Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नवे कृषी व्यापार विषयक कायदे

म
माहितगार
Mon, 09/21/2020 - 06:01
🗣 159 प्रतिसाद
या धाग्याचा उद्देश्य राजकीय नाही (अर्थशास्त्रीय आहे). पुन्हा एकदा सांगतो या धाग्याचा उद्देश्य राजकीय नाही या कायद्यांनी सर्वसामान्य शेतकरी ते सर्वसामान्य ग्राहक कसे प्रभावित होतील आणि हे प्रभाव सुखकर ठरण्यासाठी नेमके काय करणे गरजेचे असू शकते हा धाग्याचा मुख्य विषय आहे. मोदी सरकारने तीन नवे शेतकी व्यापार विषयक कायदे संसदेतून मंजूर करून घेतले आहेत. ज्याचा थेट परिणाम शेतकरी, शेतीमालाच्या विक्री आणि व्यापार पद्धती शेती मालावरचे प्रक्रीया उद्योग ते शेतीमालाचे ग्राहक या सर्वांवर होणे स्वाभाविक आहे. मला कायद्यांवर भाष्य करण्यापुर्वी कायदा मुळातून वाचण्यास आवडते पण संसदीय आंतरजालाने या वेळी साथ न दिल्याने वृत्तपत्रीय विश्लेषणावर अवलंबून रहाण्या शिवाय पर्याय नाही. कुणाला दुवे उपलब्ध झाल्यास प्रतिसादातून उपलब्ध करावेत. कशा बद्दल आहेत हे तीन कायदे ? पहिला शेतीमालाची खरेदी विक्री शेती उत्पन्न बाजार समिती पद्धतीने करण्याची सक्ती थांबवतो, दुसरा शेतीमालाच्या साठवणूकीवरील मर्यादा उठवतो आणि तिसरा करार करून शेतीस अनुमती प्रदान करतो कृषी उत्पन्न बाजार समितीतूनच सक्तीने विक्रीचा उद्देश्य काय होते? बाजार नियंत्रण आणि अधिक विश्वासार्ह व पारदर्शक व्यापार. कृषी उत्पन्न बाजार समिती पद्धतीचा इतिहास एकोणिसाव्या शतकाच्या शेवटून चालू होत असला तरी मला वाटते १९३० ते १९७० चे दशक संबंधीत प्रक्रीया विकसनाचा प्रमुख काळ असावा. यात बदल का केले जात आहेत? मला वाटते व्यापारावरील नियंत्रणे कमी करून व्यापाराची सुलभता वाढवणे, शेतीमालाच्या साठवणूक वितरण आणि प्रक्रीया उद्योगास चालना मिळण्यातील अडथळे कमी करणे. ही प्रमुख उद्दीष्ट्ये असावीत. परिणाम काय असतील आणि त्यांना कसे सामोरे जावे ? शेतीमाल प्रक्रीया तसेच शेतीमालाच्या मोठ्या वितरण साखळ्यांना करारी शेती आणि थेट खरेदीचा अवलंब करता येईल गरजेनुसार साठवणूक करता येईल. ज्या पिकांना हमी भाव नाहीत त्यांच्या खरेदीची अधिक आश्वासकतेच्या संधी शेतकर्‍यांना उपलब्ध होऊ शकेल. शेतीमाल प्रक्रीया उद्योग यशस्वी झाल्यास देशाच्या अर्थकारणास अधिक चालना मिळेल. शेतीस अधिक प्रमाणात खासगी भांडवलाचा पतपुरवठा वाढेल. सरकार हमी भाव पद्धती बंद करेल का ? मला वाटते भाजपा सरकार अन्न सुरक्षा विषयक प्रतिबद्धता बहुधा कमी करणार नाही कारण अगदी जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघाटींना भाजपा सरकारने तेवढ्या मुद्द्यावरुन थांबवले. ते एकच रेशनकार्ड देशभरची घोषणाही करते आहे त्यामुळे हमी भावाने खरेदी चालू रहातील अशी शक्यता अधिक आहे. शेतीमालाच्या साठेमारी आणि भाव हाताच्या बाहेर जाण्याच्या शक्यता तसेही केंद्र सरकार साधारणतः शेतीमालाच्या आयात आणि निर्यातीच्या बळावर शेतकी मालाच्या बाजार भावांवर नियंत्रण ठेवण्यावर भर राहीला आहे - परकीय चलनाच्या गंगाजळीचे प्रश्न नाहीत तो पर्यंत गरज पडल्यास आयात करुन अथवा निर्यात थांबवून मुल्य वृद्धीवर नियंत्रण ठेवता येते. शेतीमाल नाशवंत असल्याने प्रदीर्घ साठेमारीच्या शक्यता वस्तुतः कमी असतात. अडचणी जागतिक व्यापार अधिक खुला होण्याच्या शक्यता असताना आयात निर्यातीत सरकारला भावीकाळात किती हस्तक्षेप करता येतील हि एक समस्या समोर दिसते. दुसरे बाजारावरील नियंत्रणे कमी करणे ठिक पण शेतीमालाच्या उपलब्धतेची माहिती प्रणाली हि बाजार भावांवर माहिती आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची असते त्या माहिती प्रणाली चा सद्य आधार काढून घेतला जात असताना पर्यायी माहिती प्रणालीची व्यवस्था असावयास हवी. शेती प्रक्रीया उद्योग वाढल्यास रोजगाराच्या संधी वाढू शकतील पण हात उत्पादकांचे बळकट होताहेत का एक मध्यस्थ जाऊन दुसरे मध्यस्थ येतील कारण भारतीयांचा स्वाभाविक भर उत्पादनापेक्षा व्यापारी साट्यालोट्यावर अधिक आहे ही काळजीची गोष्ट आहे. कृषी उत्पन्नाच्या व्यापारात ज्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान आणले जावयास होते ते आणले गेले नाही त्यातील तंत्रज्ञानास उत्तेजन दिले जावयास हवे होते सहकार चळवळीचे राजकीय करण होऊन मोडीत काढली गेली. जेव्हा सरकारी नियंत्रणे कमी होतात तेव्हा सहकारी पर्याय मजबूत व्हावयास हवेत ते होताना दिसत नाहीए. संदर्भ दुवे * https://en.wikipedia.org/wiki/Agricultural_produce_market_committee#History * https://indianexpress.com/article/explained/agriculture-ordinances-punjab-haryana-farmers-protest-explainspeaking-6603039/ * https://indianexpress.com/article/explained/in-three-ordinances-the-provisions-that-bother-protesting-farmers-6598905/ * https://www.livemint.com/news/india/will-the-new-freedom-to-trade-act-benefit-farmers-11600592998681.html * https://www.thehindubusinessline.com/opinion/why-the-new-agri-laws-are-not-anti-farmer/article32654417.ece * https://www.ndtv.com/india-news/passage-of-farm-bills-evokes-mixed-political-reactions-in-uttar-pradesh-2298488 * https://www.news18.com/news/politics/bjp-manages-to-get-farm-bills-passed-in-parl-but-faces-allies-ire-oppn-creates-ruckus-calls-it-black-day-2892883.html * धागा लेखाचा उद्देश्य मुख्यत्वे सर्वसामान्यांसाठी सुक्ष्म आणि ढोबळ अर्थशास्त्रीय स्वरुपाचा आहे चर्चा सहभाग आपापले राजकीय चष्मे बाजूस ठेऊन व्हावा राजकीय कारणासाठी धागाचर्चा हायजॅक करू नये अशी विनंती आणि अपेक्षा आहे. * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे, शुद्धलेखन चर्चा व्यक्तीगत टिका, टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 58847 views

🗣 चर्चा (159)
G
Gk गुरुवार, 09/24/2020 - 18:44 नवीन
2014 आणि 2019 ला लोकांनी 5 वर्षात सिद्ध केले आहे त्याला कम्युनिष्ठ कशाला आणि धा वरसे कशाला ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/25/2020 - 06:15 नवीन
ते इंग्लिश आहे नीट समजून घ्या
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 09/25/2020 - 07:20 नवीन
ते इंग्लिश आहे नीट समजून घ्या
हहपुझा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/21/2020 - 18:04 नवीन
खाण उद्योग,रेल्वे नी, आरोग्य सेवा ,शिक्षण, पाणी पुरवठा,रस्ते ,नैसर्गिक गॅस आणि इंथान. बँकिंग. हे सर्व उद्योग सरकारच्या च ताब्यात असावेत. बाकी मनोरंजन,हॉटेल्स,माल वाहतूक,विमान सेवा,courier, असले उद्योग खासगी चालतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/21/2020 - 18:12 नवीन
जनतेची एवढी काळजी आहे तर. कोणत्या ही देशातील डॉक्टर्स ना भारतात फक्त नोंद करून प्रॅक्टिस करायला का परवानगी नाही. कोणत्या देशातील वकील इथे वकिली करू शकले पाहिजेत. जुन्या विदेशी गाड्या इथे विकायला परवानगी दिली पाहिजे. खासगी कंपन्यांचे हित जपायला अनेक निर्बंध सरकार का घालते. फ्री व्यवसाय ला पाठिंबा का देत नाही मग. कांदा निर्यात का बंद केली. सोने आयात वर निर्बंध का.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 09/21/2020 - 18:46 नवीन
कोणत्या ही देशातील डॉक्टर्स ना भारतात फक्त नोंद करून प्रॅक्टिस करायला का परवानगी नाही. कोणत्या देशातील वकील इथे वकिली करू शकले पाहिजेत. जुन्या विदेशी गाड्या इथे विकायला परवानगी दिली पाहिजे. खासगी कंपन्यांचे हित जपायला अनेक निर्बंध सरकार का घालते.
अर्तक्य लॉजिक.. पाकिस्तान मदरश्यातील डॉक्टर इथे येऊन प्रॅक्टिस करायला लागला तर चालेल का?? किंवा तिकडचाच कुराण हदीस वाला वकील इथले न्यायनिवाडे करू शकतो का?? उगाच बोलायचं म्हणून काहीही बोलायला लागले राव तुम्ही...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 09/21/2020 - 18:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/24/2020 - 15:37 नवीन
तिकडचाच कुराण हदीस वाला वकील इथले न्यायनिवाडे करू शकतो

ह ह पु वा

  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/22/2020 - 02:14 नवीन
राजेश .. अहो आपण लिहिलेल्या पैकी बरीच धोरणे जगात कोणी देश अगदी निकड असेल तर नाही तर अजिबात राबवत नाही...उगाच सरकारला वैचारिक विरोध म्हणून तुम्ही लिहताय..व्यापारी अडचणी/ धोके काय याची कल्पना आहे का? प्रत्यक्षात जगात काय चालत आणि काय नाही ते जरा बघा याची अनके उदाहरणे देऊ शकतो -कोणत्या ही देशातील डॉक्टर्स ना भारतात फक्त नोंद करून प्रॅक्टिस करायला का परवानगी नाही. कारण: त्या त्या देशातील जे प्रमाण शिक्षण आहे ते आधी तपासून घेऊनच मग तसे केले जाते,, गरज असेल तर अशी तपासणी सोपी करावी लागते पण सरसकट परवानगी देणे मूर्ख पणाचे ठरेल: गरजेचे उदाहरण: भारतीय डॉकटर सिझन मधलं काम म्हणून फिजी बेटांमध्ये मध्ये अख्खा ताफा घेऊन महिना भर राहून काम करून येतात...कारण फिजी बेटांना - सरसकट परवानगी जरी दिली तरी त्यावर लक्ष असते,, ऑस्ट्रेलिया मध्ये नु झीलंड आणि इंग्लंड आणि आशियातील म्हणजे सिंगापोर मधील डॉक्टर येऊन काम करू शकतात पण विमानातून उतरले आणि पाटी लावली असे होत नाही... - कोणत्या देशातील वकील इथे वकिली करू शकले पाहिजेत. हे तर अजून अवघड कारण देशाचे कायदे खूप भिन्न असू शकतात, आणि हे अकाउंटंट ना पण लागू पडते उदाहरण दुबई मध्ये आयकर जर नसेल तेथील टॅक्स ची सेवा देण्याचा अनुभव असलेल्या अकाउंटंट ला जर्मनीत एकदम कसे काम करता येईल? जुन्या विदेशी गाड्या इथे विकायला परवानगी दिली पाहिजे. - खास करून भारतात देशी आणि विदेशी मालकीचं गाड्यांचे उत्पादन होत असताना असे करणे जरा घातक ठरू शकते ...
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/22/2020 - 02:22 नवीन
कृषी उत्पन्न बाजार समितीतूनच सक्तीने विक्रीचा उद्देश्य काय होते? हे समजून घ्यायला आवडेल.. खास करून त्याची सुरवात, उपयोग, दुरुपयोग, परिणाम इत्यादी मी हि एका पाश्चिमात्य परंतु शेती प्रधान देशात राहतो आणि येथे सरकारी/ खाजगी/ आणि सहकारी असे तिन्ही प्रकारे शेतीमालाचे विपणन आणि निर्यात यावर चांगले काम चालते... येथेही दुष्कळा पडतो...शेतकरी कर्जबाजारी होतो....पाण्याच्या वाटपावरून अगदी एकाच युतीतील सरकार मध्ये मतभेद होतात.. भारतात असताना आम्हची माती आमची माणसे हे कधी बघतलं नाही पण याचा येथील अवतार मात्र खूप रंजक असतो .. https://www.abc.net.au/landline/ असो तर भारतात हे कसे काय चालते यावर कृपया लिहावे
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 09/22/2020 - 07:31 नवीन
बुडीत सरकारी उद्योग ( एअर इन्डिया, बि एस एन एल, एम टी एन एल, सरकारी बँका, सरकारीए इन्श्रुरन्स कम्पन्या) तगवायला गेल्या ८-९ वर्षात दोन्ही सरकारांनी जनतेचे जवळपास पाच ते सहा लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा जनतेने कष्टाने भरलेल्या आयकर, जि एस् टी, इन्धन कर यातून भरलेला पैसा आहे जो मुठभर सरकारी कम्पन्यांवर उधळला गेला आहे. याच पैशात किती रस्ते, इस्पितळे, शाळा, मेट्रो प्रकल्प पूर्ण झाले असते याचा विचार करावा. खासगी विमान कंपन्या, फोन कंपन्या, विमा कंपन्या यांना राव/वाजपेयी सरकारांनी मान्यता दिली. आज सरकारी कंपन्यांपेक्षा या क्षेत्रात खासगी कंपन्या उत्तम सर्व्हिस देतात. ही क्षेत्रे खुली केल्याने जनतेचा फायदाच झालेला आहे. भारतात आज मोबाईल फोन /इंटरनेट सेवा जगातील सगळ्यात स्वस्तपैकी एक आहे. खासगी विमा कंपन्या सरकारी विम्यापेक्षा बराच स्वस्त विमा देतात. खासगी विमान कंपन्या एअर इंडियापेक्षा चांगली आणि स्वस्त सेवा देतात. खासगीकरण म्हणजे सरकारने त्यातुन बाहेर पडणे आणि खासगी कंपन्यांवर रेग्युलेटर(सेबी, आय आर डि ए, पी एफ आर डी ए, डी जी सी ए , ट्राय इत्यादी) ठेवणे हा असतो. रेग्युलेटर मनमानी रोखण्याचे काम करतो. अजून एक खोटा प्रचार म्हणजे "जुन्या सरकारांनी हे उद्योग उभे केले जे तुम्ही फुकून टाकताय" हा. यातले अनेक उद्योग (तेल कंपन्या, बँका, विमा कंपन्या, हिन्दुस्तान एरोनॉटिक ही विमान बनवणारी कंपनी, एअर इंडिया ही विमान वाहतूक करणारी कंपनी) उद्योजकांनी उभे केलेले खासगी उद्योग होते. सरकारने राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली केवळ कागदी फराट्याने हे उद्योग स्वत:चे केले आणि त्यावर स्वतःचे पित्तू बसवले. याला उद्योग उभे करणे म्हणत नाहीत. लुबाडणे म्हणतात. खासगीकरणाची ही उत्तम उदाहरने असताना खासगीकरणाचा बागुलबुवा लोक उभा करतात त्यामागची कारणे तेच जाणोत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/22/2020 - 08:05 नवीन
खासगी करना मुळे देशाची संपत्ती वर काही मोजक्याच कुटुंबाचा अधिकार राहतो. तेच सरकार त्या मध्ये सहभागी सदेल तर जनतेचा अधिकार पण साधन संपत्ती वर राहतो. शेवटी सरकार म्हणजेच जनता आहे. मग काही लोकाकडे च देशाची साधन संपत्ती सोपावणे हे चांगले की सरकार म्हणजे जनतेच्या ताब्यात साधन संपत्ती राहणे हे चांगले . असे दोन प्रश्न निर्माण होतात. सरकारी उद्योग नुकसानीत आहेत की त्यांना ठरवून नुकसानीत आणले आहे हा प्रश्न का पडत नाही त्या लोकांना जे सरकारी उद्योग नुकसानीत चालतात अस युक्तिवाद करत आहेत. जेट एअरवेज pvt च होती ना ती कशी बंद पडली तिनी घेतलेली बँकेची कर्ज बुडल्यात च जमा आहेत ते बुडलेले पैसे जनतेचे नव्हते काय. खासगी उद्योगपती स्वतः चे पर्सनल अकाउंट मधील पैसे कधीच उद्योगात लावत नाही हे जाणूनबुजून का विसरले जाते. पैसा बँकेचा म्हणजे जनतेचा तोच पैसा वापरून देशाच्या साधन संपत्ती वर अधिकार गाजवणारा आणि काही वर्षांनी दिवाळखोरी जाहीर करून कर्ज budavnar अशी उदाहरणे किती तरी आहेत तरी त्या कडे मध्ये डोळेझाक केली जाते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/22/2020 - 08:05 नवीन
खासगी करना मुळे देशाची संपत्ती वर काही मोजक्याच कुटुंबाचा अधिकार राहतो. तेच सरकार त्या मध्ये सहभागी सदेल तर जनतेचा अधिकार पण साधन संपत्ती वर राहतो. शेवटी सरकार म्हणजेच जनता आहे. मग काही लोकाकडे च देशाची साधन संपत्ती सोपावणे हे चांगले की सरकार म्हणजे जनतेच्या ताब्यात साधन संपत्ती राहणे हे चांगले . असे दोन प्रश्न निर्माण होतात. सरकारी उद्योग नुकसानीत आहेत की त्यांना ठरवून नुकसानीत आणले आहे हा प्रश्न का पडत नाही त्या लोकांना जे सरकारी उद्योग नुकसानीत चालतात अस युक्तिवाद करत आहेत. जेट एअरवेज pvt च होती ना ती कशी बंद पडली तिनी घेतलेली बँकेची कर्ज बुडल्यात च जमा आहेत ते बुडलेले पैसे जनतेचे नव्हते काय. खासगी उद्योगपती स्वतः चे पर्सनल अकाउंट मधील पैसे कधीच उद्योगात लावत नाही हे जाणूनबुजून का विसरले जाते. पैसा बँकेचा म्हणजे जनतेचा तोच पैसा वापरून देशाच्या साधन संपत्ती वर अधिकार गाजवणारा आणि काही वर्षांनी दिवाळखोरी जाहीर करून कर्ज budavnar अशी उदाहरणे किती तरी आहेत तरी त्या कडे मध्ये डोळेझाक केली जाते.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 09/22/2020 - 08:10 नवीन
जनतेचा अधिकार बिधिकार काहीही रहात नाही. केवळ मुठभर माजोरी सरकारी कर्मचार्‍यांच्या हातात अधिकार असतात. वर भिकार सेवा. मुठभर सरकारी कर्मचार्‍यांच्या अव्वच्या सव्वा पगार पेंशनसाठी सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा वाया जातो. त्यावर भिकार आणि महागडी सेवा.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 09/22/2020 - 08:25 नवीन
खासगी उद्योगपती स्वतः चे पर्सनल अकाउंट मधील पैसे कधीच उद्योगात लावत नाही हे जाणूनबुजून का विसरले जाते.
नक्की का? कोण्ताही उद्योग सुरु करताना सुरवातीला उद्योगपती स्वतःचे भांडवल गुंतवतोच ना? बँक १००% कर्ज कधी देते???
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 09/22/2020 - 08:48 नवीन
आमच्या ओफिसमधे डी एस के यान्चे एकदा भाषण ठेवले होते. त्यात त्यानी सांगितले की " शहाणा उद्योग पति आपले पैसे कधी आपल्या धंद्यात लावीत नाही. " या डी एस के ना सध्या लॉकप ची हवा खायला लागत आहे. कोणत्याही उद्योगाला काही प्रमाणात भांडवल स्वतः चे घालावे लागते हे उघड आहे ! डी एस के ची नीती सरकारी बॅन्कानी वापरून करोडो रूपये बुडविले आहेत त्यातले किती एम डी डी एस के बरोबर तुरुन्गात आहेत.? सरकारी बॅन्का अस्तित्वात येण्यापूर्वी अनेक खाजगी बँका विमा कंपन्या बुडाल्या आहेत भारत देशात. २००८ साली अमेरिकेत काय झाले वेगळे ? खाजगी कंपन्या म्हणजे एक मर्यादित प्रमाणात फायदेशीर असतात कारण त्यात नोकरीची हमी नसल्याने नोकराना मनापासून काम करावे लागते पण एवढ्यावर कोणत्याही खाजगी धंद्याचे दीर्घ काळ प्रगती तसेच अस्तिव टाकून राहील असे काही नाही व नसते. असे असते तर जेट एयरवेज , व्हिडीओकॉन , इंडियन एयरलाईन , लोहिया मशीन टूल्स ,महाराष्ट्र स्कूटर , स्कूटर इंडिया ,डी एस के,,रिलायन्स कम्युनिकेशन या कंपन्या बुडाल्या नसत्या. जगात सेकंड लार्जेस्ट स्कूटर उत्पादक अशी जाहिरात असलेली बजाज आटो चौथ्या क्रमांकावर भारतात फेकली गेली नसती. कोणताही सरकारी धंदा मग ती एस टी असो व दूध योजना प्रचंड फायद्यात तर नाहीच पण तोट्यात देखील चालवायची नाही असे किती प्रयत्न स्वतंत्र भारतात झाले ? आताशी कोठे एक बनिया पी एम झाल्याने काही बदल होत आहेत. सरकारी बँकांचे बुडविले गेलेले पैसे फार धीम्या गतीने वसूल करण्याचे काम चालू आहे.
  • Log in or register to post comments
ज
जानु Tue, 09/22/2020 - 08:18 नवीन
ए पी एम सी मार्केट सुरु का ठेवावी याची कारणे किती लोकांना सांगता येतील? लासलगाव येथील कांदा मार्केट मध्ये भारतातील ७०% कांदा व्यापार होतो असे म्हणतात. येथे किती निकोप व्यापार होतो? पुर्ण कांदा मार्केट किती व्यापार्‍यांच्या हाती आहे? उमराणे सारख्या छोट्या गावातुन किती कांदा बांग्लादेश सीमेवर जातो? तेथे कोणाची सत्ता चालते? कोण नफा कमवतो? शेतकर्‍याची काळजी सोडा. भारतात लोकांना वैयक्तिक स्वार्थ चांगला कळतो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 09/22/2020 - 08:18 नवीन
नव्या कायद्यातील संकल्पना चांगल्या आहेत. कुठल्याही व्यवस्थेची मोनॉपली मोडून काढणे हे चांगलेच. देशभरात जीएस्टी लागू झाला तेव्हा सर्व राज्यांची संमती मिळवण्यासाठी केंद्रसरकारने काही सवलती राज्यांना दिल्या होत्या. त्यातल्या मुख्य दोन सवलती म्हणजे १. त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नाचे मेजर स्रोत जसे की इंधनावरील व्हॅट, दारू वरील अबकारी कर आणि कृषीउत्पन्न समित्यांमध्ये आकारला जाणारा मंडी कर हे पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. २. जीएसटीच्ज्य अंमलबजावणीमुळे राज्यांना जे महसुली नुकसान होईल ते केंद्रसरकार पाच वर्षे दरसाल १४ % वॄधीदराने भरून देईल. यातली दोन नंबरची सवलत देण्याबाबत केंद्राने आधीच हात वर केले आहेत. आता नव्या शेतकी कायद्यानुसार एपीएम्सीची मक्तेदारी मोडली आहे. (ही चांगली गोष्ट आहे). पण एपीएम्सीबाहेर विकल्या जाणार्‍या शेतमालावर राज्यांना कर लावता येणार नाही अशी तरतूद आहे. मुळात शेतकर्‍यांनी एपीएम्सीत माल न विकता बाहेर इतरत्र विकावा अशी अपेक्षा असेल तर त्यावर कर लावता येणार नाही ही तरतूद म्हणजेच जीएस्टीच्या वेळी दिलेल्या आणखी एका सवलतीचा भंग होत आहे. एखाद्या दुकानात शर्ट विकला तर त्यावर कर बसतो आणि त्या दुकानाबाहेर फूटपाथवर घेतला तर (अनऑफिशिअली) कर लागत नाही. तशी सिस्टिम अधिकृत केल्यासारखे आहे. राज्यांची आर्थिक नाकेबंदी करून त्यांना केंद्रापुढे लाचार होण्यास भाग पाडणे हे जारीने सुरू आहे असे यावरून दिसते. (२०१४ पूर्वी फेडरलिझम हा भाजपसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा होता हे रोचक आहे).
