Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शिवसेनेचे हे काय चाललय

व
विजुभाऊ
Wed, 09/09/2020 - 09:42
🗣 293 प्रतिसाद
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 108943 views

🗣 चर्चा (293)
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 02/25/2022 - 07:11 नवीन
शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का?
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 02/25/2022 - 07:29 नवीन
शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का?
ह्यावर काय उत्तर अपेक्षित आहे?
मुळातच शिवसेना मराठी माणसांना न्याय ह्या मुद्द्यावर स्थापन झाली होती. त्या पक्षाने राष्टीय स्वप्ने पाहणे म्हणजे किती शहाणपणाचे? असल्या उद्योगामध्ये आहे तो हक्काचा मराठी मतदार सोडुन जायचा.
ह्याबद्दल बोला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 07:44 नवीन
शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का? शिवसेनेने जे करायचे ते करावे निदान दुटप्पी पणा करू नये एवढेच म्हणणे आहे. श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने” (Eunuchs now down to Sonia) This is what Balasaheb Thackeray thought about the Congress & Sonia Gandhi! पहा गुगलून जर बाळासाहबांच्या मार्गावर चालायचे नसेल तर निदान त्यांचे नाव घेऊन मते मागू नका किंवा त्यांना वचन दिले म्हणून येन केन प्रकारेण काँग्रेस / रा कॉं च्या कुबड्या लावून मुख्यमंत्री पद घेऊ नका एवढेच म्हणणे आहे
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 02/25/2022 - 08:26 नवीन
ही bjp ला प्रिय होती,bjp सेना युती खूप वर्ष होती.सेना नालायक होती तर bjp नी त्यांच्या शी युती च का केली. ती पण अनेक वर्ष. आता पण सेने नी युती तोडली नाही तर आज पण bjp नी सेनेच्या गळ्यात गळे च घातले असते. युती कोणी तोडली? असा प्रश्न जाहीर रीत्या bjp च्या कोणत्या ही मोठ्या नेत्याला विचार . तो उत्तर देईल सेने नी. पण कोणताच bjp नेता जाहीर पने असे आक पण बोलू शकतं नाही की. सेना नालायक पक्ष होता म्हणून आम्हीच युती तोडली. बाकी शिवसेना नी मुंबई मधील मराठी लोकांसाठी खूप काही केले आहे. मराठी कलाकार,मराठी दुकान दार,रिक्षावाले,टॅक्सी वाले. गरीब कष्टाळू मराठी लोकांना सेने नी आधार दिला आहे. ते प्रामाणिक पना असेल तर कोणी ही मान्य करेल. ९३ च्या दंगलीत शिवसेना होती म्हणून हिंदू वाचले हे पण सत्य च आहे. Bjp चे सर्व कार्यकर्ते गायब होते जेव्हा हिंदू संकटात होते तेव्हा. त्या मुळे bjp नी तरी सेने वर टीका करू नये. ठाकरे नी फक्त डोळा मारला तरी फडणवीस सकाळी सकाळी सरकार स्थापन करायला येतील. अजून त्यांना आस आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/25/2022 - 08:38 नवीन
हाच प्रश्न उलटाही विचारता येऊ शकेल. इतकी वर्षे भाजपशी युती होती मग अचानक भाजप वाईट कसा दिसायला लागला? कसं असतं काही लोकांची एक वाईट सवय असते- आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं बघायचं वाकून. आधी या प्रश्नाचे काय ते बघा आणि मग इतरांना प्रश्न विचारायला जा. त्यावर तुमचे उत्तर असेल की वाजपेयी-अडवाणींचा भाजप वेगळा होता आणि मोदी-शहांचा भाजप वेगळा आहे तर त्याचप्रमाणे आम्ही पण म्हणतो की बाळासाहेब असतानाची शिवसेना वेगळी होती आणि आताची शिवसेना वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 02/25/2022 - 08:57 नवीन
अडवाणी ,वाजपेयी जी चा bjp आणि मोदी जी ,आणि अमित शह जी. ज्यांचा bjp एकच आहे. तेव्हा प्रमोद महाजन आणि मुंडे जी होते ते दोन्ही पक्षात समन्वय ठेवत होते. आज फडणवीस आणि चंद्रकांत जी आहेत त्यांना तो समतोल राखता आला नाही. युती तुटण्याच्या पाठी हेच कारण असावे. फडणवीस मुख्य मंत्री असताना सेने च्या आमदार च्या भागातील काम होवू न देणे. लोकप्रिय योजना राबवताना युती चा धर्म न पाळणे. असले राजकारण करत होते . आणि असे राजकारण राष्ट्रवादी करते. सेने चा समज होणे साहजिक आहे की फडणवीस ऐन वेळी राष्ट्रवादी शी युती करवून . सेने ला तोंडावर पाडतील. त्याचा परिणाम म्हणून आज जी स्थिती आहे ती आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 02/25/2022 - 14:42 नवीन
शिवसेनेने जे करायचे ते शिवसेनेने दुटप्पीपणा केलेला नाही, कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही, २०१४ ते २०१९ सेनेला सत्तेत डावलणे, केंद्रात दुय्यम दर्जाचे मंत्रीपद देणे वगैरे प्रकार भाजपने केले, २०१९ ला युती असुनही सेने विरोधात भाजपने ठिकठिकाणी बंडखोर ऊभे केले होते. ह्याचा वचपा सेनेने वेळ आल्यावर बरोबर घेतला. भाजपची साथ सोडणे हा ठाकरेंच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम निर्णय होता. सेनेने भाजपला संधीदिली होती पण भाजपने पहाटेच्या शपथेने माती खाल्ली, नी सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले. ईतकीच जर भाजपला हिंदूत्व नी सेनेची काळजी होती तर द्यायचं होतं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद. आताही बाहेरून पाठींबा देऊ शकतात सेनेला. पण नाही भाजपला हवी आहे फक्त नी फक्त सत्ता. त्यासाठी कुठलंही कपट करायला भाजपेई तयार असतात. मग सत्तेसाठी पहाटे अजित दादांबरोबर शपथ घ्यायची असो की मातोश्री पुढे नतमस्तक व्हायचे असो. थोडक्यात “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा“ “कपटी भाजप पेक्षा दिलदार काॅंग्रेस पक्ष कधीही चांगला.”
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 15:20 नवीन
कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले

श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने”

शिवसेनेने काँग्रेसच कशाला हवं तर दाऊद इब्राहिम /ओवैसींशी सुद्धा युती करावी. पण निदान बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होउ नये म्हणून त्यांच्या नावाची ग्वाही देणे, त्यांना वचन दिले होते म्हणून मुख्यमंत्री झालो सांगणे आणि त्यांच्या नावाने मते मागणे असले दुटप्पीपणा करणे बंद करावे इतकेच म्हणणे आहे. अर्थात तुमचे एकंदर प्रतिसाद पाहून तुम्ही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार हे माहिती होतेच पण तुमचाही दांभिकपणा उघड करावा म्हणून हा प्रतिसाद होता
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 02/25/2022 - 15:54 नवीन
काहीही. असो. भाजपच्या करटावर तुम्ही मौन पाळनार हे माहीत होते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 02/25/2022 - 14:32 नवीन
मराठी मतदार सेनेच्या पाठी नेहमी राहील त्यामुळे काळजी करू नये.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 15:21 नवीन
मराठी मतदार सेनेच्या पाठी नेहमी राहील फक्त मराठी माणूस सेनेच्या पाठी जोडे घेऊन (मारायला) राहील असे काही करू नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/25/2022 - 18:17 नवीन
सहमत. मराठी मतदार नेहमीच आपल्या पाठीशी असेल ही खात्री असल्यानेच का महापालिका निवडणुक वेळेत घेतली जात नाहीये? मुंबई महापालिकेची मुदत निदान फेब्रुवारी २०२२ मध्ये तरी संपत आहे. इतर काही महापालिकांच्या (नवी मुंबई वगैरे) सप्टेंबर २०२० मध्येच संपली तरी अजून निवडणुक घेण्यासाठी कोणतीही हालचाल दिसत नाही. विधानपरिषदेची निवडणुक अप्रत्यक्ष होणार होती म्हणजे स्थानिक जिल्हा परिषद, महापालिका वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य त्यात मत देणार होते तरीही ती निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. म्हणजे प्रत्यक्ष मतदार तर सोडाच आपल्याच महाभकास आघाडीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यही आपल्यामागे नसतील ही खात्री असल्याने निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते का? त्यात महापालिका निवडणुक वगैरे स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते. तरीही या सरकारची कामगिरीच इतकी दिव्य आहे की महापालिका निवडणुकांमध्येही त्याचा त्रास आपल्याला होईल याची खात्री आहे म्हणून निवडणुका टाळल्या जात आहेत का? बघू. घोडामैदान फार लांब नाही. कधीतरी निवडणुक घ्यावीच लागेल.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 02/25/2022 - 18:24 नवीन
पर प्रांतीय लोकांची संख्या खूप वाढत आहे रोजगार मिळण्याचे एक मेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र मधील शहर हे सूत्र च देश पातळीवर आहे. महाराष्ट्र नी आयुक्त ना जास्त अधिकार देवून नगरसेवक चे अधिकार कमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी चा वापर करावा मुंबई महानगर पालिका निवडणूक म्हणजे राज्य सरकार च्या कामाची पोच पावती नसते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/25/2022 - 18:34 नवीन
मुंबई महानगर पालिका निवडणूक म्हणजे राज्य सरकार च्या कामाची पोच पावती नसते.
नसतेच की. मी कधी म्हटले आहे? पण मग तरीही मुंबई महापालिका निवडणुक घेण्याच्या दृष्टीने काहीच पावले का नाहीत? नवी मुंबई महापालिकेची मुदत संपून दीड वर्ष झाले तरी तिथे निवडणुक घेण्यासाठी काहीही का केले जात नाहीये? राज्य सरकार नक्की कशाला घाबरले आहे?
पर प्रांतीय लोकांची संख्या खूप वाढत आहे महाराष्ट्र नी आयुक्त ना जास्त अधिकार देवून नगरसेवक चे अधिकार कमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी चा वापर करावा
बोंबला. कालपरवाच कोणीतरी उत्तर प्रदेशात जाऊन मुंबईतील अर्धे लोक हिंदी बोलतात असे म्हटले होते ना? मुंबई तुमचे घर आहे असे पण कोणीतरी बोलले होते ना? मग परप्रांतीय म्हणजे नक्की काय? कुठून आले ते?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/26/2022 - 05:26 नवीन
कुठं त्यांच्या नादाला लागताय डाव्या मेंदूला माहिती नाही उजवा मेंदू काय करतोय आणि तसेच उलटे. (ACC) हा एक आजार आहे. ज्यात मेंदूच्या दावा आणि उजव्या भागाला जोडणाऱ्या नसा ( केबल्स) नीट तयारच होत नाहीत. Agenesis of the corpus callosum (ACC) is a birth defect that affects the brain when the development of the corpus callosum, the band of white matter connecting the two hemispheres in the brain, in the embryo is disrupted. The corpus callosum is a thick bundle of nerve fibers that connects the right and left hemispheres (halves) of the brain.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/26/2022 - 06:17 नवीन
माझ्या पोस्ट समजायला तुम्हाला वेळ लागेल.आणि लागतो पण. 1)मी कॉमेंट महानगर पालिका निवडणुकीवर दिली होती २) निवडणुका पुढे नेल्या जात आहेत .राज्य सरकार उस्तुक नाही असे चंद्र सूर्य कुमार ह्यांची पोस्ट होती. ३) त्याचे उत्तर म्हणून मी जे लिहलेले आहे त्याचा अर्थ लपलेला असा आहे. ," मुंबई किंवा नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत परप्रांतीय लोकांचे बहु मतं आहे.हे परप्रांतीय लोक सेना किंवा महाराष्ट्र वादी लोकांस मत देत नाहीत.त्यामुळे ह्या महानगर पालिका bjp परप्रांतीय यूपी,बिहारी,गुजराती ह्यांच्या जोरावर जिंकेल. तेव्हा राज्य सरकार नी त्यांच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर सेवक आणि महापौर ह्यांचे अधिकार कमी करावेत आणि तो अधिकार आयुक्तांना द्यावा" मर्जी मधील मराठी आयुक्त तिथे नियुक्त करून मराठी लोकांचीच सत्ता महानगर पालिकेत पण राहील. अशी खेळी खेळता येईल आणि असे अधिकार राज्य सरकार ला आहेत. असा सर्व अर्थ आहे त्याचा. खरे तुम्हाला राजकीय पोस्ट वरचे खाच खळगे कळत नाहीत चंद्रसूर्य कुमार ह्यांना माझ्या पोस्ट चा अर्थ समजला पण तुम्हाला नाही समजला.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 02/26/2022 - 18:31 नवीन
परप्रांतीय लोक सेना किंवा महाराष्ट्र वादी लोकांस मत देत नाहीत.त्यामुळे ह्या महानगर पालिका bjp परप्रांतीय यूपी,बिहारी,गुजराती ह्यांच्या जोरावर जिंकेल. तेव्हा राज्य सरकार नी त्यांच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर सेवक आणि महापौर ह्यांचे अधिकार कमी करावेत आणि तो अधिकार आयुक्तांना द्यावा"
म्हणजे लोक आपल्याला मते देत नाहीत हे लक्षात आल्यावर निर्वाचित प्रतिनिधींचे अधिकार कमी करावेत? वा वा.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 02/24/2022 - 15:34 नवीन
विश्वास ठेवायचा नसतो.मग तो कोणता ही राजकीय पक्ष असू ध्या. ज्या दिवशी लोकांना हे समजेल तो सुदिन
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 02/25/2022 - 08:06 नवीन
अजुन एक मुक्तफळ राऊतांना शिवसेना बरबाद करुन बहुदा आप किंवा काँग्रेसमध्ये जायची योजना दिसते आहे.
२०२४ साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते असंही यावेळी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी बोलताना देशात यापेक्षा वेगळं वातावरण दिसत नाही असं म्हटलं आहे. https://www.loksatta.com/mumbai/shivsena-sanjay-raut-saamana-editorial-narendra-modi-amit-shah-investigation-agencies-sgy-87-2819099/
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/25/2022 - 08:13 नवीन
म्हणूनच संजय राऊत मला जाम आवडतात. शिवसेनेच्या १०० कट्टर विरोधकांना जे जमले नसते ते सहजपणे संजय राऊत एकहाती करत आहेत.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 02/25/2022 - 08:15 नवीन
शिवसेना मराठी माणसांच्या हितासाठी, मुळ उद्देशासाठी टिकुन राहावी असे वाटते. पण हल्लीचे माकडचाळे आणि कोंलाटउड्या बघुन हळु हळु तीही इच्छा कमी होउ लागली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 02/25/2022 - 18:19 नवीन
“शिवसेनेचा आवाज तोच आहे. त्यातला खणखणीतपणाही तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची आदित्यला धरलं तर सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर सुरुवातीला टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला अजूनही वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. प्रत्येक काळ वेगळा असतो. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर देखील त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. दगडाचीच मूर्ती होते. त्यानंतर तिच्यावर फुलं वाहायची असतात ! ” - उद्धव ठाकरे (लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक किरीश गुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी घेतली त्यातील उद्गार )
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 04:21 नवीन
हटाव लुंगी और बजाव पुंगी... ते.... भय्ये पण आपलेच .... व्हाया .... केम छो वरली आणि जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.. आणि तरीही काही मागुघपा जनतेला, शिवसेना मराठी माणसांना न्याय देणारी वाटते... इतकेच जर शिवसेनेला मराठी आणि हिंदू माणसांचा कळवळा होता तर, गिरणी कामगारांना घरे का नाही दिली?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/26/2022 - 19:25 नवीन
सेने न च नाही तर कोणत्याच पक्षांनी गिरणी कामगार ना घरे देण्यात इंटरेस्ट दाखवला नाही त्या मध्ये bjp पण आहे. आर्थिक फायदा जिथे असेल तिथे पक्षा मधील सीमा रेषा नष्ट होवून ते एक होतात. हजारो उदाहरण आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 02/26/2022 - 19:44 नवीन
+१ सहमत. ऊदाहरनार्थ टोल वसुली. ती २०१४ ते २०१९ ह्या रामराज्यात ही जोरातच होती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/26/2022 - 05:22 नवीन
तिच्यावर फुलं वाहायची असतात अगदी अगदी मला पहा आणि फुलं वाहा!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 02/26/2022 - 08:02 नवीन
नुसती फुलं नाही तर भिंतीला फोटो टांगून हार देखील घालू ! हा .... हा .... हा .... ! जय मराठी, जय शिवसेना, जय महाराष्ट्र !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 02/26/2022 - 07:40 नवीन
- उद्धव ठाकरे (लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक किरीश गुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी घेतली त्यातील उद्गार ) तुम्हाला "मुलाखत" म्हणायचे असावे असे गृहीत धरतो. :))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 02/26/2022 - 11:37 नवीन
राउत आणि नबाब हे एकाच माळेचे मणी आहेत. एकूणातच राऊत बहुतेक सेनेचे दुसरे मुख्यमंत्री व्हायचा प्लॅन करताहेत. ( अर्थात बारामतीच्या काकांंच्या मांडीवर बसून ). पण त्यांना हे माहीत नसावे की बारामतीचे काका काय करतील ते स्वतःही सांगु शकत नाहीत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 12:58 नवीन
पण, त्यांच्या दुर्दैवाने, ते ज्या पक्षाच्या खांद्यावर हात ठेवतात, ते पक्ष लयाला जातात किंवा डबघाईस येतात... शेकाप, कॉंग्रेस, मनसे ही उदाहरणे पुरेशी आहेत .... वैयक्तिक सांगायचे तर, शरद पवार यांना, काळाची पावले व्यवस्थित ओळखता येतात. त्यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. भरपूर वाचन, उत्तम स्मरणशक्ती, हे त्यांचे चांगले गूण आहेत ... पण उदारमतवादी हिंदू हा त्यांचा, माझ्या दृष्टीने अवगूण आहे.... खरंतर, मुंढे घराणे, ठाकरे घराणे इतकेच कशाला, छत्रपती भोसले घराणे पण आज शरद पवारच एकत्र आणू शकतात .... समजा, ही तिन्ही घराणी एकत्र झाली तर हिंदू नक्कीच एकाच व्यासपीठावर येतील.... एक हिंदू म्हणून, शरद पवार यांच्या कडून, माझी तरी इतकीच अपेक्षा आहे...
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 02/26/2022 - 13:47 नवीन
हे जुन्या पिढी मधील नेते आहेत.तेव्हाच्या नेत्यांचे एक वैशिष्ट होते त्यांचा लोकांशी संपर्क असायचा. आपल्या मतदार संघात किंवा राज्यात कोणत्या गोष्टी च गरज आहे. विविध क्षेत्रात प्रगती करायची असेल तर प्रतेक क्षेत्राची गरज काय आहे . ह्याची उत्तम जाणीव त्या नेत्यांना होती. महाराष्ट्रात असंख्य दिग्गज नेते त्या काळात आणि अगोदर होऊन गेले. त्या मधील एक म्हणजे शरद पवार. आज कोणत्या ही नेत्याचे उदाहरण घ्या राजकारण हा धंदा केला आहे. त्यांना कोणत्याच प्रश्नांची जाण नाही. विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास नाही. विरोधी विचार पण ऐकून घेण्याची कुवत नाही. सर्व उथळ,लोक नेते म्हणून मिरवत आहेत. त्या मुळे शरद पवार सर्वात उठून दिसतात. ते राजकारण कसे करतात,डावपेच कसे खेळतात तो विषय पूर्ण वेगळा आहे. अभ्यासू,प्रामाणिक,कष्टाळू, राजकीय नेत्यांचा काळ निघून गेला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/26/2022 - 15:25 नवीन
शरद पवार सर्वात उठून दिसतात. उठूनच काय बसूनही दिसत नाहीत. ज्यांना स्वबळावर एकदाही मुख्यमंत्री होता आले नाही. एकदाही कारकिर्दीची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत. एकदाही पूर्ण १० खासदार निवडून आणता आले नाहीत एकदाही २८८ पैकी ७५ आमदार निवडून आणता आले नाहीत केवळ सर्वाना ( पत्रकार पोलीस बाबू इ लोकांना) सरकारी कोट्यात घर, भूखंड, बारचा परवाना सारख्या खिरापती वाटून त्यानी मिंधे करून ठेवलेले आहे. यामुळे सहसा पत्रकार आणि इतर त्यांच्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. (खाल्ल्या मिठाला जागणे) ( हे श्री स्वामिनाथन अंकलेसारिया अय्यर या ख्यातनाम पत्रकाराने हिंदू वृत्तपत्रात लिहून ठेवले आहे. यांचे कनिष्ठ बंधू एके काळी भाजप चे स्टार प्रचारक होते श्री मणिशंकर अय्यर) ) त्यामुळे साहेब काहीही करू शकतात सारखे पालुपद त्यांचे चेले, चमचे, गुलाम, सदा सर्वकाळ आळवत असतात. सत्याचा आणि त्याचा दूरत्वाने सुद्धा संबंध नाही
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 02/26/2022 - 16:31 नवीन
पवारांचा बोट धरून राजकारणात आलो असं मोदी बोलले होते ना??
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 17:19 नवीन
आणि ते उपरोधिक बोलणे, माननीय शरद पवार यांना देखील समजले असेलच. कारण, खुद्द शरद पवार देखील कधीकधी उपरोधिक बोलतात.. आपण जसे एखाद्याला, "विद्वान", म्हणतो, तसेच आहे... मोदींची भाषा समजून घ्या... ते योगी, तेजस्वी सुर्या, हुकुमदेव नारायण यादव, यांच्या सारखे कधीकधी स्पष्ट बोलतात तर कधी उपरोधिक .... राजकारणी लोकांच्या भाषा समजून घेतल्या तरच, तारतम्यता अंगी बाणवता येते...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 02/26/2022 - 19:13 नवीन
आणि ते उपरोधिक बोलणे ते ऊपरोधीक वगैरे असं काहीही बोलले नव्हते.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 02/27/2022 - 06:31 नवीन
अलिकडेच तुम्हाला मिपावरील ज्येष्ठ व अर्थातच, एमिमंट वगैरे विचारवंत अ.बा. ह्यांनी 'विचारांतील गोंधळ कमी करा' अशा अर्थाचा सल्ला दिलाच होता. आता येथे पहा, त्यांना मोदी उपरोधिक वगैरे काही बोलले नव्हते, हे ठामपणे कसे सांगता आले? त्यामगे त्यांचा प्रखर अभ्यास, मनन व चिंतन आहे. ते येतेहे जे काही पिंकतात, त्यामागे हे सर्व काही आहे. तेव्हा हे लक्षांत घ्या त्यांच्याशी प्रतिवाद करतांना.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 02/27/2022 - 07:36 नवीन
खिक्क. सर मी ज्येष्ठ नाही नी एमीमंट तर आजिबात नाही. :) पण मुवि काकांचे एका बाजूला झूकलेले विचार दाखवतो. ईतर पक्षाना घराणेशाही वरून बोलायचे पण जय शहा, राणे, विखे, फडणवीस ह्या कुटूंबातील घराणेशाहीबद्दल मुवीकीका मूग गिळून गप्प बसतात. सेनेने भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्व सोडले प्रकारचे महान विचार :) भाजप म्हणजे हिंदूत्व ख्या ख्या. पुणे महापालिकेतील काहीतरी भ्रष्टाचारामुळे राज्य सरकारला जबाबदार धरणे. आता मोदी पवाराना गुरू मानताहेत पण मुवीकाकाना मोदींचे गुरू पवार म्हणून स्विकारले जात नाहीत. : ) ऊद्या ह्याच पवारांचेया पाठींब्याने भाजप सत्तेत परतली तर पवार मोदींचेच नाही तर बायडन, पुतीन ह्यांचेही गुर आहेत असं मुवीकाका ईथेच जाहीर करतील. :)
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 02/26/2022 - 17:34 नवीन
यामुळे सहसा पत्रकार आणि इतर त्यांच्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. (खाल्ल्या मिठाला जागणे)
तो निळू दामले बऱ्याच दिवसांनी टीव्ही वर मोदींविरुद्ध गरळ ओकताना दिसला. लवासा नावाचं पुस्तक त्यानेच लिहिलं होतं ना?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 02/26/2022 - 14:32 नवीन
शिवसेना इन उत्तर प्रदेश
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 17:22 नवीन
भारी आहे
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/23/2022 - 09:54 नवीन
ह्या प्रश्नाचे उत्तर विजुभाऊ तुम्हाला येथे मिळेल. https://www.misalpav.com/node/50363
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 06/24/2022 - 11:26 नवीन
धागा काढून जवळजवळ दोन वर्षे झाली. पण काही प्रतिसाद वाचताना हा धागा कालच काढल्यासारखा वाटतोय. सेनेच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. राऊत अधीकच बरळत चाललेत. राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी झालेली आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/24/2022 - 15:22 नवीन
राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी झालेली आहे हा आपला स्पष्ट गैरसमज आहे १०० % गोष्टीत अधिक काही कसं मिळवता येईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा