Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/20/2020 - 14:06
🗣 190 प्रतिसाद

राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.

मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.

आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?

''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.

मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्‍या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 89655 views

🗣 चर्चा (190)
अ
अभ्या.. गुरुवार, 06/25/2020 - 09:15 नवीन
भारत रणांगणावर जिंकतो आणि टेबलावरची चर्चेत हरतो असे ऐकलेले ते खरे की काय असे वाटू लागले.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 06/25/2020 - 08:52 नवीन
NEW DELHI: As various government departments are preparing measures to reduce dependence on Chinese imports, eyes are now on the home ministry that is set to procure close to 50,000 bulletproof jackets — including some for the Indo Tibetan Border Force (ITBP) that is posted on the Line of Actual Control (LAC) and has been involved in a tussle that took place at Pangong Tso lake. The defence ministry’s insistence on continuing with an order for 180,000 bulletproof jackets, even after it came to light that the vendor had switched the critical raw material supplier from western sources to Chinese companies last year, has led to a situation where other forces too could get similar products. Read more at: {{{https://economictimes.indiatimes.com/news/defence/will-bulletproof-jackets-have-chinese-connection/articleshow/76499843.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst}}}
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 06/26/2020 - 05:50 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-politicians-dont-even-know-china-jaydev-ranades-strong-opinion-abn-97-2197854/ वरील बातमीत एका तज्ञांचे चीन संबंधातील मत मांडलेले आहे. त्यात एका ठीकाणे असे म्हट्ले आहे कि कारगील, पठाणकोट,मुंबई हल्ला या संबधी आधी माहीती मिळाली होती , तरीपण हे हल्ले झाले. योगायोगाने एक पत्रही "इतिहासाची गरज नेमकी कशासाठी?" ह्या शिर्षकाखाली प्रसिध्द झाले आहे. त्यात नरहर कुरुंदकरांच्या एका लेखाचा संदर्भ आहे. ज्यात असे म्हटले आहे की, महंमद गझनी सोमनाथ फोडण्यासाठी ३०० मैल हिंदू राजवटीतून चालत आला तरीही प्रतिकार झाला नाही. https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-email-letter-abn-97-26-2197617/ सतर्कता कमी पडतेय का ?
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 06/26/2020 - 06:29 नवीन
भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढत आहे. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असं म्हटलं आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 06/26/2020 - 06:30 नवीन
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 06/26/2020 - 06:32 नवीन
...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/26/2020 - 08:46 नवीन
दुवा गंडला असल्यामुळे काहीच दिसत नाही. नव्याने लिंक द्याल का प्लीज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 06/26/2020 - 11:27 नवीन
https://youtu.be/mJIy0qlNqcI
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/26/2020 - 15:51 नवीन
सरकारने देशविदेशात जाऊन आंतराराष्ट्रीय राजकारणात आपल्या बाजूने इतर देश राहावेत आदानप्रदान होत राहावेत यात आपला मुत्सद्दीपणाचा अभाव आहे असे म्हणायला वाव आहे. श्रीलंका,बांग्लादेश, नेपाळ हे लहान देश चिन्यांच्या बाजुने झालेत. चिन्यांनीही आता बाजार म्हणून या देशांकडे बघायला सुरुवात केलीच आहे. पाकडे त्यांच्या बाजूने आहेतच. आपण ट्रम्प तात्याच्या भरवशावर आहोत त्यांचा किती फायदा झाला ते भारतीय सरकारलाच माहिती. उत्तम मतं, दुव्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/26/2020 - 08:37 नवीन
Image removed.

काल आणि आज सर्वच माध्यमांनी चिन्यांच्या घुसखोरीबद्दल बातमी दिली आहे. चिन्यांनी तंबू टाकून तळ ठोकला आहे. पूर्व लडाखसीमेवरील गलवान खोरे, हॉट्स्प्रींग, पेनगाँग त्सो सरोवरच्या तनावाबद्दल चर्चा सुरुच असतांना चीनच्या सैन्याने उत्तरेकडील डेपसांग पठाराव घुसखोरी केली आहे आहे, ज्या गलवान खोर्‍यात आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले तिथेच चिन्यांनी पक्के बांधकाम सुरु केले आहे असे म्हटले आहे. चित्र गलवान खोर्‍यातील असून नव्या बांधकामाची चित्रे अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध करुन दिले आहे, त्याचा अर्थ नवी दोन बांधकामे चीनने केली असल्याचे म्हटले आहे. आता जे काय असेल ते असेल त्याबाबत आपल्याकडून तरी त्याबाबात फारसे बोलले गेलेले नाही. मला वाटतं आपलं धोरण सध्या शांततेचे असावे आणि संधी मिळाली की त्यांना हुसकावून लावणयात येईल असे वाटते. भारतीय लष्कराकडून याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. देखना है आगे आगे क्या होता है... !

