उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे
बर्याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही.
असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे?
तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत?
या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.
त्या वेळीआम्ही जोखिम पत्करुन आपल्यास आणखी रेटले, त्यामुळे आपला नेमका मनसुबा समोर आला.ते एक असो, आता मुद्दा असा की आपण श्रद्धेचा आश्रय घेऊन तो रेटा पुन्हा मारण्याचे ठरवल्यामुळे सद्य परिस्थितीत आपला गुंता सुटला आहे असे आपणास वाटते आहे. ३. आपण श्रद्धेवर वाचन करण्याऐवजी इथले जपचंडी श्री शामराव भागवत यांच्या गेली तीस /पस्तीस वर्ष राबवलेल्या याच उपक्रमावरचे फलित दर्शवणारा हा धागा अप्रिय आठवणींपासून सुटका वाचला असता तर कालापव्यय टळला असता असे वाटते. कारण तिथे आम्ही यावर विस्ताराने लिहिले आहे व श्री शाभा आता आम्ही दिसलो की फक्त ॐ शांती: शांती: शांती: हा एकच जप करतात.