कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना.
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
3. बेफिकीर सामान्य माणूस
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
7. परदेशी स्थायिक नागरिक
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून...
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की : १. भ्रष्टाचार संपेल २. किंमती कमी होतील ३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील ४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील--- २०१४ आधी देशात वरिल समस्या होत्या, हे तुम्ही मान्य करताय. याचा अर्थ, कॉंग्रेसने वस्तुंच्या भरमसाठ किमती वाढवून, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन सर्वसामन्य भारतीय जनतेला लुटले हे देखील तुम्हाला मान्य आहे तर. मग देशातील जनतेने वर्तमान सरकारच्या (दिखाव्याला?) पाठींबा दिला तर त्यात चूक काय ? देशातील जनतेने कॉंग्रेससारखा भ्रष्टाचारी व घोटाळेबाज सरकारला पुन्हा निवडून द्यायला हवे होते की काय ? --- गेल्या सहा वर्षात देशात झालेल्या एका तरी घोटाळ्याचे अथवा भ्रष्टाचाराचे नाव सांगा ?