संदर्भासाठी बातम्या लिंका : दै. सकाळ, economictimes -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/26/2020 - 15:46 नवीन
चीनच्या बाजुने सात्यत्याने लष्करी सिद्धता वाढवली जात आहे, अश्या बातम्या आणि व्हिडियो काही काळा पासुन सतत समोर येत आहे. चीनच्या बाजुने :- आपल्या बाजुने :- आपल्या बाजुने टी-९० भीष्म टँस्क आणि बहुतेक टी-७२ टँक बॉर्डरवर सिद्ध असल्याचे समजत आहे. टी-९० भीष्म टँक बद्धल माहितीपट

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/26/2020 - 16:08 नवीन
चिन्यांनी आपल्याला धडकी भरावी म्हणून युद्धाभ्यास केला असावा अशा बातम्या येत आहेत. चीनी सर्वपरीने नाटक करीत आहेत आणि त्याचवेळी इंच इंच नव्हे, तर मिटर मिटर, किलोमिटर आत सीमेत घुसत आहेत. एका नकाशावर आखलेली रेष प्रत्यक्षात जवळ जवळ चार किलोमिटरची सीमा बनली आणि आपल्या बाजूचं टोक तीथपर्यंत आपली ते सीमा समजतात. आणि असा हा मामला वर्षानुवर्ष धुसमसत राहणार असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 06/27/2020 - 18:47 नवीन
या प्रतिसादाचा काही भाग धाग्याशी संबंधित नाही असे वाटण्याची शक्यता आहे.... अवांतर करण्याचा उद्देश नाही! ही चर्चा वाचतेय आणि वाचत राहीन. चांगली चर्चा सुरु केल्याबद्दल बिरूटेसरांचे आभार! चर्चा वाचत असताना आणि ९ जूनच्या " फाईट चायना विथ वॉलेट" धाग्यानंतर, मी काय करू शकेन याचा विचार केला आणि कमित कमी चिनी वस्तू वापरायचा निर्णय घेतला ( माझ्यापुरताच). आत्ता वापरत असलेल्या वस्तू वापरून संपवेन आणि नविन वस्तू घेताना चिनी घेणार नाही. हे मी पाकिस्तान बद्दल आधीच केले आहे. (मी तेथे उत्पादन झालेल्या वस्तू वापरत नाही, त्यांचे संगित/ सिरियल / सिनेमे बघत नाही). ते खूपच सोपे होते. चिनी मार्केट 'ऑल पर्व्हेझिव' असल्यामुळे कदाचित थोडे कठीण जाईलही, त्याची आता मानसिक तयारी आहे. ह्या बाबतीत त्यांचे एन्क्रोचमेन्ट मला मान्य नाही ( जसे भूभागावर नाही तसेच अर्थकारणावरही नाही, म्हणूनच या धाग्यावर हा प्रतिसाद). एक सामान्य नागरिक म्हणून हे मी निश्चित करू शकते. पण या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी यायचे एक आणखी कारण आहे. गेल्या आठवड्यात एक इन्फ्लेटेबल ग्लोबल अ‍ॅटलास घरी आणला. तो फुगवल्यावर मी जो भारताचा नकाशा बघितला तो नुसताच आश्चर्य चकीत करणारा नव्हता, त्याने मी हादरलेच!! भारताची मानच कापून टाकलेली दर्शवली होती त्यात... संपूर्ण जम्मू काश्मिर हा "डिस्प्युटेड टेरिटरी" म्हणून दाखवला होता. भारतापेक्षा पूर्ण वेगळ्या रंगात. हा अ‍ॅटलास व्हिएट्नाम मधून आला होता. बराच विचार केला मी यावर.... नेहमीचा सोडून देणे हा पर्याय मंजूर नाही... मी काही केले किंवा केले नाही तरी फारसा फरक पडेल असे नाही याची पूर्ण जाणीव आहेच. तरीही, जो भाग आक्षेपार्ह दाखवला होता तो, आणि उत्पादक माहिती भोवती नोंद करून , तो अ‍ॅट्लास आणि एक पत्रं मी येथील भारतीय कॉन्सुलेटला पाठवले व त्या पत्राची एक प्रत पंतप्रधानांना पाठवली. बिरुटेसरांनी नेपाळ बद्दल वर लिहिलेच आहे.... आता हे व्हिएट्नाम सारखे लहान देश देखिल ह्या भूभागावरील आपले sarvabhoumatva ( हे मराठीत काही केल्या लिहीता आले नाही) मान्य करत नाहीत किंवा त्याबद्दल संशयास्पद मिस् रेप्रेझेन्टेशन करतात हे मनाला फार त्रासदायक आहे....... आपण नागरिक दक्ष राहिलो नाही तर इतरांना भारत भूमी गिळंक्रुत ( हे व्यवस्थित लिहिता येत नाही हा क्रोमचा प्रॉब्लेम आहे का?) करायला वेळ लागणार नाही हे परत एकदा जाणवून गेले. मग आपल्याला (पाकिस्तान आणि चीन सोडून) इतर देशांचे उपद्व्याप, असे धागे काधावे लागतील अशी काळजीही वाटून गेली. केवळ म्हणूनच हा प्रतिसाद! आता या समस्येवर कायम स्वरूपी इलाज शोधणे तातडीचे झाले आहे. आपण ते करू शकू हा विश्वास आहे, तरीही आपल्या देशाची घरभेद्यांची महान परंपरा द्रुष्टिआड करून चालणार नाही. येत्या काळात सक्षम आणि सतर्क राहण्याची आणि शत्रुला नामोहरम करण्याची भारतीय नागरिकांची सामुदायिक ईच्छा आणि उद्देश असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 06/27/2020 - 18:55 नवीन
पटतंय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/28/2020 - 17:32 नवीन
इशान्य लडाखमधे आपण क्षेपणास्त्रे सीमेवर ठेवली असून चिन्यांचे संभाव्य हल्ले परतवण्यासाठी आपण तयारी केल्याचे बोलले जात आहे, असे असले तरी आपल्या ज्या काही मुद्यांचा प्रश्न आहे, ते मात्र सुटलेले नाही. सहा जूनच्या वेळेसची 'जैसे थे' परिस्थिती ठेवायला चीन तयार नाही. पेनगाँग सरोवरच्या फिंगर चारपर्यंत चीनने घुसखोरी करुन तिथे हेलीपॅडही उभारल्याच्या बातम्यांमधून दिसत आहे. दक्षीणबाजूला चिन्यांच्या हालचाली वाढल्या असून आपण पूर्वीपासून तिथे आहोत असे दाखवायला त्यांची नाटके सुरु आहेत. फींगर चारवर पाचशे मिटर अंतरावर भारत चीन सैन्य आमने-सामने आहेत. भडका इथेच उडण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने ज्या प्रश्नांसाठी हे सर्व सुरु झालं होतं तिथे त्या त्या स्थळांवर आपण तूर्तास बॅकफूटवर आहोत. आज गृहमंत्रीही योग्य वेळी चीन्यांना धडा शिकवू असे म्हणत आहेत. सध्या तरी आपल्याकडे सकारात्मक असे काही नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/29/2020 - 09:05 नवीन
Since Modi's June 19 infamous speech, PLA has encroached on two key Indian border areas: 1. The Depsang "bottleneck" (Y-junction), deep inside India and scene of a 3-week ingress in 2013. 2. The “triangle” near Galwan Valley's Patrol Point 14, scene of the June 15 fatal clashes. टिवटिव दुवा :- Brahma Chellaney Modi vowed the soldiers' deaths "will not be in vain." But today, the "triangle"—including the clashes' site—has come under PLA's control. Rather than giving the promised "free hand," India has asked its Army "not to escalate," thus allowing PLA to keep escalating its intrusions. टिवटिव दुवा :- Brahma Chellaney

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/29/2020 - 10:07 नवीन
आपल्या बाजुने टी-९० भीष्म टँस्क आणि बहुतेक टी-७२ टँक बॉर्डरवर सिद्ध असल्याचे समजत आहे. Amidst tensions with China, how C-17s are lifting the 46 tonne T-90 tanks आपल्या आणि जपानच्या युद्ध नौकांचा एकत्रित युद्ध अभ्यास :- LAC stand-off: India, Japan conduct naval exercise amid China row

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/29/2020 - 10:36 नवीन
अमेरिकेकडून क्षेपणास्त्रप्रणालीला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री येतीय असं ऐकलं.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 06/29/2020 - 11:12 नवीन
कौतुक वाटते ह्या न्युज चॅनेलांचे, त्यातल्या त्यात त्या न्युज नेशन आणि टीव्ही नाईन चे. गेला महिनाभर किंबहुना जास्तच काळ चीन भारत युध्द चालूच आहे अशी चर्चा असते. काय एकेक रिपोर्ट काय एकेक भाष्ये अन खरोखर पोलीस टाईम्स च्या तोंडात मारतील अशा यमकी हेडलाईन्स. " ट्रम्प ने खाई है कसम, चीन होगा अब भस्म" अरे काय? त्यात रक्षामंत्री रशियाला जाऊन डिमांड करायच्या आत रशिया आपल्याला एस ४०० अ‍ॅअर डिफेन्स प्रणाली देणार ह्याची चर्चा चालू. इतकेच नाहीतर ही प्रणाली सीमेवर तैनात झाल्यावर चीन कसा पाय लावून पळणार ह्याचे वर्णन. लगेच ही प्रणाली मंत्रीम्महोदय सोबत येताना विमानात घेऊन येणार असा आविर्भाव. त्या प्र्णालीचे गुणगान दोन दिवस गाऊन झाल्यावर ह्या वर्षात त्या मिलतील असे मंत्री आश्वासन घेऊन परतले आणि तीच एस ४०० सिस्टीम चीन ने सीमेवर उभी केली. लगेच चॅनेलांनी इस्रेली बराकचे गुणगान सुरु केले. एकेक स्पेशल रिपोर्ट्स आणि ब्रेकिंग न्युज पाहता ह्या चॅनेलांना काय हवेय ते अद्याप कळले नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/29/2020 - 11:35 नवीन
टी आर पी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 10/28/2020 - 04:54 नवीन
सकाळ २८ ॲाक्टोबर २०२० भारताची क्षेपणास्त्र मारक क्षमता भेदक करण्यासाठी उपयुक्त बेका ( बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंट ) करारावर शिक्कामोर्तब झाले. या करारानुसार भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लागणारे अचूक भौगोलिक तपशील अमेरिकेकडून मिळतील. 👆 हवाई प्रभूत्व मिळवण्यासाठी हे फार महत्वाचे वाटतंय.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 06/29/2020 - 15:19 नवीन
मन कि बात मध्ये चायना चे नाव सुद्धा घेतले नाही. सीमा पार से ? येड्याचा बाजार आहे नुसता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/29/2020 - 16:54 नवीन
बोलले पण थेट नै. जसे, की ''वाकड्या नजरेने भारतीय भूमीकडे पाहणार्‍यांना कणखरपणे उत्तर दिले जाईल. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृढनिश्चयाने जवानांनी जे बलिदान तोच संकल्प भारतीयांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय बनविले पाहिजे, हीच खरी जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल'' मान्य. आता पुढील पाऊल ? लडाखमधे चिन्यांनी भारतीय सैन्याबरोबर यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मार्शल आर्टमधे पारंगत असलेल्या जवानांची भरती करुन ती बटालियन लडाख आणि सीमाप्रदेशावर चिन्यांची असणार आहे, ही त्यांची तयारी आहे प्रत्यक्ष सीमेवर. आपण रशीयाकडून क्षेपणास्त्र विरोधी रडार घेतले. अमेरिकेकडून अमूक घेतले. जपानकडून अमुक-धमूक युद्ध सराव केला. हे सर्व अभिमान वाटावे असेच आहे, असे असले तरी आपलं मुळ जे दुखणं आहे त्यावर कार्यवाही अपेक्षित आहे, चिन्यांचे सैन्य लडाख आणि सीमेवर जे आत घुसले आहे, ते परत फिरले पाहिजेत, तरच या प्रकरणात भारतीय शिरजोर ठरले आणि आपण आपली भूमी परत मिळवली असे म्हणावे लागेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 06/29/2020 - 16:56 नवीन
हे काय नळावर च भांडण आहे का की माझं नाव का घेतलं आणि नाही घेतलं म्हणायला
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/29/2020 - 17:14 नवीन
प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने वाचावे असे दोन लेख :- ‘Post Galwan battle, Chinese soldiers were in a state of panic’ PLA troops are an anxious group, recall Indian officers बादवे जरासे अवांतर :- वरील एका प्रतिसादात आपण जपान बरोबर नौदलाचा एकत्रित युद्ध अभ्यास केला आहे त्याची बातमी आहे, जपान बरोबर आपले एक वेगळेच नातं देखील आहे जे टोकियो ट्रायल्स या नावाने प्रसिद्ध असुन देखील त्या बद्धल हिंदुस्थानी नागरिकांना तितकीशी माहिती नाही. या संपूर्ण घटनेवर वेब सिरिजी देखील असुन माझा अत्यंत प्रिय अभिनेता इरफान याने त्यात प्रमुख भुमिका केलेली आहे. जालावर असलेली माहिती खाली डकवत असुन त्यात माझी कोणतीही भर नाही... Remembered in Japan, forgotten in India…….. The day was 12 November, 1948. Tokyo Trials are going on in a huge garden house on the outskirts of Tokyo, the trial of fifty-five Japanese war criminals including Japan’s then Prime Minister Tojo, after losing WWII. Of these, twenty-eight people have been identified as Class-A (crimes against peace) war criminals. If proved, the only punishment is the “death penalty”. Eleven international judges from all over the world are announcing……”Guilty”…. “Guilty”…… “Guilty”……… Suddenly one thundered, “Not Guilty!” A silence came down in the hallway. Who was this lone dissenter? His name was Radha Binod Pal a Judge from India. Born in 1886 in the Kumbh of East Bengal, his mother made a living by taking care of a household and their cow. For feeding the cow, Radha used to take the cow to the land near a local primary school. When the teacher taught in school, Radha used to listen from outside. One day the school inspector came to visit the school from the city. He asked some questions of the students after entering the class. Everyone was silent. Radha said from outside the classroom window…. “I know the answer to all your questions.” And he answered all the questions one by one. Inspector said… “Wonderful!.. Which class do you read?” The answer came, “… I do not read…I graze a cow.” Everyone was shocked to hear that. Calling the head teacher, the school inspector instructed the boy to take admission in school as well as provide some stipend. This is how education of Radha Binod Pal started. Then after passing the school final with the highest number in the district, he was admitted to Presidency College. After taking M Sc. from the University of Calcutta, he studied law again and got the Doctorate title. In the context of choosing the opposite of two things he once said, “law and mathematics are not so different after all.” Coming back again to the International Court of Tokyo. In his convincing argument to the rest of the jurists he signified that the Allies, (winners of WWII), also violated the principles of restraint and neutrality of international law. In addition to ignoring Japan’s surrender hints, they killed two hundred thousand innocent people using nuclear bombardment. The judges were forced to drop many of the accused from Class-A to B, after seeing the logic written on twelve hundred thirty-two pages by Radha Binod Pal. These Class-B war criminals were saved by him from a sure death penalty. His verdict in the international court gave him and India a world-famous reputation. Japan respects this great man. In 1966 Emperor Hirohito awarded him the highest civilian honor of the country, ‘Kokko Kunsao’. Two busy roads in Tokyo and Kyotto have been named after him. The law has been included in the syllabus of his sentence. In front of the Supreme Court of Tokyo, his statue has been placed. In 2007, Prime Minister Shinzo Abe expressed his desire to meet his family members in Delhi and met his son. Dr. Radha Binod Pal (27 January 1886 – 10 January 1967) name is remembered in the history of Japan. In Tokyo, Japan, he has a museum and a statue in Yasukuni shrine. Japan University has a research center in his name. Because of his judgment on Japanese war criminals, Chinese people hate him. He is the author of many books related to law. In India, almost nobody knows him and perhaps not even his neighbors know him! A hindi movie was made on him, Tokyo Trials, starring Irfan Khan but that movie never made headlines. …..one of the many underrated & unknown Indians. We have been cheated by hiding the greatness of all our great nation and people as they were interested only in self and own Glory, संदर्भ :- Tokyo Trials – Radha Binod Pal a Judge

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/02/2020 - 11:35 नवीन
खूप लक्ष देऊन यातील न्यायाधीश पाल आणि स्वीडन चा न्यायाधीश यांचे म्हणणे ऐकावे लागते.. हा चित्रपट म्हणजे 'एक रुका हुवा फैसला ' चा जणू एका फार वरचं पातळीवरचे रूपांतर ( तसे एक रुका हुवा हा सुधाच १२ अँग्री मेन याचे रूपांतर होते म्हणा) फक्त १२ सर्वसामान्य नागरिकांनऐवजी ७/८ न्यायाधीश ते सुद्धा प्रत्यक्ष देशाने खास निवडून पाठवलेले म्हणजे यातील वाद प्रतिवाद किती क्लिष्ट असतील याची कल्पना करा मजा आली बघताना .. डोकं दुखलं पण मजा आली
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/29/2020 - 19:09 नवीन
१. पाकव्याप्त काश्मिरमधील हाॅस्पिटलातील निम्म्या खाटा लष्करासाठी मोकळ्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं म्हटलं जातंय. २. रशियातील विमानतळ भारतीय विमानांना केव्हाही वापरता येतील. त्यासाठी पूर्वपरवांगीची गरज नाही असं कळतंय.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/30/2020 - 05:43 नवीन
सरकारने मोबाईलमधील ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली यामुळे काय होणार हे मला तरी माहिती नाही. प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध नसतील परंतू प्ले स्टोअर टाईप विविध स्टोअरवर हे अ‍ॅप्लीकेशन मिळत असतातच. तिथे आणि तशा अनेक स्टोअरवर असे अनेक अ‍ॅप मिळत असतात, जाणकारांना माहिती आहेच. व्हीपीएन द्वारे असे अनेक अ‍ॅप वापरले जातात. असो, सरकारने काहीतरी पाऊल उचललं सरकारचं अभिनंदन. सरकारने हळुहळु अब्जावधी डॉलर्सची जी चीनी गुंतवणूक आहे तिला समूळ नष्ट करुन टाकावे, जे होईल ते होईल. बाकी आज चार वाजता पंतप्रधान आपल्या भेटीला येत आहेत तेव्हा चीन संबंधात काही नवे असले तर धाग्यात येईनच आज चार बजे देखना न भूले.. मेरे प्यारे भाईयो और बहनो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 06/30/2020 - 14:15 नवीन
हे चिनी अ‍ॅप्स बंद करण्याची तांत्रिक प्रक्रिया काय असेल हे जाणण्यास उत्सुक. जे लोक हे अ‍ॅप्स वापरत आहेत त्यांचे बंद पडणार का ? बंद पडणार नसतील आणि ते वापरत राहतील त्यांना शिक्षा वै. करणार का ? शिक्षा असेल तर काय प्रकारची असेल ? सरकारने ज्या अ‍ॅप्स वर बंदी घातली त्याला अस्सल भारतीय पर्याय सरकार ऑफिशियली घोषित करणार का ?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 06/30/2020 - 15:16 नवीन
जे लोक हे अ‍ॅप्स वापरत आहेत त्यांचे बंद पडणार का ? नाही बंद पडणार नसतील आणि ते वापरत राहतील त्यांना शिक्षा वै. करणार का ? नाही शिक्षा असेल तर काय प्रकारची असेल ? नाही सरकारने ज्या अ‍ॅप्स वर बंदी घातली त्याला अस्सल भारतीय पर्याय सरकार ऑफिशियली घोषित करणार का ? नाही फक्त प्ले स्टोअर मधून काढलंय. कदाचित पुढे ISP आधीच install असलेल्या अॅप साठी इंटरनेट ब्लॉक करतील. ताजा कलम : टिक टॉक प्ले स्टोरवर सर्च केलं तर दिसत नाही. गुगल वर सर्च करुन प्ले स्टोअर च्या लिंक वर क्लिक केलं तर प्ले स्टोअर मध्ये tiktok वर जातो आणि इंस्टॉल करता येतं.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/02/2020 - 14:29 नवीन
+१ शेअरइट अ‍ॅपवर बंदी घातल्या नंतर दुसर्‍या दिवशी वापरण्यासाठी उघडलं तर भारत शासनाची सुचना आली ही "शेअरइट हे चिनी अ‍ॅप असल्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे, कृपया वापरू नका, लवकरच आम्ही या संबंधी योग्य त्या प्रक्रिया आणि कार्यवाही करत आहोत" ही अ‍ॅपबंदी साठी टप्याटप्याने तांत्रिक कार्यवाही करण्याची सुरुवात केलीय असे बातम्यांमध्ये दाखवले जात आहे !
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/03/2020 - 06:41 नवीन
ते त्या अ‍ॅप साठी काही पर्यायी अ‍ॅप सुचवत आहेत का ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/30/2020 - 12:01 नवीन
With Chinese troops on Indian territory in 7 places in Ladakh, the PLA is now stepping up activity on the Arunachal Pradesh border. China has activated the Tawang, Walong and Asaphila borders -- which bore the brunt of Chinese attacks in 1962. टिवटिव दुवा :- Ajai Shukla आपल्या बाजुने एअर डिफेन्स सिटिम्स तैनात करण्यात आल्या असुन जमिनीवर M777 howitzers देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत. १] आकाश :- सरफेस टु एअर मिसाइल्स [ रेंज - ३० किमी ] २] Israeli SpyDer ३] Pechora ४] OSA-AK यातील काहींचे माहितीपर व्हिडियो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chinese troops now stepping up activity near Arunachal Pradesh
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 06/30/2020 - 19:19 नवीन
The hindu मद्ये एका रिटायर्ड कर्नल ची वाचनीय मुलाखत छापून आली आहे. बऱ्याच बाबी त्यांनीं समजावून सांगितल्या आहेत. https://www.thehindu.com/news/national/the-pla-has-never-taken-such-a-blatant-step-at-pangong-tso-colonel-retd-dinny/article31956455.ece?homepage=true
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 07/01/2020 - 03:32 नवीन
भौइयो और बहनो... त्यांनी आमचे २० जवान शहीद केलें... बदल्यात आम्ही त्यांचे ५० अप्लिकेशन्स प्ले स्टोर वरून बॅन केले, जे पंडित नेहरूंना जमलं नाही..
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 07/01/2020 - 12:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/01/2020 - 13:02 नवीन
चीन ने पाकिस्तानवर जवळपास संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! आता चीनच्या इशार्‍यावर पाकड्यांनी २० हजार सैनिकांना गिलगिट बाल्टिस्तान मध्ये हलवले आहे. . .. ... बादवे...लाखो हिंदूंच्या कत्तली घडवुन आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करुन इस्लामी राष्ट्राची हिंदुस्थान विरोधात निर्मीती झाली त्याच पाकिस्तानात आज साधा नमाज पढण्याचे वांदे झाले असुन यांचे चीनी आका यांची मुक्तपणे ठासत असुन यांच्या बायकांना देखील चीन मध्ये उचलुन नेत आहेत. [ हिंदूंनी चीनी लोकां कडुन काही तरी शिकावे का ? की इथे राहुन तिथे आत्मियता बाळगणार्‍यांनी बोध घ्यावा ? ] टिवटिव दुवा १ :- Yes this is true... टिवटिव दुवा २ :- Aukaat of Porkistanis after Chinese invaded Porkistan टिवटिव दुवा ३ :- MASTER-SLAVE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pakistan Army Veteran calls Kashmiris Traitors for giving Terrorist locations to Indian Army
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 07/01/2020 - 20:53 नवीन
.....पिवळे चिनी साहित्य मनसोक्त वाचुन देशाचा, देशाच्या पन्तप्रधानाचा व देशाच्या सैनिकान्चा मानभंग, तेजोभंग करणारी व पराकोटीचा द्वेश करणारी व सोयिस्कररित्या खरी माहिती दडवुन खोटी माहिती देणार्‍या व अर्बन नक्षल्यांसारखे आपला अजेन्डा पुढे रेटणार्‍या प्रतिक्रिया देणारी 'पिवळी पिशाच्चे' द्रुगोच्चर होऊ लागली आहेत असे दिसते. आमच्या सैनिकांनी चीनचे ३५ ते ५० सैनिक मारले म्हणुन कदाचित 'दुख्खी आणि वैफल्यग्रस्त' होउन ती 'पिवळी पिशाच्चे' पिसाळली असतील का ?? वरच्या काही प्रतिक्रिया वाचुन तसे वाटले म्हणुन लिहिले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/02/2020 - 05:00 नवीन
लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डीव्हिजन तैनात करण्यात आल्या आहेत. रणगाड़े क्षेपणास्त्रे याच्या पूर्ण सज्जतेसह भारताच्या सैन्यदलात मोठ्या हालचाली दिसत आहेत, तिकडे चीननेही एकीकड़े चर्चा करीत असल्याचे दाखवून सीमेवर सैन्य उभे केले आहे. भारत-चीन या दोन्ही देशांच्या कमांडरस्तरावरील चर्चेत भारताने शोक, दौलतबेग, ओल्डीरोड इथे गस्त घालू नये, ही चीनची मागणी भारताने धूड़कावून लावली आहे. चीनच्या दुस-याच्या हद्दीत घुसन्याचा मूर्खपणा वाढत आहे, तो भाग आमचाच आहे ही मुजोरी कमी झालेली नाही. काल पंतप्रधान यांचं राष्ट्राला उद्देशून भाषणात चीनबद्दल एकही शब्द नव्हता, बोलायचं होतं चीनवर पण बोलले चन्यावर ही टीका होत असली तरी काही गोष्टी आणि सर्वच गोष्टी जाहीर सांगायच्या नसतात. मॅपची लढाई आहे, App ची नाही असे असले तरी चीन विरुद्ध आता सरकारने कंबर कसली आहे, एक भारतीय म्हणून चीनची खोड मोडली पाहिजे असे फार वाटत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/02/2020 - 05:28 नवीन
जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक<\a>
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/02/2020 - 08:07 नवीन
भारत-चीन सीमारेषीय घटनांचा उत्तम मागोवा घेणारा लेख. वर, एका प्रतिसादात उल्लेख आला तो मुत्सद्दीपणाचा. आपण त्यातही बाजी मारणे गरजेचे आहे. युद्ध काही होणार नाही,भड़का कोणत्याही देशाला परवडणारा नाही. सध्या हे गुरगुरणे आहे. आपली आंतरराष्ट्रीय छबी मात्र यामुळे नक्की बनणार आहे, आपण बॅकफुटवर गेलो तर आपल्याबरोबर असलेले,येणारे देशही बॅकफुटवर जातील. सध्या तरी डोळ्याला डोळे भिडवून त्यांना परत फिरवायला मजबूर करणे हे जेव्हा होईल तेव्हा नव्या सरकारचा दबदबा निर्माण होईल,असे वाटते. काल पंतप्रधान मोदी यांचं भाषण साधं होतं, लक्षणीय नव्हतं. अन्नपूर्ण योजनेला मुदतवाढ सांगायला ते टीव्हीवर आले असतील असे मला वाटत नाही, आपला फोकस देशातील प्रश्नावरच आहे असे भासवून चीनचं शेपुट छाटायचा आत विचार चालू असावा असे वाटते. सध्या संयम, शांतता, विचार आणि मग अटॅक् असाही प्लॅन असू शकतो. देखेंगे आगे आगे होता है क्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/03/2020 - 08:37 नवीन
भारत-चीनमध्ये तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल. भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढावे यासाठी व चीनसाठी एक सन्देश असल्याचे बोलले जात आहे. काही उच्चस्तरीय बैठकही आहे असे म्हटल्या जाते. --दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/06/2020 - 08:12 नवीन
चीनचे कॅम्प गलवान खो-यात दीड किमी परत जात आहेत अशी बातमी येत आहे, त्याचवेळी भारतीय सैन्यही असलेल्या स्थानावरुन मागे जायचं असेही म्हटल्या जाते. गलवान खो-यातील नदीपात्रामुळे ते परत ज़ात आहेत असेही म्हटल्या जात आहे. विस्तारवादी शक्तींना रोखणे गरजेचे आहे, या लेहला टाकलेल्या घोषणेमुळे चीन घाबरला असे समजायचं कारण नाही. बाकी दोन स्थळावरच्या स्थानावरुन चीन मागे गेला पाहिजे कोणत्याही अटीशिवाय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 09:28 नवीन
तंबू वगैरे पण मागे राहायला नकोत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/06/2020 - 12:36 नवीन
आपले भारतीय इतके भावनिक होतात की विचारु नका. काल पंतप्रधान लेहला गेल्यानंतर जसे तेथून आपण जिंकलो. राजकीय मुत्सद्दीपणाचीही धाग्यात चर्चा करतोय या धाग्यात. कालचा त्यांचा लेह प्रवास इव्हेंट अथवा नेहमीच्या धक्कातंत्राचा भाग होऊ नये तर त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या दुरगामी परिणाम चांगले व्हावेत व्हावेत, एक भारतीय म्हणून वाटते. तंबू आणि पेट्रोलोंगचे पॉइंट बदललेच पाहिजे. ग्लोबल टाइम्समधे त्यांचं एक वाक्य आहे ''India knows ‘it can’t have a war with China’ ''New Delhi would be ‘more humiliated than 1962’ if it launches a new conflic (संदर्भ : ग्लोबल टाइम्सची बातमी)असे आपल्या देशाच्या मुखपत्रातून धमक्या देणारा चीन असा इतक्या सहजासहजी बॅकफूटवर जाणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय दबदबा जो त्यांचा आघवपणा आहे, त्यावर परिणाम होईल म्हणून यात त्यांची नक्की चाल आहे. आम्ही परत जातो परंतु तुम्हीही परत जावे यात आपण जिंकलो असे काही नाही तर आपण नियमित जिथे पेट्रोलिंग करतो तिथे यायचं नाही असे चीनचे म्हणने आहे, याकडेही आपलं लक्ष असले पाहिजे. भारत चीन बरोबर संघर्ष करु शकत नाही म्हणून भारत तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करतो असे त्यांचे म्हणने आहे, अर्थात यात आम्ही तुम्हाला घाबरत नाही वगैरे इतर काही डावपेच आहेच तो काही भाग नाही. चीनचं म्हणनं आहे की ''भारतीयांना खुश करण्यासाठी त्यांचे पंतप्रधान म्हणतात की सीमारेषेवर सैन्याला सर्व प्रकारचे निर्णय घ्यायला सूट दिली आहे'' ग्लोबल टाइम्सचा लेख काळजीपूर्वक वाचला तर चीन्यांचे अप्रत्यक्षपणे धमकावणे सुरु आहे. आपलंही आपल्याबाजूने सर्वतोपरी गुरगुरणे सुरुच आहे. चिन्यांवर किती परिणाम होतो हे काळच दाखवेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 12:54 नवीन
मला नाही वाटत आपण आपल्याला आत्तापर्यंत मिळणारी सुविधा घाबरून सोडून देऊ. चिनचे सैन्य व तळ मागे गेले की, आपला रस्ता व नदीवर बांधलेला पूल परत निर्धोक होईल. चीन्यांना त्यावर लक्ष ठेवता येईल असे काही मान्य करणे म्हणजे पूल बांधूनही नसल्यासारखाच की हो. मला वाटते, चीन जेव्हा खूप अडचणीत आलेला आहे तेव्हांच नेमके हे पूल बांधण्याचे कृत्य करणे हा आपल्या सैन्याचा डावपेचाचा भाग असावा आणि राजकीय इच्छाशक्तिने सैन्याच्या म्हणण्याला मान तुकवली असावी. त्यावर प्रतिडाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न असावा. माझ्यामागे किती देश आहेत हे सांगायचा चीन प्रयत्न करतोय. भारतही तेच करतोय. फरक एवढाच आहे की, भारतामागे उभे असलेले देश हे संपन्न व ताकदवान व स्वयंभू आहेत. तर चीनमागे उभे राहणारे चीनचे मिंधे आहेत. नेपाळ हा एक मोठा प्रश्न होता. लेहमधे लढायला गुरखा रेजिमेंट ही सर्वोत्तम आहे. ती तर नेपाळविरूध्द वापरता येत नाही. पण तोही प्रश्न सुटायची शक्यता निर्माण झालीय. अर्थात हे सगळे तर्क आहेत. म्युनसिपालटीत उंदीर मारणारे एवढच तर करू शकतात. :)
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2020 - 07:38 नवीन
डोवाल-वँग चर्चेनंतर हे झालेले आहे असे समजते. भारतीय सेनेचे बिल्ड-अप अजून तसेच आहे आणि ते चीनची माघार मॉनिटर करताहेत. अजूनही पेचप्रसंग पूर्णपणे सुटला असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कदाचित १-२ आठवड्यानंतर जरा अधिक कल्पना येईल. भूतानची पण काही जमीन आमचीच म्हणून चीन आता बोंब मारतोय. रशियाबद्दलही गरळ ओकून झालीच आहे. हे सगळं दबावतंत्र आहे असं म्हणण्यास वाव आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर खेळणं हे युद्धनीतीत डिकॉय म्हणूनच वापरलं जाणारं तंत्र आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2020 - 07:41 नवीन
चीनच्या वृत्तपत्रांनुसार भारतानंच चीनची आगळीक केलेली आहे, चीन निष्कारण यात ओढला जातोय आणि चीनच शांततेचे प्रयत्न करतोय असं चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रांवर किती विश्वास ठेवायचा हा एक मोठाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 09:17 नवीन
१९६२ च्या युद्धात भारतीय सैन्य पळत सुटले. चीनी सैनीक पाठलाग करत मागे लागले. असे करत ते आसाम मधे म्हणजे आत्ताचा (अरूणाचल प्रदेश ) घुसले. याच मार्गाने आपण तिबेटशी संबंध ठेवत आलो होतो. दलाई लामाही याच मार्गाने पळून भारतात आश्रयासाठी आले होते. मात्र त्यानंतर चिनी सैनिक माघारी परत गेले. त्यांना बहुधा हा सगळा थोरातांचा सापळा वाटत होता. प्रतापगडाखाली जसा अफजुलखान स्वखुशीने चालत आला होता, तसंच चीन अरूणाचल प्रदेशात चालून आला होता. त्याचे रसदीचे सर्व माग ताणले गेले होते. आजूबाजूच्या डोंगरात भारतीय सैन्य तोफेच्या बाराच्या इशाऱ्याची वाट बघतंय अशी कदाचित चीनी सैन्याला भिती वाटली असेल. हे सर्व आजूबाजूचे भाग भारतीयांना परिचित व चिनी सैन्याला अगम्य होते. थोरातांनी हेच सांगितले होते की, अशा स्थितीत आपण प्रत्येक चीनी सैनीक कापून काढू शकू. पराजयाच रूपांतर विजयात करू शकू. प्रतापगडाच्या लढाईचा थोरातसाहेबांनी अभ्यास केला नसेल हे कसे शक्य आहे? पण थोरातांना सगळं युध्द संपल्यावर, आता काहीही करता येणार नाही अशी परिस्थिती आल्यावर दिल्लीवरून बोलावणं आलं. नेहरू, कृष्णमेनन व कौल यांना शिवाजी महाराज, त्यांचा गनिमी कावा, डोंगर दऱ्यांचा उपयोग करून करायचं त्यांच युध्दतंत्र वगैरे कळणं शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना थोरातही कळले नाहीत. पण चिन्यांना मात्र या सगळ्यातला धोका कळला होता. ते ताबडतोब तिथून मागे फिरले. पण ते जिथून मागे फिरले तिथपर्यंतचा भाग आपण जिंकलेला असून तो भाग आपला आहे अशी गैरसमजूत त्यांनी करून घेतली आहे. हेच गलवान खोऱ्याबाबतही झाले आहे. आपण मात्र आपला जिथपर्यंत ताबा आहे, तो आपला भाग म्हणत आहोत. सर्व जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी तिबेट मुद्दामहून बफर स्टेट म्हणून ठेवला होता, त्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू होता, तेच धोरण पुढे चालू ठेवले असते तरी पुष्कळ झाले असते. पण आपण तसेतर केले नाहीच, उलट आपली तिबेटमधली आपली सैन्याची तुकडी परत बोलावली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2020 - 08:22 नवीन
Indo-China Dispute | भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा झटापट https://marathi.abplive.com/news/india/india-china-border-conflict-chinese-troops-carried-out-movements-in-eastern-ladakh-millitary-level-talks-underway-803404?utm_source=app&utm_medium=sharebutton&utm_campaign=appreferral -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा