कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.
या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज.
वरील दुसर्या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.
आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)कॉव्हिडच्या भयगंडामुळे
हृदयविकार आणि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील. या भयगंडातून डॉक्टर्स ची सुद्धा मुक्ती झालेली नाही. माझ्या माहितीतील पन्नासच्या वर वय असलेले साधारण ४० % तरी विविध हृदयविकार, मेंदू किंवा शल्यक्रिया तज्ज्ञ आपले दवाखाने बंद करून घरी बसले होते. (यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत हा एक भाग). आता हेच सर्व डॉक्टर परत दवाखाने उघडून बसले आहेत म्हणजे जेंव्हा खरं तर रुग्ण संख्या कमी होती तेंव्हा यांनी दवाखाने बंद ठेवले होते. आणि आता सहा महिने पूर्ण झाले तेंव्हा काय करणार?म्हणून हळूहळू दवाखाने चालू केले आहेत. काही डॉक्टर रोज भारताच्या कोपऱ्यात कुणीतरी डॉक्टर हुतात्मा झाला याची इत्यंभूत बातमी डॉक्टरांच्या ग्रुप वर टाकत असतात. यामुळे डॉक्टरांमध्येच किती भयगंड पसरतो हे मी रोज पाहतो आहे. दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक वरिष्ठ नागरिक सातत्याने होणाऱ्या प्रचाराने बाहेरच पडलेले नाहीत. (ज्यांना उपचारासाठी बाहेर पडायचे आहे अशा अनेकांची मुले त्यांना बाहेर पडू देत नाहीत हि पण वस्तुस्थिती आहे.) यामुळे त्यांच्या चालू असलेल्या उपचारात खंड पडला आहे याचा परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळात समजूनच येईल. काही उदाहरणे. लोकल बंद असल्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण टाटा मध्ये जाऊ शकले नाहीत आणि खाजगी दवाखाने/ रुग्णालये सरकारने जबरदस्तीने कोव्हीड केंद्रात रूपांतरित केल्यामुळे (अशा रुग्णासाठी चालू नसल्यामुळे) लोकांची केमोथेरपी/ रेडिओथेरपी वेळेत होऊ शकली नाही. कित्येक ठिकाणी छातीत दुखत असताना ज्याला अँजियोप्लास्टी करायला हवी होती त्यांना ती करता ना आल्यामुळे रोग बळावण्याची शक्यता बरीच वाढली आहे. एक उदाहरण देतो आहे- एक ६५ वर्षाच्या मध्यमवर्गातील बाई लघवी करायला त्रास होतो म्हणून मागच्या शनिवारी आल्या होत्या. हा त्रास त्यांना जानेवारीपासून होतो आहे. सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे घेऊन झाली आणि रोग वाढेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांनी बाहेर न पडणे पसंत केले. माझ्या कडे आल्या तेंव्हा त्यांना गर्भाशयाच्या तोंडाचा (cervix) कर्करोग झाला आहे आणि तो मुत्राशयापर्यंत पसरून त्यात त्यांच्या डाव्या किडनीची नळी जवळ जवळ बंद झाली असे निदान झाले आहे. अर्थात हा रोग आता स्टेज ३ पर्यंत पोहोचला आहे. मानेला असलेल्या गाठीवर ६ महिने उपचार झाला नाही अशा ३ केसेस आल्या. त्यात २ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले आणि एका २१ वर्षाच्या मुलीला लिंफोमाचे निदान झाले आहे. एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला ओव्हरीचा कर्करोग झाला आहे. पण कोणतीही सोसायटी तिला काम करू देत नसल्याने उत्पन्न शून्य आहे आणि लोकल चालू नसल्याने टाटाला जाण्यासाठी प्रत्येक वेळेस टॅक्सी करणे तिला परवडणारे नाही. (टाटा मध्ये किती चकरा माराव्या लागतात याचा मी मागच्या वर्षी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेच) मी सोनोग्राफी मध्ये १ हजार रुपये सवलत दिली आणि बाकी ८०० रुपये नंतर आणून द्या (ते येतील अशी शक्यता मला तरी वाटत नाही) यापलीकडे मी काय करू शकेन? यात कुणाला दोष देण्याचा हेतू नाही परंतु जी वस्तुस्थिती दिसते आहे ती नाकारता येत नाही.