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/22/2020 - 10:10 नवीन
प्रक्रिया न केलेल्या कोणत्या शेतमालावर कर लावला जातो? एपीएमसी मध्ये सेस आणि दलाली लावली जाते . सेस हा राज्य सरकार लावते . दोन्ही मिळून कशी राज्यात कर हा 14 टक्के पर्यंत सुद्धा आहे. त्या मुळे APMC राहिल्या नाहीत तरी त्याचे दुःख नाही. कृषी उत्पादन आणि त्यावर सेस लावणे हा राज्य सरकार चा अधिकार आहे. एपीएमसी नष्ट झाल्या मुळे राज्य सरकार चे उत्पादन कमी होईल हे खरेच आहे. पण आता जो नवीन कायदा आला आहे तसाच थोडाफार कायदा 2003 मध्ये काँग्रेस सरकार नी करायचे ठरवले होते आणि त्या कायद्या च्या प्रारूप ला 18 राज्यांनी मान्यता दिली होती. ह्या वरून असे म्हणता येईल शेतकऱ्यांना त्यांची लढाई स्वतः च ladhavi लागेल. राजकीय पक्ष मदतीला येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/22/2020 - 08:32 नवीन
अगदी योग्य मुद्दे मांडले थत्तेसाहेब
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/22/2020 - 08:35 नवीन
एपीएमसी चा उद्देश हा असंघटित शेतकऱ्यांची लूट होवू नये हा होता. त्या मुळे शेतमाल apmc मध्ये आणून नंतर तो बाजारात विकता येत होता त्या मुळे होणारी आवक आणि त्या मालाचा बाजारभाव काय असावा ह्या वर APMC ni नियंत्रण ठेवावे आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडू नयेत ह्या वर नियंत्रण ठेवावे हा हेतू होता. तो हेतू साध्य झाला नाही हे वेगळे. APMC कायदा पूर्ण वाचलात तर फक्त शेतकरी हितासाठीच तो बनला आहे असा भास होईल पण तसे घडले नाही. त्याच प्रमाणे नवीन कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचं असेल असा भास होत असला तरी तसे घडणार नाही. मुळात भारतात शेतकरी गरीब आहे खूप सारी शेतजमीन त्याच्या मालकीची नाही 1 acre च्या आत मध्ये जमिनी आहेत. थोडक्यात तो कमजोर आहे मोठा मोठ्या कंपन्या समोर त्याचा टिकाव लागणार नाही. तसाच अमेरिका सारख्या देशाचा विचार केला तर तेथील शेतकऱ्यांकडे हजारो एकर जमिनी आहे ते स्वतः सक्षम आहेत अन्याय चा प्रतिकार करण्यास. त्याच मुळे भारतीय शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोडले तर मोठ्या कंपन्या त्याच्या चिंधड्या उडवतील सरकारी संरक्षण त्यांना असायलाच हवे . नाहीतर जमिनी वरील मालकी बदलून त्या कंपन्यांच्या होतील . जेव्हा जमिनी कंपन्यांच्या मालकीच्या होतील तेव्हा ग्राहक हित बघितले जाणार नाही तर मनमर्जी चालेल कोणताच पर्याय समोर न राहिल्या मुळे टोमॅटो 500 रुपये किलो झाले तर आश्चर्य वाटून घेवू नका.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 09/22/2020 - 10:02 नवीन
रोगापेक्षा उपाय भयंकर असे होउ नये. जर खाजगी कंपन्यांनी बियाणे वगैरे पुरवले आणि हमीभावाने माल विकत घेतला तर ग्राहकाल ते म्हणतील त्या रेटने घेणे भाग पडेल. थोडक्यात ए.पी.एम.सी चा भ्रष्टाचार चालेल पण ही महागाई नको असे होइल. शिवाय जमिनीवर ताबा /दावा सांगणे हा मुद्दा निराळाच. आणि हो--जनुकीय बियाणे/खते वापरुन जमिनी नापिक झाल्या किवा फक्त विशिष्ट पीकच घेउ शकल्या तर आज भुइमुग्,उद्या कापुस परवा दुसरे पीक असे करण्याचे स्वातंत्र्य जाउ शकते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/22/2020 - 10:13 नवीन
बरोबर आहे तूमचा मूद्दा . पीकपालट करण्याचा अधिकार गमावल्यास शेतजमीन ५ वर्षात कायमस्वरूपी नापीक होण्याचा धोका आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 03:37 नवीन
बरोबर आहे तूमचा मूद्दा . पीकपालट करण्याचा अधिकार गमावल्यास शेतजमीन ५ वर्षात कायमस्वरूपी नापीक होण्याचा धोका आहे. बरोबर पण विचार करा कि - जे हे मोठे उद्योग आहेत ते स्वताच्या फायद्या साठी म्हजे स्वतः उद्योग म्हणून वर्षानुवर्षे जिवंत राहण्यासाठी त्यांना लागणाऱ्या शेतीलाच असे कसे मारून टाकतील? - शेवटी एकूण उपलब्ध शेत जमीन ठराविक आहे आणि भाजीपाला म्हणजे काही जमिनीतील तेल नाही कि एक दिवस संपू शकते.. त्यामुळे या उद्योगांना आणि त्यांना पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला जमिनी कडे लक्ष द्व्यावेच लागेल...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/22/2020 - 10:19 नवीन
शेती आणि शेती उत्पादन ह्या वर एकाधिकार शाही निर्माण होण्याचा धोका हाच सर्वात मोठा धोका नवीन कायद्या मुळे निर्माण होईल. कॉन्टॅक्ट शेती मुळे पिकांची निवड करणे हा हक्क नष्ट होईल. बियाणे कंपन्याच देतील. आणि त्या बियाण्यास paitant कायदा लागू होईल. गुजरात मध्ये काही शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या बटाट्याचे बियाणे वापरले म्हणून संबंधित कंपनीने त्या शेतकऱ्या वर कोर्टात केस केली होती. त्या मुळे समजून हा काय परिस्थिती ओढवेल. नवीन तंत्र आणि बियाणे ह्याचा लाभ जे शेतकरी कॉन्ट्रॅक्ट फार्म मध्ये सामील होणार नाहीत त्यांना दिला जाणार नाही. गळचेपी केली जाईल. त्याचा दुष्परिणाम म्हणून शेती क्षेत्रात एकाधिकार शाही निर्माण होईल.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 09/22/2020 - 19:12 नवीन
या मुख्य तीन बदलांमुळे होणारे जे परिणाम आहेत, ते यापूर्वीच काही तरतुदींमुळे महाराष्ट्र आणि बिहार राज्यात झाले आहेत असे वाचण्यात आले. १) यात कितपत तथ्य आहे ? २) नक्की कोणते परिणाम महाराष्ट्र आणि बिहार साठी नवीन असणार नाहीत ?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 09/22/2020 - 19:58 नवीन
बिहार मध्ये २००६ साली APMCची सत्ता घालवली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात विकला असे दिसून आले होते. दुवा. त्यात आणि आजच्या कायदेबदलात काय फरक आहे/ हे कसे टाळले जाईल?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/22/2020 - 20:28 नवीन
Bihar aani up ह्या राज्यांची उदाहरणे घेवून काही निष्कर्ष काढणे अयोग्य आहे. जंगल राज असलेली ती दोन राज्य आहेत. कर्नाटक किंवा दक्षिणेतील राज्य काय विचार करतात ह्यांचा अभ्यास करून महाराष्ट्र नी मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. Bjp च हेतू हिंदू ना राम मंदिर दाखवून प्रसाद स्वतः खाणे हा आहे. दक्षिण भारत त्याला बळी पडत नाही. आता महाराष्ट्र नी त्या मध्ये इंटरेस्ट घेवू नये. कार्य करण्याची पद्धत बघून च मतदान करावे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 03:21 नवीन
Bjp च हेतू हिंदू ना राम मंदिर दाखवून प्रसाद स्वतः खाणे हा आहे. हा धागा शेती बद्दल आहे ना? पण तुम्ही यात हे परत घुसवलं तर आमचे पण २ एक्के घ्या" "काँग्रेस आणि दावे यांचा हेतू भोंगळ आणि खोटा सर्वधर्मसमभाव दाखवून प्रसाद स्वतः खाणे हा आहे आणि ते गेली ७० वर्षे चालू आहे ..". ( खुलासा : मंदिरापेक्षा/ मशिदीपपेक्षा शेतीची अवजारे किंवा रस्ते / धरणे यावर सरकरने पैसे खर्च करावं याच मताचा मी हि आहे पण तुमच्यासारखे जिथे तिथे मंदिर आणि भाजप काढीत असाल तर आपण पण तोगाडियाचे बाप / आपल्या पण हातात त्रिशूल आणि भगवा... मग भले देश हिंदुराष्ट्र्र झाला तरी चालेल मग भले तुम्ही आमचं नावाने इस्लामोफोबिक म्हणून ओरडला तरी चालेले ..)
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 09/29/2020 - 16:29 नवीन
मी कुठे काही निष्कर्ष काढतोय ? मी साधा प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रात यापूर्वीच यातले काही परिणाम फडणवीस सरकारने पूर्वीच लागू केले आहेत. माझा सरळ साधा प्रश्न आहे. १) देशव्यापी बदलांपैकी नक्की किती बदल महाराष्ट्रात (आणि बिहारमध्येपण. पण बिहार इग्नोर केलं तरी चालेल.) आधीच केले आहेत ? २) महाराष्ट्रात या बदलांचा काय सु/दुः परिणाम दिसला ? विरोधक आणि समर्थक दोघांनी सुद्धा यावर प्रकाश पाडावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
य
येरागबाळा Tue, 09/22/2020 - 19:27 नवीन
मिपा वरील किती जण प्रत्यक्ष शेती करतात? किती जण सकाळी APMC किंवा कृषि उत्पन्न बाजार समिती चे कामकाज (शेतमालाचे लिलाव ) कसे चालते हे प्रत्यक्ष पाहून आले आहेत? केवळ माहिती म्हणून विचारतोय.. तसे कुणी सदस्य असल्यास माझ्यासारख्या अनेक मिपाकरांचे ज्ञानात भर टाकावी ही नम्र विनंती..
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 09/22/2020 - 22:27 नवीन
सर्व बाजुंनी परिक्षण होणे आवष्यक आहेच. आपला सर्वात मुख्य आणि काळजीकरण्याचा मुद्दा म्हणजे कायदा व्यवस्था किती सक्षम, प्रामाणिक, आणि जनतेचं हित लक्षात घेऊन कार्य करते, हा आहे. सरकारने स्वतः उद्योगधंदे करण्याऐवजी उद्योगांना प्रोत्साहन आणि काटेकोर नियमन करावं हि अपेक्षा. पण आजवरचा अनुभव बघता एकुणच याविषयी साशंकता येणं स्वाभावीक आहे. त्यामुळे खरी कसोटी कायदा व्यवस्थेची, न्याय व्यवस्थेची, जनहिताची कळजी करण्यार्‍या राजकारणाची आहे. आता शेती विषयापासुन एक नवी लिटमस टेस्ट सुरु होणार.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 09/23/2020 - 09:23 नवीन
त्यामुळे खरी कसोटी कायदा व्यवस्थेची, न्याय व्यवस्थेची, जनहिताची कळजी करण्यार्‍या राजकारणाची आहे. आता शेती विषयापासुन एक नवीटेस्ट लिटमस सुरु होणार.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/23/2020 - 07:03 नवीन
आमची शेती आहे आणि काही वर्ष मी केलेली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा उत्पादन वाढ हा नाही शेतकरी भयंकर कष्ट करून ते वाढवण्याचा प्रयत्न करत असतो प्रश्न आहे तो मार्केटिंग चा. भाजीपाला हा नाशवंत असतो त्याचे वितरण आणि विक्री ही वेगात होणे गरजेचे असते. एका जिल्ह्यात पिकलेला भाजीपाला हा जिल्यातील मागणी पेक्षा जास्त असतो तेव्हा त्याची खरेदी करून दुसऱ्या मोठ्या शहरात पाठवण्यासाठी यंत्रणा असावी लागते . त्या साठी भाजी मंडई मधील व्यापारी लागतात. ते मार्केट बघून भाजीपाला खरेदी करून त्यांच्या चैन चा वापर करतात. त्या मुळे ही वितरण यंत्रणा ही महत्त्वाची यंत्रणा आहे ती नसेल तर उत्पादन वाया जाते. ती जागा आता pvt कंपन्या घेतील त्या जेव्हा ही वितरांची जागा घेतली तेव्हा ते धोक्याच्या गोष्टी चा विचार करणार. कोणता भाजी पाला किती लागेल राज्यात किंवा देशात ह्याचा अभ्यास करून तेवढंच त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्या शी कॉन्ट्रॅक्ट करतील . ह्याचा परिणाम असा होईल की अतिरिक्त भाजी पाला बाजारात नसेल टंचाई सदृश्य स्थिती निर्माण करून भाव नेहमी चढे असतील. त्या मध्ये साठवणूक करण्याची परवानगी सरकार नी दिली आहे त्याचा वापर अन्न धान्य,कांदा ,बटाटा, लसूण,आले ह्यांची साठवणूक केली जाईल . शेतमालाची साठवणूक करण्याची परवानगी आज पर्यंत नव्हती ती आताच्या कायद्या नी दिली गेली आहे हे कंपन्यांना फायद्याचे ठरावे ह्या साठीच तो बदल केला आहे. शेतमाल अतिरिक्त बाजारात येवून n दिल्यामुळे भाव हे उत्पादन खर्च, वितरण खर्च मिळून येणाऱ्या खर्च पेक्षा नक्कीच खूप जास्त ठेवले जातील. आणि शेती उद्योग हा फायद्यात च राहील. प्रश्न हा आहे ह्या फायद्यात शेतकऱ्यांना सामील करून घेतले जाईल का? त्या साठी कायद्यात काही तरतूद आहे का? 1) विक्री किमतीच्या इतक्या पट दर शेतकऱ्यांना देणे बंधनकारक केले आहे का? 2) शेतमाल खरेदी केल्या नंतर इतक्या दिवसात त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले च पाहिजेत अशी कायद्यात तरतूद आहे का. 3) कॉन्ट्रॅक्ट पद्धत ही कशी असेल शेतकरी स्वतः पिकवेल की कंपन्या कॉन्ट्रॅक्ट केल्या नंतर जमिनी चे एकत्रीकरण करून यांत्रिक शेती करू शकतात असा तर नियम नाही ना. असा नियम नसेल तर कॉन्ट्रॅक्ट केल्या नंतर त्या मधून बाहेर पडता येणारच नाही. असे ऐकले आहे की तुम्ही कंपन्या विरूद्ध कोर्टात न्याय मागू शकणार नाही असा नियम कायद्यात आहे. सरकारी अधिकारी असेल त्याच्या कडेच न्याय मागू शकाल. मग ह्या नियमाचा उपयोग शेतकऱ्या वर दबाव आणून हतबल करण्यासाठी का नाही होणार. ऑब्जेक्शन ह्या वर आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 03:12 नवीन
ह्याचा परिणाम असा होईल की अतिरिक्त भाजी पाला बाजारात नसेल टंचाई सदृश्य स्थिती निर्माण करून भाव नेहमी चढे असतील. अति खाजगी करण पासून जपलं पाहिजे हे जरी खरे असले तरी सरसकट खाजगी कारण म्हणजे वाईट असे कृपया धरून चालू नका जगात इतर देशात खाजगी ?भांडवलशाही आणि सरकारचे नियम/ धोरण / लक्ष आणि ग्राहकांचं हिताचं दृष्टीने केलेली त्याची अंमलबाजवणी हे सर्व एकमेकांशी मारामारी ना करता अस्तित्वात असू शकते याचा विचार करा ! शेती चे एक उद्धरण देतो ( लोकसंखय आणि डॉलर कि रुपये हे बाजूला ठेवा तत्व म्हणून उदाहरण घ्या ) येथे अख्या देशातील भाजी पाल/ किरणमाळ याचे वितरण करण्याची मक्तेदारी जवळ जवळ ३-४ मोठ्या उद्योगांकडे आहे पूर्वी फक्त २ सुपरमार्केट चे ब्रँड होते पुढे एक जर्मन उद्योगने त्यात उडी मारली इत्यादी - शेतीमध्ये आणि पदार्थ बनवणे ( फूड प्रोसससिंग) आधुनिक यांत्रिक कारणाचा प्रचंड प्रमाणात उपयोग केला जातो याचा फायदा सगळ्यांनाच होतो फक्त दलालांना नाही - ग्राहकांचं दृष्टीने मागणी तसा पुरवठा + शेतीतील चढ उतार प्रमाणात त्याच भाजी चा भाव हा कधी एकदम स्वस्त कधी २-३ पट असे होते... याचा अर्थ मधले दलाल पिळवणूक करतात असे कोणी म्हणत नाही.. शेवटी शेती हा व्यवसाय आहे आणि देशाचं "अन्न सुरक्षेसाठी पण आहे" याचा मध्य घाटहून धोरण आहे.. उगाच टोकाचे तत्व घेतलेत तर एक तर ट्रम्प दादा किंवा कम्युनिसीम... भारतात नेहमीच भांडवशाही आणि सहकारी तत्वे/ समाजवाद याचे मिश्रण चालणार.. कुठलेच टोक गाठून काही उपयोग नाही
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/23/2020 - 13:16 नवीन
दर मिळतो म्हणून आपला शेतकरी यूपीत ऊस कशाला घालेल ? ऊस घालणे म्हणजे खासदारकी नव्हे , सोयीचा वाटतो तर भरा वाराणशीतून अर्ज शेतीचा माल नाशवंत असतो धान्य , आयुर्वेदिक बिया वगैरे नाशवंत नसते , पण ते साठवायला इतकी जागा व खर्च येईल की त्यापेक्षा शेतकरी विकून मोकळा होतो व पुढच्या नांगरणी पेरणीला लागतो
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/24/2020 - 13:13 नवीन
शेतकर्‍याला उस विकण्याकरता, APMC बंधनकारक आहे का सध्या ? आणि आतंरराज्यीय उसविक्रिबद्दल म्हणाल तर आजही, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हातून मोठ्या प्रमाणात उस शेजारच्या कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याय दिला जातो.
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/24/2020 - 14:21 नवीन
पण एका विशिष्ट अंतरातच जातो नैतर ऊस वाळून उतारा कमी येईल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/24/2020 - 16:21 नवीन
उस वाळून उतारा कमी होईल की उसाचे वजन ? बर ज्या कारखान्यांचा स्वत:चा उस आहे, ते गाळपाआधी उस पेटवून मग त्याचे गाळप करतात, असे का असावे बरे ?
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/24/2020 - 18:58 नवीन
ऊस पेटला असला की गाळपाला अनुकम्पा तत्वावर पहिला नंबर मिळतो , म्हणून लबाड लोक थोडेसे जाळतात व पहिला नंबर घेतात , असे ऐकून आहे ( ओपीडित टीबी , खोकणारा, म्हातारा, गर्भिणी असेल तर त्यांना आधी आत घ्यावे लागते , आमच्या भाषेत त्याला fast forwarding म्हणतात ,तसे काहिसे असावे )
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/24/2020 - 19:14 नवीन
काही फॉरिण कन्ट्रीत मुद्दाम फड जाळून जळका उस कारखान्यात घालायची प्रथा आहे, उसाला असलेली पर्ण संख्या, पाण्याचे प्रमाण अशा काही बाबीमुळे तिकडे ती प्रथाच आहे आपल्याकडे ऊस न जाळता नेतात ( बरे आहे , आम्ही लहानपणी ट्रेकटरच्या ट्रॉलीच्या मागून ऊस ओढून खात होतो , नैतर त्या आनंदास मुकलो असतो, आताची पोरे असा ऊस ओढून खातात का ? )
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 03:28 नवीन
https://www.bundysugar.com.au/education/process/harvesting.html हो अश्या दोन पद्धती असतात असे दिसतंय... पण आधी जाळला तर राशीला आणि साखरेला जलकट वास नाही का येणार? असो या ठिकाणी मळी पासून केलेल्या रम ला मात्र एक जलकट वास येतो हे मात्र खरे
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 10/03/2020 - 11:20 नवीन
दर मिळतो म्हणून आपला शेतकरी यूपीत ऊस कशाला घालेल ? ऊस घालणे म्हणजे खासदारकी नव्हे , सोयीचा वाटतो तर भरा वाराणशीतून अर्ज
खासदारकी काय आणि ऊस काय दोन्हीसाठी शेवटी बाजारपेठ महत्वाची! जर ऊसाला चांगला दर आणी ग्राहक मिळत असतील तर आपला शेतकरी वाराणशीत/यूपीत ऊस कशाला नाही घालणार? आणि निकृष्ट प्रतीचा, वाळलेला, कमी उताऱ्याचा ऊस असला तरी त्याला जर वायनाड/केरळ मधे ग्राहक मिळत असतील तर तो तिकडेही नेऊन घालायची मोकळीक त्याला असेलच की! Image removed.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/03/2020 - 12:13 नवीन
केरळातला आणि वारांनशीतला साक्षरता दर किती आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 10/03/2020 - 16:05 नवीन
केरळातला आणि वारांनशीतला साक्षरता दर किती आहे ?
साक्षरता दराचा बाजारपेठेवर काही प्रभाव पडत असेल तर धर्माचाही प्रभाव तिच्यावर नक्कीच पडत असेल नाही का? जालावरील उपलब्ध माहितीनुसार (जनगणना २०११) वायनाड मधील साक्षरता दर ८९.३२% जो संपूर्ण केरळच्या एकूण ९४% साक्षरता दराच्या तुलनेत सर्वात कमी आहे! लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ४९.४८% आणि मुस्लीम, ख्रिस्चन व इतर धर्मियांचे प्रमाण ५०.५२%. वाराणसीचा साक्षरता दर ७७.०५% जो संपूर्ण उत्तर प्रदेशच्या एकूण ६७.६८ साक्षरता दराच्या तुलनेत बराच जास्त आहे! लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ८४.५२% आणि इतर धर्मियांचे प्रमाण १५.४८%. चलाख व्यापारी आपल्या सोयीची/फायद्याची बाजारपेठ अचूक निवडतात आणि त्यात वावगे काही नाही! तशी शेतकऱ्यांना पण ती निवडण्याची मोकळीक मिळू द्या की! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/24/2020 - 15:47 नवीन
किती अंतर हो ते? २४ तासात काही ऊस वाळत नाही. ट्रक ३५ किमी ताशी म्हणालात तरी २४ तासात ४०० किमी त्रिज्येच्या ५ लाख चौरस किमी क्षेत्रात ऊस टाकता येतो. उगाच काहींच्या काही
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/24/2020 - 18:52 नवीन
50 किमी ऐवजी 400 किलोमीटर वर ऊस टाकायचा तर 8 पट खर्च वाढेल शिवाय , ऊस तोडायला ज्या टोळ्या येतात , त्याही कारखाण्याकडून ठरवून आलेल्या असतात, कारखाना 400 किलोमीटरवर टोळी कशाला पाठवेल ? 400 कीमीवर टोळी पाठवा मग 400 किमीवर ऊस आणा आणि मग शेतकर्याला कारखाने दहा किलो साखर देतात , ते आणायला विमानातून जायचे का ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 09/24/2020 - 19:43 नवीन
एखाद्याने 500रु जास्त भाव दिला तर कदाचित परवडेल ही 400 किमी जाणे..
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/24/2020 - 19:50 नवीन
कारखान्याला नाही परवडणार 500 किमीवर उस तोडायला टोळी पाठवणे https://m.lokmat.com/maharashtra/harvesters-transcript-transcript/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/25/2020 - 06:24 नवीन
50 किमी ऐवजी 400 किलोमीटर वर ऊस टाकायचा तर

8 पट खर्च वाढेल

काहीतरी भंपक प्रतिसाद द्यायचा. ५० वरून थेट ४०० किमी? ५० किमी चे १०० किमी झाले तरी क्षेत्रफळ चौपट होते हा गणिताचा मूलभूत सिद्धांत आहे आणि टोळी नेणे आणणे ऊस भरणे पोचवणे याला जितका वेळ लागतो तो लागणारच आहे. त्यापेक्षा ५० किमी अधिक नेण्यास सव्वा तास आणि केवळ थोडे अधिक डिझेल लागते. म्हणे आठपट. गणितात जेमतेम पास झालात काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा