Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर

आ
आर्यन मिसळपाववाला
Sat, 08/15/2020 - 19:10
🗣 194 प्रतिसाद
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना. 1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था 2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार 3. बेफिकीर सामान्य माणूस 4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या 5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात) 6. अडाणी आणि अशिक्षित लोक 7. परदेशी स्थायिक नागरिक 8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक 9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून... **** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56081 views

🗣 चर्चा (194)
R
Rajesh188 Sat, 08/22/2020 - 07:45 नवीन
अर्थशास्त्र तसा गहन विषय आहे त्या मध्ये माझा बिलकुल अभ्यास नाही हे मान्य करून हे तुम्हीच हे सांगा नोट बंदी मुळे सामान्य लोकांचे काय नुकसान झाले. 1) ज्या नोटा बंद झाल्या त्या बँकेत जमा करायचे स्वतंत्र जनतेला दिले होते. आणि पुरेसा वेळ सुद्धा दिला होता . माझ्या मते नुकसान कोणाचे झाले. जो पैसा हिशोबत नव्हता पण बाजारात फिरत होता तो थांबला आणि त्या पैशा वर अवलंबून जे उद्योग होते ते बुडाले. हा एकमेव नोट बंदी चा तोटा मला दिसत आहे. अजुन काय काय नुकसान झाले हे तुम्हीच सांगू शकाल तुम्ही अर्थशास्त्र मधले जाणकार आहात असा तुमचा दावा आहे. श्रीमंत सरकार आणि श्रीमंत जनता ह्या मध्ये फरक आहे. एका प्रकारात फक्त फक्त सरकार श्रीमंत असते पण जनतेला त्याचा काही ही फायदा होत नाही. सर्व योजना बनावट. सरकारी खर्च योजनेवर 100 रुपये जनतेच्या वाट्याला फक्त 5 रुपये हा प्रकार. Gst मुळे सरकार गरीब झाले पण गळती थांबली असेल तर तो फायदा च आहे असे माज मत आहे. तुम्ही अर्थ शास्त्र जाणकार आहात. ह्या वर अजुन प्रकाश टाका.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 07:58 नवीन
तुम्ही बिनधास्त ठोकाठोकी करता, ते थांबवा. नोटाबंदी आणि जिएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं किती आणि काय नुकसान झालंय हे माझ्या वरच्या आणि जिएसटीच्या पोस्टवरच्या प्रतिसादात सविस्तर लिहिलं आहे. माझे नुसते प्रतिसाद वाचले तरी तुम्हाला भरपूर प्रकाश पडेल. इथून पुढे माझे प्रतिसाद न वाचता बिनधास्त ठोकाठोकी करू नका.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/22/2020 - 08:24 नवीन
तुमच्या दोन्ही पोस्ट मी अत्यंत ध्यान देवून वाचल्या आहेत. तुमच्या पोस्ट मध्ये gst मुळे होणारे नुकसान म्हणून सर्व पैसा परत आला आणि फुकट छपाईचा खर्च वाढला आणि लोकांना त्रास झाला असे लिहल आहे. पण त्या पुढचे तुम्ही लिहायचे विसरला की फायद्या चे नाही म्हणून लीहल नाही? जो पैसा सरकार च्या नजरेत नव्हता तो सरकार च्या नजरेत आला. टॅक्स चोरी होत होती त्याला आळा बसला. अर्थ शास्त्र मध्ये जर तुम्ही जाणकार आहात तर उथळ पोस्ट करू नका सविस्तर चारी बाजू चा विचार करून लिहा. मला त्या मधले काही जास्त खोलवर समजत नाही. आम्ही उथळ पोस्ट करू शकतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/22/2020 - 08:25 नवीन
चुकून gst लिहल गेले
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 10:30 नवीन
१. नोटाबंदी हा मोदींचा सर्वस्वी एकट्यानं घेतलेला सर्वात चुकीचा निर्णय. ४.५० लाख कोटींचं चलन सर्क्युलेशनमधून बाद होईल अशी हमी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती > १०० % पैसे परत आले. नोटाछपाईचा खर्च सुद्धा लोकांनी भरलेल्या टॅक्समधून वसूल झाला नाही. जनतेचा नाहक अतोनात छळ झाला, बँकीग व्यवस्थेवर कमालीचा ताण आला, अर्थव्यवस्थेची वाट लागली. मोदींना ना खेद ना खंत; आता तो विषयच काढत नाहीत. वरती सगळे मुद्दे अंडरलाईन केलेत. पुन्हा वाचा. आणखी काय घंटा सविस्तर लिहिणार ? नोटाबंदी फेल गेली हे तुमच्या लक्षात येत नाही का ? कुठे रहाता तुम्ही ? तुम्हाला रांगेत उभं रहावं लागलं का ? एका गोष्टीची धड कल्पना नाही का कसला अनुभव नाही; कशाला उगीच टाइमपास करता ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/22/2020 - 11:18 नवीन
तुम्हाला विषयाचा काडी चा अभ्यास नाही . ह्याच विषयात नाही तर इथे तूम्ही ज्या काही पोस्ट केले आहे त्या विषयात पण तुमचा सखोल अभ्यास नाही. मला च जास्त कळत हा सर्वात मोठा भ्रम तुमचा झाला आहे. मलाच नाही तर येथील असंख्य सभासद ना तुम्ही मूर्ख ठरवायचं प्रयत्न केला आहे. नोट बंदी मुळे टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली. कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स मध्ये 13 ते 14 percent वाढ झाली. इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले. जे पाहिले इन्कम टॅक्स चुकवत होते ते पण tax भरू लागले. डिजिटल payment चे प्रमाण वाढले. सर्व पैसा बँकेत आल्या मुळे पुढच्या वाटचाली योग्य मार्ग निर्माण झाला. ह्याची पण माहिती करून घ्या आपल्या पक्षाच्या अध्यक्ष सारखे वागू नका.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 21:40 नवीन
१.
नोट बंदी मुळे टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली.कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स मध्ये 13 ते 14 percent वाढ झाली.इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले.जे पाहिले इन्कम टॅक्स चुकवत होते ते पण tax भरू लागले.
तुम्हाला कुणी सांगितलं की हा नोटाबंदीचा उद्देश होता ? नोटाबंदीचा उद्देश काळा पैसा चलनातून नष्ट करणं हा होता. एकदा पैसे बँकेत भरायची मुदत संपल्यावर रिटर्न भरुन तो बापाजन्मात व्हाइट होत नाही. काहीही आकडेवारी फेकतायं ज्याचा नोटाबंदीशी सुतराम संबंध नाही. २.
सर्व पैसा बँकेत आल्या मुळे पुढच्या वाटचाली योग्य मार्ग निर्माण झाला.
नोटांचे रंग बदलून काय घंटा फरक पडतो पुढच्या वाटचालीत ? बँकेतले पैसे काढून लोकांनी पुन्हा नव्या चलनात भ्रष्टाचार सुरु केला. आज भ्रष्टाचाराची परिस्थिती जैसे थे आहे. कुठे राहता तुम्ही आणि काय अनुभव आहे तुमचा सरकारी खात्यातल्या कामांचा ? ३.
ह्याची पण माहिती करून घ्या आपल्या पक्षाच्या अध्यक्ष सारखे वागू नका.
तुम्ही असले प्रतिसाद पुन्हा देऊ नका.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/22/2020 - 21:54 नवीन
काळा पैसा म्हणजे काय ह्याची व्याख्या सांगाल तर मी पुढे काही लिहीन.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 08/22/2020 - 19:18 नवीन
४.५० लाख कोटींचं चलन सर्क्युलेशनमधून बाद होईल अशी हमी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती याची youtube क्लिप असेल तर देता का?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 20:22 नवीन
त्यात ते `गंगामे बहा देंगे' म्हणाले आहेत. मोदींची भुक्कड आणि बोगस भाषणं पुन्हा ऐकणं हा एक मोठा छळ आहे. सुरुवातीला हा आकडा एकूण चलनाच्या (१५ लाख कोटी) ३०% होता (४.५० लाख कोटी रुपये) मग जसे जसे करोडो रुपये बँकेत जमा व्यायला लागले तसा हा आकडा बदलत गेला आणि २०% वर आणला गेला. The government estimated that ₹3 lakh crore, or approximately 20%, of the demonetised ban knotes would be permanently removed from circulation.[58] However, according to a 2018 report from the RBI, approximately 99.3% of the demonetised banknotes, or ₹15.30 lakh crore of the ₹15.41 lakh crore that had been demonetised, were deposited with the banking system. The banknotes that were not deposited were worth ₹10,720 crore.[12] Commentators concluded that the government failed in its aim of purging black money from the economy.[13] ही घ्या लिंक
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 08/22/2020 - 20:38 नवीन
@ आनंदा : बनावट नोटांच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या चलनाकडे प्रतिसादकर्ते सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत हे लक्षात घ्या! नोटबंदी वरून अजुनही गळा काढणार्या लोकांबद्दल माझी समजुत अशी आहे की : एकतर ही मंडळी अशा कॅटेगरीतली असावीत की ज्यांना बेहिशोबी कींवा बनावट नोटांच्या स्वरूपातील बराच पैसा गमवावा लागला असावा कींवा अशा स्वरूपातील पैसा बाळगणार्या लोकांच्या जीवावर त्यांची एैयाषी-उदरनिर्वाह चालत असावा! कींवा ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते पण नखशीखांत कर्जात बुडालेले असुनही श्रीमंतीचा खोटा देखावा करत राहीलेले लोक ज्यांना स्वत:ची (नसलेली) अब्रु राखण्यासाठी व आपण कर्जबुडवे नसून आपल्याला नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने ते फेडतां येत नसल्याच्या कांगावा केलेले-करणारे लोक! राजकारणी, विरोधासाठी विरोध करणारे, नमोरूग्ण, राहुल-सोनीया-मौनमोहन प्रेमी आणी भाजप-संघ विरोधक यांचाही त्यांत समावेश आहेच. दॅट्स ॲाल!
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 08/22/2020 - 21:10 नवीन
2014 मध्ये भाजपाने नोटबंदीला विरोध केला होता https://timesofindia.indiatimes.com/blogs/sanjeev-singh-blog/how-bjp-had-termed-demonetisation-as-anti-poor-in-2014/ गरिबांना त्रास होईल म्हणे
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 21:11 नवीन
१.
एकतर ही मंडळी अशा कॅटेगरीतली असावीत की ज्यांना बेहिशोबी कींवा बनावट नोटांच्या स्वरूपातील बराच पैसा गमवावा लागला असावा कींवा अशा स्वरूपातील पैसा बाळगणार्या लोकांच्या जीवावर त्यांची एैयाषी-उदरनिर्वाह चालत असावा!
१०० % चलन परत बँकेत जमा झालं याचा अर्थ सर्व बेहिशेबी पैसा फक्त जुन्या नोटातून नव्या नोटात रुपांतरित झाला. कुणालाही बेहिशेबी पैसा गमवावा लागला नाही. २.
नखशीखांत कर्जात बुडालेले असुनही श्रीमंतीचा खोटा देखावा करत राहीलेले लोक ज्यांना स्वत:ची (नसलेली) अब्रु राखण्यासाठी व आपण कर्जबुडवे नसून आपल्याला नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने ते फेडतां येत नसल्याच्या कांगावा केलेले-करणारे लोक!
विनोदी आहात काय ? नोटाबंदी आणि कर्जबुडवेगिरीचा सुतराम संबंध नाही. ती बेहिशेबी पैसा चलनातून नष्ट करण्याची योजना होती. ३.
राजकारणी, विरोधासाठी विरोध करणारे, नमोरूग्ण, राहुल-सोनीया-मौनमोहन प्रेमी आणी भाजप-संघ विरोधक यांचाही त्यांत समावेश आहेच.
काहीही फेकाफेकी लावलीये ! नोटाबंदी हा मोदींचा एकाहाती घेतलेला सर्वात निर्बुद्ध निर्णय होता अशा आर्थिक विषयावर चर्चा आहे. त्यात राजकारण कुठून काढतायं ?
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 08/22/2020 - 22:12 नवीन
अभ्यास गेला चुलीत! नोटबंदी हा अभ्यासाचा विषय नसुन अनुभवायचा विषय होता सर्वसामान्यांसाठी. हो तेच सर्वसामान्य ज्यांच्या झालेल्या सोकाॅल्ड हालांचे अतीरंजीत वर्णन वाचुन-ऐकुन आता कंटाळा आलाय.
कुणालाही बेहिशेबी पैसा गमवावा लागला नाही.
Are you sure? Are you confident? Lock kiya jaaye?
विनोदी आहात काय ? नोटाबंदी आणि कर्जबुडवेगिरीचा सुतराम संबंध नाही. ती बेहिशेबी पैसा चलनातून नष्ट करण्याची योजना होती.
हो तर विनोदी आहेच मी! म्हणून तर इतके दिवस तुमच्या फेकाफेकीयुक्त चर्चा-प्रतिसादांना विनोदी लेखन समजुनच तर वाचत होतो. पण आता त्यातल्या विनोदाची पातळी घसरत चालल्याने हा लेखन प्रपंच!
काहीही फेकाफेकी लावलीये ! नोटाबंदी हा मोदींचा एकाहाती घेतलेला सर्वात निर्बुद्ध निर्णय होता अशा आर्थिक विषयावर चर्चा आहे. त्यात राजकारण कुठून काढतायं ?
तुम्ही प्रतिसाद नीट वाचतां का हो?
नोटबंदी वरून अजुनही गळा काढणार्या लोकांबद्दल माझी समजुत अशी आहे की : एकतर
हे माझ्या प्रतिसादातले वाक्य वाचले नाहीत की त्याचा अर्थ समजला नाही तुम्हाला.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/22/2020 - 22:18 नवीन
अनुभवायचा विषय होता सर्वसामान्यांसाठी ?
इथे अर्थशास्त्रीय चालू आहे. तुमच्यासाठी तो अभ्यासाचा विषय नसेल तर कशाला प्रतिसाद देता ? आणि तो सर्वसामान्यांसाठी अनुभवायचा विषय होता इतकं बाष्कळ विधान खुद्द मोदीसुद्धा करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
व
वगिश Sat, 08/22/2020 - 22:51 नवीन
अरे जरा संदर्भ देऊन आरोप करा बर, काय तेच नोट बंदी आणि gst च तुणतुणं. म्हणे अर्थव्यवस्था गाळात गेली.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 08/23/2020 - 14:21 नवीन
म्हणे अर्थव्यवस्था गाळात गेली
मग सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काय उर्जित अवस्था आहे का ? प्रतिसाद देण्यापूर्वी किमान रोजचा पेपर तरी वाचत जा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/16/2020 - 19:49 नवीन
लोकांना सरकार म्हणजे काय,सरकार च्या निर्णयाचे आपल्या जीवनावर परिणाम होतो. जलद आणि कार्य तत्पर प्रशासन हवं असेल तर सत्ताधारी लोक उत्तम दर्जाची असावी लागतात ह्याची जाणीव च नाही.. आम्ही स्वतः च्या मेहनतीवर जगतो आम्हाला सरकार ची गरज काय .. असे सर्व गैरसमज लोकांचे आहेत त्या मुळे कोणी ही निवडून येवू ध्या आम्हाला काय त्याचे असा विचार करतात. सरकारी निर्णय वर प्रतेक व्यक्ती चे भविष्य कसे असेल हे अवलंबून आहे हे सत्य त्यांना कोणी सांगतच नाही. आणि दुसरे आपली लोक भावनिक आहेत त्यांना जाती वरून, धर्मा वरून,प्रंतावरून, लिंगा वरून कधी ही,कोणी ही नेता मूर्ख बनवू शकतो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/17/2020 - 13:22 नवीन
"...परदेशी स्थायिक नागरिक?" हे कुठं आणलेत या यादीत? पूर्णतः नाही कळला संधर्भ ! भारतात भरपुर शहाणी सुरती माणसे आहेत, त्यातील ४ गेली बाहेर तर भारताचे काय फार मोठ्ठे नुकसान झाले असे वाटत नाही.. हा त्यांच्या बाहेरील आयुष्यात त्यांनी भारताने त्यांच्या साठी केलेल्या शिक्षण खर्च एवढे तरी धन भारतात आणावे / पाठवावे असे वाटते माझ्य सारख्या सर्वसामान्य माणसाचे विचाराल तर भारतात राहून जितका हात भार भारतीय अर्थव्यस्थेला लावू शकलो असतो तितका किंवा थोडासा अधिक मी भारताबाहेर राहून भारतासाठी केला आहे यात समाधान आहे ...
  • Log in or register to post comments
G
Gk Mon, 08/17/2020 - 15:53 नवीन
डॉकटर व कम्पाउंडर मधला फरक तसाही जनतेला समजत नाहीच. नैतर 2014 ला डॉकटर मनमोहन ला घालवून आणलेला कंपौंडर परत 2019 ला आणला नसता
  • Log in or register to post comments
आ
आर्यन मिसळपाववाला Mon, 08/17/2020 - 16:17 नवीन
राजकारनी - कोनि बनवले त्याना, का आनि कसे मुर्ख बनवत आहे ते सामान्य मानसाला. "...परदेशी स्थायिक नागरिक?" विनति आहे थोदा गहन विचार करावा. इथे राहुन काय करता येवु शकले असते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/18/2020 - 01:07 नवीन
आर्यन मिसळपाववाला ...गहन विचार करूनच लिहिलंय .. मला कल्पना आह कि आपण काय म्हणताय ते,. कि माणूस फक्त पैशाने नाही तर इतर गोष्टीतून देशाची सेवा करतो अप्रत्यक्ष रित्या.. वैगरे आणि त्याची किंमत/ त्याचा देशाला होणार फायदा असा पैशात मोजता येत नाही...,मान्य माझ्य बाबतीत तरी मी भारतातात राहून देशाला काय फार मोठे योगदान दिले असते असे नाही मी काही आय आय टी किंवा आई आई एम चा पदवीधर नाही कि इसरो चा नाही ..किंवा समाजाची खूप चाड असलेले समाजसेवक वृत्तीचा नाही किंवा सेनादलाच्या जाऊ शकणार नाही .. बाकी खूप हुशार लोक जी सोडून गेली त्यातील अगदी थोड्या लोकंनाबद्दल हवे तर असे म्हणता येईल कि ते भारतात राहिले असते तर त्यांचे योगदान जास्त असते .. मान्य \पण सर्वसामान्य भायेर कायमचे स्थलांतरित झालेल्यांमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले नसावे.... कारण लोकसंख्या एवढी आहे कि पुरेसे हुशार लोक भारतात आहेत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/17/2020 - 19:05 नवीन
पक्ष गांधीवादी अहिंसेवर विश्वास ठेवणारा आहे त्यांचे उमेदवार गुंड आहेत ,हिंसा वादी आहेत तर पक्ष चे गांधी वादी धोरण बघून त्या गुंडांना निवडून द्यायचे का? पक्षाची धोरण गरिबी हटाव ची आहेत आणि त्यांचे उमेदवार उद्योग पती,गरिबांचे शोषण करणारे आहेत तर पक्षाचे गरिबी हटाव चे धोरण ला पाठिंबा म्हणून हे श्रीमंत शोषण करते निवडून द्यायचे का?. चांगले उत्तम राजकीय वातावरण आणि सरकार हवे असेल तर पक्ष ला बिलकुल किंमत देण्याची गरज नाही फक्त चांगली लोक निवडा . जे खरोखर समाजाचे ,देश ह्यांच्या हिताचा च विचार करतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/18/2020 - 01:20 नवीन
राजेश आपला विचार मान्य आहे .. पक्ष आपल्या धोरणांपासून दूर भटकायला लागला कि असे वाटणारच आणि ते भारत पुरते कदाचित जास्त प्रखरतेने जाणवत असेल... ( म्हणजे पक्ष आवडतो पण उमेदवार भिकार) पण हे जगात इतर लोकशाहीत कमी प्रखर आहे एवढेच मी दाखवू इच्छित होतो कारण येथे "पक्ष धोरणे" रातोरात बदलत नाहीत , आणि दल बदल फारसे होत नाहीत राणे, कोल्हे आणि अजित पवार यांनी जे तिथे केले ( आज इथे तर उद्या तिथे) ते इथे केले असते तर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्ठात आली असती... "तिकीट दिले नाही म्हणून तिकडे जातो" किंवा "माझा पक्ष काढतो" हे जोपर्यंत चालू आहे आणि जनता खपवून आहे अश्या समाजात पक्ष या कल्पने वर विश्वास ठेवणे कठीण .. असो बघू पुढे काय होते ते .. उदाहरण म्हणून १) आप चा प्रयोग स्थानिक पातळीवर यशस्वी झाला...केजरीवाल निवृत्त झाल्यावर तो पक्ष कसा राहील वगैरे काळ दाखवेल किंवा २)भाजपात आयाराम गयाराम मोठ्या संख्येने घेतल्याने "तत्वावर चालणार पक्ष" हे किती टिकेल हे पण दिसेल हळू हळू !
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 08/22/2020 - 06:14 नवीन
पुरेपूर सहमत. सर्वच पक्षांमध्ये सर्वप्रकारचे नग असतात. तेव्हा नग पाहूनच निर्णय, ब्रँड बघून नाही.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 08/17/2020 - 19:56 नवीन
परदेशी स्थायिक नागरिक - यांचा काय संबंध? जरा सविस्तर समजाउन सांगाल का? आणी परदेशी स्थायिक नागरिक भारताच्या एकुण लोकसंख्येच्या २% तरी आहेत का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/17/2020 - 20:03 नवीन
मनमोहन सिंग हे हुशार आहेत त्या बाबत वाद नाही पण ते चांगले पंत प्रधान होते ह्याची फक्त दहा उदाहरणे ध्या. नरेंद्र मोदी पेक्षा मनमोहन हे चांगले होते. है कशा वरून ठरवले.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 08/17/2020 - 20:14 नवीन
कडबोळे सरकार असतानाही देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित सांभाळली होती डॉ. मनमोहन सिंगांनी. बहुमत असूनही मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/17/2020 - 20:17 नवीन
सरकारी कंपन्या विकून आणि बाहेरच्या देशातील कंपन्यांना मोकळे रान देवून तात्पुरती अर्थ व्यवस्था सुधारली पण देशाचे नुकसान पण झाले. मनमोहन ह्यांच्या काळात.
  • Log in or register to post comments
आ
आर्यन मिसळपाववाला Tue, 08/18/2020 - 06:19 नवीन
खालिल लिन्क चेक करा. https://en.wikipedia.org/wiki/Non-resident_Indian_and_person_of_Indian_origin. भारत लोकसन्ख्या - 1,352,642,280 Non-resident Indian and person of Indian origin - 32,100,340 एकुन % - २.३७ +- ०.५ %
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 08/18/2020 - 06:39 नवीन
person of Indian origin हे दुसर्‍या देशात १ कींवा दोन्ही भारतीय पालकांच्या पोटी जन्माला आलेले, कींवा भारतीय नागरीकत्वाचा परदेशी नागरीक त्याग केलेले असतात. त्यांना भारतीय नागरीक म्हणुन गणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 08/18/2020 - 07:43 नवीन
त्याना चालते, त्यांच्या मते अक्षयकुमार देशी असतो आणि सोनिया , राहुल विदेशी
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 08/18/2020 - 08:00 नवीन
अक्षयकुमार आता देशी झाला आहे असे ऐकुन आहे. खरे खोटे नक्की माहीत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आर्यन मिसळपाववाला Tue, 08/18/2020 - 08:35 नवीन
बाकि मुद्द्यावर पन होवु दे चर्चा 1. प्रशासकिय व्यवस्था - कधि विचरले आहेत प्रश्न सचिव / आयूक्त / ग्रामसेवक याना कोनि 2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार - NA- खुप झलि चर्चा 3. बेफिकीर सामान्य माणूस - बेफिकीर पना मुले च होतेय कि काय सगले 4. प्रचंड लोकसंख्या - ह्या वर तर काहिच कोनि बोलताना दिसत नहिये 5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात) - बोला ह्या वर पन 6. अडाणी आणि अशिक्षित लोक - बोला ह्या वर पन 7. परदेशी स्थायिक नागरिक - अजुन मुद्दे अपेक्शित आहेत. 8. सो कॉल्ड सुशिक्षित लोक - कूलाबा किवा कसबा पेत् किवा नागपुर शहर मधिल मत् दान टक्केवरि पहा 9. भांडवलदार आणि सरकारी अधिकारी - तेलान्गन च्य तह्सिल्दर सपदले १ कोट चि लाच घेताना (सचिव / आयूक्त ह्या हीशोबाने १०० / २०० कोट घेत असले पहिजेत)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/18/2020 - 16:26 नवीन
ह्या वर तर काहिच कोनि बोलताना दिसत नहिये Narendra Modi puts population back on government agenda https://www.thehindu.com/news/national/narendra-modi-puts-population-back-on-government-agenda/article29103319.ece AUGUST 16, 2019 Centre gets moving on population control law https://www.sundayguardianlive.com/news/centre-gets-moving-population-control-law January 25, 2020 https://edtimes.in/10-points-you-need-to-know-about-the-proposed-population-control-bill/ August 10, 2020 आता यावर परत शाहीन बाग बसणार काय? धार्मिक आणि आचार स्वातंत्र्यावर घाला
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 08/18/2020 - 16:51 नवीन
कायदा करून मग 130 कोटी लोक 2020 साली सुधारणार. आमचा नेहरू लई भारी. 2 पेक्षा जास्त अपत्ये असतील तर इलेक्शन लढता येत नाही , हा कायदा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे ना ?
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 08/18/2020 - 16:57 नवीन
महापौर हारुण शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपविल्याचा आरोप आसिफ बावा यांनी गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. यासंदर्भातील तक्रार त्यांनी आज दाखल केली. शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपवून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. शासकीय निर्णयानुसार तीन अपत्ये असणारी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र असतानाही त्यांनी अपत्याबद्दल माहिती लपवून अर्ज दाखल केला आहे. तो रद्दबातल ठरवावा, अशी मागणी आसिफ बावा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. https://m.lokmat.com/sangli/sangli-municipal-election-mayor-shilkhedars-candidature/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 17:18 नवीन
नेहरू म्हणजे देश नाही. लोकसंख्या वाढ ही गंभीर समस्या आहे हे मान्य आहे पण त्याची कारणे काय आहेत ह्याचा पण विचार करा. पाहिले लोकसंख्या हा प्रश्नच नव्हता जेव्हा नेहरू होते देशाची लोकसंख्या30 ते पस्तीस करोड असेल. मेडिकल सायन्स मध्ये झालेली सुधारणा मुळे लोकांची आयुष्य वाढलं. पाहिले 10 मुल सरासरी एका स्त्री ल असायची पण ते सर्व जगत नसतं त्या मधील 3 ते 4 च जगायची . मेडिकल मध्ये नवीन शोध लागल्या मुळे बाल मृत्यू चे प्रमाण घटले .आणि म्हाताऱ्या लोकांचे प्रमाण वाढले. अजुन सुद्धा लोकसंख्या वाढ हा देशाचा प्रश्न नाही . भ्रष्टाचार, हाच देश समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो नष्ट झाला तर देश ह्या लोकसंख्या सहित उत्तुंग भरारी मारेल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 08/18/2020 - 17:51 नवीन
राजेशभौ, नेहरूंची पत्नि ३७ व्या वर्षीच गेली. त्या अगोदरही त्या आजारीच होत्या. इंदिरा गांधींना दोन मुल झाल्यावर त्यांनी नवऱ्यापासून विभक्त रहायला सुरवात केली. हे सगळं लक्षात घेऊन उत्तरे द्या! जीके उर्फ कूलगाय वगैरेंना चर्चा करायला, वाद घालायला आवडते. त्यामुळे ते एखादा स्फोटक विषय गळाला आमिष लावल्यासारखे लावतात व नंतर मासा गळाला लागायची वाट बघत बसतात. हा पेशन्सचा खेळ आहे. त्यांच्याकडे खूप पेशन्स आहे. जर मासा गळाला नाही लागला तर शांतपणे दुसरे आमिष गळाला लावतात. तुमच्याकडे खूप पेशन्स असेल आणि त्यांनी काहीही लिहिलं तरी तुम्हाला राग न येता तुम्ही प्रतिवाद करू शकत असाल तसेच तरच भाग घ्या. ;) हा विषय खूप भरकटू शकतो व भाषापण खूप खालावली जाण्याची शक्यता आहे. खूप उदाहरणे दोन्ही बाजूंनी देता येतील, हे लक्षात घेऊन प्रशासकांना विनंती केली होती. पण असो.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 08/18/2020 - 18:59 नवीन
भारी लिहिलंय
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/20/2020 - 17:27 नवीन
अहो, जीके उर्फ कूलगाय यांचा व्यासंग खूप मोठा आहे. त्यांना खूप माहिती आहे व ती त्यांना वेळेवर आठवते सुध्दा! ते काय असे तसेच नाहीत. शिवाय त्यांची भाषा खूपच लवचीक आहे. म्हणून जरा राजेशभाऊंना सावध केले. :)
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 08/20/2020 - 18:22 नवीन
मी कुलगाय नाही तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/20/2020 - 18:28 नवीन
ओके. जीके आणि कुलगाय :)
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 08/18/2020 - 19:38 नवीन
पोरे मरत होती म्हणून 7 काढत होते, छान लॉजिक आहे, मग बायका मरत होत्या म्हणून 4 लग्ने करत होते म्हणून लॉजिक दिले तर ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 19:46 नवीन
अनेक बायका करण्याची पद्धत पहिली सर्व धर्मात होती. काळा नुसार बदल होत गेला .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 08/18/2020 - 14:44 नवीन
कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर ?
या प्रश्नाची चार उत्तरे आहेत. १. काही लोक हिंदुत्त्ववादी सरकार असल्यावर सुखी असतात. २. काही लोक काँग्रेसचे राज्य आले की सुखी होतील. ३. काही लोक कोणाचेही राज्य असले तरी सुखी असतात. ४. काही लोक कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी कधीच सुखी नसतात. आपण कोणत्या पर्यायात बसतो त्याप्रमाणे सुखी व्हावे. सर्वकाळ सगळे सुखी राहू शकत नाहीत. रामदास स्वामींचा " जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुच शोधूनी पाहे" हा श्लोक कधी कानावरुन गेला आहे काय ? किंवा गेला बाजार सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट ऐकण्यात आली आहे काय ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 17:06 नवीन
इथे नेहरू,मोदी चा विषय चालला नाही . सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे. पाहिले सामान्य लोक किंवा पूर्ण जनता सुखी होण्यासाठी काय आवश्यक आहे ह्या वर विचार करायला हवा. 1) न्याय व्यवस्था अतिशय कठोर,जलद,आणि न्याय निष्ठुर असावी . तिथे कोणताच भेदभाव केला जाणार नाही. 2) प्रशासन कार्य तत्पर,भ्रष्टाचार मुक्त आणि कायद्याला आणि जनतेला बांधील हवं. कायद्या शी विपरीत काम करणाऱ्या व्यक्ती ला फाशी सारखी शिक्षा असावी आणि लगेच. आर्थिक गैर व्यवहार आणि खून हे गुन्हे एकाच दर्जाचे समजले जावेत. 3) पायाभूत सुविधा पूर्ण देशात निर्माण असाव्यात. 4) वीज,पाणी,रस्ता ह्या प्राथमिक गरजा भागवल्या जाव्यात 5) कोणत्याच व्यक्तीचे कोणत्या ही प्रकारचे शोषण होवू नये.
  • Log in or register to post comments
आ
आर्यन मिसळपाववाला Tue, 08/18/2020 - 17:33 नवीन
सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे. - एक्दम बरोबर आशय बोलला आपन.. सर्वकाळ सगळे सुखी राहू शकत नाही - अश्या भ्रामक कल्पना मधे नको रहायला. १. न्याय व्यवस्था अतिशय कठोर,जलद - अगदि खरे २. पायाभूत सुविधा - सहमत ३. वीज,पाणी,रस्ता ह्या प्राथमिक गरजा - सहमत ४. शोषण होवू नये - सहमत ५. प्रशासन कार्य तत्पर,भ्रष्टाचार मुक्त आणि कायद्याला आणि जनतेला बांधील हवं - सहमत वरिल यदि मधे भर द्वयावि.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 08/18/2020 - 18:51 नवीन
६) त्यात स्विमिंग पूल आणखी गोल्फ कोर्ट दोन्ही असावं. आपली छोटीशी भर :-)) (ह.घ्या प्लिज्ज)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 19:07 नवीन
पक्षीय वेठबिगारी जी रक्तात आहे जी नष्ट होईल तो सुदिन. नाही तर आशिया खंडातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती ला मिळणारे सुख मिळण्याची अपेक्षा samanta लोकांना आहे . असा विचार पक्षीय अफु सेवन केल्या शिवाय मेंदूत निर्माण होणार नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा