Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

घडामोडी नोव्हेंबर २०२०

म
माहितगार
Fri, 10/30/2020 - 11:14
🗣 314 प्रतिसाद
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 88419 views

🗣 चर्चा (314)
G
Gk Sun, 11/01/2020 - 08:44 नवीन
तिकडे गोव्यात भाजपाचे मंत्री बोलले , पोटभर गोमांस खा त्यांचा कुणी निषेध केला नाही की त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 11/01/2020 - 09:43 नवीन
जर गोव्यातील कायद्यानुसार तिथे खाणं allowed असेल तर निषेध का म्हणून करायचा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/01/2020 - 08:06 नवीन
@माई भारतिय अर्थव्यवस्था, त्यावर भाष्य करणारे अर्थतज्ञ, अग्रेलेखातून सरकारला 'ईशारे' देणारे संपादक , जी डी पी वगैरे कितीही वाचन केले तरी 'अर्थ' कसा लावायचा हे कळत नाही. हे मला देखील कळंत नाही ! मार्केट कोसळण्याच्या आधी त्यात अनेक नविन खेळाडु देखील मोठ्या संख्येने भाग घेतात असे का ? याचा देखील 'अर्थ' कसा लावायचा हे मला अजुनही समजलेले नाही. असो... तुमच्या ह्यांच ग्रह तार्‍यां विषयी काय मत आहे ? ते कळंव हो ! महाराष्ट्रात अनेकांचे ग्रह फिरणार आहेत असं दिसतयं... ग्रह तारे यांच्या विषयी काही काळा पासुन मला विशेष रुची निर्माण झाली असुन त्यातलं मला काहीही कळंत नसले तरी जाणुन घेण्याची प्रबळ इच्छा होत आहे. माझ्या वाचण्यात आलेली माहिती :- विश्व आर्थिक मंदी- 2020 5 नवम्बर 2019 से लेकर 24 जनवरी 2020 तक, जब तक शनि और गुरु फिर एक बार धनु राशि में रहेंगे, तब तक की समयावधि प्राकृतिक विनाश की बड़ी वजह बन सकती है. इसके अतिरिक्त मार्च 30, 2020 से लेकर 29 जून 2020 और 19 नवम्बर 2020 से लेकर 05 अप्रैल 2021 तक के मध्य गुरु-शनि की युति मकर राशि में रहेंगी, गुरु क्योंकि धन, आर्थिक स्थिति के कारक ग्रह है और शनि कष्ट, आपदाओं और काल के कारक ग्रह है, इस स्थिति में मकर राशि में दोनों का एक साथ होना प्राकृतिक आपदाओं के अतिरिक्त आर्थिक बाजार में रिकार्ड गिरावट का कारण बनेगा, यह स्थिति विश्व आर्थिक मंदी की वजह बन सकती है. इस ग्रह युति की अवधि में इस प्रकार की आर्थिक आपदायें भयंकर रुप में आने के संकेत मिल रहे है. इस समय में विश्व भर में बड़े पैमाने पर वित्तीय संकट, आर्थिक गिरावट और सेंसेक्स के रिकार्ड स्तर से गिरने के प्रबल योग बना रहा है. ऐसे में धन निवेश से बचना लाभकारी रहेगा. इससे पूर्व भी जब गुरु-शनि मकर राशि में 1842, 1901, 1961 में एक साथ आए थे तो कुछ इसी तरह की स्थिति देखने में आई थी. ========================================================================================== युद्ध के बादल यहां ध्यान देने योग्य बात यह है कि 1961-1962 में जब गुरु-शनि एक साथ मकर राशि में एक साथ थे, तो पडौसी देश चीन से युद्ध हुआ था. मकर राशि भारत देश की कुंडली में नवम भाव की राशि है, और नवम भाव से गुरु-शनि तीसरे भाव को पीडित कर युद्ध की स्थिति एक बार फिर से बना सकते है. 2020 से 2022 के मध्य एक बार फिर से चीन और पाकिस्तान से सावधान रहना होगा. अन्यथा युद्ध के बादल सिर पर एक बार फिर मंडरा सकते हैं... 59 साल बाद मकर राशि में फिर जुटेंगे 6 ग्रह, देश दुनिया में होंगे बड़े बदलाव

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracy
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 11/01/2020 - 14:24 नवीन
पाकिस्तानी खुफिया एजेंसी आईएसआई के लिए कथित तौर पर जासूसी करने वाले राम निवास गौड़ा को जयपुर से गिरफ्तार किया गया है। https://www.amarujala.com/rajasthan/ram-niwas-gaura-who-was-allegedly-working-as-spy-for-pakistan-inter-services-intelligence-arrested-from-jaipur
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 11/01/2020 - 14:42 नवीन
अश्या गद्दार व्यक्तीला फासावर लटकावले पाहिजे. तो नावावरून हिंदू वाटतोय म्हणून त्याला सपोर्ट करायला किंवा आंतरजालावर त्याला (उमाः प्रमाणे ) सपोर्ट करणारा समाज नाही आमचा. तुमच्यासारखं नाव बघून वकीलपत्र घेत नाही आम्ही.. . आम्ही माय ला मानतो.. शेजारणीला नाही.. बाकी ही घटना इथे " नावासकट " हायलाईट करण्याचा तुमचा उद्देश समजला.. अश्या संधी फार कमी मिळत असतील नाही?? .. त्याचा बेनिफिट घ्या. बाकी अश्या गोष्टी इतरधर्मीयांनी तुमच्या बिरदारीबाबत सुरु केल्या तर आंतरजाल ठप्प होईल एका दिवसात..
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 11/01/2020 - 15:20 नवीन
देशद्रोही का कोई धर्म नही होता. तुम्ही उगाचच धर्मावर घसरले मी तर एक शब्दही फेरफार न करता बातमी कॉपी पेस्ट केली
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 11/01/2020 - 16:08 नवीन
@ बाप्पू कडव्या राष्ट्रनिष्ठा पुरेश्या प्रमाणात निर्माण करण्यात गेली १४०० वर्षे आपण भारतीय नेमके का कमी पडत आलो आहोत हे समजणे कठीण जाते. भारतीय अजिबात राष्ट्रनिष्ठा दाखवत नाहीत असे नाही पण तुटून पडणार्‍यांची पुरेशी संख्या निर्माण करण्यात भारतीय तवज्ञान कुठे कच्चे पडते हे भारतीय तत्वज्ञानातील अधिकतम सकारात्मकता कायम ठेवत पुन्हा तपासण्याची गरज असावी. गेली काही शतके ज्या राष्ट्रनिष्ठेचा परिचय पश्तुन अफगाणांनी अफगाणीस्तानच्या बाबतीत दिला तशा निष्ठा ईतिहास कालीन भारतीयांनी दाखवल्या असत्या तर परकीय आक्रमणे झाली तरी टिकाव धरण्याचा कालावधी कमी राहून पाकीस्तान बांग्लादेश तयार होण्याची, आणि सकारात्मकतेला अधिक मर्यादा घालणार्‍या परकीय संस्कृतींच्या वैचारीक गुलामीची वेळ आली नसती.
  • Log in or register to post comments
G
Gk Mon, 11/02/2020 - 04:41 नवीन
फ्रान्स मधली त्या घटनेची एक बाजू दिलासादायक आहे शिक्षकाचा खून करणार्याला पोलिसांनी पाठलाग करून ताबडतोब ठार केले. चार्वाक , तुकाराम , गांधी , दाभोलकर , लनकेश .... इथे अनेकांचे धर्मान्ध खुनी मोकाट फिरतात ह्यांच्या खुन्यानाही मोदी सरकारने ठो ठो गोळी हाणावी
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच Wed, 11/04/2020 - 10:17 नवीन
ते जावु दे जि. क्या. मला सांग इतक्या मशिदी असताना मथुरेत श्री कृष्ण मंदिरात नमाज पढायला ४ मुस्लिम लोक गेले त्या विषयी तुमचे काय मत आहे? असे जर आम्ही मशिदीत जावुन आरती केली तर चालेल काय? असे झाले तर मग मिसळपाव कशाला अख्खा भारत बंद होईल नाही?
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 11/05/2020 - 06:42 नवीन
कागलकर शेपूट घालून गायब होईल.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 11/02/2020 - 07:09 नवीन
आपण भारतीय नेमके का कमी पडत आलो आहोत हे समजणे कठीण जाते.
बरोबर. ज्या गोर्‍यांनी आपला देश लुटुन फस्त केला त्यांच्याच देशात शिक्षण घेणार्‍यांना, नोकरी करणार्‍यांना स्वर्ग २ बोटे उरला आहे असे का वाटते ?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/02/2020 - 03:26 नवीन
भारतिय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे अर्थतज्ञ म्हणत होते. ह्या सगळ्याचे कारण करोना आहेच पण मूळ कारण नोव्हेंबर २०१६ मधिल नोटाबंदी आहे असेही अनेक पत्रकार सारखे म्हणत होते. ट्रॅक्टर व बाईक्सच्या विक्रीचा अर्थ्व्यवस्थेशी थेट संबंध असतो असे हे तज्ञ नेहमी सांगत असतात. मग आता हिरो कंपनीने एका महिन्यात आठ लाख बाईक्स विकल्या ह्याचा अर्थ काय ? ह्युन्डाई कंपनीने तर तब्बल ५६००० गाड्या विकल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार हा मोठा रेकॉर्ड आहे. मर्सेडिझने नवरात्रि/दसर्याच्या काळात ५५० गाड्या विकल्या. एका गाडीची किंमत ३५ ते ४० लाख तरी असावी. ४० लाखाची गाडी घेणारे मोठे व्यावसायिक असतात मग ह्याचा अर्थ "भारतिय अर्थ्व्यवस्थेचे बारा वाजले आहेत.. निर्मला सीतारामन ह्याना काहीच कळत नाही" वगैरे जो प्रचार चालु होता ती सगळी अजेंडा पत्रकारीता म्हणायची. आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही पण निदान अर्थव्यवस्था व तिच्यावर भाष्य करताना पत्रकारानी आपला राजकीय अजेंडा बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/02/2020 - 04:30 नवीन
ऑक्टोबर चे GST कलेक्शन 1लाख कोटी झाले असे म्हणतात.. अवांतर - तुमची प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले.. माई तुमच्या ह्या नी पक्ष बदलला की तुम्ही काडीमोड घेतलात? ह घ्या
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/02/2020 - 05:30 नवीन
हा हा हा. आर्थिक समस्यांचा उहापोह राजकीय विचार बाजूला ठेवुन करावा असे आमचे मत.अनेक अर्थतज्ञ तसे करताना दिसत नाहीत."अर्थ्व्यवस्थेने मान टाकलेली/केंद्राच्या तिजोरीत खडखडाट.." अशी वाक्ये लोक्सत्तेच्च्या अग्रलेखात गेल्या आठवड्यापर्यंत येत होती. हे अंशुमान तिवारी(https://en.wikipedia.org/wiki/Anshuman_Tiwari) , अतिशय उत्तम उहापोह करतात, आकडेवारी सांगून. देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली आहे हे ते सांगत होते. "आता पुढची २/३ वर्षे काही खरे नाही" असेही म्हणत होते. मग हे असे अचानक काय झाले? यु पी आय मधुन व्यवहार वाढले हे समजू शकतो पण हिरो कंपनीच्या बाईक्सची ८ लाख विक्रमी विक्री झाली.. जर अर्थव्यवस्थेने मान टाकलेली होती, लोकांच्या खिशात पैसा नव्हता तर मग ह्युण्डाई/मारूतीच्या गाड्या एवढ्या जोरात कशा खपत आहेत? https://auto.hindustantimes.com/auto/two-wheelers/hero-motocorp-shatters-own-record-sells-eight-lakh-units-in-october-41604245636344.html ह्याचे उत्तर मिळेल का?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/02/2020 - 07:25 नवीन
दुचाकी चार चाकी चा खाप वाढण्याचे दुसरे एक पण महत्वाचे कारण करोना आणि सोशल डिस्टन्सिंग हे असू शकते. बस ट्रेन ने प्रवास करायला लागू नये म्हणून लोक गाड्या किंवा दुचाकी घेत असावेत. हे देखील एक शक्यता आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/02/2020 - 07:50 नवीन
देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली आहे हे ते सांगत होते. "आता पुढची २/३ वर्षे काही खरे नाही" असेही म्हणत होते. माई हे असत्य नाही. करोनाने त्यात अधिकची भर घातली आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम दिसायला पुढचे वर्ष उजाडावे लागणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या भितीने ज्यांना कामासाठी इतर वाहनांचा वापर टाळावा वाटला असावा आणि ज्यांची आर्थिक स्थिती योग्य असावी यांनी मध्यम छोट्या श्रेणीतील कार आणि दुचाकींना पसंती दिली असण्याची शक्यता अधिक वाटते. काही चिंतादायक बातम्या :- Data | An estimated 12.2 crore Indians lost their jobs during the coronavirus lockdown in April: CMIE Lockdown 2.0: Unemployment rate hits 26% in India, 14 crore lose jobs, says CMIE 1.89 crore salaried Indians lost jobs since April, around 50 lakh only in July, says CMIE 1.89 crore salaried jobs lost in 3 months Every third professional has lost his job since corona Coronavirus: India will take 'years' to recover from unemployment crisis Five million salaried people lost jobs in July; their ballooning numbers a source of worry: CMIE India's fragile formal sector: 18.9 million white collar job loss 'difficult' to retrieve Loss is not only of jobs but also of incomes माझ्या ओळखीतल्या अनेक जणांचे वांदे लागले आहेत, कोणाचा बिझनेस आहे,कोण हॉटेल लाईन मध्ये आहे तर कोणी नोकरदार. जितक मला ठावूक आहे आणि समजलं आहे त्यानुसार डिप्रेशन अटळ आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With China
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/02/2020 - 11:51 नवीन
काही कळत नाही रे मदनबाणा . लोकांकडे पैसा नाही म्हणावे तर यात्रा डोट कॉमवर ४०% अधिक बुकिंग झाली. ती कशी? https://www.livemint.com/news/india/travel-firms-witness-spike-in-bookings-in-festival-season-11603703616234.html हे सहलीला जाणारे कुणी धनाढ्य नाहीत. मध्यम-उच्च मध्यमवर्गीय आहेत. एका वर्गाकडे ४०/५० लाखाच्या गाड्या घेण्यासाठी पैसा आहे. उच्च-मध्यम्/नवश्रिमंतांकडे मारूती एर्टिगा, किया, हेक्टर, आय-२० गाड्या घेण्यासाठी पैसा आहे. गुजरात्मध्ये समुद्र-विमानाने पटेलांचा पुतळा पाहण्यासाठि पहिल्याच दिवशी ३००० बुकिंग्स झाली. https://indianexpress.com/article/business/aviation/spicejet-gets-3000-bookings-for-seaplane-service-6911871/ वरील बातम्यांची व 'ढासळणार्या' अर्थ्व्यवस्थेची सांगड कशी घालायची ?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/02/2020 - 11:54 नवीन
सहलीला जाणे, ७/८ लाखाच्या गाड्या घेणे,४०/५० लाखाच्या गाड्या घेणारे आर्थिक नियोजन करत असतीलच ना? भविष्याचा विचार करत असतीलच ना? हे कोण व्यावसायिक आहेत , ज्यांचे एकदम मस्त चालले आहे?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 11/02/2020 - 04:52 नवीन
तर bjp विरूद्ध मत व्यक्त करणाऱ्या लोकांना पण भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. भारतीय संस्कृती टिकून राहावी म्हणून सर्व काही रिती रीवज ते अतिशय भक्ती भावाने निभावत असतात. धर्माचा,जातीचा वापर जेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो तेव्हा मतभेद होतात. राजकारणात धर्म आला की राजकीय पक्ष धर्म जाती वाटून घेतात त्या संबंधित पक्षाच्या सरकारला ला विरोध केला की त्या धर्माला विरोध करतोय असा सोयीचा अर्थ काढला जातो. मुळात धर्माला राजकारणात प्रवेश निषिद्ध च असला पाहिजे. बाहुधर्मिय ,अनेक जातीत विभागलेला भारतीय समजा साठी ते धोकादायक आहे. टीव्ही वर सरळ धार्मिक चर्चा आयोजित करून ,न्यूज वर धर्म आधारित बातम्या चा रतीब लावून आपण देशप्रेम दाखवत आहोत की देशद्रोही काम करत आहोत ह्या विषयी विचार करण्याची गरज आहे. ह्या बाबत gulf मधील देशांचे उदाहरण घेण्याची गरज आहे. बहुसंख्य मुस्लिम असलेल्या ह्या देशात बिगर मुस्लिम लोकांना काहीच त्रास नाही. इथल्या सारखे तिथे मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करत नाहीत. कोणत्या देशात मुस्लिम वर अन्याय झाला म्हणून तिथे लोक रस्त्यावर उतरत नाहीत. त्यांनी धर्माला धर्माच्या ठिकाणी च ठेवलं आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/02/2020 - 05:32 नवीन
एक प्रश्न मनात आला. गल्फ मध्ये ईशनिंदा कायदा आहे की नाहीये हे जरा सांगाल का मला शोधून? धर्म आणि राजकारण एकत्र अनु नये म्हणताय म्हणून विचारतोय आपला. अवांतर - तुम्ही म्हणताय ते कितीही खरे असले तरी अनादी काळापासून धर्म आणि राजकारण हातात हात घालूनच चालत आलेले आहेत, त्यामुळे त्यात बदल होणे मला तरी इतक्यात अपेक्षित नाही. You have to live with it.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 11/02/2020 - 09:58 नवीन
UAE मध्ये सर्व मुस्लिम राष्ट्र असल्या मुळे इशनिंदा कायदा तिथे नक्कीच असेल. आणि त्या साठी फाशी ची शिक्षा सुधा असू शकते. Indonesia मध्ये पण इशानिंदा कायदा आहे पण तो फक्त मुस्लिम साठी नाही. सरकारी धर्म असलेल्या हिंदू,बौद्ध,मुस्लिम ह्या सर्व धर्मांना तो लागू आहे. तिथे हिंदू धर्मातील देवता वर टीका केली तरी इशा निंदा खाली केस चालेल. अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका टीपणी करणाऱ्या लोकांना फाशी हीच साजा योग्य आहे असेच माझे मत आहे
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 11/02/2020 - 10:05 नवीन
माझ्या मते ईश्वर निंदे साठी फाशी देने म्हणजे अतिरेक आहे,
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/02/2020 - 11:36 नवीन
@ राजेश.. तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतेय का??
अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका टीपणी करणाऱ्या लोकांना फाशी हीच साजा योग्य आहे असेच माझे मत आहे
हा कायदा आला तर भारतातले सर्व लेफ्ट, अतिशहाणे मुस्लिम मुल्ला मौलवी, ख्रिश्चन पाद्री आणि सो कॉल्ड बुद्धिजीवी सर्वांना फाशी द्यावी लागेल.. कारण बहुतांश वेळा यांचा निम्मा वेळ हिंदू देवी देवतांवर टीका आणि हिंदू धर्माची निंदा नालस्ती करण्यातच जातो.. फक्त हिंदू लोकं सहिष्णू आहेत म्हणून आजवर हे जिवंत आहेत.. नाहीतर लोकं इथे कार्टून काढले तरी गळा कचाकच कापून टाकायला मागे पुढे बघत नाहीत. हिंदुत्वाबद्दल काही लिहिण्याआधी तुम्ही तुमचे बौद्धिक वय तपासून घ्या हा एक आगंतुक सल्ल्ला.. अगदीच नाही जमले तर 1 वर्ष इतर धर्मीय लोकांचा आतून बाहेरून पूर्ण अभ्यास करा, त्यांचे साहित्य वाचा, सर्वसामान्य लोकांशी गप्पा करा.. आणि मग इथे येऊन आपले ज्ञान पाजळा.. !!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 11/02/2020 - 11:45 नवीन
अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली हिंदू देवता ,हिंदू धर्म ह्या वर गल्लिछ भाषेत टीका करणारे डावे,कम्युनिस्ट,नास्तिक ह्यांच्या वर कडक कारवाई झालीच पाहिजे हे माझे मत आहे. पहिला माझा msg पुर्ण वाचत जा.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/02/2020 - 12:26 नवीन
तुमच्या भाषेत कडक कारवाई म्हणजे डायरेक्ट फाशी का???
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 11/02/2020 - 06:17 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-govt-spent-rs-713-crore-20-lakhs-of-taxpayers-money-on-ads-last-year-rti-reveals-scsg-91-2317511/ वरील बातमी जर का खरी असेल तर ते योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? आणि जर का खोटी असेल तर लोकसत्ता वर भक्त केस करुन माफी मागायला लावनार का?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/02/2020 - 07:49 नवीन
मोदी सरकार खरेच अतिरेकी खर्च करतेय.. BTW - आपले मौनीबाबा पण काही कमी नव्हते. शेवटच्या तीन वर्षात 2048 कोटी.. https://m.timesofindia.com/india/UPA-govt-spent-about-Rs-2048-crore-on-publicity-in-three-years/articleshow/38895769.cms आणि आता तुमच्याच भाषेत..- वरील बातमी जर का खरी असेल तर ते योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? आणि जर का खोटी असेल तर टाइम्स ऑफ इंडिया वर चमचे लोकं केस करुन माफी मागायला लावनार का?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 11/02/2020 - 08:06 नवीन
कदाचित जाहिरातीतल्या खर्चा मध्ये विविध योजनांची केलेली जाहिरात असेल. उदाहरण म्हणजे समजा जन धन मध्ये बँकेत खाती खोला, गॅस सबसिडी give-up करा ह्यांचा खर्च ह्या मध्ये असेल. आणि कोणत्याही सरकार आणि जन ते साठी हे गरजेचं आहे, कारण सरकार ने एखादी योजना आणली आणि त्याची माहिती जनते पर्यंत त्याची माहिती पोहचलीच नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे ह्या सरकार ने फक्त एका परिवाराच्या नवे योजना नाही आणल्या.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/02/2020 - 08:55 नवीन
हेच म्हणणार होतो. योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असतात.. रोज 2 कोटी म्हणजे तशी काही फार रक्कम नव्हे, काही महत्वाच्या योजनांच्या नुसत्या पेपर ऍड द्यायकय्या झाल्या तरी काही हजारात खर्च येतो आज.. त्यामानाने 2 कोटी म्हणजे कमीच आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 11/03/2020 - 07:24 नवीन
बाप्पूजी खलिल बातमी टाइम्स ऑफ इंडिया मधलीच आहे. त्यात म्हटले आहे की, The average daily advertising spend of the NDA government in print and electronic media over the last three years is a little over double that of the previous UPA government's two terms. https://timesofindia.indiatimes.com/india/during-3-year-tenure-nda-spends-twice-more-than-upa-in-print-electronic-advertising-rti/articleshow/60306252.cms कदाचित जाहिरातीतल्या खर्चा मध्ये विविध योजनांची केलेली जाहिरात असेल. योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असतात.. वरील मुद्द्यांवर आक्षेप नाही आहे. तर याचा उपयोग योजनांची माहीती कमी व स्व-प्रतीमा बनवण्यासाठी जास्त होतो आहे असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 11/03/2020 - 08:08 नवीन
हम्म.. गोंधळी जी. तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदीच चुकीचा आहे असं नाही. काही जाहिराती या खरंच डोक्यात जाणाऱ्या आहेत.. पेट्रोल पंपावर एकाच व्यक्तीचा फोटो पाहून पाहून वीट आलाय. हा खर्च नक्कीच अनावश्यक होता आणि आहे... पण कोणे एके काळी श्रीमती सोनिया जी, राहुल जी आणि मनमोहन सिंग या त्रिकुटाने पण असाच धुमाकूळ घातला होता हे ही तितकेच सत्य आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 11/03/2020 - 16:56 नवीन
गॅस सबसीडी स्वेच्छेने सोडण्यासाठी आता जाहीरातीवर खर्च करायची गरज पडणार नाही . गॅस सबसीडी सरकारने बंद केली आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 11/03/2020 - 16:57 नवीन
गॅस सबसीडी स्वेच्छेने सोडण्यासाठी आता जाहीरातीवर खर्च करायची गरज पडणार नाही . गॅस सबसीडी सरकारने बंद केली आहे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 11/03/2020 - 17:56 नवीन
एकदा तुमच्या डीलर ला भेटून या, सबसिडी चालू आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 11/03/2020 - 18:47 नवीन
त्यापेक्षा गॅसची पावती चेक करा , सबसीडीचा तपशील आढळतो का बघा . तसेच बँकेत सबसीडी जमा झाली का ह्याचीही खात्री करून घ्या .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 11/03/2020 - 18:58 नवीन
बातमी खरी आहे. https://www.google.com/amp/s/energy.economictimes.indiatimes.com/amp/news/oil-and-gas/govt-eliminates-cooking-gas-subsidy-as-covid-turns-oil-market-favourable/77870487
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 11/03/2020 - 19:54 नवीन
अरेरे ! आनंदी आनंद आहे सगळा. गॅस सबसिडी बघायला बातम्या बघायला लागतात. गॅस पावती , बँक पासबुक बघत नाही का ? किती हा सरकारवर विश्वास ? एखाददिवशी जनतेला झोला घ्यायला लावेल हे सरकार.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 11/04/2020 - 07:03 नवीन
Order Date Order Ref No Order No No. of Cylinder Status Date Cash Memo No Cash Memo Amount Cash Memo Date Subsidized Cylinder Subsidy Amount Transfer Status Payment Type Bank Name Bank A/c No Bank IFSC 01-11-2020 11:41:20 1200828800094221 385213 1 Delivered 02-11-2020 1299665 597.00 01-11-2020 Yes To be processed REFILL SUB 04-09-2020 01:42:26 1200828800076339 379642 1 Delivered 14-09-2020 1281239 597.00 04-09-2020 Yes To be processed REFILL SUB 19-05-2020 01:00:00 1200828800045528 371170 1 Delivered 22-05-2020 1249175 582.00 21-05-2020 Yes तरी सबसिडी अजून खात्यात जमा झालेली नाही. अर्थात, सरकार इतकं भंपक आहे की कोणत्या वेळी काय निर्णय घेईल सांगता येत नाही. आणि जरा काही विचारलं की विचारणारे डायरेक्ट देशद्रोही !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 11/02/2020 - 10:54 नवीन
सरकारी योजना काय आहेत ह्याची माहिती देणे हे सरकार चे कर्तव्य च आहे. त्या साठी सरकारी तिजोरी मधून पैसे खर्च होणे हयात काहीच गैर नाही. लोकांना माहीत कसे पडणार काय योजना आहेत आणि काय नियमाची तरतुदी करायच्या आहेत. पण राम मदिर आम्हीच कसे बांधणार आहोत. पाकिस्तान ची आम्ही कशी वाट लावली. अंतर राष्ट्रीय स्तरावर आम्ही कसे भारताची बाजू भक्कम करत आहोत. बाकी पक्ष कसे देश विरोधी कारवाया करत आहेत. अशा प्रकारच्या प्रचारावर सरकार खर्च करत असेल तर ते आक्षेप घेण्याच्या लायकीचे आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/02/2020 - 11:01 नवीन
Chinese state-run channel shows the portrait of Prophet Muhammad, netizens ask if Muslim nations will boycott China आता पाकिस्तान, मलेशिया च्या तोंडातुन किंवा इतर कुठल्या इस्लामी देशाचा कंठ फुटतो का ते पहा ! आपल्या देशातील दाढीदार जिहादी बोकडं काय बोलणार यावर ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With China
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 11/02/2020 - 11:12 नवीन
भारत हा हिंदू चा देश झाला पाहिजे असेल तर पाहिजे हिंदू ना सशक्त करा . त्यांना च हिंदुत्व वादी पक्ष आणि हिंदू च कमजोर करत आहेत. ते तर सांगत आहे मी प्रतेक पोस्ट मधून. जमिनी कोणाच्या सरकारी पातळीवर हडपल्या जात आहेत हिंदू च्या. उद्योग पती कोणाचे शोषण करत आहेत हिंदू चे कंत्राटी पद्धतीवर कमी पगारात कोण राबत आहे कोण राबवत आहे हिंदू च. हिंदू सरकारी अधिकारी कोणाची पिळवणूक करत आहेत हिंदू सामान्य जनतेची. हिंदू ना देशोधडीला लावून हिंदू हिताच्या गप्पा मारूच नका.
  • Log in or register to post comments
G
Gk Mon, 11/02/2020 - 11:33 नवीन
अर्धपोटी लोकच धर्माच्या नावाने लवकर गोळा करता येतात शिकून अमेरिकेत नोकरी करत बसले किंवा भारतात कलेकटर , सिव्हिल सर्जन , प्रोफेसर होऊन बसले आणि त्यांना संध्याकाळी मोर्चाला या बोलले तर थोडेच येतील
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 11/02/2020 - 11:48 नवीन
आस काही नाही, शिकलेले लोक सुद्धा धर्माच्या नावाखाली बॉम्बस्फोट करायला माघे पुढे पाहत नाहीत. भटकळ बंधू वगैरे अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 11/05/2020 - 06:50 नवीन
लोक सुद्धा बायकोने लाथ मारल्याचा दोष हिन्दू धर्माला देउन इस्लाम चे गोडवे गातात. सुन्ता करुन घ्यायचं मात्र धैर्य करत नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/02/2020 - 12:29 नवीन
अर्धपोटी लोकच धर्माच्या नावाने लवकर गोळा करता येतात शिकून अमेरिकेत नोकरी करत बसले किंवा भारतात कलेकटर , सिव्हिल सर्जन , प्रोफेसर होऊन बसले आणि त्यांना संध्याकाळी मोर्चाला या बोलले तर थोडेच येतील
म्हणजे संपुर्ण इस्लाम जग जे आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जाळपोळ करत आहेत.. मोर्चात सहभागी आहेत ते सर्व अर्धपोटी किंवा बेकार आहेत असच ना.. ??
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 11/02/2020 - 12:39 नवीन
दुबई मध्ये आंदोलन जाळपोळ चालू आहे का? असेल तर तशी लिंक ध्या.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/02/2020 - 14:34 नवीन
जाळपोळ चा अर्थ पुतळे जाळणे असा घ्या. आणि हे सर्वत्र चालू आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/02/2020 - 14:06 नवीन
९-११-२००१ च्या हल्ल्याचा मुख्य हाय्जॅकर महंमद अट्टा स्थापत्यशात्र शिकलेला होता रे जिक्या. https://en.wikipedia.org/wiki/Mohamed_Atta https://en.wikipedia.org/wiki/Ziad_Jarrah बहुतांशी अपहरणकर्ते सुखवस्तु कुटुंबातले, अमेरिकेत शिक्षण घेतलेले होते असे वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
G
Gk Mon, 11/02/2020 - 14:12 नवीन
माई अगं ते लोक उच्च मॅनेजमेन्ट करतात प्रत्यक्ष मोर्चात , दंगलीत सहभागी होत नाही मोर्चातले लोक म्हणजे गोडसे , किंवा मोहरा मधले सुनील शेट्टी. त्यांचे मास्टर माईंड , नसरुद्दीन शहा वेगळेच असतात , ते उच विद्या विभूषित वगैरे असतात
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/05/2020 - 06:18 नवीन
माई साहेब GK म्हणजे गिरीश कुबेर भम्पकच बरळणार त्याच्या कडे काय लक्ष द्यायचे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा