Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शिवसेनेचे हे काय चाललय

व
विजुभाऊ
Wed, 09/09/2020 - 09:42
🗣 293 प्रतिसाद
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 108943 views

🗣 चर्चा (293)
आ
आनन्दा Fri, 09/11/2020 - 11:32 नवीन
असु द्या हो, ते राहुल गांधीमध्ये भविष्यातील नेता शोधतात.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 09/11/2020 - 13:52 नवीन
गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है ! ... ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे. आणि शिवसेनेसारखे पक्ष संपलेलेच बरे ! राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांना राजकीय नेते बनावण्याचा आद्य मान शिवसेनेचा आहे .. त्यानंतर बाकीच्यानी त्याची री ओढली कारण तोपर्यत तोच नोर्म झाला होता .. तोच यशाचा राजमार्ग झाला होता.. एक लोकशाही समर्थक म्हणून शिवसेना लवकरात लवकर संपावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ... कसलिही नीतीमत्ता नाही , तत्वे नाहीत , धोरण नाही , केवळ खंडणीखोरी , घराणेशाही आणि राडा ! अर्वाच्य बोलणे आणी शिवराळ भाषा ! कधी मराठी झेंडा, कधी हिन्दुत्व आणि आता मुस्लिम लांगूलचालन ! यांच्यापेक्षा कोन्ग्रेस बरी , नपुसक सौभाग्यापेक्शा ढळढळीत वैधव्य बरे ! ज्याकाळात शिवसेना मुम्बईत फोपावली त्याकाळात मराठी मनामध्ये एक प्रचंड पोकळी होती .. बाळ ठाकरे या चतुर आणि चाणाक्ष मनुष्याने टायमिंग साधले आणी ते गॉडमन झाले ! अर्थात हे सारे काण्ग्रेसच्या आशीर्वादाने आणी क्रुतीशील साह्यानेच घडले .. बाकी मराठी माणासाचे कल्याण .. अस्मिता वगैरे अंधश्रद्धा आहेत ! त्यानी आपले आणि आपल्या घराण्याचे पद्धतशीर कल्याण करुन घेतले .. त्या ओघात काही गुंडानीही आपले उखळ पांढरे करुन घेतले .. मराठी माणसाचे काही भले झाले असेल तर तो साइड इफ्फेक्ट आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/11/2020 - 15:22 नवीन
गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है ! ... ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे. अगदी ! हे गीदड तर फार माजलेले असुन त्याला मरायची घाई झालेली दिसते हे त्याच्या कृतीतुन स्पष्टच आहे. कंगानेने काडी केली आणि हे गीदड गेले लगेच धावुन. तेल लावलेल्या पैलवानाने जशी विधाने करण्यास सुरुवात केली आहे त्यावरुन हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे कळुन येते. हे कमी होते म्हणुन एका न्यूज चॅनल त्यांच्या २ पत्रकारांनाच्या सुटकेसाठी आता National Human Rights Commission (NHRC) कडे गेले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 15:39 नवीन
विरोधी पक्षाच्या राज्यसरकार वर दबाव निर्माण करण्यासाठी केंद्रीय एजन्सी चा गैर वापर होत आहे. भारत हे संघ राज्य आहे ह्याचा विसर पडू नये. राज्य मानवी हक्क आयोग सुद्धा असतो त्या साठी केंद्रीय आयोग कडे जाण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 09/11/2020 - 15:42 नवीन
मी 100 वा शतकपूरतीबद्दल अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/11/2020 - 14:45 नवीन
श्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती १४३ कोटी आहे असे त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस दाखल केलेले शपथपत्रात लिहिलेले आहे. प्रबोधनकार पासून ते बाळ ठाकरे, श्री उद्धव ठाकरे ते श्री आदित्य ठाकरे यांचा कोणता असा व्यवसाय आहे ज्यात एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/11/2020 - 14:58 नवीन
असा व्यवसाय आहे ज्यात एवढी संपत्ती निर्माण होऊ शकते? फोटोग्राफितुन त्यांनी बक्कळ पैसा कमावला असणार बघा ! :))) बाकी इडी मुंबइत आलेली आहेच तर याचाही शोध घेण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 14:56 नवीन
शिवसेना नी हे प्रकरण योग्य पद्धती नी हाताळला की अयोग्य ह्याचे मोजपट्टी काय. राजकारणी लोकांच्या खेळी एवढ्या सरळ पण नसतात की त्या मधून आपल्या सारखी सामान्य लोक काही अर्थ पटकन काढू. पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल. अजित दादा,फडणीस एकत्र येवुन काही तासात केंद्र सरकार ला राष्ट्रपती राजवट हटवयला लावली नाही तर राष्ट्रपती राजवट हटलीच नसती. सुशांत च्या आत्म्हत्ये चे राजकारण होणार ह्याची खात्री नक्कीच त्यांना असणार. अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे. आता ncb ची दिशा आत्महत्या करायला प्रवृत्त केले हे सिद्ध करणे अशी आहे. म्हणजेच ते प्रकरण संपल्यात च जमा आहे. . कोणाला काय साध्य करायचे ह्याचा अंदाज प्रतेक जन वेगळा लावतोय.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 14:56 नवीन
शिवसेना नी हे प्रकरण योग्य पद्धती नी हाताळला की अयोग्य ह्याचे मोजपट्टी काय. राजकारणी लोकांच्या खेळी एवढ्या सरळ पण नसतात की त्या मधून आपल्या सारखी सामान्य लोक काही अर्थ पटकन काढू. पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल. अजित दादा,फडणीस एकत्र येवुन काही तासात केंद्र सरकार ला राष्ट्रपती राजवट हटवयला लावली नाही तर राष्ट्रपती राजवट हटलीच नसती. सुशांत च्या आत्म्हत्ये चे राजकारण होणार ह्याची खात्री नक्कीच त्यांना असणार. अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे. आता ncb ची दिशा आत्महत्या करायला प्रवृत्त केले हे सिद्ध करणे अशी आहे. म्हणजेच ते प्रकरण संपल्यात च जमा आहे. . कोणाला काय साध्य करायचे ह्याचा अंदाज प्रतेक जन वेगळा लावतोय.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 09/11/2020 - 19:02 नवीन
पवारांचे राजकारण कपटाचे असते हे एव्हाना उघड गुपित आहे. ह्यात बी.एम.सी मध्ये सत्ता शिवसेनेची आहे त्यामुळे पवारांनी सल्ला जरी दिला असला असता तरी आता ह्या कृत्याची जबाबदारी शिवसेनेकडे पक्षी उ.ठांकडेच जाते.मला तर वाटते हा सल्ला नक्की पवारांनीच दिला असावा.ह्यानिमित्ताने शिवसेनेला नवीन काही जनाधार तर मिळाला नाहे पण बर्याच जणांची नाराजी ओढवुन घेतलीये.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 09/11/2020 - 15:51 नवीन
"पवार सारखे नेतृत्व सत्तेत सहभागी आहे त्यांच्या सल्ला नक्कीच घेतला असेल." ज्येष्ठ म्हणून सल्ला घेतला असेल तर ठीक अन्यथा देशाच्या राजकारणात ममता बॅनर्जी,अखिलेश यादव पवारांपेक्षा उजवे ठरतील रे राजेशा. असो. "अजुन सुद्धा मुंबई पोलिस नी काय तपास केला हे गुलदस्त्याच आहे." हाच तर प्रोब्लेम आहे रे. तपास चोख असायला हवा होता. तो असता तर ही वेळ आली नसती असे आमचे मत.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Fri, 09/11/2020 - 15:55 नवीन
स्वतःच्या हाथाने पायावर धोन्डा मारून घेतायेत... राउत सूड उगवतोय की काय असेच वाटते आहे. :)
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 09/11/2020 - 16:42 नवीन
हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल.. या निमिताने एक नवीन शब्दार्थ समजला..!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 09/11/2020 - 17:34 नवीन
जाम नॉटी बुवा तुम्ही!! आयला काहीतरी घोळ झालेला दिसतोय. हरामखोर म्हणावं तरी प्रोब्लेम. आणि नॉटी म्हणावं तरी प्रोब्लेम.. काय करू आता?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/11/2020 - 18:56 नवीन
निवृत्त नौदल अधिकार्‍यास मारहाण झालेचे समोर आले आहे ! जर देशासाठी सेवा करणारे वयोवृद्ध या राज्यात सुरक्षित नसतील तर माझ्या सारख्या सामान्य जनतेला हेच गुंड ठार करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत ! राष्ट्रपतींनी या घटनेची त्वरित दखल घेउन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/12/2020 - 17:34 नवीन
राजकीय वैमनस्यातून यूपी आणि बिहार मध्ये खुले आम् दिवसा ढवळ्या राजकीय नेत्यांच्या किती तरी हत्या झाल्या आहेत आणि अजुन सुद्धा होतात तरी त्या दोन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा असा सूर निघत नाही. Maharashtra मधे राजकीय विरोधकांचा हत्या केल्या जात नाहीत त्या महाराष्ट्र ला हे हिंदू भाषिक नेते शहाणपण शिकवत असतात ते नीतिमत्ता मध्ये बसते का.? त्यांना तो नैतिक अधिकार आहे का?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 09/12/2020 - 17:45 नवीन
हत्या केल्या जाईपर्यंत वाट बघावी असे म्हणताय का?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/11/2020 - 19:08 नवीन
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी ही मागणी आता सगळ्या जनतेनी केली पाहिजे, कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे त्याची प्रतिष्ठाच आज मातीमोल करण्यात आली आहे. हे लोक आता दंगल घडवुन आणायला देखील मागे-पुढे पाहणार नाहीत अशी भिती सामान्य जनतेला वाटत आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 20:07 नवीन
केंद्रीय सत्ता मुजोर होवून हुकुमशाही कडे देश जाईल ह्याची शक्यता राज्य घटना लीहताना विचारात घेतली आहे. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते,किती दिवस जास्तीत जास्त लावली जाते ह्या विषयी नियम आहेत. काँग्रेस नी सुद्धा हे खेळ खेळले आहेत मनमानी पना गृहयुद्ध कडे घेवून जाईल. अर्णव म्हणतो म्हणून आणि कोणी तरी निवृत्त अधिकारी ज्यांनी आता bjp स्वीकारली असेल राष्ट्रपती राजवट लावता येत नाही .सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल आणि मतदार ची सहनभुत bjp हरवून बसेल हे न समजण्या एवढे bjp चे केंद्रीय नेतृत्व मूर्ख नाही.. अर्णव मूर्ख सारखी बडबड करत आहे . फक्त प्रांतीय द्वेष मुळे महाराष्ट्र सरकार विरूद्ध उत्तर भारतून अर्णव ला समर्थन मिळत आहे. तो मोठा शहना आहे म्हणून नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/12/2020 - 03:12 नवीन
म्हणजे सेने जे केले आणि राउत जे बोलले त्यात काहीच चूकले नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला? सेनेच्या धाकामुळे ( भीतिमुळे ) मराठी चॅनेल्स या बाबत फारशी चर्चा करत नाहियेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/11/2020 - 20:33 नवीन
कारभारी दमाने घ्या ! राष्ट्रपती राजवट कधी लागते याचा अभ्यास करा, महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करा, त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 21:04 नवीन
राष्ट्रपती राजवट न्यायालय च्या पूनारलोकान कक्षात येते आणि मनमानी पद्धती नी लादलेली राष्ट्रपती राजवट न्यायालय रद्द करू शकते. आणि त्याच सरकार ची पूनारस्थपणा करू शकते राष्ट्रपती राजवट विषयी dr Babasaheb Ambedkar बोलले होते अगदी शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लादली जावी . आणि ती लोकशाही वाचवण्या साठी असावी लोकशाही चा गळा घोटण्यासाठी नाही. 1994 मधील बोंबई घातल्या नंतर राष्ट्रपती राजवट लावण्या वर सर्वोच्च न्यायालय नी बंधने घातली आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/12/2020 - 04:53 नवीन
राष्ट्रपती राजवट कधी लागते याचा अभ्यास करा, महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करा, त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या मुनी राष्ट्रपती लागवट कधी लागते याचा नक्कीच अभ्यास करावयास हवा. महाराष्ट्रातील क्राईम इंडेक्स, इतर राज्यातील क्राईम इंडेक्स यांची तुलना करुन मागिल राष्ट्रपती राजवट लागली नव्हती हे आपणास माहित नाही याचे मात्र नवल वाटले नाही ! महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नाही म्हणुन ११ दिवस याच राज्यात राष्ट्रपती राजवट लागु होती. घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालत नसेल तरी राष्ट्रपती राजवट लागू केली जाउ शकते. त्याचे व्हिडीओ इथे पोस्ट करा, मग जनतेला ठरवू द्या नेहमी प्रमाणेच तुमच्या सवयी नुसार दिलेला व्हिडियो न पाहताच तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, कारण मी दिलेल्या पहिल्या व्हिडियो मध्येच माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मुलीने त्यांच्या वडिलांना झालेल्या अमानुष मारहाणी नंतर घाबरलेल्या / भेदरलेल्या अवस्थेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली आहे. माझ्या निरिक्षणा नुसार मी दिलेले एकही व्हिडियो न पाहता तुम्ही नेहमी प्रतिसाद देता आणि वर मलाच कधी व्हिडियो पोष्ट करावेत या बद्धल सुचना करता हे हास्यास्पद आहे. ज्या राज्यात छत्रपतींच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जाते त्याच राज्यात साधुंना पोलिसांच्या समोरच ठार केले जाते, एका स्त्रीवर सुडात्मक पद्धतीने कारवाई करुन तिचे घर / ऑफिस उध्वस्त केले जाते, पत्रकारांना तुरुंगात टाकले जाते आणि ६२ वर्षाच्या माजी नौदल अधिकार्‍यास डोळा लाल होइ पर्यंत अमानुष मारहाण केली जाते त्या राज्यात घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालते आहे का ? हा प्रश्न नक्कीच विचारला जाउ शकतो आणि म्हणुनच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली जाउ शकते. जाता जाता :- दुसर्‍यांना अभ्यासाचे सल्ले देण्याच्या आधी स्वतःचा काय अभ्यास आहे याचे आत्मपरिक्षण करावे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaishankar, Wang agree: Let’s keep talking, quickly disengage, ease tensions along LAC
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/12/2020 - 06:13 नवीन
चार गुंडानी एखाद्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली म्हणून राष्ट्रपती राजवट लावणे समर्थनीय कधीच होणार नाही. कारण असे झाले तर लोकनियुक्त सरकार पाडायला चार गुंड पुरेसे होतील. या ऐवजी अशा गुंडाना अटक करून अशी अजामीनपात्र कलमे लावून चार सहा महिने आत टाकावे कि कोणताही गुंड केवळ आमच्या नेत्याला कोणी काही बोलले म्हणून कायदा हातात घेण्याचे धारिष्ट्य करणार नाही. ( ज्या तर्हेने मारहाण केली आहे त्यावरून ते अधिकारी गंभीर रित्या जखमी झालेले आहेत हे दिसतेच आहे). आपल्याच पक्षाच्या गुंडाना अटक करून असे धारिष्टय हे सरकार दाखवेल का हाच प्रश्न आहे. सुबोध खरे निवृत्त नौदल अधिकारी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/12/2020 - 09:02 नवीन
त्या गुंडांना पोलीसांनी चार तासातच जामिनावर सोडलेय अशी बातमी येतेय.
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Mon, 09/14/2020 - 08:38 नवीन
मर्चंट नेव्ही अधिकारी आणि भारतीय नौदल अधिकारी यातला फरक समजत असेलच. मग विनाकारण नौदलाला यात आणायची गरज का आहे?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 09/12/2020 - 10:37 नवीन
अवांतर : मारहाण झाल्याने डोळा आतून लाल होतो? की बाहेरून काळानिळा पडतो? --------------------------------------------------------- माजी नौदलाधिकारी मदन शर्मा यांचा लाल डोळा : Image removed. --------------------------------------------------------- पारंपरिक ब्लॅक आय : Image removed. --------------------------------------------------------- वाचकांनी काय ते ठरवावं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/12/2020 - 10:55 नवीन
फक्त डोळा आतून लाल झालाय बाहेरून मारहाण केल्याची काहीच निशाणी नाही. कुछ तो गडबड हैं?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 09/13/2020 - 01:05 नवीन
पत्रकारांना तुरुंगात टाकले जाते ?? त्यांना न्यायालयाने रिमांड दिली आहे. बाकी कसेही लिहिलेत तरी न्यायव्यवस्थेचा आदर करा. त्यांच्या वर ट्रेसपासिंग आणि एसॉल्टचे चार्जेस आहेत. प्रथमदर्शनी पुरावा बघून न्यायालयाने त्यांना तुरुंगात टाकले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 10/03/2020 - 09:41 नवीन
आता हे दोन्ही महाशय कुठे आहेत???. उ.प्र. मधील घडलेल्या घटनांकडे सोयीस्कर दुर्ल्क्ष करतायत???? त्यांच्याबद्दल आपुल की असेल तर तिकडे जाउन राहव ना एकदम सुरक्षीत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 20:15 नवीन
गेली किती तरी दशक दाऊद underworld चा डॉन आहे. किती तरी आर्थिक व्यवहारात त्याचे पैसे भारतात गुंतले आहे त. केंद्रात,राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व पक्षांची सरकारे येवून गेली दाऊद चा 1 केस पण कोण वाकडा करू शकला नाही. त्या मुळे bjp ni किंवा कोणत्याच पक्षांनी नाकाने कांदे solu नयेत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 09/11/2020 - 22:56 नवीन
शिवसेना सारखा राजकीय पक्ष ज्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जगावला. मराठी माणसाच्या पाठी संघटित ताकत उभी केली. अगदी रिक्षा वाला असू नाही तर ट्रेन मधील भांडण फक्त सेनेचे नाव घेतले की संघटित परप्रांतीय हजार वेळा विचार करायचे मराठी माणसावर हात उचलायला . सेना प्रमुख च्या एका इशाऱ्यावर हजारो लोक जीव देण्यास तयार होती. ती ताकत मोदी मध्ये पण नाही. बाळासाहेब ठाकरे च्या एका इशाऱ्यावर सर्वस्व अर्पण करणारे हजारो होते आणि आज पण आहेत. देशातील एकमेव नेता ज्याला मना पासून लोकांचे प्रेम मिळाले त्या सेने ची किमंत भंगार हिंदी मीडिया.आणि बॉलिवूड मधून बाहेर हाकलले ली सुमार दर्जा ची अभिनेत्री कंगना ठरवणार की मूर्ख चा बादशाह अर्णव ठरवणार.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 09/12/2020 - 05:31 नवीन
सेनेची किंमत कमी करण्यासाठी बाकीच्यांना काही करायची गरजच नाही, असा कारभार करून सेना आपली किंमत स्वतःच कमी "करून दाखवत" आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/14/2020 - 12:34 नवीन
राजेश तुम्ही म्हणताय तो सेनेचा सुवर्णकाळ आणि त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर इतकं हि लोक चांगले होते ( कुठे नवलकर, जोशी आणि कुठे राऊत ) आता काय झालाय सेनेचं? नुसतं उत्तर भारतीयांवर आग पाखड करून तुम्ही सेनेची मराठी माणसाच्या मनातील गेलेली इज्जत परत अनु शकत नाही .. मराठी माणसाच्या मनातूनच सेना उतरली आहे .. याचा जरा करा गंभीर विचार, राज्य पातळीवर म्हणून मराठी म्हणून सेनाला पाठिंबा देणारा मराठी jar दूर जातोय तर !
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Sat, 09/12/2020 - 03:56 नवीन
प्रतिमा मलिन करणे हे भाजपा 2014 पासून करते आहे>>> २०१४ मधे फडणवीस मुम झाल्यापासुन शिवसेना व भाजपा युती असली तरी ऊठा नेहेमी त्यान्च्या विरुद्ध बोलले आहेत.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 09/12/2020 - 05:48 नवीन
निव्रुत्त नौदल अधिकार्याला मारहाण करणे निषेधार्ह आहे. कधी मराठीप्रेमाचे नाटक तर कधी हिंदुत्वाचे, सेनेने मराठी माणसाला फक्त मूर्ख बनवायचे काम केले.सगळीकडून होणार्या हल्ल्यांमुळे शिवसेना नेत्यांचा संयम सुटलेला दिसतो. दंगल सद्रुश परिस्थिती निर्माण करून सामान्य माणसाचा बळी घेऊ नका हीच उद्धव ह्यांना विनंती
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 09/12/2020 - 06:02 नवीन
पी ओ के म्हणजे पाक व्याप्त काश्मीर म्हणजेच एक आमचीच लाडकी भूमी जी चुकीच्या लोकानी शासित आहे .मी जर कन्गनाच्या जागी असतो तर अशी फोड करून सांगितली असती ज्यायोगे मी मुम्बईला पाकिस्तान म्हटले नसून पाक्व्याप्त काश्मीर म्हणजेच भारतभूमी असे म्हटले आहे .पण कंगना ..... आता सूड्बुद्धीने शिवसेना शासित मनपा ने बान्धकामावर कारवाई केली आहे यात कायदेशीर चूक काही नाही. नैतिक आहे असे म्हणता येईल, सम्बन्धित कायद्यात कोणत्या प्राधान्य क्रमाने बान्धकामे पाडायची अशी काही यादी दिलेली नसावी त्याचा गैरफायदा घेउन हा सूड उगविण्यात आला आहे वा कंगनाच्या चिथावणीला प्रत्यूत्तर देण्यात आले आहे असे म्हणता येईल. चाणक्य साहेबाना सत्ता व कोन्ग्रेस या दोघाचीही आजन्म गरज भासणार आहे सबब त्यानी ३५६ चा फायदा घेऊन केंद्रातून राष्त्रपति राजवट येऊ नये म्हणून ही कारवाई पालिकेच्या कायद्यानुसार झाली आहे राज्यसरकारचा त्यात काही संबन्ध नाही हे स्पष्ट केले आहे ही भीती सेनेलाही पटली आहे सबब आता कंगनाला भिडायचे ते ठाकरी पद्धतीने नाही तर बारामती पॅटर्न वापरून हे धोरण सेनेने स्वीकारले आहे . सबब आता कंगना ड्रग प्रकरण सेनेतर्फे हाताळले जाणार असून त्याचा कन्ट्रोल साहजिकच गृहमन्त्री यान्चेकडे असेल एकीकडे कायदा ( ३५६) खूष दुसरीकडे सेनाही खूष असा तो पॅटर्न असणार आहे.
  • Log in or register to post comments
ड
डीप डाईव्हर Sat, 09/12/2020 - 07:01 नवीन
एक नंबर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 09/12/2020 - 09:19 नवीन
नैतर पीओके वर कारवाई झाल्यावर पहिली बार सर्जिकल स्त्राईक मोदीने पाकिस्तान को अंदर घुसकर मारा वगैरे व्हॅटसपवर ऊत आला नसता
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 09/12/2020 - 18:10 नवीन
आता तुमच्या काळात झालेल्या सर्जीकल स्ट्राईक (झाल्या असतील तर) तुम्ही देशवासीयांना सांगीतल्या नाहीत त्यात भक्तांचा काय दोष? मातोश्रींची परवानगी नव्ह्ती मिळाली का देशवासीयांना सांगायला??
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/12/2020 - 18:47 नवीन
त्यांच्या काळात झालेले सर्जिकल स्ट्राईक इतके गुप्त होते की लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा कळले नाहीत केंव्हा केले गेले ते.
  • Log in or register to post comments
ज
जानु Sat, 09/12/2020 - 07:13 नवीन
सध्याच्या राजकीय वातावरणात विचार केलं जेव्हापासून शिवसेना राजकीय दृष्ट्या घरोबा बदलला, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले तेव्हापासून भाजपा नेतृत्वाने आपल्या भावी राजकारणाची दिशा कृतीत आणणे सुरू केले. मुळात एक समजून घेतले पाहिजे भाजपाला एक राजकीय पक्ष म्हणून राज्याची एक हाती सत्ता आवश्यक वाटते. कोणतेही राजकीय पक्षासाठी हे लक्ष योग्य आहे, परंतु महाराष्ट्रात चार वेगवेगळे पक्ष काम करतात त्यामध्ये वैचारिक दृष्टीने काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजप हे दोन गट कार्यरत दिसतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपले मतदार वाढवायचे असतील तर आपल्याच मित्रपक्षाला आपल्यात सामील करणे अथवा आपल्यात सामील करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि त्यास यश आलेले नाही तोच प्रयत्न भाजपा आता सेनेसोबत करीत आहे. विरोधी मताचा मतदार बदलण्या पेक्षा समविचारी असलेल्या मतदाराला एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षांकडे अधिक सोपे असते. आमदाराने पक्षांतर करणे आणि मतदाराने पक्ष बदलणे यामध्ये फार फरक असतो शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचे राजकारण केले असते, आणि आपल्या शिवाय राजकारणात सत्ता मिळवणे अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले असते तर दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रात शरद पवारांना एक हाती सरकार स्थापन करणे शक्य झाले असते. वर्तमानाचा विचार केला तर केंद्रात भाजप राजकीय दृष्ट्या अत्यंत परिणामकारक खेळी करून जनमत फिरवण्यासाठी हुशार झालेला आहे. त्यात विरोधी पक्ष भाजपाला आवडेल आणि सोईची होईल अशी राजकीय भूमिका घेऊन मदत करत आहे याचे सगळ्यात चांगले उदाहरण काश्मीर, मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्र ज्याप्रमाणे मेहबूबा यांनी राजीनामा देणे, राज्यपालांच्या हाती सत्ता देणे, त्यावेळी अब्दुल्ला सांगत होते आपण एकत्र येऊ पण भारताच्या जनतेचे नशीब थोर त्यांनी तसे केले नाही आणि भाजपाने कायदाच बदलला. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये भाजपाला पूर्ण राज्य मिळवणे शक्य झालेले नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला एका मोठ्या आणि सत्ताधारी समाजाचा पक्ष असून सुद्धा एक हाती सत्ता मिळवणे शक्य होत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी पाहिजे तसं स्थान मिळू शकत नाही यासाठी जातीय समीकरण बदलणे आवश्यक आहे यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे भाजपासाठी सेना आणि राष्ट्रवादीसाठी काँग्रेस नामशेष होणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही पक्ष सध्या इतरांच्या जीवावर म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी वर जगत आहेत, यांना यापुढे कधीही स्वत: च्या अथवा एकत्र येऊन सत्ता प्राप्ती शक्य नाही. यासाठी भाजपाने सेनेचा मतदार आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा मतदार मिळवणे सर्वात आवश्यक आहे. पूर्वीच्या फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकार स्थापनेत हाच मुद्दा दोघांच्या मनात असावा अजित पवार यापूर्वीदेखील अशा प्रकारची मांडताना दिसतात मात्र पवार साहेबांना हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्य वाटत नसावे. त्यासाठी पवारांना सेनेला मुख्यमंत्री पदी विराजमान करणे ही एक राजकीय खेळी असू शकते कारण एकदा सेना राज्य करण्यास लायक नाही हा मुद्दा जनतेच्या मनात ठसला की ते मतदार आपोआप भाजपाच्या बाजूने झुकतील. राष्ट्रवादी हा तुलनेने तरुण नेत्यांचा त्यांना आपल्या भवितव्याची काळजी वाटू शकणाऱ्या नेत्यांचा पक्ष आहे. तसेच राजकीय तडजोडी करण्यासाठी राष्ट्रवादी अधिक लवचिक आहे. सेनेच्या स्वभावानुसार सेनेतील नेते यापेक्षा वेगळे काही करतील अशी अपेक्षा पवार आणि मोदी यांना नव्हती त्यासाठी सुशांत सिंग प्रकरण हे महत्त्वाचे ठरले. सुशांत सिंग मृत्यु हे तत्कालीन कारण अपेक्षेपेक्षा लवकर मिळाले त्यात साठ पासष्ठ दिवस वाया घालवून केंद्राला हस्तक्षेप करण्याची सुवर्णसंधी सेनेने मोदी आणि शहा यांना दिली. जोडगोळी याचा लाभ घेणार नाही अशी अपेक्षा कशी करू शकतो? राजकारणात आपला फायदा झाला नाही तरी चालेल पण विरोधकाला वाट देऊ नये हा नियम असतो. त्यातच सुशांत सिंग प्रकरणाच्या निमित्ताने बॉलिवूड सरळ होत असेल तर सोयीचे होणार कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की बॉलिवूड मध्ये भाजपा आणि हिंदू विचारांचे विरोधाचा फार प्रभाव आहे आणि त्यास राजकारणातील काही मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्व साठी सुशांत सिंग प्रकरणाचा याहून चांगला उपयोग करणे शक्यच नव्हते. त्यात शिवसेनेने काँग्रेसच्या मागे जाऊन अर्णव गोस्वामी यांच्या विरोधातील लढाई आपली लढाई करून घेतली आणि सोबत कंगना अंगावर घेणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 09/12/2020 - 07:45 नवीन
भाजपासाठी सेना आणि राष्ट्रवादीसाठी काँग्रेस नामशेष होणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही पक्ष सध्या इतरांच्या जीवावर म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी वर जगत आहेत, या बाबतीत माझा असा अन्दाज आहे की येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सेनेची बरीच मते भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. भाजपातील काही मवाळ भाजपा वाले कामगिरीच्या जोरावर राष्ट्रावादी कॉन्ग्रेसकडे वा कॉन्ग्रेसकडे वळण्याची शक्यता कमीच कारण तसा या दोन पक्षान्चा कार्यक्रम ही नाही वा संयुक्त सरकार असल्यानी तशी सन्धीही नाही. साधारण पणे ब्राह्मण द्वेष्टे मतदार कदापीही भाजपा ला मत देणे शक्य नाही व संघाच्या प्रभावाखाली असलेले कदापिही भाजपेतर पक्षाला मत देण्याची शक्यता नाही. अत्यन्त उदारमनस्क नेतृत्व जर बविआ ला मिळाले व ते कॉन्ग्रेस बरोबर आले तर काही नवी मान्डणी होउ शकते. बाकी ममता दीदी सारखा चमत्कार पवारांचे बेभरवशी नेत्रुत्व कधीच करून एकहाती सत्ता स्थापन करून शकणार नाहीत हे लिहून घ्या !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/12/2020 - 09:02 नवीन
जेव्हा काँग्रेस पूर्ण फॉर्म मध्ये होती ,इंदिराजी पंतप्रधान होत्या तेव्हा पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस अधिपत्य खाली होता. त्या पाठची कारण पण फक्त भावनिक नव्हती महाराष्ट्र मध्ये सहकारी क्षेत्र उदयास येत होते काँग्रेस च्या नेतृत्व खाली. नव नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहिले,बँका उभ्या राहिल्या ,सहकारी तत्वावर दूध डेअरी उभ्या राहिल्या. कर्मवीर सारख्या नेत्यानं मुळे शिक्षण क्षेत्रात विकास झाला,धरण बांधली गेली शेती पाण्या खाली आले. विद्युत वितरण आणि निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला. एकंदरीत विकासाचे राजकारण काँग्रेस चे झाले आनी लोक त्या विकास च्या माध्यमातून काँग्रेस ची पाठी राखी झाली मूळ तळागाळात रोवली गेली. ग्रामीण क्षेत्रात विकास झाला . नेतृत्व उत्तम दर्जाचे होते आणि भावनिक राजकारण न करता विकासाचे केले gele. शरद पवार पण त्याच संस्कृती मध्ये वाढले राज्य साठी काय करायला हवं हे त्यांना चांगले माहीत आहे . इंदिराजी गेल्या आणि सर्वच बदललं. काँग्रेस नी काही केले नाही असे आपण बोलू शकत नाही.. सेने ची निर्मिती च भावनिक प्रश्नावर झाली मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाला तिनी हवा दिली काँग्रेस नी छुपा पाठिंबा दिला ह्या मागचा काँग्रेस चा उध्येश जात होता हे मला सांगता येणार नाही. पण कामगार चळवळी शी संबंधित काही तरी असावे आणि कामगार संघटना पासून उद्योगपती चे रक्षण करण्याचा कुटील हेतू पण असू शकतो.. पण सेने मुळे मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांना आधार मिळाला हे कोणीच नाकारू नये. नोकऱ्या मध्ये सेने च्या दबाव मुळे मराठी लोकांची संख्या वाढली. मराठी लोकांवर दादागिरी जे परप्रांतीय लोक करत होती त्याला चाप बसले . लहान धब्दे सेने च्या संरक्षण खाली चालू केले गेले. आणि एक प्रकारचे आत्मिक बळ मिळाले . राज्याचे हित शिवसेना चांगली समजते असा विश्वास निर्माण झाले आणि सेने ला जन आधार मिळाला. गुंडागर्दी करणे त्या वेळी गरजेचे होते संवेधनिक मार्गाने काहीच साध्य झाले नसते ते सेने नी गुंडागर्दी करून साध्य केले पण गुंडागर्दी मराठी लोकांच्या हिता साठी होती. काँग्रेस राष्ट्रवादी चे मतदार एकाच आहेत आणि ते सहकारी क्षेत्र शी संबंधित आहे आता काही वर्षात सहकारी क्षेत्र भ्रष्टाचार मुळे संपले,आर्थिक संस्था दबघाईला आल्या आणि काँग्रेस राष्ट्र वादी च जनाधार कमी झाले. Bjp ni हिंदुत्व चे राजकारण केले मुस्लिम समाज विषयी हिंदूंना भीती दाखवून हिंदू ना वेगळे केले आणि बहुसंख्य हिंदू मत विभागली गेल्या मुळे bjp सत्तेत आली. पण विकासाचे राजकारण bjp ni कधीच केले नाही त्यांचा पायाच भावनिक आहे . भावनिक पायावर उभी असलेली bjp ची इमारत जशी लवकर उभी राहिली तशी लवकर कोसळू पण शकते. कमीत कमी हिंदू ना तरी आर्थिक क्षेत्रात संधी निर्माण करणे गरजेचे होते ते bjp नी केले नाही. आर्थिक संध्या फक्त ठराविक उद्योगपती नच देवून बाकी बहुसंख्य हिंदू चा आर्थिक आधार तोडण्याचे उपत्याप bjp ni केले. किती ही चुकीची काम केली तरी हिंदू हिंदू करून जिंकून येवू असा त्यांना आत्मविश्वास आहे पण उपाशी पोटी लोक जास्त दिवस हिंदू म्हणून bjp च्या पाठी जाणार नाही. त्यांची मोठी काम कोणती तर kashmir चे विभाजन,370 रद्द,राम मंदिर. एवढीच. काश्मीर चे विभाजन करून काश्मिरी लोकमत बदलणार नाही. त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे त्या साठी आर्थिक विकास हाच एकमेव मार्ग आहे. हा देश बहुधर्मिय आहे हे सत्य बदलणे शक्य नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेवून आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्याची कुवत bjp madhye नाही. हे सत्य लोकांना जाणवू लागले आहे.. त्या मुळे आलेल्या सत्तेचा उपयोग धार्मिक तेढ आणि जहाल राष्ट्रवाद साठी न करता आर्थिक,सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचं आहे तरच bjp टिकेल नाही तर . काँग्रेस,लालू,मुलायम सारखी अवस्था तिची सुधा होईल हे नक्की.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/12/2020 - 09:03 नवीन
जेव्हा काँग्रेस पूर्ण फॉर्म मध्ये होती ,इंदिराजी पंतप्रधान होत्या तेव्हा पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस अधिपत्य खाली होता. त्या पाठची कारण पण फक्त भावनिक नव्हती महाराष्ट्र मध्ये सहकारी क्षेत्र उदयास येत होते काँग्रेस च्या नेतृत्व खाली. नव नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहिले,बँका उभ्या राहिल्या ,सहकारी तत्वावर दूध डेअरी उभ्या राहिल्या. कर्मवीर सारख्या नेत्यानं मुळे शिक्षण क्षेत्रात विकास झाला,धरण बांधली गेली शेती पाण्या खाली आले. विद्युत वितरण आणि निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला. एकंदरीत विकासाचे राजकारण काँग्रेस चे झाले आनी लोक त्या विकास च्या माध्यमातून काँग्रेस ची पाठी राखी झाली मूळ तळागाळात रोवली गेली. ग्रामीण क्षेत्रात विकास झाला . नेतृत्व उत्तम दर्जाचे होते आणि भावनिक राजकारण न करता विकासाचे केले gele. शरद पवार पण त्याच संस्कृती मध्ये वाढले राज्य साठी काय करायला हवं हे त्यांना चांगले माहीत आहे . इंदिराजी गेल्या आणि सर्वच बदललं. काँग्रेस नी काही केले नाही असे आपण बोलू शकत नाही.. सेने ची निर्मिती च भावनिक प्रश्नावर झाली मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाला तिनी हवा दिली काँग्रेस नी छुपा पाठिंबा दिला ह्या मागचा काँग्रेस चा उध्येश जात होता हे मला सांगता येणार नाही. पण कामगार चळवळी शी संबंधित काही तरी असावे आणि कामगार संघटना पासून उद्योगपती चे रक्षण करण्याचा कुटील हेतू पण असू शकतो.. पण सेने मुळे मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांना आधार मिळाला हे कोणीच नाकारू नये. नोकऱ्या मध्ये सेने च्या दबाव मुळे मराठी लोकांची संख्या वाढली. मराठी लोकांवर दादागिरी जे परप्रांतीय लोक करत होती त्याला चाप बसले . लहान धब्दे सेने च्या संरक्षण खाली चालू केले गेले. आणि एक प्रकारचे आत्मिक बळ मिळाले . राज्याचे हित शिवसेना चांगली समजते असा विश्वास निर्माण झाले आणि सेने ला जन आधार मिळाला. गुंडागर्दी करणे त्या वेळी गरजेचे होते संवेधनिक मार्गाने काहीच साध्य झाले नसते ते सेने नी गुंडागर्दी करून साध्य केले पण गुंडागर्दी मराठी लोकांच्या हिता साठी होती. काँग्रेस राष्ट्रवादी चे मतदार एकाच आहेत आणि ते सहकारी क्षेत्र शी संबंधित आहे आता काही वर्षात सहकारी क्षेत्र भ्रष्टाचार मुळे संपले,आर्थिक संस्था दबघाईला आल्या आणि काँग्रेस राष्ट्र वादी च जनाधार कमी झाले. Bjp ni हिंदुत्व चे राजकारण केले मुस्लिम समाज विषयी हिंदूंना भीती दाखवून हिंदू ना वेगळे केले आणि बहुसंख्य हिंदू मत विभागली गेल्या मुळे bjp सत्तेत आली. पण विकासाचे राजकारण bjp ni कधीच केले नाही त्यांचा पायाच भावनिक आहे . भावनिक पायावर उभी असलेली bjp ची इमारत जशी लवकर उभी राहिली तशी लवकर कोसळू पण शकते. कमीत कमी हिंदू ना तरी आर्थिक क्षेत्रात संधी निर्माण करणे गरजेचे होते ते bjp नी केले नाही. आर्थिक संध्या फक्त ठराविक उद्योगपती नच देवून बाकी बहुसंख्य हिंदू चा आर्थिक आधार तोडण्याचे उपत्याप bjp ni केले. किती ही चुकीची काम केली तरी हिंदू हिंदू करून जिंकून येवू असा त्यांना आत्मविश्वास आहे पण उपाशी पोटी लोक जास्त दिवस हिंदू म्हणून bjp च्या पाठी जाणार नाही. त्यांची मोठी काम कोणती तर kashmir चे विभाजन,370 रद्द,राम मंदिर. एवढीच. काश्मीर चे विभाजन करून काश्मिरी लोकमत बदलणार नाही. त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे त्या साठी आर्थिक विकास हाच एकमेव मार्ग आहे. हा देश बहुधर्मिय आहे हे सत्य बदलणे शक्य नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेवून आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्याची कुवत bjp madhye नाही. हे सत्य लोकांना जाणवू लागले आहे.. त्या मुळे आलेल्या सत्तेचा उपयोग धार्मिक तेढ आणि जहाल राष्ट्रवाद साठी न करता आर्थिक,सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचं आहे तरच bjp टिकेल नाही तर . काँग्रेस,लालू,मुलायम सारखी अवस्था तिची सुधा होईल हे नक्की.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 09/12/2020 - 09:30 नवीन
वरील लेख बरचसा वास्तवाला धरून आहे ! कोणताही अभिनिवेश नाही याबद्द्ल आभारी आहे !
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/12/2020 - 10:05 नवीन
कामगार चळवळीत सेनेने नेहमीच सोयीस्कर भुमीका घेतली आहे.कामगार चळवळीला पहिला सुरूंग लागला तो कृष्णा देसांई या कम्युनिस्ट कार्यकर्त्यच्या खुनानंतर. बाळासाहेब ठाकर्‍यांनी कृष्णा देसाईंच्या मारेकर्‍यांचे अभिनंदन केले होते. दुसरी वेळ म्हणजे डॉ दत्ता सामंतांनी केलेल्या गिरणी कामगार सम्पात ठाकर्‍यांनी त्यांची भूमिका अचानक बदलली. पुण्यातल्या टेल्को च्या सम्पाच्यावेळेसही ती अगदी तळ्यात मळ्यात अशीच होती. कामगार चळवळीत सेनेला कोहीनूर मिल फिनीक्स मिल या मील्स च्या जागांच्या ठिकाणी कामगाराम्ना वसवणे सहज शक्य होते. जे त्यानी कधीच अजेंड्यावर ठेवले नाही. छगन भुजबळ सेनेत असताना बेळगाव चा प्रश्न त्याम्नी बेळगावात जाऊन स्टंट करत अटक करुन घेतली होती. पण सत्तेत येताच तो प्रश्न सोयीस्करपणे अजेंड्यावरून पुसून टाकला. त्या नंतर सेनेने त्याचा उच्चारही केला नाही. कोकणात दाभोळ वीज प्रकरणात सेना तो प्रकल्प समुद्रात बुडवायला निघाली होती. रेबेका मार्क बाळासाहेबाना एकदा भेटली आणि त्या नंतर त्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन झाले तेही जास्तीच्या दरानुसार. बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही आता मुळात प्रश्न निर्माण झालाय तो सेनेच्या आस्तित्वाचा. आडमुठ्या आणि गुंड दहशतवादी भूमीका घेवून मिळालेली लोकप्रियता सवंग असते. याचे भान सेना नेतृत्वाला ज्या वेळेस येईल त्या वेळेस फार उशीर झालेला असेल. म्हणावे असे एक दोन अपवाद सोडले तर सेनेला तारून नेतील असा जनाधार असलेला तळागाळातला कोणताच नेता त्यांच्याकडे नाहिय्ये. उद्धव ठाकरेंच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. आदित्य ठाकरे अगदीच अननुभवी आहेत. दरवेळेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन राज्य मिळवणे हाच एकमेव मार्ग चोखाळला तर आत्ता आहे तेही जनमत विरोधात जाईल
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 09/12/2020 - 10:18 नवीन
विजुभौ , बाळासाहेब हे उमदे कलाकार वगैरे होते पण सुमार राजकारणी होते. मॅनेज करता येणारे गॉडफादर होते असे म्हणायचे का ..... ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 09/12/2020 - 13:11 नवीन
बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही आता मुळात प्रश्न निर्माण झालाय तो सेनेच्या आस्तित्वाचा.
तुमच्या धाग्याला हे वाक्य बरोबर बसते आहे आणि त्यानुसारच धागा पुढे चालला आहे.. परंतु थोडे अवांतर वाटेल पण हे मुद्दे मांडतो.. --=> प्रश्नच पडायचा असेल तर या देशाचे काय होईल याचाच पडतोय आता.. 1. आता केंद्र आणि राज्याकडे कोविड मुळे पैसे कमी आहेत, निदान अश्या वेळेस काही गोष्टीत tax वाढवून सरकार पैसे जमवू पाहतेय.. पेट्रोल dizel हे त्याचे मुख्य स्रोत, तसेच नुकतेच zee business ला ऐकले sanitizer वर gst जादा आकारणार आहेत म्हणुन त्याच्या किंमती वाढणार, आता ज्या गोष्टीला tax free असायला हवे त्या पेक्षा जास्त कर लावला जातोय.. पेट्रोल वर जास्त कर घेण्या विरोधात मी होतो, परंतु देशाच्या गरजेसाठी आणि पैसेच नसल्याने ते पैसे आता गोळा करत असले तर माझा आता त्याला विरोध नाही.. परंतु जे खरे आहे ते चित्र जनतेला दिसले पाहिजे, आणि गरज नसताना जास्त कर आधी आणि नंतरही आकारला नाही पाहिजे.. 2. बर अश्या अनेक सरकारी किंवा निमसरकारी संस्थे तुन करोडो रुपये मिळतात तरी, पण या मधील भागीदारी खुप वेगाने विकली जात आहे, आणि नंतर भविष्यात हे स्रोत ही private झाल्यावर सरकार ला असा पैसा वापरता येणार नाही.. पेट्रोलियम, lic, रेल्वे, विमानतळ डीफेंस अश्या अनेक संस्था आता हळू हळू विकल्या जातायेत.. उद्याचे रोजगार हे कंत्राटी आणि अश्या दिग्गच busineman कडेच असणार आहेत, याचा दूरगामी परिणाम होणारच.. 3. कोविड मुळे अर्थव्यवस्थेवर खुप परिणाम झाला आहेच, पण त्या अगोदरच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती.. तिला जोराचा झटका कोविड ने दिला पण त्या आधी? त्यामुळे हे अपयश सरकार कोविड च्या नावाने खपवत असले तरी ते अपयश त्यांचे आधी आहे.. यावर कोणी बोलत नाही.. 4.. करोना आधी महाराष्ट्रात जास्त वाढला, मग मुख्यमंत्री, आघाडी कशी हाताळू शकत नाही गोष्टी असे पसरवले गेले, आता देशात वाट लागली आहे, यावेळेस पंतप्रधान परिस्थिती हाताळू शकत नाही असे मेसेज किंवा सोशल डंका कुठेच वाजत नाही, आणि मग मात्र अश्या काही घटना वगैरे कडे लक्ष वळवले जातेय असे मला वाटते.. 5. धार्मिक भेग अधिक वाढवून, त्याच्यावर आपली पोळी भाजण्याचे काम चालू आहे, पण देशात दंगली झाल्या तरी हिंदू मुस्लिम ह्या मुद्द्यावर राजकारण करून देशात दुफळी माजवली जातेय.. याचे पाडसाद उद्या जगात पडतील आणि हा देश हि सुरक्षित नाही असे उद्या जग बोलू शकते, पण याचे कोणालाच काही पडले नाही.. कुरेशी जनगण किंवा भारत माता बोलला किंवा राहुल गांधी नीट बोलला कि अजुन काय acche din पाहिजेत असे म्हणणारी जनता, acche din ला इतक्या level वर आणतील वाटले नव्हते.. त्यामुळे bjp, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना यांच्या पेक्षा देशाचे काय होईल, रोजगारआणि अर्थव्यवस्थेचे काय होईल, देशाच्या प्रतिमेचे काय होईल, संस्था विकल्याने देश भविष्यात कुठल्या संकटातून जाऊ शकेल आणि या अनुषंगाने देशाचे काय होईल हा प्रश्न पडतो.. परंतु, हे प्रश्न पडू नये म्हणुन 6. लोकशाही चा चौथा खांब स्वतःच्या पद्धतीने वापरून असे प्रश्न लोकांना पडूच नयेत म्हणुन त्यांना वेगवेगळे मुद्दे चघळायला दिले जातायेत असे मला वयक्तिक वाटते.. शिवसेना, पवार, मोदी, काँग्रेस यांचे काही हि झाले तरी जनतेला काडीचा फरक पडत नाही, पण देशाच्या नुकसानीने सगळ्यांचे आयुष्य बदलणार आहेच आणि पुढील पिढी असल्या अराजक, धार्मिक स्थिती मध्ये आपण ढकलणार आहोत हे नक्की... #India deserves better पुढचा भाग लिहावा म्हणतोय आता.. वेळ आलीये..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/12/2020 - 14:02 नवीन
देशाची स्थिती गंभीर होत आहे. Bjp सरकार ला विकासाची दिशा अजुन मिळत नाही. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संस्था नष्ट करण्याचे काम ती मन लावून करत आहे. फक्त दिखावा केला जात आहे विकासाचा पण विकास फक्त काही लोकांचाच होत आहे.. मीडिया लोकांना वेगळ्याच विश्वात घेवून जात आहे मीडिया जे विषय मांडत आहे आणि सरकार चे अपयश लपवत आहे हे पहिल्यांदा च घडताना दिसत आहे. लोकांच्या सर्व अनुभवाने लक्षात येत आहे फक्त हिंदू चे राजकारण करून सत्ता मिळते हे गणित चुकीचे ठरू शकते. ठोस असा कोणत्याच क्षेत्रात bjp ni काहीच केले नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा