतात ...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 01/30/2021 - 10:07 नवीन
बटाट्या पासून सोने, अशा अफाट कल्पना ते नक्कीच मांडू शकतात. गटारात पाईप टाकून इन्स्टंट गॅस काढणे विसरलात बहुतेक! :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 01/28/2021 - 07:31 नवीन
सहमत _/\_ पण त्यांनी एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 01/29/2021 - 16:06 नवीन
त्यांच्या पुढे अमेरिका , उत्तर कोरिया ,चीन पाकिस्तान,, तुर्कस्तान सर्वच लोळण घालतील हे नक्की ! हसून हसून गडबडा लोळायला हवे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/28/2021 - 04:04 नवीन
मोदीना भारतात एकच पर्याय आहे तो म्हणजे " शरद पवार साहेब " ! इतके गारूड कुणाकडेही नाही ! हे उपरोधाने लिहिलंय असं मी गृहीत धरतोय. उपरोध नसेल तर हा मोठा विनोद आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 05:22 नवीन
झुकानेवाला चाहिए .... शरद पवार, गेली 35-40 वर्षे राजकारणात आहेत. कधीच एकहाती सत्ता घेऊ शकले नाहीत. फक्त फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत असतात. वसंतराव नाईक ते पृथ्वीराज चव्हाण, ही यादी खूप मोठी आहे. प्रचंड बुद्धीवान माणूस, धरसोड वृत्ती मुळे, लोकांची विश्र्वासार्हता गमावून बसतो.... ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे, शरद पवार...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 06:07 नवीन
मोदी हे उत्तम,सक्षम राज्यकर्ते आहे असे मानले तर मग bjp ची पक्षाची यंत्रणा मोदी विरुद्ध वातावरण निर्माण करत आहेत असे म्हणावे लागेल. कोणतेच तथ्य नसलेले सरकारी कामाविषयी समाज माध्यमावर पोस्ट करणे . हे तर पक्ष च करत आहे ना. नको ते दावे समाज माध्यमावर करणे जे अतिशय निर्बुद्ध असतात. हे पण पक्षाची यंत्रणा च करत आहे. म्हणजे bjp मधूनच मोदी ना विरोध आहे. शक्य होईल तेवढी त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम bjp samarthak च करत आहेत. राम मंदिर साठी वर्गणी गोळा करण्याचे अवडंबर माजवणे. पाकिस्तान वर लष्कर नी केलेल्या कारवाई चे अतिशोक्ती युक्त वर्णन करणे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या हे सत्य असून सुद्धा अर्थव्यवस्था चांगली आहे असे च चुकीचे रेटून बोलणे, कोणत्या ही आंदोलन करणाऱ्या लोकांना पाकिस्तानी हस्तक,किंवा अतिरेकी ठरवणे. Bjp virudh जो बोलेल त्याला देशद्रोही ठरवणे. स्वतंत्र नंतर खडतर स्थिती असताना सुद्धा ज्या विविध राज्यकर्त्या नी देशाला योग्य वळण दिले त्यांचे चरित्र हनन करणे. हे सर्व उद्योग bjp च्या पक्षांची यंत्रणा च करत आहे . आणि ह्या मुळे खरेच मोदी चांगले असले तरी त्यांची प्रतिमा सामान्य लोकांच्या मनातून उतरत आहे. पुढच्या निवडणुकीत यश मिळाले तरी मोदी नको अशी स्थिती निर्माण करण्यासाठी च पक्ष हे करत असेल अशी शंका येते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 06:09 नवीन
तुमच्या मते, दुसरा पर्याय कोणता?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 06:21 नवीन
130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात खूप पर्याय आहेत. अनेक व्यक्ती आहेत ज्या देश उत्तम चालवू शकतात . तरुण लोकांच्या हातात देश देणे आता गरजेचे आहे. वलय नसलेल्या पण बुद्धिवान नेत्याला पंतप्रधान पद दिले तर ते उत्तम देश चालवतील प्रतेक पक्षात अशी हुशार, तरुण मंडळी आहेत . आणि ती सक्षम पण आहेत. ज्यांच्या भोवती प्रसिध्दी च वलय आहे फक्त त्यांचाच तुम्ही विचार करत आहात. त्या मुळे देशातील सर्व खासदार,आमदार,तुम्हा ला नालायक दिसत आहेत. आणि हे तुमचे मत साफ चुकीचे आहे. स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/28/2021 - 08:13 नवीन
Rajesh188 कोव्हीड नंतर पुणे महापालिकेतील उंदीर मारायचा विभाग उघडलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 01/28/2021 - 09:32 नवीन
>>> स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.? पुढच्या निवडणुकीत तुंही उभे राहा, बघूया पंतप्रधान होता येते का ते..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 06:21 नवीन
130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात खूप पर्याय आहेत. अनेक व्यक्ती आहेत ज्या देश उत्तम चालवू शकतात . तरुण लोकांच्या हातात देश देणे आता गरजेचे आहे. वलय नसलेल्या पण बुद्धिवान नेत्याला पंतप्रधान पद दिले तर ते उत्तम देश चालवतील प्रतेक पक्षात अशी हुशार, तरुण मंडळी आहेत . आणि ती सक्षम पण आहेत. ज्यांच्या भोवती प्रसिध्दी च वलय आहे फक्त त्यांचाच तुम्ही विचार करत आहात. त्या मुळे देशातील सर्व खासदार,आमदार,तुम्हा ला नालायक दिसत आहेत. आणि हे तुमचे मत साफ चुकीचे आहे. स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 07:23 नवीन
तुमच्या कडे दुसरा पर्याय नाही...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 07:36 नवीन
तरुण म्हणजे कोण, राहुल की रेहान गांधी/वाड्रा ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 07:35 नवीन
किती ही आपटलित तरी २०२९ पर्यंत तुमच्या नशिबी मोदीच आहेत. तेंव्हा मोदींच्या नावाने आणखी खोटा प्रचार करा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 07:46 नवीन
कारण, इतर पक्षांकडे सोडा, सामान्य माणसाला देखील, दुसरा पर्याय सापडत नाही. अद्याप तरी कुणीही, दुसरा पर्याय दिलेला नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 08:04 नवीन
बाकी आमच्या कडे खूप पर्याय आहेत देश उत्तम चालवतील असे . तुम्ही मात्र मोदी कोषातून बाहेर येवू नका.
  • Log in or register to post comments
व
वडगावकर गुरुवार, 01/28/2021 - 11:09 नवीन
एक अगदी संतुलित मत मांडायचा प्रयत्न करतोय , बघा जमतोय का  तुम्ही ,आम्ही मोदी ना काहीही म्हणालो तरी सामान्य जनता (कुणी त्यांना मंद भक्त ,मोदी भक्त काहीही म्ह्णूद्या ) जो पर्यंत स्वयंस्फूर्ती ने आपली मते त्यांच्या झोळीत घालतील तो पर्यंत त्यांना पर्याय नाही. (आज की ग्यान गुटी : कोणताहि समीक्षक एखादा पिक्चर हिट करू शकत नाही त्याला हिट करणारी असते ती चार चार वेळा तिकीट काढून तो पिक्चर बघणारी पिटातली पब्लिक ) 
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 07:53 नवीन
तो राज्यकारभार अत्यंत सुमार दर्जा च आहे . अगदी आदित्य ठाकरे,रोहित पवार, किंवा कोणी ही तरुण खासदार मोदी पेक्षा उत्तम देश चालवतील. अगदी राहुल गांधी सुद्धा उत्तम देश चालवू शकतात . व्यक्ती म्हणून राहुल गांधी मोदी पेक्षा खूप उत्तम आहेत. मायावती,अखिलेश यादव, शिंदे राज घराण्याचा आताच वारस jyotitndra राजे शिंदे. अरविंद केजरीवाल,खूप आहेत . फक्त त्यांना त्या पदावर बसवा . किती तरी उत्तम प्रकारे देश चालवतील ते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 08:02 नवीन
राष्ट्रीय पातळी वरचा नेता पण नको आणि राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष पण केंद्रात सत्तेमध्ये. मोदी पण राज्य पातळीवर चे च नेते होते . अगदी ग्राम पंचायत जरी उत्तम चालवणारा नेता असेल तेरी तो पंतप्रधान पद सुद्धा उत्तम रित्या सांभाळू शकतो. लोकांना उत्तम राज्यकारभार म्हणजे काय हे चांगले समजते. जेव्हा सहज क्षमते नुसार बिलकुल पैसे न भरता उत्तम कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. जेव्हा सरकारी यंत्रणा सामान्य लोकांची काम वेगात करतात आणि 1 रुपया पण लाच घेण्याची हिम्मत करत नाहीत. लोकांची नोकरी वर पिळवणूक होत नाही. अशी खूप लगेच दिसून येणारे बदल झाले की राज्य कारभार उत्तम चालला आहे हे लक्षात येते. मोदी आल्यानंतर काडी च पण फरक दिसून येत नाहीं पहिल्या सारखाच बेशिस्त ,बेकायदा काम पूर्ण क्षमतेने चालू आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 08:06 नवीन
मोदी आल्यानंतर काडी च पण फरक दिसून येत नाहीं -- आता तुम्हाला टमरेल घेऊन रेल्वेट्रकवर बसायची आहे सवय. त्याला मोदी काय करणार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/28/2021 - 08:15 नवीन
अगदी ग्राम पंचायत जरी उत्तम चालवणारा नेता असेल तेरी तो पंतप्रधान पद सुद्धा उत्तम रित्या सांभाळू शकतो. अण्णा हजारे याना पंतप्रधान करायचे का? एकदम गल्ली ते दिल्ली मंत्री काम करत नसेल तर अण्णा उपोषण करून त्यांची आत्मशुद्धी आणि चित्तशुद्धी करून देतील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 08:20 नवीन
शाहीनबाग दंगल आणि शेतकरी आंदोलन, देशभरात चालू होईल.... चालेल का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 08:16 नवीन
तुमच्या कडे दुसरा पर्याय नाही .... असता तर,सांगीतला असता.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 01/28/2021 - 09:20 नवीन
समजा पर्याय म्हणून १८८नी एक रँडम नाव सांगितलं तर ? उदा- रावसाहेब चिंगभूतकर हे वाश्याड गावातील एक अतिशय ज्ञानी मनुष्य आहेत. लोकांची त्यांना उत्तम पारख आहे. समाजकल्याणामध्ये वाश्याड गावातील सगळी जाणती मंडळी चिंगभूतकर साहेबांचे नाव ऐकून आहेत. चिंगभूतकर साहेब हे पंतप्रधान होऊ शकतात. ते सुद्धा अविवाहित आहेत. ह्यावर तुमचे काय मत ? (जोक असाईड, मोदींशीवाय कोणीही पंतप्रधान होऊ शकण्याच्या लायक नाही असे वाटत असल्यास तुमचे मत भयंकर हास्यास्पद आहे.)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 01/28/2021 - 15:16 नवीन
रावसाहेब चिंगभूतकर हे वाश्याड गावातील एक अतिशय ज्ञानी मनुष्य आहेत. असं त्यांचं स्वतःचं मत आहे ( आणि काही चेल्या चमच्यांचं) त्यांना कोणी कुत्रं सुद्धा विचारत नाही. श्री मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी याना साधारण ६० कोटी लोकांनी २०१९ मध्ये मत दिलं आहे. ६० कोटी लोकांच्या एकत्रित शहाणपणा पेक्षा आपणच शहाणे समजणारे अनेक भंपक लोक आहेत त्यात रावसाहेब चिंगभूतकर यांच्या सारखे लोक पैशाला पासरी मिळतील
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 15:31 नवीन
सहमत आहे... राहुल गांधी, यांच्या पेक्षा, हुषार आहेत का?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 01/29/2021 - 16:58 नवीन
भयंकर हास्यास्पद... तुमच्या दृष्टीने. एक साधा प्रश्न आहे.. मोदींना पर्याय सांगा... आजच्या घडीला तो नक्की दिसत नाही. अतिशय खोलात जाण्याची इच्छा नाही, तरी लोकांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये, प्रत्येक नागरिकाचा बँक खाते असावं असं या आधी कोणालाही का वाटलं नाही ...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 01/30/2021 - 05:46 नवीन
एफ डी ची विमा सुरक्षा मर्यादा ५ लाख करणे जेनेरिक औधधाविषयी प्रसार करणे एल ई डी दिव्याविषयी मार्गदर्शन करणे आयकर परतावा लवकर मिळावा म्हणून प्रयत्न आयकर जास्तीत जास्त लोकांनी भरावा यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन चे प्रयत्न रस्ते निर्माणातील वाढ पी एम ऑफिस ने सामान्य लोकांच्या प्रशासकीय विषयक तक्रारीची दखल घेतल्याच्या उदाहरणात वाढ काही अजून ना जमलेले सरकारी बँकांतील करबुडव्यावर कारवाई निर्णाय स्वरूपात राजकीय लोकांसाठी त्वरित गुन्हा शाबीत होणे वा निर्दोष सुटण्याची सोय ( उदा कलमाडी ,खडसे,,भुजबळ ई केसेस ,,) महागाईवर नियंत्रण पेट्रोल किमती कमी करणे . काही बाबतीत मोदी फारच मौन धारण करतात असे अलीकडे आढळून आले आहे ! त्यामुळे त्यांच्या विरोधकांना गरसमज पसरवण्यास मदत मिळते .एक उदा देतो. रोजगार निर्मिंती झाली नाही असे विरोधक म्हणतात पण पी एफ खात्यांच्या संख्येत वाढ झाली असे ते खाते म्हणते यात ही माहिती खरी की खोटी याचे निवेदन थेट मोदीकांडून येणे अपेक्शित कारण भारत देश प्रणाली केंदित नसून तो जास्त व्यक्तिकेंद्रित आहे म्हणून ! ( अलीकडेच एका " साहेबांच्या " फोनने क्रिकेट खेळाडू क्वॅरंटाइन ना होताच घरी गेले ना ? ) .
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 05:52 नवीन
ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे, त्याला मतदान न करणे... मी तरी अशा व्यक्तीला मतदान करत नाही आणि करणार पण नाही ...
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 01/28/2021 - 08:42 नवीन
पंतप्रधानपदाच्या बाबतीत तरी, भारतात नेहमीच व्यक्तीपूजेची परंपरा राहिलेली आहे. ते चूक की बरोबर ही वेगळी बाब. तटस्थपणे लोकांची मानसिकता बघीतली तर दिसेल की, - लोकांना जी व्यक्ती नेता म्हणून काम करू शकेल असा विश्वास वाटतो, त्यांनाच ते मँडेट देतात. ते खरोखर किती काम करतात आणि किती प्रपोगंडा ह्याकडे सरळ दुर्लक्ष केल्या जातं. - लोकांची सामुहिक स्मरणशक्ती फार कमी असते, त्यामुळे कोणत्याही नेत्याला आपला ब्रँड हा लोकांपुढे सतत वाजवत रहावा लागतो. राहुल गांधी हा सक्षम पर्याय आहे किंवा नाही याबद्दल बहुतांश लोकं नाहीच म्हणतात. पण पर्याय म्हटलं की राहुल गांधींचं नाव समोर तरी येतं, याला ब्रँडींग म्हणतात. - काम करण्याचा [केले / न केले हा भाग अलाहिदा] डंका वाजवायचा की राजकीय कुरघोड्यांचा हे ज्याने-त्याने त्याचे स्वत:चे ठरवायचे असते. उद्धव ठाकर्‍यांनी वर्षभरात काय कामं केलीत याचा लेखाजोखा स्वतःहून दिला आणि त्यावर लोकांचा विश्वास बसला, तर त्यांचाही ब्रँड नीट वाजेल. मोदीच्या बाबतीत एक आरोप नेहमी केला जातो. ते प्रपोगंडा खूप करतात, त्यामानानं काम अजिबातच करत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणे प्रपोगंडा करण्यात काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही. आणि काम जर केलेले नसेल तर, ते लोकांना पटेल अशा पद्धतीने, जनमानसात पोहोचवणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. होतंय काय की, विरोधासाठी विरोध करतांना, सगळे विरोधी पक्ष त्यांची लोकांमधली विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत. अगदी ते सत्य जरी सांगत असतील तरी, लोकं साशंक नजरेनंच पाहतात. जर मोदींच्या नावानं एक अ‍ॅप तयार होऊ शकते तर ते बाकी नेत्यांच्या नावानंही होऊ शकतं की. पण लोकं बघतील किती हा प्रश्न आहे. कामं करण्यासाठी प्रशासनावर मजबूत पकड लागते. ते मॅनेजमेंट स्कील आहे. अजित पवार, नितिन गडकरी ही काही उदाहरणं म्हणता येतील. फडणवीसांनी वकिलीची प्रॅक्टीस केली तर ती जास्त चांगली चालेल अशा पद्धतीने ते मुद्दे मांडतात, पण प्रशासनावर तेवढी त्यांची पकड वाटत नाही. उद्धव ठाकर्‍यांची अशी कोणतीच बाब अजून तरी समजली नाही. नेत्याला आपल्या लक्ष्याला पूरक अशा नवनवीन कल्पना सुचून त्या राबवता आल्या पाहिजेत. तेच विजनरी म्हटल्या जातात. सोबतच, जे चांगलं आहे ते कोणतंही काम मान्य करून, त्यातलं उचलून दुसरीकडे वापर करण्याचं शहाणपण आणि प्रामाणिकपणाही असायला हवा. थोडक्यात काय तर, मला माझ्या हाताखाली काम करण्यासाठी कोणता माणूस आवडेल? माझ्यासाठी हे तीन मापदंड आहेत - प्रामाणिक, बुडात आग असलेला आणि प्रश्न पडणारा व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारा. स्किल कमी असेल तरी चालेल, ते मी ठीक करून घेईन. आता जर एका छोट्या कंपनीतल्या जागेवर काम करण्यासाठी ही प्राथमिकता योग्य वाटत असेल तर, पंतप्रधानपदासाठी किती मापदंड असायला हवेत? अशा मापदंडात बसणारा आणि लोकाश्रय असणारा कोणीही उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्यातरी दुसरा कोणी असा दिसत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 01/28/2021 - 09:44 नवीन
इतरत्र पर्याय नाहीतच असे नाही. केजरीवाल हा मला या क्षणी सर्वोत्कृष्ट पर्याय दिसतोय.. अर्थात आज नाही, कदाचित 2029 मध्ये, चांगल्या प्रकारे स्वतःला घडवले तर.. त्याच्याकडे क्षमता आहे, वापरली पाहिजे. राहुल गांधी पर्याय म्हणून कुठेही उभा राहत नाही, त्याला स्वतःला आपण काय बोलतो तेच बऱ्याच वेळा कळत नाही.. तो बाहेर भारताला काय रेप्रेसेंट करणार? याशिवाय मला वाटते नवीन पटनायक हा देखील एक चांगला पर्याय बनू शकेल. भाजपमध्ये पाहिले तर माझी पहिली पसंती अमित शहा याना असेल, पण ते होणार नाहीत. किंगमेकर स्वतः राजा होऊ शकत नाही. त्यानंतर योगी ना पसंती असेल. पण ते देखील 2027 च्या आसपास. मोदीनी 75/76 पूर्ण झाल्यावर राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मला वाटते.. ते 25 साली 75 वर्षांचे होतील. त्यानंतर असा चेहरा असावा जो किमान 4 निवडणुका पक्षाला पुरेल.. बाकी - भारताच्या पंतप्रधानाने निवडणुकीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे.. ज्याला साध्या निवडणुकीचे डावपेच खेळता येत नाहीत, तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दबाव कसा सांभाळेल?
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/29/2021 - 07:02 नवीन
इतरत्र पर्याय नाहीतच असे नाही.
मला सध्यातरी तयार पर्याय दिसत नाही असं म्हणायचं होतं. पर्याय होऊ/ठरू शकतील असे खूप आहेत. पण त्यांना तशी संधी मिळेलच असं नाही. मोदींना नेतृत्वात येण्याची संधी वाजपेयींनी दिली हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचं तसं होईलच असं नाही.
भारताच्या पंतप्रधानाने निवडणुकीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे.. ज्याला साध्या निवडणुकीचे डावपेच खेळता येत नाहीत, तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दबाव कसा सांभाळेल?
ह्याच्याशी पूर्ण सहमत. काम आणि राजकारण ही दोन चाकं झाली गाडीची. एक असल्याशिवाय दुसर्‍याला महत्त्व राखता येत नाही. पण तेवढ्याच त्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टीही आहेत. फक्त एकाच दिशेने जायला हवीत नाही तर बोर्‍या वाजतो. कामं होत आहेत असा विश्वास लोकांना असला तर राजकारणाकडे तटस्थपणं बघणं किंवा सरळ दुर्लक्ष करणं आपसूकच होतं! :-)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 10:27 नवीन
योगी आणि ओवसि मध्ये मला तरी काहीच फरक दिसत नाहीत. फक्त बोलबच्चन आहे मोदी सारखाच. योगी la उत्तर प्रदेश सांभाळता येत नाही आणि त्यांच्या हातात देश द्यायला चाललेत. जंगल राज आहे यूपी मध्ये. रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की . काय ते रस्ते, काय ती बेशिस्त. जनावर रस्त्यावर फिरत असतात. त्या पेक्षा आसाम,ओरिसा ,सारखी राज्य उत्तम आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 01/28/2021 - 10:39 नवीन
तुम्हीच व्हा ना पंतप्रधान!! नाही तर उद्धवरावांना करूया. मग तर झाले?
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 01/28/2021 - 10:40 नवीन
फिरू द्या हो सर, ती मुकी जनावरे बिचारी कुठे जातील? अन् राजकारणात जाण्यापेक्षा रस्त्यात फिरलेली बरी. :)) रस्ता म्हणाल तर एक्स्प्रेस वेज आपल्यापेक्षा उप्र मध्ये जास्त आहेत बरं का...आणि सतत नवे बांधत आहेत. दिल्ली मेरठ, लखनौ कानपूर, ईस्टर्न पेरीफेरल, वगैरे एकदा दुरून तरी बघा. आता पूर्वांचल, बुंदेलखंड, गोरखपूर लिंक वगैरे झाले की ते राज्य बरेच बदलेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/28/2021 - 10:44 नवीन
सारखा महाज्ञानी, महाप्रतिभावान व्यक्ति या भुतलावर अस्तित्वात असताना, तुम्हीच इतर लोकांची नावे पंतप्रधानपदासाठी सुचवणे हा तुमच्या महान प्रतिभेचा अपमान आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 01/28/2021 - 11:42 नवीन
> योगी आणि ओवसि मध्ये मला तरी काहीच फरक दिसत नाहीत. आपणाला गुलाबजामून आणि शेण ह्यातील फरक समजतो का ? योगी आदित्यनाथ ह्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश ने बरयापैकी कामगिरी केली आहे. अर्थांत हत्तीने उपवास केला म्हणून तो काही घोडा होत नाही त्या प्रमाणे उत्तर प्रदेश ज्याने शेकडो वर्षे इस्लाम रुपी हलहल पचवून भारताचे रक्षण केले आहे त्या उत्तर प्रदेशाचे भविष्य पालटवणे हे ३ वर्षांत होणारे काम नाही. पण २०२० मध्ये उत्तर प्रदेश ची कामगिरी पाहू १. गुन्हे Incidence of serious crimes such as murder and rape fell 7.8% and 28% respectively year-on-year to 2032 and 1216. Compared to 2016, the last year of the previous Samajwadi Party government, cases fell 26% and 38.7% respectively under the two heads. Compared to 2013, crimes committed fell 27% and 26% respectively. योगी ह्यांच्या कार्यकाळांत रिकॉर्ड गुंडांचे एन्काउंटर झाले आहे. २. बदल्या योगींच्या नेतृत्वांत पोलीस आणि इतर महत्वाच्या पदांच्या बदल्या जवळ जवळ बंद झाल्या आहेत. ३. स्त्री सुरक्षा महिलांची छेडछाड हा गुन्हा उत्तर प्रदेश मध्य आता अत्यंत गांभीर्याने घेतला जात आहे. त्याच बरोबर इस्लामिक रॉड रोमिओ पासून हिंदू महिलांचे संरक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे होते आहे. ४. किन्नर समाजाला प्रतिष्ठा ५. परीक्षांतील भ्रष्टाचारावर बऱ्यापैकी आळा. ६. रस्त्यांचे बांधकाम. योगी ह्यांनी दिल्लीशी जोडणाऱ्या रस्त्याना प्राधान्य दिले आहे आणि कित्येक एक्सप्रेस वे चे काम सुरु आहे. ७. गंगा बऱ्यापैकी साफ झाली आहे. ९. इस्लामिक वसाहतवादाच्या नष्ट केलेले राम मंदिर बनविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. १०. कोव्हिडच्या दरम्यान सर्वप्रथम योगी सरकारने आपल्या कामगारांना घरी आणण्याची व्यवस्था आपुलकीने केली होती. > रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की . युपी आधी पासून जंगल राज होते आधीचे अय्याश नवाब, काँग्रेसचे घाणेरडे राजकारण, मूर्ख इस्लामिक जनता इत्यादींनी उत्तर प्रदेश च्या समस्या वाढल्या होत्या त्यांना बऱ्यापैकी आळा योगी ह्यांनी घातला आहे. प्रदेश मधील गुन्हे वेगाने कमी होत आहेत. > काय ते रस्ते, काय ती बेशिस्त.जनावर रस्त्यावर फिरत असतात. आपण अश्या कुठल्या भारतीय शहरांत राहता जिथे बेशीस्त नाही आणि जनावरे रस्त्यावर फिरत नाहीत ? नोएडा भारतांतील सर्वांत चांगल्या शहरा पैकी एक आहे. गाझियाबाद सर्वांत वेगाने प्रगती करणारे शहर आहे. महाराष्ट्रा पेक्षा दुप्पट मुले प्रदेश IIT मध्ये पाठवतो. पण महत्वाचा मुद्दा आहे आहे कि आपल्यासारखे विचार "जंत" राजकीय हेतूने प्रेरित होऊन जी वळवळ करतात त्यातून आपला सामान्य लोकांप्रती असलेला द्वेष दिसून येतो. योगी आवडत नसले तरी विनाकारण अख्या उत्तर प्रदेशाला शिव्या देण्याची गरज नाही. आसाम काय किंवा ओरिसा काय सर्वच भारतीय राज्ये असून मुख्यमंत्री कोण आहे ह्यावरून त्यांना शिव्या देण्याची गरज नाही. माझ्या मते योगी आदित्यनाथ ह्यांचे सर्वांत महत्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी आपल्या सारख्या विचारजंतांची वळवळ जी आहे ती पुढे आणली आहे. भगवे वस्त्र धारण करणारा हा योगी बिनदिक्कत पणे सर्व इस्लामिक, साम्यवादी समाजवादी किड्यांच्या नाकावर टिच्चून वागत आहे तेच पाहून हृदयाचे सार्थक होते. नाहीतर ह्याच खुर्चीत बाया नाचविणारा एक माणूस बसत होता आणि दलितांच्या नावाने प्रचंड संपत्ती चोरून गोळा करणारी एक महिला बसत होती. टीप : पुढील विलेक्शन मध्ये योगीच बिनधास्त जिंकून येणार. रायबरेली सुद्धा काँग्रेस च्या हातातून जाणार आहे आणि अखिलेश आपल्या नाकाने सोडच्या बाटल्या उघडत बसणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/28/2021 - 11:50 नवीन
सहमत आहे... आता तुम्हाला, एक किताब मिळेल आणि एक सल्ला मिळेल ... महाराष्ट्र सोडून जा, हा सल्ला मिळेल आणि "महाराष्ट्र द्वेषी" हा किताब मिळेल .... योगींच्या कार्याची स्तूती केली की, हे आपसूकच मिळतात ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा